गाभा:
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
प्रतिक्रिया
3 Sep 2016 - 8:10 am | श्रीगुरुजी
>>> अक्षरश: डोक्याचा भुगा होणारे प्रॉब्लेम येतात. कधी कधी 16-16 तास काम करून issues फिक्स केलेले आहेत. काही लोक (तुम्ही असे म्हणत नाही) समजतात तितके आय.टी. फिल्ड म्हणजे टाईमपास नाही.
+ 1
2 Sep 2016 - 2:37 pm | श्रीगुरुजी
प्रस्न मोदकभाऊंना असला तरी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
भारतात ओरिजिनल कोड डेव्हलपमेंट सुद्धा होते. अनेक कंपन्यांनी स्वतःच्या प्रोपायटरी लायब्रर्या डेव्हलप केलेल्या आहेत. अनेक कंपन्यांनी स्वतःचे प्रोप्रायटरी प्रॉडक्टस् डेव्हलप केले आहेत. 'टॅली' हे अकाउंटिग प्रॉडक्ट भारतीय आहे. भारतीय कंपन्या कोड एनहान्समेंट, डिफेक्ट फिक्सिंग इ. कामांप्रमाणे ओरिजिनल कोड डेव्हलपमेंटचे काम सुद्धा करतात. सीडॅक या निमसरकारी कंपनीचे सुद्धा स्वतःचे प्रॉडक्ट आहेत.
27 Oct 2016 - 10:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
भरपुर ओरिजिनल डेव्हलपमेंट असते. अगदी रॉकेट सायंन्स नसलं तरी लोकांच्या मोबाईलचे लोकेशन (जीपीएस न वापरता) शोधण्यापासुनतर प्रचंड स्पीडनी होणारे स्टॉक मार्केटचे व्यवहार सांभाळणारी प्रणाली वगैरे वगैरे भरपुर होत असतं काम.
2 Sep 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी
गुळगुळीत व स्वच्छ दाढी केलेली असणे, स्वच्छ इस्त्रीचे कपडे असणे, पदवेशांना पॉलिश असणे, लो वेस्ट व शॉर्ट टॉप सारखे अंतर्वस्त्रांचे (आणि काहीसे आतील अंगाचे सुद्धा) दर्शन घडविणारे लक्षवेधक कपडे नसणे हे धोरण सर्व दृष्टीने योग्य आहे. फक्त सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येच नव्हे तर सर्व सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी असाव्यात. फक्त प्रॉडक्ट बेस्ड किंवा किंवा फक्त सर्व्हिस बेस्ड कंपन्या फारश्या नसतात. बहुतेक कंपन्यात या दोन्ही प्रकारची व इतरही अनेक प्रकारची कामे चालतात. जुने ग्राहक व संभाव्य ग्राहक, सर्वेक्षक कंपन्यांना अनेकवेळा भेटी देतात. आपले सहकारी सुद्धा दाढीचे खुंट वाढलेले, चुरगाळलेले अस्वच्छ कपडे घातलेल्या अवस्थेत कसे तरी दिसतात. बाहेरील ग्राहकांनी तर असे कर्मचारी बघितल्यावर कंपनीबद्दल वाईट मत होईल. त्यामुळे कंपनीने स्वच्छ व व्यवस्थित राहण्याची सक्ती करणे योग्यच आहे.
2 Sep 2016 - 3:15 pm | संदीप डांगे
सहमत आहे, कॅज्युअल कपड्यांचा ट्रेण्ड मावळत चालला आहे. तो येण्याचं कारणही टीनेजर-वीशीतल्या मुलांनी टेक्नॉलॉजी जगतावर मुसंडी मारली होती, तेव्हा त्यांच्या कॅज्युअल वागण्याला ग्राहक कंपन्या मान तुकवून समजून घेत होत्या. आता माहोल बदलला आहे. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या व अनेक धुरंधर निर्माण झाल्याने ज्याचे प्रेझेंटेशन चांगले त्याला प्राधान्य मिळायला लागले आहे, त्यामुळे परत ऑफिशियल कपड्यांचा काळ परत आलाय.
जेव्हा एखादी प्रजाती व तिचे काम दुर्मिळ व परम आवश्यक असते तेव्हा तिचे कसलेही नखरे सहन केल्या जातात, जाहिरात क्षेत्रात आजही कॅज्युअल वातावरण असण्याचे व कायमच राहण्याचे कारण तेच आहे.
2 Sep 2016 - 11:29 am | सुबोध खरे
गाड्या किंवा मोबाईल मध्ये सक्ती करणे याचा एक दुसरा पैलू पण आहे. आपण टाटा मोटर्स मध्ये काम करीत असताना मारुतीची गाडी चालवत असाल तर साहजिक लोक विचारतात का हो टाटाची गाडी चांगली नाही का? म्हणजे तुम्ही आतले म्हणून विचारतोय? यामुळे कुप्रसिद्धी फार पटकन होते. आणि मग हे असे विनोद (?) म्हणून व्हॉट्स अँप वर पटकन प्रसारित होतात. उद्या अशीच गोष्ट रिलायन्स च्या मोबाईल बद्दल होईल यासाठी कंपनी तुम्हाला काही अति घालते तसेच हे आहे.
बाकी रतन टाटांचे माहित नाही पण जे आर डी टाटा स्वतः रोज अँबेसेडर गाडी चालवीत घरी जात असत आणि त्यांच्या गाडीत कुलाब्याला जाणाऱ्या कुणालाही लिफ्ट देत असत अगदी चपराशाला सुद्धा. हे माझ्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे.
2 Sep 2016 - 6:54 pm | तर्राट जोकर
रिलायन्स जिओने खूप आनंदी व्हायची गरज नाही. जगात काहीही मोफत मिळत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. पाचशे रुपयाच्या प्लानमधे चार जीबी डेटा आहे जो १३५एम्बी च्या स्पीडने चार ते सात दिवसात संपेल. फुकट बोलायचे पैसे आधीच वसूल केले आहेत. रात्रीचा डेटा मोफत - ती रात्र २ ते ५. जिओच्या वेबसाईटवर प्लान्स व पॅकेज दिलेत त्यात कॉलींगचे व एसएमएस चे दर ठळक दिले आहेत. जर लाईफ्टाईम फ्री कॉलिंग आहे तर ते दर कशाचे? आजच्या पेपरात प्रधानसेवकांची खाजगी कंपनीच्या जाहिरातीतली उपस्थिती इथे नाकाने कांदे सोलणार्या कोणाला अजून खटकलेली दिसत नाही. नमो नमः
2 Sep 2016 - 7:10 pm | चंपाबाई
मैं ब्यापारी हूं .. असे प्रधानसेवक निवडणुकीपूर्वीच कबूल करुन बसलेत... मग केली जाहिरात तर बिघडलं कुठं ?
2 Sep 2016 - 9:54 pm | सुबोध खरे
जगात काहीही मोफत मिळत नाही हे परत एकदा सिद्ध झालं.
त्यात नवीन काहीच नाही.त्यातुन अम्बानीकडुन काहीही फुकंट मिळेल ही अपेक्शा करणे हे अतीच आहे
मी एअर टेल चे ४ G गेले दिड वर्श वापरतो आहे. ५०० च्या आस पास बिल येत. यात १ जि बि नेट आणी ५००० मिनिटे बोलणे मिळते . त्याच पैशात रिलायन्स जर ४ जि बि नेट आणी अमर्याद बोल्णे देत असेल त र काय वाईट ?
बाकि त्यान्च्या जाहिरातीत न मो च नव्हे तर महात्मा गान्धी स्वामी विवेकानन्द सुद्धा येत आहेत.
अम्बानी कुणा कुणाला वेठिस धरतील ते सान्गता येणार नाही
2 Sep 2016 - 10:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
दुर्दैवाने विवेकानंद अन बापूजी कुठल्या संवैधानिक पदावरही नाहीत हयातही नाहीत !! नमो आपल्या सुदैवाने आहेत एका संवैधानिक पदावर... बाकी काय बोलणार
3 Sep 2016 - 10:53 am | तर्राट जोकर
डॉक्टर, इथे अम्बानीकडून भारतातल्या कोणीही कोणतीही भिकार्यासारखी अपेक्षा करत नाही आहे/केली नव्हती. अम्बानी स्वतः तोंड वर करुन 'फुकट कॉलिंग' सुविधा आहेत असे जाहिर करतात. फाईन प्रिन्टमधे घोटाळा करतात. फ्री शब्दावर भुललेल्या जनतेला जागृत करण्याचा प्रतिसादाचा उद्देश आहे.
अमर्याद बोलणे ह्यावर अधिक माहिती काढा.
म्हणजे अंबानीच्या जाहिरातीत देशाच्या पंतप्रधानांनी मॉडेलिंग करणे तुम्हाला पटलेले आहे तर? उद्या हार्पिक च्या जाहिरातीत स्वच्छ भारत मिशनला वेठीस धरुन पंतप्रधान वापरलेले चालतील. आणखी खूप योजना आहेतच. चांगलंय.. ये तो बस शुरुवात है.. खरंय. आप्टार्ड्सनाच का उगा नेहमी शिव्या द्यायच्या? त्यांचे भाऊबंद तर सगळीकडे आहेत.
3 Sep 2016 - 1:08 pm | श्रीगुरुजी
उगी उगी . . .
3 Sep 2016 - 1:19 pm | तर्राट जोकर
धन्यवाद. तिकडे केजरु के गुलाम धाग्यावर आपण येता जाता रडत असता त्याबद्दल काय?
आपण म्हणे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला अशी गत झाली भक्तांची. हा हा हा हा हा हा.
3 Sep 2016 - 2:16 pm | श्रीगुरुजी
उगी उगी . . .
मिपावरील शेंबूड आख्यानाचा धागा वाचा.
3 Sep 2016 - 2:22 pm | तर्राट जोकर
वरचा प्रतिसाद स्वगत आहे वाटतं. प्रधानसेवकांनी भक्तांना कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं. जियो मेरे लाल
3 Sep 2016 - 2:23 pm | श्रीगुरुजी
उगी उगी . . .
3 Sep 2016 - 1:17 pm | सुबोध खरे
त जो साहेब
अंबानी जर एक रुपयात हत्ती विकत असतील तर तो अटी लागू शिवाय येणारच नाही आणि ती अट अशीच असेल कि माझा उंदीर १ लाख रुपयात घेणाऱ्याला एक रुपयात हत्ती मिळेल. तेंव्हा ते जे काही सांगतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
अंबानी "धंदा करायलाच" बसलेले आहेत ते काही धर्मार्थ व्यवसाय करीत नाहीत. पण त्यांच्या अशा जाहिरातींमुळे इतर कंपन्यांना आपले दर कमी करायला लागतील ग्राहकांच्या दृष्टीने हा फायदा आहे.
लाईफ बॉय जेंव्हा हात धुण्याचा साबण विकतात तेंव्हा ९९ .९९ % जंतू धुतले जातात असे सांगतात. त्यात चूक काहीच नाही पण ते कोणत्याही साबणाने होते हेमंतर सांगत नाहीत.
कॉम्प्लान घेणाऱ्यांची उंची हि ते न घेणाऱ्यांच्या उंचीपेक्षा हि जास्त वाढते. सरासरी ३ मिमी वाढते असे आमच्या एका सर्व्ह मध्ये आढळले आहे असे खाली * लावून लिहिलेले असते.
सफोला मध्ये शून्य कोलेस्टेरॉल आहे अशी जाहिरात करतात पण कुठल्याही तेलात कोलेस्टेरॉल नसतेच. तेल खाल्ल्याने ते वाढते.
अंबानी त्यापेक्षा वेगळे नाहीतच.
बाकी नमो असलेली जाहिरात मी पाहिली नाही. ते गुरुदेव टागोर पासून म. गांधी पर्यंत सर्व महान लोकांच्या फोटोखाली यांचे स्वप्न पूर्ण करूया म्हणून म्हणत आहेत तसेच काही आहे का ते माहिती नाही.
अमर्याद बोलणे आहे ते तुम्ही नेट पॅक घेतला तर त्यावरच आहे.
3 Sep 2016 - 1:30 pm | तर्राट जोकर
परत तेच. अहो इथे आश्चर्य कोणाला वाटतंय? अंबानी धडधडीत खोटं बोलून जनतेला उल्लू बनवत आहेत एवढंच इथं सांगायचं होतं. कोणीही धंदा करावा काही समस्या नाही, खोटं बोलून फसवून धंदा करावा ह्याला तुमची सहमती असेल काय? इतर कंपन्यांचे दर जिओ च्या तुलनेत कमीच आहेत. खोटं बोलल्यामुळे फक्त उलटं दिसत आहे. बाकी सगळेच तुमच्यासारखे अतिहुशार-अॅड्व्हान्स स्मार्ट नसतात. त्यासाठी हा प्रतिसाद प्रपंच. तुमच्यासारख्या सर्वज्ञ माणसाला काय सांगायचे?
3 Sep 2016 - 1:37 pm | सुबोध खरे
अंबानी धडधडीत खोटं बोलून जनतेला उल्लू बनवत आहेत एवढंच इथं सांगायचं होतं
अहो कोण खोटं बोलत नाहीये
HD रेडी टीव्ही म्हणजे काय तर HD पण नाही.
फेअर अँड लव्हली लावून १५ दिवसात गोरेपण मिळवा
रोज फक्त २० रुपयाचे बॉर्न व्हीटा देणाऱ्या आईला मुलगा मी इंजिनियर झालो कि तुझ्यासाठी घर घेईन म्हणतो.
वानगी दाखल हि उदाहरणे पुरेशी आहेत.
3 Sep 2016 - 2:01 pm | तर्राट जोकर
https://www.jio.com/en-in/plans
जरा अभ्यास करुन घ्या. आय विल बी बॅक.
3 Sep 2016 - 2:21 pm | श्रीगुरुजी
१५ लाख सीसी टीव्ही लावणार, आम्ही इथली व्यवस्था बदलायला आलो आहोत, जनलोकपाल आणणार, सर्वत्र फुकट वायफाय देणार, ५ वर्षात २५ नवीन महाविद्यालये उभारणार, आम्ही भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, . . . ही खोटी आश्वासने विसरलात की काय?
3 Sep 2016 - 2:24 pm | चंपाबाई
तुमचे सत्यवादी मोदी माझे १५ लाख कधी देणार ? शीश महल चा हप्ता भरायचा आहे.
3 Sep 2016 - 2:27 pm | सुबोध खरे
तुम्हाला कर्ज कुणी दिलँ? आणि कोणत्या नावानं ?
3 Sep 2016 - 2:35 pm | श्रीगुरुजी
ROFL
8 Sep 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी
बाहेरील देशात काळा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जर तो सर्व आपल्याला परत आणता आला तर प्रत्येक कुटुंबाला १५-२० लाख रूपय मिळू शकतील. - नरेंद्र मोदी (२०१४ साली एका प्रचारसभेत बोलताना)
काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपय जमा करू असे मोदींनी २०१४ साली प्रचारसभेत आश्वासन दिले होते. आता मात्र ते पैसे न देता ते यू टर्न घेत आहेत. - काँग्रेस, आआप व उर्वरीत मोदी विरोधक
3 Sep 2016 - 3:01 pm | सुबोध खरे
अमर्याद बोलणे आहे ते तुम्ही नेट पॅक घेतला तर त्यावरच आहे.
माफ करा आपल्याच दुव्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच अमर्याद बोलणे फुकट आहे.
1. Voice is truly free – no charge towards voice or the data used to make 4G voice calls.
2 Sep 2016 - 11:06 pm | चंपाबाई
करलो दुनिया मुठ्ठी में ....
अशी टॅग लाईन घेवुन रिलायन्स मोबाईलच्या क्षेत्रात उतरलं. भारतातला सर्वात मोठा उद्योग समुहांपैकी एक असल्याने यशाची खात्री होतीच. त्यात राजकारण्यांचं पाठबळ. ५०० रु. दोन फोन अशी स्किम दिली आणि अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. पुढे त्याची बिलं आल्यावर लोकांनी ते फोन फेकुन दिले आणि परत जुन्या ऑपरेटरकडे वळाले. रिलायन्सचा हा डाव फारसा यशस्वी झाला नाही. तोटाच झाला असावा.
आता परत एकदा तोच डाव खेळतेय तीच कंपनी. फोर जीचं आमिष देवुन.
अनलिमिटेड डाटा आणि कॉल्स फ्री आहेत तिन का चार महिन्यासाठी.त्यामुळे त्या सीमकार्डासाठी उड्या पडताहेत लोकांच्या . काल अनुभव घेतला त्याच्या स्पीडचा. भन्नाट स्पीड आहे. पण मागच्या अनुभवातुन यावेळी कंपनी शहाणी झालीय असं वाटतंय. मागच्या चुकांवर काहितरी तोडगे आणि उपाय केलेत असं दिसतंय.
मागच्या योजनेत हॅंडसेट त्यांचाच होता,नंतर मग इतर वापरायला अलाउड केलं. या वेळीही ते हॅंडसेट देताहेत किंवा तुमच्याही हॅंडसेटवर हे सीम वापरता येतं. अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटा फ्री आहे म्हणुन लोक आता वापरु नंतर फेकुन देवु अशा मुडमधे आहेत. "फुकट घावलं अन बापलेक धावलं"अशा पध्दतीने लाईनी लावुन लोक फोन घेताहेत, पण सावधान ... कंपनीने यावेळी चाल खेळलीय. तुम्ही बरोबर सापडणार त्यांना.
ते सीम तुमच्या मोबाईल मधे घातलं की पहिले तुमचे मोबाईल मधे त्याचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यात तुम्हाला आलेला अॅक्टिव्हेशन कोड टाकावा लागतो आणि मग तुमचा फोन सुरु होतो. म्हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच नंबर त्याच फोनमधे वापरावा लागेल. जर दुसरा वापरायचा असेल तर अनलॉक किंवा कंपनीची परवानगी लागु शकते अशी शक्यता आहे . चार महिन्यानी बंद करता येणार नाही. आणि जर बंदच करायचा झाला तर रिलायन्स तुमच्याकडे मागच्या काळाचं बील मागु शकते. आपल्या महागड्या हॅंडसेटपेक्षा त्याचं बिल जास्त आलं नाही म्हणजे मिळवली.कारण यावेळीही सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि रिलायन्स बिलाच्या बाबत फार बदनाम आहे. त्यांचाच फोन घेवुन चार महिने वापरुन मग नंतर नसेल परवडत तर हॅंडसेट चे पैसे अक्कलखाती टाकुन फुकट डाटा वापरायचा असेल तर हरकत नाही.
नाहितर नेहेमीप्रमाणे रिलायन्स च्या जाळ्यात अडकुन "नाटक फुकट ,थेटर बाहेर पडायचे १०० रु " असला प्रकार होवु नये म्हणजे झालं
........................
2 Sep 2016 - 11:24 pm | अभ्या..
हे जराजरा खरं वाटतय बरं का.
चंबा कवाबवा मुद्द्याचे बोलतीय.
तर मी १ म्हैन्यापूर्वी जिओ घेतले विथ एल्वायेफ हॅन्डसेट. त्याच्या वायफायवर सगळे पीसी, लॅपटॉप, मोबाईल वापरतो. स्पीड समाधानकारक. जवळपास ५ एमबीपीएस. ऑक्टो एन्ड पर्यंत फ्री डेटा असे बोललेले त्यावेळी. आता डिसेंबरपर्यंत आहे. माझ्या एका म्हैन्याच्या डेटा खर्चात पाच महिने मिळाले. प्लस पीस ला पीस अँड्रोईड आहेच.
आता एक सीम घ्यावे म्हणून मी रिला. डिजीटल स्टोअर ला गेलो. तो म्हणाला सगळे जिओ अॅप डाउनलोड करा. त्यत माय जिओ आणि जॉइन जिओ असतात. त्यातून क्युआर/बार कोड मिळेल. तो दाखवा आणि सीम न्या. ते अॅप सुरुवातीला २० एम बी दाखवतत. डाउनलोडिंग पूर्ण झाल्यावर ४०० च्या आसपास एमबी होतात. तेवढे करताच माझा फोन हँगला. आधीचे आयडीया चक्क बंद. कॉलिंग नाही की कांड्या दिसेनात. शेजारीच आयडीया स्टोअर होते. तेथे विचार्ल्यावर तो म्हणे की रिलायन्सचे अॅप्स फोनचे सेटिंग बदलतात. ते इतर कंपन्याना न चालणेबल होतात. ते आधी अनैन्स्टोल करा. तेवढे केल्यावर आणि फोन रिस्टोअर केल्यावरच (२ दिवसाचा नवा अस्ल्याने केला) आयडीया पूर्ववत चालू झाले. असल्या काड्या ह्यापुढे मला तरी झेपणार नाहीत सो.. रामराम जिओ. अगदी रुळल्यानंतर पहाता येईल. तोपर्यंत हॉटस्पॉटचे नेट वापरणारच. आयडीया व्होडाफोनवाले सुधरले तरी बरेच आहे म्हणा.
3 Sep 2016 - 1:04 am | चंपाबाई
ते मला व्हाट्सपवर आले.
11 Sep 2016 - 9:11 pm | सुबोध खरे
ते मला व्हाट्सपवर आले.
म्हणजे व्हॉट्स ऍप वर आलेले "काहीही" प्रतिसाद म्हणून चालेल म्हणता?
नक्की ना ?
लक्षात ठेवू.
11 Sep 2016 - 5:29 pm | श्री गावसेना प्रमुख
ते सीम तुमच्या मोबाईल मधे घातलं की पहिले तुमचे मोबाईल मधे त्याचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यात तुम्हाला आलेला अॅक्टिव्हेशन कोड टाकावा लागतो आणि मग तुमचा फोन सुरु होतो. म्हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच नंबर त्याच फोनमधे वापरावा लागेल. जर दुसरा वापरायचा असेल तर अनलॉक किंवा कंपनीची परवानगी लागु शकते अशी शक्यता आहे . चार महिन्यानी बंद करता येणार नाही. आणि जर बंदच करायचा झाला तर रिलायन्स तुमच्याकडे मागच्या काळाचं बील मागु शकते. चम्पाबाइ तुम्हि तद्दन खोटी माहीती देत आहात,तुम्ही अगदि जिओ चे सिमकार्ड काढुन फेकुन दिले तरि LYF चे मोबाइल चालतात.आणी बाकीच्या हँडसेट निर्मात्यांना काय करायच आहे त्यांच्या मोबाईल मध्ये ग्राहक कोनतेही कार्ड वापरेना.असे जर आयएमइआय वरुन जर बाकिच्या सेवा प्रदात्यांची सेवा जर बन्द करता आलि असती तर हा खेळ कधीचा सुरु झाला असता,जास्तीत जास्त काय होइल त्या मोबाइल शिवाय दुसरिकडे स्किम देणार नाहीत.
11 Sep 2016 - 6:48 pm | चंपाबाई
ते मला व्हाट्सपवर आले. त्याची खात्री करुन घ्यायची म्हणूनच इथे टाकले. अशाच प्रकारचा मेसेज व्हाट्सपवर अजुन एका ठिकाणीही आला आहे.
15 Sep 2016 - 12:35 am | हेमन्त वाघे
Reliance telecom आणि Reliance Energy दोन्ही कंपन्या आतून एकच आहेत . खरे तर eliance telecom ची युक्ती आहे कि कि ते आपल्या घरातील विद्युतशक्ती परत Reliance Energy ला पाठवणार आहेत. आणि प्रत्येक घरातून प्र्त्येक्वेलेला अतिशय थोडी जास्तीची वीज घेवून ती परत Reliance Energy च्या ग्रीड मध्ये परत पाठवली जाईल . ज्यांनी Einstin चे सूत्र वाचले असेल त्यांना लगेच कळेल ( E = m c वर्ग ) कि उर्जेचे येका प्रकारातून दुसर्यात हस्तातरण होऊ शकते . डेटा चे प्रसारण म्हणजे उर्जेचाच प्रवास आहे . आणि हा डेटा तर फोनकडून operator कडे हि जात असतो . पण चार्जिंग करताना जो आपण जास्ती वेळ चार्जर लावतो त्यातून , तसेच आपण बोलतो तेव्हा आपल्या फोनची विद्युतशक्ती हि Reliance Energy कडे पाठवली जाईल . असे करणे फक्त Reliance लाच शक्य आहे कारण जगात अशी फक्त येकच कंपनी आहे जी telecom आणि Energy त आहे . जास्ती झालेली वीज ते आपल्याला विकू शकतात किंवा तिचे पेट्रोल मध्ये रुपांतर करू शक्तातात. Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another. - Conservation of energy ) आणि पेट्रो केमिकॅल्स मध्ये कोणती कंपनी आहे - Reliance !!!! Whatsapp वरून
2 Sep 2016 - 7:05 pm | भिंगरी
पैलवान योगेश्वर दत्तला सुवर्ण पदक मिळू शकत. लंडन ऑलिंपिक मधले सुवर्ण पदक तसेच रजत पदक विजेते उत्तेजक चाचणीत दोषी असण्याची शक्यता.
2 Sep 2016 - 7:09 pm | संदीप डांगे
अहो, त्याचं स्वतःचंही पदक अजून कन्फर्म नाही ना? चाचण्यांचे निकाल येतंच आहेत अजून... रजत पदकाचे रद्द होणे कन्फर्म झाले होते दोन दिवसांआधी. आता सुवर्णपण काय?
2 Sep 2016 - 7:12 pm | भिंगरी
हो तेही खरेच. नाहीतर तेलही गेले तूपही गेले आणि...........
असे व्हायचे.
3 Sep 2016 - 11:58 am | इरसाल
रेफ्रीला सुवर्ण पदक मिळायचे !!!!
3 Sep 2016 - 11:58 am | संदीप डांगे
=))
3 Sep 2016 - 1:21 pm | अभ्या..
हा ना. भारतीय खेळाडूंनो. आलिम्पिकाला जावाच पण त्यापेक्षा चारित्र्य स्वच्छ ठेवा (म्हणजे डोपिंग बिपिंग करु नका). न जाणो कधी पदक मिळेल.
थोड्या दिवसानी सोज्ज्वळ टीम ह्यासाठी पण पदक जाहीर होणारे.
4 Sep 2016 - 12:41 pm | अमितदादा
काश्मीर मध्ये काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. काश्मीर मध्ये दहशतवाद कमी करण्यामध्ये j&k पोलिसांचा मोलाचा वाटा आहे. काश्मीर पोलिसांचा SOG हे युनिट आर्मी बरोबर प्रत्येक चकमकी मध्ये भाग घेत तसेच स्थानिक गुप्त माहिती गोळा करण्यात SOG चा मोठा वाटा आहे. काश्मीर मधील कायदा सुव्यवस्था सुद्धा सांभाळण्यात यांचा मोठा वाटा आहे. आता हळूहळू काश्मीर पोलिसांच्यात असंतोष पसरत चाललाय, पोलीस घरी जायला सुद्धा भिऊ लागले आहेत. दक्षिण काश्मीर मध्ये तर पोलीस ड्युटी वर जात नाहीत त्यामुळं कायदा सुवस्थेचा ताण CRPF वर येऊन पडला आहे आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय त्यांचं काम खूप अवघड होऊन बसलंय. काश्मीर मध्ये 12 कि 14 वर्षानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी BSF तैनात कारावी लागली आहे. राज्य शासन हे जाणीवपूर्वक inactive झालं आहे. काश्मीर पोलीस असंतुष्ट होणं हि धोक्याची घंटा आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/kashmir-unrest-v...
http://scroll.in/article/814100/why-the-mehbooba-flag-fiasco-is-symbolic...
4 Sep 2016 - 1:04 pm | गामा पैलवान
लोकहो,
कामावर असतांना प्राणघातक हल्ल्यात दिवंगत झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या अंत्यसंस्काराची बातमी इथे आहे : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=JAQUAV
प्रकाशचित्र :

यात शवपेटिका स्पष्ट दिसते आहे. तसेच वार्तेनुसार हा मंत्राग्नी नसून भडाग्नी होता. एव्हढं तपशीलवार वर्णन कशासाठी केलं असावं? खास कारण आहे का? यापूर्वी अशा प्रकारे अनेक पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे वार्तांकन फारसे होत नसे. म्हणून शंका आली.
आ.न.,
-गा.पै.
4 Sep 2016 - 1:58 pm | सुबोध खरे
http://m.hindustantimes.com/mumbai-news/maha-second-only-to-up-on-police...
पुढील वर्षी निवडणूका आहेत.
4 Sep 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी
सिधु आता नवीन पक्ष काढतोय. आआप आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करेल व बायकोलाही आआपचे तिकीट मिळेल या भरवश्यावर राज्यसभेची खासदारकी सोडणार्या सिधुला आआपनेही ठेंगा दाखविलेला दिसतोय. पंजाबी जनता बहुतेक त्याला पहिल्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळाबाद करेल. एकंदरीत त्याची अवस्था 'तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे' अशी होताना दिसतेय.
http://www.ndtv.com/india-news/navjot-sidhu-to-join-new-party-awaz-e-pun...
4 Sep 2016 - 2:50 pm | चंपाबाई
आणि असा हुश्श्शार माणूस एकेकाळी भाजपात होता म्हणे.
4 Sep 2016 - 2:52 pm | चंपाबाई
मोदीनी जिओची जाहिरात केली म्हणे ... डिजिटल इंडियाचा भाग म्हणून.
पण हे चायनामेड आहे म्हणे .. मग मेक इन इंडियाचे काय होणार ?
4 Sep 2016 - 7:43 pm | चंपाबाई
5 Sep 2016 - 8:56 pm | चंपाबाई
लिट्टी चोखा खात मुख्यमंत्री फडणवीस उद्गारले ... मुंबैच्या प्रगतीत यूपी बिहारवाल्यांचे मोठे योगदान आहे.
....
चंपाबाई वेटींग फॉर बकरी ईद ...
5 Sep 2016 - 9:00 pm | डँबिस००७
चंपाबाई,
म्हणजे वाजवु का ?
6 Sep 2016 - 6:58 pm | चंपाबाई
नाही.
5 Sep 2016 - 11:26 pm | अमितदादा
मालदीव च हिंदी महासागर मध्ये स्ट्रॅटेगिक दृष्ट्या असणार महत्व खालील लेखात उत्तमरीत्या नमूद केलं आहे. भारत समर्थक मोहम्मद नाशिद यांची उचलबांगडी होऊन सुद्धा भारताने मालादिव बरोबर सलोख्याचे संबंध ठेवले आहेत, कारण चीन चा वाढता प्रभाव थांबवणे. 2015 साली मालदीव ने आपली घटना बदलून मालदीव मधील जमीन परदेशी व्यक्ती किंवा संस्था विकत घेऊ शकते अशी तरतूद केली. हि तरतूद भविष्यात चीन च्या नौदलाचा स्थळ स्थापण्याची तयारी नाही ना याची चर्चा भारतीय विश्लेषकात आहे.
The Maldives Takes Its Place in Indian Ocean Geopolitics
भारताने हि मोहम्मद नाशिद बरोबर नवीन खेळ खेळाय सुरुवात केलीय, नाशिद गुप्तरित्या श्रीलंकेत येऊन गेले हे वाचले आहे. पाहूया पुढं काय होतंय ते.
6 Sep 2016 - 3:57 pm | श्रीगुरुजी
खांग्रेसने उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभेची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपविलेली आहे. त्यांनी प्रचारासाठी एक नवीन युक्ती काढली आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी अनेक छोट्या खाट (कॉट) सभा घेणार असून त्यात खाटेवर बसून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. राहुलच्या सभेसाठी खांग्रेसने शेकडो खाटांची व्यवस्था केली आहे. आज राहुलची पहिली खाट सभा झाली. सभा संपल्यासंपल्या जमलेल्या शेतकर्यांनी सभेसाठी आणलेल्या खाटा पळवून नेल्या.
Commotion breaks out as locals flee with wooden cots after Rahul Gandhi’s khat sabha in Deoria (Image: Twitter @ANI_news)
6 Sep 2016 - 5:05 pm | संदीप डांगे
चाय पे चर्चा ची आयडिया बदलून वापरत आहेत किशोर,
राहुल गांधींना काहीही मदत होणार नाही प्रशांत किशोरची. नोबडी कॅन हेल्प हिम! =))
6 Sep 2016 - 6:57 pm | चंपाबाई
मोदी आवास योजनेत घर देणार.
१५ लाख देणार.
मग आरामात झोपायला कॉट नको का ? म्हणुन लोकानी कॉट नेली असेल.
मोदीनी अटल कॉट योजना जाहिर करायला हवी होती.
9 Sep 2016 - 1:03 am | चंपाबाई
भाजपीय शहांची सभा ..
http://indianexpress.com/article/india/india-news-india/amit-shah-patida...
6 Sep 2016 - 5:27 pm | इरसाल
चायपे चर्चा च्या चालीवर,
खटियापे चर्चा और खटियापे खर्चा........जरा अश्लिल नाय वाटत !!!!!!!
ज्यायला लोकं पण जाम बेक्कार, खाटाच घेवुन पळाले भेंडी.
कोणीतरी कृपया मोदींच्या "चायपे चर्चा" नंतर लोकं कप घेवुन पळाल्याचा फोटो आणी डाटा टाकावा. प्लीजच प्लीज
6 Sep 2016 - 5:40 pm | फेदरवेट साहेब
कोणीतरी कृपया मोदींच्या "चायपे चर्चा" नंतर लोकं कप घेवुन पळाल्याचा फोटो आणी डाटा टाकावा. प्लीजच प्लीज
कसंय न , हाती सोटा घेऊन चुचकारले तर आमच्या कुत्रे जमातीत तरी अश्या ट्रॅप मध्ये न अडकायचे शहाणपण आहे, त्यामुळे आमचा दुरूनच भूभू:कार (तुम्हा मिपा वरल्या माणसांच्या भाषेत पास), बाकी मिपावर काय, आम्हीही (पंजावर निवांत डोके ठेऊन) मजा बघावी असे खुपसे इतर प्राणी आहेतच! कोणी अडकलं तर बघू मजा हाय काय अन नाय काय
(मानवावर भरोसा नसलेला श्वान)
ढेल्या
8 Sep 2016 - 8:49 am | चंपाबाई
मोदी यांनी गेल्या दोन वर्षांत बडे उद्योगपती आणि धनिकांचे जवळपास १.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले .. राहूल गांधी.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/taking-cots-is-stealing-what-ab...
8 Sep 2016 - 9:04 am | श्रीगुरुजी
ROFL at Pappu's babble and believers in his nonsense talk.
8 Sep 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी
आता फक्त हिच्याकडूनच सल्ला घेणं शिल्लक होतं.
https://www.geo.tv/latest/113804-Malala-calls-on-UN-to-take-notice-of-In...
10 Sep 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी
Musings/Sermons from Malala who has been residing in UK since last 3+ years
___________________________________________________________________________
“I am ready to tell the world that Pakistan is a safe place and teams should go there and play cricket,” Malala told reporters at Edgbaston.
“What outside world thinks about Pakistan is not true and all those terrorists are not Pakistani so teams should come and play in Pakistan and wherever I will go I will tell the world about this,” said Malala.
वयाच्या १९ व्या वर्षीच ही मुलगी खूप हुशार झालेली दिसते.
http://scoreline.asia/malala-to-advocate-return-of-cricket-to-pakistan/
8 Sep 2016 - 7:51 pm | चंपाबाई
एक फेबु पोस्ट
=========================
२०१४ साली सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी पक्षाने ४७ प्रकरणांत एकूण ५८ जणांवर राजद्रोहाचे खटले भरले. त्यातील एकही प्रकरण न्यायालयात टिकले नाही, इतके ते बिनबुडाचे होते. याआधीच्या सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे हे खटले अधिक विखारी आणि विषारी होते. याचे कारण राष्ट्रवादाचा ठेका जणू आपल्या एकट्याकडेच दिलेला आहे आणि अन्य सर्व हे देश बुडवायलाच निघाले आहेत, असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तन असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या सत्ताधारी पक्षाचा चांगलाच मुखभंग होईल. त्याची नितांत गरज होती. कारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक बेजबाबदार वर्तन करणारे सध्याचे सत्ताधारी नेते, टीकाकारांवर राजद्रोहाची कुऱ्हाड चालवण्यात मश्गूल होते. सर्वोच्च न्यायालयाने अशांना भानावर आणले असून "देशातील नागरिकांना सरकारविरोधात, त्यांना वाटेल ते, अगदी 'काहीही' बोलण्याचा अधिकार आहे" असे नमूद केले. - गिरीश कुबेर [संपादकीय - लोकसत्ता दि ७/९/२०१६ पृ ७
8 Sep 2016 - 8:19 pm | श्रीगुरुजी
थापा.
हार्दिक पटेल व JNU gang वरील देशद्रोहाचा गुन्हा न्यायालयाने कायम ठेवलेला आहे.
10 Sep 2016 - 12:32 pm | चंपाबाई
जे एन यू आणि डी यू ( सेंट्रल - ३/ ४ अपवाद ) मध्ये तुमची एबीवीपी उडाली !
12 Sep 2016 - 11:48 am | खालीमुंडी पाताळधुंडी
"सेंट्रल - ३/ ४ अपवाद"
पण दुर्दैव असे कि मिडियावाले हेच हायलाईट करत आहेत भाजपकडून पैसे घेवून
9 Sep 2016 - 11:32 am | इरसाल
https://www.youtube.com/watch?v=-Lvku8rwpgc
३:३० पासुन पुढे ऐकावे.
10 Sep 2016 - 1:56 am | विकास
झाकीर नाईकांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ने राजीव गांधी फाउंडेशनला, ज्याचे संस्थापक सदस्य सोनीया, राहूल, प्रियांका आहेत आणि मनमोहन सिंग पण ट्रस्टचे सदस्य आहेत, २०११ मध्ये "रू. ५० लाख फक्त" दान केले होते....
आज ही बातमी बाहेर आल्यावर काँग्रेसला विचारल्यावर तारांबळ उडाली...
10 Sep 2016 - 8:45 am | चंपाबाई
दान कुणीही कुणाला करु शकतो.
11 Sep 2016 - 9:05 pm | सुबोध खरे
दान कुणीही कुणाला करु शकतो.
नक्की ना?
मग मोदी साहेबानी आपली "प्रतिमा" अंबानींना दान केलेली चालेल ना ? उगाच काव काव केलीत मागे.
किंवा बिर्ला, अदानी, अंबानींनी भाजपाला निवडणूकीसाठी दान केलेले चालेल म्हणता?
उत्तम आहे. लक्षात ठेवू.
11 Sep 2016 - 9:38 pm | चंपाबाई
डॉक्टरजी/सैनिकजी/प्रोफेसरजी
साइड चुकली तुमची.
तुम्ही वकिली करायला हवी होती.
12 Sep 2016 - 10:38 am | सुबोध खरे
हा सल्ला मला बरयाच लोकांनी दिला होता. वकिलीत एक वकील नेहमीच जिंकत असतो मग तो फिर्यादी असो कि आरोपी.
डॉक्टरकीत तुम्ही "नियतीशी" झुंज देत असता त्यात तुमची जीत हि नेहमीच "तात्पुरती" असते. परंतु तुमचा हा तात्पुरता विजय कुणाच्या पराभवाच्या खांद्यावर उभा नसतो.
तेंव्हा पुढच्या जन्मी पण मला डॉक्टरच व्हायला आवडेल.
10 Sep 2016 - 12:17 pm | चंपाबाई
रेल्वे तिकिट बुकिंग दर१०% तिकिटानंतर दरवाढ होणार.
त्यामुळे शेवटी असलेली तिकिटे विमानापेक्षाही महाग होणार.
म्हणजे शेठजी लोकानाच ते पर्वडणार !
11 Sep 2016 - 8:33 am | चंपाबाई
इतकी वर्षे कपिल शर्माचे बांधकाम बेकायदेशीर होते म्हणे. पण लाचखोरीचा आरोप नव्हता,
आता पाच लाखाच्या लाचखोरीचा आरोप झाल्यावर सेना मनसे म्हणतात की त्याचे बांधकाम बेकायदेशीर आहे.
याची नेमकी संगती कशी लावायची ?
11 Sep 2016 - 9:28 am | lakhu risbud
जामोप्या ...अत्यंत अभ्यासू विवेचन
11 Sep 2016 - 3:49 pm | अमितदादा
काही दिवसापूर्वी भारत अमेरिकेत लिमोओ करार झाला त्याविषयी वाचायची इच्छा होती, पण चांगले लेख सापडले नाहीत. ह्या कराराचे समर्थन करणारे लेख इंग्रजी वर्तमानपात्रात वाचले होते पण काही उत्तम वाटले नाहीत. आज लोकसत्तात ह्या कराराची विरुद्ध बाजू मांडणारा लेख आलाय त्याची हि लिंक. विंग कमांडर अभय जोशी यांनी लिहलाय.
http://epaper.loksatta.com/933542/loksatta-pune/11-09-2016#page/7/2
12 Sep 2016 - 10:14 am | अमित भोकरकर
कमांडर साहेबाच्या म्हणन्यानुसार आपण अक्साई चिन आपण चिनला द्यायला हवे होते. मग लगेच सिक्कीम व अरुनाचल प्रदेश पन देउन टाकावे उगाच आपन "महासत्तेशी" पंगा घ्या. मग लगेच काश्मीर आणी पंजाब पाकिस्तानला द्यायला काय हरकत आहे. बाकी हे देश फार सज्जन आहेत.
12 Sep 2016 - 10:37 pm | अमितदादा
पहिली गोष्ट, आज चीन आणि पाकिस्तान ची भारतविरोधी युती होत असताना भारताला जपान, अमेरिका, व्हिएतनाम यांच्याशी सहकार्य वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं माझं मत आहे. वर दिलेला लेख माझ्या विचाराशी समांतर नाहीये, परंतु कधी कधी विरोधी मते/लेख समजून घ्यावी लागतात कारण ती आपल्या विचारातील दोष किंवा धोके लक्षात आणून देतात. उदारणार्थ आपण अमेरिकेशी केलेल्या करारानुसार दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकतो. अमेरिका भारतीय तळाचा वापर चीन विरुद्ध करू शकते पण भारत अमेरिकन तळाचा वापर कशासाठी करणार कॅनडा, आफ्रिका, कि मेक्सिको वरील निगराणी साठी? लेखकाने ह्या करारातील दाखवून दिलेला दोष नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. कोणताही करार करताना आपला स्वार्थ पहिला पाहिजे मित्र राष्ट्राचे हित नव्हे.
दुसरी गोष्ट, सिक्कीम, अरुणाचल, काश्मीर द्या असं लेखक कुठं म्हणतोय हे दाखवून द्या. हे तुमचं interpretation आहे. मुळात लष्करी अधिकारी अस मत कधीच व्यक्त करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी नीं तिबेट ला मान्यता देऊन सिक्कीम ची मान्यता पदरात पाडून घेतली, त्याच तत्वावर लेखक सूचित करतो की aksai chin हा भाग वरच चीन च अस्तित्व मान्य करून चीन बरोबरचा सीमा प्रश्न सोडवून घ्यावा. अर्थात हे चूक कि बरोबर ह्यावर चर्चा होऊ शकते, पण लेखकाचे हे मत काही कचारापेटीत टाकण्यासारखं नाही. भारत सरकार ला ह्याची जाणीव असल्याने आता पर्यंत कोणत्याच सरकार ने अधिकृत रित्या aksai chin चा विषय द्विपक्षीय वाटाघाटीत चर्चिला नाही (मोदींनी हि नाही).
कोणताही देश सज्जन नाही, भारत हि नाही. तसेच कोणताही देश कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो हे काळाने सिद्ध केलं आहे.
अवांतर
जेव्हापासून भारत अमेरिका संबंध सुधारू लागले आहेत, तेंव्हापासून रशिया आणि पाकिस्तान ची जवळीक वाढू लागली आहे. मागे रशिया ने पाकिस्तान ला हेलिकॉप्टर विकण्या संदर्भात चाचपणी केली होती. आता आलेल्या बातमी नुसार रशिया आणि पाकिस्तान मध्ये पहिली जॉईंट मिलिटरी excersize होण्याची श्यक्यता आहे.
भविष्यात भारत अमेरिका जपान व्हिएतनाम यांचा एक गट आणि रशिया चीन पाकिस्तान यांचा विरोधी गट तयार होतोय कि काय याची शंका येतीय.
23 Sep 2016 - 12:35 pm | पुंबा
रशिया आणि पाक यांच्यात होणारा हा संयुक्त युद्धाभ्यास रद्द करण्याचा निर्णय रशियाने उरी हल्ल्यानंतर घेतला. रशिया भारताचा एकमेव विश्वसनिय, ऑल वेदर मित्र आहे हे पुन:पुन्हा सिद्ध होते. काही काळापासून रशिया-पाक-चीन अशी तिहेरी फळी भारत-अमेरिका जवळिकीमुळे निर्माण होताना दिसत होती. आता राजनयाच्या द्रुष्टीने भारताने आपल्या रशियाशी असलेल्या मित्रत्वाचा फायदा करुन घ्यावा आणी पाकिस्तानला चीन आणि रशिया दोहोंपासून दूर करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात चीन-पाकिस्तान संबंध cpec मुळे शिखरावर आहेत, तरीही चीनला पाकपासून तोडण्यासाठी आणखी कोणते राजनयिक पावले उचलता येतील?
23 Sep 2016 - 3:36 pm | धर्मराजमुटके
तुमची माहिती चुकीची आहे. इकडे वाचा.
24 Sep 2016 - 9:11 pm | अमितदादा
मुळात आंतराष्ट्रीय संदर्भाबाबतीत ऑल वेदर मित्राची व्याख्या वेदर पाहून मैत्री असा करायला हवा , कोण कायमचा शत्रू नाही कोण कायमचा मित्र नाही, सर्व काही काळाचा महिमा:). असो काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तान मध्ये रशिया च्या नाकीनऊ आणणारा पाकिस्तान आज रशिया बरोबर चांगले संबंध हळूहळू प्रस्थापित करत आहे.
चीन ला पाकिस्तान पासून तोडणे नजीकच्या काळात श्यक्य नाही कारण भारतविरोधी राजकारणात पाकिस्तान चीन च एक हुकमी पत्ता आहे. तसेच CPEC प्रोजेक्ट चीन च्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.
11 Sep 2016 - 11:53 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
आता मलालाचा विषय निघालाच आहे तर थोडी माहिती झाडतो. ही अतिशय दुर्दैवी मुलगी आहे. ब्रिटनचा माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन हा संयुक्त राष्ट्रसंघाचा शिक्षण दूत आहे. याला पाकिस्तानात खाजगी शाळांचं जाळं विणायचं आहे. त्याकरिता कोणतरी एक चेहरा हवा म्हणून झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप) यास गळ घातली. हाही पाकिस्तानातला एक शिक्षणसम्राट आहे.
तर मलालाच्या बापाने मलालाला विकायला काढली. हे तालिबान्यांना आवडलं नाही. त्यांनी त्यांच्या परीने (= डोक्यात गोळ्या झाडून) तिला थोपवण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मलालाचं नाव छापून आल्यावर तिला एकटी सोडायला नको ना? मग ही अक्कल झियाउद्दीनला नव्हती का? छेछे, त्यानेच तर पोटच्या पोरीला विकायला काढली!
मलाला हे लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू आहे. बस एव्हढीच जाणीव ठेवावी ही वाचकांना विनंती. ती जे बोलते ती सगळी पढवलेली पोपटपंची (= script) आहे.
आ.न.,
-गा.पै.
12 Sep 2016 - 7:32 am | चंपाबाई
तुमच्या ह्या प्रतिसादात मलालाच्या बापाच्या ऐवजी 'अडानी अंबानी' व मलालाच्या जागी मोदींचे नाव घालायची माझी इच्छा होत आहे.
12 Sep 2016 - 10:35 am | सुबोध खरे
आई आई ग!
लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू
चंपाबाईना मोदी साहेब म्हणजे कोकरू वाटले हे वाचून डोळे पाणावले.
गहिवरून आले, दिल भर आया आणि असे जे काही होऊ शकते ते सर्व झाले.
चंपाबाई
मोदी साहेब अख्ख्या काँग्रेस,समाजवादी, सुडोसेक्युलर, डावे, अति डावे या सर्वाना गुजरात मध्ये पुरून जमिनीवर ५फूट ६ इंच उंच आणि ५६ इंच रुंद असे दिल्लीत उरले आहेत. तुम्ही चिंता करणे सोडुन द्या
12 Sep 2016 - 10:52 am | विशुमित
गामा जी ,
"झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)"
हे मलालाच्या वडील आहेत म्हणून "(=मलालाचा बाप)". बाकी त्यांची पार्श्व भूमी काही का असेनात आपण आपला सुसंस्कृतपणा सोडावा का?
नार्कोटेक औषध तीर्थ, चहा आणि अन्नामध्ये देऊन साधक मंडळी जमावणाऱ्या आद्य गुरूं आणि जागतिक हिंसेला खतपाणी घालणाऱ्या मौलवींपेक्षा शिक्षण सम्राट नक्कीच किती तरी पटीने चांगलेच म्हणावे लागतील.
12 Sep 2016 - 11:30 am | गामा पैलवान
विशुमित,
तुमचा रोख सनातन संस्थेकडे आहे हे प्रतिसादातून दिसतं. तसंही पाहता, निरपराध साधकांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या पोलिसांशी सुसंस्कृतपणे वागून काही उपयोग नाहीच्चे मुळी. त्यामुळे मी आजिब्बात सुसंस्कृत नाही बरंका.
बाकी, औषधात वा तीर्थात अंमली पदार्थ सापडल्याचा काही पुरावा वगैरे मिळाला का? की आपली बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!
आ.न.,
-गा.पै.
12 Sep 2016 - 11:43 am | विशुमित
इतके दिवस "संस्थेत" राहून सुद्धा जी व्यक्ती सुसंस्कृत नाही बनू शकली तर मग इतर कथित साधकांनी आपले आयुष्य गुरु चरणी लीन करण्यात काय हासील?
"नमस्कार कसा करावा" असले बौद्धिक दुसऱ्यांना पाजणाऱ्यापासून कथित अध्यात्म प्रेमींनी दूर राहिलेलेच बरं..!!
विचार नाही पटले की झोडून काढा अशीच प्रतिमा असणाऱ्यांनाचा संग खरंच मोक्षाकडे घेऊन जाईल का ?
गुन्हा सिद्ध झाला तरच दोषी असं असेल तर छगन बाप्पा निर्दोषच म्हणावे लागतील नाही.
13 Sep 2016 - 1:01 am | गामा पैलवान
विशुमित,
तुमच्या प्रतिसादाचा उद्देश कळला. त्याचं काय आहे की सनातनवाले सगळं सनदशीर मार्गाने करतात. म्हणून सुहेल शर्मासारख्या काही पोलिसांना फुकटची चरबी चढली आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवण्यापर्यंत सुहेल शर्माची मजल गेली आहे. याची चरबी उतरवण्यासाठी संस्कृती कामाची नाही.
आज डॉक्टर तावडे जात्यात आहेत. काल साध्वी, आणि प्रसाद पुरोहित होते. उद्या कोण असेल? संस्कृतीच्या बाता मारणाऱ्यांनी आगोदर या तिघांचा गुन्हा काय आहे ते सांगावे.
आ.न.,
-गा.पै.
12 Sep 2016 - 12:33 pm | विशुमित
४० वर्षांची तपश्चर्या वाया!--- इति नाथा बाबा..!!
म्हणे माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवल्यामुळे सरकारची कारवाई.
माध्यमांवर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणावर ठेवायचा "तावडेंवर "????
http://www.loksatta.com/maharashtra-news/eknath-khadse-5-1300387/
12 Sep 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी
http://www.loksatta.com/maharashtra-news/one-dead-in-malegaon-due-to-ele...
गुटखा खाऊन मारलेली पिचकारी एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. मालेगावमध्ये रविवारी ही घटना घडली. मोहम्मद यासिन असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आपल्या भावाला भेटण्यासाठी रविवारी मालेगावातील रमझानपुऱ्यामध्ये आला होता. भाऊ ज्या इमारतीमध्ये राहात होता. तिथे गेल्यावर मोहम्मदने गुटखा खाल्ला. इमारतीच्या खिडकीतून खाली थुंकत असताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांवर त्याची पिचकारी उडाल्याने त्याला तीव्र दाबाचा विजेचा धक्का बसला. यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाईकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुटख्याची पिचकारी विजेच्या तारांवर पडल्याने विजेचा दाब उलटा आला आणि त्यामुळे मोहम्मदला विजेचा धक्का बसला. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे.
हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही?
सारांश - गुटखा खाल्ल्यावर तारांवर पिचकारी न मारता जिन्याच्या कोपर्यात किंवा तारा नाहीत हे बघून खिडकीतून थेट रस्त्यावर पिचकारी मारावी. म्हणजे जिवानिशी जायचा धोका टळे.
12 Sep 2016 - 2:37 pm | फेदरवेट साहेब
हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही?
छान पिचकारी मारलीय तुम्ही पण.
12 Sep 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी
Dawood Ibrahim's money was not swindled, Indian government had it seized
For months Dawood Ibrahim thought that he was being cheated by his own men, but when he realized that his hawala transactions were being blocked by Indian agencies, he was flabbergasted.
http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-hawala-money-india-sei...
12 Sep 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी
याचसाठी होता केला अट्टाहास
आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत.
http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participati...
13 Sep 2016 - 6:41 pm | श्रीगुरुजी
प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई
रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-com...
13 Sep 2016 - 7:34 pm | मार्मिक गोडसे
छान
13 Sep 2016 - 8:23 pm | इरसाल
गोविंद नारायणाने मोदींच्या सांगण्यावरुन १५ (अक्षरी पंधरा- आहे ना लक्षात १५ लाख) रुपयांसाठी टीसीला आणी त्याच्या मासुम कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची कट-कारस्थाने केली. (भले सुरेश प्रभु भाजप सरकारात असेना, आमच्या पंजाब आणी गोवा येथील प्रचाराला खीळ घालण्यासाठी खास फ्रान्स मधुन डास मागवुन दिल्लीत चिकनगुनिया पसरवला)
13 Sep 2016 - 8:40 pm | चंपाबाई
कपिल शर्माने मोदीना ट्विट केले तर मोदीभक्त हसत होते... डायरेक्ट मोदीना ट्विट ?
अआता हे चालते का ?
13 Sep 2016 - 8:46 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
14 Sep 2016 - 11:57 pm | अमितदादा
गेल्या काहीवर्षापासून संरक्षण आणि शस्त्रास्त्रे खरेदीसाठी अमेरिकेकडे झुकलेला भारत रशिया कडे परत एकदा वळतोय. हि भारत रशिया संबंधासाठी चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काही महिन्यात भारत रशिया बरोबर काही महत्वाचे आणि मोठे डिफेन्स करार करेल. बहुदा रशियाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेलं महत्व, चीन आणि पाकिस्तान शी होणारी जवळीक भारताच्या लक्ष्यात आलेली दिसतेय. ह्या बातमीनुसार भारत आणि रशिया मध्ये पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमानानंच उत्पादन आणि कामोव हेलिकॉप्टर संधर्भात वाटाघाटी ऍडव्हान्स स्टेज वर आहेत . तसेच येत्या काही महिन्यात भारत रशिया कडून S-400 Triumf हि अत्याधुनिक मिसाईल संरक्षण प्रणाली विकत घेऊ शकतो, तसेच एक अणुपाणबुडी भाडेतत्वावर घेऊ शकते . आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत विकसित करत असलेल्या INS विशाल ह्या अणू उर्जेवर चालणाऱ्या aircraft carrier साठी रशिया ची मदत होऊ शकते.
अवांतर
१. भारतीय नौदल ची नवीन आणि अत्याधुनिक विनाशकेची माहिती वाचा इथे
२. रफाले बरोबर येणाऱ्या अत्याधुनिक air to air क्षेपणास्त्राची माहिती इथे
16 Sep 2016 - 8:47 am | चंपाबाई
महाराजांचे आशिर्वाद घेऊ .. सेना भाजपाला निवडून देऊ ...
तुरुंगातून कैदी फरार होण्यामध्ये महाराष्ट्राने बिहारला मागे टाकले.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/...
16 Sep 2016 - 12:01 pm | सुबोध खरे
हे अधिकृत आकडे आहेत.
एकदा बिहारला जाऊन प्रत्यक्ष पहा.
काही लोकांसाठी तुरुंग हा बाहेरपेक्षा जास्त चांगला आहे. दोन वेळच्या जेवणाची सोयही होते.
आणि दुसरीकडे काही लोकांचे तुरुंगात राहूनहि राजेशाही थाट चालू असतात जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हि लाजवतील. .
16 Sep 2016 - 3:34 pm | चंपाबाई
महाराजांचे आशिर्वाद मोदीना मिळाले की कैद्याना ? कैदी पसार होत आहेत.
17 Sep 2016 - 1:13 pm | श्रीगुरुजी
आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असूनही वर्तमानपत्रात एकही जाहिरात नाही, रस्त्यावर एकही फ्लेक्स नाही ... काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय.
17 Sep 2016 - 4:05 pm | चंपाबाई
बर्थडे फ्लेक्स राजकारण्यांचे लागतात... अंबानीच्या जाहिरातीत काम करुन मोदी आता प्रोफेशनल मॉडेल झालेत
17 Sep 2016 - 5:41 pm | फेदरवेट साहेब
या इकडे अहमदाबादेत, किंवा गुजरातेत, म्हणाल तितके फ्लेक्स दाखवतो, नुसते साधे फ्लेक्स नाहीत तर मोठी मोठी होर्डींग्स सुद्धा लागलेली आहेत. जिथे अच्छे दिन म्हणायचे तिथे म्हणा. अतिरेक करून किमान मोदी साहेबांना तरी कमीपणा आणू नका
17 Sep 2016 - 7:08 pm | श्री गावसेना प्रमुख
भाद्रपदाच्या महिन्यात मोदिंच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने बरेच चवताळलेत कि नाही.
17 Sep 2016 - 11:37 pm | फेदरवेट साहेब
ही असली माणसे पाहिली का आम्हाला कुत्रे जातीत जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. आम्ही किमान भाद्रपदात माजतो, माणसे बारोमास माजलेलीच असतात हे पुन्हा एकदा ठळक रित्या स्पष्ट झाले. कॉमेंट काय आहे ती मोदींविरोधी आहे का मोदींच्या अंधभक्ती विरोधी जिच्यामुळे खुद्द मोदींना त्रास होऊ शकतो, हे न पाहता आरडणे म्हणजे आमच्या भुंकण्यावरताण आहे. शिकुची इच्छा असलेली गुणग्राहक लोकं कुत्र्याकडून इमानी असणे, मायाळूपणा, मिताहार, कार्यनिष्ठा , वगैरे शिकतात अन भोट माणसे फक्त भाद्रपदाकडे लक्ष देऊन असतात, विकृती हो, दुसरं काय म्हणा, अन फरकही काय पडतो म्हणा, Dhelya's life is an open book.
(चावरा/विचारवंत/किलर ऑफ माणसाच्या डोक्यातील जंत)
ढेल्या
18 Sep 2016 - 6:11 pm | श्री गावसेना प्रमुख
पण एकाच कुत्र्याचे किति क्लोन असावेत ह्यालाहि काही मर्यादा आहेत कि नाही.
18 Sep 2016 - 3:26 pm | श्रीगुरुजी
ते नंतर दाखवा. मला आधी बाबासाहेब पुरंदर्यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा जो तुमचा दावा आहे ती कात्रणे बघायची आहेत.
19 Sep 2016 - 10:26 am | फेदरवेट साहेब
ती कात्रणे तूर्तास हाताशी नाहीत, त्यामुळे मी माझा मुद्दा सपशेल मागे घेतो अन पुरावा हाती नसतानासुद्धा बाबसाहेबांबद्दल बोललो ह्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी ऐकीव माहितीवर विधान करायला नको होते, मी मनःपूर्वक माफी मागतो आहे.
(दिलगीर)
ढेल्या
17 Sep 2016 - 6:48 pm | चंपाबाई
उद्यापासून आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो.
महाराष्ट्रात त्यांचे फ्लेक्स लावणार कोण ? शिवसेना भाजपा आता वेगळ्या चुलीची भाषा बोलत आहेत.. त्यात ते विदर्भ वगैरे प्रकर्णानंतर मराठी भाजपे मूग गिळून बसलेत.
17 Sep 2016 - 7:02 pm | ईश्वरसर्वसाक्षी
चंपाबै D.M.L.T ;)
आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो.
सुंता झालयवर पाय झाला का रे बरा ? जंत कसे आहेत.
17 Sep 2016 - 7:11 pm | श्री गावसेना प्रमुख
बाईंनी जेंडर चेंज केलय तुम्हाला माहीत नाही काय.
18 Sep 2016 - 3:39 pm | हेमन्त वाघे
सुंता जरा जास्तीच खाली झाली का ??
19 Sep 2016 - 8:40 am | जेसीना
ब्बघून सांगतो...........कि सांगते ....... नक्की काय ???
खूपच शंका येतात मनात हो बाई / बुआ .....
17 Sep 2016 - 2:58 pm | चिनार
अरुणाचल प्रदेश मध्ये नेमकं काय चाललंय ??
17 Sep 2016 - 4:25 pm | ईश्वरसर्वसाक्षी
चंपाबै D.M.L.T ;)
17 Sep 2016 - 4:26 pm | जेसीना
चंपाबाई जा तुम्ही गावाला ...... चैन पडेल आम्हाला
23 Sep 2016 - 11:50 am | बोलबोलेरो
https://www.thequint.com/uri-attack/2016/09/21/uri-avenged-2-india-paras...
हि बातमी चंदन नंदी या पत्रकाराने लिहिली असून, अन्य कोणत्याही वृत्तपत्रात आलेली नाही. नक्की काय प्रकार असावा?
(In light of the reactions to this article, The Quint decided to reconfirm the information from its sources. We stand by our story.)
At least 20 terrorists have been neutralised in a daring cross-LoC operation by the Indian Army in response to the Uri attack.
Two units of the elite 2 Paras comprising 18-20 soldiers flew across the LoC in the Uri sector in military helicopters and carried out an operation that killed at least 20 suspected terrorists across three terror camps in Pakistan Occupied Kashmir (PoK).
The Quint: Exclusive: Uri Avenged. Special Forces Cross LoC; Kill 20 Terrorists
Total casualties, including those injured, could be as high as 200, sources said.
Military sources revealed to The Quint, which confirmed this information from two other independent sources, that the operation happened during the intervening hours of 20 September and 21 September.
Indications that the Indian Special Forces struck across LoC came in the form of Pakistan declaring a no-fly zone over PoK on 20 September night.
Pakistan’s national flag carrier, Pakistan International Airlines (PIA), had cancelled flights to northern Pakistani cities, including to Gilgit and Skardu in PoK, due to “airspace restrictions”.
PIA called off flights to Gilgit and Skardu in Gilgit-Baltistan region in PoK and Chitral in Khyber-Pakhtunkhwa province.
PIA spokesperson Danyal Gilani had tweeted this information late Tuesday evening.
Pakistan Prime Minister Nawaz Sharif held a telephonic conversation with the country’s powerful Army Chief General Raheel Sharif on Tuesday night ahead of his speech at the UN in which he raised the Kashmir issue. It is understood that they are likely to have discussed this cross-border raid as well.
Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP)
Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP)
Speaking at an event earlier on Wednesday, Defence Minister Manohar Parrikar said the Uri attack may need a “knee-jerk” reaction.
“Won’t go into details of what India can do, but sometimes knee-jerk reaction is required,” he said.
Also Read: Sometimes a Knee-Jerk Reaction is Needed: Parrikar on Uri Attack
Hours after the attack on Sunday morning by four terrorists that killed 18 Indian soldiers, Prime Minister Narendra Modi had tweeted that those behind the act “would not go unpunished”.
Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters)
Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters)
India has blamed the Pakistan-based Jaish-e-Mohammed terrorist outfit for the attack in Uri.
A statement issued by the Ministry of External Affairs listed the items recovered from the terrorists, including GPS tracker with coordinates that indicate the point and time of infiltration across the LoC and the subsequent route to the terror attack site; grenades with Pakistani markings; communication matrix sheets; communication equipment; and other items made in Pakistan, including food, medicines and clothes.
Foreign Secretary S Jaishankar had summoned Pakistani High Commissioner Abdul Basit on Wednesday and conveyed India’s demand for action by Pakistan to crack down on the terror infrastructure in its territory.
23 Sep 2016 - 2:02 pm | गामा पैलवान
बोलबोलेरो,
हा प्रकार काय आहे ते माहीत नाही. बहुधा भारतीय उच्चस्तरावर कमालीची गुप्तता राखली गेलीये.
पाकिस्तानी सैन्य तातडीच्या इशाऱ्यावर (= हाय अॅलर्ट) आहे. काहीतरी शिजतंय खरं. आपला स्वत:चा स्थाननिर्देश (=जीपीएस) प्रणालीचा उपग्रह असल्याने भारत यशस्वीरीत्या गुप्तता पाळू शकला. यापूर्वी परदेशी उपग्रहामार्गे विदा येत असे. त्या मार्गावर नजर ठेवून पाकिस्तानी हेरखात्यास माहिती पुरवली जाई (अशी शंका आहे). आता हा पर्याय बंद झाल्याने पाकी बावचळले असावेत.
आ.न.,
-गा.पै.
23 Sep 2016 - 2:28 pm | बोलबोलेरो
असा एकूण बातमीचा स्वरूप आहे. परंतु, लढाऊ विमानाची धावपळ व प्रवासी विमानोड्डाणावर बंदी वगळता, पाकिस्तानचा काहीच प्रतिसाद नाही.
चंदन नंदीसह , अजूनही काही आयडी वरून या बातमीचे अनुषंगाने सांकेतिक ट्विट्स पाहायला मिळाले. काही कळत नाही.
27 Sep 2016 - 11:13 pm | अमितदादा
A new era in medical science...
Eggs from a mother with damaged mitochondria and a donor with healthy mitochondria are collected. The majority of the genetic material is removed from both eggs. The mother's genetic material is inserted into the donor egg, which can be fertilised by sperm. (News summary)
First 'three person baby' born using new method
28 Sep 2016 - 1:03 am | कैलासवासी सोन्याबापु
ह्याचा फायदा काय होईल म्हणे नेमका अमितदादा?
28 Sep 2016 - 10:39 am | अमितदादा
ह्या संशोधनाचा मुख्य हेतू आई-वडील मध्ये असणारे genetic problem मुलामध्ये येवू न देणे आहे. उदारणार्थ वरील केस मध्ये आईच्या च्या सेल मध्ये असणार्या Mitochondria (आपल्या सेल च इंजिन) मध्ये दोष होता, त्यामुळ Mitochondria हा डोनर च्या सेल मधून घेतला जेणेकरून जन्मणार्या मुलात हा defect नसेल.
माझा ह्या विषयाशी सबंध विद्यापीठात काही कोर्सेस घेतल्यामुळे आहे आणि मला यातील फक्त जुजबी माहिती, मात्र भरपूर उत्सुकता आहे. या विषयातील तज्ञ च याचे फायदे तोटे , किंवा भविष्यातील उपयुक्तातात सांगू शकतील. मला मात्र ह्या संशोधकांना आज ना उद्या नोबेल मिळेल असे वाटतंय कारण हा क्रांतिकारी शोध आहे (जर ते मुल काही वर्ष without any problem वाढलं तर).
अवांतर> Mitochondria बद्दल जालावर वाचा रोचक माहिती हाती लागेल.
28 Oct 2016 - 10:57 am | पुंबा
ग्रेट.. धन्स हे सांगितल्याबद्दल.
4 Oct 2016 - 3:38 pm | श्रीगुरुजी
जयललिताच्या आजाराबद्दल सामाजिक माध्यमातून बर्याच अफवा पसरत आहेत. जयललिता गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारी असून रूग्णालयात दाखल आहे. काही काळ ती सिंगापूरला उपचारासाठी गेली होती. ९२ वर्षीय करूणानिधी आजाराची माहिती जाहीर करावी अशी मागणी करीत आहे. एकंदरीत बर्याच शक्यता आहेत.
समजा हा आजार दीर्घकाल टिकून जयललिता रूग्णालयातच राहिली तरीसुद्धा ती मुख्यमंत्रीपद सोडून काळजीवाहू मुख्यमंत्र्याची नेमणूक करणार नाही. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचारासाठी गेले होते परंतु मुख्यमंत्रीपद सोडले नव्हते. आताही तसेच होईल.
जयललिताच्या अद्रमुक पक्षात ती स्वतः सोडली तर इतर एकही जण जगाला माहिती नाही. आपल्या पक्षात तिने जाणूनबुजून प्रतिस्पर्धी निर्माण होऊन दिलेला नाही. त्यामुळे यदाकदाचित या आजारात तिचे काही बरेवाईट झाले तर पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत करूणानिधी अद्रमुकचे १५-२० आमदार फोडून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. सध्या एकूण २३४ पैकी द्रमुककडे अंदाजे १०० व काँग्रेसकडे ७-८ आमदार आहेत. अद्रमुककडे १२० च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे द्रमुकला बहुमतासाठी जेमतेम १३-१४ आमदार हवे आहेत. जर अशी फोडाफोडी व अश्व खरेदी-विक्री सुरू झाली तर केंद्र सरकार तामिळनाडू विधानसभा बरखास्त/स्थगित करण्याचा निर्णय घेऊ शकते. १९८७ मध्ये एमजीआर च्या देहावसनानंतर अद्रमुकमध्ये सुंदोपसुंदी माजल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षाने मध्यावधी निवडणुक घेतली होती. यावेळीही तसेच होऊ शकते.
7 Oct 2016 - 3:12 am | गामा पैलवान
लोकहो,
वेस्ट ब्यांकेत नवीन वसाहत रचण्याच्या इस्रायलच्या बेताचा अमेरिकेकडून (कधी नव्हे तो) निषेध : http://www.nytimes.com/2016/10/06/world/middleeast/obama-israel-west-ban...
अमेरिकेस याची भारी किंमत मोजावी लागेल.
आ.न.,
-गा.पै.
14 Oct 2016 - 11:17 pm | श्रीगुरुजी
http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-pitches-for-2nd-term-...
प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी फेरनिवड करण्यात यावी, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. प्रणव मुखर्जी हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
__________________________________________________________________________________
शिवसेनेने भाजपला अडचणीत आणण्यासाठीच हे पिल्लू पुढे आणले आहे हे उघड आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणुक जुलै २०१८ मध्ये आहे. भाजप निश्चितच स्वतःच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी उभा करणार हे निश्चित आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार व सर्व राज्यांचे दोन्ही सभागृहातील आमदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे. राज्यसभेत बहुमत नसले तरी मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजप बहुमताच्या आकड्यापासून फार लांब नाही. बरीच मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात असल्याने आमदारांची बरीच मते भाजपकडे आहेत. २०१७ मधील उ.प्र., उत्तराखंड व पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर रालोआची पंजाबमधील आमदार संख्या निश्चितच बर्याच प्रमाणात कमी होईल, परंतु त्याची भरपाई खूप जास्त प्रमाणात उ.प्र. व उत्तराखंड मधून होईल. एकंदरीत भाजपकडे राष्ट्रपतीपदासाठी बरीचशी कुमक आताच तयार आहे.
भाजप अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा जुन्या नेत्यांपैकी कोणाला तरी राष्ट्रपतीपदासाठी उभे करेल असे वाटते. अर्थात पूर्णपणे अनेपेक्षित उमेदवार निवडण्याचे धक्कातंत्र अवलंबण्याचे तंत्र मोदी-शहा वापरू शकतात व ते कोणतातरी वेगळाच उमेदवार पुढे आणू शकतात. महाराष्ट्र, हरयाना व झारखंड मधील मुख्यमंत्री निवडताना त्यांनी असेच धक्कातंत्र वापरले होते.
शिवसेनेने खोडा घातला तर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील अंदाजे ७० आमदारांची व संसदेतील अंदाजे २२-२३ खासदारांची मते भाजपला गमवावी लागतील. हे ओळखून शिवसेनेने आताच फासे टाकले आहेत व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निमित्त करून भाजपला ब्लॅकमेल करता येईल असा उधोजींचा बेत दिसतो.
दुर्दैवाने उधोजींना नुसतीच पोकळ प्रक्षोभक भाषणे करणे एवढेच जमत असलाने व राजकारणातील खेळ्या खेळण्याचे नीटसे जमत असल्याने त्यांनी आपले हुकमाचे पत्ते खूपच आधी उघड केले आहेत. आता मोदी-शहा सावध होउन योग्य ती योजना आखून शिवसेनेला नेहमीप्रमाणे तोंडघशी पाडतील कारण निवडणुकीला अजून ९ महिने अवकाश आहे. उधोजींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले पत्ते उघड केले असते तर कदाचित भाजपची अडचण होऊ शकली असती. दुर्दैवाने उधोजींनी पुन्हा एकदा खूपच घाई करून आपले हुकमाचे पान टाकून दिल्याने आता त्यांच्या हातात हुकमाचे पान शिल्लक नाही व पुन्हा एकदा मोदी-शहा याचा पुरेपूर फायदा उठविणार हे नक्की.
15 Oct 2016 - 12:23 pm | गामा पैलवान
दंड भरून अघोषित धन उघड करायच्या योजनेत भाग्यनगरातल्या एका व्यक्तीने तब्बल दहाहजार कोटी ( म्हणजे १ वर ११ शून्ये बरंका) रुपये इतकी संपत्ती उघड केली आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/hyderabad-individual-decla...
ही व्यक्ती उद्योगपती असणं शक्य नाही असं चंद्राबाबू नायडू म्हणतात. माझ्या मते हा जगमोहन रेड्डी असावा. तो बराच पैसेवाला आहे. सोनिया गांधीने त्याला जाम खुन्नस दिली असल्याने नवीन पाठराखा शोधंत हिंडंत असावासं दिसतंय. मोदींच्या रूपाने आधार मिळाला खरा, पण जबर किंमत मोजावी लागलीये. अर्थात जिवापेक्षा जास्त किंमत कशाचीच नाही. वडील राजशेखर रेड्डींच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे सत्य अधिकंच ठळकपणे जाणवलेलं असावं. पैसा काय परत कसाही मिळवता येईल.
-गा.पै.
15 Oct 2016 - 12:31 pm | chitraa
निवडणुक आय्गाने सचिव प्रकर्णात आपला नोटिस्काढलि.
तसेच करुनही आसाम की त्कडल्याकुठल्या भाजपाला मात्र नोटिस नाही
19 Oct 2016 - 12:06 am | श्रीगुरुजी
बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणींना कोर्टाचा दिलासा, समन्स बजावण्याची याचिका रद्द
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-court-dismisses-plea-to-s...
स्मृती इराणींची पदवी बनावट असल्याच्या खटल्यातून इराणींना दिलासा मिळालेला आहे. आआप सारख्या पापाराझ्झींचा भरणा असलेल्या टॅब्लॉईड पक्षाने व इतर काही जणांनी मागील वर्षात खोटे आरोप करून बदनामी करण्याची मोहीम सुरू केली होती. नरेंद्र मोदींच्या पदव्या बनावट आहेत, स्मृती इराणींची पदवी बनावट आहे, विनोद तावडेंची पदवी बनावट आहे अशी सातत्याने बदनामी सुरू होती. त्या मोहिमेला आता न्यायालयानेच फटका दिला आहे. हाच आआप पक्ष आपल्या पक्षातील बनावट पदवीधारक जितेंद्र तोमर याची भलामण करीत होता.
19 Oct 2016 - 5:28 am | chitraa
न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाला इराणी यांच्या पदवीबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पिक्चर अभी बाकी है !
19 Oct 2016 - 11:34 pm | अमितदादा
गोव्यामध्ये मध्ये नुकतीच BRICS परिषद पार पाडली, ह्यातून भारताच्या हाती नक्की काय लागलं याची चिकित्सा झाली पाहिजे. मुळात ब्रिक्स हि संघटना जगातील अर्धी लोकसंख्या आणि 25% GDP असणाऱ्या राष्ट्रांचा समूह आहे, परंतु आतापर्यंत तरी यातून ठोस असा निर्णय किंवा दिशा दिलेली दिसून आलेली नाही, याच कारण प्रत्येक देशाचे न जुळणारे डावपेच आणि ध्येयधोरणे. मोठा असा निर्णय म्हणून पाहायला गेलं तर New development bank ची स्थापना हेच दिसून येत त्यातही त्याचा प्रमुख भारतीय असणं एवढच ती काय समाधानाची गोष्ट. मात्र चीन ने आशियाई इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँकेची स्थापना केल्यामुळे ब्रिक्स बँक झाकोळली गेली आहे.
गोव्यात झालेल्या परिषदेत भारताला भरीव अस काही मिळालं नाही, चीन आणि रशिया ने पाकिस्तान चा उल्लेख करायचा टाळलं तसेच UN ने जागतिक दहशतवादी ठरवलेल्या लष्कर ए तोयब्बा तसेच जैश च सुद्धा उल्लेख नव्हता. त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीरिया मधील एका दहशतवादी संघटनेचा मात्र उल्लेख होता ज्याचा भारताला धोका नाहीये. खरं तर ह्या परिषदेमध्ये व्यापार, पायाभूत सुविधा, गरिबी ह्या मुद्यांना सुद्धा दहशतवाद बरोबर महत्व द्यायला हवं होतं पण असं झालं नाही. अर्थात काहीच झालं नाही असं नाही परंतु ह्यावेळाची परिषद पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद वरती केंद्रित झाली त्यातून भरीव अस काहीच हाती लागलं नाही.
आधीच सार्क हि संघटना भारत आणि पाकिस्तान च्या वादाची बळी ठरलीय आता ब्रिक्स हि संघटना भारत आणि चीन वादाची बळी ठरताना दिसतेय. आता भारत BIMSTEC हि संघटना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पाहूया पुढं काय होतंय ते.
BRICS Summit: China bulldozed India's security concerns as Russia looked the other way
21 Oct 2016 - 2:36 am | गामा पैलवान
अमितदादा,
माझं मत थोडं वेगळं आहे. ब्रिक्स हा राष्ट्रसंघाप्रमाणे अधिकृत गोट नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक पेढीस पर्याय म्हणून ब्रिक्स विकासपेढी स्थापली जाणं हे मोठंच यश मानायला हवं. चीनने स्वत:ची पेढी स्थापल्याने फारसा फरक पडणार नाही. चिनी पेढी नाणेनिधी व जगत्पेढीस पर्याय नाहीये.
पाकिस्तानचा उल्लेख टाळला गेला हे एका अर्थी बरंच झालं. भारत पाकिस्तानास बघून घेण्यास स्वत: समर्थ आहे असा अर्थ सूचित होतो. पाकिस्तानचे राजनैतिक कोंडी करण्यासाठी ब्रिक्स हे व्यासपीठ फारसं प्रभावी नाही. हा गोट म्हणजे जागतिक मतबांधणी करण्याचे साधन म्हणून बघायला पाहिजे. नेमकं अशाच अर्थाचं राजकारण रशियाने केलं आहे. कसं ते पाहूया.
अल नुसरा या सीरियाच्या आतंकवादी संघटनेचं नाव घेण्यामागचं कारण माझ्या परीने उलगडून सांगतो. क्लिंटन बाईंचे अल नुसराशी गाढ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. हे नाव घेण्यामागे रशियास (म्हणजे पुतीन यांना) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी क्लिंटन बाई नको आहेत असं सूचित करायचं आहे. या सूचनेस उर्वरित ब्रिक्स राष्ट्रांचं मूक अनुमोदन आहे. हा यामागचा गर्भितार्थ आहे.
आ.न.,
-गा.पै.
21 Oct 2016 - 11:29 pm | अमितदादा
हे जरी असलं तरी ह्यातून रशिया चे ध्येय साध्य झाले, पाकिस्तान ला दहशतवादावरून एकटं पाढण्याचं जे भारताचं ध्येय आहे त्यात ब्रिक्स ने खोडा घातला. अर्थात भारत आंतराष्ट्रीय पातळीवर हे काम उत्तमरीत्या करत आहे पण ब्रिक्स मध्ये भारताच्या ह्या भूमिकेशी चीन आणि रशिया ने अधिकृत रित्या सहमती दर्शवली नाही ह्या परिषदेत हा माझा मुद्दा होता.
असो तुमच्या मताचा आदर आहे.
21 Oct 2016 - 3:36 pm | श्रीगुरुजी
जयललिताच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे म्हणे. तिची गुंगी/झोप येणारी औषधे थांबविली असून आता ती बसायला लागली आहे अशी माहिती तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली आहे.
(AIADMK supporters conduct special prayers for the speedy recovery Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa, at the Apollo Hospitals in Chennai on Thursday.)
http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/jayalalithaa-taken-off-...
या बातमीखालील काही निवडक प्रतिक्रिया (वरील चित्र पाहून व खालील प्रतिक्रिया वाचून महाराष्ट्र खूपच प्रगल्भ व परीपक्व आहे असं जाणवलं) -
- Wow.....! I will celebrate Diwali the moment Amma is discharged from the hospital.
- It is a good sign. Mass prayers have their effect. Faith moves mountains.
- Lord Arunachala has answered our prayers
- The prayers displayed in the picture accompanying your news, have proven effective.
- There is no parallel to collective praying which indeed brought about tremendous improvement in Amma's health. I too join millions in praying for her speedy recovery and reoccupy the CM's chair soon to continue her able leadership!
- we look forward to her return to power. Astrology has proved itself right.
- Great news our state needs her for another 2 term
___________________________________________________________________________
आणि कायअप्पावर फिरणारा हा एक विनोद -
In a Tamilnadu school -
Teacher: Why were you absent for 3 days?
Student: Lakshmi died.
Teacher: Who is Lakshmi?
Student: My Appa's wife.
Teacher: Why don't you say your amma died?
Student: If I say amma died, police will arrest me.
23 Oct 2016 - 6:06 pm | श्रीगुरुजी
'ए दिल है मुश्किल' या चित्रपटावरील बंदीचा वाद आता सुटला आहे. यात एक पाकडा असल्याने हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवू दिला जाणार नाही अशी धमकी मनसेने दिली होती. हा चित्रपट दाखवू नये अशी चित्रपटगृहमालकांना मनसेकडून तंबी देखील मिळाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करत असल्याने पाकड्यांना भारतीय चित्रपटात घेऊ नये अशी भावना जनतेत निर्माण होत होती. मनसेने या जनभावनेचा अचूक फायदा उचलून चित्रपटाविरूद्ध मोहीम सुरू केली.
सर्वसाधारणपणे शिवसेना अशा मोहीमा सुरू करते व काँग्रेससारखे पाकिस्तानप्रेमी पक्ष त्याला विरोध करतात असेच आतापर्यंत दिसून आले आहे. यावेळी शिवसेना काही भूमिका घ्यायच्या आतच मनसेने हा मुद्दा उचलल्याने सेनेची पंचाईत झाली व सेनेने या मुद्द्यावर मौन पाळले. दुसरीकडे पाकड्यांविरूद्ध तीव्र जनभावना असल्याने काँग्रेससारख्या पाकिस्तानप्रेमी पक्षांना या भूमिकेला उघड विरोध करता आला नाही व त्यांनी देखील मौन पाळले.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने सरकारला चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. फडणविसांनी देखील चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे मान्य केले. दुसरीकडे सुरवातीला 'कलेला व कलाकारांना देश, धर्म इ. च्या सीमा नसतात', 'कलाक्षेत्राला राजकारणापासून वेगळे ठेवा' इ. नेहमीचीच फार्सिकल विधाने काही चित्रपट निर्मात्यांकडून यायला लागली. परंत चित्रपटाविरूद्ध जनभावना तीव्र असल्याचे लक्षात आल्यावर करण जोहरने संभावितपणाचा आव आणून साळसूदपणे एक चित्रफीत प्रसिद्ध करून आपणही देशभक्त आहोत, आपल्यासाठी देश सर्वप्रथम आहे इ. बाष्कळ बडबड केली. त्याच्या चित्रफितीतील एक वाक्य अत्यंत संतापजनक होते. 'आपण गतवर्षी हा चित्रपट सुरू केला त्यावेळी आजच्या तुलनेत पूर्ण वेगळी परिस्थिती होती, त्यामुळे एका पाकड्याला मी चित्रपटात घेतलं..' असा संतापजनक दावा त्याने केला. पाकिस्तान गेली २५ वर्षे भारतात दहशतवादी हल्ले करीत आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात आजवर शेकडो अतिरेकी हल्ले करून हजारो निष्पाप नागरिकांचे, पोलिसांचे व सैनिकांचे प्राण घेतले आहेत. पाकड्यांची भारतात दहशतवादी हल्ला केला नाही असे गेल्या २५ वर्षात एकही वर्ष नव्हते. अशावेळी गतवर्षी परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्ण भिन्न होती असे समर्थन अत्यंत संतापजनक होते.
परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेवटी फडणविसांनी करण जोहर व राज ठाकर्यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढला. चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील मृत सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा फलक दाखविण्याचे जोहरने कबूल केले. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटींची देणगी देण्याचेही कबूल केले व भविष्यात एकाही पाकड्याला चित्रपटात घेणार नसल्याचे कबूल केले.
फडणविसांनी एकाअर्थी बैठक बोलावून राज ठाकर्यांना एक सन्मानजनक सुटकेचा मार्ग दिला. समजा मनसेने ऐकले नसते तर शेवटी पोलिसांना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु त्यातून दगडफेक, चित्रपटगृहांचे नुकसान, तोडफोड, लाठीमार इ. होऊन शेवटी चित्रपट दाखविला गेलाच असता व तसे होऊन शेवटी आपलाच विजय झाला या भ्रमातून जोहर व इतर निर्मात्यांनी भविष्यात पाकड्यांना घेणे थांबविले नसते.
भविष्यात एकाही पाकड्या नटाला, नटीला, गायकाला, तंत्रज्ञाला चित्रपटात घेणार नाही असे जोहर व निर्मात्यांच्या संघटनेने जाहीर केले आहे. ते आपला शब्द कितपत पाळतील याविषयी माझ्या मनात दाट शंका आहे. मनसेशी तडजोड केल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला आहे तर फडणविसांनी मनसेसारख्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून मनसेचे ब्लॅकमेल सहन केले अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी इ. पाकिस्तानप्रेमी पक्षांनी केली आहे. जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अकाल तख्त, अखिल आसाम विद्यार्थी संघटना, मिझोराममधील लाल डेंगा, काश्मिरमधील फुटिरतावादी हुरीयतचे नेते इ. शी बोलणी करून समझोता करताना आपण जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण गेलो होतो असे काँग्रेसला वाटत नाही. परंतु त्यांच्या मते मनसेशी बोलणी करणे म्हणजे अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार.
पाकिस्तान हा देश आपला शत्रू आहे व सर्व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. पाकिस्तान भारताला नष्ट करण्याचा गेली ७० वर्षे प्रयत्न करीत आहे. शत्रूबद्दल मनात कायम संतापाची व तिरस्काराचीच भावना असली पाहिजे. त्याशिवाय शत्रूचा पराभव करता येणार नाही. ही भावना बोथट झाली तर आपला प्रतिकारही बोथट होतो व त्यामुळे शत्रूचा पराभव होणे अवघड होते. त्यामुळे भारताने पाकशी कोणतेही संबंध न ठेवता सतत पाकचा प्रतिकारच केला पाहिजे.
सीमेवर आपले सैनिक शस्त्रांच्या सहाय्याने पाकशी लढत आहेत. केंद्र सरकार राजकीय पातळीवर पाकशी लढत आहे. सामान्य जनतेने पाकड्यांवर पूर्ण बहिष्कार टाकून व पाकड्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता या लढाईत आपला वाटा उचलला पाहिजे. पाकड्या कलाकारांना दिलेल्या मानधनातून पाक सरकारकडे कराच्या रूपाने त्यातील काही भाग जातो व पाक सरकार त्याच पैशातून दहशतवादी भारतात पाठवून भारतात हल्ले करते. म्हणजे आपण तिकिटांच्या पैशातून जे पैसे निर्मात्याला देतो तेच पैसे शेवटी आपल्याचविरूद्ध वापरले जातात.
त्यामुळे ज्या ज्या चित्रपटात पाकडे नटनट्या, गायक इ. आहेत ते चित्रपट कधीही पहायचे नाहीत असा मी खूप पूर्वीच निश्चय केला होता व आजतगायत तो निश्चय पाळलेला आहे. इतरांनी सुद्धा या चित्रपटांवर बहिष्कार टाकून निर्मात्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना धडा शिकवावा अशी मनोमन इच्छा आहे.
23 Oct 2016 - 7:32 pm | chitraa
भाजपा सर्कार बोलले होते .... लोकानी बघायचे तर बघा अन्यथा नाही , त्यानी स्वतः ठरवावे.
राज ठाकरे हे राज्य / केंद्र सरकारचे अधिकृत अधिकारी / प्रतिनिधी आहेत का ?
पाकिस्तानी कलाकाराला त्या १०० रु तिकिटातील एक रुपया जात असेल , तो पैसा - पाक कर - दहशतवादी , हीच लांबड लिंक उरलेल्या ९९ रुपयाला - भारत शासन कर - भारतीय सैन्य अशीही लावता येईल ना ?
६५ वर्षे दहशत सुरुच आहे , हे गुजरात्मध्ये माहीत नाही का ? गुजरात पाक आयात निर्यात सुरुच आहे ना ?
अडाणीच्या पॉवर प्रोजेक्टला जर त्यानी पाकला वीज विकली तर हाच नियम लावणार का ?
निर्णय घ्यायला राज्य सर्कार एकटे समर्थ नव्हते का ? दुसरा राजकीय पक्ष जो सरकारातही नाही व विरोधी पक्षातही नाही , तो का मदतीला घेतला म्हणे ?
......
उत्तरे द्यायची तयारी नसेल तर नुसते हहपुवा लिहिलेत तरी चालेल.
23 Oct 2016 - 8:28 pm | chitraa
अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार.
गुर्जी, काँग्रेसच्या काळात माय नेम ईज खान, जोधा अकबर , बच्चनचा कोणतातरी सिनेमा .. अशा अनेक सिनेमाना विरोध झाला होता. पण सरकारने सिनेमावाल्याना संरक्षण दिले होते. कुणापुढेही मांडवली केली नव्हती.
सैन्याला दिलेला वाटा हा एक टिप ऑफ आइसबर्ग असण्याची शक्यता आहे. मांडवलदार / मुम/ मनसे/ बीजेपी असे अनेक इतर वाटेही असू शकतील.
बरं, एखादा निर्माता गरीब आहे, त्याचे बजेट कमी आहे, तो पाच कोटी देऊ शकत नाही, त्याचे काय करायचे ?
23 Oct 2016 - 8:02 pm | मार्मिक गोडसे
'साडीच्या' बदल्यात 'शाल' देउन तिरस्कार व्यक्त करायचा. असेच ना?
23 Oct 2016 - 8:34 pm | अनुप ढेरे
खुद्द मुख्यमंत्री असली मांडवली करतो हे अत्यंत दुर्दैवी आहे. सैन्यानेच आम्हाला असली मदत नको म्हणून यांना नकार दिला तर आवडेल.
23 Oct 2016 - 9:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
गुर्जी प्लीज, टक्याच्या धाग्याची लिंक द्या न हो, आगाऊ मागणीच नोंदवतो आहे, त्याचं काय आहे मी मोगाचे प्रश्न डांगेंचा उद्वेग अन ढेरेंनी विचारलेले प्रश्न तिघांनाही प्लस वन देतोय. नंतर तुमची गैरसोय व्हायला नको. =))
23 Oct 2016 - 11:21 pm | श्रीगुरुजी
http://www.misalpav.com/comment/889469#comment-889469
23 Oct 2016 - 10:17 pm | chitraa
अमेरिकेतील सूर्याजी पिसाळावर हिरीरीने चर्चा करणार्यांसाठी खमंग बातमी.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/varun-under-attack-over-de...
संरक्षण दलाची माहिती उघड केल्याचा वरुण गांधींवर आरोप
25 Oct 2016 - 11:53 am | सुज्ञ
comment
25 Oct 2016 - 3:54 pm | श्रीगुरुजी
पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला करून ६० जणांना मारले आहे. आपण जे पेरले त्याची इतकी भयंकर विषारी फळे आपल्याला मिळतील हे पाकिस्तानला अतिरेकी जन्माला घालताना अजिबात वाटले नसेल. एवढे होऊनसुद्धा पाकिस्तान सुधारण्याची सुतराम चिन्हे नाहीत. अर्थात आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट इतके प्रबळ झाले आहेत की पाकिस्तान सरकार ठरवून सुद्धा त्यांना आवरू शकणार नाही. हा देश असाच नष्ट व्हावा हीच मनोमन इच्छा आहे.
http://indiatoday.intoday.in/story/all-you-need-to-know-about-4-hour-que...
25 Oct 2016 - 3:58 pm | श्रीगुरुजी
हिंदुत्वाताची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सात न्यायमुर्तींच्या बेंचने हा निकाल दिला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी याचिका दाखल करून हिंदुत्वाची पुन्हा एकदा व्याख्या करण्याचे अपिल केले होते. न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची समीक्षा करण्याचे अपिल केले होते. सेटलवाड यांच्याशिवाय शमसूल इस्लाम आणि दिलीप मंडल यांनी ‘राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची’ मागणी केली होती.
मुख्य न्यायमुर्तींसमवेत न्यायमूर्ती मदन लोकूर, एस. ए. शोब्दे, ए. के. गोयल, यू. यू. लळीत, डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा या बेंचमध्ये समावेश होता. ‘हिंदुत्व ही जगण्याची शैली असून हिंदू हा कुठला धर्म नसल्याचे १९९५ मध्ये न्यायालयाने म्हटले होते.
डिसेंबर १९९५ मध्ये न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी हिंदुत्वावर मत मागून लोकप्रतिनिधी कायद्यान्वये उल्लंघन करत नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि आर. वाय. प्रभूसारख्या नेत्यांनी केलेल्या अपिलावर आपले मत व्यक्त केले होते. हिंदुत्वाला केवळ हिंदू धर्माच्या मान्यतेच्या आधारवरच समजू नये. ही भारतीय लोकांची जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हटले होते. या निर्णयांतर्गत न्यायालयाने मनोहर जोशी यांची निवडणूक योग्य ठरवली होती. प्रचारादरम्यान मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र सर्वात प्रथम हिंदू राज्य बनेल असे म्हटले होते.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-courts-denies-to-review...
26 Oct 2016 - 1:29 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
तुम्ही म्हणता की पाकिस्तान हा देश असाच नष्ट व्हायला हवा आहे. मात्र इथे एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की बळी गेलेले लोकं पाकिस्तानी नसून बलुची आहेत. अशा हल्ल्याच्या वेळेस आपण बलुची बांधवांच्या बाजूने उभं राहायला हवं.
आ.न.,
-गा.पै.
26 Oct 2016 - 4:38 pm | गामा पैलवान
लोकहो,
मिपावरील स्त्रीनामे घेतलेले पुरुष गायब होण्यामागील रहस्य जाणून घ्या : https://goo.gl/TCIQhR
आ.न.,
-गा.पै.
26 Oct 2016 - 11:36 pm | श्रीगुरुजी
मजेशीर वृत्त
26 Oct 2016 - 11:41 pm | श्रीगुरुजी
डॉ. शरद पवारसाहेबांचे अभिनंदन! लालू, जयललिता यांच्या पाठोपाठ आता पवारसाहेबही डॉक्टर होणार. इतरांच्या तुलनेत फारच उशीरा त्यांना हा सन्मान मिळतोय. 'देर आये लेकिन दुरूस्त आये' असेच म्हणावे लागेल.
http://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-get-d-litt-honorar...
27 Oct 2016 - 9:35 pm | सही रे सई
चीनने असे प्रसिद्धी पत्रक काढलं याचाच अर्थ त्यांना भारतातल्या चीनी वस्तूंवरील बंदीची दाखल घ्यावीशी वाटली. म्हणजेच जरी ते म्हणत असले कि आम्हाला काही फरक पडत नाही तर मग अशी पत्रक काढावीशी का वाटली त्यांना.