Skip to main content

विडंबन

सीट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 20/11/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलसं दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये आता तो तारेवर बसलेला कावळा बघ बघ माझी आठव

कधी कधी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 17/11/2014 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी.
काव्यरस

<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

लेखक जेपी यांनी रविवार, 16/11/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ? लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो. ============================================================================= हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत.

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

लेखक सूड यांनी बुधवार, 12/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

अजुनी बसून आहे

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 07/11/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..
काव्यरस

( ओळखलत का साहेब मला?)

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/१

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 04/11/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

मिपादेवीची विनवणी?

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 30/10/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।। जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।| व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा । कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।| जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका। टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।| जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा। पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।| मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका। डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।| कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।

मांद्यपर्वातील भैरवी

लेखक अवतार यांनी रविवार, 19/10/2014 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पळता पळता वाटे अदृश्य राहिली वाट मी चढतो आहे कधीचा हा आयुष्याचा घाट ठिणगीच्या स्पर्शाने राखेत पेटते आग पृथ्वीच्या भाग्याचा का नक्षत्रांना राग? सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? दाटून मेघ येता मणक्यात चमकते वीज गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज ! मज ठाऊक नाही कोठे ह्या आभाळाचा अंत मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत ! कवी --- (विदाऊट) ट्रेस