Skip to main content

राजकारण

पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 13/06/2009 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात? (This article was published in eSakal's web edition http://beta.esakal.com/2009/06/05114456/international-Pakistans-cond.ht… or http://tinyurl.com/kjldqp) आज पाकिस्तानात जे अराजक माजले आहे त्याची मूलभूत कारणे शोधली तर एक गोष्ट सहज दिसते की पाकिस्तानने स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे स्वत: कधीच कमावले नाहीत.

शिवसेनेचा निलाजरेपणा

लेखक टायगर यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे.

शिवसेना पुन्हा उभी राहील?

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 05/06/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! सुधीर काळे, जकार्ता. शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh…) मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे.

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 01/06/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे.

मराठी माणसाचा तारणहार कोण?

लेखक घोडीवाले वैद्य यांनी रविवार, 31/05/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणात सद्‌हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्‍वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे.

सामना चालकांच्या डोळ्यांत अंजन

लेखक घोडीवाले वैद्य यांनी गुरुवार, 21/05/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत मनसेने शिवसेनेला भुईसपाट केल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला. त्यात सामना चालकही (?) मागे नव्हते. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या महाशयांनी इ-सकाळचा आधार घेतला. त्यावरील केवळ राज यांच्याविरोधातील प्रतिक्रिया सामनात छापल्या. मात्र उद्धव यांना त्यांची ला..की दाखविणारी एकही प्रतिक्रिया त्यात नव्हती. आता इ-सकाळवरच मराठी मतविभाजनासंबंधी एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील प्रतिक्रियांची दखल सामना घेणार आहे का? http://beta.esakal.com/2009/05/19163101/features-current-affairs-about…

कैफियत ....

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/05/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...