लाटा समुद्राच्या सखे पायात तू माळु नको,
बेडयाच त्या पैंजण न्हवे, त्यावरी भाळु नको।
चंद्र हा निघतो प्रवासा रोजच्याच भेटगाठी
गोंदुनी भाळी तयाला, तू अशी मिरवू नको।
मुक्त वारा या नभीचा नाद याचा मोकळा,
जखडूनि केशी तयाला, तू अशी अडवू नको।
वाहते हे जल-कलंदर, राख़ण्या मर्जी स्वत:ची,
पाट बांधुनी तयाला, तू अशी फिरवू नको।
लाभतो कधी का किनारा, या नभाला सखे,
क्षितिज-कुम्पण तव नयनिचे, त्यावरी बांधू नको।
प्रतिक्रिया
23 Apr 2015 - 8:00 pm | पैसा
सुंदरच लिहिलीय कविता!
24 Apr 2015 - 7:50 am | एक एकटा एकटाच
आवडली
छान आहे
24 Apr 2015 - 8:01 am | श्रीरंग_जोशी
या कवितेत जान आहे.
24 Apr 2015 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा
प्रत्येक शेवटाला जोरदार टाळ्या!
26 Apr 2015 - 7:39 pm | Vimodak
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार....
29 Apr 2015 - 5:31 pm | गणेशा
अप्रतिम .. एकदम जबरदस्त .. अति सुंदर आहेत कविता तुमच्या.
असेच लिहित रहा... वाचत आहे...
29 Apr 2015 - 5:54 pm | एस
मस्त!
29 Apr 2015 - 6:10 pm | अनुप ढेरे
मस्तं!
16 May 2015 - 9:51 am | नूतन सावंत
सुरेख.
16 May 2015 - 9:52 am | किसन शिंदे
फार सुरेख कविता लिहिता तुम्ही.