Skip to main content

चौकशी

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 21/12/2008 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

मदत हवी आहे.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/12/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक लंगोटीयार सध्या पुण्यातून मनीला (फिलीपाईन्स) इथे स्थलांतरित झालाय. सध्या तो एकटाच तिकडे गेलाय. थोड्याच दिवसात घर शोधून कुटूंब स्थलांतरित करेल. मिसळपावकरांपैकी कोणी मनीला इथे आहेत का? माझ्या मित्राला घर शोधायला मदत करु शकेल अशी माहीती कोणाला असल्यास कृपया व्य. नि. तून संपर्क साधावा. धन्यवाद! चतुरंग

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

पत्र मिळेल काय?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 14/11/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामधील प्रकाश बाळ यांचा लेख. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3710606.cms यात व्यक्त झालेल्या मतांवर चर्चा करता येईलच परंतु सध्या मला इच्छा आहे ती यात उल्लेखलेले सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेले पत्र. कुणाकडे याचा दुवा / प्रत आहे काय?

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

बागेची गोष्ट.

लेखक रामदास यांनी सोमवार, 20/10/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
कच्ची तुरट आंबट चिंबट अशीकशी नावं ठेवत पेरवाची बाग लुटली कुणी.? बघा जीभ काळी निळी चव कश्शी नाही मुळी, लालडी चोच पुसत पुसत इकडे तिकडे बघत बघत रावे म्हणाले हसत हसत. आम्ही नाही बॉ त्या गावचे !
Taxonomy upgrade extras

गप्पागोष्टी

लेखक घासू यांनी गुरुवार, 02/10/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या शारजाह (यु.ए.ई.) येथे असतो. इकडे कुणा मिसळप्रेमी॑ची भेट होइल का?

अल्फाराटा

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी कांही दिवसासाठी अमेरिकेत अल्फाराटा इथे आलो आहे. कोणी मिसळपावप्रेमी इथे जवळपास अहेत काय ?

आता काय करावं? नसत लचांड... :(

लेखक मनिष यांनी मंगळवार, 19/08/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अनपेक्षितपणे एका वेगळ्याच समस्येत फसलोय. साधारण दोन वर्षापुर्वी मारुती ट्रू-व्हॅल्यू मधून सेकंड-हँड कार घेतली आणि ती चांगली चालली आहे . काल रजिस्टर पोस्टाने कोल्हापुरच्या हातकणंगले (? गावाचे नाव नक्की महित नाही) गावाहून पोलिसांकडून पत्र आले -- त्यात एका अपघाताचा उल्लेख आहे (तारीख आणि नक्की काय झाले त्याचा उल्लेख पत्रात नाही) आणि त्यासंदर्भात कागदपत्रे आणि गाडी घेऊन हातकणंगले इथे बोलावले आहे. मी गाडी कधीही पुण्याबाहेर नेली नाही, तसेच मी घेतल्यापासून तिला कुठलाही छोटा-मोठा अपघात झाला नाही. अर्थात मी घ्यायच्या आधी झाला असेल तर काही माहित नाही.

बालवाडीतल्या पुस्तकाच्या शोधात...

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 16/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा बालवाडीत होते... साधारण २०-२५ वर्षांपूर्वी... तेव्हा १ लहान मुलांसाठीचे पुस्तक होते माझ्याकडे, पाठपुस्तक नव्हे! त्यात लहान मुलांसाठी गोष्टी होत्या. पुसट पुसट आठवतायत. त्यान १ बदकाची गोष्ट होती. बदकाचे लाकडी घर - त्याला १ गोल खिडकी - त्यात ते पिवळे बदक - आणि पाऊस पडतो का काय अशी ती गोष्ट होती. नीट आठवत नाहीये. दुसर्‍या गोष्टीत बिस्किटे तयार करणार्‍या मुलीची होती. त्यात मुलीचे, तिच्या आईचे की मावशीचे, बिस्किटे की डोनट की त्यासदृश काहीतरी, गव्हांकूर यांचेही चित्र होते. वेगळ्या प्रांतातील अनुवादीत कथा असतात तसे काहीसे होते. मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे. कोणाला आठवतेय का हे पुस्तक?