हे शाश्वत ज्ञान नव्हे !
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका. थोडा वेळ चौर्यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
In reply to ते यनावाला ते हेच का? तुम्ही by शिल्पा ब
ते यनावाला ते हेच का?ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.मिपावर जवळपास साडे-तीन वर्ष काढूनही तुम्हालाही हा प्रश्न पडावा ना. असोच.
In reply to इथे यादी मिळेल.www.yumtimes by ग्रेटथिन्कर
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
In reply to आभारी आहे. by ग्रेटथिन्कर
In reply to अरे वा by अनिरुद्ध प
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
In reply to . by उद्दाम
In reply to ? by मुक्त विहारि
In reply to जाऊ द्या by अनिरुद्ध प
In reply to सकारात्मक बदल by मुक्त विहारि
In reply to एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं by धन्या
In reply to सकारात्मक बदल by मुक्त विहारि
In reply to जाऊ द्या by अनिरुद्ध प
In reply to मी माणुस नाही ,मी गाढव आहे. by ग्रेटथिन्कर
In reply to हा धागा अध्यात्म आणि विज्ञान by धन्या
या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.हायला, ह्ये म्हंजे माझ्यावर अन्याय आहे. आता ह्याची दाद कोणाकडे मागा़यची? संमंकडे गेलो असतो पण तेही कंपुबाजांना मदत करतात असा 'विद्युत' वेगाने साक्षात्कार करुन दिला गेल्याने तोही मार्ग बंद. च्यामारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली ही तर :( - (अन्यायग्रस्त) सोकाजी
In reply to या सोत्रींना काम नव्हतं. by सोत्रि
In reply to हा धागा अध्यात्म आणि विज्ञान by धन्या
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
In reply to अहाहा! by पैसा
पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर.यनावाला ही यांची जालीय आयडि. यांच्या लेखनाशी परिचय असल्यावर हे शंभर टक्के उपहासच आहे, हे तुमच्या चटकन लक्षात यायला हवे होते. उपक्रमावर यनावालांचे भरपूर लेख होते.
In reply to बाकी प्रतिसाद नंतर वाचतो, by आनंदी गोपाळ
In reply to अंधश्रद्धा निर्मूलनाच्या by प्रकाश घाटपांडे
यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.माझा या मताला आक्षेप आहे. त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. रच्याकने काका तुम्हाला भेटायचं आहे. कधी जमू शकेल?
In reply to यनावालांच्या पत्रा ठासून by धन्या
त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही.हे बरोबर आहे. माझी बायको देखील हे पत्र वाचल्यावर चक्रावली. तिने अगोदरचे यनावालांचे सगुण निर्गुण मधील लेख वाचलेले असुन सुद्धा! मला जाणकार म्हणजे यनावालांच्या लेखनाला जाणणारा अशा अर्थाने म्हणा्यच होत. बाकी कवा बी! भेटू तुपल्याला सुटी आसन तव्हा!
अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.अश्या गोष्टी सांगता आल्या असत्या तर त्याला 'आत्मज्ञान' म्हणायची गरजच काय होती? स्वतच स्वताला स्वताबद्दल झालेलं ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणतात . त्यालाच मुक्ती, मोक्ष , आत्मसाक्षात्कार , ईश्वर साक्षात्कार असा म्हणतात . आत्मज्ञान हे कोणीही कोणालाही सांगू, देवू शकत नाही ते आपल आपल्यालाच मिळवाव लागत . ते मिळवण्याचा फक्त मार्ग दाखवता येतो. दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर) वरील वाक्य तुम्हांला नहि. टवाळ खोरांसाठी अहे.
In reply to @धन्या - by म्हैस
In reply to @धन्या - by म्हैस
In reply to ज्ञान वाटल्याने वाढते असा by बलि
जे जे आपणांसी ठावे । ते ते दुसऱ्यांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन ।।हे समर्थांचे वचन फक्त दासबोधाचे पारायण करताना वाचायचे असते. आचरणात आणायलाच हवे असे काही नाही.
In reply to बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही by धन्या
In reply to @धन्या - by म्हैस
दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर)जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२|| असं ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या पसायदानात म्हणतात. आता टींगळ टवाळी करणार्यांना जर हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं नाही तर त्यांच्या वाईट विचारांचा नाश होऊन त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होणार कसे?
हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!गीतेतल्या श्लोकाला बरोबर , चूक ठरवणारे आम्ही कोण? गीता हि काय एखादी कविता आहे का? आणि ती सांगणारा एखादा सामान्य मनुष्य आहे का?
In reply to हे तुमचं विवेचन म्हणजे by म्हैस
In reply to गीता बाली आणि कविता by ग्रेटथिन्कर
In reply to त्या आध्यात्मिक आहेत का? by अत्रुप्त आत्मा
In reply to हे तुमचं विवेचन म्हणजे by म्हैस
गीता हि काय एखादी कविता आहे का?तांत्रिकदृष्ट्या उत्तर हो असंच आहे. गीता ही महाभारत या महाकाव्याचा भीष्मपर्वातील भाग आहे. त्यामुळे गीता या भागाला महाकाव्याच्या छोटया भागाला काव्य किंवा कविता नक्कीच म्हणता येईल.
In reply to गीता बाली आणि कविता कृष्णमुर्ती- समर्थ रामदास --- by संजय क्षीरसागर
In reply to आताशी by इरसाल
In reply to काय ठरलं? by प्यारे१
In reply to काय ठरलं? by प्यारे१
In reply to ....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च by मोदक
In reply to अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ by प्यारे१
In reply to मी म्हणतो आहे ना माझा by मोदक
In reply to अरे हो! बॅट तुझी नसली तरी by प्यारे१
In reply to एखादा खेळ आवडत नाही म्हणून by मोदक
In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
जल्ला इषय काय होता?
परंपरा प्यारे.. परंपरा.
(येथे टुक्कार कखुकग मधल्या अतीटुक्कार* ह्रितीक रोशन च्या आवाजाचा फील आणावा)
*हे ही मत प्यारेचेच!! ;-)In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
In reply to काय ओ? by पैसा
In reply to काय ठरलं? by प्यारे१
In reply to बाइज और एक्सट्रा रनो की वजह by अत्रुप्त आत्मा
ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?स्पष्टपणे सांगूनही तुमच्या डोक्यात अजून शिरलेलं दिसत नाहीये ज्ञानाचं प्रदर्शन न केल्याने ज्ञानी माणसाला काहीच फरक पडत नहि. त्यात नुकसान टवाळ खोरंचाच आहे . मी हे हि म्हणलाय कि ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवता येतो. तुम्हाला स्वताला काही करायला नको. फुकटात हवंय का सगळं . उदाहरण द्यायचं झालं तर : भर उन्हाळ्यात एखादा माणूस दमून येतो. त्याला तहान लागली अहे. घसा कोरडा पडला अहे. अश्यावेळी थंडगार पाणी प्यायल्यावर जी तृप्ती मिळते ती तुम्ही त्याला शब्दांमध्ये कितीही सांगितली तरी, जो पर्यंत तो स्वत पाणी पिवून तहान भागवत नाही तो पर्यंत त्याला समजणार आहे का? ज्ञानाचं असंच आहे . अजूनही शंका असतील तर आता एकच उपाय आहे . स्वतः ज्ञान मिळवायचं आणि चेक करायचं माझं म्हणण बरोबर आहे कि चुक.
In reply to दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) by प्रकाश घाटपांडे
ते यनावाला ते हेच का?