ज्या बीजाला
अंकूरायचे असते
प्रसवायचे असते
ते पाहत नाही
तापमान किती डिग्री
हवेत आर्द्रता किती
पावसाची काही शक्यता
वा मातीचा ओलसरपणा
ते मातीत ढेकळात
खडकाच्या फटीत
इवल्या पालवीने उभारते
अस्तित्वाची दखल आपल्या
जगाला घ्यायला लावते
भोसले जी.डी.
आत्मशोध काव्यसंग्रह
प्रतिक्रिया
24 Apr 2016 - 7:04 pm | gsjendra
तूमचा अभिप्राय काय आहे?
24 Apr 2016 - 7:31 pm | जव्हेरगंज
पटली नाही.
तम्ही म्हणता ती खरं असेल तर, वाळवंट का एवढी रुक्ष आहेत. झालंच तर अंटार्टिका वगैरे मध्ये पण झाडं उगवत नाहीत असं ऐकून आहे.
29 Apr 2016 - 6:50 pm | gsjendra
शब्दशः अर्थ घेऊ नये
24 Apr 2016 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भावना पोहचल्या.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2016 - 8:21 pm | विजय पुरोहित
ही कविता तुम्ही परत दुसर्यांदा टाकली आहे!
परत तपासून बघा!
24 Apr 2016 - 9:02 pm | कानडाऊ योगेशु
प्रगल्भ!
तुमच्या आयडीत a ऐवजी s चुकुन आला आहे का?
24 Apr 2016 - 9:18 pm | जव्हेरगंज
अरे काय चाललयं काय ?
हे आधीही इथे आहे की www.misalpav.com/node/35530
24 Apr 2016 - 9:20 pm | अभ्या..
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको तिथं लक्श देउ.
राम्याची शीतली तशीच राह्यली. ल्याह्यला घ्या तिच्यावरच एक लेखमाला.
28 Apr 2016 - 3:48 pm | gsjendra
होय दूसर्यांदा टाकली.a ऐवजी s चूकून झाले आहे.शब्दात अडकू नका