वियोग-कविता
वियोग या विषयावरील काही जुन्याच कविता आज पुन्हा वाचत होतो या शेअर कराव्याश्या वाटल्या सहज म्हणुन हा धागाप्रपंच केला. बघा एखादी तार जुळते का तुमचीही.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा संग्रह "निशा निमन्त्रण" हा मला फ़ार भावतो. या संग्रहातील कवितांचा काळ तसा फ़ार जुना आहे साधारणत: १९३७-३८ मध्ये लिहीलेल्या या कविता आहेत. बच्चन यांच्या विख्यात " मधुशाला" आणि "मधुबाला" नंतर लिहिलेल्या कवितांचा हा स्वतंत्र संग्रह आहे. या कविता संग्रहाला तुलनेने कमी प्रसिद्धी मिळाली बहुधा. तर मजजवळ असलेल्या निशा च्या आवृत्तीला स्वत: बच्चन यांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतुन या संग्रहातील कविता त्यांची पार्श्वभुमी इ.
मिसळपाव
मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
___________________________________________________________________
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले.
दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले.
बेखबरी का फायदा
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
-------------------------------------------------------------------------------------------
खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली.
खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला.
थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली.
तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं.
तिसऱ्यांदा खटका दबला.