सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
20 Apr 2008 - 12:54 am | अभिज्ञ
कविता आवडलि............
माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?
जास्त भावले.
अबब.
20 Apr 2008 - 9:47 am | प्राजु
ग्रीष्मातली पानगळ बघून
पहाटे पहाटे देव रडला
त्याचा आसवांचा सडा
पाना-फुलांवर अलगद् पडला
इथे ग्रिष्मात पानगळ बघून... यानंतर पानाफुलांवर सडा पडणे हे विरोधाभास वाटते. त्या ऐवजी जर..
त्याच्या आसवांचा सडा
गवताच्या पात्यांवर अलगद् पडला..
हे कसे वाटते??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Apr 2008 - 10:30 am | उदय सप्रे
प्राजु,
तुमची सूचना एका अर्थी योग्यच आहे.पण (देवकी पंडित यांची क्षमा मागून !).....
ग्रीष्मात तुमच्या नावाचीच फुले - प्राजक्ताची फुले कशी सुकत सुकत जातात , पाने पण हळू हळू कमी कमी होत जातात - हा "क्षयरोग" म्हणजे त्या सजीव झाडाचे "निश्चित् मरण" देवाला कळून तो रडला अशी यामागची संकल्पना होती आणि ती तुम्ही स्वतः छान कविता करता त्यामुळे तुम्हाला नकीच समजेल हा विश्वास आहे.
तुमच्या ब्लॉग वरील कविता वाचणे चालू आहे , एक अतिशय सुंदर आणि तरल अनुभव ! अभिनंदन ! माझ्या ब्लॉग्ज वरील तुमच्या अभिप्रायांबध्दल आभार !
20 Apr 2008 - 10:33 am | प्राजु
तुमची भावना अतिशय सुंदर आहे. पटले तुमचे म्हणणे..
मी ही तुमचे ब्लॉज्ग वाचते आहे. खूप छान वाटते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Apr 2008 - 12:22 am | वरदा
मी वाचली नाही आधी..
मस्त कविता आहे...माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?
ह्म्म खरय्...