चिंब
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही
नेईल काळजासी तो तुझा हात नाही
एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही
ईथे श्रावणाला आता धार नाही
किती सरी जळाल्या वणवा वादळात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे...
कमरेत वाकलेला वड उभा अंगणात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
वाचन
2832
प्रतिक्रिया
12