Skip to main content

वेदना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 06/08/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपनाबाजारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, "वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो." जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.

थांब ना..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 06/08/2009 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ? घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना - प्राजु

कसाबाला राखी बांधून घ्यायची आहे म्हणे

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 06/08/2009 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://beta.esakal.com/2009/08/05202807/home-mumbai-kasab-case-rakhi.ht… सकाळमधे अशी बातमी आहे की हलकट कसाबाला राखी बांधून घ्यायची इच्छा आहे. मला वाटते कुण्या थोर भगिनीने काथ्याचा एक जाडजूड दोर वळावा आणि तो जाहीरपणे त्याच्या गळ्याभोवती करकचून आवळावा. त्याचे प्राण पूर्ण जाईपर्यंत हा फास सोडू नये आणि अशा तर्‍हेने रक्षाबंधन साजरे करावे. होऊ घातलेले अतिरेकी हा रम्य सोहळा पाहतील तेव्हा तसले कृत्य करण्यापूर्वी विचार करतील अशी एक आशा.

(डांबिस पिवळा)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 05/08/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: हिंदोळा ह. घ्या... लघु-गुरू लयाला जाती पडले निष्प्राण गणमात्रा कविता वाचूनि तात्या आक्रंदतो ढसाढसा तप्त शब्दवर्षा विडंबनाची नसे आशा दिसे दीनवाणा साक्षात केसुराणा तुझा फसफशीत उत्साह सोसवेना मिपाकरां संहत नायट्रिक आम्ल पिऊन मरतील आता तुझ्या दुर्धरी वेदनेचे समूळ उच्चाटन प्राजक्ता जयवी करण्या एकत्र आसुसल्या आणि एकटाच डोलणारा अती आनंदे डांबिस पिवळा!!! :) (निवेदनः ही जबरदस्त मूळ कविता लिहून आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!)
काव्यरस

परत एकदा १८९७

लेखक विकास यांनी बुधवार, 05/08/2009 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात स्वाईन फ्लूचा पहीला बळी पडला आणि सरकारला खडबडून जाग आली. ११० स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, त्यात ११ शाळांमधले ७० विद्यार्थी आहेत. आता अजून शाळा, क्लासेस वगैरे बंद ठेवणे अजूनच वाढले आहे. मात्र सरकारला जाग येण्यासाठी इतका वेळ लागावा हे दुर्दैव. पण जाग आल्यामुळे सरकारने जो कायदा/नियम तात्काळ लागू (activate) केला आहे तो वाचून आश्चर्य वाटले. "संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७" असे त्याचे नाव आहे. तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला.

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/08/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले
काव्यरस

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.

संस्कार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 05/08/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
चुकले मी परत अस कधीही करणार नाही. तुझी शप्पथ. तुला वाटत तस काहीही नाही. हव तर मार परत एकदा मला. तु सांगशिल ती शिक्षा मला मंजुर आहे. आता इतर मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत त्याला मी काय करु? आता ही पोर हाताशी नसती तर हीला कधीच सोडली असती. आई म्हणायच का ह्या बयेला? कसले संस्कार आयशीच्या घोवाचे. तरी सांगत होतो एवढा जाच करु नकोस. नाही दिवस राहीले पुर्वीचे. हिच्या आग्रहाकरता कन्या शाळेत घातली. आता पोर रुपाने माझ्यावर गेली त्यात तीचा काय दोष? ही तीच्या रुपावर जळते की काय? ३६ गुण मिळतात म्हणून बापाने सांगितले. लग्न केले. लग्न कसले बोडक्याचे. १७ वर्षाचा जाच झाला. प्रत्येक गोष्टीत उलटच डोक चालत. लग्न जेम