मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
23 Apr 2025 - 10:09 am

आतंकवादी बेलगाम
पुलवामा,पहलगाम.......
होतच रहाणार
कुठवर मानवतेचं कलेवर
ॐ शांती म्हणत ओढत रहाणार

रोज रोज कुठवर मरायचं
XXX की औलाद,
तोंडाला लागलयं रक्त
भ्याड हल्ले बघत रहायचं

कुठवर आसवं गाळायची
कुठवर मेणबत्ती जाळायची
एकजुट होणार,का?
फक्त राजकिय पोळी भाजणार

भळभळतीय जखम
नकोय आता रकम,हवा
डोळ्याला डोळा,गोळीला गोळी
आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी

नको अश्वासने नको वल्गना
हवी गुरूवाणी,शिवगर्जना
पुरे आता दया,क्षमा,शांती
मिटवा एकदाची खाज त्यांची

पुनश्च पेटवा मशाली
जाळून टाका विषवल्ली
बनू आता विश्वगुरू ,
नरसंहाराने
विश्व शांतीची सुरवात करू......

पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना.

कुसुमाग्रज यांचे ते शब्द आठवतात...

लढतील सैनिक लढू नागरिक
शर्थ लढ्याची करू.......

दृष्टीकोनदेशभक्तिसांत्वनाभयानकबिभत्सकरुणप्रतिशब्द

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2025 - 1:34 pm | चौथा कोनाडा

पुनश्च पेटवा मशाली
जाळून टाका विषवल्ली
बनू आता विश्वगुरू ,
नरसंहाराने
विश्व शांतीची सुरवात करू......

पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना.

समयोचित रचना !

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2025 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2025 - 12:30 pm | प्रसाद गोडबोले

कधी निघताय मग तुम्ही बदला घ्यायला ?

=))))

मुक्त विहारि's picture

27 Apr 2025 - 12:43 pm | मुक्त विहारि

त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात....

ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात.

इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2025 - 3:02 pm | अमरेंद्र बाहुबली

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

मुक्त विहारि's picture

28 Apr 2025 - 4:20 pm | मुक्त विहारि

इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार?

असो,

आनंद आहे....

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2025 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला.
2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ?

की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ?

राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव .
नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

मुक्त विहारि's picture

28 Apr 2025 - 6:47 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात....

पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2025 - 7:12 pm | प्रसाद गोडबोले

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा.

पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे.
बघू काय म्हणतात ते.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2025 - 7:15 pm | अमरेंद्र बाहुबली

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

मुक्त विहारि's picture

28 Apr 2025 - 7:32 pm | मुक्त विहारि

पण ते एकांगी कशाला?

राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प...

पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प....

नुह बाबतीत, तुम्ही गप्प.

संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प.

बरे ते जाऊ द्या....

नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प.

आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला...

व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे.

कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका...

इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात...

अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा.

आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल.

पटत नसेल तर सोडून द्या.

आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2025 - 8:01 pm | प्रसाद गोडबोले

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद !

2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो.

2029 नंतर बोलू.

श्रीगुरुजी's picture

29 Apr 2025 - 12:09 am | श्रीगुरुजी

कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच.

एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Apr 2025 - 9:37 am | चंद्रसूर्यकुमार

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 10:35 am | अमरेंद्र बाहुबली

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.
नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

मुक्त विहारि's picture

29 Apr 2025 - 1:23 pm | मुक्त विहारि

त्यामुळे,

स्वतः:ची भूमिका नाही....

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2025 - 1:44 pm | श्रीगुरुजी

कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे.

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा.

मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2025 - 12:37 pm | मुक्त विहारि

"मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार."

अर्थातच...प्रश्नच नाही...

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Apr 2025 - 8:29 pm | चंद्रसूर्यकुमार

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.

पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2025 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी

आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे.

भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते.

पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे.

आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते.

दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे.

भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं.

अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे.
.

भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे.
काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे.

जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील

पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर.....

चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे.

सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील.

संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे.

अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे.
देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे.

युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.

ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत.

इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये.

एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.

वामन देशमुख's picture

29 Apr 2025 - 7:44 am | वामन देशमुख

समयोचित कविता आवडली. भावना पोचल्या.