धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे...
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना...
उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं!
'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..'
या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते..
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..
क्या बात है..
मिसळपाव

आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....!
आशाताई, जियो....!
तात्या.