कितीदा तरी रे आले होते,
खूण ओळखीची शोधत होते,
नाहीच झाली पण भेट आपली,
मी उम्बर्यातच थिजले होते.
किती जपून आणले शब्द होते,
तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते,
मौनात वेदना डोळ्यांत विझल्या,
शब्द कधीच रे निसटले होते.
किती अंतर चालून आले होते,
आता कुठे बघ विसावले होते,
दिशा साऱ्या का अंधारून आल्या,
की गावच तुझे बदलले होते.
अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते,
मूर्त रूप मी त्याला देत होते,
कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला,
ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 2:27 pm | जडभरत
छान. पहिलं कडवं खूप आवडलं.
4 Aug 2015 - 2:33 pm | जडभरत
उंबर्यातच थिजून द्विधा मनस्थितीत हाताने साडीचे टोक अस्वस्थपणे हाताळणारी स्त्री डोळ्यासमोर येते.
4 Aug 2015 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा
आवडलं.
4 Aug 2015 - 3:15 pm | वेल्लाभट
दिशा साऱ्या का अंधारून आल्या,
की गावच तुझे बदलले होते.
या ओळी विशेष भावल्या.
सुंदर !
4 Aug 2015 - 10:54 pm | एक एकटा एकटाच
निव्वळ अप्रतिम
10 Oct 2015 - 11:25 am | माहीराज
खुप छान. .सुरेख
11 Oct 2015 - 4:20 pm | बोका-ए-आझम
छानच!
11 Oct 2015 - 6:59 pm | अजया
छान कविता.
11 Oct 2015 - 7:13 pm | जव्हेरगंज
आवडेश!
11 Oct 2015 - 7:47 pm | सस्नेह
गूढ-रम्य काव्य !
11 Oct 2015 - 8:17 pm | एस
'असा बेभान हा वारा...' या गीताची आठवण आली.
12 Oct 2015 - 1:38 am | रातराणी
सर्वांचे धन्यवाद!