धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे...
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना...
उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं!
'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..'
या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते..
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..
क्या बात है.. एक सुंदर, तरल अर्थ असलेली ओळ. 'त्या' या अक्षरावर संगीतकाराने पंचमाची अतिशय हळवी जागा ठेवली आहे. आणि गायकानेही तिला खूप चांगला न्याय दिला आहे.
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..
बरं मग पुढे काय? तर,
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..!
क्या बात है!
पहिल्या ओळीने सुरू केलेल्या संवादाचं, दुसर्या ओळीतल्या 'त्या' या अक्षरावरच्या अत्यंत हळव्या जागेमुळे खूप छान उत्तर मिळतं! पंचमाला सुंदर स्पर्श करून आलेली 'त्या' या अक्षरावरची जागा एखादं सुंदर फुलपाखरू उडून एखाद्या मनमोहक फुलावर अलगदपणे लँड व्हावं त्याप्रमाणे 'फुलापाशी थांब ना..'तल्या षड्जावर येऊन अलगद विसावते! क्या केहेने..!
या दोन ओळीतच हे गाणं आवडून जातं, हृदयाला भिडतं!
सये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि...
या ओळीत पुन्हा एकदा सुरावट टेक ऑफ घेते ती थेट 'सये' शब्दातल्या तार रिखभापर्यंत!
'रमुनी सार्या या जगात' या ओळीत तार शुद्ध गंधाराला हलकासा स्पर्श करून येणारी अवरोही अंगाची ही सुरावट फारच सुरेख आहे. 'सार्या' शब्दातला तार षड्ज खूप समधान देऊन जातो. 'रिक्त भाव असे परि' मधली खास यमन रागातली पंचमावर न्यास असणारी सुरावट यमनचं नैसर्गिक सौंदर्य दाखवून जाते. 'भाव' हा शब्द गायकाने खूपच सुंदर गायला आहे!
कैसे गुंफु गीत हे ?
हे बाकी एकदम कॉन्ट्रास्ट, अनपेक्षित बरं का..! या ओळीतील शुद्ध मध्यमावरचा प्रश्नार्थक न्यास गाण्याची दिशाच बदलतो.. पण संगीतकाराने अगदी थोडाच वेळ हे अनपेक्षित वळण ठेवलं आहे. अगदी 'कैसे गुंफु गीत हे '' हा छोटास्सा प्रश्न विचारण्यापुरतंच म्हणा ना! :)
त्यानंतर लगेच 'धुंद होते शब्द सारे'..' ह्या षड्जावर न्यास असणार्या ओळीने तो संवाद पूर्ण केला आहे.
मंडळी, एक गोष्ट आपल्या लक्षात आली का? गाण्याच्या सुरवातीला 'धुंद होते शब्द सारे' या ओळीचा शुद्ध गंधारावर न्यास आहे, परंतु 'कैसे गुंफु गीत हे?' चा संवाद पूर्ण करण्याकरता संगीतकार 'धुंद होते शब्द सारे' हीच ओळ षड्जावर न्यास ठेऊन पूर्ण करतो.. यावर माझं मत मी इतकंच नोंदवेन की संगीतकाराने या कवितेवर, या गाण्याच्या चालीवर बर्यापैकी विचार केला आहे, चिंतनमनन केलं आहे. आमच्या अभिजात संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर संगीतकाराची उपज खूप चांगली आहे असं म्हणता येईल! :)
मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
या दोन्हीही ओळी फार सुंदर आणि अर्थपूर्ण. 'बरसला मल्हार हा' आणि 'बहरला निशिगंध हा' या दोन्ही सिमिट्रिकल सुरावटीतल्या 'पनीरेग' संगतीमुळे हंसध्वनीची आठवण करून देणारी एक वेगळीच मजा येते आणि मी वर म्हटल्याप्रमाणे 'संगीतकाराची उपज फार चांगली आहे' याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो!
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
या ओळी पुन्हा मूळ चालीचा संदर्भ घेत आपल्यापुढे येतात.
'का कळेना काय झाले, भास की आभास सारे'
पंचमाचा आधार घेऊन विचारलेल्या वरील दोन प्रश्नांना संगीतकाराने तीन तर्हेने उत्तरं दिली आहेत याचं मला कौतुक वाटतं! 'जीवनाचा गंध हा' तल्या उत्तरांगप्रधान अंगाने, 'विश्रांत हा' हे यमनी अंगाने, आणि 'शांत हा' हे पुन्हा मगासच्यासारखं शुद्धमध्यमाची 'गमग' ही संगती घेऊन दिलेलं अनपेक्षित उत्तर! क्या बात है...
असो, मंडळी मला हे गाणं जसं दिसलं, तसं मी लिहिलं आहे. यातलं मला जे मनापासून भावलं ते लिहिलं आहे. एखादं गाणं म्हणजे काय, तर शब्दानुरूप विविध स्वरावलींची केलेली ती एक गुंफण! मला स्वरांची किंचित तोंडओळख असल्यामुळे या गाण्यातले स्वर मला कसे दिसले ते मी लिहिलं आहे. कुणी याला गाण्याचं डिसेक्शन केलं आहे असंही म्हणू शकेल किंवा इतरांना हे गाणं आणखी वेगळं दिसू शकेल, भावू शकेल!
या गाण्याचं एरेंजिंग, ताल-ठेका, त्यातला हृदयाला हात घालणारा बासरीचा वापर इत्यादी सगळं अगदी सुरेख जमून आलंय. चित्रिकरण तर केवळ अप्रतीम! शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यां समर्थ कलाकारांनी आपल्या सहजसुंदर वावरामुळे या गाण्याचा प्रसन्न मूड अगदी छान राखला आहे.
असो, एका सुरेख गाण्याचं दान माझ्या पदरात घातल्याबद्दल कवी कौस्तुभ सावरकर, संगीतकार अमार्त्य राहूल आणि गायक रवींद्र बिजूर यांचा मी ऋणी आहे.. या तिघांचंही मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देतो. या गुणी मंडळींकडून अशीच काही चांगली दानं पदरात पडावीत हीच इच्छा! :)
ऍन्ड लास्ट बट नॉट लीस्ट, या सुरेख गाण्याची फर्माईश करून चार ओळी लिवण्याची संधी दिल्याबद्दल प्राजूदेवींचेही आभार मानतो..! :)
आपला,
(वार्यासंगे वाहायला आवडणारा) तात्या.
सये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि...
या ओळीत पुन्हा एकदा सुरावट टेक ऑफ घेते ती थेट 'सये' शब्दातल्या तार रिखभापर्यंत!
'रमुनी सार्या या जगात' या ओळीत तार शुद्ध गंधाराला हलकासा स्पर्श करून येणारी अवरोही अंगाची ही सुरावट फारच सुरेख आहे. 'सार्या' शब्दातला तार षड्ज खूप समधान देऊन जातो. 'रिक्त भाव असे परि' मधली खास यमन रागातली पंचमावर न्यास असणारी सुरावट यमनचं नैसर्गिक सौंदर्य दाखवून जाते. 'भाव' हा शब्द गायकाने खूपच सुंदर गायला आहे!
कैसे गुंफु गीत हे ?
हे बाकी एकदम कॉन्ट्रास्ट, अनपेक्षित बरं का..! या ओळीतील शुद्ध मध्यमावरचा प्रश्नार्थक न्यास गाण्याची दिशाच बदलतो.. पण संगीतकाराने अगदी थोडाच वेळ हे अनपेक्षित वळण ठेवलं आहे. अगदी 'कैसे गुंफु गीत हे '' हा छोटास्सा प्रश्न विचारण्यापुरतंच म्हणा ना! :)
त्यानंतर लगेच 'धुंद होते शब्द सारे'..' ह्या षड्जावर न्यास असणार्या ओळीने तो संवाद पूर्ण केला आहे.
मंडळी, एक गोष्ट आपल्या लक्षात आली का? गाण्याच्या सुरवातीला 'धुंद होते शब्द सारे' या ओळीचा शुद्ध गंधारावर न्यास आहे, परंतु 'कैसे गुंफु गीत हे?' चा संवाद पूर्ण करण्याकरता संगीतकार 'धुंद होते शब्द सारे' हीच ओळ षड्जावर न्यास ठेऊन पूर्ण करतो.. यावर माझं मत मी इतकंच नोंदवेन की संगीतकाराने या कवितेवर, या गाण्याच्या चालीवर बर्यापैकी विचार केला आहे, चिंतनमनन केलं आहे. आमच्या अभिजात संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर संगीतकाराची उपज खूप चांगली आहे असं म्हणता येईल! :)
मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
या दोन्हीही ओळी फार सुंदर आणि अर्थपूर्ण. 'बरसला मल्हार हा' आणि 'बहरला निशिगंध हा' या दोन्ही सिमिट्रिकल सुरावटीतल्या 'पनीरेग' संगतीमुळे हंसध्वनीची आठवण करून देणारी एक वेगळीच मजा येते आणि मी वर म्हटल्याप्रमाणे 'संगीतकाराची उपज फार चांगली आहे' याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो!
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
या ओळी पुन्हा मूळ चालीचा संदर्भ घेत आपल्यापुढे येतात.
'का कळेना काय झाले, भास की आभास सारे'
पंचमाचा आधार घेऊन विचारलेल्या वरील दोन प्रश्नांना संगीतकाराने तीन तर्हेने उत्तरं दिली आहेत याचं मला कौतुक वाटतं! 'जीवनाचा गंध हा' तल्या उत्तरांगप्रधान अंगाने, 'विश्रांत हा' हे यमनी अंगाने, आणि 'शांत हा' हे पुन्हा मगासच्यासारखं शुद्धमध्यमाची 'गमग' ही संगती घेऊन दिलेलं अनपेक्षित उत्तर! क्या बात है...
असो, मंडळी मला हे गाणं जसं दिसलं, तसं मी लिहिलं आहे. यातलं मला जे मनापासून भावलं ते लिहिलं आहे. एखादं गाणं म्हणजे काय, तर शब्दानुरूप विविध स्वरावलींची केलेली ती एक गुंफण! मला स्वरांची किंचित तोंडओळख असल्यामुळे या गाण्यातले स्वर मला कसे दिसले ते मी लिहिलं आहे. कुणी याला गाण्याचं डिसेक्शन केलं आहे असंही म्हणू शकेल किंवा इतरांना हे गाणं आणखी वेगळं दिसू शकेल, भावू शकेल!
या गाण्याचं एरेंजिंग, ताल-ठेका, त्यातला हृदयाला हात घालणारा बासरीचा वापर इत्यादी सगळं अगदी सुरेख जमून आलंय. चित्रिकरण तर केवळ अप्रतीम! शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यां समर्थ कलाकारांनी आपल्या सहजसुंदर वावरामुळे या गाण्याचा प्रसन्न मूड अगदी छान राखला आहे.
असो, एका सुरेख गाण्याचं दान माझ्या पदरात घातल्याबद्दल कवी कौस्तुभ सावरकर, संगीतकार अमार्त्य राहूल आणि गायक रवींद्र बिजूर यांचा मी ऋणी आहे.. या तिघांचंही मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देतो. या गुणी मंडळींकडून अशीच काही चांगली दानं पदरात पडावीत हीच इच्छा! :)
ऍन्ड लास्ट बट नॉट लीस्ट, या सुरेख गाण्याची फर्माईश करून चार ओळी लिवण्याची संधी दिल्याबद्दल प्राजूदेवींचेही आभार मानतो..! :)
आपला,
(वार्यासंगे वाहायला आवडणारा) तात्या.
वाचने
12905
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सुरेख गाणे...
चांग आसा.
छान गाणं....
मस्त!
वा..
खूप छान.
In reply to खूप छान. by प्राजु
अगदी सेम
लेखन
रसग्रहण
In reply to रसग्रहण by यशोधरा
असेच म्हणते
आभार..
In reply to आभार.. by विसोबा खेचर
=))
In reply to =)) by सिद्धार्थ ४
चुचु
रसग्रहण
In reply to रसग्रहण by मीनल
पण आता
लेख आवडला.. एक रिक्वेष्ट आहे
तात्या, एक
हृदयस्पर्शी
हे
सुंदर
गाणे खुप
सुंदर गाणे अन सुंदर विवेचन !
वा बुवा...
अती सुन्दर
आम्हाला