उपासाचा किस...(घेतला का कधी?)

बराच वेळ मनाशी मी हाच विचार करत होतो की उपासाला नेमका हा किस कसा चालतो..? उपासाला जड असे काहिच खायचे नसते..म्हणे! मग हे कसे चालते..? बारश्याला तेराव्याचे गाणे? खिचडी काय..नी..किस काय? हलके थोडेच असतात..होय? माणसे कशी शोधुन काढतात उपवासालाच सुखाची सोय? उपवसाला शास्त्रात म्हणे निराहार ही संज्ञा आहे पण लोक केवढा किस काढतात की पाहुन वाटतं..काय हे..? खिचडी काय...नी थालपिठं काय सगळं जडच खातात तर काहि दुसरं टोक गाठणारे पाणी पिऊन उपाशी रहातात. तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो... ज्याची त्याची अवड..! मी म्हणतो,,बा धर्मा.. आता तुझ्या अस्थी सावड धर्म ही अफूची गोळी हे वचन आज मला पटलं आणी त्यांना

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.

चितगांव संग्रामाचा ८२ वा स्मृतिदिन

लेखनविषय:
आज दिनांक १८ एप्रिल. ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी मास्टरदा उर्फ हुतात्मा सूर्यसेन यांनी भारतीय प्रजासत्ताक सेनेच्या अवघ्या ६४ सैनिकांनासह रात्री ९.५० ला एल्गार केला आणि अगदी काही दिवसांसाठी असेल पण चितगांव स्वतंत्र केले आणि चितगांव वर तिरंगा फडकावला. या सेनेत सर्वात लहान योद्धा होता तो अवघ्या १४ वर्षांचा सुबोध रॉय! स्वातंत्र्यवेडाने पछाडलेले मूठभर शिपाई विरुद्ध इंग्रजांचे प्रचंड संख्येने आलेले प्रशिक्षित व शस्त्रसज्ज सैन्य या अतिविषम संग्रामात अनेक विरांच्या आहुती पडल्या आणि मास्टरदांना माघार घ्यावी लागली. मात्र सेना विखुरली ती पुन्हा एकदा एकवटण्यासाठीच.

<<<ठेल्याचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!>>>

एक डेअरीचा व्यवसाय नीट सुरु असतानाही मी डेअरीच्या ठिकाणीच पान सुपारीचा ठेला स्थापित केला होता. (झक मारलीन ठेला सुरु केला असं झालंय, कारण पैसे देऊनही ठेल्याचं अधिकृत लायसन्स मिळू शकत नाहीय ) त्यात धंद्याच्या जागेत पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही व्यवसाय व्यवस्थित चालू होते. पण गेल्या काही दिवसात ठेल्यावरच्या गांज्याने गोंधळ झाला , आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी धाड पड्ल्यानं ठेला आणि डेअरी पण बंद करावी लागली. आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक माननीय (पक्षी एजन्ट, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि मनपा नि पोलिस ठेसनासमोर अनुष्टाणाला बसवला.

दु:खाचा महाकवी हरपला

लेखनविषय:
लेखनप्रकार
अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत. १० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात.

द अंडरटेकर!

बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

काहीतरी विधायक करावं !! भाग १

नमस्कार मंडळी, प्रस्तावना : १. ही कोणतीही जाहीरात नाही. २. ह्यात कोणताही स्वार्थ नाही. ३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही. ४. गैरसमज नकोत. ;) धन्यवाद. खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्‍या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला. असो, मूळ मुद्द्यावर येऊया, मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे.

चवदार तळे सत्याग्रह - ८५ वर्ष पूर्ण..

लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते. आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत.. -- कॉमॅ.
Subscribe to सद्भावना