पुन्हा झकीर नाईक

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
8 Jul 2016 - 12:53 am
गाभा: 

https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8

झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.

खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)

माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.

सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?

एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.

असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU

प्रतिक्रिया

सचु कुळकर्णी's picture

8 Jul 2016 - 1:01 am | सचु कुळकर्णी

आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही.

हुप्प्या भौ पुढे नाय वाचले. एक ठरवा काय ते मग बोलु.

हुप्प्या's picture

8 Jul 2016 - 2:28 am | हुप्प्या

एक ठरवले आहे की शुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य राबवण्याची भारत देशाची परंपराच नाही. आता बोला!

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 1:12 am | चंपाबाई

बापूजींची हत्या करणार्‍यानेही मी अमके तमके यांना गुरु मानतो असे सांगितले होते ना ?

खटपट्या's picture

8 Jul 2016 - 1:18 am | खटपट्या

और ये हो गयी बोनी...

हुप्प्या's picture

8 Jul 2016 - 2:27 am | हुप्प्या

१. सावरकरांवर रीतसर खटलाही भरला होता. कडव्या गांधीवाद्यांकडून त्यांच्या नातेवाईकांना मारहाणही झाली होती. झकीर नाईकांना तसे करावे असे सुचवताय का?

२ गांधींना मारणे हा दहशतवाद होता का? माझ्या मते नाही. ती एक ठरवून केलेली राजकीय हत्या होती. हातात पिस्तुल होते, अनेक नि:शस्त्र लोक जे गांधीचे भक्त म्हणजे नथुरामचे विरोधी होते. पण अन्य कुणालाही मारले नाही. ढाक्यात जे झाले तो शुद्ध दहशतवाद होता. त्या बेकरीत उपस्थित लोकांना केवळ मुस्लिम नाहीत, कुराण येत नाही म्हणून ठार केले गेले. गांधींना मारणे आणि हा प्रकार ह्यात आपणास फरक दिसत नाही का?

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 8:13 am | चंपाबाई

केवळ गुरु आहेत असे म्हटल्याने खटला झाला नव्हता. कटात सामील असण्याचा संशय होता म्हणुन खटला झाला होता.

....

गुरु मानणे व कटात सामीलही असणे / तसा संशय असणे यात फरक आहे न ?

हुप्प्या's picture

8 Jul 2016 - 11:04 am | हुप्प्या

१. गांधींना मारणे हा दहशतवाद नव्हता. गांधींना मारणे इतकाच मर्यादित हेतू ठेवून सगळी आखणी झाली होती. जगभरच्या अमुक एका विचाराला न मानणार्‍या मिळेल त्या व्यक्तीला कसेही करून ठार मारण्याचा हा जगत्व्यापी कट नव्हता. इथे म्हणजे ढाका, मदिना, अन्कारा, बगदाद ह्या विविध ठिकाणी तो तसा आहे असे दिसते आहे.
२. झकीर नाईकच्या जहाल विचारांचा प्रचार प्रचंड प्रमाणात होत आहे. प्रेक्षकांपैकी अगदी १ टक्का लोक माथे फिरून हिंसक कारवाया करु लागले तरी मोठे उत्पात होऊ शकतात. देशांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अशा विचारांचा प्रसार करु देण्याकरता भूमी, व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायला बहुसंख्य बिगरमुस्लिम असणारा देश बांधील आहे का?
३. वर्तमानकाळातील प्रत्येक घटनेला गांधीहत्येशी संबंध जोडून तिथे तसे घडले मग आता का नाही असे विचारणे हे आवश्यक आहे का? असे केल्याने वर्तमानकाळातील समस्या सोडवणे सोपे जाते का?
४. गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातील विशिष्ट गटाने तमाम ब्राह्मण घरात मारहाण, जाळपोळ, लुटालूट केली. कित्येक ब्राह्मण कुटुंबे बेघर होऊन देशोधडीला लागली. पोलिस व कायद्याने ब्राह्मण लोकांना वार्‍यावर सोडले होते. निदान ह्या गोष्टीचे वर्तमानकाळात वा भविष्यात कधीही अनुकरण होऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे.

सुबोध खरे's picture

8 Jul 2016 - 11:34 am | सुबोध खरे

हुप्प्या शेट
तुम्ही त्या मोगाच्या नादाला कुठे लागता?

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 4:30 pm | बोका-ए-आझम

हुप्प्याभौ, काही आयडींशी चर्चा करुन काहीही निष्पन्न होत नाही. मनस्ताप मात्र होतो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 10:39 am | खालीमुंडी पाताळधुंडी

दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच.
आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे??
दांभिक कुठचे

कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही.

संजय पाटील यांनी काढलेला धागा होता. आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की. लोक करतील चर्चा. बरं; दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही. मग तुम्हाला काही का वाटेना!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 5:30 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

कलबुर्गींच्या हत्येवर काथ्याकूट झालेला आहे.

हो झाला ना! तोंडदेखला निषेध नोंदवून आपला अजेंडा चालवणार-या बर्याच प्रतिक्रिया पाहिल्या.

तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही.

डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय??
एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?

आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की.

आमचे धागे उडवतात इथे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 5:32 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

दांभिकांच्या प्रतिक्रिया यामध्ये लगेच ओळखतात
http://www.misalpav.com/node/32592

त्याचं काय?

भोळा भाबडा's picture

8 Jul 2016 - 5:42 pm | भोळा भाबडा

इस्लामी कट्टरता आणि दहशतवाद याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण इथे कोणी मुसलमान नाहित कि जेणेकरून त्यांना समुपदेशन मिळेल,पण दभोलकर-पानसरे यांबद्दल चर्चा केली तर कायतरी उपयोग होईल,कारण इथे बरेच सनातनी आणि देवभोळे लोक आहेत त्यामुळे निदान चर्चा वाचून इथल्या पूर्णसंख्यांक हिंदूना समुपदेशन तरी मिळेल.

...याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण..

१) मंगळ अथवा शनी ग्रहावरील इथे कोणी नसले तरीही आम्ही मिपावर चर्चा करतो :), सभ्यतेच्या संकेतात आणि मिपाच्या धोरणात बसते तो पर्यंत मिपा एक चर्चामंच आहे सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्याच पाहीजेत.

२) मिपा हे आजच्या घडीला सर्वाधीक वाचले जाणारे मराठी चर्चामंच संस्थळ आहे, ज्या विषयाबद्दल हा धागा आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात राहते संस्था चालवते महाराष्ट्रातून प्रचार चालवते त्याच्या यथायोग्यते बद्दल मिपावर चर्चा होऊ नये ? कमाल आहे ? चर्चा न झाल्यामुळे अविश्वास पूर्वग्रह वाढले तर ते कुठल्या मंचावर हाताळले जाणार ?

३) आज सगळ्याच समुदायांची नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते आहे समुपदेशनही इंग्रजी भाषेतून अधिक श्रेयस्कर पण इंग्रजी भाषेत लिहिणारे समुपदेशनात यशस्वी झाले असते तर हा प्रश्नही उपस्थीत झाला नसता म्हणजे इंग्रजीतून चर्चा करणारे कुठेतरी कमी पडताहे म्हणून स्थानीय भाषेत चर्चा झाली तर त्यांना न जमलेल्या काही रचनात्मक बाजू मराठीतून पुढे येऊ शकतील असा विचार का करु नये ?

४) अमुकतमूक समुदाय महाराष्ट्रात कैक शतके राहतो आणि मराठी चर्चामंचावर नसतो याचा कार्यकारणभाव वेगळ्या चर्चेचा विषय आहे तुर्तास विषय काढलात तर लक्ष वेधतो

५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.

भोळा भाबडा's picture

8 Jul 2016 - 6:56 pm | भोळा भाबडा

५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.

किंचित असहमत,
मुद्दा दाबण्याचा काहीच हेतू नाही.
माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते.
सनातन वृत्ती,देवभोळेपणा,कर्मकांड इत्यादी गोष्टींवर चर्चा करणार-यांना इथे काय प्रतिष्ठा आहे ते आपणास माहित आहेच,सगळे कसे अंगावर धावून जातात?(उदा-यनावाला)
बाकि चर्चा दाबण्याची मनिषा नाही ओ साहेब.

माहितगार's picture

8 Jul 2016 - 7:42 pm | माहितगार

माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते.

मी आस्तीक नास्तीक ह्या धर्माची बाजू ते त्या धर्माची बाजू उजवी डावी बर्‍याच विषयांवर मी लेखन केले आहे, मी तटस्थपणे लेखन आणि सगळ्यांच्या योग्य बाजूला उचलतो आणि टिकाही करतो एकांगी लिहीत नाही याची माहिती झाली आहे ते सहसा माझ्या अंगावर धावून येत नाहीत. व्यक्तिगत टिकेसंबंधी आणि तार्कीक उणीव यूक्त लेखन होते -तार्कीक उणिवा दाखवून दिल्या की भागते- पण जगातली ९९ % लोक तर्कशुद्ध बुद्धी प्रामाण्यावर नाही भावनांवरच जगतात हे ही वास्तव नाही का ?

बाकी बुडा खाली अंधार हे वास्तव असले तरी बुड सोडून इतरत्र प्रकाश देण्याची क्षमताही असू शकते, सकारात्मकतेने पाहीले की सकारात्मक दिसते. दुसर्‍या धाग्यांवरचा राग या धाग्यावर येऊन काढण्यात इथल्या चर्चेत विषयांतर करणे हा सुद्धा तार्कीक उणीवेचा प्रकार आहे आणि आपण इतरांकडून तर्कपूर्णतेची अपेक्षा करतो तेव्हा तर नक्कीच टाळला पाहीजे किंवा कसे

भोळा भाबडा's picture

8 Jul 2016 - 8:20 pm | भोळा भाबडा

हम आपके मुरीद हुए।
संयत प्रतिसाद आवडला.

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 7:22 pm | बोका-ए-आझम

डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय??
एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?

तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे. डाॅ.तावडे पोलिसांच्या अटकेत आहेत. सारंग अकोलकर फरार आहेत. त्यावरून त्यांना दोषी मानायचं असेल तर तुम्ही खुशाल मानू शकता. इतरांनाही तसंच वाटावं अशी सक्ती करु शकत नाही.

आमचे धागे उडवतात इथे.

संपादकांना जे उडवण्याच्या लायकीचं वाटतं ते सगळं उडवलं जातं. तुम्हाला तुमचे धागे ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे वाटत असतील. संपादकांना वाटत नाहीत. साधी गोष्ट आहे.

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 7:38 pm | चंपाबाई

तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे..

......

जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?

जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?

अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.

जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?

अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 7:44 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तीन-तीन माणसे मारली राव!!
तुम्हाला काय हा योगायोग वाटतो काय?
बाकि तुम्ही याबाबतीत झापड ओढली आहे त्यामुळे
अधिक काय सांगणे.
सूज्ञांना माहित आहेच कोणती वृत्ती यास कारणीभूत आहे.

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 8:47 pm | चंपाबाई

माणसे नाईकसाहेबानी मारली ?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 8:50 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

आवं मी सनातन्यांबद्दल बोलत आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 8:54 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

चंपाबाई,

माणसे नाईकसाहेबानी मारली ?

त्याला साहेब म्हणायची गरज नाही.

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 11:06 pm | चंपाबाई

उसे श्री मत कहो !

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 9:02 pm | बोका-ए-आझम

त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. तरीही कोर्टात खटला चालवून, सर्व साक्षी-पुरावे तपासून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावर अपील करण्याचा आणि भारताच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा हक्कही देण्यात आला. या आरोपींनाही तो हक्क आहे आणि तुम्ही कितीही म्हणालात तरी जोपर्यंत कोर्टात या हत्या सनातन्यांनी केल्या आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही सनातन्यांच्या नावाने काहीही आरोप केलेत तरी त्याला काहीही अर्थ नाही. तुमच्याकडे जर त्याबद्दल माहिती असेल तर पोलिसांना का नेऊन देत नाही? सगळंच स्पष्ट होईल.

अनुप ढेरे's picture

8 Jul 2016 - 8:07 pm | अनुप ढेरे

झाकीर नाईकचे विचार/भाषणं गुन्हा आहे हे देखील अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही. म्हणून काय त्यावर मत प्रदर्शन करायचं नाही काय? बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही.

भोळा भाबडा's picture

8 Jul 2016 - 8:17 pm | भोळा भाबडा

बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही.
सहमत

असं अजून सिद्ध झालेलं नाही. मुळात त्यांना का मारण्यात आलं हेच अजूनही सिद्ध झालेलं नाही. वीरेंद्र तावड्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांत दाभोळकरांचा उल्लेख दानव का राक्षस असा केलेला होता. त्यावरून त्यांची हत्या सनातनच्या लोकांनी केलेली आहे हे सिद्ध होत नाही. शिवाय एखाद्या माणसाने हत्या केली म्हणजे तो ज्या संघटनांचा सदस्य आहे त्या सर्व गुन्हेगार किंवा दहशतवादी संघटना होत नाहीत.

अनुप ढेरे's picture

8 Jul 2016 - 9:18 pm | अनुप ढेरे

मी काही लगेच त्यांना शिक्षा द्या असं म्हणत नाहिये. कोर्टाची भांडणं वर्षानुवर्ष चालतील. पण सामान्य माणसाला मत बनवता येतं आणि ते खूप चुकीचं असतं असं नाही. तसं बघायला गेलं तर राजा/ कनिमोझी यांच्यावर देखील कोणतेही टू-जीमधले आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. पण तरीही सामान्य माणूस त्यांना भ्रष्टाचारी मानतोच. तसंच सनातन प्रभात बद्दल आहे.

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 9:41 pm | बोका-ए-आझम

आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेत निकाल लागायला वेळ लागतो आणि खटल्याला राजकीय रंग मिळाला की कुठलाही राजकीय पक्ष विधिनिषेध न बाळगता त्याचं भांडवल करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला हवा असलेला कुणी जर दोषी नसेल तर त्याला कोर्टाचा निर्णय पटत नाही. यातूनच कोर्टाबाहेर जाऊन न्याय मिळवायचे प्रयत्न सुरु होतात. नक्षलवादी असोत किंवा बजरंग दल - दोन्हीही लोकांना तारणहार वाटायला लागतात.हे दुष्टचक्र चालू राहतं.

अनुप ढेरे's picture

8 Jul 2016 - 10:10 pm | अनुप ढेरे

दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता. केवळ ते अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही म्हणून लोकांनी त्यावर मत बनवू नये असं नाही.

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 9:12 am | बोका-ए-आझम

दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता.

कशावरून धार्मिक दहशतवाद? तेच तर सिद्ध व्हायचंय. खून का झाला हेच अजून सिद्ध झालेलं नाहीये. सर्वजण त्यांच्या कार्यामुळे त्यांचा खून झाला असं म्हणताहेत. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी हे गेली अनेक वर्षे कार्यरत होते. आत्ताच त्यांचं कार्य लोकांना समजलं आणि त्यातून त्यांची हत्या झाली? काहीही असलं तरी ते न्यायालयापुढे आलेलं नाही. लोकांनी काहीही मत बनवू दे. तो त्यांचा हक्क आहे. पण न्यायालयात ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही.

अनुप ढेरे's picture

9 Jul 2016 - 2:06 pm | अनुप ढेरे

मी गुन्हा सिद्ध झालेला आहे असं म्हणालेलो नाहिच्चे. मत काय बनलं आहे तेच सांगतोय.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Jul 2016 - 9:41 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.आता सलमानचचं उदाहरण घ्या ना.
न्यायालयामध्ये देव आहे हे सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही,पण देव मानणारे किती प्रचंड संख्येने आहेत.

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 10:06 pm | बोका-ए-आझम

न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.

एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेवर टीका करणं हे नकारात्मक वृत्तीचं निदर्शक आहे, असं माझं मत आहे. एका मुस्लिम अतिरेक्यावरुन संपूर्ण मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे लोक आणि एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडणारे यांच्यात काहीही फरक नाही. आणि मुळात लोकशाही आहे तर न्यायव्यवस्था अशी होण्यात आपलाही सहभाग आहेच. फक्त घटनेने दिलेलं उच्चारस्वातंत्र्य पाहिजे आणि जबाबदारी घ्यायची नाही हा दुटप्पीपणा आहे. (व्यक्तिगत घेऊ नये.)

बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही

मोठ्ठ्ठा फरक आहे. झापडबंद असाल तर तो फरक लक्षात येणार नाही. पण नाहीतर ते लक्षात येणे सहज शक्य आहे.
दाभोळकर वा अन्य व्यक्तींना मारणारे मारेकरी हे फक्त त्या व्यक्तीला मारण्याचा कट करत होते आणि त्यांची सर्व योजना ही त्या दृष्टीने होती. ढाक्यात काय घडले? कुठल्याशा बेकरीत जायचे जिथे परदेशी व्यक्तींची गर्दी असते तिथे शस्त्रसज्ज होऊन जायचे. मग तिथे जो कुणी असेल त्यातील लोकांना ओलिस ठेवायचे. त्यातल्या कुराणातील आयते म्हणू शकणार्‍या लोकांना सोडून द्यायचे आणि बाकीच्यांना ठार करायचे. हा अत्यंत धर्माधिष्ठित, पिसाट, विध्वंसक, असहिष्णू बेत होता. त्यात एखाद्या व्यक्तीला मारणे हा उद्देश नसून मिळतील तितक्या लोकांना मारण्याचा एक घाऊक द्वेष होता.
कट करुन एका व्यक्तीला मारणे हे बेकायदा, मृत्युदंडाला पात्र असणारे कृत्य आहे. पण दहशतवाद हे त्याहूनही भयंकर आणि क्रूर कृत्य आहे. एखाद्या व्यक्तीला मारण्यामागे त्या व्यक्तीबद्दल रोष असतो. पण निव्वळ अमुक जागी उपस्थित आहे आणि इस्लामचा अनुयायी नाही म्हणून एखाद्याला मारणे ह्यात जी निर्घॄणता लागते ती एका व्यक्तीला कट करुन मारताना दिसत नाही. हा मोठा फरक लक्षात आणून दिलाच पाहिजे. जेवढे हाताला लागतील ते लोक मारायचे. मग त्यात वय, लिंग, स्वभाव काहीही न बघता ते पुरेसे इस्लामी आहेत की नाहीत ते जुजबी तपासून मग मारायचे हे कृत्य जास्त भीतीदायक आणि विध्वंसक आहे.
कलबुर्गी आणि दाभोळकर प्रकरणी फक्त त्या व्यक्तींनाच नुकसान झाले पण ढाक्यातील दहशतवादी प्रकारात कोण बळी जाईल किती बळी जातील ह्याचा काहीही भरवसा नाही. त्या दोन्ही प्रकारांना एका पारड्यात तोलणे उथळपणाचे आहे असे माझे मत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Jul 2016 - 5:14 pm | गॅरी ट्रुमन

त्या दोन्ही प्रकारांना एका पारड्यात तोलणे उथळपणाचे आहे असे माझे मत.

प्रचंड सहमत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Jul 2016 - 11:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

नीट समजावलेत :)
धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

11 Jul 2016 - 1:04 pm | मृत्युन्जय

अतिशय तीव्र सहमती. अगदी योग्य शब्दात मांडले आहे

दोन्ही गोष्टींमध्ये धार्मिक प्रेरणेने हत्या केलेया आहेत. धार्मिक भावनांचा/धर्माचा आधार घेऊन दहशत पसरवणं हे दोन्हीकडे कॉमन आहे. (बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!) सनातन प्रभात आदींना गंभीरपणे घेत नाहीत हे दुर्दैवी आहे.

मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.

मिहिर's picture

12 Jul 2016 - 1:11 am | मिहिर

मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.

+१

बॅटमॅन's picture

12 Jul 2016 - 1:12 am | बॅटमॅन

सहमत. उगा नको तिथे डिफेन्सिव्ह होऊ नये.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2016 - 3:58 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2016 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले

(बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!)

तथाकथित बाबरी मशीदीच्या जागी ११ व्या शतकातील मंदीर होते हे पुराव्याने शाबित झालेले आहे , तेही 'सेक्युलर' सरकारच्या काळात ! त्यामुळे बाबरी पाडणे हा दहशतवाद ठरत नाही, तो उशीराने झालेल्या न्याय ठरतो.

जर बाबरी पडणे हा दहशतवाद असेल तर शिवाजीमहाराजांनी दख्खन्मोहिमेत २-३ मशीदी ( की ज्या पुर्वाश्रमीमंदीरे असल्याचे खणखणीत पुरावे होते) पाडुन पुन्हा मंदिरे उभारली आहेत ह्याला काय म्हणाल ?

आणि हिंदुंनी कोणत्याही दुसर्‍या "धर्माच्या" विरुध्द "प्रो-अ‍ॅक्टीव्हली" हिंसा केल्याचे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही , तुम्हाला सापडले तर जरुर कळवा आम्हालाही , इथेच मिपावर वादावादीत वापरता येईल !!

हुप्प्या's picture

12 Jul 2016 - 9:43 pm | हुप्प्या

पुन्हा सांगतो: एका व्यक्तीची हत्या ही केवळ त्या व्यक्तीचे नुकसान करते. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ह्यांनी कुठल्यातरी विचारांनी धार्मिक लोकांशी संघर्ष सुरू केला होता. त्यातील माथेफिरु लोकांनी त्यांना संपवले. हे अर्थातच पूर्ण चुकीचे, फाशी द्यायच्या योग्यतेचे कृत्य होते. पण निदान ह्या बळी पडलेल्यांनी काही वादग्रस्त विचार मांडून त्या संघर्षाची पायाभरणी केली होती.

ढाक्याचे काय? तिथली ती बेकरी, तिथे उपस्थित असणारे तरिशी जैन सारखे लोक, कुणाच्या अध्यात ना मध्यात. कधी इस्लाम विरोधी विचार मांडलेले नाहीत काही नाहीत. केवळ अतिरेक्यांनी ती जागा निवडली म्हणून त्यांना बळी जावे लागले. त्यातील स्वैर, ताळतंत्र नसणारा हिंसाचार, कुणाचाही बळी घेऊ शकणारा हिंसाचार हा जास्त घातक आहे.

दोन मोठे फरक म्हणजे आकड्यातला फरक, एक व्यक्ती विरुद्ध अनेक व्यक्ती बळी जाणे. पहिल्या बाबतीत निदान थोडी कुणकुण लागली असणे आणि कुठलाही मागमूस लागू न देता घडवून आणलेला हिंसाचार हे दुसरे टोक.

जर सरकार सजग असते आणि दाभोळकरांसारख्या लोकांना २४ तास संरक्षण देत असते तर त्या घटना टळू शकल्या असत्या. भविष्यात टळू शकतील. पण ढाक्यातील अतिरेकी घटनांसारख्या घटना टाळणे अशक्य आहे. एक तर ते अतिरेकी त्या घटनेपर्यंत अतिरेकी आहेत हेच माहित नव्हते. आणि जिथे ती घटना घडली तिथे अशी काही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे एक समाज म्हणून इस्लामी दहशतवाद मला जास्त धोकादायक वाटतो. मी कुठल्याही धर्माच्या अध्यात वा मध्यात नसलो तरी इस्लामी अतिरेकाचा बळी मी ठरणारच नाही अशी खात्री नाही. उलट सनातनकडून मला धोका नाही असे वाटते. बहुतांश समाज हा मध्यममार्गी असतो आणि त्याच्या दृष्टीने ढाक्यात घडले ते जास्त नुकसान करणारे आहे.

बोका-ए-आझम's picture

12 Jul 2016 - 10:47 pm | बोका-ए-आझम

मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.

माॅडरेट मुस्लिम हे अमेरिका जसं good Taliban आणि bad Taliban म्हणते तसं मृगजळ आहे. आणि हिंदू धर्मात मूलतत्ववाद येणं मला तरी शक्य वाटत नाही. इस्लामप्रमाणे हिंदू धर्म हा काही पुस्तक किंवा प्रेषित यांच्यावर आधारित धर्म नाही. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो. तसा पूर्णपणे नास्तिक मुस्लिम असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कमी कडवा किंवा कमी कट्टर मुस्लिम असू शकतो, पण moderate किंवा liberal हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो तसा मुस्लिम असणं शक्य नाही. आणि त्याबद्दल तक्रारही नाही, किंवा त्यात नकारात्मक असं काही आहे असंही नाही. पण उगीचच moderate मुस्लिम वगैरे अस्तित्वात नसलेल्या किंवा शक्य नसलेल्या मृगजळी संकल्पनांच्या मागे लागणं व्यर्थ आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 8:05 am | कैलासवासी सोन्याबापु

त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो.

१. हिंदूधर्मात भौगोलिक विविधता आहे हे मान्य आहे

२. ब्लास्फेमी ही संकल्पना हिंदूधर्मात नाही हे जरा सोदोहारण स्पष्ट केलेत तर पुढे बोलता येईल

3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो हे मात्र मी अमान्य करतो

जवळपास सर्व इस्लामिक देशांत त्याबद्दल कमी-अधिक स्वरूपाच्या शिक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदेचा आरोप ठेवलेल्या एका स्त्रीला माफी देण्यासंदर्भात विधान केल्याबद्दल पाकिस्तानी पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्याही झालेली आहे. तसं हिंदू धर्मात अजिबात नाही. कुठल्याही हिंदू सुधारकाला ईश्वराचं अस्तित्व नाकारण्याबद्दल वाळीत टाकणं वगैरे प्रकार झालेले नाहीत. गोपाळराव आगरकरांना पुण्यातल्या ब्राम्हण समाजाने वाळीत टाकलं होतं आणि त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. पण त्यामागे आगरकरांच्या नास्तिक असण्याचा आणि ते उघडपणे जाहीर करण्याचा काहीही संबंध नव्हता. चार्वाकाचं जडवादी तत्वज्ञान, ज्यात भौतिक सुख सर्वश्रेष्ठ मानून पारलौकिक सुखाचा ध्यास घेण्याची खिल्ली उडवलेली आहे, भारतीय तत्वज्ञान परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे.
पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो कारण हिंदू असण्यासाठी माझी देवावर श्रद्धा असण्याची किंवा देव या संकल्पनेवर विश्वास असण्याची अजिबात गरज नाही. इस्लाममध्ये अल्लावर विश्वास न ठेवणारा हा सरळसरळ काफिर मानला जातो. मग भलेही तो दुस-या धर्मानुसार असलेल्या देवाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारा असला तरीही. हिंदू धर्मात असं काहीही नाही.

माहितगार's picture

13 Jul 2016 - 9:27 am | माहितगार

१. हिंदूधर्मात भौगोलिक विविधता आहे हे मान्य आहे

तुम्हाला काही वेगळे म्हणावयाचे आहे का ? एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति (ऋग्वेद १.६४.४६)– meaning wise people explain the same truth in different manners हे त्या शिवाय ज्ञान हे सर्व दिशांनी येऊ द्या म्हणणार्‍या धार्मिक संस्कृतीत तुम्हाला केवळ भौगोलीक विवीधताच आढळली ? इतर विवीधता आढळल्या नाहीत ?

बोका-ए-आझम's picture

13 Jul 2016 - 9:51 am | बोका-ए-आझम

बापूंनी भौगोलिक विविधता असा उल्लेख केलाय म्हणजे त्यांना फक्त तीच आढळली असं होत नाही असं मला वाटतं. त्यांनी बाकीच्या विविधतांचा उल्लेख केला नसेल.

सतिश गावडे's picture

13 Jul 2016 - 10:33 am | सतिश गावडे

3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो हे मात्र मी अमान्य करतो

नास्तिकांचा धर्म कल्पनेवर विश्वास असेल असे वाटत नाही. नास्तिक हिंदू हा केवळ जन्माने हिंदू असण्याची शक्यता जास्त आहे.

बोका-ए-आझम's picture

13 Jul 2016 - 11:47 am | बोका-ए-आझम

तेव्हा अनेक आचरणात्मक गोष्टी त्यात येतात. उदाहरणार्थ माणूस हिंदू म्हणून जन्मला असेल पण नंतर पूर्ण नास्तिक बनला असेल तरी त्याचे काही आचार-विचार हे हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू जीवनशैलीप्रमाणे असतील. उदाहरणार्थ तो/ती लग्न हिंदूधर्मीय जोडीदाराशी करतील, मुलांची नावं हिंदू धर्मानुसार (याचा अर्थ धार्मिक विधी करुन असा घेऊ नये) ठेवली जातील वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात जी अंगभूत सहिष्णुता आहे त्यानुसार असा माणूस दुस-यावर त्याचे विचार लादणार नाही. असा माणूस नास्तिक असला तरी तो हिंदू धर्माचं पालन करतो आहे. मग त्याचा देवावर विश्वास नसला तरी हरकत नाही. दुस-या शब्दांत सांगायचं तर - हिंदू धर्मात देव आणि धर्म या वेगवेगळ्या संकल्पना आहेत पण इस्लाममध्ये महंमद हा देवाचा प्रेषित मानलेला असल्यामुळे इस्लामवर विश्वास आणि देवावर विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत.

माहितगार's picture

13 Jul 2016 - 10:55 am | माहितगार

२. ब्लास्फेमी ही संकल्पना हिंदूधर्मात नाही हे जरा सोदोहारण स्पष्ट केलेत तर पुढे बोलता येईल.

कोणत्याही धर्मीयात उदात्तता आणि संकुचितता आढळून येतात तसे हिंदूतही होत असावे तरीही संकुचितता कुठे आढळलीच तर त्याचा हिंदूधर्मीय अध्यात्मिक पाया अत्यंत ढिसाळ असेल. याच कारण मोक्ष प्राप्ती हे सर्वोच्च उद्दीष्ट षड रिपूंचा त्याग करणे अनिवार्य होते त्यात मत्सर क्रोध यांचाही त्याग निरपवाद अनुस्यूत आहे.

संत एकनाथ काय म्हणतात बघा

निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान । हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥५१॥
ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां । तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥संदर्भ

हिंदू धर्मीय तत्वज्ञानांचा आधार असलेल्या षड्दर्शनातील काही दर्शने इश्वराचे अस्तीत्वच मानत नाहीत. -जे इश्वर मानतात ते इश्वरापर्यंत अनेक मार्गाने पोहोचतात, आई वडलांना गुरुला देशाला किंवा अजून कशाला तुम्ही ईश्वर मानले तर त्यास इश्वर निंदा असे गृहीत धरले जात नाही. शिवाय असंख्य वेळा ईश्वरावर भक्तगण आणि संतगण रागावलेले ही दाखवले आहेत, तर ऋषीमुनी इश्वराला माणसाप्रमाणे रागवून शापही देऊ शकत. एवढेच नाहीतर विघ्नकर्त्यांची पूजा देखील करण्याचे स्वातंत्र्य आहे.

पारंपारीक भारतीय परस्पर विचारांवर टिकेचे आणि मतभेद निराकारणाचे मुख्य साधन शास्त्रार्थ आहे. त्यात टिकाकरतानाही दुसर्‍याच्या (वैचारीक) निवडी बद्दल दुष्वास न करता आदर आणि सहिष्णूतेची भावना ठेवणे अभिप्रेत असे. फार फारतर इतर मतांवर पाखंडी (heresy) असल्याची टिका केली जाई अपवादात्मक संघर्षही होत असतील पण मुख्य भर इतरांच्या निवडी बद्दल आदर आणि दुष्वास टाळणे यावर असल्यामुळे गोष्टी विकोपाला जाणे अवघड असे एवढे करुन, न्याय करणे हे राजाचे कर्तव्य असे. इश्वर अथवा पावित्र्य निंदा आढळली तर कुणीही उठा आणि घ्या बदला असा इश्वरी आदेश हिंदू धर्मात दिसत नाही उलट बदल्याच्या भावनेचा त्याग (किमान थेअरीत तरी) सांगितला जातो.

अंशतः संदर्भ:
Why Hinduism never developed a concept of blasphemy

3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो

विवीध दर्शन तत्वज्ञांनाचा दाखला वर दिलाच आहे त्या शिवाय स्वामी विवेकानंदांचे नास्तिकांची बाजू घेणारे पुरेसे लेखन मी मिपावर पुर्विच्या धागा लेखातून उधृत केले आहे.

अर्थात मी जशी उदात्त बाजू मांडली तसे संकुचित आचार-विचारांचे प्रदर्शन करणारी हिंदू धर्मीय मंडळीही आढळतात ही खेदाची बाबही बर्‍याचदा समोर येऊ शकते ही मानवी मर्यादा हिंदू मानवांनाही लागू होत असावी.

विकास's picture

9 Jul 2016 - 1:22 am | विकास

दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच.
आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे?? दांभिक कुठचे

अहो "पाताळ धुंडणारे" दांभिक असतात...

हे घ्या दुवे...

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
अराजक
डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Jul 2016 - 9:22 am | खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्ही तीन लिंका दिल्या आहेत,आता दांभिकता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो.
श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता.
"अराजक" या धाग्यात सुद्धा काही प्रमाणात विषय सोडून
गरळ ओकलीच आहे.
"कलबुर्गींची हत्या" या धाग्यात प्रगो,तुडतुडी,काळा पहाड,यांचे प्रतिसाद तसेच इतरही सन्मानणीय आयडींचे प्रतिसाद पाहिल्यास दांभिकता काय असते ते लक्षात येईल.काहींनी यर हत्येचा निषेध पण नोंदवला नाही.

मृत्युन्जय's picture

11 Jul 2016 - 1:10 pm | मृत्युन्जय

श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता.

दाभोळकरांच्या धाग्यावर साळगावकरांना देखील श्रद्धांजली वाहणे ही मला वाटते एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. त्या संदर्भात म्रूगनयनी ने दिलेली खालील प्रतिक्रिया बोलकी आहे

'अंनिस" कार श्री. नरेन्द्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...
'कालनिर्णय' कार श्री. जयन्त सांळगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...

एक -महान ज्योतिष-अभ्यासक जयन्त साळगांवकर आणि दुसरे महान ज्योतिष विरोधक- नरेन्द्र दाभोळकर... यांचा दुर्दैवी मृत्यू एकाच दिवशी व्हावा.. हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!! .... ~*~*~*~

वेगळी विचारधारा असली तरीही साळगावकर काही दाभोळकरांचे शत्रू नव्हते. किंबहुना दोघे कदाचित एकमेकांच्या विरोधात उभे देखील ठाकले नसतील. असे असताना दोघांना एकाच धाग्यावर श्रद्धांजली वाहणे हा विरोधाभास असू शकतो पण म्हणुन तो खोडकरपणा आहे असे नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 6:43 am | कैलासवासी सोन्याबापु

तारेक फतेह ने भारी गेम केली ह्याची

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2016 - 2:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हिडियो आवडला.

-दिलीप बिरुटे

अत्रन्गि पाउस's picture

8 Jul 2016 - 8:38 am | अत्रन्गि पाउस

झकीर नाईक वाटतो तितका सोपा नाही. मुस्लिमेतर तत्वज्ञान सुद्धा तो मुखोद्गत ठेवतो आणि अतिशय मुद्देसूद बोलतो.
'विचारांचा मुकाबला विचारांनी' हे त्याच्याबाबत शक्य वाटते कारण तो मुसलमान धर्मतत्वांवर घेतलेले आक्षेप शांत पाने ऐकून घेऊन त्याचे खंडन तर करतोच पण वर चार गोष्टी अजून सुनावतो. त्यामुळे त्याच्याशी जाहीर वाद शक्य आहे पण त्यासाठी लागणारा व्यासंग, हजरजबाबीपणा आणि निर्भय वृत्ती हे जरुरीचे आहे.

त्याच्याशी वाद विवाद करण्याची संधी बहुधा सहज सुलभ असावी, कारण त्याच्या बर्याच सभा होतांना दिसताहेत.

ह्या माणसाचा वादातील पराभव पाहण्याची आत्यंतिक तळमळ आहे ...

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jul 2016 - 11:38 am | अनिरुद्ध.वैद्य

माणुस हुशार आहे.

भंकस बाबा's picture

10 Jul 2016 - 11:38 pm | भंकस बाबा

हा माणूस अजिबात हुशार नाही, धर्मवेड त्याच्या अंगी ठासुन भरले आहे.
त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप पहा , नुरा कुस्ती प्रमाणे असतात त्या, इथे फक्त हाच फर्क असतो की कुस्ती शेवटी नाइकच जिंकतो,
सलमान , शाहरुख़ , आमिर सिनेमात लंबेचवड़े डायलॉग मारतात म्हणुन ते काय हुशार झाले?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

11 Jul 2016 - 8:45 am | खालीमुंडी पाताळधुंडी

सलमान , शाहरुख़ , आमिर सिनेमात लंबेचवड़े डायलॉग मारतात म्हणुन ते काय हुशार झाले?

काय भंकस करताय?
तुम्हाला अॅक्टिंग येते का?
शाहरूखचं स्ट्रगल तुम्हाला माहित्ये का?
अमिरच्या समाजकार्याचा अभ्यास आहे का?किंवा तुम्ही समाजासाठी काय करता?
सलमानच्या बिइंग ह्युमन संस्थेबद्दल काही माहिती आहे का?
...
..
उगाच आपलं घेतली पाचची कि सुटला तर्राट...
स्वमतांध दांभिक कुठचे

भंकस बाबा's picture

11 Jul 2016 - 9:48 pm | भंकस बाबा

अगदीच खाली मुंडी आहात तुम्ही! तुम्ही या नटाचे pro आहात काय?
सलमानने लावलेले दिवे जगजाहिर आहेत.
आमिर खानचा दांभिकपणा सत्यमेव जयतेच्या वेळी लोकांनी अनुभवला आहे.
शाहरुखच्यां कोणत्या मेहनतीबद्दल बोलताय आपण? पेप्सी कंपनीच्या शीतपेयात किटकनाशके मिळाल्यावर ह्याची प्रतिक्रिया काय होती माहित आहे? किटकनाशके तर या देशाच्या पाण्यात आहेत, त्याला तुम्ही कंपनीचा दोष कसा मानणार्,
जौदे , ही गुणी बाळे तुम्हीच घेऊन नाचा डोक्यावर.
जकीर नाइकच्या क्लिप्स बघा, प्रश्न विचारण्यार्या माणसाच्या बाजूला ते दाढ़ीवाले कशाला उभे राहतात हो?
जसा काही तो पळून जानारा आहे, जवळजवळ 20/22 क्लिप पाहिल्या आहेत मी, एकाही वेळी त्याला अडचणीत आणनारा प्रश्न विचारण्यात आलेला नाही,

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2016 - 9:58 pm | कानडाऊ योगेशु

एकाही वेळी त्याला अडचणीत आणनारा प्रश्न विचारण्यात आलेला नाही

काही परदेशी विद्यापीठात लेक्चर देताना विचारले आहेत पण जेव्हा उत्तर गोत्यात आणणारे असेल तेव्हा चिडचिड करुन प्रश्न विचारणार्याच्या कुवतीबद्दलच प्रश्न्चिन्ह उभे करतो.पण ह्या माणसाचे पाठांतर थक्क करणारे आहे. मुस्लिम धर्मातला विवेकानंदांच्या जवळ्पास जाणारे व्यक्तिमत्व असल्याचा कधी कधी विचार येतो मनात.

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 10:11 pm | संदीप डांगे

नका हो विवेकानंदांचा अपमान करु...

त्याच्या पाठांतराबद्दल दोन शब्दः हे पाठांतर अचूक आहे ह्याची मला खात्री नाही. असले तरी तो जे इन्टरप्रीटेशन करतो त्यामुळे त्याच्या पाठांतराला शुन्य कींमत आहे.

मी जवळपास सर्व धर्मग्रंथांचे वाचन केले आहे, बहुतेक सर्व धर्मोपदेशकांचे संदेश वाचलेले आहेत. प्रत्येक जण एकाच एकमेव सत्याकडे वेगवेगळ्या भाषेत निर्देश करत आहेत असे जाणवायचे. विपश्यनेचा कोर्स केल्यावर ते कोणत्या सत्याकडे निर्देश करत आहेत त्याची जाणीव झाली. तुकाराम-ज्ञानोबांपासून, गुरुगोविंद सिंगापर्यंत, इव्हन मोहम्मद पैगंबरापर्यंत सर्व 'पोचलेले' लोक एकाच सत्याचा पुकारा करत आहेत हे जाणवले. त्यामुळे भाषा, दॄष्टांत, तळमळ वेगवेगळी भासत असली तरी ह्या सर्व महात्म्यांच्या संदेशात एकवाक्यता आहे याची जाणीव झाली. म्हणजेच त्या सर्वांच्या संदेशाचे अचूक इन्टरप्रिटेशन मी करु शकलो असे मला वाटले व तेच असीम शांतता देणारे आहे. त्यामुळे कोणत्याही दोन धर्मांच्या तात्विक-अध्यात्मिक वादात पडणे योग्य नाही याचीही समज आली. अशी समज झानाकडे अजिबात नाही हे कळल्यामुळे झानाच्या पाठांतराचे कवडीचेही कवतिक नाही.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2016 - 10:25 pm | कानडाऊ योगेशु

नका हो विवेकानंदांचा अपमान करु...

म्हणुनच जवळपास जाणारे असे म्हटले आहे. अर्थात ह्यामागेही एक कहाणी आहे. झा.काचे गुरु शेख अहमद दिदात ह्याने हा -कुराण च्या कुराण व सोबत बायबल ही मुखोद्गत करुन मिशनर्यांना त्यंच्याच धर्मातली वैगुण्ये वगैरे दाखवण्याचा प्रकार- सुरु केला. ह्यामागे ही तो कधीकाळी कुणा मिशनर्यांकडुन अपमानित झाला होता म्हणुन चाळीस वर्षे कम्पॅरिटीव स्टडी करुन मग खुलेआम आव्हान द्यायला सुरवात केली. झा.काने बाकीच्या धर्मांचाही पुस्तकी का होईना अभ्यास केला व जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्या त्या धर्मातील आदरणीय व्यक्तिमत्वांबद्दल काहीही हीन बोलायला कमी केले नाही. ह्या गुरु शिष्य जोडीसंबंधी वाचताना मला रामकृष्ण परमहंस व विवेकानंद ह्या गुरुशिष्य जोडी आठवली. परंतु हजारोंच्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्य तोंडावर चुकीचे/बरोबर संदर्भ आत्मविश्वासाने फेकुन त्यांना संमोहीत करणे हा प्रकार ही चकित करणारा आहे.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2016 - 10:31 pm | कानडाऊ योगेशु

त्याच्या पाठांतराबद्दल दोन शब्दः हे पाठांतर अचूक आहे ह्याची मला खात्री नाही. असले तरी तो जे इन्टरप्रीटेशन करतो त्यामुळे त्याच्या पाठांतराला शुन्य कींमत आहे.

मान्य.पण अडचण ही आहे कि त्याला समोरासमोर वादविवाद अजुन कोणी असे सिध्द अथवा म्हणुही शकले नाही. युटुय्ब वरचे जे दुवे आहेत झा.का च्या लेक्चर्सचे पोस्टमार्टेम करणारे ते सगळे त्याचे लेक्चर व्यवस्थित स्टडी करुन मग संदर्भ पडताळून केले गेलेले आहेत. कुराण मधील एक चूक दाखवा मी त्वरीत इस्लामचा त्याग करतो हे त्याचे आव्हान अजुनही कोणी घेऊ शकलेले नाही.

भंकस बाबा's picture

30 Jul 2016 - 9:04 am | भंकस बाबा

पुष्कळाणी देण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन पण आपल्याला कोंडीत पकडल्यावर झाक्या असा काही आक्रस्ताळीपणा दाखवतो की समोरचि आव्हान देणारी व्यक्ति गांगरुन जाते.
रच्याकने झाक्याला इस्लाममधेच पुष्कळसे विरोधक आहेत.त्याच्या मते मझार, दरगे हे गैर इस्लामिक आहेत.
तो मुसलमानाना तिथे जाण्यास मना करतो, आता हा मुद्दा घेऊन कोणी इस्लामिक स्कॉलर त्याच्याबरोबर वाद घालताना दिसला नाही. मला वाटते हाच मुद्दा घेऊन जर त्याला चेकाळवले तर त्याचा कलबुर्गी बनण्यास वेळ लागणार नाही, कारण इस्लाममधे ' आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास' अशी स्थिति आहे.

मार्मिक गोडसे's picture

11 Jul 2016 - 11:29 am | मार्मिक गोडसे

त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप पहा , नुरा कुस्ती प्रमाणे असतात त्या, इथे फक्त हाच फर्क असतो की कुस्ती शेवटी नाइकच जिंकतो,

नुरा कुस्ती ही उपमा मला आठवत नव्ह्ती म्हणून प्रतिसाद देत नव्हतो, योग्य उपमा दिली. हा माणूस मला अजिबात हुशार वाटत नाही.

हुप्प्या's picture

9 Jul 2016 - 1:23 am | हुप्प्या

https://www.youtube.com/watch?v=bk5q9TeGo14
ही क्लिप पहा. त्याच्या अथांग ज्ञानाची खोली फार नाही. थोडेसे खोलात शिरले तर ते लक्षात येते.
उदा. हिंदूंमधे मूर्तीपूजा वर्ज्य आहे हे सांगताना तो वेदांचा संदर्भ देतो. पण वेद हेच हिंदूंचे धर्मग्रंथ मानावेत असे कुठे म्हटले आहे? वेद हे कुराणाच्या पातळीवर न्यायचा प्रयत्न हास्यास्पद आहे. शिवाय वेदात इंद्र, वरूण, अग्नी असले आणखी कितीतरी देव आहेत त्यांच्या प्रार्थना आहेत त्यांचे काय? किती हिंदू लोक वेदांचे पारायण करतात? वेद हा माझ्या लेखी एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, चोखामेळा, नामदेव ह्या संतांनी सांगितलेला धर्म लोकांना जास्त समजतो आणि भावतो. ह्या प्रत्येक संताने सगुण उपासना म्हणजे मूर्तीपूजेला शिरोधार्य मानले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन अनेक अभंगातून आढळते. हे खरे हिंदू नाहीत का? झकीर नाईकच्या उथळ अभ्यासातून तसा निष्कर्ष निघत असेल पण तो सत्याला धरून नाही.

झकीर नाईकाला वादविवाद करण्याचे अनेक लोकांनी निमंत्रण दिले आहे पण तो त्यातून पळ काढतो.
http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaikp2.htm

तेव्हा हा माणूस वाटतो तितका विद्वान नाही. जर खुले व्यासपीठ असेल तर त्याचा विचारांनी पराभव करणे शक्य आहे. पण त्याच्या चॅनेलवर तसे स्वातंत्र्य नसते. त्याला वाटले तर तो त्याच्या गुंडांकरवी तुम्हाला हाकलून देऊ शकतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Jul 2016 - 9:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर

दिग्विजय सिंगाने झाकीर शांतीचा प्रसार करतो असे २०१२ साली म्हंटल्याचे स्मरते.

माहितगार's picture

8 Jul 2016 - 11:25 am | माहितगार

डिसक्लेमर : मी व्हिडीओ माध्यमे पाहणे आणि त्यावर भाष्य करणे खास करून लिखीत मजकूर नसताना सहसा (होताहोईतो) टाळतो त्यामुळे लेखात नमूद युट्युब्स अभ्यासल्या नाहीत.

* निसटत्या बाजू १

...पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही.

हा वाक्यांश केवळ अंशीक माहीतीच देत नाही का ? की लिहिण्याच्या घाईत शब्दांच्या निवडीत आणि वाक्य रचनेत तडजोड झाली आहे - आज पर्यंततरी माणसाने मनातल्या मनात काय विचार केला याचे स्वांतत्र्य सगळकडेच बर्‍यापैकी असावे- आपण कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्याबद्दल बोलता आहात- भारतीय राज्यघटने नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुलभूत अधिकार असला तरी ते अमर्याद नाही पण सर्वसाधारण पणे काही अपवादात्मक स्थिती सोडल्या तर ते अधिकतम असणे अभिप्रेत आहे किंवा कसे ? अर्थात हा संपूर्ण चित्राचा अंशिक भाग झाला. ते अधिकतम आहे का हा या समस्येतील वेगळ्या सविस्तर चर्चेचा पैलू आहे.

या चित्राचा दूसरा भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याला राज्यघटना आणि कायदेविषयक संरक्षण मिळाले तरीही ते अधिकतम वापरण्यातले, समाजाकडून / समुदायाकडून / धर्मसंस्था इत्यादीकडून उपस्थित केले जाणारे व्यावहारीक अडथळे, जसे की हितसंघर्ष असलेल्यांचे उत्पातमुल्य उच्चार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य निर्भेळपणे वापरण्यावर प्रत्यक्षात मर्यादा आणते. अर्थात असा उत्पातमुल्याचा दबाव असणे भारतीय राज्यघटनेस अभिप्रेत नसावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कसे.
इथे अमुकने तमुक केले, तिथे तडजोड केली तर इथे का नको असा पवित्रा घेतला जाताना दिसतो हि एक तार्कीक उणीव आहे एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नसते.

* माझे मत

माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही.

जवळपास सहमत आहे. इथे अडचण अशी असते की अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी करुन खंडन करु शकणार्‍यांची संख्या त्यांना उपलब्ध वेळ (आणि असे व्यक्त होण्यासाठी किमान स्वरुपाची सुरक्षा आणि वातावरण) कमी पडत असतात, साशंकीत तर्कांच्या मांडणीचे तर पर्वत उभे असतात मग त्यातील कोणते विचारांचे खंडन करावे याला प्राधान्य देण्याचाही प्रश्न येतो.

पण सर्वसाधारण्पणे व्यक्तीगत टिकेकडे लक्ष केंद्रीत न करता मुद्यांच्या खंडनाकडे लक्ष दिले तर वेळ अधिक वाचतो खंडन अधिक व्यवस्थीत होते. (पण प्रत्यक्षात नेमके उलट घडत असते, व्यक्तीगत टिकेस प्राधान्य देण्यात विचारातील तर्कदोषांकडे लक्ष्य वेधायचे राहून जाते - मग तर्कदुषित विचारांच्या मांडणीचा प्रभाव मागील पानावरुन पुढे चालू रहातो )

टोकाच्या विचांरांचे खंडन होऊन मिळत नाही आणि चुकीच्या विचारांनी कुणी प्रभावीत होऊन सामाजिक उपद्रव करत असेल तर तात्कालीक मर्यादीत बंधन घालण्यात काही चुकीचे नाही पण अभिव्यक्तीवरील बंधने कायमस्वरुपी न राहता खंडनावर भर दिला जावयास हवा. अभिव्यक्तीवर बंधन टाकताना अशी निर्मिती खंडनकरण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना खंडनासाठी उपलब्ध असावयास हवी आणि अशा कृतींचे समिक्षण झाल्या नंतर त्या नंतरच्या काळात -खरेतर बहुसंख्य साहित्य-कला-कृतींच्या प्रकाशनावर विरुद्ध बाजूच्या विचारांच्या मर्यादा आणि तर्कदोष दाखवणार्‍या मंतासहीत चे समिक्षण सोबत जोडणे बंधनकारक करुन साहित्य-कला-वैचारीक अभिव्यक्ती समाजापूढे उपलब्ध रहावयास हवी.

हुप्प्या's picture

9 Jul 2016 - 1:34 am | हुप्प्या

१. सॅटॅनिक व्हर्सेस : ह्यावर बंदी का घातली? केवळ मुस्लिम व्होटबँकेकरता. महंमदाला सैतानाने काही ओळी सांगितल्या आणि नंतर त्या ओळी कुराणातून वगळल्या अशी काही तरी गोष्ट आहे ज्यावर हे पुस्तक आधारलेले आहे. पण इराणमधे रश्दीविरुद्ध फतवा जाहीर होताच भारताने ह्यावर बंदी घातली.
२. निकाह हा सिनेमा तलाक तलाक तलाक ह्या नावाने प्रदर्शित होणार होता. पण मुस्लिम लोकांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. मग निर्माते बी आर चोप्रा ह्यांना त्याचे नाव बदलून निकाह ठेवावे लागले. त्रिवार तलाक म्हणून घटस्फोट देण्याला कायद्याची मान्यता आहे (अर्थात केवळ मुस्लिम पुरुषांना!) तरी सिनेमाला ते नाव द्यायला बंदी का?
३. लोकमतमधे पिगी बँकेवर आयसिसचा झेंडा छापला म्हणून दंगे झाले. कारण त्या आयसिसच्या "पवित्र इस्लामी" ध्वजावर अल्ला आणि मोहम्मदाचे नाव होते आणि ते डुकरावर (अगदी व्यंगचित्राद्वारेही) दाखवणे हे महापाप!

ह्या आणि अशा प्रसंगातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत मर्यादित आहे हे लक्षात येते. विशेषतः मुस्लिमांबाबत. हिंदूंच्या देवीदेवतांबाबत भारतीय सरकार जास्त सहनशील आहे. तसे असायला नको. सर्वांना सारखेच स्वातंत्र्य मिळायला हवे. ते एखाद्या गटाच्या उपद्रवमूल्याकडे बघून दिले जाता कामा नये.

माहितगार's picture

9 Jul 2016 - 1:57 am | माहितगार

याच उत्तर सरकार पेक्षा नरहर कुरुंदकरांकडे अधिक व्यवस्थीत असावे, 'स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते' संस्कृती विशीष्ट स्वातंत्र्य देणारी असेल तर तीच स्वाभाविक वाटते. पण त्यापुर्वी स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृद्धींगत करून ती सिद्ध करावी लागते.

हुप्प्या's picture

9 Jul 2016 - 2:33 am | हुप्प्या

एखादा गट (म्हणजे मुस्लिम धर्मीय लोक) हे कायमच खुट्ट झाले की आमच्या भावना दुखावतात अशी बोंब ठोकतात. प्रत्येक वेळीस अशा वृत्तीला खतपाणी घालून हे लोक कधी व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकतील ही आशा भाबडी आहे. उलट बाकी कुणाला काय बोलायचे ते बोला पण आमच्या धर्माला काही उलटसुलट बोलाल तर खबरदार! अशा प्रकारची वृत्ती जास्त बोकाळत आहे. आगीत तेल ओतून ती विझण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. अशाने स्वातंत्र्याचा कक्षाबिक्षा वद्धिंगत न होता जास्त आक्रसून जात आहेत हे उघड दिसते आहे.
चार्ली हेब्दो प्रकरण असो वा डॅनिश कार्टून, चेष्टा वा टिंगल केल्यावर त्याचे प्रत्युत्तर म्हणून जगभर होणारी हिंसा हे हल्लीच्या काळात मुस्लिमांबाबतच का होत आहे? हे स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृध्दिंगत होत असल्याचे लक्षण आहे का?

माहितगार's picture

9 Jul 2016 - 8:24 am | माहितगार

अर्ध उत्तर संदीप डांगेच्या खालच्या प्रतिसादातून आहे -यातील व्यक्तीपूजा प्रकारांच्या मर्यादांबद्दल समाजास सजग करणे महत्वाची पायरी असावी- आणि अर्धे उत्तर एम जे अकबरांच्या ब्रेक्झिट बद्दलच्या अलिकडील एका लेखात चपखल आले असावे - एम जे अकबर मंत्रिपदावर पोहोचल्यामुळे त्यांचे लेख गुगलणे अवघड झाले आहे. पण अतिरेक्यांचा सामना पोलीस दलांनी करणे जरूरी आहे तेथिल अपयशाचे खापर इतरत्र फोडून उपयोग नाही असा त्याचा मतितार्थ आहे.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 8:50 am | चंपाबाई

स्त्रीशिक्षण, विधवा विब्वाह , केशवपन, सतीबंदी , महिला पोटगी प्रॉपर्टी कायदे, जातीभेद निराकरण, गणपती आर्टिफिशियल ट्यांकमध्ये सोडणे... ... 'तुम्ही'देखील हे सहजपणाने स्वीकारलेले नाही. आधी प्रचंड विरोध करुन गोंगाट करुन नंतर हे स्वीकारले ना? आठवतय का , की सिलेक्टिव्ह अम्नेजिया झालाय?

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 8:59 am | बोका-ए-आझम

स्वीकारले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण मुस्लिमांनी अजूनही धर्मसुधारणा स्वीकारलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हमीद दलवाईंसारख्या सुधारकाला खुद्द त्यांच्या समाजात जी वागणूक मिळाली त्यावरून कळतंच. आजही केरळसारख्या राज्यांत अल्पवयीन किंवा नुकत्याच १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलीशी लग्न करणे आणि मग तिचा यथेच्छ उपभोग घेऊन तिला फोनवरून तलाक देऊन सोडून देणे असले प्रकार होतात. त्याला अरब निकाह म्हणतात. हे अजूनही -२१ व्या शतकात चालू आहे आणि अजूनही AIMPLB ला तलाकच्या नियमांना हात लावायची इच्छा नाही. हे कशाचं निदर्शक आहे? हिंदू निदान काळानुसार बदलले, मुस्लिम दुर्दैवाने काही अपवाद वगळता बदलायला तयार नाहीत याचंच ना?

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:43 am | चंपाबाई

दहा हजार वर्षांच्या हिंदू प्रथा अकबर औरंगजेब वगैरेनी केलेले कायदे , राजा राममोहन रॉय , फुले इ इ चे प्रयत्न , इंग्रजी कायदे व नंतर काँग्रेसची कारकिर्द इ प्रदीर्घ काळातील प्रयत्नानंतर हळूहळू संपल्या.

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 12:12 pm | बोका-ए-आझम

तुमचं इतिहासाचं अज्ञान अफाट आहे यात शंकाच नाही. औरंगजेबाच्या कायद्यांनी हिंदू प्रथा संपल्या? असो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या संपल्या. मुस्लिमांच्या अजून शिल्लक आहेत. दहा हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्मात सतीसारखी घाणेरडी प्रथा होती हे आज महत्त्वाचं नाही पण मुस्लिम धर्मात आजही कोणत्याही स्त्रीला तिचा पती तीन वेळा तलाक देऊन घराबाहेर काढू शकतो हा खरा प्रश्न आहे. आणि त्यातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा नाही हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 5:08 pm | चंपाबाई

सतीची प्रथा दहा हजार वर्षापुर्वी होती ? रमाबै माधवराउ बल्लाळ उर्फ पेशवे अश्मयुगात सती झाल्या की काय !
सतीविरुद्ध कायदे अकबर व औरंगजेबाने केले होते... पण त्याच्या पदरी हिंदू सरदार ढीगभर असल्याने त्याची अम्मल बजावणी करणं त्याना जमणार नव्हते.

नंतर सुरु होतो इंग्रजी काळ ... राजा राममोहन रॉय इ इ ... स्त्री शिक्षण इ इ


दहा हजार वर्षे सुरु असणार्‍या प्रथा संपायला तीनशे वर्षे लागली
!

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 8:42 pm | बोका-ए-आझम

सतीविरुद्ध कायदे अकबर व औरंगजेबाने केले होते... पण त्याच्या पदरी हिंदू सरदार ढीगभर असल्याने त्याची अम्मल बजावणी करणं त्याना जमणार नव्हते.

काय सांगता? त्यांचा व्यनि आलेला की काय? तुमच्या नक्की कुठल्या आयडीवर पाठवलेला होता त्यांनी? आणि औरंगजेबाने सतीविरुद्ध कायदा केला होता हे कशावरून? त्याला आणि अकबराला आणि त्याला कधीपासून त्याच्या पदरी असलेल्या हिंदू सरदारांची भीती वाटायला लागली? बरं, अकबराने कायदा केला होता मग औरंगजेबाने तो परत का केला म्हणे? मुघल दरबारातही फायली गहाळ व्हायच्या की काय? काहीही मनात येईल तो इतिहास सांगताय राव. अभ्यास वाढवा जरा.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:28 pm | चंपाबाई

Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46

https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice)

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:31 pm | चंपाबाई
बोका-ए-आझम's picture

10 Jul 2016 - 9:38 am | बोका-ए-आझम

त्यावर कोणीही जाऊन काहीही लिहू शकतो हे माहित आहे ना? विश्वासार्हता हा मुद्दा आहे. अकबराचं अस्सल फर्मान वगैरे आहे का? नाही ना? मग संपलं. मी उद्या विकीपिडियावर जाऊन सती ही प्रथाच नव्हती असं लिहू शकतो. त्याला काहीही अर्थ नाही. रच्याकने हा विकीवरचा लेख तुम्हीच लिहिला आहे का?

सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे केले होते ह्याचा अकबरनाम्यात उल्लेख आहे.
रच्याकने सतीप्रथा किमान दिड हजार वर्ष जुनी आहे. मौर्योत्तर काळानंतर जी कर्मकाण्डे हळूहळू सुरु झाली त्यातूनच कधीतरी ही प्रथा उगम पावली असावी. दक्ष राजा, सती, शंकर-वीरभद्र ही कथा किमान गुप्तकाळात जन्म पावलेली असावी. चालुक्यांनंतर ही प्रथा खूपच वेगाने पसरली.

ह. अ. भावे ह्याचं 'सतीप्रथेचा इतिहास' नामक एक पुस्तक आहे ( मी अजून वाचलं नाही ते) त्यात नक्कीच अधिक माहिती मिळेल.

सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे केले होते ह्याचा अकबरनाम्यात उल्लेख आहे.

असे कायदे कुणीही करेल. अंमलबजावणी केली होती का? हे महत्त्वाचं आहे. आणि मुळात अकबरनामा हा अकबराच्या भाटांनी त्याचं गुणगान करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ असेल तर त्यात ते काहीही लिहितील. ते खरं आहे कशावरून? हजार बखरींपेक्षा एक अस्सल कागदपत्र भारी असतं ना? मग कुठे आहे ते अस्सल कागदपत्र? राजा राममोहन राॅय यांच्या संवाद कौमुदी मध्ये जसे १८२९ मध्ये सतीप्रथा बेकायदेशीर ठरवल्याबद्दल तत्कालीन गव्हर्नर जनरल लाॅर्ड विल्यम बेंटिकचं अभिनंदन करणारी बातमी आहे आणि त्याचबरोबर सनातन्यांनी काढलेल्या चंद्रिका नावाच्या वृत्तपत्रात राॅय यांची निर्भर्त्सना करणारी आणि हा धर्मावर हल्ला असल्याची बातमी आहे आणि ही दोन्हीही वृत्तपत्रं ब्रिटिश म्युझियममध्ये उपलब्ध आहेत (मायक्रोफिल्म) - तसं काहीही इथे नाहीये.

प्रचेतस's picture

11 Jul 2016 - 2:29 pm | प्रचेतस

त्यात बहुधा सतीची एक केस दिलेली आहे.

अकबरनामा मजकडे संक्षिप्त स्वरूपात आहे. घरी गेल्यावर बघून सांगतो नक्की काय उल्लेख आहे ते. त्यात नाही मिळाले तर अर्काइव्हवर उपलब्ध असलेली सम्पूर्ण प्रत अभ्यासावी लागेल.

हा अर्थात फ़क्त एक ग्रंथ. मुग़ल दफ़्तरात यासंबंधी अजून कागदपत्रे नक्कीच असतील पण ती मला माहीत नाहित.

म्हणून तुम्ही सुधारणारच नाही का?

viraj thale's picture

9 Jul 2016 - 1:12 pm | viraj thale

डाकू
रानी
चम्पा
बाई

संदीप डांगे's picture

8 Jul 2016 - 9:28 pm | संदीप डांगे

विचारांचा मुकाबला विचारांनी हा प्रकार झाना सोबत शक्यच नाही. किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते. उदाहरणे अनंत आहेत.

माहितगार's picture

8 Jul 2016 - 10:03 pm | माहितगार

झाना म्हणजे ? विचारांचा मुकाबला विचारांनी का शक्य नाही ?

संदीप डांगे's picture

8 Jul 2016 - 10:18 pm | संदीप डांगे

झाना = झाकिर नाइक

विचारांचा मुकाबला विचारांनी शक्य आहे/अस्तो पण ते 'विचार' असतील तर....

माहितगार's picture

8 Jul 2016 - 10:26 pm | माहितगार

;) सॉरी माझा ट्यूब पेटावयास वेळ लागला :)

माहितगार's picture

8 Jul 2016 - 10:30 pm | माहितगार

..पण ते 'विचार' असतील तर....

हम्म ते जे काही -काठावरचे- बोलतात ते आपल्याला पटणारे नसले तरी काही लोकांना अनीष्ट कृती करण्या इतपत प्रभाव पाडत असेल तर त्याची दखल घेऊन खंडण करण्या जोग्या मुद्द्यांचे खंडण करणे जरुरी राहते किंवा कसे.

संदीप डांगे's picture

8 Jul 2016 - 10:48 pm | संदीप डांगे

मिसळपाववर आपण(सर्व) आपल्या आयुष्यावर कपर्दिकही प्रभाव न पाडणार्‍या विषयांबद्दल्ची आपली घट्ट मते मेगाबायटी चर्चांनंतरही बदलत नाही ह्यातून काय ते समजावे.

अभ्या..'s picture

8 Jul 2016 - 11:51 pm | अभ्या..

मला झाना म्हणजे झापडबंद नास्तिकचा शॉफॉ वाटलेला. ;)

संदीप डांगे's picture

12 Jul 2016 - 10:38 pm | संदीप डांगे

;) हे पण चालेल!

माहितगार's picture

8 Jul 2016 - 10:33 pm | माहितगार

...किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते.

आपल्याला हि व्यक्ती पुजेतून येणारी मर्यादा असेल असे म्हणावयाचे आहे ?

संदीप डांगे's picture

8 Jul 2016 - 10:46 pm | संदीप डांगे

हो. व्यक्तिपूजा हा एक भाग झाला. धर्म, समाज, चालिरीती, अस्मिता इत्यादींच्या पारंब्यांना लटकून राहण्याची गरज सामान्य माणसांना असते, ती सुटू नये म्हणून विचारांपेक्षा अविचारांना किंवा फक्त मूढ आदेशपालनाला महत्त्व दिलं जातं. अविचार म्हणजे वाईट विचार नव्हे. अविचार म्हणजे अशी अवस्था जिथे माणूस स्वतःच्या डोक्याने विचार-विनिमय न करता आदर्श-गुरु व्यक्तिने सांगितले ते तसेचे तसे स्विकारतो.

मोठा विषय आहे. तुर्तास, विस्तार करावयास मजकडे पुरेसा वेळ नाही ह्याबद्दल क्षमस्व.

माहितगार's picture

8 Jul 2016 - 11:09 pm | माहितगार

मुद्दा छान मांडलात, बाकी गोष्टींच्या मर्यादांची वेळ प्रसंगी चर्चा होताना दिसते तेवढी व्यक्ती पुजेच्या मर्यादांची होताना दिसत नाही. व्यक्तीपुजेच्या संदर्भाने पुढे मागे याच विषयावर वेगळा धागा लेख टाकावयास हवा.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2016 - 12:07 am | श्रीगुरुजी

वर बर्‍याच प्रतिसादात दाभोळ्कर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा उल्लेख असून या हत्या धार्मिक हत्या असून सनातनच्या सदस्यांनी त्या केलेल्या आहेत असा प्रतिसादकर्त्यांचा ठाम विश्वास आहे. जरा वस्तुस्थिती पाहूया.

१) दाभो़ळकर हत्या -

ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळकरांचा खून झाल्याझाल्या लगेच काही मिनिटातच या खुनामागे सनातन आहे असे आरोप सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी हे आरोप केले. एकप्रकारे पोलिसांचा तपास फक्त एका विशिष्ट दिशेला वळावा हाच त्यामागे उद्देश असावा. हत्येनंतर पुढील २-३ आठवडे पोलिसांना सनातनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. सनातनच्या ६०-७० कार्यकर्त्यांची चौकशी झाली. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. हत्येच्यावेळी झालेले वेगवेगळे २ लाख कॉल्स तपासण्यात आले. सीसीटीव्हीवरील चित्रण अनेक प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. त्यातून काहीच मिळाले नाही. तपास भरकटलेला होता हे दिसून आले.

४-५ महिन्यांनी अचानक नागोरी व खंडेलवाल या बेकायदा पिस्तुले विकणार्‍यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली. ते ज्या प्रकारची पिस्तुले विकायचे त्याच प्रकारच्या पिस्तुलातून हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या फुसक्या संशयावरून दोघांना अटक करून तुरूंगात ठेवले. तब्बल ९० दिवस तुरूंगात ठेवून कोणताच पुरावा न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करता आले नाही व त्यामुळे त्यांना जामिनावर सोडावे लागले. तपास भरकटलेला होता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

या खुनानंतर जवळपास दीड वर्षाने फेब्रुवारी २०१५ मध्ये पानसरेंची याच प्रकारे हत्या झाली. नंतर पुन्हा एकदा सनातनवर आरोप सुरू झाले. परंतु काहीच सापडले नाही. नंतर ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकमध्ये कलबुर्गींचा असाच खून झाला. सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक झाली. लगेच त्याचा संबंध दाभोळकरांच्या व कलबुर्गींच्या खुनाशी लावला गेला. आजतगायत समीरचा या ३ खुनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.

खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर जून २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्याला दाभोळकरांच्या खुनाचा आरोपावरून अटक केलेली आहे. तावडेला अटक झाल्याझाल्या वेगवेगळ्या माध्यमातून लगेच सनातनवर दोषारोप सुरू झाले. तावडेकडे काय सापडले याचे रोज अपडेट्स देणे सुरू झाले. आश्चर्य म्हणजे पोलिसांपेक्षा दाभोळकरांचे चिरंजीव व कन्या हेच रोज माध्यमांना अपडेट्स देण्यात पुढे होते. तावडेकडे म्हणे २००९ साली लिहिलेली काही ईमेल्स सापडली. त्यात त्याने हिंदूराष्ट्र निर्माण करण्याबद्दल व त्यासाठी १५ हजारांची सशस्त्र फौज निर्माण करण्याबद्दल लिहिले होते. काय चावटपणा आहे! १५ हजारांच्या फौजेसाठी दरमहा किमान ६०-७० कोटी रूपये लागतील. इतके पैसे तावडे कोठून आणणार होता? ही फौज कोठे राहणार होती? इतकी शस्त्रे कोठून आणणार? या सर्व गोष्टी गुपचूप करणे शक्य होते का? नंतर पोलिसांनी असा दावा केला की तावडे या कटाचा सूत्रधार होता व त्यानेच खुन्यांना शस्त्रे पुरविली होती. खुनात वापरली गेलेली काळी मोटरसायकल म्हणे तावडेच्या काळ्या मोटरसायकलशी मिळतीजुळती आहे (रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक १०० मोटरसायकलींपैकी किमान ९० काळ्या रंगाच्या असतात). पोलिसांनी नंतर एका साक्षीदाराची साक्ष काढली. हा साक्षीदार एका वाहिनीवर तोंड झाकून माहिती सांगत होता. त्याचे नाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते. नंतर सनातननेच त्याचे नाव जाहीर केले. सनातनने त्याच्यावर एका प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कदाचित त्याचा सूड म्हणून तो साक्ष देत असावा. नंतर म्हणे तावडेच्या बायकोने अशी माहिती दिली की तोच या खुनामागचा सूत्रधार आहे. पोलिस व दाभोळकर कुटुंबीय रोज माध्यमांमध्ये बातम्या पेरत होते. माध्यमांना रोजच्या तपासाची बातमी पुरवू नका अशी शेवटी न्यायालयानेच पोलिसांना तंबी दिल्यावर सर्व बातम्या बंद झाल्या.

मुळात दाभोळकरांच्या खुनामागे सनातन आहे याच गृहितकावर जवळपास ३ वर्षे सुरू आहे. त्यामागे दुसरे कोणी असावे ही शक्यताच पोलिसांनी गृहित धरली नसावी. आजतगायत ज्या दोघांनी खून केला ते सापडलेले नाहीत, खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही, आजवर जे जे पकडले त्यांच्याकडून निर्णायक पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु सनातनच या खुनामागे आहे याच गृहितकावर तपास सुरू आहे.

२) पानसरे हत्या -

पानसरेंच्या हत्येनंतर जवळपास ७ महिन्यांनी सनातनच्या समीर गायकवाडला १५ सप्टेंबर २०१५ ला पकडण्यात आले. अजूनही तो अटकेत आहे. त्याला अटक केल्याकेल्या माध्यम ट्रायल सुरू झाली. तो सराईत गुन्हेगार आहे असे अनेक वृत्तवाहिन्यांवरून दाखविले गेले. प्रत्यक्षात त्याच्यावर यापूर्वी एकाही गुन्ह्याची नोंद नव्हती. त्याच्याकडे म्हणे २५-३० मोबाईल सापडले. नंतर जाहीर झाले की तो मोबाईल दुरूस्तीचे काम करीत होता व त्यामुळे त्याच्याकडे २५-३० मोबाईल असणे अगदी स्वाभाविक आहे. पानसरेंच्या खुनातील दोघे आरोपी अजून सापडलेले नाहीत. खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही. खून होताना पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे त्याच स्थळी उपस्थित होत्या. त्यांनी खुन्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. समीर गायकवाडला ओळखपरेडमध्ये त्यांना ओळखता आलेले नाही. खरं तर इथेच तो खटला संपलेला आहे. त्या गल्लीतील इतर ३-४ प्रत्यक्षदर्शींना समीरला ओळखता आलेले नाही. नंतर म्हणे एका १४ वर्षांच्या मुलाने त्याला ओळखले. न्यायालयात हे टिकणार नाही. खुनाच्या वेळी तो ठाण्यात होता असे त्याचे कॉल रेकॉर्ड सांगते. एकंदरीत त्याच्याविरूद्ध काहीच पुरावा दिसत नाही. "मी दोन पापे केली आहेत" असे तो मैत्रिणीला म्हणाला असे पोलिस सांगतात. दोन पापे म्हणजे दोन खून असे कोणतेच न्यायालय मान्य करणार नाही. तरीसुद्धा गेले १० महिने तो अटकेत आहे.

पोलिसांनी मे २०१६ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केल्यावर पानसरे कुटंबियांनी न्यायालयात अर्ज दाखल करून इतक्यात आरोपपत्र दाखल करू नका असा आदेश देण्याची न्यायाधिशांना विनंती केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व आरोपपत्र दाखल करून खटलाही सुरू करायचा नाही कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल आणि मग सनातनवर कसे आरोप करता येतील? दरम्यानच्या काळात सनातनला झोडपत रहायचे व त्यांनीच खून केलेत असे आरोप सुरू ठेवायचे.

पानसरे हत्येचा तपासही एकाच दिशेने सुरू आहे. पानसरे कोल्हापूरमधील टोलला विरोध करीत होते. कदाचित त्याचाही खुनाशी संबंध असू शकतो. परंतु हा मुद्दाच विचारात घेतलेला दिसत नाही. परंतु त्याचा खून सनातननेच केला अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे.

३) कलबुर्गी हत्या -

कलबुर्गींची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये झाली. आजतगायत एकाही संशयिताला पकडलेले नाही. परंतु हत्येसाठी सनातनलाच जबाबदार धरले जात आहे.

एकंदरीत या तीनही खुनांमागे सनातनच आहे, याच गृहितकावर तपास सुरू आहे. सनातनविरूद्ध अजूनपर्यंत फारसे भक्कम पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. पकडलेल्यांविषयी माध्यमातून खोट्या बातम्या पुरविण्याचे उद्योग सुरू दिसताहेत. ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या त्यातील एकही जण अजून सापडलेला नाही, खुनात वापरलेली पिस्तुले मिळालेली नाहीत, खुनात वापरलेली मोटरसायकल मिळालेली नाही, खुनांमागचा हेतू अजूनही समजलेला नाही. ज्यांना आ़जवर पकडलेले आहे, त्यांच्याविरूद्ध फारसे पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु तरीही धार्मिक कारणांवरूनच हे खून झाले व या खुनांमागे फक्त सनातनच आहे अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे.

वास्तविक हे खून अत्यंत सराईत सुपारी किलर्सने केले असावे असे वाटते. साधारणपणे पुढारी, बिल्डर्स, माफिया गँग्ज असे सुपारी किलर्स प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी वापरतात. सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे. परंतु सनातनकडे अस सुपारी किलर्स व त्यासाठी लागणारा पैसा व हेतू असेल असे वाटत नाही.

माहितगार's picture

9 Jul 2016 - 12:55 am | माहितगार

आपण वेगळा धागा लेख होईल इतपत मोठे उत्तर दिलेत हे ठिक पण हा सर्वच वस्तुतः वेगळ्या धागा लेखाचा विषय आहे, धागा लेखाचा मुख्य विषय भरकटण्यात फरक पडेल असे दिसत नाही मग झानांच्या (अ)विचारांची चिकित्सा बाजूला पडते. इतरांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी आपण मुख्य विषय हाताळून मग अवांतर प्रकाशित करणे हा ही एक उपाय असू शकतो किंवा कसे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2016 - 1:13 am | प्रसाद गोडबोले

अत्यंत अभ्यासपूर्ण अशा संपूर्ण प्रतिसादाला टाळ्या !!

सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.

आणि विशेष करून ह्या वाक्याला standing ovation आणि जोरदार टाळ्या ! सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये पण ज्याप्रकारे स्वमतांध दाम्भीक लोक त्यांच्या विरुद्ध कंपूबाजी करत आहेत ते पाहून उगाचच softcorner वाटायला लागलाय ह्या मूर्ख आणि अनाभ्यासू लोकांविषयी !

भोळा भाबडा's picture

9 Jul 2016 - 10:40 am | भोळा भाबडा

सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये

"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये"
या पठडीतले वाक्य!!

नाखु's picture

9 Jul 2016 - 4:26 pm | नाखु

सनातन वाल्यांचा धिक्कार्/अव्हेर करायला माणसं पुढाकार तरी घेतात मिपावर्/जालावर आणि प्रत्यक्षात पण दहशतवादी/कट्टर इस्लामींचा धिक्कार तर लांबची गोश्ट त्यांच्या क्रूरपंणा आणि अमानवी वर्तणुकीबाबत चकार शब्दही बोलला जात नाही तथाकथीत धर्मनिरपेक्षवाद्यांकडून.

धाग्यातील विंबल्डनचा साक्षीदार नाखु

भोळा भाबडा's picture

9 Jul 2016 - 5:11 pm | भोळा भाबडा

म्हणूनच "पुरोगामी" शब्द ही एक शिवी होऊन बसली आहे.आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2016 - 8:36 pm | प्रसाद गोडबोले

"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये" या पठडीतले वाक्य!!

हा हा हा .

गावडे सर हे पहा , आणि तुम्ही म्हणत होता की हा माझा डु आयडी आहे =))))

बाकी भोळाभाबडा ह्यांच्या काय नादाला लागायचे , त्याना ना आर्य सनातन वैदिक धर्म माहीत आहे ना सनातन प्रभात प्रणीत धर्म . जर त्यांनी सनातन ची वेबसाईत पाहिली असती आणि मिपावरील उपनिषदांची सीरीज वाचली असती तर त्यांचे त्यांनाच कळाले असते की सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये !! असो.

भोळाभाबडा ह्यांना आमचा सनातनी नमस्कार =))))
a

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 9:04 am | बोका-ए-आझम

सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.

अगदी. पण हा काही गुन्हा नव्हे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Jul 2016 - 9:32 am | खालीमुंडी पाताळधुंडी

गुरूजी,
अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात.
आता
"सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला"
हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.

भोळा भाबडा's picture

9 Jul 2016 - 9:54 am | भोळा भाबडा

मग अकोलकर का फरार आहे??
आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं.
डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे.
एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये ,
ही सामवरची ऐका

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:04 am | चंपाबाई

सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो, असे पेप्रात आले होते.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:27 am | चंपाबाई

http://indianexpress.com/article/india/india-news-india/narendra-dabholk...

THE CENTRAL Bureau of Investigation (CBI) team probing the murder of rationalist Narendra Dabholkar told the court on Monday that it had come across 119 bank accounts that are suspected to be used by the Sanatan Sanstha members including Rudra Patil, Vinay Pawar, Sarang Akolkar, who are currently on the run.

गुर्जी मोड ऑन.

तो फरारी असला तरी तो एक साधक असल्याने तो सनातनचे व्यवहारकरु शकतो.

गुर्जी मोड ऑफ

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 10:05 am | चंपाबाई

सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो म्हणे

तो कितपत विश्वासार्ह आहे? असा तर कुणीही साक्षीदार येईल आणि कुणाहीबद्दल काहीही बोलेल. कोर्टात शपथेवर बोललाय का? नाही ना? मग असल्या गोष्टींना काहीही अर्थ नाही.असल्या पुराव्यांच्या एखादा नवशिका वकील पण चिंध्या करेल. साम हे सकाळचं, म्हणजे बोलून चालून राष्ट्रवादीचं चॅनेल. ते काहीही म्हणतील. कोर्टात त्यातले किती दावे टिकतील ते बघू. मग या वाद घालायला.

माहितगार's picture

9 Jul 2016 - 11:23 am | माहितगार

दोन्ही बाजू एवढं सगळ व्यक्तील़क्ष्य तर्कदोष असलेले 'आमचे-तुमचे' वादात वेळ घालवतात विरुद्ध बाजूचे दहा वैचारीक मुद्दे घ्यायचे आणि त्याचे खंडण मंडण करावयाचे यास कुणीच वेळ देत नाही त्यामुळे अविचारी कृत्य करणार्‍यांना त्यांचा विचार विचार नसण्याची शक्यता नसून अविचार असण्याची शक्यता आहे हे लक्षात येण्याची संधीच प्राप्त होताना दिसत नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Jul 2016 - 2:35 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

¤एबीपी माझावरची मुलाखत¤
साक्षीदार-संजय साडविलकर

तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!!
दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे.

https://www.youtube.com/watch?v=VMa-Fs_Di1s&feature=youtube_gdata_player

मिपावर बरेच जाणकार आहेत व धर्माच्या/अध्यात्माच्या धाग्यावर मेगाबायटी/मेगाफायटी चर्चा देखील करतात.
एखादा कोणी ह्या झानाला आव्हान नाही देऊ शकत का? हुप्प्यासाहेब तुम्हीच का नाही ट्राय करत?

मनिमौ's picture

9 Jul 2016 - 3:04 pm | मनिमौ

करण्यात आलेला आहे. झा ना वर चर्चा होण्या ऐवजी मोगा आणी सोनेरी टोळी ने नेहमी प्रमाणे हिंदू धर्मात किती वाईट गोष्टी आहेत आणिहिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jul 2016 - 3:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

सोनेरी टोळी म्हणजे?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Jul 2016 - 4:02 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

आणि हिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे

चंपाबाईव्यतिरिक्त अन्य कोणीही असे म्हटले नाही.

धागा हायजॅक केलेला आहे.

मुद्दामच केला आहे.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 5:16 pm | चंपाबाई

Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46

https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice)

इतिहासात लिहिलेल्य गोष्टी सा ंगणे म्हणजे हिरवी जाहिरात करणे ?

प्रदीप's picture

10 Jul 2016 - 9:47 am | प्रदीप

विकीपेडियातील संदर्भ छातीठोकपणे देता येत नाहीत, हे तुम्हास ठाऊक नाही काय?

आता हाच जो संदर्भ तुम्ही वारंवार देत आहात, तो जनाब शेख मुहम्मद इक्रम ह्या पाकिस्तानी इतिहासकाराचा आहे. तेव्हा तो कितपत ग्राह्य धरायचा? कमीतकमी तो व्यवस्थित तपासून पहावयास पाहिजे.

सर्वसाधारणपणे, मोघलांच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी तत्कालिन हिंदू राजांच्या, हिंदू सैनिकांच्या स्त्रीया, त्याच्या युद्धात झालेल्या मृत्यूनंतर त्याच्याच चितेत आत्मदहन करीत, असे सतिच्या प्रथेचे मूळ आहे असे सांगितले जाते. ते चुकिचे आहे का?

चंपाबाई's picture

10 Jul 2016 - 9:56 am | चंपाबाई

महाभारतात माद्री सती गेली

रामायणात मेघनादची बायको सती गेली.

तेंव्हाही मोघल होते का ? की , चुकुन वीस हजार वर्षे आयुष्य मिळाले तर पुढे भविष्यात मोघल त्रास देतील या भीतीने त्या बिचार्‍या आधीच सती गेल्या म्हणायच्या ?

तुम्हीच रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा असल्याचं सांगितलं होतं. मग काल्पनिक कथेत काहीही होऊ शकतं. कोणी पाहिलंय?

तुमच्या गावात आजून सती प्रथा चालू आहे?
त्या प्रथा वाईटच पण आता आहेत का नाहीत ना?
आणि तरी सुद्धा आता २०० वर्षापूर्वीच्या गोष्टीमुळे
आता दोष देत असाल तर तुम्ही धन्य आहात.

नगरीनिरंजन's picture

9 Jul 2016 - 3:06 pm | नगरीनिरंजन

न्या. काट्जूंनी झकीर नाईकला खुल्या डिबेटचं आव्हान दिलंय. फेसबुकवर नाईकच्या भक्तांच्या कॉनेंट्स वाचून हहपुवा झाली आणि त्रासही झाला. जगात स्टुपिडिटी ठासून भरली आहे आणि ह्या एकमेव कारणासाठी आत्महत्या करणार्‍याला मी तरी मनोरुग्ण म्हणणार नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Jul 2016 - 4:11 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ज्याहिरारीने इतर धर्माची चिकित्सा पक्षी द्वेष करता त्याच हिरारीने स्वतःच्या धर्माची चिकित्सा करण्याचं धाडस नाय तुमच्यात.
काल्पनिक देवांबद्दल अपशब्द काढल्यावर लगेच भावना दुखावतात.प्रसंगी खून पडतात,त्याचं सोयरसुतक नाही पण आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै!!!

'आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै' हे अकबर आणि औरंगजेब यांच्यासाठी लागू होतं का ?

इरसाल's picture

9 Jul 2016 - 4:40 pm | इरसाल

स्वतःभोवती असलेल्या वलयाचा (चांगले किंवा वाईट) अतिशय गैरफायदा घेण्याचा अतिशय अशक्य आणी निर्लज्ज प्रकार सुरु आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 5:48 pm | चंपाबाई

नाइकानी अतिरेक्यांचा कुत्रे असे संबोधुन निशेध केलाय म्हणे.

नथुराम , गायकवाड इ इ चा त्याम्च्या गुरुनी / सनातनने निशेध केला होता काय ?

हुप्प्या's picture

9 Jul 2016 - 8:42 pm | हुप्प्या

नथुराम गोडसेने १९४८ साली गांधींना मारले. त्याला आता ६८ वर्षे झाली. त्या घटनेशी संबंधित असणारे कुणी आज जिवंत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे वर्तमानात या. हवे तर वेगळा धागा काढून त्यात झकीर नाईक व गोडसे ह्यांची तुलना करण्याकरता काथ्या कुटा. उगाच विषय का भरकटवताय?
एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसरी चूक दाखवणे ही तिसरी चूक आहे!

मुक्त विहारि's picture

10 Jul 2016 - 12:12 am | मुक्त विहारि

+ १

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2016 - 9:28 am | प्रसाद गोडबोले

तो त्यांचा अजेंडाच आहे मुवी !
कारण नीट रीतसर चर्चा झाली तर नाईक साहेब जे सांगतात त्याचे पितळ उघडे पडेल ना ! ते तसे पडु नये म्हणुन मध्येच अकबर , औरंगजेब , नथुराम , अकोल्कर, सती प्रथा , भगवा दहशतवाद वगैरेंना घुसडायचे की झालेच धाग्याचे काश्मीर ... मुळ मुद्दा राहिला बाजुला !!

सामान्य वाचक's picture

10 Jul 2016 - 8:19 pm | सामान्य वाचक

लक्ष्य का देतात बरे लोक्स
त्या आयडी ला उकळ्या फुटत असणार हे वाच वाचून
Sample treatment म्हणून यापुढे या सोनेरी टोळीच्या एकही पोस्ट ला उत्तर देऊ नका

शाम भागवत's picture

10 Jul 2016 - 8:37 pm | शाम भागवत

मूळ मुद्यावर यायचय?
मग हे वाचा.

ढाका घातपाताच्या निमीत्ताने

समीर गायकवाडने हत्या केलीय हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे निषेध केला नसेल. तुम्हाला भारी घाई सगळ्याची.

http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaikp2.htm

कट पेस्ट करा...

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2016 - 8:00 pm | श्रीगुरुजी

धागा भरकटविण्यात नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी यश मिळविले हे खरे आहे. त्यामुळे झाकीर नाईक व त्याची धर्मांध विषारी वक्तव्ये या मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. परंतु धागा भरकटविण्यासाठी जे खोटे आरोप केले आहेत त्यावर प्रत्त्युत्तर देणे आवश्यक आहे. यापूर्वीच एक दीर्घ प्रतिसाद देऊन सनातनवर केलेले खोटे आरोप व त्यामागची वस्तुस्थिती समोर आणलेली आहे. त्यानंतर अजून काही खोटे आरोप झाले आहेत. त्यावर पुन्हा एकदा वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.

गुरूजी,
अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात.
आता
"सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला"

हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.

तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही. "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते. हे वक्तव्य खूप काही सांगून जाते असा भास होत असेल तर इथेही ते सांगा आणि संबंधित तपाससंस्थांनाही सांगा.

मग अकोलकर का फरार आहे??
आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं.
डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे.
एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये ,

अकोलकर फरारी आहे असे पोलिस म्हणतात. तो का फरार आहे ते पोलिस आणि तोच जाणे. तो गेली ६-७ वर्षे फरारी आहे म्हणे. असेल. पण या खुनाशी त्याचा संबंध आहे का याबद्दल अजून पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. एखादा माणूस फरारी आहे हे कारण त्याला दोषी ठरविण्यासाठी पुरेसे नाही.

हा साक्षीदार तोंड लपवून का मुलाखत देत होता? दाभोळकरांच्या खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर तावडेला पकडले. त्याआधी २०१३ मध्ये नागोरी व खंडेलवालला पकडले होते. पावणेतीन वर्षे हा साक्षीदार का गप्प राहिला? त्याला खुनाची पूर्ण माहिती होती तर त्याने ती इतके दिवस का लपवून ठेवली? तो जे काही बोलला त्याचा आधार काय? तो जे म्हणेल त्यावर न्यायालय डोळे झाकून विश्वास ठेवणार का? एकंदरीत खोटा साक्षीदार उभा करण्याचा हा प्रकार दिसतोय.

सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो म्हणे

शेकडो खाती असण्याचा आणि खुनाचा संबंध आहे काय? भारतीय नागरिक कायद्याप्रमाणे कितीही खाती उघडू शकतो. ज्याप्रमाणे गायकवाडकडे २५-३० भ्रमणध्वनी संच सापडले अशा ब्रेकिंग न्यूज झळकत होत्या, तसेच हे पण आहे. या गोष्टींचा खुनाशी संबंध आहे का?

तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!!
दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे.

तावडेने माझ्याकडे अण्वस्त्रे तयार करण्यासाठी माणूस पाठविला होता असे उद्या साडविलकर सांगेल! असे सांगणारा व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे धन्य आहेत.

__________________________________________________

एकंदरीत पुरावे गोळा करून नंतर तावडे व गायकवाडला पकडण्याऐवजी आधी त्यांना पकडून नंतर खटल्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी माध्यमांना सांगून (२५-३० मोबाईल, शेकडो खाती इ.) तोच गुन्हेगार आहे असे समाजात पसरविणे म्हणजे आधी बाण मारून नंतर त्याभोवती वर्तुळ काढण्याचा प्रकार आहे.

हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Jul 2016 - 9:07 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही.

मग तुम्हाला थेट NIA मधून माहिती मिळते का?

"सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते.

खिक्क,
सबनीसांना आचरट शिरोमणी म्हणताय?
तुमच्या बुद्धीची कीव येत आहे,अहो त्यांनी पत्र लिहून मोदींची माफी मागितली होती.
आणि " सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" या व्यक्तव्यात तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही?

हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.

ख्याक्,
उजव्या विचारसरणीचं सरकार असूनसुद्धा तुम्ही असे म्हणताय?

यात आक्षेपार्ह नक्की काय आहे?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Jul 2016 - 9:59 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

माॅर्निंग वाॅकला आल्यावरच दाभोलकरांना मारले,म्हणून सबनीसांना घाबरवण्यासाठी पुनाळेकरने तसे ट्वीट केले होते.

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2016 - 10:14 pm | श्रीगुरुजी

कशावरून?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Jul 2016 - 11:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

आदरणीय गुरूजी,
त्यांनी ट्वीट कोणत्या आशयाने केले होते ते सार-या जगाला माहित आहे,तरीही तुम्ही सोंग घेताय?
इथल्या निरपेक्ष आयडींनी पुनाळेकरच्या ट्वीटबद्दल प्रकाश टाकावा.
वरच्या प्रतिसादामध्ये गुरूंजींचे ढोंग उघड पडले आहे.