आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ
काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात
शोधात अशा मी प्रेमा तुझ्या
ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ?
ना कधी सोडून जाईन
ना अंतर तुला मी देईन
वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द ,
नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ,
तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ
एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे
एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते
" काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य
अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य
पटेल तुला हे नक्की कधीतरी
तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी
-- प्रिया
प्रतिक्रिया
9 May 2013 - 10:59 pm | ढालगज भवानी
छान आहे. समोरच्या व्यक्तीला 'कमिटमेंट अँग्झायटी" असेल तर अशा भावना मनात येऊ शकतात.
12 May 2013 - 10:27 am | Bhagwanta Wayal
कविता छान आहे, आवडली...
12 May 2013 - 12:24 pm | संजय क्षीरसागर
इतकाच फरक करायचा आवकाश की झालं स्वामींच गाणं.
12 May 2013 - 3:25 pm | अभ्या..
वा वा. काय कविताय. मस्त एकदम.
लै म्हणजे लैच आवडली आहे. :)
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
12 May 2013 - 3:39 pm | चित्रगुप्त
...." काळजी करू नकोस , आहे मी " ....
यावरून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे" आठवले.
(स्वगतः हल्ली स्त्र्यायडी खरा की लटका हे कळेनासं झालंय)
12 May 2013 - 4:03 pm | संजय क्षीरसागर
हमारे खयाल कितने मिलतेजुलते है!
12 May 2013 - 4:14 pm | चित्रगुप्त
...पटेल तुला हे नक्की कधीतरी...
त्याला हे पटले की आम्हाला नक्की कळवा आणि पार्टीत बोलवा.