मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे... धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना... उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं! 'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..' या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते.. वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.. क्या बात है..

मम सुखाची ठेव...

विसोबा खेचर ·
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच

'ढापलेली' गाणी

राहूल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रामराम मंडळी. इच्छा असूनही कामाच्या गडबडीत गेल्या काही दिवसात 'मिसळपाव'ची चव घेता आली नाही. म्हटलं जरा वेळ मिळाला की मिसळीच्या ३-४ प्लेटी मस्त उडवून येऊ. आत्ताशी कुठं जरा सवड मिळाली. गिऱ्हाइकांची वर्दळ बघून बरं वाटलं. आता जरा विषयाकडे वळू. सर्वप्रथम सभ्य लोकांसाठी खुलासा: ढापलेली = चोरलेली. तर विषय आहे चोरलेल्या किंवा उचललेल्या गाण्यांचा. जगात अनेक भाषांमधले संगीतकार गाणी चोरतात हे जरी खरे असले तरी तूर्तास हा विषय सगळ्यांच्या लाडक्या अशा 'हिंदी चित्रपटसंगीता'पुरता मर्यादित ठेवला आहे. (अस्मादिकांचे ज्ञान एवढ्यापुरतेच आहे).

पं. रत्नाकर पईंची गुरूपौर्णिमा

मोहन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या रविवारी पईबुवा मस्त गायले. ८२ वर्षे वय जाणवले नाही. बसंत, परज व डागोरी. २५ -३० मि. मजा आला. मला वाटते जयपूर घराण्याचे ते आता 'लास्ट ऑफ द रोमन्स' असावेत. मिपाच्या कलादालनात शास्त्रिय संगीतप्रेमीं साठी हे छायाचीत्र . (आय्.आय.टी. पवई , २१ सप्टे. २००८). - मोहन

आठवणी सवाईग॑धच्या...

mina ·
लेखनविषय:
कलादालनाला माझी मौल्यवान भेट... ग॑गुबाई हनगल आणि अण्णा..दुसरा फोटो गिरीजादेवी आणि अण्णा कुटु॑बासमवेत्..केव्हाचे फोटो आहे ते आपणच मला कळवा..धन्यवाद. m/3007/2862112897_ef534330c2_s.jpg" alt="" />

दुर्गा झाली गौरी!

विकास ·
लेखनविषय:
बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे. भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते.

आशा भोसलेंना मानाचा मुजरा...!

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्‍या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्‍या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....! आशाताई, जियो....! तात्या.

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

मनिष ·
लेखनप्रकार
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

गाणी : खणखणीत नाणी

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड? पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर "छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी "झी'वर "टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. "छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! "मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून "आज या चित्रपटातील गाणे "छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा.

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे. स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं? गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.