काय पाहिजे सुचत नाही..
सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही..
जिवनातले काही अटळ पैलु
का टळत नाही?
ईच्छा असते तसं घडत नाही
स्वप्नात घड्ते पण...
पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही?
ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????
प्रतिक्रिया
25 Feb 2015 - 1:48 am | पदकि
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????: मस्तच!
25 Feb 2015 - 9:29 am | शब्दानुज
किती अपेक्ष्ा ठेवता इच्छा असुद्या अपेक्ष्ा नको
25 Feb 2015 - 11:22 am | राशी
अपेक्षा नाहित पण काही सुप्त व्यथा आहेत ज्या फार क्षणिक आहेत. ज्या कधीनाकधी प्रत्येकाने अनुभवल्या असतील.
25 Feb 2015 - 9:45 am | ज्योति अळवणी
छान आहे कविता. पण थोड़ी अधूरी वाटली
25 Feb 2015 - 11:29 am | राशी
आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.
28 Feb 2015 - 4:36 pm | यसवायजी
ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
>>
हेच चुकतं तुम्हा बायकांचं. एकदा मागुन तर बघा, मिळेल मिळेल. :))))
28 Feb 2015 - 6:10 pm | टवाळ कार्टा
त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै?
याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका
28 Feb 2015 - 6:21 pm | यसवायजी
@ त्याच्या कडे मागता येत नाही..
मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >>
पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे?
'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)
28 Feb 2015 - 6:29 pm | टवाळ कार्टा
"," ने कै फायदा होतो नै ;)
3 Mar 2015 - 6:07 pm | राशी
काही लोकांना दुर्लक्ष करण्याची कला मिसळ्पाव वर अवगत होइल असे वाटते आहे.
28 Feb 2015 - 8:31 pm | चेतन677
लई भारी आहे कविता..