लव्ह.. आज कल!
("लव्ह.. आज कल" हा इम्तियाज अलि दिग्दर्शीत चित्रपट नुकताच पाहण्यात आला. त्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार.)
पुर्वीच्या काळी चित्रपटात कसे असायचे की नायिकेची 'सगाई' ठरल्याची बातमी आली तरी नायकाचा चेहरा पांढराफटक पडायचा. :S मग ही सगाई होवू नये, आणि यदाकदाचित झालीच तर 'शादी'पर्यंत जाऊ नये यासाठी सगळा आटापिटा चालायचा. नायिकेचे पालक हेच अनेकदा व्हिलन असायचे.
काळ नेहमी पुढे जात असतो. त्यामुळे नंतर नंतर नायिकेची लग्नघटिका समीप येईपर्यंत नायक निर्धास्त राहू लागले.
मिसळपाव