माझेच जगणे खरे.....
पूर्वप्रकाशित...
नमस्कार मंडळी
आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो?
ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.
मिसळपाव
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
विटलेला रंग कचर्याचा गंध
ना घुशींना प्रतिबंध.
कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा
लाभला उंदरांस स्वच्छंद!
मी आशा का ठेवावी?
की कबुतरांना शी न व्हावी!
वैतागून संध्