मिणमिणता दिवा.

Jayant Naik's picture
Jayant Naik in जे न देखे रवी...
20 Apr 2018 - 10:21 am

मिणमिणता दिवा ..

मरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली .
कंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली.

असाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला….
“तुला काही प्रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन” म्हणाला .
जीवनाचे रहस्य काय ?संघर्षाचे बीज काय ?
आनंदाचे आणि वेदनेचे प्रयोजन काय ?
श्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय ?
त्यांना काय करायचे होते ? ते पूर्ण झाले काय ?

मी हसलो ...तो गोंधळला ….
म्हणाला ..”अरे वेड्या ..मी इथे न बोलवता आलो आहे !
तुला उत्तरे द्यायला ..आणि तू असा हसतोस काय ?”
मी म्हणालो ...अरे प्रश्न माणसांचे ...त्यांनीच उत्तरे शोधायला हवीत !
उत्तरे शोधायला देवदूताला यावे लागले,इथेच ..
देवाच्या योजनेत नक्की काही तरी चुकले

प्रश्न माझ्या मनात असतील तर ..उत्तरेही असलीच पाहिजेत .
फक्त शोधण्याची गरज आहे …
देवदूताची इथे गरज कुठे आहे ?
आता हसण्याची पाळी देवदूताची होती ...तो हसून म्हणाला ,
“ अरे सगळा गुंता इथेच तर आहे ! सगळा घोळ या मनाचा आहे….
मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे !
हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत ! “

देवदूताने आपले काम केले ..
मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला ..
मार्गावर माझ्या ..प्रकाश आपोआप पडत गेला ...

जयंत नाईक

***********************************************************************************************

भावकवितामुक्तक

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Apr 2018 - 8:54 pm | पैसा

कविता आवडली

छान आहे . आवडेश एकदम येगळी . हटके
सिद्धेश्वर विलास पाटणकर

माहितगार's picture

29 Apr 2018 - 1:55 pm | माहितगार

प्रश्न माझ्या मनात असतील तर ..उत्तरेही असलीच पाहिजेत .
फक्त शोधण्याची गरज आहे …
देवदूताची इथे गरज कुठे आहे ?
आता हसण्याची पाळी देवदूताची होती ...तो हसून म्हणाला ,
“ अरे सगळा गुंता इथेच तर आहे ! सगळा घोळ या मनाचा आहे….
मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे !
हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत ! “

देवदूताने आपले काम केले ..
मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला ..
मार्गावर माझ्या ..प्रकाश आपोआप पडत गेला ...

व्वा काय बाते , भारी !!

मला हा प्रश्न कायम पडलेला आहे कि एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे हे आपल्याला कसे समजते. आपले मन ते कशाशी पडताळून पाहते ? आपल्या स्मृतीत बर्याच वेळा हि माहिती नसते मग ते कश्याशी पडताळून पहिले जाते.