आणीबाणीतले अनुभव

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
27 Jun 2018 - 7:22 pm
गाभा: 

आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत.
पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही).
तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

प्रतिक्रिया

रामदास२९'s picture

27 Jun 2018 - 9:10 pm | रामदास२९

आणिबाणी अनुभवलेली नाही .. पण ऐकिव लिखाणानुसार सरकारी चमचे, खुशमस्करे यान्नी अक्षरशः धुमाकूळ घातला होता .. लोकान्च्या वाईट कार्यपध्दती सुरुवातीला सुधारल्या( कामावर वेळेवर येणे ईत्यादी) पण नन्तर कथित उद्दिष्टान्पासून भरकटल्यामुळे विरोधी वातावरण तयार झाले. समाजवादी, जनसन्घ यान्नी कडाडून विरोध केला. तसेच अजून एक निरिक्षण म्हणजे उत्तर भारतात आणिबाणीला दक्षिणेच्या मानाने जास्त विरोध झाला.. प्रत्यक्ष अनुभवलेली नाही त्यामुळे जे ऐकण्यात, वाचनात आले ते लिहिले...

सर टोबी's picture

27 Jun 2018 - 10:36 pm | सर टोबी

या विषयावर पूर्वी, माझ्या अंदाजाने, विकास यांचा सविस्तर प्रतिसाद एका धाग्यावर आला होता. त्यात त्यांनी संप, औद्योगिक आणि सरकारी कारभारात असणारी बेशिस्ती या मुळे एकूणच अस्थिर झालेले जीवन याचा चांगला उहापोह केला होता. हा सर्व प्रकार किती गंभीर होता हे सांगताना गुजरात मधील वैद्यकीय महाविद्यालयातील एका आंदोलनामुळे जो वणवा पेटला होता तो कसा देशभर पसरत चालला होता त्याची आठवण सांगितली आहे.

विशेष म्हणजे आणीबाणीच्या सुरवातीच्या काळात तर जनतेत कमालीचे समाधानाचे वातावरण होते. बसेस, रेल्वे वेळेवर धावणे, सरकारी कार्यालयात एकूणच कामाच्या वेळेच्या बाबतीत झालेले सुधारणा या मुळे जनतेत समाधान होते. आजही रेशनिंगच्या दुकानात शिल्लक असलेला साठा लिहण्याची असलेली शिस्त हि आणीबाणीच्या दिवसांची आठवण आहे. मुंबईत फोर्ट भागात स्मगलिंगच्या वस्तू मिळणारे स्टाल्स पूर्णतः बंद पडले होते आणि लोक मोकळेपणाने फुटपाथवरून चालू शकत होते. आज जेंव्हा फ्लेक्स काढण्याची देखील कोणी इच्छाशक्ती दाखवू शकत नाही तेंव्हा मजबूत प्रशासन असल्याने काय चमत्कार होऊ शकतो याच्या केवळ दंतकथांवरच आपल्याला समाधान मानावे लागेल.

मला वाटते आणीबाणीच्या दरम्यान कधीतरी, संजय गांधींना पुढे आणण्याचा भाग म्हणून, त्यांचा २० कलमी कार्यक्रम सरकारी पातळीवर राबवण्यात यायला लागला. त्यातील नसबंदी हा सर्वात जास्त बदनाम झालेला उपक्रम. यात सरकारी नोकरांना नसबंदीची उद्दिष्ट दिली गेली. यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी उद्दिष्ट सध्या करताना केलेली मनमानी यामुळे आणीबाणी (ज्याला सरकारी पातळीवर अनुशासन पर्व म्हटले जायचे) बद्दल लोकांच्या मनात घृणा निर्माण झाली.

काँग्रेसच्या काळात सर्वच गोष्टी वाईट होत्या याचा लोक जेंव्हा म्हणून उल्लेख करतात तेंव्हा तेंव्हा त्यांचा निव्वळ विशेषणावर भर असतो. साठ वर्षाची घाण, लांगुलचालन वगैरे वगैरे. प्रत्यक्षात किस्सा कुरसिका प्रकरण, विद्याचरण शुक्ल नावाचे रंगढंगी मंत्री असे हातावरच्या बोटावर मोजता येतील इतकेच किस्से आहेत. काळाच्या ओघात त्यांना काही महत्व देखील राहिले नाही यावरून त्यांचा किरकोळपणा लक्षात यावा. प्रत्यक्षात बघाल तर संजय गांधींनी सुरु केलेला मारुती उद्योग आज गेली ३५ वर्षे एक महत्वाचा उद्योग म्हणून गणला जातो आणि सरकारला बरीच वर्षे त्याने चांगला महसूल मिळवून दिला आहे. सरकारी कामातील शिस्तीची घडी बरीच व्यवस्थित आहे आणि त्याला काही राज्यांमध्ये अधिक बळकटी आणली जात आहे.

समाजाला शिस्त लावण्यासाठी परत कधीतरी आणीबाणी लावावी लागेल का? मला वाटते त्या आणीबाणीला १९७५ च्या आणीबाणीचे यश मिळणे शक्य नाही. २५-३० कोटींची बेशिस्त जनता आणि १२५ कोटींची बेशिस्त जनता इतका हा नुसता स्केलचा फरक आहे. त्यात राजकारण हा, ज्यांना काहीतरी वारसा आहे, त्यांच्यासाठी तर करिअरच झाली आहे. महागड्या गाड्या, स्टाईल स्टेटमेंट होईल अशी पोषाखाची पद्धत (कोणत्याही ऋतूत घोंगडी किंवा शाल पांघरुणे). राजकारणाची पकड सैल होणे आणि प्रशासन मजबूत होणे हाच एका चांगल्या राष्ट्राचा पाया होऊ शकतो आणि तो देण्याची आणि मागण्याची सध्यातरी आपल्या समाजात कुणाला गरज वाटत नाहीये.

मराठी कथालेखक's picture

28 Jun 2018 - 11:12 am | मराठी कथालेखक

त्या धाग्याचा दुवा किंवा धागा शोधण्याकरिता एखादी महत्वाची खूण (धागालेखकाचे नाव, धाग्यातील आठवत असलेले एखादे वाक्य) असे काही देवू शकता का ?

सुबोध खरे's picture

29 Jun 2018 - 10:10 am | सुबोध खरे

टोबी सर
आपल्याला आणीबाणीचा किती अनुभव आहे हे मला माहिती नाही प्ररंतु आपण वर लिहिलेले हे एक अजेंडा मनात ठेवून लिहिलेले आहे.

तेंव्हा सर्वांच्या मनात होती ती शिस्त नव्हे तर प्रचंड भीती होती. कारण मिसा कायदा. या कायद्याखाली कोणालाही विनाचौकशी कितीही दिवस अटकेत ठेवता येत असे. हा कायदा १९७१ साली पास झाला होता आणि हा घटनेच्या ९ व्या अनुसुची मध्ये टाकला होता ज्यामुळे या कायद्यावर न्यायालयीन प्रतिबंध टाकता येत नसे. (याच घटनेच्या ९ व्या अनुसुची मध्ये टाकून तामिळनाडू मध्ये ७० % आरक्षण आहे आणि हे प्रकरण न्यायालयात राजकारणामुळे प्रलंबित आहे). या कायद्यात आणीबाणी मध्ये अनेक वेळा पाहिजे तसे बदल केले गेले होते.

या कायद्याचा गैरवापर झाल्याने लोकांत प्रचंड भीती होती.या पण काम केले नाही तर आपल्याला कधीही अटक होईल या भीतीने सरकारी कर्मचारी कामे करत असत. पण केंव्हा कोणाला काय कारणासाठी अटक होईल हे माहित नव्हते. गाडी उशिरा आली तर मोटरमनला अटक होत असे एस टी नीट चालवली नाही तर चालकाला चौकशीला बोलावले जात असे. आणि एकदा माणूस चौकशीसाठी गेला तर तो केंव्हा परत येईल याची कोणालाही खात्री नव्हती.

स्मगलिंग हातभट्टी इ बंद होते कारण आपण कारवाई केली नाही तर आपल्यालाच अटक होईल या भीतीने पोलिसांनी सर्व संशयग्रस्तांना अटक करून आत टाकले होते. सार्वजनिक सोयीच्या गोष्टी चांगल्या चालत होत्या याचे कारण प्रचंड भीती हे होते

याला तुम्ही जनतेत कमालीचे समाधानाचे वातावरण होते म्हणताय बढिया है

रेशन च्या दुकानात धान्य मिळत असे हा गैरसमज आहे पण त्याबद्दल कोणी ब्र काढायची बिशाद नव्हती.

साधे "वीस" कलमी कार्यक्रम च्या मागे कुणीतरी चारशे लिहून चारशे वीस केले तर गिरगावात पोलीस आठवडाभर फिरून येणाऱ्या जाणारी पोरांना फटकावत असत. कारण हे असे करणारा सापडला नाही तर आपली नोकरी जाईल/ तुरुंगात टाकले जाईल हि पोलिसांनाच भीती होती.

इंदिरा गांधी यांनी ढवळाढवळ केली नाही असे एकही सरकारी खाते नव्हते ज्यात सर्वोच्च न्यायालय आणि घटना सुद्धा सामील आहे. आपल्या मर्जीतील लोकांना न्यायाधीश नेमण्यापासून ते मर्जीतील न्यायाधीशांना "ए एन रे" सरन्यायाधीश करण्यापर्यंत मजल गेली. https://en.wikipedia.org/wiki/A._N._Ray
मग या सरन्यायाधिशानी इंदिरा गांधी यांचा लाळघोटेपणा इमानदारीत केला.

https://www.indiatimes.com/news/india/the-darkest-hour-in-indian-judicia...

How it led to the making of draconian law
Chief Justice A N Ray, beholden to Mrs. Gandhi for his appointment as the Chief Justice after superseding other senior judges, chose to disregard the unanimous conclusion advanced by all the other high courts of the country on the same question. They all agreed that, even in the darkest period of political turmoil, a citizen could approach the high courts under Art. 226 of the Constitution for appropriate remedy through writ jurisdiction. CJI Ray chose to overrule all those judgments and closed the gate of the courts to the ordinary citizen of the country demanding justice in very unjust times.
निदान आपण विकी मधील आणीबाणी बद्दल लेख तरी वाचायला हवा होता
https://en.wikipedia.org/wiki/The_Emergency_(India)

https://en.wikipedia.org/wiki/Kesavananda_Bharati_v._State_of_Keralaकायद्याच्या अभ्यासकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी हि केस आहे.
मारुतीची एकंदर कहाणी "एकाधिकार शाही राबवून मारुतीला कसे वर आणले गेले आणि इतरांना कसे खच्ची केले गेले" आपण वाचलीत तर आपले मत "कदाचित" बदलू शकेल.

हा सर्व काळ माझ्या उत्तम स्मरणात आहे.

तेंव्हा आणीबाणीचे समर्थन करणारा कुणी असेल तर एक तर त्याने आणीबाणी पाहिलेली नाही किंवा तो काँग्रेसचा अंध भक्त आहे असे स्पष्ट आहे.

अजेन्डा दिसण्यामध्ये आणि काँग्रेस भक्त दिसण्यामध्ये काय वाईट आहे? माझ्या प्रतिसादातील 'साठ वर्षांची घाण' आणि 'लांगूलचालन' हि शब्द रचना तर तुम्हालाच डोळ्यासमोर ठेऊन केली आहे. इतकी घाण असणारा देश जेंव्हा भाजपच्या ताब्यात आला तेंव्हा लगेच महिन्याभरात फेकुन्ना मंगळ मोहिमेचे उदघाटन करण्याची संधी मिळाली. तेंव्हा आपल्या प्रतिसादात तारतम्य असावे हि अपेक्षा आहे.

जेंव्हा भाजपा विरुद्ध काँग्रेस हा वाद अहमिहिकेने लढविला जातो तेंव्हा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणारा युक्तिवाद आणि विशेषणांचा भडीमार करणारी भक्तांची मानसिकता.

आणि मारुतीला जीवदान दिले ते जनता सरकारने. आणि एकाधिकारशाही राबवून इतरांचे खच्चीकरण कसे काय झाले ते सविस्तर लिहाना. वरती मी म्हटलेच आहे कि नुसता विशेषणांचा भडीमार. आजमितीला निदान दहा कंपन्या, प्रत्येकी ५ वाहनांचा पोर्टफोलिओ घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यातील सर्वात तरुण कंपनी निदान वीस वर्षांची आहे. खच्चीकरण करून अशी वृध्धी होते का?

विजुभाऊ's picture

30 Jun 2018 - 3:19 pm | विजुभाऊ

भीतीए मुळे का होईना लोक शिस्तीने काम करीत होते.
भारतीय लोकाना शिस्त लावायला भीती हेच योग्य साधन आहे.
ज्या दिवशी स्वयंस्फूर्ती ने पुण्यात ट्राफीक ला शिस्त लागेल तो दिवस सुवर्ण दिवस म्हणता येईल.
गणपतीची मिरवणूक कमी काळात संपणे हे हल्ली कायद्याचा बडगा असूनही शक्य होत नाहिय्ये.
साधी हेल्मेट सक्ती केली तरी ती लोक झुगारून लावतात.
लोकांना सरळ करायचे असेल तर बडगाच हवा.

कुमार१'s picture

28 Jun 2018 - 11:25 am | कुमार१

की त्या काळातील अनंत चतुर्दशीची पुण्यातली मिरवणूक कशी गुमान ८ तासांत संपली होती!
आणीबाणी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 'सकाळ'ने त्यांची अग्रलेखाची जागा ठळकपणे कोरी ठेवली होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2018 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे आणीबाणी चांगली होती म्हणायची. मी इंदिरा गांधींचा आधीच फॅन. त्यात आणीबाणी मध्ये लोकांना शिस्त लागली हे वाचून बरं वाटलं. ह्या देशातील जनतेला कायदे लावल्या शिवाय सुधारणा होत नाही. असल्या लोकांना आणीबाणी मुळे शिस्त लागली असेल तर आणीबाणी हे खरंच अनुशासन पर्व म्हणून साजरे व्हावे.

आणीबाणी हा काळ खरोखर अनुशासन पर्व म्हणावा लागेल.
सर्वसामान्य लोकांना काही त्रास जाणवला नाही.
नाही म्हणायला आमच्या शाळेतील काही शिक्षक हे राजकीय कारणासाठी अटकेत होते.
माझे एक नातेवाईक देखील राजकीय कैदेत होते. त्याना एकदा भेटायला गेलो होतो त्यावेळेस ते सर्व जेलमधे आनंदात दिसले.
हसत खेळत गप्पा मारत होते.
या काळात रेशनवर धान्य आले नाही , मोर्चे , दगडफेक , बंद हे काहीच आढळत नव्हते.
लोक टॅक्स चुकवेगिरी न करता प्रमाणीक पणे भरत होते.
एक चांगला कणखर नेता काय करु शकतो हे दिसून आले.
देशाला अशा आणिबाणीची खरोखरच पुन्हा एकदा गरज आहे.
विशेषतः हिंदी न्यूज चॅनल्स वर आणिबाणी ची जास्त गरज आहे.

आणिबाणीच्या अगोदर जयप्रकाश नारायण यानी पोलीस दले , निमलकष्करी दले आणि सैन्य दले यानी उठाव करावा असे आवाहन केले होते.
असे आवाहन करणे हे किती मूर्खपणाचे आहे याची आत्ता जाणीव होते.
इंदीरा गांधी इतका कणखर आणि निर्णय घ्यायला न डरणारा नेता या देशाला त्या नंतर कधी मिळालाच नाही.
मोदी त्या मार्गाने प्रगती करत आहेत. ही सुदैवाने चांगली गोष्ट आहे.

आंणीबाणीत स्वात:ला आलेले अनुभव असे कोणी का लिहीत नाही .?

मी आणीबाणी काळात फार धमाल केली . ती शिस्त मला तर काही लागली नाही . अक्षरश: धुमाकूळ घालायचो असे म्हणा ना त्या काळात .

त्यावेळी माझे वय दीड वर्षे होते . फार मस्ती करायचो मी....

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, तुरुंगवास याची कणभरही भीती न बाळगता माझी आणीबाणीविषयक मतं मी खुद्द आणिबाणीतही उच्चारवाने आणि स्पष्टपणे सतत मांडत असे. पण प्रत्येक वेळी मी काहीही विरोधी मत कंठशोष करून मांडू लागलो की कोणीतरी येऊन दुपटं चेक करून जात असे किंवा पळीभर बडीशेपेचे पाणी तोंडात घालून मला उभे धरून ढेकर आणवीत असत. आणीबाणीने त्यांची आकलनशक्ती नष्ट केली होती.

राही's picture

5 Jul 2018 - 11:23 pm | राही

!

रविकिरण फडके's picture

28 Jun 2018 - 2:34 pm | रविकिरण फडके

Please excuse me; transliteration is not working on my laptop so compelled to use English.

A less known fact: the Maharashtra govt (most likely fearing that the vari would be used for instigating people against emergency) banned the annual Pandharpurchi vari in the year 1976. So it did not happen.

So much for the great, uninterrupted tradition of a few hundred years. When the chips are down, Vitthal does not matter.
And that's how it would always be. Aadhi potoba, mag vithoba!

विशुमित's picture

28 Jun 2018 - 5:57 pm | विशुमित

पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

एमी's picture

28 Jun 2018 - 11:25 pm | एमी

बरं मग राही यांनी लिहिलेला
http://www.aisiakshare.com/node/4215
हा लेख चालेल का?

आणि हि अजूनेक लिंक असावी म्हणून
http://www.aisiakshare.com/node/4215

अरेच्चा एकच लिंक दोनदा दिली का मी!!

http://aisiakshare.com/node/4645

पिवळा डांबिस's picture

29 Jun 2018 - 2:02 am | पिवळा डांबिस

आणीबाणी आणि त्यानंतरची काही वर्षे हे एक दु:स्वप्न होतं.
डीटेल्स सांगून उगाच कशाला जुन्या जखमा जागवायच्या?
आणीबाणीने एक मात्र झालं. आपण आदर्श मानलेली सर्वपक्षीय नेतामंडळी ही किती क्षुद्र आणि पोरकट आहेत हे आणीबाणी आणि त्यानंतरच्या काही वर्षांतच समजलं.
थोडक्यात आमच्या श्रामोंच्या शब्दात सांगायचं तर "आम्ही मोठे झालो!"
:(

खेडूत's picture

29 Jun 2018 - 8:19 am | खेडूत

नेमकं!
खपली न काढणं चांगले!
७ व्या वर्षी बरंच भोगावे लागले. आठवणी नको वाटतात!
बाकीचे विषय आहेत की.. एंजॉय!!

वेळेवर येत आणि कामही करीत. एकदा विक्रीकर भवन चे दरवाजेच सकाळी ९.३० ला बंद केले आणि नंतर आलेल्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना गैरहजर मांडले होते. मी तेव्हा विक्रीकर खात्यात नोकरीला होतो. सरकारी कामे पटापट होत आणि छोट्या कामांसाठी सरकारी माणसांनी पैसे खाणे जवळजवळ नष्ट झाले होते. मूंबईच्या आरटीओ कार्यालयात आणि जकात नाक्यावर देखील. नंतर कधीही एवढी शिस्त दिसली नाही. परंतु भारत बचाओ म्हणून एक सरकार पुरस्कृत मानला गेलेला निधी मात्र जमा करीत.

पंचाईत झाली होती ती बिनबुडाच्या बातम्या, सरकारविरोधात काहीही आवाज उठवणार्‍यां पत्रकारांची. फालतू बकबक करणार्‍या विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांची.

पण संजय, शुक्ला, बन्सी अशा बगलबच्चाची अफाट तोडपाटीलकी चालत असे आणि ही नावे खाजगीत शिव्या म्हणून वापरली जात. दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात या शिव्या वापरल्या आहेत.

यात बरेवाईट काय होते याबद्दल मी आणखी कोणतेही मत मांडू इच्छित नाही. आपला आपण निष्कर्ष काढावा.

शेखरमोघे's picture

29 Jun 2018 - 7:40 am | शेखरमोघे

आणिबाणीत काय चालत होते याचे बर्‍यापैकी वर्णन "Indu Sarkar" या चित्रपटात पाहायला मिळेल. बर्‍याच लोकाना आणिबाणीच्या विरोधात बोलण्याची भीती वाटत असल्यामुळे अनेक युक्त्या योजल्या गेल्या. एक नमुना - Obituary for Democracy - इथे पहाता येईल https://www.scoopwhoop.com/Obituary-Of-Democracy-Emergency-1975/#.meiuarafb

पुण्यात तुरुन्गात डाम्बलेल्या लोकानी त्यान्चा कैदेतला काळ वेगवेगळ्या अभ्यासात घालवला. युक्रान्द च्या कुमार सप्तर्षीनी याबद्दल लिहिले आहे.

मराठी_माणूस's picture

29 Jun 2018 - 8:43 am | मराठी_माणूस

शिस्त, अनुशासन पर्व वगैरे सामान्य माणसाला समाधान देणार्‍या गोष्टी घडल्या तर मग ह्याच सामान्य माणसांनी त्यांना परत निवडुन का दिले नाही ?

बबन ताम्बे's picture

30 Jun 2018 - 5:05 pm | बबन ताम्बे

माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले होते. 77 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिलेले जळजळीत अग्रलेख आठवतात. लोकसत्ता त्यावेळी मुंबईत सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक होते .

बबन ताम्बे's picture

30 Jun 2018 - 5:06 pm | बबन ताम्बे

माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले होते. 77 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिलेले जळजळीत अग्रलेख आठवतात. लोकसत्ता त्यावेळी मुंबईत सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक होते .

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 12:13 pm | सुबोध खरे

मग ह्याच सामान्य माणसांनी त्यांना परत निवडुन का दिले नाही ?
असे प्रश्न विचारायचे नसतात नाही तर तुमच्या वर "प्रतिगामी, भक्त" असे शिक्के बसतील

चौकटराजा's picture

29 Jun 2018 - 9:03 am | चौकटराजा

आणीबाणी ही फक्त युद्ध असले की असते असा गैरसमज होता . काही पत्रकारांनी अग्रलेख मुददाम कोरा ठेवला होता की की तो सेन्सर झाला होता ई समजायला वाव नव्हता . आणीबाणीत एकूण नोकरशाही वर्ग व समाज याना शिस्त लागली होती हे खरे ! आज लोक अघोषित आणीबाणी आहे असे म्हणतात पण खरी परिस्थिती उलट आहे . मोदी ना लोक हुकुमशहा म्हणतात पण माझे मते हुकुम्शाहाचे काय अधिकार त्याना आहेत ? काहीच नाही . आजची सरकारे , सरकारी मंडळी, राजकारणी , नोकरशहा यांची कर्तुते पाहिली की या तथाकथित हुकुम्शाहाचा कुणाला धाक आहे असे वाटत नाही . लेखक , विचारवंत या मध्ये काही लोक सरकारने पदे , पुरस्कार देऊन विकत घेतलेले असतात व काही न दिलेले रहातात . जे रहातात हे भुंकत रहातात मग सरकार कोणतेही येवो . आणीबाणी त संघ परिवाराच्या अनेकाना मात्र सुडाने वागविण्यात आले यात शंका नाही. संघवाला व मटका किंग यांच्यात काही फरक करण्यात आला नाही हा मोठा लोकाशाहीवरचा डाग आहे. तरीही आणीबाणी व बाबरी मशीद हे दोन्ही विषय राजकारणी व विचारवंत आपल्या स्वार्थासाठी निष्कारण चघळत असतातच !

कपिलमुनी's picture

29 Jun 2018 - 11:17 am | कपिलमुनी

आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य , मूलभूत स्वातंत्र्य यांची पायमल्ली झाली असे त्यावेळच्या बातम्या मधून समजते .
अनुशासन , शिस्त यासाठी स्वातंत्र्यचा बळी देउ शकत नही

सोमनाथ खांदवे's picture

29 Jun 2018 - 12:37 pm | सोमनाथ खांदवे

चौकटराजा म्हणतात "आणीबाणीत एकूण नोकरशाही वर्ग व समाज याना शिस्त लागली होती हे खरे ! आज लोक अघोषित आणीबाणी आहे असे म्हणतात पण खरी परिस्थिती उलट आहे . मोदी ना लोक हुकुमशहा म्हणतात पण माझे मते हुकुम्शाहाचे काय अधिकार त्याना आहेत ? "

मी काँग्रेस चा कट्टर विरोधक आहे पण आणिबाणी बद्दल जे काही वाचलंय तेंव्हा पासून काँगेस च्या फक्त इंदिरा गांधी चा फॅन आहे . मी तर म्हणेन आपल्या भारत सारख्या लोकसंख्या चा स्फोट झालेल्या देशाला एक तर हुकूमशाहीचीच गरज आहे असं वाटतंय .
कुठे ही कचरफेकने , रस्त्यावर पान तंबाखू खाऊन पाचपच थुंकणे , भारतात राहून पाकिस्तान वरील प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करने , सामान्य गरीब लोकांना सार्वजनिक ठिकाणी व सरकारी ऑफिस / दवाखान्यात तुच्छ वागणूक देणे , सरकारी कार्यालयात पैसे सरकावल्या शिवाय कुठलेही काम न होणे मग तो गरजू किती ही गरीब असो या गोष्टी लोकशाही मध्ये सर्रास चालतात . लोकशाही मध्ये भ्रष्ट्राचार दूर होऊन किमान स्वछता , आरोग्य शिक्षण व्यवस्थित भेटेल याची काही शक्यता वाटत नाही .
शेतकऱ्यांना किमान दर प्रत्येक कामगारांना किमान वेतन अजून ही दिवास्वप्न च आहेत मग काय पेटवायची का असली लोकशाही ?

सुबोध खरे's picture

29 Jun 2018 - 12:52 pm | सुबोध खरे

मग काय पेटवायची का असली लोकशाही ?
उद्वेगाने आपण हे म्हणता आहेत हे ठीक आहे.

पण एक उदाहरण म्हणून सांगतो नाणार प्रकल्पाला विरोध असणाऱ्या सर्व स्थानिक लोकांना विनाचौकशी तुरुंगात टाकून प्रकल्प पूर्ण केलेला चालेल का? किंवा बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या ऐवजी तुरुंगात खितपत टाकले तर चालेल काय?
आणीबाणी अगदी हेच झाले.

Turkman gate demolition and firing was an infamous case of political oppression and police brutality during the Emergency when the police shot and killed people protesting against demolitions of their houses ordered by Indira Gandhi's government in 1976 to cleanse Delhi of slums and force poor residents to leave Delhi and move to distant settlements.

https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19780115-sanjay-gand...

सोमनाथ खांदवे's picture

29 Jun 2018 - 11:01 pm | सोमनाथ खांदवे

अहो , पण चीन च्या कम्युनिस्ट हुकूमशाही मध्ये प्रकल्प विरोधकांना कुठं सरसकट जेल मध्ये टाकतात ? त्यांच्या हुकूमशाही मुळे झालेली प्रगती सर्वांनी पहिली अनुभवली असेल . आणि त्यांचा दरारा पहा चीन वर डोळे वाटरण्या अगोदर अमेरिका दहा वेळा विचार करते . आणि आपल्या लोकशाही पुरस्कृत सरकार ला पाकिस्तान , मालदीव, मलेशिया , बांगलादेश , नेपाळ , श्रीलंका हे आपले शेजारी देश आपल्याला भीक ही घालत नाही . कारण आपल्याला अजून आपले भारतातील बेसिक प्रॉब्लेम च सुटलेले नाहीत तर आपण चीन अमेरिका सारखी जागतिक हवालदाराची भूमिका कधी करणार ?

रानरेडा's picture

29 Jun 2018 - 11:32 pm | रानरेडा

चीन च्या कम्युनिस्ट हुकूमशाही मध्ये प्रकल्प विरोधकांना कुठं सरसकट जेल मध्ये टाकतात ?

तुम्ही हे विनोदाने म्हणत आहात का ?
चीन चा इतिहास आपण थोडा हि वाचला नाही का ?

https://www.independent.co.uk/arts-entertainment/books/news/maos-great-l...

https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_of_landlords_under_Mao_Zedong

http://www.nybooks.com/daily/2018/02/05/who-killed-more-hitler-stalin-or...

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2018 - 10:09 pm | टवाळ कार्टा

मी स्वतः चीनमध्ये राहुन आलोय.....तिथे सरकार सगळ्यात मोठ्ठा गुंड आहे....सरकारबद्दल अवाक्षर काढणार्या व्यक्तीला सरकार कधी/कसा गायब करेल कोणाला थांगपत्तासुद्धा लागणार नाही....दडपशाही आहे तिथे...आणि जो काही विकास दिसतो तो फक्त बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी ठरावीक शहरे सज्ज करुन केलेला देखावा आहे

जेम्स वांड's picture

5 Jul 2018 - 4:15 pm | जेम्स वांड

एकदा तियानमेन चौकात कसे कम्युनिस्टांनी स्वतःच्याच पुढल्या पिढीवर रणगाडे घातले होते ते वाचून घ्याच.

"तुझ्या प्लॉट वर ३०० मजल्याची टोलेजंग इमारत बांधून घेऊन पण तू तिच्याकडे पाहिलेस तरी तुला बुडावर फटके देऊ"

हा विकास तुम्हाला आवडत असेल तर शुभेच्छा. मला स्वातंत्र्य अनमोल वाटते. हा जो "पेटवायची का असली लोकशाही?" विचारायचा जो हक्क आहे तो अमूल्य आहे

जाता जाता

आणीबाणी म्हणलं की भलेभले उजव्या विचारसरणीचे लोकही थेट लिबरल मूल्यांचा हवाला देऊ लागतात, ते पाहणे बडे मजेशीर असते. एकंदरीत इतिहासात कम्युनिस्टांनी मारलेल्या कुविख्यात "कम्युनिस्ट कोलांटी" इतकेच मजेदार.

ट्रेड मार्क's picture

30 Jun 2018 - 2:23 am | ट्रेड मार्क

आणीबाणी का लावली यावर कोणीच काही बोललं नाहीये.

१९७१ मधील रायबरेलीची निवडणूक इंदिरा गांधी जिंकल्या होत्या. त्यांनी राज नारायण यांना पराभूत केले होते. राज नारायण यांनी हा विजय चुकीच्या मार्गाने मिळवलेला आहे अशी केस कोर्टात दाखल केली. यात असं म्हणलं होतं की श्रीमती गांधींचे निवडणूक सहाय्यक यशपाल कपूर हे सरकारी नोकर होते. म्हणजेच त्यांनी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लावली. जज सिन्हा यांनी या प्रकरणात श्रीमती गांधींना संसदसदस्यत्व रद्द केलं आणि ६ वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली. यावेळी इंदिरा गांधी स्वतः कोर्टात उपस्थित होत्या.

इंदिरा गांधींनी या निर्णयाविरोधात जे अपील केलं ते जस्टीस कृष्णा ऐयर यांच्या समोर सुनावणीला आलं. त्यावेळेला जस्टीस ऐयर हंगामी जज म्हणून काम पाहत होते. २४ जून १९७५ ला जज ऐयर यांनी जज सिन्हांच्या या निर्णयाला स्थगिती दिली पण संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यास आणि संसद सदस्य म्हणून पगार घेण्यास मनाई केली.

या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून विरोधी नेत्यांची आणि त्यांच्या सदस्यांची धरपकड करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर नन्तर १९७६ मधे काँग्रेसच्या रॅली मध्ये गायला नकार दिला म्हणून प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यावर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन वर गाण्यास बंदी घातली, जी आणीबाणी संपेपर्यंत कायम राहिली. तसेच जनता पार्टीचे संसद सदस्य अमृत नाहटा यांच्या "किस्सा कुर्सी का" या १९७७ मध्ये बनलेल्या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली. यात संजय गांधी आणि तत्कालीन सूचना, दूरसंचार मंत्री व्ही. सी. शुक्ला आणि काही काँग्रेस कार्यकर्ते यांच्यावर या फिल्मच्या मूळ प्रतीसहित इतर सर्व प्रती नष्ट केल्याबद्दल कोर्ट केस करण्यात आली.

बाबू लोक वगैरे वेळेवर कामाला यायला लागले कारण कोणत्याही कारणावरून केवळ नोकरी जाईल याचीच नव्हे तर कुठलीही कारवाई होईल याची भीती होती. तसेच सरकारच्या किंवा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याविरुद्ध तसेच नितीविरुद्ध कोणी जरा जरी काही बोललं तरी लगेच कारवाई होत होती.

व्यक्तिस्वातंत्र्य गेल्या ४ वर्षात नष्ट झालंय म्हणून जे गळा काढत आहेत त्यांना खरंच तसं होणं म्हणजे काय याची कल्पनाही नाही. इथे मिपावर तरी विद्यमान सरकारच्या बाजूने बोलणारे गायब झालेत. आणि विरोधात बोलणारे मात्र मोदींवर अगदी वैयक्तिक टीका करून वर व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतीये आणि मोदी एकाधिकारशहा आहेत म्हणतात. आहे की नाही गंमत!

मोहन's picture

30 Jun 2018 - 2:33 pm | मोहन

वर इतरांनी सांगितल्या प्रमाणे तरुण-भारत च्या अग्रलेखाची जागा कोरी होती. सेन्सार केला गेला असे कळले. आमच्या परिचयाचे एक संघाचे प्रचारक होते ते भुमिगत झाल्याची अफवा होती. एका परिचीतांना रातोरात अटक झाली असावी असा संशय होता. नाक्यावर, थेटरमधे टोळक्यांनी होणारी वासुगीरी दुसर्याच दिवसापासून बंद झाली. आमच्या घराजवळच्या मैदानात संघाची शाखा भरत असे, ती बंद झाली. ( पुढे काही दिवसांनी कुणाच्या घरी, गच्चीवर वगैरे लपून छपून भरत असे). पहीले दोन तीन दिवस कुणाला काहीच कळत नव्हते, पुढे हळुहळू लोक सरावायला लागले. सगळी कडे, विशेषतः सरकारी कामकाजात शिस्त दिसू लागली, आमच्या कालेजातले सगळे प्राध्यापक वेळेवर हजर राहायला लागले, चीरीमिरी टाईपचा भ्रष्टाचार पूर्ण बंद झालेला दिसत होता. हे सगळे आम्हाला अनपेक्षित पण सुखावह वाटत होते. लोकांमधे दोन तट झाले होते. पहीला आपल्याला असेच हुकुमशाही , सरळ करणारे सरकार हवे असे मानणारा, तर दुसरा हा बळजबरीचा रामराम फार दिवस चालणार नाही व नंतरची अनागोंदी कल्पनेच्या बाहेर असेल व म्हणून विरोध करणारा.
४-५ महिन्यानंतर बर्याच गोष्टी हळुहळू बाहेर येवू लागल्या. जबरीची नसबंदी, शिक्षकांना नसबंदीचे दिलेले टारगेट, तुर्कमान गेट प्रकरण झाले, संजय गांधींच्या सुरस व चमत्कारीक कथा. आम्हा लोकांत इंदीराजी ह्या संजय व त्याच्या चांडाळ चोकडीच्या हातातले बाहुले बनल्या आहेत हा विचार पक्का होत होता. ह्या सगळ्याचा परिणाम हळुहळू आम्हा लोकांचे मत बदलण्यात व्हायला लागला. लवकरच, आपल्याला अन्न, वस्त्र व निवार्या बरोबरच वैचारिक स्वातंत्र्य आवश्यक असल्याची जाणीव व्हायला लागली. मग जेंव्हा निवडणुका जाहीर झाल्या तो पर्यंत आमच्या कालेजातले संपूर्ण जनमत इंदीराजींच्या विरुध्द गेलेले होते.

गामा पैलवान's picture

30 Jun 2018 - 10:28 pm | गामा पैलवान

लोकहो,

माझ्या खाती एक ऐकीव अनुभव आहे. ऐकीव अशासाठी की देशातल्या आणीबाणीच्या काळी अस्मादिकांची आणीबाणी चड्डीत साजरी होत असे.

त्या काळी तांदूळ मिळायची मारामार होती. आमच्या वडिलांनी टिटवाळ्याहून कुठूनसे दहा किलो तांदूळ पैदा केले व ठाण्यास घरी आणले. रेलवे स्थानकावरून घरी एव्हढं वजन आणता येणारं नव्हतं. म्हणून रिक्षा केली. रिक्षावाल्यास कळलं की तांदूळ आहेत. त्याने उतरतांना जास्त पैशाची मागणी केली. आमचे वडील म्हणजे साक्षात जमदग्नी! त्यांनी सरळ नकार देऊन पिशवी खाली उतरवली. रिक्षावाल्याने तक्रार करायची धमकी दिली. आमच्या तेर्थरूपांनी त्याच्या सणसणीत कानाखाली भडकावली. वर म्हंटलं की, जा आणि करायची तिकडे कर तक्रार माझी.

पुढं काही झालं नाही.

आणीबाणीस बाळासाहेब ठाकऱ्यांचा पाठिंबा होता. वडील शिवसेनेतल्या अनेकांना ओळखायचे. काही गडबड झाली असती तर निस्तरणं अवघड पडलं नसतं बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे, संक्षिप्त रूपात पुन्हा थोडेसे. आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता. पुढेपुढे संजय आणि त्याच्या भाटांनी अतिरेक केला. मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या दोन पावसाळ्यांत कुठेही पाणी तुंबले नाही की लोकल गाड्या एक मिनिटसुद्धा उशीरा धावल्या नाहीत. बेस्ट बसेससुद्धा वक्तशीर होत्या, इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेच्या अगदी एक फूट इतक्या जवळ थांबायच्या. लोक शिस्तीत रांग लावून उभे असायचे. आजूबाजूला पोलीस फारसे नसत पण वातावरणात दरारा होता. आणिबाणी नकोशी होण्यात नसबंदीचा अतिरेक ही बाब जास्त कारणीभूत झाली. मुळात सरंजामी उत्तरेकडे पुरुषांना अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य असते. नसबंदीमुळे आपल्या लैंगिक सुखावर घाला येईल असे त्यांना वाटले. संततिनियमनासाठी बायकांवरच्या हिस्टेरोक्टॉमी या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांची नसबंदी कितीतरी सोपी. कमी खर्चाची,कमी त्रासाची. तरीही पुरुष लोक या शस्त्रक्रियेला तयार नसत. अजूनही नसतात. इंदिरा गांधी स्वत: एक बाईमाणूस. त्यांनाच हे कळू शकले. म्हणून बायकांच्या शस्त्रक्रियांऐवजी नसबंदीला त्यांनी प्राधान्य दिले. पण यामुळे बिमारू राज्ये, जिथून सर्वाधिक खासदार संसदेत जातात, ती खवळून उठली. कधी नव्हे ते हिंदूमुस्लिमांत कॉमन कॉझ होऊन हातमिळवणी झाली. दक्षिणेत फारसा विरोध झाला नाही. नंतरच्या निवडणुकीत दक्षिणेने दिलेले पाठबळ उत्तरप्रदेशातल्या तुफानी झंझावातापुढे कमी पडले. कॉंग्रेसची पार वाताहत झाली.
आणीबाणीमागची कारणे, परिस्थिती, परिणाम यावर लिहिण्यासारखे खूप आहे. समाजवाद्यांनी सुरू केलेल्या आणि प्रामुख्याने चालवलेल्या या आंदोलनाचा जनसंघाला अतोनात फायदा झाला. त्यांना व्यासपीठ मिळाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व लोकांना कळले वगैरे पुष्कळ मुद्दे आहेत. माझ्या दृष्टीने एक सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे संततिनियमन हा विषय राजकीय अजेंड्यातून कायमचा बाहेर पडला. त्याचे नावही नको म्हणून कुटुंबकल्याण हे नवे नाव दिले गेले इतकी नावड त्या शब्दाविषयी निर्माण झाली. असो. इथे सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेता येण्याजोगा नाही. ते फार विस्तृत प्रकरण होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2018 - 11:59 am | प्रकाश घाटपांडे

माझ्या दृष्टीने एक सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे संततिनियमन हा विषय राजकीय अजेंड्यातून कायमचा बाहेर पडला. त्याचे नावही नको म्हणून कुटुंबकल्याण हे नवे नाव दिले गेले इतकी नावड त्या शब्दाविषयी निर्माण झाली.

अगदी समर्पक. आता लोकसंख्या वाढीविषयी वा संततीनियमनाविषयी कोणीच बोलायला तयार नाही. वोट बँक सांभाळायची आहे

मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या दोन पावसाळ्यांत कुठेही पाणी तुंबले नाही

हायला

इंदिराजी एवढ्या पावरबाज होत्या कि वरुणराजावर पण त्यांनी आणीबाणी लावावी?

उदो उदो असावा पण म्हणून उंदराला ऐरावत म्हणायचं म्हणजे फार झालं.

माझ्या आठवणीत मुंबईत पाणी तुंबलं नाही असं गेल्या पन्नास वर्षात एकही वर्ष झालेलं नाही.
कारण ज्याला मुंबईची उत्तम माहिती आहे त्याला एवढं मूलभूत ज्ञान आहेच कि भरतीच्या वेळेस तुफान पाऊस झाला कि पाणी तुंबतंच.

पौर्णिमा अमावास्येला साधारण दुपारी आणि रात्री बारा वाजता पूर्ण भरती असते. रात्री पाऊस झाला तर कळत नाही पण सकाळ पासून संततधार लागली कि १२ वाजेपर्यंत मुंबईची तुंबई होते आणि भरती संपली कि पाण्याचा निचरा होतो. तुम्ही काय वाटेल ते करा.

आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झाले तेंव्हा लोकसंख्य फारच कमी होती आणी "आताची मुंबई महापालिका" नव्हती तरी पाणी तुंबतच असे.

आता-- या निचरा होणाऱ्या गटाराच्या व्यवस्थेत आपण बेसुमार प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यात अडथळे आणतो आहोत आणि जेथे तेथे सिमेंटीकरण केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी थेट गटारात जाते आणि त्या यंत्रणेवर बेसुमार भार पडतो.

इंदिरा गांधींनी वरुणराजावर आणीबाणी लादली असे नव्हे तर मुंबई मनपाचे कमिशनर भालचंद्र देशमुख यांनी सर्व नोकरशाही आणि कचरा उचलणारे ठेकेदार यांना कामाला लावले. भालचंद्र देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय व स्वच्छ अधिकारी होते. आणि आपले कर्तव्य न करण्याबाबत कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ही धडाडी ते दाखवू शकले.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 6:59 pm | सुबोध खरे

काहीही

सुबोध खरे's picture

2 Jul 2018 - 10:01 am | सुबोध खरे

एकंदर माझ्या लक्षात आला आहे कि ज्यांनी आणीबाणीतील दहशत प्रत्यक्ष पाहिलेली नाही त्यांना त्यातील भयामुळे येणाऱ्या शिस्तीचे प्रचंड आकर्षण आहे. शिस्तीचा अतिरेक किती असू शकतो या गोष्टी ज्यांनी पाहिलेल्या नाहीत किंवा अनुभवलेल्या नाहीत त्यांना हे आकर्षण असणे कदाचित नैसर्गिक असेल पण हे आकर्षण दोन वर्षे देश लष्कराच्या ताब्यात द्या असे म्हणणाऱ्या लोकांसारखेच आहे. पण "घी देखा लेकिन बडगा नाही देखा" हि स्थिती आहे.
लोकांना चीनच्या "शिस्तीबद्दल" आकर्षण वाटते हि गोष्ट जास्त गंभीर आहे. आणि काही लोक केवळ भाजप ला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या कोणत्याही गोष्टीला चांगले म्हणायला तयार आहेत हि गोष्ट फारशी चांगली नाही.
शिस्तीचा अतिरेक म्हणजे काय हे मी लष्करात अनेक वर्षे अनुभवलेले आहे आणि सत्ता लष्कराच्या हातात दिली तर काय होईल हेही माहिती आहे. सुदैवाने "भारतीय लष्करी अधिकारी" याना लोकशाही काय आहे याची संपूर्ण जाण आहे. त्यामुळे आपल्याकडे ७० वर्षाच्या कालावधीत एकही वर्षे (लष्करी) हुकूमशाही आलेली नाही. त्याच दिवशी स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानची स्थिती पहिली तर हि गोष्ट आपल्या लक्षात यायला हरकत नाही.
असो. यापुढे याबद्दल काही लिहिणे हा केवळ कालापव्यय असेल.
इति लेखनसीमा

विशुमित's picture

2 Jul 2018 - 10:28 am | विशुमित

शतप्रतिशत सहमत..!

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2018 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे
कल्याणकारी मर्यादित हुकुमशाही अशा काहीशा संकल्पनेचे आकर्षण लोकांना वाटते. शेवटी शिस्तीमधे स्वातंत्र्याचा संकोच होतच असतो.

कपिलमुनी's picture

2 Jul 2018 - 1:34 pm | कपिलमुनी

भारतीय लष्कराने लोकशाहीचा नेहमीच सन्मान केला आहे. कधिहि राजकीय परीस्थीतीचा फयदा न घेता कायम सपोर्ट करत लोकशाही मजबूत करायल मदत केलि अहे .
आपल्या देशात प्रत्येक चांगली गोष्ट दुसर्‍ञाने करावी असे वाटते .
शिस्त सुद्धा स्वयंशिस्त न पाळता दुसर्‍यने लावावी असे वाटते

मराठी_माणूस's picture

2 Jul 2018 - 10:46 am | मराठी_माणूस

मुठभर लोकांच्या सत्तेच्या हव्यासापायी , असंख्य निष्पाप आणि निरागस नागरिक भरडले गेले. सगळ्या देशाल हे काही काळाने लक्षात आले .
ज्यांचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नव्हता (कलाकार, साहीत्यीक इ.) तेही मग विरोधात उतरले आणि आलेल्या निवडणुकीतुन लोकांनी आपले योग्य ते मत दिले.

अनुप ढेरे's picture

2 Jul 2018 - 1:42 pm | अनुप ढेरे

राही यांच्या धाग्यावर मिपासदस्य अरविंद कोल्हटकर यांचा प्रतिसाद बोलका आहे.

खनिज तेलाच्या किंमतीतील अनपेक्षित वाढ, दुष्काळ, बांगलादेशी निर्वासितांचा भार अशांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडायला आली होती, त्यातच जयप्रकाशसारख्यांचे देशाला निर्नायकतेकडे न्यायचे प्रयत्न ह्यांच्यावर उतारा म्हणून आणीबाणी अपरिहार्य ठरली असे म्हणणे म्हणजे शुद्ध कांगावा आहे. माझ्या स्मृतीनुसार देशाची आर्थिक स्थिति इतकी नाजूक झाली नव्हती की आणीबाणी आणि इंदिरानेतृत्व हेच त्यावर इलाज आहेत असे वाटावे. तसे पाहिले तर स्वातन्त्र्य मिळाल्यापासून देशाचे हे ना ते आर्थिक प्रश्न होतेच आणि दरिद्री दीनवाण्या लोकांची जेथे प्रचंड संख्या आहे अशा देशात ते असणारच. दुष्काळ पूर्वीहि येऊन गेले होते, उदाहरणार्थ १९६१-६२ सालातहि पाऊस खूपच उशीरा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. तरीहि 'देश नाकाला सूत लावलेल्या स्थितीत आहे' असे आमच्या सारख्यांना १९७५ मध्ये आणीबाणीच्या समर्थकांनी सांगेपर्यंत कधीहि जाणवले नव्हते. पूर्वी आर्थिक संकटांमधून देश तरला होता, आताहि तरला असता. पण 'मीच ह्या देशाची तारणहार आहे' अशा megalomania मधून आणीबाणीचा उगम झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. २५ जून १९७५ ह्यादिवशी रामलीला मैदानावर प्रचंड जनसमुदायासमोर जयप्रकाशांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदापासून पायउतार होण्याचे जाहीर आवाहन केले आणि त्याचा परिणाम म्हणजे २६ जानेवारीला फक्रुद्दिन अली अहमद ह्या रबरस्टँप राष्ट्रपतींनी आणीबाणी (Internal Emergency) च्या घोषणेवर सही केली.

दरवर्षी आणिबाणीचे समर्थक हे तुणतुणं सुरू करतात की आणिबाणि गरजेची होती अमुक अमुक कारणांमुळे.

राही's picture

2 Jul 2018 - 6:02 pm | राही

प्रतिसाद तेव्हाही पटला नव्हता.
१९७४ मधल्या जॉर्ज फर्नॅंडीस यांच्या प्रचंड यशस्वी (जवळ जवळ महिनाभर १००% अनुपस्थिती) अशा रेल्वे संपामुळे झालेले अतोनात हाल अजूनही स्मरणात आहेत. ऱेल्वे बंद असल्यामुळे रस्तेवाहतुकीवर प्रचंड ताण पडला. कितीतरी अपघात झाले. ट्रक्समधून प्रवासी वाहतूक होऊ लागली. वैयक्तिक सांगायचे तर एक जवळचे नातेवाईक स्कूटर अपघातात जायबंदी झाले. असे अनेक. संपाच्या योग्यायोग्यतेविषयी मतभेद असतील पण धाकदपटशाद्वारे जनतेला इतके वेठीस धरणे तेव्हाही पटले नव्हते आणि आताही नाही. खरे म्हणजे आमचे कुटुंब आणि गोतावळा कट्टर समाजवादी होता. माझ्यासारखे अनेक टीन एजर्सनी उसळत्या रक्ताला स्मरून विद्रोहात उडी घेतली होती. सरकारचे अनुशासनपर्व आणि युवा- पौगंडांचे विद्रोहपर्व. तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन.
पुढे कदाचित लिहीन इथेच.

मार्मिक गोडसे's picture

2 Jul 2018 - 6:20 pm | मार्मिक गोडसे

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन.
पुढे कदाचित लिहीन इथेच.

लिहाच.
भले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यावेळी आणिबाणीचा निर्णय घेतला असेल, दडपशाहीचा अतिरेकही झाला असेल, परंतू विरोधकांच्या विध्वंसक हालचाली बघता शॉर्ट टर्म दडपशाहीचा वापर केला गेला असावा. विरोधकांच्या कृतीबद्दल मात्र कोणी फारसे बोलताना दिसत नाही.

मराठी कथालेखक's picture

2 Jul 2018 - 6:15 pm | मराठी कथालेखक

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार.. .
कोणतीही गोष्ट..खासकरून इतक्या गुंतागुंतीच्या घटनेचे फक्त 'चांगली वा वाईट' असे वर्गीकरण करणे कदाचित कठीण असेल.. प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन वेगळा पण अनुभवांची देवाण घेवाण झाली हे महत्वाचे.
धन्यवाद

आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी अतिशयोक्ती होत आहे असे वाटते.

रेलवे चा संप हा माझ्या स्मरणात आहे. तासाभरात एखादी लोकल जात असे.
रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण पडला होता हि वस्तुस्थिती. ट्रक टेम्पो खाजगी वाहनांना लोकांना नेण्याची सरकारने परवानगी दिली होती. मी स्वतः दादर ते घाटकोपर खाजगी बसने नंतर घाटकोपर ते भांडुप ट्रकच्या मागे बसून आणि पुढे मुलुंड पर्यंत टॅक्सीने प्रवास केल्याचे आठवत आहे. लोकांचे फार हाल झाले हि वस्तुस्थिती आहे हे कोणीच नाकारत नाही.
पण संप का झाला आणि कशा तर्हेने अत्यंत कठोरपणे तो दडपला गेला होता हेही वाचून घ्या.
The strike lasted from 8 to 27 May 1974.[1] The 20 day strike by 1.7 million (17 lakh) workers is the largest recorded industrial action in the world.
The strike was held to demand an eight hour working day for locomotive staff by All India Loco Running Staff Association and a raise in pay scale, which had remained stagnant over many years, in spite of the fact that pay scales of other government owned entities had risen over the years.[6]
Furthermore, since British times the Railways termed the work of the locomotive staff as "continuous", implying that workers would have to remain at work as long as the train ran on its trip, often for several days at a stretch. The independence of India did not change this. The eight hour work day had not been implemented in Indian railways by the Railway Board, a quasi government bureaucracy despite having become a free country in 1947, this had led to dissatisfaction among labour, especially locomotive Pilots.[7] Traditional railway union leaders too were starting to get distant from worker demands and closer instead to politicians, thus leading to further discordThe spread of diesel engines and the consequent intensification of work in the Indian Railways since the 1960s resulted in continuous working hours being extended by days, creating much resentment among the workers.[9] The Railways, although government-owned, remained an organization in which the accepted worldwide standard of an eight-hour working day was violated with impunity.[10] When the crafts unions raised the issue, they demanded a 12-hour working day for loco running staff. This led to railway strikes by rail workers across the country in 1967, 1968, 1970 and 1973, finally leading to the 1974 strike which was participated in by 70% of the permanent work force of railways

https://en.wikipedia.org/wiki/1974_railway_strike_in_India

INDIA: Strangulating Strike
http://content.time.com/time/magazine/article/0,9171,944832,00.html

या संपामुळे आणीबाणी पुकारली गेली हे म्हणणे हास्यास्पद आहे. २७ मे १९७४ ला हा संप संपला आणि पुढे एक वर्षाने म्हणजे २६ जून १९७५ रोजी आणीबाणी पुकारली गेली.
आणीबाणीत ज्यांची धरपकड झाली आणि विनाचौकशी तुरुंगात टाकले त्यांचे हाल काय झाले हे त्या लोकांनाच माहिती आहे. रा स्व संघाचा द्वेष करणाऱ्या लोकांना आता द्वेषापोटी आणीबाणीचे समर्थन करताना पाहिले तर अतिशय आश्चर्य वाटते.
कारण कम्युनिस्ट आणि समाजवादी हे दोन्ही जनसंघ आणि रा स्व संघाचा द्वेष करणारे पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात जनसंघाबरोबर एकदाच एकत्र आले होते.
इंदिराजींचे नेत्या म्हणून आपले गुण आहेत पण त्यामुळे आणीबाणी चे समर्थन करता येत नाही.
कोणत्याही कायद्याच्या अभ्यासकाला विचारा स्वातंत्र्य समता सारख्या अत्यंत मूलभूत लोकशाही मूल्यांची अक्षरशः पायमल्ली झाली होती.

सामान्य माणसाला १९९१ च्या उदारीकरणाच्या शष्प फरक पडला नव्हता म्हणून ते उदारीकरण सपशेल फसले याचा उलट युक्तिवाद आपण करता आहात असेच खेदाने म्हणावे लागेल.
बाकी आणीबाणी चे समर्थन करणारे कोणतेही दावे स्पष्टपणे खोटे ठरले होते. आता लोकांच्या विस्मरणामुळे बऱ्याच गोष्टी धुतल्या जात आहेत एवढेच म्हणेन.

१९७१च्या डिसेंबरमध्ये पाकवर निर्णायक आणि खणखणीत विजय मिळवल्यामुळे समाजात इंदिरा गांधी आणि इंदिरा कॉंग्रेसविषयी जनतेत आत्यंतिक प्रेम आणि आदर निर्माण झाला होता. अमेरिकेच्या दबावाला आणि रोषाला न जुमानल्यामुळे इंदिरा गांधींचा आंतरराष्ट्रीय दबदबाही वाढला होता. पण विजयी युद्धानंतर युद्धाच्या खर्चाचा बोजा १९७२ मध्ये समाजावर पडला. महागाई वाढू लागली. त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे
इतके दुर्भिक्ष्य आले होते. मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला.
क्रमशः

ट्रेड मार्क's picture

3 Jul 2018 - 3:13 am | ट्रेड मार्क

तुम्ही सांगताय ते सगळं आणीबाणीच्या लागू करायच्या बऱ्याच आधी घडलेलं आहे. जरी या सर्व घटनांची थोडीफार पार्श्वभूमी आणीबाणीच्या निर्णयाला असेल असं म्हणलं तरी मुख्य कारण मात्र कोर्टाने इंदिरा गांधींवरचे निवडणुकीत गडबड केल्याचे आरोप ग्राह्य मानले हेच असणार.

सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नाकारली म्हणल्यावर पुढील धोके नक्कीच त्यांच्या लक्षात आले असणार आणि त्यात परत इगो सुद्धा दुखावला असणार. म्हणून लगेच दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली गेली. इतकी टोकाची कृती केल्यावर त्याला सपोर्ट मिळायला म्हणून या सगळ्या आधीच्या घटनांचा पद्धतशीरपणे उपयोग करून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची संधी साधली गेली असावी. तसेच वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि त्यावेळेला जी कुठली माध्यमे असतील त्यातून सक्तीने आणीबाणी कशी योग्य आहे हेच पसरवायला लावलं असणार. कारण विरोधात बोलायची सोयच नव्हती.

बाकी लोकांनी ऑफिसला वेळेत जाणं, कामं व्यवस्थित करणं हे आणीबाणीमुळे झालेले समांतर फायदे (collateral benefits) म्हणता येतील. पण त्यामुळे आणीबाणी लावण्याचा निर्णय योग्य होता किंवा त्यामुळे समस्त लोकांचा फायदा झाला असं कसं म्हणता येईल? सरकारला तेवढ्यापुरती अनिर्बंध सत्ता मिळाली तसेच जे सरकारसमर्थक होते त्यांना बराच फायदा मिळाला असावा. जे सामान्य लोक कधीच कशात नव्हते त्यांना फारसा फरक पडला नसावा किंबहुना collateral benefits मिळाले असावेत. पण जे सरकार विरोधक होते त्यांचे मात्र हाल झाले. आता यात फक्त विरोधी नेते आणि राजकारणीच नव्हते तर सरकारच्या धोरणांवर टीका करणारी माध्यमे किंवा राजकीयदृष्ट्या ऍक्टिव्ह (पण राजकारणात नसलेले) लोक पण होते. उदा. द्यायचं झालं तर त्याकाळात मिपा असतं तर श्रीगुरुजींना आणि अजून २-४ जणांना नक्कीच अटक झाली असती. किंवा सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना पण कारवाईला सामोरं जावं लागलं.

त्यामुळे तुम्ही कुठल्या भूमिकेतून आणिबाणीकडे बघताय त्याप्रमाणे ती घटना दिसेल.

राही's picture

3 Jul 2018 - 3:54 pm | राही

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही. उलट अनेक क्लृप्त्या वापरून मूक निषेध आणि विरोध प्रगट केला गेला. सरकारी बातम्या आणि जाहिराती असत पण त्या आजच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात होत्या. टाईम्स ग्रूप सहसा सरकारच्या विरोधात नसतो तसा तो तेव्हाही नव्हता. पण भलामण मात्र नव्हती. माध्यमे मध्यम डावी समाजवादी होती. त्यांचा कॉंग्रेस सरकारला आधीपासूनच विरोध होता. शिवसेना आणि काही कम्यूनिस्ट गट आणीबाणीच्याबाजूने होते.

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही

काय सांगताय?

२० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती
मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे.

राष्ट्रसंत विनोबा भावे यांचे दूरदर्शन, त्यांचा उपा,, मौनव्रत आणि मौनव्रतातून बाहेर आल्यावर बाबा आनंदला म्हणून स्वतःच टाळ्या पिटणे पासून आणीबाणीला अनुशासन पर्व पर्यंत सर्व गोष्टींचा भरपूर उदो उदो झाला होता.

लांगूल चालनाची पातळी इतकी खाली गेली होती कि ९१ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी जाहीर सभेत India is Indira, and Indira is India असे म्हणून दाखवले. हजारो वर्षांच्या दैदिप्य्मन संस्कृती आणि इतिहास असणाऱ्या देशाला एका नेत्याच्या दावणीस बांधण्याचा अत्यंत हीन प्रयत्न पाहून आजही अंगाचा तिळपापड होतो.

It was the culture of sycophancy that reduced men of achievement and stature to grovelling caricatures. No better example exists to this day than Dev Kant Barooah, Congress president, declaring at the height of the Emergency in 1976 that "India is Indira, and Indira is India". His oily obsequiousness would be matched by another President-of the country, no less.

राष्ट्रपती असेलल्या ज्ञानी झैलसिंह यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासाठी मी जमीन झाडायला तयार आहे असेही म्हटले होते. राष्टपती पदाला काळिमा फासणारी वक्तव्ये करताना या लोकांना जराही लाज वाटल्या नाहीत? आजही संताप होतो आणि इथे लोक आणीबाणीचे गुणगान गात आहेत.

Zail Singh, eternally grateful to his leader for giving him the occupancy of Rashtrapati Bhavan, announced that he would gladly "sweep the ground" that Indiraji walked upon. It was a case of crawling when being asked to bend. There would be more crawlers emerging from the woodwork when Sanjay Gandhi and later, brother Rajiv, made their political debut.

https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20051226-india-is-i...

बाकी विरोध करणारे पत्रकार पासून सर्वच विनाचौकशी तुरुंगातच होते.

ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेस सर्व राजकीय नेत्यांची सुटका झाली यानंतर या विरोधाला उधाण आले आणि त्यात इंदिराजी आणि त्यांची काँग्रेस वाहून गेले.
मी वर म्हटलं आहे ना कि लोक बऱ्याच गोष्टी विसरले आहेत.

मराठी_माणूस's picture

3 Jul 2018 - 7:46 pm | मराठी_माणूस

बरोबर.
तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक.

नितिन थत्ते's picture

5 Jul 2018 - 6:44 am | नितिन थत्ते

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही
काय सांगताय?

२० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती
मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे.

मी तेव्हा आठवीत-नववीत होतो. ७७ च्या निवडणुकीच्या वेळेस नववीत होतो.

वर तुम्ही म्हणालात तशी गाणी वगैरे प्रकार सरकारी पातळीवर होते. त्यावेळी माध्यमे म्हणजे रेडिओ टीव्ही* आणि वृत्तपत्रे-साप्ताहिके इतकीच होती. सरकारी माध्यमांत आणि काही सरकारच्या सहानुभूतीदार वर्तमानपत्रात आणीबाणीची भलामण चाले. आमच्या घरी तेव्हा नवशक्ति येत असे. तो सामान्यपणे काँग्रेसी पेपर होता. (मुंबईत मिळणार्‍या वर्तमानपत्रांपैकी) लोकसत्ता हा काँग्रेसविरोधी पेपर होता. सेन्सरशिप असूनही त्यात आणीबाणीची भलामण असलेला काहीही मजकूर येत नसे. तसाच पुण्यात सकाळ तरूण भारत हे विरोधी पेपर होते. त्यात कधी भलामण झाली नसणार.

*दूरदर्शन हे सरकारी माध्यम आहे त्यामुळे ते सरकारचा "प्रचार" करते असा आरोप लोक पूर्वी करत असत. पण त्यातल्या अनेकांना दूरदर्शन हीच एक संतुलित वाहिनी असल्याचा साक्षात्कार २०१४ नंतर झाला हा भाग अलाहिदा !! ;)

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 10:13 am | सुबोध खरे

आपले महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांबद्द्ल विस्मरण झाले आहे असे दिसते.

शिवाय सर्व सिनेमा थिएटर मध्ये दाखवले जाणारे "भारतीय समाचार वृत्त" यात भारत कसा जगाच्या पुढे आहे हे सिनेमाच्या अगोदर दाखवले जात असे.

आपल्याला त्यांच्या प्रचाराच्या आणि लांगूलचालनाच्या चित्रफिती पाहायच्या असतील तर खालील दुवा उघडून पहा.

https://scroll.in/article/668111/watch-indira-gandhis-emergency-era-prop...

रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत.

He was Minister of State under Prime Minister Indira Gandhi from 1967 to 1977 including as Minister of State with Independent Charge of Information and Broadcasting.

Despite a versatile career, Shukla’s role as Information and Broadcasting Minister during the Emergency period had got him some odium as propagandist for Indira Gandhi’s government.
His ministry attracted adverse attention for the media censor policy during that period when Freedom of speech was under attack.

The Justice Shah Commission of Inquiry which went into the Emergency excesses,was stunned when V. C. Shukla owned entire responsibility for the functioning of his ministry.

As minister for information and broadcasting, Shukla not only cut power supply to printing presses but also used to monitor almost each and every story printed.

When Indira Gandhi became prime minister in 1966, she chose him as a minister in her Cabinet. Shukla was also very close to Sanjay Gandhi. It was said, that following poor coverage of Indira Gandhi's rally at Boat Club on 20 June 1975, Sanjay Gandhi removed Inder Kumar Gujral and appointed Shukla as minister of I&B.

He had banned Kishore Kumar’s songs on All India Radio because Kishore Kumar had refused to sing at an Indira Gandhi rally.
He was known for his iron-fist handling of the media during the Emergency.

गाण्याच्या दोन तीन ओली आठवत आहेत त्या अशा

मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम

बेकारोंको काम मिले और सस्ती हो कुछ रोटी

मजदूरो को सम्मान मिले और मिले बराबर हिस्सा

काँग्रेसचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता

याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही.

नितिन थत्ते's picture

5 Jul 2018 - 11:17 am | नितिन थत्ते

रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच माध्यमे होती त्यातून सरकारचा प्रचार होणार यात काही संशय नाही. तीच गोष्ट वृत्त चित्राची. जी माध्यमे सरकारच्या ताब्यात नव्हती वृत्तपत्रे, साप्ताहिके वगैरे त्यातल्या कोणी आणीबाणीची भलामण केली नाही. (त्यात पुन्हा जी वृत्तपत्रे काँग्रेसजनांच्या मालकीची होती त्यात आणीबाणीचा प्रचार होणारच होता).

महाराष्ट्र टाइम्स हे तेव्हा तरी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र होते असे वाटत नाही. मुंबईतील सर्वाधिक खपाचे लोकसत्ता आणि पुण्यातील सकाळ हे तर आणीबाणी विरोधीच होते.

तरीही आणीबाणीचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता हे मान्य आहे.

>>याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही.

सध्या तेव्हासारखी रेडिओ आणि टीव्ही केवळ सरकारीच माध्यमे आणि थोडीच वृत्तपत्रे असती तर "अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.

विशुमित's picture

5 Jul 2018 - 11:25 am | विशुमित

<<"अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.>>
==>> हाहाहा...!!

====
बाकी आणीबाणी बाबत मान्यवरांकडून रोचक माहिती मिळत आहे.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 12:00 pm | सुबोध खरे

म्हणजे आता अच्छे दिन येणार नाहीत हे तुम्ही मान्य केलंय ना? मग झालं तर. आता आम्हाला अच्छे दिन केंव्हा येणार याचे उत्तर द्यायला लागणार नाही.

पण मग उगाच "आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता". हे विधान धादांत असत्य आहे एवढं मान्य केलं कि झालं.

राही's picture

5 Jul 2018 - 4:55 pm | राही

मान्य नाहीच. कारण प्रत्यक्ष्यानुभव. त्या काळाइतकी लोकांमधली शिस्त आणि समाजातली सुव्यवस्था आजतागायत कधीही अनुभवलेली नाही.
राष्ट्रीयीकरणानंतर बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपांना ऊत आला होता आणि १९७५पर्यंत तो कळसाला पिचला होता. आणीबाणीमध्ये हे सगळे ताबडतोब थांबले. वक्तशीरपणा ९९% वाढला. गोदींमध्ये चोऱ्यामाऱ्या , दिरंगाई या सगळ्याला ऊत आला होता. व्यापारी जहाजाला बर्थ मिळणे, मालाची चढ उतार होणे यात महिना महिना जाई. डेमरेज वाढे. आणीबाणीत तीन चार दिवसांत जहाजे मोकळी झालेली आहेत. ही सांगोवांगीची गोष्ट नाही. घरातली माणसे व्यापारी आणि भारतीय नौदलात होती. त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत. ही शिस्त आणि सुव्यवस्था नव्हे का? असं बरंच काही लिहिता येईल. वरती श्री प्रकाश देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही शिस्तपालनात स्वातंत्र्याचा संकोच होतच असतो.
तेव्हा आणीबाणीत लोकांमध्ये शिस्त आणि समाजामध्ये सुव्यवस्था होती या विधानाविषयी मी ठाम आहे.
अर्थात अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून सुव्यवस्था आणता आली असती तर ते सोन्याहून पिवळे झाले असते. तसे त्या काळी का करता आले नाही याचे अनेक अंदाज करता येतील. तो खूप मोठा विषय आहे . असो.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:01 pm | सुबोध खरे

DELUSION --FALSE BUT UNSHAKABLE BELIEF

राही's picture

5 Jul 2018 - 8:15 pm | राही

प्रत्यक्ष अनुभवाला मी बिलीफ म्हणू शकत नाही आणि false तर नक्कीच नाही. आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत. पण आता इतक्या वर्षांनी बराच ऊहापोह झाल्यावर आणीबाणीच्या चांगल्या बाजू आणीबाणीनंतरच्या पार्श्वभूमीवर अधिकच ठळकपणे जाणवतात.
काही वैयक्तिक गोष्टी नाइलाजाने लिहाव्या लागल्या. क्षमस्व.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 8:28 pm | सुबोध खरे

हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे

मी लिहिले आहे त्यातील एकतरी मुद्दा तुम्हाला खोडता आला आहे का?

जेवढे सगळे लिहिलेले आहे ते सगळे सार्वजनिक न्यासावर कुणालाही उपलब्ध आहे.

त्यावेळी एक नावाजलेला तमाशा (लोकनाट्य) होता. गावोगावी त्यांचे जत्रेच्या काळात खेळ चालत. त्यांच्या वगनाट्यातील एका गाण्याच्या ओळी मला अजून आठवतात.
त्या काहिश्या अशा होत्या... एक लाजरा न साजरा मुखडाच्या चालिवर गाणे होते.
"गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं !
शेतकर्‍या भिऊ नका, इंदिराच्या ऐका हाका
का ?? कायदा !!
गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं !! "

शब्दबम्बाळ's picture

9 Jul 2018 - 1:19 pm | शब्दबम्बाळ

काय गम्मत ना!!

रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत.

आजकाल देखील असेच आपले चमचे घेऊन स्वतःलाच चान चान विशेषणे लावून घ्यायची फ्याशन आली आहे म्हणे!
पण अर्थातच त्यात मात्र केवळ सत्य असणार आहे कारण देशात केवळ एकच माणूस निःस्वार्थी आहे ना!

सुबोध खरे's picture

9 Jul 2018 - 6:53 pm | सुबोध खरे

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन.
पुढे कदाचित लिहीन इथेच.
माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही
"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".
लोक कायद्याला न जुमानीतसे झाले.

या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत.

विषय आणीबाणीचा चालू आहे. मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का?

त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे?

आणि

मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का?

आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली?
सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का?
समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला?

बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का?

अंधद्वेष असु नये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2018 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 12:40 pm | सुबोध खरे

त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे
इतके दुर्भिक्ष्य आले होते.

हि वस्तुस्थिती होती. कोणताही जिन्नस धान्य इ याला जिल्हा बंदी होती.

कोकणात स्वतःच्या शेतात पिकणारा तांदूळ सुद्धा लोकांना मुंबईत घरी आणता येत नव्हता. यावरच शाहीर साबळे यांचे विडंबन होते.

पोलीस हवालदार एस टी डेपो मध्ये कोपऱ्यात उभ्या असलेल्या माणसाला म्हणतोय
चूप चूप खडे हो जरूर कोई बात है
पायलीभर भात है ये पायलीभर भात है


मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला.

म्हणून आणीबाणी आली हे म्हणणे अतिशयोक्तीच आहे

१९७२ चा दुष्काळ आणि तीन वर्षांनी जाहीर केलेली (२६ जून १९७५) आणीबाणी यांचा संबंध फार तर बादरायण म्हणता येईल असा आहे

राही's picture

5 Jul 2018 - 7:00 pm | राही

हे एकच कारण होते असे नव्हे. पुढच्या तीन वर्षात सुव्यवस्थेची घडी अधिकच विसकटत गेली. ती सर्व कारणे वर्णन करायचा कंटाळा आला आहे. लोहिया यांचा पक्का कॉंग्रेसद्वेष, (कॉंग्रेसमुक्त भारत वगैरे, पण तशी घोषणा नव्हती) जयप्रकाशजींचे तीव्र आंदोलन, बहुतांशी डाव्या अशा माध्यमांनी केलेली खंबीर पाठराखण, जॉर्जच्या रेल्वे संपामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, मुख्यत: अन्नधान्य, इंधन, खाद्यतेले यांची ठप्प झालेली वाहतूक आणि त्यामुळे झालेली टंचाई, बॅंक कर्मचाऱ्यांची सततची आंदोलने अशा अनेक कारणांनी सरकारला जेरीस आणले गेले. लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:37 pm | सुबोध खरे

लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.
लोकांचे माहित नाही परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांनी कायदा पाळणे सोडून दिले इतकेच नव्हे तर पाहिजे तसा कायदा वळवून घेतला.

वरिष्ठ तीन न्यायाधीशांना डावलून पाहिजे त्या (अजित नाथ रे) न्यायाधीशांना पदोन्नती देऊन भारताचे सरन्यायाधीश केले. आणि हि आणीबाणीतील गोष्ट नसून १९७३ मधील गोष्ट आहे.
This judiciary–executive battle would continue in the landmark Kesavananda Bharati case, where the 24th Amendment was called into question. With a wafer-thin majority of 7 to 6, the bench of the Supreme Court restricted Parliament's amendment power by stating it could not be used to alter the "basic structure" of the Constitution.
Subsequently, Prime Minister Gandhi made A. N. Ray—the senior most judge amongst those in the minority in Kesavananda Bharati—Chief Justice of Indiain April 1973. Ray superseded three judges more senior to him—J. M. Shelat, K.S. Hegde and Grover—all members of the majority in Kesavananda Bharati. Indira Gandhi's tendency to control the judiciary met with severe criticism, both from the press and political opponents This appointment superseded three senior judges of the Supreme Court, Jaishanker Manilal Shelat, AN Grover and K. S. Hegde, and was viewed as an attack on the independence of the Judiciary. This was unprecedented in Indian legal history, and has been called the "blackest day in Indian democracy"

कशाला आपण लोकशाहीच्या बाता करत आहात

On 12 June 1975, Justice Jagmohanlal Sinha of the Allahabad High Court found the prime minister guilty on the charge of misuse of government machinery for her election campaign. The court declared her election null and void and unseated her from her seat in the Lok Sabha. The court also banned her from contesting any election for an additional six years.
she was held responsible for misusing government machinery, and found guilty on charges such as using the state police to build a dais, availing herself of the services of a government officer, Yashpal Kapoor, during the elections before he had resigned from his position, and use of electricity from the state electricity department.

The persistent efforts of Narain were praised worldwide as it took over four years for Justice Sinha to pass judgement against the prime minister.

Indira Gandhi challenged the High Court's decision in the Supreme Court. Justice V. R. Krishna Iyer, on 24 June 1975, upheld the High Court judgement and ordered all privileges Gandhi received as an MP be stopped, and that she be debarred from voting. However, she was allowed to continue as Prime Minister pending the resolution of her appeal.

Later that day, Indira Gandhi requested a compliant President Fakhruddin Ali Ahmed to issue a proclamation of a state of emergency. Within three hours, the electricity to all major newspapers was cut and the political opposition arrested. The proposal was sent without discussion with the Union Cabinet, who only learnt of it and ratified it the next morning.

Invoking article 352 of the Indian Constitution, Gandhi granted herself extraordinary powers and launched a massive crackdown on civil liberties and political opposition. वा रे अनुशासन पर्व
The Government used police forces across the country to place thousands of protestors and strike leaders under preventive detention.

In Tamil Nadu, the M. Karunanidhi government was dissolved and the leaders of the DMK were incarcerated. In particular, Karunanidhi's son M. K. Stalin, was arrested under the Maintenance of Internal Security Act. At least nine High Courts pronounced that even after the declaration of an emergency, a person could challenge his detention.

The Supreme Court, now under the Indira Gandhi-appointed Chief Justice A. N. Ray, overruled all of them, upholding the state's plea for power to detain a person without the necessity of informing him of the grounds for his arrest, or to suspend his personal liberties, or to deprive him of his right to life, in an absolute manner (the habeas corpus case')राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश आपल्या ताटाखालचे मांजर नियुक्त केले आणि कायद्याचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावला.
आणि आपण म्हणताय लोक कायद्याला जुमानेनासे झाले?
बढिया है

Habeas Corpus case

Justice M.H. Beg was also involved in the Habeas Corpus case. This landmark case in Indian democracy, Additional District Magistrate of Jabalpur v. Shiv Kant Shukla, came up in 1975 during the Indian Emergency. The legal question hinged on the citizen's right to judicial scrutiny for arrests under emergency. The five senior most judges of the Supreme court heard the case, and four aligned with the government view that even the right to life stood suspended during emergency (only dissent was H. R. Khanna). In his April 1976 decision, Justice Beg appeared to bend backwards even, when he observed:

We understand that the care and concern bestowed by the state authorities upon the welfare of detenues who are well housed, well fed and well treated, is almost maternal.ज्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत( कोणताही आरोप नसताना) ठेवले आहे त्यांना उत्तम निवास उत्तम खाणे पिणे देऊन त्यांची आईसारखी उत्तम काळजी घेतली गेली आहे

A few months later, in January 1977, M.H. Beg, who was junior to H. R. Khanna, was appointed Chief Justice of India by the Indira Gandhi government. This was against legal tradition.

हम करेसो कायदा याचे दुसरे उदाहरण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मिळणार नाही

आपली अंध भक्ती किती आहे हे आपण आपल्याच डोळ्याने वाचून घ्या.

चिर्कुट's picture

9 Jul 2018 - 2:45 pm | चिर्कुट

लोकशाहीच्या बाता, ताटाखालचे मांजर, हम करेसो कायदा, पाहिजे तसा कायदा वळवून घेणे आणि शेवटी कहर म्हणजे अंधभक्ती वाला सल्ला...

याच गोष्टी सध्याच्या प्रधानसेवकांबद्दल म्हणल्या जातात आणि त्याचा विरोध कोण, कसा करतं हे विसरलात वाटत?

सुबोध खरे's picture

9 Jul 2018 - 6:52 pm | सुबोध खरे

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन.

पुढे कदाचित लिहीन इथेच.

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही

"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".

लोक कायद्याला न जुमानीतसे झाले.

या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत.

विषय आणीबाणीचा चालू आहे.

मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का? त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे?

आणि

मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का?

आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली?
सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का?
समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला?

बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का?

अंधद्वेष असु नये.

आणिबाणी समर्थक आणि विरोधकांचे आर्ग्युमेण्ट्स वाचुन असं वाटतय कि पिक्चर पहिले रिलीज झाला, ट्रेलर मागाहुन आलं :)
तेच कोलॅटरल बेनीफीट्स, तेच बाण मारुन त्या भोवती वर्तुळ बनवणं, तेच मागचे-पुढचे संदर्भ मिक्स करणं, तेच व्यक्ती-विषेशाच्या अहंपणा वि. नि:स्वार्थ भाव वगैरेच्या चर्चा.

एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.

एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.

"आईसक्रीमवाले गंदे अंकल"ची सर्वाधिक तीव्र शोकांतिका. :-(

ट्रेड मार्क's picture

4 Jul 2018 - 3:14 am | ट्रेड मार्क

माझ्यामते तुम्ही करताय ती तुलना होऊ शकत नाही. तुमची तयारी असल्यास तटस्थपणे चर्चा करू.

एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.

हे काही कळलं नाही. कृपया विस्तारून सांगावे.

गवि म्हणले तसं आईस्क्रीमवाले गंदे अंकल बद्दल असेल तर तसे लोक्स जागोजागी पूर्वीपार आहेत. आता कदाचित माध्यमे भरपूर झाल्याने बातम्या सहज आणि वेगाने पसरतात, त्यामुळे कदाचित प्रकार वाढले असं वाटत असण्याची शक्यता आहे.

पण इंदीराजींच्या आणिबाणीबाबत आम्हि केवळ श्रवणभक्ती करु शकतो... त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला.

आईस्क्रीमवाले गंदे अंकल पुर्वीही होते याबद्दल वाद नाहि. लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे.

ट्रेड मार्क's picture

5 Jul 2018 - 4:29 am | ट्रेड मार्क

त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला

म्हणूनच "सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो" असं म्हणताय. हिंदुबहुल देशात हिंदू देवतांची खिल्ली उडवणारे चित्रपट निघतात आणि असे चित्रपट शेकडो कोटींचा गल्ला जमवतात. पूर्वी तर देवतांची नग्न चित्र पण काढली गेली आहेत पण चित्रकार सुखरूप राहून वर ती चित्रे कोट्यवधींना विकली सुद्धा गेली आहेत. यांचे निर्माते कोण होते ते वेगळं सांगायची गरज नाही. यातल्या कोणाला काय धोका झाला?

जर सरकारवरील किंवा पंतप्रधानांवरील टिकेबद्दल म्हणाल तर अतिशय हीन पातळीवरची टीका होऊनही त्या टीकाकारांवर सरकारने कारवाई केल्याची उदाहरणे नाहीत. जसे विरोधक टीका करतात तसेच समर्थक त्या विरोधकांना प्रत्युत्तर करतात. अर्थात टीका खालच्या पातळीवर घसरत जाते तसेच प्रत्युत्तर सुद्धा त्याच पातळीवर जाते. मग टीकाकार अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि गळचेपी होतीये म्हणून ओरडतात. परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान काही बोलले नाही तरी प्रॉब्लेम असतो आणि बोलले तरी प्रॉब्लेम असतो. याचे कारण म्हणजे विरोधकांना फक्त आरडाओरडाच करायचा असतो.

सरकारने सामान्य जनतेला सोडून द्या पण राजकीय विरोधकांना मुद्दाम त्रास दिल्याचे किंवा खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकल्याचे उदाहरण आहे का? मग कुठली आणीबाणी चालू आहे?

लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे.

लोकशाहीत लोकांना, म्हणजेच जनतेला, अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडील जनता खरंच मॅच्युअर होतेय का हे सांगा. साधं कचरा व्यवस्थापन लोक वैयक्तिक पातळीवर करू शकत नाहीत. मग कुठे तरी जबरदस्ती, म्हणजे कडक कायदे आणि शिक्षा, करायला लागणारच ना?

गुन्ह्यात अडकलेल्या अभिनेत्यांचे फॅन फॉलोइंग बघा. त्यांचे चित्रपट १०० कोटींचा गल्ला सहज पार करतात ते कोणामुळे? पण परिस्थितीमुळे साधा पाव चोरणाऱ्या लहान मुलाला मात्र हेच लोक मारहाण करतात. असो. परत तेच पुराण नको.

अर्धवटराव's picture

15 Jul 2018 - 10:47 am | अर्धवटराव

सरकारबद्दल काहिच म्हणणं नाहि. सायलेण्ट आणिबाणी पब्लीकच्या बाबतीत आहे. असो.

मराठी_माणूस's picture

3 Jul 2018 - 6:10 pm | मराठी_माणूस

मल्याळम सिनेमा Piravi बद्दल वाचा , चित्रपट पहा. एक अतिशय सुन्न करणारा अनुभव.

सुनील's picture

5 Jul 2018 - 12:10 pm | सुनील

मोदींच्या कार्यशैलीवर फिदा असणारांना इंदिरा गांधींची कार्यशैली खटकावी, हे भलतेच रोचक आहे!!!

ट्रेड मार्क's picture

9 Jul 2018 - 8:33 am | ट्रेड मार्क

विषय आणीबाणीचा आहे. मोदींची कुठली कार्यशैली इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेस असलेल्या कार्यशैली सारखी वाटतीये ते तुलना करून सांगा बघू.

रंगीला रतन's picture

5 Jul 2018 - 3:29 pm | रंगीला रतन

ज्या कोणाला सध्या अघोषित, सायलेंट टाईप ची आणीबाणी चालू आहे असले भास होत असतील त्यांनी भाऊ तोरसेकारांचा हा लेख वाचावा.

ह्या असाध्य रोगावर इलाज उपलब्ध नाहीये , तरी अशा रोगाने बाधित झालेल्या रुग्णांशी कसे वागावे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचावा.

टीप: बाधित रुग्णांवर हे लेख वाचून काही परिणाम होण्याची शक्यता ०% आहे.

माझ्या एका प्रतिसादावरचा श्री सुबोध खरे यांचा प्रतिसाद खूपच तिरका झाला आहे तो इथे लोकांच्या सोयीसाठी समोर पृष्ठमध्यावर नकलला आहे.
हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे
हे सर्व ठळक बोल्ड टाइपमध्ये आहे.
यावर मी काहीच भाष्य करू इच्छित नाही.
भद्रं ते... (कल्याण असो)

बाई, तुम्ही बाई आहात. गप्प बसा. नाहीतर गप्प बसवण्यात येईल. बघे बघत राहतील.

बाकी सांप्रत मिपावर बिकांचा एक फुल्याफुल्यांचा धागा नुकताच वर आलाय. त्यात शेवटी लिहिल्याप्रमाणे दुर्लक्ष हा सर्वोत्तम मार्ग असावा हेच खरे.

ट्रेड मार्क's picture

9 Jul 2018 - 8:38 am | ट्रेड मार्क

तुम्ही राही यांना व्यक्तिशः ओळखता का? नसेल तर राही हा आयडी असलेली व्यक्ती स्त्री आहे हे कशावरून ठरवलंत?

तुम्ही राहीताईंना ओळखत नाही? मराठी आंतरजालावर नवे दिसताय. असो.!

मी आंतरजालावर नवीन नाही पण तुम्ही म्हणताय त्या आयडी मागील व्यक्तीस मीही ओळखत नाही, इतकेच काय तुम्ही आय डी मागे कोण व्यक्ती आहात हेही मला ठाऊक नाही. त्याने काही फरक पडतो?

एखाद्या व्यक्तीस ओळखत नसल्यास फार मोठा गुन्हा आहे का?

तंतोतंत हेच म्हणायचे आहे. आभासी विश्वात एखाद्या सदस्यनामाच्या आभासी अस्तित्त्वाच्या मागील खऱ्याखुऱ्या व्यक्तीचा आंतरजालावरील मतप्रदर्शनाशी संबंध का जोडायचा?

यशोधरा's picture

10 Jul 2018 - 9:14 pm | यशोधरा

एसभाऊ, तसे काही झालेय असे वाटत नाही. प्रथम तुमचीच पोस्ट आहे ना, की बाई आहात तुम्ही, गप्प बसा, अशी? त्यावरून तो प्रश्न आलाय की तुम्ही त्यांना व्यक्तिशः ओळखता का, अशी. असे आपले मला वाटते.

एस's picture

11 Jul 2018 - 12:08 am | एस

:-) यशोताई, नाही हो. ट्रेडमार्कराव मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत. हा आंतरजालावरील फार जुना फ़ंडा आहे. त्याला मी भीक घालणार नाही. अर्थात, मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच. @ट्रेडमार्क, 'भद्रम् ते'! :-) :-) :-)

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2018 - 12:43 am | ट्रेड मार्क

मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत.

ही समजूत तुमची तुम्हीच करून घेतलीत. त्यामुळे परत हा प्रश्न उभा राहतोय, 'तुम्ही हे म्हणताय त्याला काही आधार आहे का?'. मला राहींच्या एकूण (फक्त या धाग्यांवरील नव्हे) प्रतिसादांवरून ते स्त्री आहेत असं वाटलं नव्हतं. तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं.

मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच.

मला जिथे चुकीचं वाटतं तिथे मी बोलतोच, मग ते कुठल्या व्यक्तीला (आयडीला) आहे याचा काही संबंध नाही. मग त्या व्यक्तीला शिंगावर घेतोय असं वाटू दे नाहीतर दुसरं काही वाटू दे. पण मला याची गम्मत वाटतीये की तुमची स्वतःबद्दल काय समजूत आहे.

तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं.

तो अतिशय उद्वेगाने लिहिलेला उपहास आहे. हे जर का तुमच्या किंवा इतर कोणाच्या लक्षात आले नसेल तर मग गैरसमज होण्याची चांगलीच शक्यता आहे.

(बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला.कदाचित माझी मांडणी चुकली असावी. पुढील प्रतिसादांपासून अशा वेळी कंसात स्पष्टपणे 'उपहास', 'विनोद', 'खंत' असे लिहीत जाईन.)

नाही, उपहास माझ्या तेव्हाच लक्षात आला एसभाऊ, उलट म्हणूनच तुमच्या ह्या भूमिकेचे मला फार फार वाईट वाटले आहे. इतके जजमेंट पूर्ण, इलाईटी पवित्रा घेऊन लिहिणाऱ्या मिपाकरांपैकी तुम्ही नव्हता, असे मला वाटत होते. परवा परवा एका धाग्यावर सत्य कळल्यावर तुम्ही तसे मोकळेपणे लिहिलेले पाहून तुमच्याबद्दल आदरच वाटला होता, पण हे खटकले.

असो. आता ह्यावर अधिक लिहिणार नाही. तुमचेही काही कारण असेलच.

मिपा मला अनोळखी होत चालले आहे, हेच खरे असावे बहुधा.

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2018 - 11:16 pm | ट्रेड मार्क

गप्प बसा म्हणणे उपहास होता हे जरी समजलं असेल तरी बाई आहात हे म्हणणे हा पण उपहास होता का? मला अगदी मूलभूत प्रश्न पडला होता की ज्यांना तुम्ही बाई म्हणून संबोधताय त्या खरंच बाई आहेत का. म्हणून तसा प्रश्न विचारला.

आता दुसऱ्या मुद्द्याकडे... जर बाई आहेत म्हणून त्यांना उपहासाने गप्प बसायचा सल्ला देताय ते कशासाठी? मिपावर कधी कोणाला स्त्री आहे म्हणून कोणी प्रतिसाद देऊ नका किंवा तत्सम काही केले आहे का? जर असे एखाद्या आयडीने केले असेलच तर समस्त (पुरुष) मिपाकर, मिपावरील सगळ्या स्त्री असलेल्या आयडींशी असेच वागतात असं तुमच्या उपहासगर्भ प्रतिसादातून वाटतंय.

बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला.

तुम्ही विचार कुठल्या दिशेने करताय याला महत्व आहे ना? नुसता बराच विचार करून होणार!

पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. हाकानाका.

यशोधरा's picture

11 Jul 2018 - 11:05 am | यशोधरा

एसभाऊ, सिरीयसली?
तुम्ही असे काही लिहाल असे वाटले नव्हते. माफ करा, पण सखेदाश्चर्य वाटून राहिले आहे, खरंच!
..असो.

राही's picture

12 Jul 2018 - 3:56 pm | राही

एस भाऊ,
आपल्या भावना पोचल्या. धन्यवाद. प्रतिसाद देत राहिले की अधिकाधिक लचके तोडले जातील आणि इतर लोकांना फुकटची मजा बघायला मिळेल म्हणून एखाद्या स्त्री आयडीने वाद वाढवत नेऊ नये या म्हणण्यामागची कळकळ आणि स्त्रीत्वाची मानमर्यादा व आदर राखण्याचा सद्भाव समजला. उद्वेगही समजला.
ज्या प्रतिसादावर आपण वरील प्रतिसाद लिहिला तो मूळ प्रतिसाद खोडसाळच होता. पण दुसऱ्यावर चिखलफेक करणाऱ्याचे हात आधीच चिखलात बरबटलेले असतात हे जाणून त्यातल्या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष केले.
धन्यवाद.

सुबोध खरे's picture

6 Jul 2018 - 9:46 am | सुबोध खरे

आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत.

आपल्या घरच्या चर्चेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणताय हे जितके हास्यास्पद आहे तितकेच त्या महिलेचे स्वतः च्या शारीरीक अनुभवावरून जगाबद्दल अनुमान काढणे हास्यास्पद आहे.

माझे एक तरी म्हणणे आपल्याला पुराव्यानिशी खोडून काढता आले आहे का?

श्रीमती इंदिरा गांधी यांनी पूर्ण बहुमताच्या आधारावर जितकी एकाधिकारशाही राबवली -- राज्याचे निवडून आलेले सरकार बरखास्त करण्यापासून मर्जीतील न्यायाधीशांना सर्वोचच न्यायालयातील सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यापासून विरोधकांना २१ महिने विनाचौकशी तुरुंगात डांबण्यापासून ते सर्व वृत्तपत्रांची वीज खंडित करण्यापर्यंत -- तितकी एखाद्या हुकूमशहाने हि केली नव्हती आणि तुम्ही म्हणताय अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
बढिया है

मार्मिक गोडसे's picture

6 Jul 2018 - 11:45 am | मार्मिक गोडसे

आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली?
सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का?
समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला?

सर टोबी's picture

9 Jul 2018 - 10:38 pm | सर टोबी

आणिबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी बराच हात दिला असे दिसते. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागा काँग्रेसला मिळाल्या. २८ जागांचे विश्लेषण केले तर मुंबईतील सर्वांच्या सर्व जागा जनता पक्षाला मिळाल्या. इतरही ठिकाणी सर्वसाधारणपणे शहरी मतदारांनी काँग्रेसला नाकारले.

या ठिकाणी शहरी विचारसरणीचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. सर्वसाधारणपणे सामाजिक प्रश्नांबद्दलची जागरूकता, प्रसारमाध्यमांकडून होणारी एका विशिष्ठ विचारसरणीची भलामण किंवा हेटाळणी याचा शहरी मतदारांवर सहज परिणाम होतो. आतातर प्रचार सोपा झाल्यामुळे शहरी मतदार सहजपणे सरसकटीकरण करतात जसे सहकार म्हणजे खाबुगिरीची कुरणे, काँग्रेस म्हणजे बेगडी धर्मनिरपेक्षता वगैरे.

खेड्यात आणि त्यातही महाराष्ट्रातील खेड्यात गावपातळीवर रोजगार, लोकांच्या सहभागातून उद्योग आणि संपत्तीची निर्मिती यात काही गावांनी कमालीची आघाडी घेतली होती. आणि हि सर्व गावे नैसर्गिक दृष्ट्या संपन्न होती असेही नाही. याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा. आणि हि गावपातळीवरची प्रगती हे काँग्रेसचे निःसंशय असे यश होते. त्यामुळे शेतकरी सहसा काँग्रेसला नाकारत नाही.

उत्तरेत एकूणच लोकांची मानसिकता सरंजामशाहीला अनुकूल अशी आहे. तेथे आजही सरकारी नोकरीचे कमालीचे आकर्षण असते. आणि या मानसिकतेमुळेच तेथे बर्याचवेळेला राजकारणी आणि नोकरशहा यांची भ्रष्ट एकी पाहायला मिळते. नसबंदीची सर्वात जास्त सक्ती आणि अत्याचार यामुळे काँग्रेसचा येथे गावपातळीवर देखील पराभव झाला परंतु जेथे असे प्रकार फारशे झाले नाहीत तेथे जनतेने काँग्रेसला हात दिला.

मार्मिक गोडसे's picture

9 Jul 2018 - 11:54 am | मार्मिक गोडसे

मिपावर कोणीतरी शेतकरी सदस्य असेलच जो माझ्या वरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. मला उत्सुकता आहे, कारण इतका मोठा वर्ग आणीबाणीच्या विरोधात गेल्याशिवाय ते जुल्मी सरकार कोसळणे अशक्य होते.

पिलीयन रायडर's picture

9 Jul 2018 - 9:00 pm | पिलीयन रायडर

आणीबाणीचा अनुभव नाही. अगदी दुपट्यात वगैरे असायचा पण संबंध नाही कारण आई बाबाच माध्यमिक मध्ये असतील!

पण इथे वाचून अंदाज आला. मोदी आणि त्यांचे समर्थक कितीही मूर्खासारखे वागत असले (असं मानू एक मिनिट) तरी ही आणीबाणी नाहीच. कायदेशीर पद्धतीने सरकार ने नियंत्रण आणणे ही वेगळीच गोष्ट असणार. लोकांना दट्ट्या लागला की सुव्यवस्था आली असेलच, पण लोकशाही मध्ये ही स्वागतार्ह कशी असेल? चीन मध्ये पण लोक शिस्तीत वागत असतीलच. पण तसं जगायचं आहे का आपल्याला. जर्मनीत पण लोक शिस्तीत वागतात आणि त्यासाठी सरकार नीट यंत्रणा राबवते, आणीबाणी किंवा हुकूमशाही आणत नाही. म्हणून तेव्हा लोक धड वागत होते तस्मात आणीबाणी उत्तम हा तर्कच चुकीचा आहे. आणि वर मोदी सरकारशी त्याची तुलना करणं सुद्धा चूक आहे. मोदी पुष्कळ चुकत असतील, माझंही तेच मत होत चाललं आहे, तरी ही काही आणीबाणी नाही. कारण त्याविषयी मी दुनियाभर बोंबलू शकतेय.

राही's picture

10 Jul 2018 - 1:01 pm | राही

इथे धागालेखकाने खास करून आपले अनुभव प्रत्येकाने मांडावेत असे लिहिले होते म्हणून वैयक्तिक अनुभव लिहिले. हे अनुभव सार्वजनिक ठिकाणचे होते. बॅंक, रेल्वे, पोस्टऑफिस
बंदर गोदी, बेस्ट बसेस, खाजगी गाड्या व त्यांचे चालक अशा थिकाणचे म्हणजे सामान्य माणसाला रोज सामोरे जावे लागणाच्या ठिकाणचे अनुभव अत्यंत म्हणजे आश्चर्यकारकरीत्या सुखद होते. हे लिहायचे होते ते लिहिले.

मराठी कथालेखक's picture

10 Jul 2018 - 2:10 pm | मराठी कथालेखक

माझ्या वडीलांनी नुकत्याच काही आठवणी मला सांगितल्यात
माझे आजोबाचे अहमद्नगर जिल्ह्यातील एका काहीशा दुर्गम गावात किराणामालाचे दुकान होते. जोडीला ते काही प्रमाणात सावकारी करत. यात भांडी गहाण ठेवून पैसे कर्जाऊ दिले जात. काही लोकांना कर्ज फेडता न आल्याने अनेक भांडी आजोबांकडे जमा झाली होती. या भांड्यावर सहसा भांड्याच्या मूळ मालकाचे नाव कोरलेले असायचे.
आणीबाणी जाहीर झाली तेव्हा माझे वडील पुण्यात होते. ते तातडीने गावी गेलेत. आणि संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांनी ही भांडी गोळा करुन शहरात आणून विकलीत. पुढे कधीतरी गावातून आजोबांच्या सावकारीबद्दल तक्रार केली गेली पण झडतीस आलेल्या अधिकार्‍यांना कसलाही पुरावा न मिळाल्याने कारवाई करता आली नाही.

आणीबाणीच्या काळात माझ्या आई-वडीलांचा विवाह झाला. पण त्यात कसलीही अडचण आली नाही.

राही's picture

10 Jul 2018 - 3:21 pm | राही

मुंबईत एक भिकारी दिसत नव्हता. रस्ते, रेल्वे देवळे कुठेही भिकारी नव्हते. सगळ्या भिकाऱ्यांना पकडून दूर कुठेतरी रस्तेबांधणी वगैरेसारख्या कामाला लावले होते असे बोलले जाई. रेल्वेतले आणि बाहेरचे फेरीवालेसुद्धा नाहीसे झाले होते.रस्ते रोज प्रामाणिकपणे झाडले जात.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता गोठवला होता. गावोगावच्या खाजगी सावकारीवर गदा आली होती.
राजकीय क्षेत्रात मात्र अस्वस्थता आणि नापसंती होती. सरकारविरोधी विचारांच्या लेखन भाषण प्रगटनावर सेंसॉरशिप होती. वृत्तपत्रांतला मजकूर सेंसॉर होई. कार्यकर्त्यांची धरपकड झाली.
नसबंदीचा अतिरेक झाला हे माझ्यामते सामान्य जनांमध्ये सरकारविरोध तीव्र होण्याचे प्रमुख कारण होते. लोक चवताळले. यामध्ये सर्व थरांतले पुरुष होते.
सरकारी वर्तमानपत्रे आणि आकाशवाणीदूरदर्शन यांमध्ये इंदिरा गांधी आणि वीस कलमी कार्यक्रम यांच्या जाहिराती आणि उदो उदो अगदी नकोसा झाला. एलीट वर्ग विरोधात गेला.
असे खूपसे.

प्रसाद_१९८२'s picture

10 Jul 2018 - 7:05 pm | प्रसाद_१९८२

तुमचे ह्या धाग्यावरचे एकुणच सर्व प्रतिसाद वाचून असे दिसते की त्यावेळचा सरकारी कर्मचारी वर्ग, त्यांच्यावर आणिबाणी लादल्यावरच इमानदारीत काम करायला लागला, ऐरवी ते लोक कामाच्या ठिकाणी जाऊन फक्त पाट्या टाकत होते.

राही's picture

11 Jul 2018 - 12:07 am | राही

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयी आजही लोकांमध्ये पुष्कळ नाराजी असते. तशीच ती तेव्हाही होती. सगळेच अप्रामाणिक आणि कामचुकार नसतात. पण जेव्हा या अप्रामाणिक आणि कामचुकारांची टक्केवारी घटते तेव्हा सुव्यवस्था आणि शिस्त निर्माण होते. आणीबाणीत ही टक्केवारी धाकाने म्हणा अथवा दपटशामुळे म्हणा, खूपच घटली होती.
सर्वसामान्य जनजीवन आश्चर्यकारक रीत्या सुरळीत झाले होते. त्यानंतर आजतागायत इतकी सुव्यवस्था पाहायला मिळालेली नाही. आणीबाणी कळत्या वयात न पाहिलेल्यांचा यावर विश्वासही बसणार नाही.
राजकीय क्षेत्रात नाराजी पसरली कारण सरकारविरोधी विचार प्रगटनावर बंदी आली. एलीट वर्गाचा रोष झाला. समाजवाद्यांनी भूमिगत राहून या गळचेपीचा प्रतिकार केला. त्यांना क्विट इंडिया चळवलीतल्यासारखे वलय प्राप्य झालें . हा काळ त्यांच्या लोकप्रियतेचा परमोच्च बिंदू होता. नसबंदीच्या अतिरेकामुळे आणीबाणीविरुद्ध खरा रोष निर्माण झाला. सर्व स्तरातल्या पुरुषांमध्ये मोठाच असंतोष पसरला.

राही's picture

11 Jul 2018 - 12:09 am | राही

टंकनदोषांसाठी क्षमा प्रार्थनीय.

सुबोध खरे's picture

10 Jul 2018 - 6:42 pm | सुबोध खरे

मुंबईतील सर्व धडधाकट भिकार्यांना पकडून जायकवाडी धरणावर "रोजगारासाठी" नेले होते.तेंव्हा त्यांना १२ रुपये रोजगारावर ठेवले होते आणि मुंबईत तेंव्हा भिकार्यांना साधारण ६० रुपये रोज मिळत आणि काही मोलाच्या ठिकाणी २५० रुपये रोज या भिकार्यांना काम करण्याची मुळीच सवय नव्हती. त्यामुळे ते एक एक करून पळून परत मुंबईत आले. तेंव्हा एक वर्ष भरात मुंबईत परत सर्वत्र भिकारी दिसू लागले.

सर टोबी's picture

10 Jul 2018 - 10:16 pm | सर टोबी

धरणाचे काम २४ फेब्रुवारी १९७६ संपले होते. 'काही काम राहिले तर नोंद करून ठेवा, ४ महिन्यात मी आणीबाणी लावतेच आहे' असे बाईंनी शंकरराव चव्हाण यांना सांगितले असल्यास गोष्ट वेगळी.

नितिन थत्ते's picture

11 Jul 2018 - 10:19 am | नितिन थत्ते

हा प्रतिसाद मुळीच कळला नाही

सुबोध खरे's picture

11 Jul 2018 - 10:29 am | सुबोध खरे

टोबी सर
आणीबाणी २६ जून १९७५ रोजी लावली होती. हि नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

बाकी भिकाऱ्यांना जायकवाडी धरणाच्या कामावर पाठवले होते अशी पेपरात बातमी वाचल्याचे आठवते. मी काही जायकवाडीला पहायला गेलो नव्हतो. अगदी जायकवाडी नसेल फाळके वाडी नाही तर कोळके वाडी असेल काय फरक पडतो. भिकारी एक वर्ष नव्हते हि वस्तुस्थिती आहे.

मी जरी आणीबाणीचा विरोधी असलो तरी फुकट्या लोकांना रोजगारावर धाडले हि चांगलीच गोष्ट होती हि वस्तुस्थिती बदलत नाही.

जाता जाता -- आणीबाणी नंतर १९८०-८१ च्या सुमारास दादरच्या पुलावरील भिकाऱ्याने आपली मोक्याची जागा आपल्या जावयाला आंदण दिली आणि तो डोंबिवलीला भीक मागायला गेला अशी बातमी पण वाचली होती

माझ्या प्रतिसादात थोडी गफलत झाली पण बारकाईने विचार करता अजून काही प्रश्न मनात आले त्यांचा हा उहापोह.

१९७५ च्या काळात ६० आणि २५० रुपये म्हणजे काय असावे याचे माझ्या माहितीप्रमाणे वर्णन करीत आहे.

सत्तर ते नव्वदच्या दशकामध्ये महागाई वाढीचे प्रमाण बरेच जास्त होते. बऱ्याच वस्तू सहजच वार्षिक १०% वेगाने महाग होत असत. आता या ठिकाणी मी माझा १९८९ सालचा मुंबईतील खर्चाचा मर्यादित तपशील देतो. त्यावरून १९७५ सालच्या किमतीचा अंदाज यावा.

मी ८९ साली मुंबईत असताना दररोजचा बाहेरचा खर्च २० रुपयाच्या आत होत असायचा. सहा रुपयात वाशी ते वरळी असा येऊन जाऊन प्रवास, दहा रुपयांपर्यंत बाहेरचे खाणे आणि मित्रांबरोबर दोन-एक वेळा चहा एवढे सर्व त्यात होत असे.

सत्तरीच्या दशकात मला कुणाला भिक्षा देण्याचा प्रसंग आला नाही परंतु ८३ च्या दरम्यान मुंबईत सुट्या पैशांची प्रचंड चणचण होती. त्यावेळेला भिकारी १ रुपया दिल्यावर ९० पैसे खळखळ न करता देत असत. म्हणजे ७५ साली १० पैसे भिक्षा दिल्यावरही भिकारी आनंदाने तुमचा पाठलाग थांबवित असावेत असा अंदाज करायला हरकत नाही. म्हणजे ६० रुपये ज्याचे सरासरी उत्पन्न आहे त्याला ३ तासाच्या दोन 'शीफ्टमधे' ६०० लोक भिक्षा देत असावेत. पाच पैसे देणारे पण असतील पण आपल्या उदाहरणाच्या सुटसुटितपणासाठी आपण त्यांचा विचार करायला नको. तर ६ तासात ६०० तर तासाला १०० लोक भिक्षा देत असणार. म्हणजे एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी तासाला १२ वेळेला सिग्नल पडत असेल तर ८ जणांनी टॅक्सी अथवा बसमधून भिक्षेकऱ्यांना पैसे द्यायला हवे. भीक देण्याचे इतके 'आदर्श' प्रमाण आजही, जेंव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती सुधारली आहे असे दिसते, त्या काळात दिसत नाहीये.

आपले वरील उदाहरण ४ पटीने मोठे केले तर (२५० रुपये उत्पन्नासाठी) तर कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर तासाला ४०० लोक भिक्षा देण्यासाठी रांगा लावतायत असे दृश्य दिसले असते कि जे अतिशयोक्तीपूर्ण वाटते. एवढे करूनही असा एखादा हायली पेड भिक्षेकरी असेलच तर पांगुळगाड्यावरून साधारण ५ किलो चिल्लरचे बोचके घेऊन बंदे रुपये करण्यासाठी तो चालला आहे असे कोणीतरी पहिले असेलच.

राही's picture

12 Jul 2018 - 3:12 pm | राही

१९७२- ७५ या काळात मुंबईत सरकारी नोकरीतील लिपिकांचे सुरुवातीचे पगार २५० -३५० या रेंजमध्ये असत. राज्य सरकारचे कमी, केंद्र सरकारचे जास्त. गोदीमध्ये कमी. बॅंका एल आय सीमध्ये जास्त. सात रुपये, दहा रुपये अशा सुरुवातीच्या वार्षिक वेतनवाढी असत.

सुबोध खरे's picture

12 Jul 2018 - 8:33 pm | सुबोध खरे

6 Professional Beggars In India Who Are Probably Richer Than You & I

https://www.storypick.com/professional-beggars-in-india/

Mumbai's beggars earn Rs 180 cr a year

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1797524.cms?utm_source=co...

let me introduce Bharat Jain who begs in Mumbai The 'Richest' beggar of the country, Bharat is the owner ... on an average a beggar can earn Rs. 1500 a day.

https://www.quora.com/How-much-money-does-a-beggar-make-in-India

सूज्ञांस सांगणे न लगे

मराठी_माणूस's picture

11 Jul 2018 - 2:01 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/indira-gandhi-article-by-ma...

ह्या लेखाच्या शेवटी आणीबाणी च्या काळातील प्रशासकीय सेवे बद्द्ल लिहले आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 4:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

या लेखात आणीबाणीतल्या वस्तूस्थितीचे प्रामाणिक वर्णन आहे.

मार्मिक गोडसे's picture

11 Jul 2018 - 8:24 pm | मार्मिक गोडसे

माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी कधी आणीबाणीचा विषय निघाला की तिचे जोरदार समर्थन करतात. गाय वासरु प्रेम इतके की दुसरे कुमार केतकरच. स्वातंत्र्य चळवळीत तुरूंगवास झाला असतानाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेंशन घेतले नाही. आणीबाणीच्या काळात ते BMC मध्ये लिपिक होते. शिस्तबद्ध कामाची सवय असल्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही, परंतू त्यांचे सहकारी उजव्या विचारसरणीचे व भ्रष्टाचारी असल्यामुळे ते दडपणाखाली काम करत, त्यांना आजोबांची भीती वाटायची. आजोबांच्या मते प्रामाणीकपणे काम करणाऱ्याला काहिही त्रास झाला नाही.
भिकाऱ्यांबद्दल मी त्याना विचारले. भिकारी पकडण्याकरता BMC ची वाहने वापरली होती. कुठल्याही धरण प्रकल्पासाठी त्यांना ठेवलं नसावे, कारण त्यांची निवासाची सोय आणि स्थानिकांचा रोजगार हिरावणे हे सरकारला शक्य नव्हते.
माझे वडील आणीबाणीच्या काळात विदयार्थीदशेत होते. रेल्वे आणि बसेस वेळेवर धावत , ह्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही.
आणीबाणीला जनतेने नाकारले हे सत्य आहे, परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.

अनुप ढेरे's picture

12 Jul 2018 - 5:00 pm | अनुप ढेरे

परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.

नाझी जर्मनीतपण प्रत्येक वर्गाला झळ नव्हती बसली. ज्यु लोक डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असं म्हणणार का?

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 9:55 pm | सोमनाथ खांदवे

त्या काळी गरीब शहर किंवा खेडेगावातील जनतेचे प्रमाण खूपच असणार आणि त्या गरीब वर्गाला झळ बसली काँग्रेस निवडणुका हरली पण नंतर पुन्हा मुसंडी मारून जनता पार्टी ला चारीमुंड्या चित केले .

चिर्कुट's picture

17 Jul 2018 - 5:34 pm | चिर्कुट

याच धर्तीवरचे खालील मुद्दे आठवतात -
१. नोटाबंदीचा त्रास फक्त काळापैसावाल्यांनाच झाला.
२. टॅक्सचोरच जीएसटी ला विरोध करतात, बाकीचे खुश आहेत.

:)

मार्मिक गोडसे's picture

12 Jul 2018 - 5:29 pm | मार्मिक गोडसे

चुकीची तुलना. आणीबाणी अत्याचार करणारे पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून आलेत, नाझींच्या बाबतीत तसे घडले का?

सुबोध खरे's picture

13 Jul 2018 - 9:11 am | सुबोध खरे

मुळात जनता पार्टी हि खिचडीच होती. त्यांची एकसंध अशी विचारसरणी नव्हती. ज्यात विचारसरणीने पार दोन टोकाचे असलेले पक्ष सुद्धा म्हणजे कम्युनिस्ट आणि जनसंघ हे एकत्र आले होते. त्यामुळे ती टिकणारी नव्हतीच.
त्यांचा एकच मूळ हेतू होता तो म्हणजे लोकशाहीची पुनर्स्थापना आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीला विरोध.
काँग्रेस त्या काळातही तळागाळाच्या लोकांमध्ये गांधीबाबाची काँग्रेस म्हणूनच प्रसिद्ध होती. सर्व दूर पसरलेल्या जनतेत इतर पक्षांचे तितके बस्तान बसलेले नव्हते. तेंव्हा काँग्रेस परत निवडून येणार यात कुणाल फारशी शंका नव्हती. एवढच होतं कि जनता पक्ष आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल कि नाही.
परंतु समाजवादी लोकांच्या मूळ विचारसरणीमुळे ( ज्यात नेते जास्त आणि अनुयायी कमी) तो तीन वर्षातच आटपला.

शाम भागवत's picture

22 Jul 2018 - 11:52 pm | शाम भागवत

वाचतोय.
पण राजकीय धाग्यावर काही लिहायच धाडसच होत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

25 Jul 2018 - 6:08 am | सोमनाथ खांदवे

वैयक्तिक टीका टाळून करा सुरवात हळूहळू , स्वतः ला व्यक्त करण्यासाठी असल्या व्यासपीठाचा उपयोग होतो व्हाट्स ऍप तर पोरखेळ च झाला आहे .