मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते

bhagwatblog ·

सर्वसामान्य लोकांमध्ये अनामिक, अनोळखी राहिलेल्या (ठेवलेल्या) अनेक देशभक्तांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या सर्वस्वाची आहूती दिली आहे. त्यांच्यापैकी एका स्वातंत्र्यसैनिकाची त्रोटक पण सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !

बाप्पू 11/07/2019 - 15:55
इथे जन्मल्यापासून एवढेच डोक्यात बसवले जाते कि गांधीजी नी विना तलवार विना ढाल स्वातंत्र्य मिळवून दिले.. कितीतरी अनामिक हुतात्मे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शाहिद झाले. त्यांना कधीही प्रसिद्धी मिळाली नाही. ना मान सन्मान... त्यांची नावे देखील काळाच्या ओघात विस्मरणात गेली.. रंगो बापूंबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

सर्वसामान्य लोकांमध्ये अनामिक, अनोळखी राहिलेल्या (ठेवलेल्या) अनेक देशभक्तांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या सर्वस्वाची आहूती दिली आहे. त्यांच्यापैकी एका स्वातंत्र्यसैनिकाची त्रोटक पण सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !

बाप्पू 11/07/2019 - 15:55
इथे जन्मल्यापासून एवढेच डोक्यात बसवले जाते कि गांधीजी नी विना तलवार विना ढाल स्वातंत्र्य मिळवून दिले.. कितीतरी अनामिक हुतात्मे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शाहिद झाले. त्यांना कधीही प्रसिद्धी मिळाली नाही. ना मान सन्मान... त्यांची नावे देखील काळाच्या ओघात विस्मरणात गेली.. रंगो बापूंबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते "रंगो बापूजी गुप्ते". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.

EVM

चिगो ·

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...
लेखनप्रकार
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

रफाल - भाग २

रणजित चितळे ·

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते
लेखनविषय:
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

भारांच्या जगात... ४

अजिंक्य विश्वास ·

हो. खरे आहे तुमचे. पण मध्ये उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी याची आवृत्ती काढली होती. आता आऊट ऑफ प्रिंट आहे असे सांगत आहेत पण अश्या त्यांची 'आऊट ऑफ प्रिंट' झालेली मायापूरचे रंगेल राक्षस, जंगलबुकातील दंगल आणि त्या दंगलीतील दोन पोरे, गडावरचा खजिना, मुक्काम शेंडेनक्षत्र ही त्यांच्या दुकानात खूप मागितल्यावर आणि जोशीबुवा नसताना मिळाली, आणि ती ही जास्त प्रती घेतल्या तरच. माझ्याकडे सध्या ह्या पुस्तकांच्या ५-१० प्रती आल्या त्यामुळे. आता नागफणी, झपाटलेला प्रवासी आणि उडती छबकडी मिळत आहे का ह्या साठी मस्का मारणे चालू आहे

हो. खरे आहे तुमचे. पण मध्ये उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी याची आवृत्ती काढली होती. आता आऊट ऑफ प्रिंट आहे असे सांगत आहेत पण अश्या त्यांची 'आऊट ऑफ प्रिंट' झालेली मायापूरचे रंगेल राक्षस, जंगलबुकातील दंगल आणि त्या दंगलीतील दोन पोरे, गडावरचा खजिना, मुक्काम शेंडेनक्षत्र ही त्यांच्या दुकानात खूप मागितल्यावर आणि जोशीबुवा नसताना मिळाली, आणि ती ही जास्त प्रती घेतल्या तरच. माझ्याकडे सध्या ह्या पुस्तकांच्या ५-१० प्रती आल्या त्यामुळे. आता नागफणी, झपाटलेला प्रवासी आणि उडती छबकडी मिळत आहे का ह्या साठी मस्का मारणे चालू आहे
लेखनविषय:
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

भारांच्या जगात... ३

अजिंक्य विश्वास ·

In reply to by गवि

संक्षिप्त आवृत्ती ह्यातल्या बर्‍याच पुस्तकांची आली आहे. पण बहुतेक करून नावे बदलली आहेत. तेच शोधणे चालू आहे सध्या

In reply to by अजिंक्य विश्वास

गवि 09/08/2018 - 13:16
संक्षिप्त आवृत्ती म्हणजे नेमका काय प्रकार आहे? जर मजकूर काटछाट करून आकार छोटा करत असतील तर कितपत कमी होतो कंटेंट? असं करण्यात व्यावसायिक फायदा काय त्यांचा?

In reply to by गवि

संक्षिप्त म्हणजे जवळपास ’रिडर्स डायजेस्ट’ सारखा प्रकार पण खूप कमी शब्दात. मागे मी ’सूर्यावर स्वारी?’ चा परिचय दिला होता. त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे ’कंपनी चालली सूर्याकडे’. मूळ पुस्तक जवळपास २०० पानांचे आहे, पण संक्षिप्त रूप फक्त ९२ पानांचे आहे. फ़क्त गाभा घेतला आहे. पण मूळ पुस्तकातील डिटेल्स ह्यात येत नाहीत. कन्टेन्ट खूप कमी आहे त्यात आणि मूळ पुस्तक छोट्या स्वरुपात का होईना बाजारात येणे हा कदाचित व्यावसायिक फायदा असू शकेल. फार पूर्वी भारांनी ’बालमित्र’ मासिक चालवण्यासाठी काही हजारांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी लाखाणींनी त्यांना एका शब्दावर त्यांचे कर्ज फेडले. मग त्याची परतफेड त्यांनी लाखाणींकडे ही पुस्तके देऊन केली. सूर्यावर स्वारी?, मुक्काम शेंडेनक्षत्र, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, किल्ल्यातील कारस्थान, मायापूरचे रंगेल राक्षस, काळा बाण, सफरचंद, समुद्री सैतान, हिंमतवान जासूद आणि झपाटलेला प्रवासी ही पुस्तके लाखाणींनी प्रकाशित केली. पैकी झपाटलेला प्रवासी राजा प्रकाशन आणि नंतर मुक्काम शेंडेनक्षत्र हे उत्कर्ष प्रकाशनने छापले. राजा प्रकाशनने तर ज्यूल्स व्हर्नचा संचच काढला पण दुर्दैवाने तो संक्षिप्त रूपात काढला आणि उत्कर्षने कसे काय केले देव जाणे, पण भारा गेल्यावर मुक्काम शेंडेनक्षत्र छापले. भारांची जी पुस्तके दिल्याची भावना असेल त्याची जाणीव म्हणून त्यांनी कदाचित ती पूर्ण रुपात आणली नाहीत (अपवाद झपाटलेला प्रवासी आणि मायापूरचे रंगेल राक्षस. पैकी झपाटलेला प्रवासीची तिसरी आवृत्ती पॉप्युलरने काढली होती, म्हणून कदाचित मिळाली असेल, असा माझा अंदाज आहे. पण किल्ल्यांतील कारस्थान, काळा बाण आणि अदृश्य माणूस तर दिसत पण नाही.) बाकी मी शोधत आहे. जशी मिळतील तसे अपडेट करत जाईन.

In reply to by सिरुसेरि

'चिन्याचा चिन्याचा जमालगोटा' हे आधीचे नाव आहे. 'एका चिन्याचा जमालगोटा' हे नाव जेव्हा राजा प्रकाशनने संक्षेप काढायला सुरुवात केली त्यावेळेस दिले गेले आहे. तुम्ही खाली फोटो पाहत आहात तो १९६६ सालाचा आहे, म्हणजेच हे पुस्तक त्या आधी प्रकाशित झाले आहे. तुम्ही जे पुस्तक म्हणत आहात ते १९८५ नंतर संक्षेप रूपाने आले आहे. ”उडती छ्बकडी’ मधील यादी

आदूबाळ 13/08/2018 - 13:52
यातली खालील पुस्तकं माझ्याकडे (पुण्याला) आहेत.
३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो ४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो ५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो २५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
पुण्याला गेलो की शोधतो आणि तुम्हाला फोन करतो.

In reply to by गवि

संक्षिप्त आवृत्ती ह्यातल्या बर्‍याच पुस्तकांची आली आहे. पण बहुतेक करून नावे बदलली आहेत. तेच शोधणे चालू आहे सध्या

In reply to by अजिंक्य विश्वास

गवि 09/08/2018 - 13:16
संक्षिप्त आवृत्ती म्हणजे नेमका काय प्रकार आहे? जर मजकूर काटछाट करून आकार छोटा करत असतील तर कितपत कमी होतो कंटेंट? असं करण्यात व्यावसायिक फायदा काय त्यांचा?

In reply to by गवि

संक्षिप्त म्हणजे जवळपास ’रिडर्स डायजेस्ट’ सारखा प्रकार पण खूप कमी शब्दात. मागे मी ’सूर्यावर स्वारी?’ चा परिचय दिला होता. त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे ’कंपनी चालली सूर्याकडे’. मूळ पुस्तक जवळपास २०० पानांचे आहे, पण संक्षिप्त रूप फक्त ९२ पानांचे आहे. फ़क्त गाभा घेतला आहे. पण मूळ पुस्तकातील डिटेल्स ह्यात येत नाहीत. कन्टेन्ट खूप कमी आहे त्यात आणि मूळ पुस्तक छोट्या स्वरुपात का होईना बाजारात येणे हा कदाचित व्यावसायिक फायदा असू शकेल. फार पूर्वी भारांनी ’बालमित्र’ मासिक चालवण्यासाठी काही हजारांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी लाखाणींनी त्यांना एका शब्दावर त्यांचे कर्ज फेडले. मग त्याची परतफेड त्यांनी लाखाणींकडे ही पुस्तके देऊन केली. सूर्यावर स्वारी?, मुक्काम शेंडेनक्षत्र, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, किल्ल्यातील कारस्थान, मायापूरचे रंगेल राक्षस, काळा बाण, सफरचंद, समुद्री सैतान, हिंमतवान जासूद आणि झपाटलेला प्रवासी ही पुस्तके लाखाणींनी प्रकाशित केली. पैकी झपाटलेला प्रवासी राजा प्रकाशन आणि नंतर मुक्काम शेंडेनक्षत्र हे उत्कर्ष प्रकाशनने छापले. राजा प्रकाशनने तर ज्यूल्स व्हर्नचा संचच काढला पण दुर्दैवाने तो संक्षिप्त रूपात काढला आणि उत्कर्षने कसे काय केले देव जाणे, पण भारा गेल्यावर मुक्काम शेंडेनक्षत्र छापले. भारांची जी पुस्तके दिल्याची भावना असेल त्याची जाणीव म्हणून त्यांनी कदाचित ती पूर्ण रुपात आणली नाहीत (अपवाद झपाटलेला प्रवासी आणि मायापूरचे रंगेल राक्षस. पैकी झपाटलेला प्रवासीची तिसरी आवृत्ती पॉप्युलरने काढली होती, म्हणून कदाचित मिळाली असेल, असा माझा अंदाज आहे. पण किल्ल्यांतील कारस्थान, काळा बाण आणि अदृश्य माणूस तर दिसत पण नाही.) बाकी मी शोधत आहे. जशी मिळतील तसे अपडेट करत जाईन.

In reply to by सिरुसेरि

'चिन्याचा चिन्याचा जमालगोटा' हे आधीचे नाव आहे. 'एका चिन्याचा जमालगोटा' हे नाव जेव्हा राजा प्रकाशनने संक्षेप काढायला सुरुवात केली त्यावेळेस दिले गेले आहे. तुम्ही खाली फोटो पाहत आहात तो १९६६ सालाचा आहे, म्हणजेच हे पुस्तक त्या आधी प्रकाशित झाले आहे. तुम्ही जे पुस्तक म्हणत आहात ते १९८५ नंतर संक्षेप रूपाने आले आहे. ”उडती छ्बकडी’ मधील यादी

आदूबाळ 13/08/2018 - 13:52
यातली खालील पुस्तकं माझ्याकडे (पुण्याला) आहेत.
३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो ४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो ५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो २५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
पुण्याला गेलो की शोधतो आणि तुम्हाला फोन करतो.
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

भारांच्या जगात... २

अजिंक्य विश्वास ·
लेखनविषय:
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

भारांच्या जगात... १

अजिंक्य विश्वास ·

गवि 31/07/2018 - 07:11
शेंडेनक्षत्रही तितकंच अफलातून आहे. लहानपणी या दोन पुस्तकांतून भारा एका विलक्षण जगात घेऊन गेले होते. हेच नव्हे तर इतर खूप खूप पुस्तकं. तुमच्या विशलिस्टमध्ये "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" आणि "जयदीपची जंगलयात्रा" नाहीत हे वाचून ती पुस्तकं तुमच्याकडे ऑलरेडी आहेत अशी समजूत होऊन प्रचंड असूया वाटली आहे. बाकी सर्व एकीकडे आणि ही दोन पुस्तकं एकीकडे असं लहानपणी होतं. तरीही ती कुठेतरी गेली. आता मिळणं जवळजवळ अशक्य.

In reply to by गवि

तुमचा अंदाज एकदम अचूक आहे. तुम्ही उल्लेख केलेली आणि तशीच (फास्टर फेणे गृहीत न धरता) भारांची जवळपास ६० पुस्तके जमा आहेत. त्यात जयदीपची जंगलयात्रा, खजिन्याचा बेटावर संजू-राजू, तैमूरलंगाचा भाला, दिपमाळेचे रहस्य, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, झपाटलेला प्रवासी(पॉप्युलर प्रकाशन), ढब्बूराजा, भाग्यशाली सिक्सर, भटकबहाद्दर, मायापूरचे रंगेल राक्षस (उत्कर्ष प्रकाशन), तारास बलबाचे दोन पुत्र, हाजीबाबाच्या गोष्टी, खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी, कैद्याचा खजिना, भाराभर गवत, दुःख पर्वताएवढे, रॉबिन्सन आणि मंडळी, भटांच्या वाड्यातील भुतावळ, ही आणि अशीच अजून पुस्तके आहेत. वर लिहिलेली पुस्तके सध्या मिळत नाहीत. आणि त्यातच ज्यूल्स व्हर्नचे अनुवाद देखील आहेत जे लाखाणी बुक डेपोने आणले होते. बघू काय होते आता? जयदीपने आणि बाकी मंडळींनीसुद्धा बालपण बहारदार केले होते हे नक्की.

In reply to by गवि

पुस्तकांच्या बाबतीत मीदेखील आशाळभूत, हावरा, इर्षा बाळगणारा, असूया मनात धरणारा आहे. तुम्ही नक्की कुठली पुस्तके म्हणत आहात? सूर्यावर स्वारी आणि अदृश्य माणूस एका मित्राला मुंबईला चक्कर मारायला लावून मिळवली आहेत. (अर्थात त्याची कृपा खूप महत्त्वाची) आणि खजिन्याचा बेटावर संजू-राजू आणि दिपमाळेचे रहस्य हे लकडी पुलावर आणि सरस्वती मंदिर शाळेसमोर बसणाऱ्या काटकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ आहेत त्यांच्याकडून घेतली होती. ते सध्या नसतात तिथे. तुम्हाला हवी असली तर अजून एक कॉपी मिळाली तर नक्की तुमच्यासाठी घेईन मी. :)

भारांच्या पुस्तकांनी लहानपणी वेड लावलं होत. त्यातूनच साहस कथा, गूढ कथांची आवड निर्माण झाली. आज जे काही थोडं फार लेखन झालं आहे ते त्यांच्या पुस्तकावर जोपासलेल्या विचारसरणीमुळे

In reply to by सिरुसेरि

नक्कीच. कुठे उपलब्ध आहेत ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? माझ्या ग्रंथालयात ही पुस्तके उपलब्ध नाहीत म्हणून तर त्यांचा शोध घेणे चालू आहे सध्या

ढब्ब्या 31/07/2018 - 19:11
किशोर मासिकाचे सर्व अन्क आता ईथे उपलब्ध आहेत, त्यात भा रा . भागवत यान्च्या बर्याच कथा देखील आहेत http://kishor.ebalbharati.in/archive/index कदाचीत तुम्हाला मदत होईल

In reply to by ढब्ब्या

धन्यवाद सर. किशोरचे माझे आवडते अंक मी आधीच डाऊनलोड केले आहेत. फक्त हार्ड कॉपी हातात यायची वाट पाहत आहे मी. लहानपणी मी जे ज्या स्वरूपात वाचले आहे त्याच्यातच गुंतून पडलो आहे . ☺️

नाखु 31/07/2018 - 23:05
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे. फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का? आता किशोर नसलेला किशोर वाचक नाखु

In reply to by नाखु

ढब्ब्या 01/08/2018 - 00:41
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे. फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का? >> आहे तेच अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याने असा काही प्रयत्न केला नाही व फार चिकित्सा देखील केली नाही

राघव 02/08/2018 - 14:07
एक भुताळी जहाज म्हणून पण त्यांचे पुस्तक वाचलेले आठवते..! बाकी त्यांनी केलेले अनुवाद तुम्ही या यादीत समाविष्ट केलेले नाहीत?

गवि 31/07/2018 - 07:11
शेंडेनक्षत्रही तितकंच अफलातून आहे. लहानपणी या दोन पुस्तकांतून भारा एका विलक्षण जगात घेऊन गेले होते. हेच नव्हे तर इतर खूप खूप पुस्तकं. तुमच्या विशलिस्टमध्ये "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" आणि "जयदीपची जंगलयात्रा" नाहीत हे वाचून ती पुस्तकं तुमच्याकडे ऑलरेडी आहेत अशी समजूत होऊन प्रचंड असूया वाटली आहे. बाकी सर्व एकीकडे आणि ही दोन पुस्तकं एकीकडे असं लहानपणी होतं. तरीही ती कुठेतरी गेली. आता मिळणं जवळजवळ अशक्य.

In reply to by गवि

तुमचा अंदाज एकदम अचूक आहे. तुम्ही उल्लेख केलेली आणि तशीच (फास्टर फेणे गृहीत न धरता) भारांची जवळपास ६० पुस्तके जमा आहेत. त्यात जयदीपची जंगलयात्रा, खजिन्याचा बेटावर संजू-राजू, तैमूरलंगाचा भाला, दिपमाळेचे रहस्य, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, झपाटलेला प्रवासी(पॉप्युलर प्रकाशन), ढब्बूराजा, भाग्यशाली सिक्सर, भटकबहाद्दर, मायापूरचे रंगेल राक्षस (उत्कर्ष प्रकाशन), तारास बलबाचे दोन पुत्र, हाजीबाबाच्या गोष्टी, खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी, कैद्याचा खजिना, भाराभर गवत, दुःख पर्वताएवढे, रॉबिन्सन आणि मंडळी, भटांच्या वाड्यातील भुतावळ, ही आणि अशीच अजून पुस्तके आहेत. वर लिहिलेली पुस्तके सध्या मिळत नाहीत. आणि त्यातच ज्यूल्स व्हर्नचे अनुवाद देखील आहेत जे लाखाणी बुक डेपोने आणले होते. बघू काय होते आता? जयदीपने आणि बाकी मंडळींनीसुद्धा बालपण बहारदार केले होते हे नक्की.

In reply to by गवि

पुस्तकांच्या बाबतीत मीदेखील आशाळभूत, हावरा, इर्षा बाळगणारा, असूया मनात धरणारा आहे. तुम्ही नक्की कुठली पुस्तके म्हणत आहात? सूर्यावर स्वारी आणि अदृश्य माणूस एका मित्राला मुंबईला चक्कर मारायला लावून मिळवली आहेत. (अर्थात त्याची कृपा खूप महत्त्वाची) आणि खजिन्याचा बेटावर संजू-राजू आणि दिपमाळेचे रहस्य हे लकडी पुलावर आणि सरस्वती मंदिर शाळेसमोर बसणाऱ्या काटकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ आहेत त्यांच्याकडून घेतली होती. ते सध्या नसतात तिथे. तुम्हाला हवी असली तर अजून एक कॉपी मिळाली तर नक्की तुमच्यासाठी घेईन मी. :)

भारांच्या पुस्तकांनी लहानपणी वेड लावलं होत. त्यातूनच साहस कथा, गूढ कथांची आवड निर्माण झाली. आज जे काही थोडं फार लेखन झालं आहे ते त्यांच्या पुस्तकावर जोपासलेल्या विचारसरणीमुळे

In reply to by सिरुसेरि

नक्कीच. कुठे उपलब्ध आहेत ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? माझ्या ग्रंथालयात ही पुस्तके उपलब्ध नाहीत म्हणून तर त्यांचा शोध घेणे चालू आहे सध्या

ढब्ब्या 31/07/2018 - 19:11
किशोर मासिकाचे सर्व अन्क आता ईथे उपलब्ध आहेत, त्यात भा रा . भागवत यान्च्या बर्याच कथा देखील आहेत http://kishor.ebalbharati.in/archive/index कदाचीत तुम्हाला मदत होईल

In reply to by ढब्ब्या

धन्यवाद सर. किशोरचे माझे आवडते अंक मी आधीच डाऊनलोड केले आहेत. फक्त हार्ड कॉपी हातात यायची वाट पाहत आहे मी. लहानपणी मी जे ज्या स्वरूपात वाचले आहे त्याच्यातच गुंतून पडलो आहे . ☺️

नाखु 31/07/2018 - 23:05
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे. फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का? आता किशोर नसलेला किशोर वाचक नाखु

In reply to by नाखु

ढब्ब्या 01/08/2018 - 00:41
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे. फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का? >> आहे तेच अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याने असा काही प्रयत्न केला नाही व फार चिकित्सा देखील केली नाही

राघव 02/08/2018 - 14:07
एक भुताळी जहाज म्हणून पण त्यांचे पुस्तक वाचलेले आठवते..! बाकी त्यांनी केलेले अनुवाद तुम्ही या यादीत समाविष्ट केलेले नाहीत?
लेखनविषय:
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

केळीचे सुकले बाग ....

विशाल कुलकर्णी ·

हे कुसुमावती बाई जिवंत असतानाच लिहिलेली कविता आहे. मृत्युनंतर लिहिली हि कथा विनाकारण प्रचलित झाली आहे. अरविंद गजेंद्रगडकर ह्यांनी प्रत्यक्ष अनिलांनाच विचारून ह्याची खातरजमा केलेली आहे. स्वत: अनिल म्हणाले होते कि
अहो हि कविता मी माझ्या रुसलेल्या प्रतिभेला उद्देशून केलेली आहे
गजेंद्रगडकर ह्यांच्या अशी सूर अशी माणसे ह्या पुस्तकात हा संदर्भ आहे

नाखु 18/04/2018 - 19:05
पण हृदय स्पर्शी स्फुट लेखन गर्दीतला एकटा नाखु

सुंदर ! अतिषय सुंदर लेखन दादाश्री ! कवितेचे आतिषय सुंदर रसग्रहण आवडले ! गाण्याची लिन्क असेल तर जरुर द्यावी ! शिवाय ह्याच लेखाचे अभिवाचन करुन एखदा सुंदर विडिओ बनव्ता आला तर पहा , नक्की शेयर करण्यात येईल ! ! आणि हो, आत एखाद्या नितांत आनंदी गीताचे रसग्रहण लिहावे अशी प्रेमळ विनंती ! :)

अत्यंत सुंदर धागा आणि तितकाच उत्तम परिचय. आणखी असेच धागे आपण लिहावेत हि विनंती. शेवटी या भावगीताची यु-ट्यूब लिंक दिली असती तर बरं झालं असतं.

तेजस आठवले 19/04/2018 - 16:08
हे गाणं माझं फार आवडतं आहे. युट्युब वर उपलब्ध आहे. उषा मंगेशकरांच्या आवाजात ह्या गाण्याच्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त झाल्या आहेत.

हे कुसुमावती बाई जिवंत असतानाच लिहिलेली कविता आहे. मृत्युनंतर लिहिली हि कथा विनाकारण प्रचलित झाली आहे. अरविंद गजेंद्रगडकर ह्यांनी प्रत्यक्ष अनिलांनाच विचारून ह्याची खातरजमा केलेली आहे. स्वत: अनिल म्हणाले होते कि
अहो हि कविता मी माझ्या रुसलेल्या प्रतिभेला उद्देशून केलेली आहे
गजेंद्रगडकर ह्यांच्या अशी सूर अशी माणसे ह्या पुस्तकात हा संदर्भ आहे

नाखु 18/04/2018 - 19:05
पण हृदय स्पर्शी स्फुट लेखन गर्दीतला एकटा नाखु

सुंदर ! अतिषय सुंदर लेखन दादाश्री ! कवितेचे आतिषय सुंदर रसग्रहण आवडले ! गाण्याची लिन्क असेल तर जरुर द्यावी ! शिवाय ह्याच लेखाचे अभिवाचन करुन एखदा सुंदर विडिओ बनव्ता आला तर पहा , नक्की शेयर करण्यात येईल ! ! आणि हो, आत एखाद्या नितांत आनंदी गीताचे रसग्रहण लिहावे अशी प्रेमळ विनंती ! :)

अत्यंत सुंदर धागा आणि तितकाच उत्तम परिचय. आणखी असेच धागे आपण लिहावेत हि विनंती. शेवटी या भावगीताची यु-ट्यूब लिंक दिली असती तर बरं झालं असतं.

तेजस आठवले 19/04/2018 - 16:08
हे गाणं माझं फार आवडतं आहे. युट्युब वर उपलब्ध आहे. उषा मंगेशकरांच्या आवाजात ह्या गाण्याच्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त झाल्या आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.

गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय

पाषाणभेद ·

उपयोजक 06/03/2018 - 12:16
'सॅन' पाड्याची ही नवी माहिती वाचून 'शहाण'पाड्यात वाढ झाली!! :)

जेम्स वांड 06/03/2018 - 13:11
रहस्याचा गौफ्यस्फोट अन वाचणाऱ्याचा हास्यस्फोट एकदमच होऊन जातो, फारच लवकर मग पुढे वाचू वाटत नाही! म्हणून नाय जमलं

पैसा 06/03/2018 - 13:29
अरारा! हे संशोधन वाचून हाताची दहाही बोटे तोंडात घातली आहेत! अजून येऊ द्या. पण एकही चित्र नसल्याने अंमळ निराशा झाली.

आपण "कानात" ( कि कामात ? ) व्यस्त असताना देखील, बॉसकडे दुर्लक्ष करुन हे महान संशोधन आम्हा वाचकांचे पुढे आणण्याचे कष्ट घेतलेत याबध्दल हाभारी आहोत. असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो आणि नवीन नविन प्रबंध आम्हाला वाचायला मिळोत, ;-)

सस्नेह 06/03/2018 - 14:44
वाह ! भन्साळी कुलोत्पन्न 'लीला'धर संजयांच्या नंतर श्रेष्ठ इतिहासकार आपणच =))

खेडूत 06/03/2018 - 16:46
छान छान! असेच संशोधन अन्य उपनगरांविषयी व्हावे.. . कळवा ही मुंबईची हद्द होती, तिथं पर्यंत मुंबईकर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी येत आणि पोचलात की कळवा म्हणत असत!

गामा पैलवान 06/03/2018 - 19:57
पाभे, तुम्ही लिहिलेली कथा बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तो जो पाद्री होता ना तो चर्चच्या सर्वकालीन शिरस्त्याप्रमाणे पेडोफाईल होता. म्हणून ते सान पेडो असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन सान पाडा झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाषाणभेद 06/03/2018 - 21:19
आ. न., गा. पै जी, माझी कथा? अहो संशोधन आहे ते. अन ते बनावट कसे? अस्सल कागदपत्रांच्या संदर्भासहीत सिद्ध झालेले संशोधन आहे ते. आता शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिबाबत जसा वाद होतो, त्याप्रमाणे यात वाद होवू शकेल पण सरळ बनावट म्हणणे फार खोटा आरोप आहे हे आम्ही ठासून सांगू पाहतो. आपल्या येथील श्री. चित्रगुप्तांना या संशोधनाबद्दल माहिती पडले तर ते एक काय दहा चित्रांमधले पुरावे देतील हा आमचा विश्वास आहे. आणखी एक, आमच्या संशोधनातले संदर्भासहित दिलेली कागदपत्रे अन पुस्तके तुम्ही बघितली नाहीत काय? एकदा सदर कागदपत्रे मेहनतीने मिळवा म्हणजे संशोधन् काय असते ते माहीती होईल. आ. न., पाभे

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 06/03/2018 - 21:34
अहो दगडफोडे संशोधक, सदर कागदपत्रे तुम्ही मेहनतीने मिळवलेली आहेत यावरून तुम्ही बनावट कथा लिहिलीये हेच सिद्ध होतं ना? संशोधन फक्त ढापलेल्या मालावरूनच करता येतं हा मूलभूत सिद्धांत तुम्हांस ठाऊक नाही? काय सांगायचं तुम्हांस आता ....! आ.न., -गा.पै.

पुलंच्या " चितळे मास्तर " कथेत ज्याप्रमाणे सुलतानाच्या सुनबाईला परत पाठविण्याच्या प्रसंगाचे वर्णन , चितळे मास्तर अशा काही अफलातुन शब्दात करित असत्,कि ऐकणार्‍यास वाटावे कि चितळे मास्तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच हजर होते. तसं आताही " पाषाणभेद " सुक्ष्म देहाने त्याकाळी हजर होते असेच वाटून गेले. चालू द्या. भारतातील बर्‍याच शहरांच्या नावांवर असेच संशोधन सुरु ठेवा आणि आम्हा पामरांच्या ज्ञानात भर घालावी ! !

नाखु 06/03/2018 - 20:51
बदलापूर, भांडुप, मळवली यावरही संशोधन, उत्खनन होउन बर्याच गोष्टी उजेडात याव्यात. अखिल मिपा खफ माहीतीची महती आणि महतीची माहीती प्रक्षेपण केंद्रीय समितीच्या "दिव्याखाली अंधार"या पाक्षिकातील वाचकांची मागणी

In reply to by नाखु

बबन ताम्बे 07/03/2018 - 18:56
तळेगाव, मळवली, लोणावळा ही आत्ताची गावे इस्टुर फाकडाच्या पराभवानंतर तळवली, मळवली, लोळावला अशा नावाने ओळखली जायला लागली. इंग्रजी फौज इंद्रायणी क्रॉस कर असताना मराठी फौजेने तोफ गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे इंग्रज फौज अक्षरश: पाण्यात तळुन निघाली. म्हणुन तो परिसर तळवली. इंग्रज आणि मराठी सैनिक दिवसभर धुमश्चक्री केल्यानंतर निवांत तंबाखु मळत ते मळवली. शेवटचा इंग्रज सैनिक जिथे लोळवला ते गाव लोळावला. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तळवलीचे तळेगाव झाले, लोळावलाचे लोणावळा झाले (ल आणि ळ शेजारी शेजारी आले की उच्चारायला अवघड जाते म्हणुन असावे). मळवली मात्र तसेच राहीले. (संदर्भ : अकलेच्या तार्‍यांवरुन दिशा ओळखणे आणि माझी भ्रमंती हे १९ व्या शतकात गाजलेले पुस्तक)

काल संध्याकाळी मला स्विडनमधून नोबेल समितीचा फोन आला होता. ते या संशोधनाची चौकशी करत होते. लवकरच एका फार मोठ्या आनंदाची घोषणा ते करणार आहेत असे त्यांनी सांगितले. :)

In reply to by चामुंडराय

ते संशोधन माझे आहे. एकदा एक कोकणी माय कॅलिफोर्नियातिल "सान दिया" या ठिकाणी राहणार्‍या आपल्या लेकीला भेटायली तेथे गेली असता तिने लेकीला विचारले, "ह्यो सान सान काय हाय गो ?" लेक म्हणाली, "सान-दिया-गोsss". हे जवळून चाललेल्या एका इमिग्रंट पॉप सिंगरने ऐकले व ते हेल काढून म्हटलेले शब्द त्यांला आवडले. त्याने ते शब्द वापरून, "सान-दिया-गो, सान-दिया-गो" असे धृपद असलेले गाणे बनवले. ते गाणे इतके फेमस झाले की त्या शहराचे नाव "सान-दिया-गो" असे पडले. "कौन से 'सान'ने किसको क्या 'दिया' है "गो" ?" असा प्रश्न एका जपानी-हिंदी-कोकणी मिश्रवंशिय इमिग्रंटने नुकताच उभा केला आहे. त्याचे उत्तर शोधायला तेथिल सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधिल संशोधकांना ५० मिलियन डॉलर्सची ग्रँट मंजूर केली आहे. संशोधनात भाग घेण्याची इच्छा असलेल्यांनी व्यनित चौकशी करावी. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 06/03/2018 - 23:52
पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत जिथं सैनिकांची हाडं पसरलेली होती त्या गावात निवांत बसले असतील शास्त्री.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान 07/03/2018 - 13:04
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचं हे संशोधन बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तिकडे स्थलांतरित झालेल्या एका मालवणी चेडवाचा पाट तिच्याहून वयाने लहान झिलग्यासोबत लावला. म्हणून सान (= लहान) दिला घो असं ते नाव झालं. मग तिथे भय्ये घुसले आणि त्यांनी दिला चं दिया केलं. आ.न., -गा.पै.

इरसाल 10/03/2018 - 13:53
सानपाडा नक्की सानपाडा आहे की सांडपाडा ?????

तेजस आठवले 10/03/2018 - 16:49
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर आली नाही. असो. ठाण्याहून महाप पर्यंत जाताना दलदलीचा रस्ता चालून लोकांना अगदी वीट येत असे. त्यामुळे हळूहळू त्या दलदलीच्या प्रदेशाला विटावा म्हणू लागले. कामोठ्याजवळ मुले चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना त्यांना मान नावाचे एक पंजाबी प्रशिक्षक शिकवत.एकदा ते बॉलिंग करत असताना त्यांना गुडघ्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन ते गेले.ती त्यांची शेवटची ओव्हर ठरली. मग त्या ठिकाणचे नाव मान-सर-ओव्हर अश्या अर्थाने मानसरोवर पडले. :) ही ही ही

उपयोजक 06/03/2018 - 12:16
'सॅन' पाड्याची ही नवी माहिती वाचून 'शहाण'पाड्यात वाढ झाली!! :)

जेम्स वांड 06/03/2018 - 13:11
रहस्याचा गौफ्यस्फोट अन वाचणाऱ्याचा हास्यस्फोट एकदमच होऊन जातो, फारच लवकर मग पुढे वाचू वाटत नाही! म्हणून नाय जमलं

पैसा 06/03/2018 - 13:29
अरारा! हे संशोधन वाचून हाताची दहाही बोटे तोंडात घातली आहेत! अजून येऊ द्या. पण एकही चित्र नसल्याने अंमळ निराशा झाली.

आपण "कानात" ( कि कामात ? ) व्यस्त असताना देखील, बॉसकडे दुर्लक्ष करुन हे महान संशोधन आम्हा वाचकांचे पुढे आणण्याचे कष्ट घेतलेत याबध्दल हाभारी आहोत. असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो आणि नवीन नविन प्रबंध आम्हाला वाचायला मिळोत, ;-)

सस्नेह 06/03/2018 - 14:44
वाह ! भन्साळी कुलोत्पन्न 'लीला'धर संजयांच्या नंतर श्रेष्ठ इतिहासकार आपणच =))

खेडूत 06/03/2018 - 16:46
छान छान! असेच संशोधन अन्य उपनगरांविषयी व्हावे.. . कळवा ही मुंबईची हद्द होती, तिथं पर्यंत मुंबईकर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी येत आणि पोचलात की कळवा म्हणत असत!

गामा पैलवान 06/03/2018 - 19:57
पाभे, तुम्ही लिहिलेली कथा बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तो जो पाद्री होता ना तो चर्चच्या सर्वकालीन शिरस्त्याप्रमाणे पेडोफाईल होता. म्हणून ते सान पेडो असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन सान पाडा झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाषाणभेद 06/03/2018 - 21:19
आ. न., गा. पै जी, माझी कथा? अहो संशोधन आहे ते. अन ते बनावट कसे? अस्सल कागदपत्रांच्या संदर्भासहीत सिद्ध झालेले संशोधन आहे ते. आता शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिबाबत जसा वाद होतो, त्याप्रमाणे यात वाद होवू शकेल पण सरळ बनावट म्हणणे फार खोटा आरोप आहे हे आम्ही ठासून सांगू पाहतो. आपल्या येथील श्री. चित्रगुप्तांना या संशोधनाबद्दल माहिती पडले तर ते एक काय दहा चित्रांमधले पुरावे देतील हा आमचा विश्वास आहे. आणखी एक, आमच्या संशोधनातले संदर्भासहित दिलेली कागदपत्रे अन पुस्तके तुम्ही बघितली नाहीत काय? एकदा सदर कागदपत्रे मेहनतीने मिळवा म्हणजे संशोधन् काय असते ते माहीती होईल. आ. न., पाभे

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 06/03/2018 - 21:34
अहो दगडफोडे संशोधक, सदर कागदपत्रे तुम्ही मेहनतीने मिळवलेली आहेत यावरून तुम्ही बनावट कथा लिहिलीये हेच सिद्ध होतं ना? संशोधन फक्त ढापलेल्या मालावरूनच करता येतं हा मूलभूत सिद्धांत तुम्हांस ठाऊक नाही? काय सांगायचं तुम्हांस आता ....! आ.न., -गा.पै.

पुलंच्या " चितळे मास्तर " कथेत ज्याप्रमाणे सुलतानाच्या सुनबाईला परत पाठविण्याच्या प्रसंगाचे वर्णन , चितळे मास्तर अशा काही अफलातुन शब्दात करित असत्,कि ऐकणार्‍यास वाटावे कि चितळे मास्तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच हजर होते. तसं आताही " पाषाणभेद " सुक्ष्म देहाने त्याकाळी हजर होते असेच वाटून गेले. चालू द्या. भारतातील बर्‍याच शहरांच्या नावांवर असेच संशोधन सुरु ठेवा आणि आम्हा पामरांच्या ज्ञानात भर घालावी ! !

नाखु 06/03/2018 - 20:51
बदलापूर, भांडुप, मळवली यावरही संशोधन, उत्खनन होउन बर्याच गोष्टी उजेडात याव्यात. अखिल मिपा खफ माहीतीची महती आणि महतीची माहीती प्रक्षेपण केंद्रीय समितीच्या "दिव्याखाली अंधार"या पाक्षिकातील वाचकांची मागणी

In reply to by नाखु

बबन ताम्बे 07/03/2018 - 18:56
तळेगाव, मळवली, लोणावळा ही आत्ताची गावे इस्टुर फाकडाच्या पराभवानंतर तळवली, मळवली, लोळावला अशा नावाने ओळखली जायला लागली. इंग्रजी फौज इंद्रायणी क्रॉस कर असताना मराठी फौजेने तोफ गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे इंग्रज फौज अक्षरश: पाण्यात तळुन निघाली. म्हणुन तो परिसर तळवली. इंग्रज आणि मराठी सैनिक दिवसभर धुमश्चक्री केल्यानंतर निवांत तंबाखु मळत ते मळवली. शेवटचा इंग्रज सैनिक जिथे लोळवला ते गाव लोळावला. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तळवलीचे तळेगाव झाले, लोळावलाचे लोणावळा झाले (ल आणि ळ शेजारी शेजारी आले की उच्चारायला अवघड जाते म्हणुन असावे). मळवली मात्र तसेच राहीले. (संदर्भ : अकलेच्या तार्‍यांवरुन दिशा ओळखणे आणि माझी भ्रमंती हे १९ व्या शतकात गाजलेले पुस्तक)

काल संध्याकाळी मला स्विडनमधून नोबेल समितीचा फोन आला होता. ते या संशोधनाची चौकशी करत होते. लवकरच एका फार मोठ्या आनंदाची घोषणा ते करणार आहेत असे त्यांनी सांगितले. :)

In reply to by चामुंडराय

ते संशोधन माझे आहे. एकदा एक कोकणी माय कॅलिफोर्नियातिल "सान दिया" या ठिकाणी राहणार्‍या आपल्या लेकीला भेटायली तेथे गेली असता तिने लेकीला विचारले, "ह्यो सान सान काय हाय गो ?" लेक म्हणाली, "सान-दिया-गोsss". हे जवळून चाललेल्या एका इमिग्रंट पॉप सिंगरने ऐकले व ते हेल काढून म्हटलेले शब्द त्यांला आवडले. त्याने ते शब्द वापरून, "सान-दिया-गो, सान-दिया-गो" असे धृपद असलेले गाणे बनवले. ते गाणे इतके फेमस झाले की त्या शहराचे नाव "सान-दिया-गो" असे पडले. "कौन से 'सान'ने किसको क्या 'दिया' है "गो" ?" असा प्रश्न एका जपानी-हिंदी-कोकणी मिश्रवंशिय इमिग्रंटने नुकताच उभा केला आहे. त्याचे उत्तर शोधायला तेथिल सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधिल संशोधकांना ५० मिलियन डॉलर्सची ग्रँट मंजूर केली आहे. संशोधनात भाग घेण्याची इच्छा असलेल्यांनी व्यनित चौकशी करावी. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 06/03/2018 - 23:52
पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत जिथं सैनिकांची हाडं पसरलेली होती त्या गावात निवांत बसले असतील शास्त्री.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान 07/03/2018 - 13:04
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचं हे संशोधन बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तिकडे स्थलांतरित झालेल्या एका मालवणी चेडवाचा पाट तिच्याहून वयाने लहान झिलग्यासोबत लावला. म्हणून सान (= लहान) दिला घो असं ते नाव झालं. मग तिथे भय्ये घुसले आणि त्यांनी दिला चं दिया केलं. आ.न., -गा.पै.

इरसाल 10/03/2018 - 13:53
सानपाडा नक्की सानपाडा आहे की सांडपाडा ?????

तेजस आठवले 10/03/2018 - 16:49
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर आली नाही. असो. ठाण्याहून महाप पर्यंत जाताना दलदलीचा रस्ता चालून लोकांना अगदी वीट येत असे. त्यामुळे हळूहळू त्या दलदलीच्या प्रदेशाला विटावा म्हणू लागले. कामोठ्याजवळ मुले चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना त्यांना मान नावाचे एक पंजाबी प्रशिक्षक शिकवत.एकदा ते बॉलिंग करत असताना त्यांना गुडघ्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन ते गेले.ती त्यांची शेवटची ओव्हर ठरली. मग त्या ठिकाणचे नाव मान-सर-ओव्हर अश्या अर्थाने मानसरोवर पडले. :) ही ही ही
लेखनप्रकार
(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.) साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. तर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात घणसोली गाव फार छोटे होते. पाडाच म्हणाना.

मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध

मनो ·

पैसा 04/03/2018 - 10:29
माहितीपूर्ण आणि मनोरंजक! इतकी आडनावे फारसी उगम असलेली आहेत हे माहित नव्हते.

मारवा 04/03/2018 - 19:21
लेख फार आवडला . पठाणांचे पुस्तक अप्रतिम आहे. फार पुर्वी लोकमत मध्ये एक छोटेखानी सदर येत असे त्यात ते एक एक शब्दाचा संबंध जोडुन दाखवत असत. हे असे शोधुन काढणे मोठे मनोरंजक आहे. म्हणजे बघा वरील *बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार " *फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा) पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ? तसेच *फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस्‌ लिहिणारा ) नाना फडणवीस म्हणजे एक आग्रह मी बघितलाय नाना फडणीस नव्हे नाना फडणवीस व पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो. तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे. म्हणजे मुळ तर फारसी आहे मात्र आमचे व्हर्जन असे असेच असावे या प्युरीटनीस्ट आग्रहाची मौज वाटते. याच पुस्तकात एक शब्द दिलेला आहे "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे. गालिबच्या फारशी गझला जर देवनागरीत मिळाल्या तर या दोन ग्रंथाची मदत घेऊन आपल्याला नक्कीच काही प्रमाणात अर्थ शोधता येइल . पण सबसे बडी दिक्कत ही आहे की मला देवनागरीत गालिब ची फारसी शायरी कुठे सापडली नाहे.

In reply to by मारवा

मनो 04/03/2018 - 21:49
देवनागरी कशाला, मूळ स्वरूपात वाचता येईल की. फार अवघड नाहीये. हे एक पुस्तक आहे - चित्रे पाहून शब्द शिका, सोपे ani मजेदार आहे http://ncertbooks.prashanthellina.com/class_1.Urdu.IbtadayeUrdu/all_in_one1.पडफ दुसरा सोपा उपाय - फारसी शब्द कॉपी करून ईथे पेस्ट करा. हि साईट तुम्हाला ती गझल वाचून दाखवेल. http://farsireader.com/webdemoen/ (शेवटचे वाक्य त्यांची जाहिरात आहे - आपण टाकलेला मजकूर नाही )

मारवा 04/03/2018 - 19:37
*शिकिलकर (फा. सैकल्गर्‌ = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा "शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज माहीतीत आहे. हे साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात. पण हा मुळ शब्द आणि यांचा असा संबंध माहीत नव्हता. अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित

मारवा 04/03/2018 - 19:43
त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?' ओसामा बिन लादेन असे आहे होय

In reply to by मारवा

होय ! अरबीत संपूर्ण नाव लिहिण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे... (व्यक्तीचे नाव) बिन / बिन्त* (वडिलांचे नाव) बिन (आजोबांचे नाव) अल् (घराण्याचे/ट्राईबचे नाव) * बिन = चा मुलगा आणि बिन्त = ची मुलगी.

गामा पैलवान 04/03/2018 - 20:16
मनो, रोचक संकलन आहे. त्याबद्दल धन्यवाद. एक अस्सल मराठी (?) शब्द आहे शिपाई. सिपाही हा मूळ फारसी शब्द आहे. त्यावरून मराठीत शिपाई आला. चपराशी व शिफारस हे देखील मराठीत रुळलेले मूळचे फारसी शब्द आहेत. शेवटी त्या सुप्रसिद्ध मराठी वाक्याची आठवण होतेच : शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची. आ.न., -गा.पै.

तेजस आठवले 04/03/2018 - 22:38
फारच माहितीपूर्ण लेख. खरंच असे काही असू शकेल असे माहिती नव्हते. अमीन आडनाव ब्राह्मणात पाहिलेले आहे. खासगीवाले पण. त्यांचा उगम असा असेल असे वाटले नव्हते. दहावीला माझ्या बरोबर एक शेरखाने आडनावाचा मुलगा होता.

चौथा कोनाडा 26/09/2018 - 13:24
माहितीपूर्ण आणि मनोरंजक! इतके शब्द फारसी उगम असलेली आहेत हे जाणून थक्क व्हायला झाले ! माझ्या एका परिचिताचे आडनांव खवीसखान असे होते. याचा काय उगम असावा ?

नेहमीप्रमाणेच फार रोचक, रंजक आणि माहितीपूर्ण लेख ! "मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही 28/09/2018 - 07:16
असेच. Bdw, ' हल्ली' चे मूळ 'हाल ही मे' या उर्दू/ हिंदी आणि पर्यायाने पारसी/अरबी भाषेत असावे का? तसेही ' सद्यस्थिती कशी आहे, किंवा कसे आहात ' या अर्थी काय हालहवाल असे आपण म्हणतोच.

समर्पक 27/09/2018 - 21:50
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
दारू म्हणजे औषध... आजही इराणी प्रभावळीच्या प्रदेशात औषधालयास 'दारूखाने' असेच म्हणतात.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 29/09/2018 - 12:52
'ढालगज-भवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल. ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण. गज म्हणजे हत्ती. भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात. पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न. यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणार्‍या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची. तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे. - सर्वसाक्षी
हा मनोगत संस्थळावर सापडलेला सर्वसाक्षी यांचा प्रतिसाद

गामा पैलवान 28/09/2018 - 17:34
डॉक्टर सुहास म्हात्रे,
"मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)
तुमचं म्हणणं गंमतीनं घेतोय. पण थोडा खोलवर विचार केला तर लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :
तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत.
याचा अर्थ असा की पर्शियन लोकांनी/राजांनी भारतावर कधीच आक्रमण केलं नाही (अपवाद फक्त नादिरशहा). भारतात फारसी भाषेचा प्रचार व प्रसार झाला तो तुर्क व मंगोल्यांमुळे. त्यांच्या स्वत:च्या भाषेत राज्यकारभाराविषयी काहीच माहिती नव्हती. युद्ध जिंकणं वेगळं आणि जिंकलेल्या प्रदेशाच्या राज्यकारभाराची घडी बसवणं वेगळं. तर मग मराठीतले फारसी शब्द हे तुर्क व मंगोल्यांचं भाषादारिद्र्यच दर्शवीत नाही काय? अर्थात, मराठीत राजनीतीसाठी प्रतिशब्द उत्पन्न करायला हवेतंच. किंबहुना शिवाजीमहाराजांनी ते तसे केलेही आहेत. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की मराठीतले फारसी शब्द हे एका वेगळ्या तथ्याकडेही अंगुलीनिर्देश करतात. त्यामुळे मराठीच्या शुद्धतेचा आग्रह हा मराठीचं अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी असावा. आ.न., -गा.पै.

पैसा 04/03/2018 - 10:29
माहितीपूर्ण आणि मनोरंजक! इतकी आडनावे फारसी उगम असलेली आहेत हे माहित नव्हते.

मारवा 04/03/2018 - 19:21
लेख फार आवडला . पठाणांचे पुस्तक अप्रतिम आहे. फार पुर्वी लोकमत मध्ये एक छोटेखानी सदर येत असे त्यात ते एक एक शब्दाचा संबंध जोडुन दाखवत असत. हे असे शोधुन काढणे मोठे मनोरंजक आहे. म्हणजे बघा वरील *बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार " *फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा) पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ? तसेच *फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस्‌ लिहिणारा ) नाना फडणवीस म्हणजे एक आग्रह मी बघितलाय नाना फडणीस नव्हे नाना फडणवीस व पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो. तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे. म्हणजे मुळ तर फारसी आहे मात्र आमचे व्हर्जन असे असेच असावे या प्युरीटनीस्ट आग्रहाची मौज वाटते. याच पुस्तकात एक शब्द दिलेला आहे "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे. गालिबच्या फारशी गझला जर देवनागरीत मिळाल्या तर या दोन ग्रंथाची मदत घेऊन आपल्याला नक्कीच काही प्रमाणात अर्थ शोधता येइल . पण सबसे बडी दिक्कत ही आहे की मला देवनागरीत गालिब ची फारसी शायरी कुठे सापडली नाहे.

In reply to by मारवा

मनो 04/03/2018 - 21:49
देवनागरी कशाला, मूळ स्वरूपात वाचता येईल की. फार अवघड नाहीये. हे एक पुस्तक आहे - चित्रे पाहून शब्द शिका, सोपे ani मजेदार आहे http://ncertbooks.prashanthellina.com/class_1.Urdu.IbtadayeUrdu/all_in_one1.पडफ दुसरा सोपा उपाय - फारसी शब्द कॉपी करून ईथे पेस्ट करा. हि साईट तुम्हाला ती गझल वाचून दाखवेल. http://farsireader.com/webdemoen/ (शेवटचे वाक्य त्यांची जाहिरात आहे - आपण टाकलेला मजकूर नाही )

मारवा 04/03/2018 - 19:37
*शिकिलकर (फा. सैकल्गर्‌ = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा "शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज माहीतीत आहे. हे साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात. पण हा मुळ शब्द आणि यांचा असा संबंध माहीत नव्हता. अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित

मारवा 04/03/2018 - 19:43
त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?' ओसामा बिन लादेन असे आहे होय

In reply to by मारवा

होय ! अरबीत संपूर्ण नाव लिहिण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे... (व्यक्तीचे नाव) बिन / बिन्त* (वडिलांचे नाव) बिन (आजोबांचे नाव) अल् (घराण्याचे/ट्राईबचे नाव) * बिन = चा मुलगा आणि बिन्त = ची मुलगी.

गामा पैलवान 04/03/2018 - 20:16
मनो, रोचक संकलन आहे. त्याबद्दल धन्यवाद. एक अस्सल मराठी (?) शब्द आहे शिपाई. सिपाही हा मूळ फारसी शब्द आहे. त्यावरून मराठीत शिपाई आला. चपराशी व शिफारस हे देखील मराठीत रुळलेले मूळचे फारसी शब्द आहेत. शेवटी त्या सुप्रसिद्ध मराठी वाक्याची आठवण होतेच : शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची. आ.न., -गा.पै.

तेजस आठवले 04/03/2018 - 22:38
फारच माहितीपूर्ण लेख. खरंच असे काही असू शकेल असे माहिती नव्हते. अमीन आडनाव ब्राह्मणात पाहिलेले आहे. खासगीवाले पण. त्यांचा उगम असा असेल असे वाटले नव्हते. दहावीला माझ्या बरोबर एक शेरखाने आडनावाचा मुलगा होता.

चौथा कोनाडा 26/09/2018 - 13:24
माहितीपूर्ण आणि मनोरंजक! इतके शब्द फारसी उगम असलेली आहेत हे जाणून थक्क व्हायला झाले ! माझ्या एका परिचिताचे आडनांव खवीसखान असे होते. याचा काय उगम असावा ?

नेहमीप्रमाणेच फार रोचक, रंजक आणि माहितीपूर्ण लेख ! "मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही 28/09/2018 - 07:16
असेच. Bdw, ' हल्ली' चे मूळ 'हाल ही मे' या उर्दू/ हिंदी आणि पर्यायाने पारसी/अरबी भाषेत असावे का? तसेही ' सद्यस्थिती कशी आहे, किंवा कसे आहात ' या अर्थी काय हालहवाल असे आपण म्हणतोच.

समर्पक 27/09/2018 - 21:50
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
दारू म्हणजे औषध... आजही इराणी प्रभावळीच्या प्रदेशात औषधालयास 'दारूखाने' असेच म्हणतात.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 29/09/2018 - 12:52
'ढालगज-भवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल. ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण. गज म्हणजे हत्ती. भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात. पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न. यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणार्‍या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची. तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे. - सर्वसाक्षी
हा मनोगत संस्थळावर सापडलेला सर्वसाक्षी यांचा प्रतिसाद

गामा पैलवान 28/09/2018 - 17:34
डॉक्टर सुहास म्हात्रे,
"मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)
तुमचं म्हणणं गंमतीनं घेतोय. पण थोडा खोलवर विचार केला तर लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :
तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत.
याचा अर्थ असा की पर्शियन लोकांनी/राजांनी भारतावर कधीच आक्रमण केलं नाही (अपवाद फक्त नादिरशहा). भारतात फारसी भाषेचा प्रचार व प्रसार झाला तो तुर्क व मंगोल्यांमुळे. त्यांच्या स्वत:च्या भाषेत राज्यकारभाराविषयी काहीच माहिती नव्हती. युद्ध जिंकणं वेगळं आणि जिंकलेल्या प्रदेशाच्या राज्यकारभाराची घडी बसवणं वेगळं. तर मग मराठीतले फारसी शब्द हे तुर्क व मंगोल्यांचं भाषादारिद्र्यच दर्शवीत नाही काय? अर्थात, मराठीत राजनीतीसाठी प्रतिशब्द उत्पन्न करायला हवेतंच. किंबहुना शिवाजीमहाराजांनी ते तसे केलेही आहेत. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की मराठीतले फारसी शब्द हे एका वेगळ्या तथ्याकडेही अंगुलीनिर्देश करतात. त्यामुळे मराठीच्या शुद्धतेचा आग्रह हा मराठीचं अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी असावा. आ.न., -गा.पै.
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने. (टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ.