आकाश झाले कोरडे,
सुकले त्याचेही नरडे,
कुठे भटकशी वरूणराजा,
पाऊस इथे का न पडे.
धरतीची दशा ही सुन्न,
दाही दिशाही खिन्न,
कुठे भटकशी वरूणराजा,
कधी होशील तु प्रसन्न.
तुझ्या आगमनाची आस,
शेते पडली ही ओस,
कुठे भटकशी वरूणराजा,
घेऊदे मोकळा श्वास.
भिजवुन टाक ही अवनी,
आनंद पसरी या भवनी,
दया करा हो वरूणराजा,
भिक मागतो तुझ्या मी चरणी.
---- हृषीकेश ----
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 12:24 am | ज्योति अळवणी
सद्य परिस्थिति खरच अशी आहे
10 Sep 2015 - 3:08 am | पद्मावति
छान लिहिलय. आवडली कवीता.
11 Sep 2015 - 5:42 pm | निनाव
सुन्दर. विषय उत्तम. ज्योति अलवनि ह्यन्च्याबरोबर सहमत.