हिशेब हिशेबाचा

आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम

लेखनविषय:
लेखनप्रकार
 कम्युनिजम मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ _________________________________________________ तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता. तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं. एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे.

मला आवडलेली ५० पुस्तके

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके - १) मी कसा झालो? प्र. के. अत्रे २) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे ३) पानिपत, विश्वास पाटील ४) महानायक, विश्वास पाटील ५) झाडाझडती, विश्वास पाटील ६) युगंधर, शिवाजी सावंत ७) छावा, शिवाजी सावंत ८) मृत्युंजय, शिवाजी सावंत ९) स्वामी, रणजित देसाई १०) श्रीमान योगी, रणजित देसाई ११) पावनखिंड, रणजित देसाई १२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे १३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे १४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे १५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे १६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे १७) पडघवली, गो. नी. दांडेकर १८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी.

माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी

लेखनविषय:
लेखनप्रकार
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. आधुनिक काळात राजेश रेडडी हे नाव याच यादीत घेतलं जात. त्यांची उर्दू भाषेवर तेवढीच पकड आहे जेवढी हिंदीवर. त्यामुळे मातृभाषा उर्दू नसतांना त्यांनी उर्दू गझलेत जे मानाचं स्थान प्राप्त केलंय ते निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे.

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

रंजीश हि सही

लेखनप्रकार
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

एका चिमण्याची गोष्ट

लेखनविषय:
लेखनप्रकार
(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य .... वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच झाली. क्षणभरातच ते जगाला विसरले. एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. आकाशात विहरताना त्यांना एक वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले.

गुलजार!

लेखनविषय:
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे. खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा.

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी

लेखनविषय:
लेखनप्रकार
(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. ) संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते. सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप. आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?). लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले.

रूस्तम

लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.
Subscribe to आस्वाद