भारताने आपले सार्वभौमत्व गहाण टाकायचे ठरविल्यानातर त्याला कोण अडवू शकणार आहे. अणु करारात हेच होत आहे. सुरुवातीला भाजप विरोधात होते. पण या ना त्या कारणात अडकवून, कोन्ग्रेस नि त्यांना फोडून त्यांचे मन वळविले आणि अणु करार एकदाचा पदरात पडून घेण्याचे निश्चित केले.
अनु ऊर्जेपासून मिळणारी विजेबरोबर शेकडो संभाव्य धोके आहेत ज्यावर आजतागायत उपायच नाहीत व त्यातून पण हि वीज काही स्वस्तात पदरी पडणार नाहीये हे माहित असून सुद्धा सरकार हे करायला का धजावत आहे देव जाने.
अणू दुर्घटनेनंतरची भरपाई होणार तिप्पट
कोणी कितीही भलावान्या केल्या तरी ह्या बाबतीत सरकारला किती जाण आहे, सर्वांना माहीतच आहे.
सरकारने भोपाल दुर्घटना ज्या पद्धतीने हाताळली आहे त्यावरून सरकारला सामान्य जनतेच्या जीवाची किती काळजी आहे ते समजते. भविष्यातील अणु दुर्घटने समोर भोपाळ दुर्घटना एक अतिशय शुल्लक असेल इतका त्याचा विनाशकारी विध्वंस होऊ शकतो. देव ना करो जर काही दुर्घटना झालीच तर हजारो लोक क्षणात होरपळून नाहीसे होतील, लाखो कायमचे जायबंदी होतील, आणि पुढची लाखो वर्षे जैतापूर , रत्नागिरी सारखी नैसर्गिक वैभवशाली ठिकाणे एक स्मशान भूमी म्हणून ओळखली जातील.
उपकार केल्यासारखे नुकसान भरपायीत तिपटीने वाढ करून १५०० कोटी केली आहे.
सरकारला एकंच प्रशा विचारावासा वाटतो, महामार्गांचे budget सुद्धा शेकडो कोटीचे असते.
( परवा थत्ते काकांनी घेतलेल्या एक कौल घेतला, तित मध्ये सुद्धा त्यांना १३ हजार आणि १९ हजार कोटी हे आकडे वापरण्याचा मोह आवरला नाही ) तर ह्या अणु दुर्घटने पुढे १५०० कोटी कीस झाड कि पत्ती.
सरकार सुरक्षे विषयी जे काही सांगते आहे ते मागे (एक दोन महिन्यापूर्वी) झालेली किरणोत्सर दुर्घटना कशी हाताळली यावरून समजून येईल. भले त्या अणु प्रकल्प भारताला वीज देण्यास सक्षम असेलही, पण तो प्रकल चालविणारे जर योग्य खबरदारी घेणार नसतील तर पुन्हा एकदा ह्या देशाला एक अजून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. ते अतिरेकी , नक्षलि हमले हे त्याच्यापुढे कवडीमोल ठरतील.
जय भोपाळ प्रकल्प जर सरकार व्यवस्थित हाताळू शकले नाही तर सरकारला काय अधिकार आहे लाखो लोकांच्या जीवावर उठण्याचा ?
सुरक्षे विषयी एक (हास्यास्पद वाटणार) प्रश्न एका सदस्याने मनमोहन सिंग यांना केला होता.
"सुरक्षेविषयी तुमची जर खरच इतकी खात्री आहे तर एखाद्या प्रकल्पाच्या जवळ तुमचे घर बांधून तुम्ही तिकडे राहाल काय ?" मनमोहन सिंग यांनी शब्दछल करून वेळ मारून नेली पण उत्तर काही दिले नाही.
मला वाटते त्यांच्या उत्तरातच सगळं आले आहे. तरीसुद्धा ज्यांना हा प्रकल्प भारताच्या जिवापेक्षा जास्त मोलाचा वाटतो त्यांनी हा प्रश्न स्वताला विचारून पहावा. देश धोक्यात घालून मला वीज नको. त्यापेक्षा दिवसातून १२ तास अंधारात बसायला सुद्धा मी तयार आहे. जर वीज मिळविण्यासाठी खरच प्रयत्न करायचेच असतील तर पर्यावरण वाचून देखील खूप पर्याय आहेत. पण सरकारला अणु उर्जेच जी नशा चढली आहे ती उतरेल तर ना !
मग नंतर काही झाली कि १५०० कोटी, २० /२५ वर्षांनी अपंग लोकांच्या तोंडावर फेकून आम्ही किती देशाचे भले केले हे आवळायला कोन्ग्रेसी जन मोकळे.
ह्या विषयी पुण्यातील एका लोकायत नामक स्वयंसेवी संथेने जनजागृती सुरु केली आहे.मी सुद्धा त्यात भाग घेतला होता, आपणही घेऊन जनजागृती मध्ये सहकार्य करावे आणि पुढची पिढी दोषमुक्त / किरनोस्तार्गरहित वातावरणात जन्मास यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाचने
18618
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की कशावर राग आहे?
तुमच्या स्वताच्या जीवाची किंमत किती, त्याच्याशी ५ लाख ने गुणावे.
In reply to नक्की कशावर राग आहे? by ऋषिकेश
आंतर्र्राष्ट्रीय आणि फक्त नागरी...
In reply to तुमच्या स्वताच्या जीवाची किंमत किती, त्याच्याशी ५ लाख ने गुणावे. by गांधीवादी
वीजेची मोठी गरज भागवायला
अगदी खरे
In reply to वीजेची मोठी गरज भागवायला by Pain
Calendar of Nuclear Accidents and Events
In reply to अगदी खरे by हुप्प्या
थोडा सहमत आहे. लोकसंख्या,
In reply to Calendar of Nuclear Accidents and Events by गांधीवादी
थोडा सहमत आहे. लोकसंख्या,
In reply to Calendar of Nuclear Accidents and Events by गांधीवादी
३ माईल आयलंड
In reply to Calendar of Nuclear Accidents and Events by गांधीवादी
सध्याच्या -
अगोदर दोघांचे नुकसान समजावून घेऊ, मगच भरपाईची चर्चा करणे रास्त.
In reply to सध्याच्या - by विसुनाना
समजावून घेऊच
In reply to अगोदर दोघांचे नुकसान समजावून घेऊ, मगच भरपाईची चर्चा करणे रास्त. by गांधीवादी
दुर्घटना नाही झाली तरी कचरा स्वरुपात धोकादायक. झाली तर देवा तूच
In reply to समजावून घेऊच by विसुनाना
असो.असो.
In reply to दुर्घटना नाही झाली तरी कचरा स्वरुपात धोकादायक. झाली तर देवा तूच by गांधीवादी
लेख वाचुन
पण ह्याचा मूळ धाग्याशी संबंध काय ?
In reply to लेख वाचुन by वेताळ
वा!
In reply to पण ह्याचा मूळ धाग्याशी संबंध काय ? by गांधीवादी
नकारात्मक विचार
एक विचार.. बेजबाबदार
अनु कचरा विल्हेवाट लावायला १ लक्ष ते काही कोटी वर्षे लागतात.
In reply to एक विचार.. बेजबाबदार by अर्धवट
हम्म्म..
http://www.misalpav.com/node/
In reply to हम्म्म.. by भारतीय
>>चुलच बरी..वाहने बंद करून
थत्ते काका, अवकाशालाही थोडे
In reply to >>चुलच बरी..वाहने बंद करून by नितिन थत्ते
वा. उत्तम ललित लेखन.
+१
In reply to वा. उत्तम ललित लेखन. by राजेश घासकडवी
विवेक?
आधी
दोन्ही बाजू
उत्तम
In reply to दोन्ही बाजू by इन्द्र्राज पवार
न्युक्लियर ऊर्जा आणि बागुलबुवा
राज्/अर्थकारण !!
सदस्यांच्या मताचा आदर करून मी हि चर्चा माझ्यासाठी तरी थांबवितो.
असे नसावे.