Skip to main content

राजकारण

एकेकाची संक्रांत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 15/01/2009 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग : १ (राज ठाकरेंचा बंगला) (वहिनी व राजसाहेब एक मोठ्या पातेल्या समोर बसले आहेत आणी लहान लहान पिशवीत हलवा आणी रेल्वेची तिकिटे भरत आहेत.) आम्ही :- हॅ हॅ हॅ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .. राजसाहेब :- तिळगुळ घ्या तिकिट घ्या आणी आपल्या राज्यात सुखी रहा. आम्ही :- तुमच्याच राज्यातले रहिवासी आहोत आम्ही साहेब, आत कुठे पाठवताय आम्हाल अजुन ? राजसाहेब :- अरे हो खरेच की लक्षातच आले नाही. बर मिळाला ना तिळगुळ ? फुटा आता. उगाच कामत असताना त्रास देउ नका. आम्ही :- (चिवटपणाने) साहेब मातोश्रीवर देउन आलात का नाही तिळगुळ ? राजसाहेब :- तुम्हाला काय कारयच्या आहेत हो चांभार चौकशा ?

राजे – १

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 03/01/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र. बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!

`संकल्प'यात्रा!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 31/12/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली. हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात. पोलिसांपासून अतिरेक्‍यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत.

मुखर्जीसाहेब कॄती केली पाहीजे , पण ...

लेखक बामनाचं पोर यांनी शुक्रवार, 26/12/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून भारताचे सर्व नेते हे पाकिस्तानला धमकी देण्यात आणि " ओ , हे ऐकत नाहीत बघा " असे रडगाणं अमेरीकेसमोर गाण्यात फार व्यस्त आहेत. प्रणव मुखर्जी हे नुकतेच म्हणाले " बडबड नको कॄती करा ". मुखर्जीसाहेबांचे अगदी बरोबर आहे कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण ...आपल्या देशातली घाण साफ करण्याची कॄती .. या हल्यानंतर अगदी मच्छीमार संघटना ते पार रॉ पर्यंत सगळयांनी जे एकमेकांवर आरोप केले ते अगदी घृणास्पद होते. प्रत्येकाचे हेच म्हणणे होते " आम्ही इशारा दिला होता , त्यांनी ऐकलं नाही " ..