Skip to main content

प्रतिक्रिया

खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 23/12/2012 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती.

पाकी मंत्री येऊन आपल्याला लाथांचा गोड प्रसाद देऊन गेला त्यावरील संदर्भात

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/12/2012 23:30 या दिवशी प्रकाशित केले.

गर्दभ लीला!

एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले.

द लास्ट अ‍ॅक्ट

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 17/12/2012 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
१२.१२.१२. ला साहेबांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींनी पेपरची पाने भरलेलली होती त्या टाळुन पुढे जात असताना एका चित्रपटाच्या जाहीरातीने नजर खेचुन घेतली होती. चित्रपटाचे नाव होते "The Last Act". चित्रपटाच्या प्रिमियर साठी निवडलेला दिवस होता १२.१२.१२ त्याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या डायरेक्टर्स ची संख्या आहे १२ आणि चित्रपटाचे कथानक घडतेही १२ शहरात. द लास्ट अ‍ॅक्ट ही भारतातली पहिली कॉलॅबरेटीव्ह फिचर फिल्म आहे. "द लास्ट अ‍ॅक्ट" मागची कल्पना अगदी साधासोपी आहे.

उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/11/2012 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे.

स्कायफॉल-

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 05/11/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

काटकोनी त्रिकोण

लेखक तिमा यांनी गुरुवार, 20/09/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 03/08/2012 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती.