माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला र्हावत नाही
लिहूया कविता म्हणून
लिहीली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलं जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहील्या
वाचून र्हावत नाही
दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असंच आहे
अशावेळी
कविता लिहील्या
वाचून र्हावत नाही
अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत ही नाही
तरी हरकत नाही
कविता लिहील्या शिवाय
मला र्हावत नाही
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 7:14 pm | मनीषा
रचनेतील विचार आवडला ..
13 Nov 2008 - 9:02 pm | श्रीकृष्ण सामंत
मनीषा ,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
21 Oct 2016 - 3:26 pm | Bhagyashri sati...
छान,आवडली कवीता
21 Oct 2016 - 3:55 pm | पथिक
आवडली!!
21 Oct 2016 - 4:02 pm | वेल्लाभट
काव्यभाव कमी वाटला. व्याकरणात सुधार हवा.