मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

समीरसूर ·
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे.

मराठी माणसाचा तारणहार कोण?

घोडीवाले वैद्य ·
राजकारणात सद्‌हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्‍वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे.

सामना चालकांच्या डोळ्यांत अंजन

घोडीवाले वैद्य ·
मुंबईत मनसेने शिवसेनेला भुईसपाट केल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला. त्यात सामना चालकही (?) मागे नव्हते. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या महाशयांनी इ-सकाळचा आधार घेतला. त्यावरील केवळ राज यांच्याविरोधातील प्रतिक्रिया सामनात छापल्या. मात्र उद्धव यांना त्यांची ला..की दाखविणारी एकही प्रतिक्रिया त्यात नव्हती. आता इ-सकाळवरच मराठी मतविभाजनासंबंधी एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील प्रतिक्रियांची दखल सामना घेणार आहे का? http://beta.esakal.com/2009/05/19163101/features-current-affairs-about.html

कैफियत ....

बट्ट्याबोळ ·
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

भोचक ·
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

एकम् सत्

विकास ·
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...

होय निगेटीव्हच

विनायक पाचलग ·
काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्‍या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता. मुळ लेख- http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm माझा प्रतिसाद- http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm
होय, निगेटीव्हच....।
सध्या 'नकारात्मक मत' या विषयावर प्रचंड उहापोह, साधक-बाधक चर्चा सुरू आहे.

बाळासाहेबांनापण कबूल..!

विकास ·
कसाबचे नवीन वकील अब्बास काझमी, यांनी या अतिरेक्याचे वकीलपत्र घेतले म्हणून त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठीत इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्तपदावरुन काढून टाकण्यात आले. या संदर्भात आज बाळासाहेबांनी सामनामधे "हा इस्लाम आम्हालाही कबूल आहे" म्हणून अग्रलेख लिहीला आहे. त्यातील मुद्दे:
  1. अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
  2. महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे.

(बहु असोत)

३_१४ विक्षिप्त अदिती ·
बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥ गगनभेदी माया तरी पडते ती उणी लोभाच्या सीमाही वाढती झणी चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥ प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे रस्ता वा चौकासही नाव मम पुरे "भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥ जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती 'फोडा अन राज्य करा' हीच तर निती धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥ गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो लक्ष्मी, कीर्ती, सत्

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग २

सातारकर ·
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १ उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्ध (superstitious) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन. अशा स्थितीत उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. २७ नोव्हेंबर १९५५ च्या टाइम्स ऑफ इंडीया मधे आलेला श्री.