शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती
न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती
धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी
अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई,
माझ्या कविता आणिक गाणी
शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट
उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट
ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ
पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ
दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला
अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला
असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती
बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती
-प्रदिप काळे.
माझा ब्लॉग: मुक्त कलंदर
प्रतिक्रिया
19 Mar 2017 - 11:30 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त !!
20 Mar 2017 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू मोड ऑन
ओके.
पांडू मोड ऑफ. ;)
21 Mar 2017 - 12:19 am | ज्योति अळवणी
आवडली
21 Mar 2017 - 8:59 am | Pradip kale
धन्यवाद.
21 Mar 2017 - 10:46 am | पुंबा
छान कविता.
21 Mar 2017 - 10:47 am | पुंबा
ब्लिस ऑफ सॉलिट्यूड.