संध्याकाळी वारा वाहता
मेघदूत नी गारा होत्या
मन माझे मग काहूरते
कधी येणारगं तू सखये
झाडावरचा राऊ मजला
हळुच घालतो शीळ स्वरांची
जाणुनबुजूनी माझ्याभोवती
आठवण करीतो तुझ्या सुरांची
रवीराज तो गहीवरलेला
सांजवेळी बहरत होता
मुक्तहस्ते तळ्याकिनारी
तुझा रक्तिमा वाटत होता
कोपरावरच्या वळणावरती
मोगराही बहरलाय
माझ्या वेड्या जिवाबरोबर
तो ही तुझ्यासाठी आतुरलाय
एक नभ जो जाई सुसाट
वाटे तयावर स्वार होउनी
मी यावे ऊडीनी अलगद
कुशीत तुझया एक क्षणिक
सरूनी जाते संध्याकाळ
तुझ्या आठवणित नकळत
मन माझे मग काहूरते
कधी येणारगं तू सखये
- अडाणि.
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 1:51 pm | चन्द्रशेखर गोखले
अडाणि अडाणि म्हणता आणि सुंदर तराणी लिहिता.. मस्त !!