Skip to main content

राजकारण

हक्क

लेखक सूर्य यांनी मंगळवार, 13/10/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या सकाळी सकाळी उठुन सात वाजता मी मतदान करुन येणार". मी बायकोपाशी जाहीर करुन टाकले. आज इ-मेल आली होती. कंपनी इज कमिटेड टु एनेबलिंग इट्स एम्प्लॉइज टु कास्ट देअर वोट. थँक यु फॉर एक्सरसाईजींग युवर राईट टु वोट. कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. 'राईट टु वोट', हक्क ..हम्म.. मी मनाशी म्हटले. आपला हक्क आपण बजावलाच पाहीजे. 'परिस्थीती वाईट आहे' असे म्हणुन आपण नेहेमी शिव्या घालत असतो. आपले काम आपण कधी करणार. लेट मी कंप्लीट माय टास्क. त्या विचारातच घरी आलो होतो. बरेच वर्षात सुट्टी असताना घड्याळात सकाळचे सात वाजलेले बघितले नव्हते. आज बघितले. मतदानाला जायचे आहे, मनात घोळत होते.

परिवर्तन!!!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 13/10/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्ता, कुठे बेपत्ता झालास? बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू, व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू, अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ, आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू, मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ, डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय, राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच
काव्यरस

सकाळच्या वेब एडिशनवर माझा लेख (सुधारित आवृत्ती)

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 08/10/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खान यांच्या पत्र प्रसिद्धी मागचे कारण काय? (माझ्या आधीच्या लेखाची सुधारित आवृत्ती आज दै.’’सकाळ’न’’आपल्या वेब एडिशनवर अपलोड केलेली आहे) दुवा: http://beta.esakal.com/2009/10/08121050/pailteer-dr-abdul-qadeer-khan.h… (आपली मते थेट सकाळच्या वेबसाईटवर खाली दिलेल्या चौकटीतच चढवावी ही विनंती.) २००३ साली आपली डच पत्नी हेनीला लिहिलेल्या पत्राचा मजकूर ब्रिटिश पत्रकार सायमन हेंडरसन यांच्या हातात २००७ साली आला, पण त्या पत्रातील मजकुरावर त्यांनी लेख लिहिला जवळ-जवळ दोन वर्षांनी!

सात ऑळींची गोष्ट

लेखक संतोषएकांडे यांनी गुरुवार, 24/09/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
कारगीलला युध्ध सूरु झाल्या मूळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या. शहरातून सरहदीवर जाणार्‍या सैनिकांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता. देशाच्या रक्षकांच्या अभिवादनाला दूसरे रक्षक "रक्षामंत्री" येणार होते. दिल्या वेळा पेक्षा फक्त "तीन तास" लेट ते स्वतःच्या 'लिमोझीन' मधे आले. कार्यक्रम 'शॉर्ट' मधे आटोपुन ते निघून ही गेले. थोड्या वेळानी नातेवाइक-मित्रांचा निरोप घेवून सैनिक 'खडखड खटारा' ट्रक मधे बसून सरहदी कडे रवाना झाले. आज पर्यंत कळले नाही की, देशाचे खरे 'रक्षक' कोण....!

राज यांचे अभिनंदन

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 24/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम्स नाउ या वाहिनीला मुलाखत देताना आवर्जून मराठीच बोलून निर्भीड विचार मांडल्याबदृल राज ठाकरे यांचे अभिनंदन. मुलाखतीसाठी खालील दुवा पहा - http://www.timesnow.tv/videoshow/4328045.cms

डॉ. खान यांचे शास्त्रीय गायन कीं जगाला गुमराह करण्याचा कट?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 21/09/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात पाकिस्तानी शास्त्रज्ञ (व पाकिस्तानच्या अणू बॉम्बचे पिताश्री) डॉ. अब्दुल कादीर खान यांचे स्वत:च्या पत्नीला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते सध्या एकाद्या मैनेप्रमाणे गात आहेत (ज्याला आंग्लभाषेत singing like a canary असे म्हणतात)! कारण ’जब चिडियाही चुग गयी खेत’, गपा बसून काय फायदा? पण ते जे सांगत आहेत ते खरे आहे का?

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

'मागच्या बाका'वरची दुर्लक्षित पोरं !

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 15/09/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गात मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांकडे शिक्षकांचेही दुर्लक्ष होते, तशी आज काही सरकारी खात्यांची स्थिती आहे. हजारो कोटी रुपये खर्चून पायाभूत विकासाला वेग देणाऱ्या आणि मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राच्या नागरीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्या राज्य शासनाने सामान्य माणसाची जबाबदारी असलेली अनेक खाती ‘मागच्या बाका’वर बसविल्याने एकीकडे करोडोंची खैरात; तर दुसरीकडे निधीची प्रतीक्षा असे विसंगत चित्र आहे.