जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 11:42 am

ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही.
प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती.
शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)

जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन.

म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे. रबर ताणायचा कीती हे थोड्याशा प्रयत्नाने साध्य करता याबद्द्ल दुमत नसावे अशी आशा करतो. साधना यासाठीच की कितीही मोठं दु:क्ख असुद्या ते दु:क्ख आहे हे कोणालाही समजते. पण सुख आल्यावर हेही काही काळाने का होईना ते दु:ख्खात बदलते हे लवकर लक्षात येत नाही.आपले संतुलन सुखाने बिघडते. आता प्रश्न असा आहे की मी सुखाच्या आनंदाला मुकायचे का ? तर अजिबात नाही. सुख आल्यावर आनंद , दुक्ख आल्यावर दु:क्खाकडे तटस्थपणे पहा. निरासक्त होउन बस्स. तेवढंच पुरेसे आहे . त्यातुन तुमचा तुम्हाला बोध होईल. आता अध्यात्माच्या नावाने इतकी बोंबाबोंब झालीय जगात की एवढंच करायचं आनी दु:क्खातुन मुक्ती हे केवळ अशक्य वाटायला लागतं. करुन न पाहता शंका उमटतात.मन इतकं बावरलेलं झालय की ते समतेने पाहुच शकत नाही कारण जन्मापासुनची सवय. असो. आपण नेहमी बाहेर पहातो, उदा: मिपावरील प्रतिक्रिया पहा कुठल्याही धाग्यावरील. एका धाग्यावर मत नोंदवलेलं असेल तर दुसरीकडे त्याच व्य्क्तीने विसंगत विधान केलेलं आढ्ळुन येइल. बर्याचदा ते विनोदाचा भागही असेल.पण काही वेळा ते आपल्याच आधी केलेल्या विधानाच्या विरुद्ध असेल. आपण नकळत पण सतत दुसर्याच्या वागणुकीचे डोळ्यात तेल घालुन मुल्यमापण करत असतो. सगळी साधना हिच की आपण आपल्याच वागणुकीचे मुल्यमापन करावे म्हणजे आपल्याला आपलाच बोध होईल. विचार करुन बोलले तर नंतर शब्द गेल्यावर वाइट वाटुन घेण्याची वेळ येणार नाही.असो. झाले हे प्रबोधन फारच झाले काय?

नाही मग हे वाचा
http://www.aisiakshare.com/node/3140

झाले मग हे वाचा.
http://misalpav.com/node/28489

कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय.

हे घ्या पुरावे:
http://misalpav.com/node/21788

काही खास
विलासरावला प्रत्यक्ष भगवान शंकरानं जरी चिलीम ऑफर केली तरी ते ती हातात घेणार

नाहीत हे मी आता सांगू शकतो.

स्वत: विपश्यना करीत प्रत्येक पाऊल टाकणारे, 'आपल्याला कशातलं काही कळत नाही' हा गुरुमंत्र असणारे विलासराव रस्ताभर सगळ्या जगाची नालस्ती करीत होते - आणि मी त्यांना दाद देत होतो. अर्थात हे फक्त माझी परिक्षा पाहण्यासाठीच.
मला कळतं असा आव मी आणत होतो, मग विलासरावच्या रुपातले साईबाबा मला सोडणार काय? माझा बेकअलीपणा त्या रस्ताभर सांडत होता. परिक्रमा झाल्यानंतर विलासराव त्यांच्या प्रेमाच्या लोकांची साईबाबांच्या रुपात भेट घेतील. म्हणजे मी विलासरावच्या रुपात साईबाबांसोबत फिरत होतो, आणि मला ते कळत नव्हतं, मी त्यांना अक्कल शिकवत होतो, पण साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाहीच - ते मला माझ्यावर विनाकारण खूश झालेल्या एका नाथपंथीय योग्यानं दाखवलं. कसं ते पुढे सांगू.

आत्मशून्य आणि विलासराव मुंबईतून परिक्रमेसाठी निघत असताना विलासरावांनी त्याच्यासाठी आणि स्वत:साठी सारखाच शर्ट, पंचा आणि रुमाल घेतला होता. म्हणजे दोघांचा पेहराव सारखाच. तीन तासांपूर्वी आत्मशून्य त्या पेहरावात रस्त्यावरून जात असताना त्या कॉन्स्‍टेबलने पाहिलं होतं आणि आता तो आत्मशून्यच हे कसं ते मला विलासरावांनी समजून सांगितलं होतं? तुम्हाला, हे वाचणार्‍यांना काय कळलं? हे परब्रह्मच वेगवेगळ्या रुपात फिरतंय आणि वेगवेगळी रुपं दाखवून मरणांत परिक्षा घेतंय.

माझ्‍या ओळखीच्या असलेल्या विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी किती प्रकारे मला इशारे केले असतील, पण मी ते सगळं मातीत घालत होतो. आता, घडून गेलेल्या प्रत्येक गोष्‍टीची संगती मला अचूक लागतेय, ती गुरुने माझ्यावर केलेल्या कृपेमुळं. तुम्हा वाचणार्‍यांना स्वत:च स्वत:च्या बळावर कमावलेली नजर असेल, किंवा तुमच्या मस्तकी कधी कोणा गुरुचा हात राहिला असेल तरच तुम्हाला हे सगळं खरं आहे का याचा अंदाज येईल. नाहीतर तुमच्यालेखी यशवंत कुलकर्णी नावाचा कुणीतरी पोट्‍टा पागल झाला अशी नोंद लागेल.
मध्‍येच लागलेल्या एका धाब्यासमोर रांजण भरुन ठेवलेले होते, तिथेही विलासरावांनी पाणी पिलं, मीही पिलं. त्यांनी त्या धाब्यावरच्या लोकांना 'पानी पिना है किंवा पानी पिएं क्या' असं काहीतरी दरडावून विचारलं होतं एवढं आठवतंय. तेवढ्या 14 कि.मी. मध्‍ये विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीतून हजारो दृष्‍टांत दिले असतील, पण मला त्यावेळी नजर कुठे होती?

चालत चालत दहा किलोमीटर अंतर कापलं. आजूबाजूला शुकशुकाट असलेल्या रस्त्याच्या कडेला एक फुलवाला फुलांच्या माळा करीत बसला होता. तिथं माठ भरून ठेवलेला होता. पुन्हा तिथं पाणी पिलं. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याच्याशीही दोन गोष्‍टी केल्या. त्याला काय कळलं असेल देवजाणे. पुन्हा दोनतीन किलोमीटर पुढे पोहोचलो असू. महेश्वरमध्‍ये गेल्यानंतर कुठे जाऊन थांबायचं ते विलासरावच ठरवत होते

तिथे शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या वृद्धाला विलासरावांनी थांबण्‍याच्या सोईबद्दल विचारलं. तो म्हणे तुमची थांबण्‍याची व्यवस्‍था मागेच असलेल्या लॉजमध्‍ये होऊ शकते. त्यानं दोन-दोनदा विलासरावांना नमस्कार केला. विलासरावांनी कुणालाही काही दरडावून विचारलं की बिनदिक्कत पुढे जात होते, मग मीच माझ्या लाजकाजं त्या उत्तर देणार्‍याला धन्यवाद किंवा थँक्यू म्हणत होतो तेव्हा विलासरावच्या रुपातील साईबाबा मला सांगत होते, कशाचे धन्यवाद? नर्मदे हर, नर्मदे हर म्हणायचं. मी भेटलेल्यांपैकी बर्‍याच लोकांना नर्मदे हरही म्हणालो आणि धन्यवाद थँक्यूही म्हणालो.

एका गाड्यावर खरबूजं विकायला ठेवली होती. विलासरावच्या रुपातील साईबाबा म्हणाले 'मला खरबूजं फार आवडतात. आज रात्री खरबूजच खाऊ.' म्हटलं घेऊन टाकू. वीस रुपये देऊन एक खरबूज घेतलं. मध्‍येच त्यांनी त्यांना भेटलेल्या कुठल्यातरी 'प्रति साई'चा किस्सा सांगितला. तो जो कोण माणूस असेल त्यानं स्वत:ला 'प्रति साई' घोषित केलंय आणि तो आश्रम बांधून रहातोय. त्याच्या गावापासून शिर्डीपर्यंत तो उलटा चालत जातो. पेपरमध्‍ये बातम्या वगैरे येतात. प्रति साई आहे तर शिर्डीपर्यंत उलटा कशाला चालत जातो म्हणून मी खूप मोठ्यानं हसलो. विलासरावच्या रुपातील साईबाबा त्यालाही भेटून आले होते - तेव्हा त्याने विलासरावांच्या रुपातील साईबाबांना विपश्यनेबद्दल चार गोष्‍टी विचारल्या आणि विलासरावांनीही त्या त्याला सांगितल्या.

राजराजेश्वर मंदीराच्या दिशेनं निघालो. या मंदीरात जायचं अर्थातच विलासरावच्या रुपातील साई बाबांनी ठरवलं होतं. मंदीराचं गेट ओलांडून आत गेलो. एक वृद्ध ब्राह्मण कद घालून मंदीराच्या पायरीवर बसला होता. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याला इथे थांबण्याची व्यवस्‍था होऊ शकते का हे विचारलं. तो म्हणे, 'कम हियर, व्हेअर डू यू केम फ्रॉम?' मग विलासरावांनी काय सांगायचं ते सांगितलं. कुठले आहात, कुठून येताय वगैरे चारदोन गोष्‍ट झाल्या. तो मंदीराच्या समोरच्या प्रांगणाकडे हात दाखवून म्हणे, 'यहां सो जाओ.' विलासरावांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या इंग्रजी बोलण्‍याची माझ्यासमोर टर उडवली.

आयला यक्कुशेठ, काय करताय
प्रास - Tue, 29/05/2012 - 19:18
आयला यक्कुशेठ, काय करताय हो?
दोन दिवसाच्या परिक्रमेची गोष्ट अशी काही सांगताय की जणु आमच्या डोळ्यांपुढेच घडतेय. पण जे काही बुद्धी टिपतेय त्यांची पूर्णच्या पूर्ण संगती लावणं अवघड होऊन बसलंय ना....
मला कल्पना आहे की हे असलं काही अनुभवल्यानंतर ते तसंच्या तसं मांडणं खूपच कठीण होत असावं पण आमचा आपला नेहमीप्रमाणेच यक्कुशेठांच्या लिखाणाला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शक्य तितक्या लवकर पुढले भाग टाका. वाट बघत आहे.
विलासरावांबद्दल काळजी वाटतेय पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक....
आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?

विलासरावांबद्दल काळजी
यकु - Tue, 29/05/2012 - 19:59
विलासरावांबद्दल काळजी वाटतेय

काळजी? अहो तो माणूस जिथे जाईल तिथे सांगतोय की द्यायचं असेल खायला तर तयार द्या, सदावर्त वगैरे देऊ नका. हाताने बनवत नाही. कुठल्यातरी मंदीराच्या पुजार्‍यानं नारळ दिलं, त्यावरच गड्याचा दिवस गेला.
त्याच्या आधी कुठलंतरी मंदीर त्यांना आवडलं, तिथे बाहेर, ओट्यावरच ते झोपत होते, तर तिथल्या ब्राह्मण पुजार्‍यानं त्यांची जात आणि धर्म विचारला. आणि यांनी सांगितला तेव्हा यांना पडक्या खोलीत पाठवून देण्यात आलं. माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका.

पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक....

तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.

आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर?

मी महेश्वरचे सगळे घाट पालथे घातले, आश्रमांमध्‍ये त्याची विचारपूस केली, पण त्याची भेट व्हायची नव्हतीच.

माणूस अहमदनगर जिल्ह्यातून
प्रास - Wed, 30/05/2012 - 11:23
माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका.

अहो यक्कुशेठ, अहमद नगरचा माणूस अहमद नगरच्या माणसाला व्यवस्थित ओळखणारच की! Wink

तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा.

विलासरावांना असल्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी दिलेल्या उत्तरांवरूनच काढलेला निष्कर्ष आहे हा...

आत्मशून्याचं आत्मशून्यच सांगेल असं मानून चालू Wink

बाकी पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत....

गुंगवून टाकणारं लिहिलंस
वल्ली - Wed, 30/05/2012 - 09:01
गुंगवून टाकणारं लिहिलंस रे.
विलासरावांसारख्या सज्जन माणसाबरोबर भरपूर गप्पा मारत फिरण्याचा योग वसई आणि कान्हेरीच्या भटकंतीत आलाच होता.

यकुविलास आवडला.
नगरीनिरंजन - Wed, 30/05/2012 - 09:29
यकुविलास आवडला.

हम्म... साईबाबांना भेटायला
लीमाउजेट - Wed, 30/05/2012 - 14:37
हम्म...
साईबाबांना भेटायला हवं... Smile

ते सिल्व्हासा की कुठे नोकरी करीत होते तेव्हा काहीतरी वाचून की कुठल्या घटनेमुळे तीन दिवस सतत रडत राहिले आणि त्यांना उपरती झाली. मग सगळं सोडून ते तिथून शिर्डीला चालत आले. विलासराव अहमदनगर जिल्ह्यातलेच असल्याने त्या दोघांतच संवाद चालला होता. शिर्डीपासून जवळच असलेल्या कोकणखार गावाबद्दल बोलणं सुरु होतं. बहुतेक जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. कारण जनार्दन स्वामींचा सगळ्यात अव्वल पट्‍टशिष्य होऊन दाखवीन असं काहीतरी त्यांच्या बोलण्‍यात आलं होतं. परिक्रमेबद्दल वगैरे बराच वेळ बोलणं सुरु होतं.

शहरात जाऊन चहा, नाष्‍टा करुन येण्याचा विषय निघाला. ते म्हणे चला, मी पण येतो. मग त्यांनी आधी बहुतेक आम्हाला विश्वेश्वराच्या मंदीरात नेलं. तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदीरातूनच वर गेलेल्या रस्त्याने आम्ही आम्ही थांबलो होतो त्या मठीत आलो. मी तिथे त्यांचे आणि त्यांच्या पायाचे फोटो काढले. विलासराव म्हणे, झालं! हे लिहिणार आता तुमच्याबद्दल इंटरनेटवर. म्हटलं हो, आपल्याला प्रॅक्टीकल करुन पहाणारी माणसं आवडतात. योगी महाराज हसले.

बाकी नारायण नारायण.

कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव

नरा: नारायण!!!!!!

आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम ..........!!!!!!!

धर्मवाङ्मयमुक्तकविनोदजीवनमानप्रवासअर्थकारणशिक्षणमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छासमीक्षाअनुभवसंदर्भप्रश्नोत्तरेप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

16 Aug 2014 - 12:06 pm | सोत्रि

नेमके काय आहे हे?

- (डोक्याचे दही झालेला) सोकाजी

स्पंदना's picture

16 Aug 2014 - 12:13 pm | स्पंदना

उद्या दहीहंडी आहे ना?
थर पण लावायची गरज नाही. फोडुन घ्या!!

सुहास..'s picture

18 Aug 2014 - 12:27 pm | सुहास..

- (डोक्याचे दही झालेला) सोकाजी >>>

आण ते हिकडं , जरा एखाद मॉकटेल बनवितो ...सोकाडे कलर्ड बिच नावाच ;)

कविता१९७८'s picture

16 Aug 2014 - 12:21 pm | कविता१९७८

गमतीशीर लेख.

प्यारे१'s picture

16 Aug 2014 - 12:34 pm | प्यारे१

विलासराव,

नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही? तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे.

थोडी विश्रांती घ्या.
आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो.
आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच.

विलासराव's picture

16 Aug 2014 - 1:03 pm | विलासराव

विलासराव,

नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही?

दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का? नसतिल तर मग माझं काही म्हणनं नाही.

तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे.

वाचुनही हेच अनुमान असेल तरिही मला काहीही म्हणायचं नाही.

थोडी विश्रांती घ्या.
आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो.
आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच.

आपण दाखवलेल्या सदभावनेबद्दल अनेक आभार.
मी एकदम ठणठणीत आहे, काळजीचं काहीही कारण नाही.

प्यारे१'s picture

16 Aug 2014 - 1:14 pm | प्यारे१

>>>>कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय.

हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय.

बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच.

विलासराव's picture

16 Aug 2014 - 1:18 pm | विलासराव

हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय.

बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच.

आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी.

>> आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी.

असे 'संक्षी'प्त होऊ नका!

- (सर्वांचा मी) सोकाजी

>> दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का?

हो वाचल्या, मग? आता संदर्भ लागला नाही म्हणून जाउद्या असे मोघम उत्तर देऊ नका!
तुम्ही जे काही लिहीलेय आणि लिंका दिल्यात त्यांच्यातला कार्ककारण भाव स्पष्ट होत नाहीयेय आणि त्यामुळे ते असंबद्ध वाटतंय.

सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)
सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला!

-(आयुष्य मनमुराद उपभोगणारा) सोकाजी

विलासराव's picture

16 Aug 2014 - 1:45 pm | विलासराव

अहो सोत्री अस पहा

मि तिकडे साधना मार्गावर लिहीलेय आनी आलेल्या प्रश्नांची यथाशक्ती ( माझ्या अनुभवाप्रमाणे) उत्तरे दिलीत.
खरंतर मी तो अनुभव ईथेच लिहीनार होतो.ओपन मिपा बंद होते म्हणुन तिकडे लिहीले.
तिकडचे काम आवरुन ईकडे आलो तर इथे साईंचे लेख वाचले.
मि द्यायच्या म्हणुन प्रतिक्रिया देत नाही. कींवा कमीत कमी देतो असं म्हणुया.
मी साइंच्या त्या धाग्यावर माझी प्रतिक्रिया नोंदवली. आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे. आनी तो धागा आता वाचनमात्र झाला. काही हरकत नाही.
झोपताना शेवटचा धागा साइंचा वाचल्याने सहजच त्याचे विचार मनात घोळत होते. तसाच झोपलो.
आता ही काय जादु नाही की झोपताना ज्या विचारावर मन काम करत होते त्याच विषयाशी संबंधीत उठताना तुमचा पहीला विचार असतो. हवम तर करुन पहा. नसेल तर नका करु.या नियमाला धरुनच जाग आली तेंव्हा तेच चिंतन चालु झाले.

एकदम मला ते यक्कुचे साइपुराण आठवले. तिकडे रुक्ष विषय होता मग म्हणालो हा तर चांगलाच मनोरंजनाचा विषय होइल. मग कविताताईंना वाइट नको वाटायला म्हनुन ते गंमत पहा असे लिहीले. मनापासुन त्याच अर्थाने.
मग लेख टाकला.मग लक्षात आले म्हणुन कविताताइंना खरड टाकली. निलकांतालाही लेख पाठवला. नियमात बसतोय का पहा म्हनुन.

तरीही स्वभावानुसार काही लोक नाही समजु शकणार म्हनुन ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही.
प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती.
शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)
कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव
हे लिहीले.

आता कोणी म्हणेल की प्रत्येकाला व्यनी पाठवुन त्यांची मते घेउन लेखात बदल करावेत काय?
जग एवढं तकलादु कसे झाले की घ्यायचे ते घेउन बाकी सोडुन देउ शकत नाही काय?
मी मग लिहुच नये असाच त्याचा अर्थ होत नाही काय?
मला वाटले ते तसेच्या तसे लिहायचे स्वातंत्र्य मला नाहि काय?

मी खरोखरच गंमत म्हणुन लेख लिहिलाय. आता तो कोणास तसा वाटत नाही हा माझाच दोष काय?

कविता१९७८'s picture

16 Aug 2014 - 2:16 pm | कविता१९७८

अहो विलासराव मी मिपा वर अगदी नवीन आहे, खरड वगैरीची मला कल्पना नाहीये ; थोडीफार माहीती मला लिमाउजेट , पैसा आणी इतर मैत्रीणींनी दिलीये , तुम्ही आता लिहिलंय तेव्हा मी माझी खरडवही चेक केली.

संदेश शक्यतो व्यक्तिगत निरोपात पाठवले तर बरं होईल.

विलासराव's picture

17 Aug 2014 - 11:41 am | विलासराव

सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)

शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) असे आहे ते पुर्ण वाक्य.

सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला!

असे म्हणल्यावर धागा लिहीण्याचा मला अधिकारच नाही असेच मी समजेन.

कवितानागेश's picture

16 Aug 2014 - 1:27 pm | कवितानागेश

साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात.
बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे.
पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय.

तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का?
माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही.
... तेंव्हाही झाला नव्हता.. :(

साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात.
बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे.

धन्यवाद.

पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय.

आर्थातच ती चुकीची आहे. मूळातच ती मी त्यासाठीच टाकलीय. मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय. मला अजुनतरी असा भास झालेला नाही. पण मग काही लोक म्हणणार हाच भास आहे मुळी (माझाच). घोड्यावर बसु द्यायचं नाही पायीही चालु द्यायचं नाही. असो.

पण मग मी आत्ता जर म्हणालो १ तासात जगबुडी होणार आहे तर कीती लोक विश्वास ठेवतील?

तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का?
माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही.
... तेंव्हाही झाला नव्हता.. Sad

होती. मला तेंव्हाही मी साइ आहे असे वाटले नाही अन आताही नाही.
दुसर्या ओळीबद्द्ल असे म्हणेन की जर असेच काही ध्वनीत होत असेल, आनी त्याचा एकाही व्यक्तीला फार त्रास होणार असेल तर धागा बंद करा ( अगदी मनापासुन). उडवुन टाका. मी दुसर्यावर कोट करतो तसे स्वतःवरही. म्हणुन मला आताही यात काही गैर आहे असे वाटत नाही. पण धागा बंद करायला काहीच हरकत नाही माझी.

कवितानागेश's picture

16 Aug 2014 - 2:40 pm | कवितानागेश

"मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय."
मी त्या तुलनेबद्दल लिहित नाहीये. ते तुम्ही केवळ 'गंमत' म्हणून लिहिलं आहे हे मला कळू शकतय.

संजय क्षीरसागर's picture

16 Aug 2014 - 3:17 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही.

तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'. पण त्यासाठी वापरलेला विदा इतका परिणामकारक आहे की तो संबंधितांना सहन होणार नाही. आणि जे पूर्वपिठीकेशी परिचित नाहीत त्यांना मुद्दा कळणं शक्य नाही, असा दुहेरी पेच आहे.

मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला.

थोडक्यात, ज्यांना समजावं या सद्भावनेनं तुम्ही लिहीलंय त्यांना पूर्वसंदर्भाअभावी समजणार नाही. ज्यांना समजू शकेल (आणि ज्यांनी अशा साधनांना प्रोत्साहन देऊ नये अशी अपेक्षा आहे), ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि जे दोन्हीकडे नाहीत त्यांना वाटेल लेखकच हुकलायं!

मला तुमचा हेतू लक्षात आलायं पण हेतूशुद्धता धागा टिकवायला कितपत मदत करेल ही शंकाये.

विलासराव's picture

16 Aug 2014 - 4:49 pm | विलासराव

तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही.

हे तुमचं मत. धाग्याची शाश्वती आवश्यक नाही. कारण गंमत.

तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'.

साफ चुक. हे तुमचं मत.

मी गमतीने धागा काढलाय.

माझा किंवा कुणाचाही

पोपट मेला. तो सांगतोय पोपट मेलाय.
कुणी म्हणतय
१) असं नका म्हणु पोपट मिरची खात नाही असं म्हणा.
२) कुणी म्हनतय पोपट झोपलाय असं म्हणा.
३) कुणी म्हणतय पोपट पाणी पीत नाही म्हणा.

आता काय करु.......

मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!!

कवितानागेश's picture

16 Aug 2014 - 6:13 pm | कवितानागेश

झाली का टरफलं उचलून? :)

विलासराव's picture

16 Aug 2014 - 6:19 pm | विलासराव

मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!!

मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही!!!! असं आहे ते .*ok*

विलासराव's picture

17 Aug 2014 - 11:58 am | विलासराव

मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला.

एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही.
असे म्हणतोय त्याबद्द्ल माफी पण मनात आले की तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन.
ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा.

मला विपश्यना समजली.काही लोक ती करु शकत नाहीत हेही समजले. त्याची त्याची कारणेही आहेत हे ही समजले.
आता यात जेंव्हा दोष आहे असे मला समजेल , किंवा कोणि महापुरुष( सामान्यही असु शकतो) ते दाखवुन देईल तर मी माझी समज बदलेल.

मत आनी समज यात गल्लत तर नाही ना होत?
पण मला यावर यापेक्षा जास्त वाद घालायचा नाही.
त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आनी धागा काढण्याचे ते प्रयोजन नव्ह्ते. असो.

विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही.

तुम्हीही अंदाजच व्यक्त करता हे पाहुन गंमतच वाटली. पण धाग्याचा उद्देश स्फल झाला हे पाहुन आनंदच झाला.

तरीही
तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही.

उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य.

अवांतर :
आता पहा धागा कसा धावतोय.

तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे.

त्यामुळे, माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्याकडे किंवा तुमच्या साधनेकडे नाही.

तो, या :

"साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत"

आणि वरच्या पोस्टमधे सतत येणार्‍या तत्सम उल्लेखातल्या, `भ्रमाकडे' आहे.
________________________________

>एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही.

= धाग्यावरच्या गोंधळाबाबत मी लिहीलंय, सत्याविषयी नाही.

गोंधळ कसा घातला हे बघायला वेळ असेल तर ही लिंक आहे : http://www.misalpav.com/user/18002/authored.

सत्य एकदा समजलं की समजलं त्यात फेरफार होत नाही.

तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो, सत्य समजल्याची महत्वाची खूण म्हणजे साधना संपते. साधना करायची आवश्यकताच नव्हती हे लक्षात येतं कारण सत्य आणि आपण वेगळे नाही. कोणतीही साधना आपल्याला स्वतःपासून वेगळं किंवा एकरुप करु शकत नाही. आपण अविभाज्य आहोत हा प्रत्यक्ष अनुभव होतो.
_________________________________

> तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन. ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा.
= असं मी म्हटलेलं नाही.

= मी तुमच्या सांप्रत साधनेविषयी (विपश्यना) काहीही लिहीलेलं नाही. विपश्यना दूरगामी मार्ग असला तरी निर्धोक आहे. माझं म्हणणं साधना जटील नसावी इतकंच आहे.

>उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य.

= हे तुम्हाला मंजूर आहे म्हटल्यावर विषय संपला.

विलासराव's picture

17 Aug 2014 - 8:49 pm | विलासराव

ओके संक्षी.

तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे.

सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने.माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती)
देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का
.

नाहीतर साईविलास तुम्हाला शापच देतील.

तुम्ही तर मुक्तच आहात , मीही मुक्तीच्या मार्गावर आहे पण जवळ्पास अलीकडच्या टोकावर आहे आहे. जेण्व्हा मी मुक्त होइल तेंव्हा आपण भेटुच.

काय म्हणता?

बाकी बोला

संजय क्षीरसागर's picture

17 Aug 2014 - 9:32 pm | संजय क्षीरसागर

जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मी थांबतो. पण जाताजाता थोडं स्पष्टीकरण :

सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने. माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती) देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का.

इतकं अवघड काहीही नाहीये.

आपण जन्मच घेतलेला नाही. जन्म-मृत्यू शरीराला आहे. आपण आत्ता, या क्षणी आणि सदैव विदेह आहोत. तस्मात, शरीराला राबवणार्‍या कष्टप्रद साधना निरुपयोगी आहेत.

मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही.

तुम्ही जी विपश्यना करतायं त्याचा प्रणेता बुद्ध, (आपल्या या) अवस्थेला शून्य म्हणतो. आणि तो माझाही अनुभव आहे. ती उघड, डोळ्यासमोर असलेली वस्तुस्थिती आहे. सत्य गुह्य नाही, प्रकट आहे. सत्य विषेश नाही, साधारण आहे.

त्यामुळे मंत्र किंवा जपापेक्षा विपश्यना निर्धोक आहे असं मी म्हटलंय.

आणि त्याही पुढे जाऊन, (यात कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही), ज्याच्याकडे समज आहे त्याला साधनेची आवश्यकताच नाही. ओशोंचं एक अफलातून वाक्य आहे : `समझ की कमी साधनासे पूरी करनी पडती है'

तस्मात, मी पदयात्रेच्या धाग्यावर म्हटलं होतं `साधना साधी आणि सोपी असावी'.

थोडक्यात, एकतर साधनेची आवश्यकताच नाही पण करत असाल तर भ्रमाकडे नेणारी किंवा शारीरिक अपाय करणारी नसावी.

विलासराव's picture

17 Aug 2014 - 11:42 pm | विलासराव

ओके.
चर्चा थांबवुयात.

संजय क्षीरसागर's picture

18 Aug 2014 - 12:07 am | संजय क्षीरसागर

*i-m_so_happy*

मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही.

अगदी अगदी.

रमण महर्षींना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, "सदेह मुक्ती आणि विदेह मुक्ती यातील फरक काय? माझ्या माहितीप्रमाणे जी व्यक्ती मृत्यूनंतर मुक्त होतो तो विदेह मुक्त आणि जो सदेह मुक्ती पावतो ती सदेह मुक्ती."
रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."

मुक्त होता परि बळे झाला बद्ध| माझे, माझे म्हणोनिया || ;)

धन्या's picture

18 Aug 2014 - 12:55 pm | धन्या

एक्ग्झॅक्टली !!!

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2014 - 1:10 pm | प्रसाद गोडबोले

आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा

मी पण मी पण ब्यॅटींग करणार...

अहं निर्विकल्पो निराकाररूपः, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."

...आणि जटील साधना (उदाहरणार्थ नसलेल्या देवाचा अजपा, यज्ञ-याग, कष्टप्रद व्रतवैकल्ये, अनुष्ठानं, काल्पनिक ईश्वरप्राप्तीसाठी केलेल्या पदयात्रा किंवा परिक्रमा), भ्रम दूर करण्याऐवजी सघन करतात, इतकंच (केव्हापासनं) सांगतोयं!

अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत ना हो ते....

आध्यात्मिक लोकशाही आहे, त्यात वेगळे मार्ग आहेत, लोकांनी त्यांच्या कुवती नुसार ते मार्ग वापरण्याची मुभा आहे, ह्या गोष्टींचा वापर करायला काय हरकत आहे तुमची? का बाकी सगळे यडे आणि ....?

संजय क्षीरसागर's picture

18 Aug 2014 - 2:34 pm | संजय क्षीरसागर

आणि तुमच्याशी प्रश्नोत्तरात मला सुतराम रस नाही.

अर्थात, आता तुम्ही उसळलाच आहात तर किमान इतकं तरी लक्षात यायला हरकत नव्हती :

मी म्हणतो म्हणून कुणीही कुठलीही साधना थांबवणार नाही त्यामुळे तुम्ही तापून उपयोग नाही. तुम्ही तुमची साधना जोमानं चालू ठेवा आणि आपण वेडे का शहाणे ते तुम्हीच ठरवा.

माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील.

प्यारे१'s picture

18 Aug 2014 - 2:53 pm | प्यारे१

>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील.

विचार तुमचे म्हणून चांगले की विचार चांगले म्हणून तुम्ही घेतलेत हे एकदा स्पष्ट करा बरं.

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2014 - 12:35 pm | श्रीगुरुजी

>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील.

मूपक

*DANCE*

*YAHOO*

मूकवाचक's picture

18 Aug 2014 - 2:45 pm | मूकवाचक

रमण महर्षींचे मत लवचिक आणि सर्वसमावेशकच होते. असो.

In response to questions on self-liberation and the classic texts on Yoga and
Vedanta, Ramana recommended self-enquiry as the principal way to awaken to the "I-I",realise the Self and attain liberation. He also recommended Bhakti, and gave his approval to a variety of paths and practices.

संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Ramana_Maharshi

प्यारे१'s picture

16 Aug 2014 - 4:12 pm | प्यारे१

आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा.

असो. आता आम्ही काळजी घेऊ. :)

विलासराव's picture

16 Aug 2014 - 5:13 pm | विलासराव

आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा.

तो त्यांचा दृष्टीकोन. माझा मी वारंवार लिहीलाय.

असो. आता आम्ही काळजी घेऊ. Smile

अवश्य.

विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा

हा मुद्दा ओढुन तानुन उपस्थीत केलाय. आता खेचायचच असेल तर

गांधीजींचा जिव गेलायच ना? मग इथेच मिपावर त्यासंबंधात काय लिहीलं गेलंय?
दोन्हीही बाजुने.

माझा उद्देश तो नव्हता.ध्वनीत असेल तर धागा उडवावा हेही लिहीलय.

हेही पटत नसेल तर आनी जीवाची खरच तळमळ वाटत असेल तर मला वाचवा.
विशेषतः जेव्हा मला काहीही झालेलं नाहि असं मी म्हणतोय तरी.

मला काहीही झालेलं नाहि हे म्हणतोय हाच माझा भ्रम आहे असे वाटत असेल तर मी लालबागला रहातोय.
कुठल्याही हॉस्पीटलला मी यायला तयार आहे, पण मी बील भरू शकणार नाही.

मी फक्त विलासराव साई एवधच प्रकरण पाहीलय त्यात.

मी सर्वज्ञ नाही याची मला पुरेपुर जाण आहे पन ईथे कोणी दुसरं सर्वज्ञ आहे असे मला वातत नाही.

माझं मत = जे अनुकुल ते अनुकुल= जे प्रतिकुल ते प्रतिकुल= जे तटस्थ ते तटस्थ.

कुणाची संख्या किती हे मी पहात नाही.

आता तर हा धागा लिहुन मी संसदेत आहे की काय असंच वाटायला लागलय मला.

माझ्या बाजुने पुर्णविराम.

प्यारे१'s picture

16 Aug 2014 - 6:07 pm | प्यारे१

हम्म्म!

ठीके. इस बात पे मिट्टी डालते है|

असंका's picture

17 Aug 2014 - 10:19 pm | असंका

याचा काय अर्थ आहे?

अभ्यास वाढवावा ही नम्र विनंती.

मी कालपासून काम धाम सोडून अभ्यासच करतो आहे. जवळ जवळ आठ दहा धागे प्रतिसादांसकट चार पाच वेळा वाचून झाले आहेत. साधारण अंदाज येत आहे पण नक्की काही कळत नाहिये! काही पॉइंटर देताल का?

असं करण्याची गरज नाही. कामधाम करा. अभ्यास करत बसू नका. कारण निष्पत्ती काही नाही.

(स्वगतः आता कामधाम करत अभ्यास वाढवा असं लिहायला हवं असं दिसतंय.)

विलासराव's picture

18 Aug 2014 - 3:13 pm | विलासराव

हा इन जनरल प्रतीसाद आहे. आवळेंना नाही.मुक्तीचे जाणकार इथे हजर होउन लिहीते झाले त्याबद्द्ल अनेक आभार.
माझं मत एवढच जो काही बोध बुद्धाला, ओशोंना,रमन महर्षींना , तुकाराम महाराजांना झाला त्याने केवळ ते स्वतः मुक्त झाले. याबाबत कोण काय म्हणतय त्यातुन प्रेरणा मिळु शकते. बोध्/समज/ किंवा काहीही ही ज्याची त्याची त्यालाच व्हावा लागतो. कशा मार्गाने त्यावर माझा काही फार अभ्यास नाही. मला एक मार्ग माहीती झाला त्यावर मि चालतोय.खरतर वाचन आहे पण अनुभव नाही त्यामुळे पास. पण माझाच मार्ग खरा, मलाच सर्व कळतेय हे असे जे काही प्रतिसाद आहेत ते सर्व मुक्त लोकांचे असु शकत नाहीत मग तो कुणीही असो. मुक्तीच्या दुसर्याच्या अनुभवाच्या वाचनाच्या अभ्यासातुन ते आलेले आहेत. हे निरीक्षण( माझ्या अभ्यासातुन) नोंदवतो.

पण जो कुणी अंतीम मुक्ती मिळवील तो करुनेने ती कशी मीळवायची हेच लोकांना शिकवील.परोपकार हेच त्याचे जिवनभाष्य असेल परपीडा ती कितीही सुक्ष्म का असेना तो ती करुच शकणार नाही.. वितंडवाद किंवा मीच कसा मुक्त असा वाद (सुर) तो कधीही घालनार नाही. त्याला पोटापाण्याच्या उद्योगाची किंवा कूठल्याही घरादाराची( थोडक्यात सुरक्षीततेची) गरज उरणार नाही. तो फक्त आनी फक्त जनसेवा करत राहील असे माझे वाचन सांगते. दावा कुठलाही नाही कारण ते वाचनच आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Aug 2014 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

साईराम साईराम जय साईराम, शिर्डीवाले तुझको प्रणाम

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2014 - 12:09 am | प्रसाद गोडबोले

चान चान .

अध्यात्मिक उन्नतीसाठी सुबेच्चा !
------------------------------
अवांतर त्या गुप्तकाशीतील योग्यांच्या लिन्कारुन आठवले http://www.misalpav.com/node/21802 ह्या लेखात ज्या साधुबाबा ची चित्रे दिली आहेत त्याला भिमाशंकरला पाहिल्या सारखे वाटते !

सूड's picture

18 Aug 2014 - 2:54 pm | सूड

काय्येक कळ्ळं नाय !!

स्पा's picture

18 Aug 2014 - 3:23 pm | स्पा

सूड सरांशी तीव्र सहमत

इरसाल's picture

18 Aug 2014 - 3:56 pm | इरसाल

अजुन एक अपुरं वर्तुळ पुर्ण होवु पहातय !

सस्नेह's picture

18 Aug 2014 - 6:01 pm | सस्नेह

इरसालबुवा, तुम्हीपण ...?

इरसाल's picture

19 Aug 2014 - 10:38 am | इरसाल

आम्हीपण म्हणजे आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे म्हटल....(इरसालबुवांनी शर्टाची कॉलर नाकात सुरळी करुन घालत म्हटलं) पण अस करताना इरसाल बुवाच उजव्या सोंडेचे गणपती वाटत होते (इति पुलंच्या एका कथानकातुन साभार.......भेंडी)

बॅटमॅन's picture

19 Aug 2014 - 1:09 pm | बॅटमॅन

त्यावरून हा अप्रतिम लेख आठवला.

http://www.misalpav.com/node/15353

विलासराव's picture

19 Aug 2014 - 1:27 pm | विलासराव

मस्त धागा आहे तो. आजच पाहीला बॉ. आजकाल हा परा असत कुठे.

यशोधरा's picture

18 Aug 2014 - 6:09 pm | यशोधरा

पाचेक वर्तुळं झाली की ऑलिंपिकवाला लोगो होईल!

आदूबाळ's picture

18 Aug 2014 - 6:18 pm | आदूबाळ

किंवा "आवडी"चा

आवडीच्या लोगोत चार असत्यात !!

आदूबाळ's picture

18 Aug 2014 - 6:22 pm | आदूबाळ

बरोब्र!

इरसाल's picture

19 Aug 2014 - 10:39 am | इरसाल

त्रिकोणवाले एक वर्तुळ नाय चालणार ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे वर्तुळ नै हो !

ही स्पायरल आहे... अवकाशातल्या गॅलॅक्सीसारखी बाहेरच्या दिशेने अनंत कालासाठी उलगडत जाणारी... एक टोक दुसर्‍याला शिवायचा चानसच नाय !

पण गॅलॅक्सीसारखीच बघायला लय भारी वाटते खरी ! :) ;)

सस्नेह's picture

19 Aug 2014 - 4:08 pm | सस्नेह

टाका की राव, ग्याल्याक्षीचा.
गेल्या साली गेला होता ना तुम्ही ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2014 - 4:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं!

फोटू, फोटू... तर हे घ्या फोटू त्या ग्याल्याक्षींचे...

Messier51 sRGB

.

Seyfert Sextet Complex
Seyfert Sextet Complex

आणि हा पण एक अजून...


नोकियांचा ग्याल्याक्षी ग्रँडचा ह्यांची ग्याल्याक्षी आमच्या घराजवळंच हाय बगा ! :) ;)

प्यारे१'s picture

19 Aug 2014 - 5:00 pm | प्यारे१

ओ आप्पा,
ते शाम्शूम हाय शाम्शूम. आपके प्रतिसाद को 'नो'-किया गया है ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2014 - 8:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

राईट्ट, राईट्ट... शाम्शूमच हाय. थोडा फिर्नेको जानेका था. उस गडबडमे गल्तीसे मिष्टेक हुवा ! :)

विलासराव's picture

19 Aug 2014 - 9:02 pm | विलासराव

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं!

मला वाटलं मला एकट्यालाच फिरता येतय ब्रम्हांडामधे.
एक्कासाहेब तर छुपे रुस्तम निघाले.
कधी ना कधी भेट होइलच तिकडे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2014 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव... पृथ्वीवर कधीमधी असतो झालं :) ;) या मिपावर्च्या लोकान्ला आजाबात सान्गू नका... नायतर कायबाय प्रतिसाद टाकत्याल ;)

नक्की भेटू. IC 1101 कशी वाततेय ? तिथेच कट्टा करू या :)

लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे !

संजय क्षीरसागर's picture

19 Aug 2014 - 11:52 pm | संजय क्षीरसागर

एरर का येतेयं पाहाणार का?

सूड's picture

20 Aug 2014 - 12:08 am | सूड

तुमची साधना कमी पडत असेल.

संजय क्षीरसागर's picture

20 Aug 2014 - 12:51 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

विलासराव's picture

20 Aug 2014 - 7:38 am | विलासराव

सही जवाब

+१११११११११

विलासराव's picture

20 Aug 2014 - 7:48 am | विलासराव

>>>>>>लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे !

घाई काय आहे? चिंता कसली? होउद्या नष्ट. जो उत्पन्न होता है वो नष्ट होणे के लिये,नष्ट होके खतम नही होता फिर उत्पन्न होता है, ऐसेही हे भवसंसार चलता है. बोले तो परीवर्तन ही संसार का नियम है ना!!!!!!!!!

>>>>>नक्की भेटू.

तथास्तु!!!!!!

>>>>>IC 1101 कशी वाटतेय ? तिथेच कट्टा करू या

कट्टा करण्याशी मतलब. IC 1101 किंवा कुठेही. ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत.
संक्षी बरोबर आहे का?

संजय क्षीरसागर's picture

20 Aug 2014 - 9:55 am | संजय क्षीरसागर

आपण कुठे जाणार? स्वरुप तर कायम आहे. पण ते एक आहे, कट्टा कुणासोबत करणार?

विलासराव's picture

20 Aug 2014 - 10:15 am | विलासराव

आपल्याबरोबरच म्हन्जे स्वरुपासोबत आणी तेही शक्य नसेल तर राहीलं बॉ.

संजय क्षीरसागर's picture

20 Aug 2014 - 10:34 am | संजय क्षीरसागर

कट्टा कसा होणार? शिवाय स्वरुप अचल आहे त्यामुळे त्याला गंतव्य नाही. आणि त्याही पुढे जाऊन, स्वरुप नाही अशी जागाच नाही, तर ठिकाण कसं ठरणार?

आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे आणि ज्यांना कळावंस वाटतंय त्यांना पर्वणी!

विलासराव's picture

20 Aug 2014 - 10:54 am | विलासराव

आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे

सहमत. मीही यातलाच. फरक एवढाच की मला स्वरुप म्हणजे काय हे वाचुन माहीती आहे,

प्रचीती

नाही.

त्यासाठी माझ्या समजेप्रमाणे प्रयत्न चालु आहेत. तरीही येइल किंवा नाही याची चिंता मी करत बसत नाही.
कारण ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल हे मला मान्य आहे.