प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे
मुळ कविता : तू ये...
अरे द्यायचेच असेल तर दे
आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती
शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर बंदिशी मिलनाचे...
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
हळव्या कोपर्याचे .. असेच हे हळवेच गाणे
अर्थ न पुसता फक्त याचे ओझेच वाहने
वाह्यचेच असेन फुल तरी
समर्पणाचे भाव वाह तु
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
न ला एक काना , ह ला दुसरी वेलांटी
हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही
तु दास भावनांचा .. ओंजळीत भीक वाही
द्यायचेच असेल तर दे
ललाटी चांदण्यांचे गोंदन
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
--- शब्दमेघ ( २९/०४/२०१५)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3928
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला...भारी आवडेश :)
जबरीच रे गणेशा.
द्येवा मी जातो दुरून … ची आठवण झाली....
छान लिहिली कविता गणेशा.
सर्वांचे आभार !
In reply to छान लिहिली कविता गणेशा. by सतिश गावडे
धन्यासारखेच म्हणतो. कविता
सुंदर कविता
सुरेख कविता
जे ब्बात
कविता तशी साधीच आहे, आणि मुळ
In reply to जे ब्बात by ज्ञानोबाचे पैजार
catching up
मस्तं!
सुंदर कविता