कायं झालं कसं झालं
नाई काईचं कयलं,
उभ्या पिकाचं वावरं
यकायकी उलंगलं १
आता लोकं डोयापुळे
होतं चांदनं खेयतं,
यकायकी कुठूनं हा
आला अंधार पयतं २
रेती थापटूनं खोपे
किती पायावरं केले,
पायं काळतां भाईरं
सारे खचूनचं गेले ३
मनातले मांडे सारे
मनातचं रायले ,
पोटरकी धांडे नाई
ते नाईचं निसयले ४
झाळं पळलं वार्यातं
आता कुठची सावली,
गेला उळूनं सोनुला
रडं रडली माऊली ५
प्रतिक्रिया
16 Mar 2015 - 9:10 am | प्रचेतस
आपण फ्यान झालोत राव तुमच्या वर्हाडी बोलीतील कवितांचे.
17 Mar 2015 - 8:06 am | यसवायजी
+१ असेच म्हणतो
17 Mar 2015 - 3:50 am | रुपी
आवडली..
19 Mar 2015 - 11:57 pm | ऊध्दव गावंडे
खूप खूप धन्यवाद,वल्ली, रुपी, यसवायजी
प्रतिसादा बद्दल,आभार आपला युकेजी
युकेजी= ऊध्दव काशीराव गावंडे
मिसळपाव, संमं, तसेच मिपा करांना खूप खूप धन्यवाद!
20 Mar 2015 - 12:03 am | मधुरा देशपांडे
आवडली. लिहीत राहा.
20 Mar 2015 - 9:35 am | ऊध्दव गावंडे
आभारी आहे.