पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही
नेईल काळजासी तो तुझा हात नाही
एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही
ईथे श्रावणाला आता धार नाही
किती सरी जळाल्या वणवा वादळात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे...
कमरेत वाकलेला वड उभा अंगणात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
प्रतिक्रिया
20 May 2015 - 8:52 am | चित्रगुप्त
आवडली कविता. आधीच्या पेक्षा सुगम आणि घट्ट बांधणीची.
......मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे........ हे खासच.
20 May 2015 - 10:22 am | अर्व
धन्यवाद चित्रगुप्तजी...
प्रयत्न सुरु आहे...अधिक सुगम आणि घट्ट बनवण्याचा..
20 May 2015 - 10:51 am | किसन शिंदे
आवडली!
20 May 2015 - 11:09 am | चित्रगुप्त
या निमित्ताने कवितेतील सुबोधता आणि निर्बोधता, गेयता आणि अगेयता, परंपरा आणि नवता, विस्कळितपण आणि नेटकेपण, छंदबद्ध आणि मुक्तछंद वगैरेंचा सौंदर्यानुभूतीशी कसा काय संबंध असू शकतो, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो.
20 May 2015 - 11:25 am | विशाल कुलकर्णी
वाह..
20 May 2015 - 11:56 am | गणेशा
कविता छान आहे, पुढील कवितेस शुभेच्छा !
20 May 2015 - 12:08 pm | psajid
खुप छान कविता !
20 May 2015 - 12:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अजुन एक सुंदर रचना..
20 May 2015 - 2:00 pm | चुकलामाकला
उसावे... म्हणजे?
20 May 2015 - 3:03 pm | अर्व
उसावे म्हणा किंवा उसवावे.. किंवा संपावे एकच
23 May 2015 - 11:50 pm | एक एकटा एकटाच
सुरेख!!!!!!!
25 May 2015 - 12:45 pm | अर्व
धन्यवाद