राज की समाज....... कारण?(कथा भाग 2)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
5 Dec 2016 - 9:41 pm

"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते.

"उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली.

"भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का? बास कर की तुझा हा बाहेरख्यालीपणा" आण्णा वैतागून म्हणाले.

"वा वा! कोण कोणाला सांगतय बाहेरख्यालीपणा बद्दल! आण्णा शैला म्हणत होती परवा रात्रि तुम्ही तिच्या दाराशी थांबला होतात. पाणी मागितलत आणि हात धरलात. अहो ती माझी आहे. तिला तरी सोडा." उदय उर्मटपणे आण्णाकडे बघत म्हणाला.

उदयच्या उर्मटपणाने चिडलेले आण्णा त्याच्या अंगावर धावून जात ओरडले,"ए भेनच्योद तोंड आवर नाहीतर जीभ हासडून ठेवेन. भाड्या तुझी काय ती? तीचेच दागिने विकुन खाल्लेस... तिला लग्न करू देत नाहीस... साली आली होती रडत आणि पदर पसरून माझ्याकडे त्यादिवशी. पदर जास्त पसरला गेला आणि थोड़ा इथे तिथे हात लागला... एवढच. पण आता तू इतका मोठा झालास की मला तू विचारणार? आजही कानाखाली आवाज काढिन तुझ्या. समजल? चल चालता हो. मला विचार करू दे."

आण्णांचे बोलणे एकून उदय विचारात पडला. तो काही न बोलता वाड्यातून बाहेर पडला. आण्णा मात्र त्यांच्या आरामखुर्चीत बसून विचार करत होते.
-------------------------------------
आण्णांनीच सुगंधासमोर परवानगी दिल्यामुळे लक्ष्मीबाई रोज न चुकता सुगंधाच्या संस्थेत जात होत्या. आण्णा त्यांना थांबवू शकत नव्हते आणि त्यांना हे अस लक्ष्मीबाईच संस्थेत जाण आणि काम कारण पटत देखील नव्हत.

आण्णा आज थोड़े लवकरच वाड़यावर आले. लक्ष्मीबाई अजुन संस्थेतून घरी आल्या नव्हत्या. हे समजल्यावर आण्णाचा पारा चढ़ला. लक्ष्मीबाईनी घरात पाय ठेवला आणि आण्णानी त्यांना वृन्दावनासमोर बडव-बड़व... बडवल. लक्ष्मीबाई दोन दिवस तर त्या खोलीतून बाहेर पडु शकत नव्हत्या. पण त्यांना सुगंधा वाट बघत असेल याची कल्पना होती. त्यांच्या सुनेला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी सुनेला गळ घातली.... म्हणल्या,"सुगंधा माझी वाट बघत असेल ग पोरी. तिला निरोप तरी दे ग. कसही कर आणि तिला कळव की मला थोडं बर नाही. मला विचारात सुगंधा घरी आली तर अनर्थ होईल." पण सुन तरी काय करणार? जर ती बाहेर पडली अस उदयला समजल असत तर तिची खाट लक्ष्मीबाईच्या शेजारी पडली असती. त्यामुळे ती गेली नाही. शेवटी लक्ष्मीबाईना ज़ी भिती होती तेच झाल. सुगंधा तिस-या दिवशी घरी आली. कर्मधर्मसंयोगाने आण्णा घराच होते.

"या... या... सुगंधाताई. आज इकडे कुठे?" तिला समोर बघून त्यांनी खोट हसत तिच स्वागत केल.

"अहो वहिनी पडल्या म्हणे? चौकशिला आले." त्यांना हसत नमस्कार करत सुगंधाने उत्तर दिल.

आण्णा अवाक् झाले. कारण लक्ष्मीला बर नाही याची खबर बाहेर नव्हती.

"छे हो! तिला काय धाड़ भरली आहे. झक्कास आहे ती." त्यांनी उत्तर दिल.

"मग बोलवा न!" अस म्हणून सुगंधानेच हाक मारायला सुरवात केली. "वहिनी अहो वहिनी..."

"त्या जरा पडल्यात. थोड़ी कणकण आहे अंगात." आतल्या दाराशी येऊन सुनेने उत्तर दिल.

"अरे? तू कोण?" माहित असूनही सुगंधाने मुद्दाम आश्चर्याचा आव आणून विचारल.

"आमची सुनबाई." सून काहीतरी बोलेल म्हणून मनात नसूनही आण्णांनी उत्तर दिल.

"अरे वा आण्णा. तुम्हाला सुनदेखिल आहे? वाटत नाही तुमच्याकडे बघुन. तुम्ही अजूनही बरेच तरुण दिसता की" सुगंधाने आण्णांना चढवण्यासाठी म्हंटल.

हे ऐकून आण्णा खुश झाले. मिशीला पिळ देत त्यांनी आत बघत ऑर्डर सोडली. "पाहुण्या ताई आल्यात. चहां पाण्याच् बघा."

सुन मागल्या पावली आत पळाली आणि चहा-नाश्ता घेऊन आली.

तिला समोर आलेलं बघून सुगंधाने मुद्दाम तिच्याशी बोलायला सुरवात केली. तिला आपल्या बरोबर बसायला सांगत सुगंधाने विचारल,"अरे लहान दिसतेस ग. काही शिकली आहेस की नाही?"

पदर घट्ट डोक्यावरुन लपेटुन तिने हळूच उत्तर दिल. "हो जी. सातवी पास."

"अरे वा... बरीच शिकली आहेस की. बर झाल बाई तू भेटलीस. उद्या पासून तू पण ये संस्थेत वाहीनिंबरोबर. लिखा-पढ़ी तूच करशील. माझ काय बाई... माझ्यासाठी हा दोन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. मग मी जाणार. तुला आणि वाहिनींनाच मग चालवायची आहे संस्था. काय आण्णा साहेब बरोबर न?" सुनेशी बोलत पण आण्णांना हवी असणारी माहिती स्वतःहून देत सुगंधा म्हणाली.

ही नवीन माहिती ऐकून आण्णा एकदम खुश झाले. 'म्हणजे ही बाई थोड्या दिवसांसाठीच् आली आहे तर.' अचानक त्यांना सुटल्यासारखे झाले. त्यांनी विचार केला 'बर झाल. मोठ नाव असलेल्या संस्थेचा आधार मिळाला तर भविष्यात उपयोग होईल. त्यात लक्ष्मी आणि सुनबाईनाच ही हाताशी घेते आहे. म्हणजे पुढे हिची संस्था आपल्यला खिशात घालता येणार आहे.' आपल्या विचारावर खुश होत आण्णा मोठ्याने म्हणाले,"हो हो... अगदी बरोबर. येईल न तीसुद्धा लक्ष्मीबरोबर. तशा दुपारी त्या मोकळयाच असतात." सुगंधाने हसत-हसत मान डोलावली आणि चहा घेऊन ती वाड्यावरून निघाली.
--------------------------
संस्थेच्या कामाला जवळ-जवळ दोन महीने झाले होते. लक्ष्मीबाईनी स्वतः गावात फिरून बायकांना एकत्र केल होत. त्यांची सुनसुद्धा आता संस्थेच्या कामाला सरावली होती. बायका ही आता मोकळेपणाने सुगंधाशी बोलायला लागल्या होत्या. सुगंधादेखिल कधीच मोठी मोठी भाषण देत नसे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यांचे प्रश्न विचारायचे... आणि हळूहळू त्यांना स्वतः च्या पायावर उभ राहाण्याच महत्व समजावायच. असा एकूण तिचा कार्यक्रम असे. त्यातच त्यांच्याशी बोलून गावात कुठला व्यवसाय सुरु कारण जमेल त्याची पड़ताळणी देखील ती करत असे.

हळूहळू तिने गोणपाटाच्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता; असा विश्वास गावातल्या महिलांच्या मनात निर्माण केला. पहिल्या शंभर पिशव्या त्यांच्या मागे लागून करून देखील घेतल्या. आता प्रश्न या पिशव्या विकण्याचा होता. यासाठी आश्चर्यकारक रित्या आण्णासाहेब पुढे आले. जील्ह्याच्या ठिकाणी काही मोठ्या दुकानातून त्यांच्या ओळखी होत्या. त्या लोकांशी बोलणी करून देण्यासाठी स्वतः आण्णासाहेब सुगंधाला नेणार होते. त्यांनी लक्ष्मीबाई बरोबर सुगंधाला निरोप पाठवला होता. वाड्यावर लवकर या. सकाळी लवकर निघावे लागणार होते. म्हणून मग काम लवकर आटपून त्यादिवशी सुगंधा घरी लवकर आली होती.

सगळ लवकर उरकून सुगंधा पलंगावर आडवी झाली. रात्रि अचानक तिच्या खोलीच्या खिड़कीची कड़ी अगदी हळू आवाजात वाजली. पण त्या आवाजाने देखिल सुगंधाला जाग आली. तिच्या लहानपणापासून तिला सांभाळणारे सदा काका तिच्या खोली बाहेर झोपले होते. साठीच्या घरात असले तरी आजही चार जणांना भारी पडतील अशी शरीर यष्टि होती त्यांची. त्यांच्याच भरोशावर सुगंधाचे वडील आणि पति तिला असे चार-चार महीने घरापासून लांब राहायला देत होते. सदा काकांची झोपही सावध होती. ते लगेच उठुन आत आले. तिला गप रहाण्याची खूण करून खिड़कीजवळ गेले. आतली अस्पष्ट हालचाल जाणवून बाहेरील व्यक्तिने हलक्या आवाजात हाक मारली. आवाज स्त्रीचा होता. सुगंधा पटकन खिड़कीजवळ गेली आणि तिने हळूच खिड़की उघडली.

"ताई मी शैला. मला आत घ्या ना."

एकदा सदा काकांकडे बघुन सुगंधाने तिच्यासाठी दार उघडले. शैला आत येऊन अक्षरशः सुगंधाच्या पायावर कोसळली. तिचा बांध फुटला होता. आणि तरीही आवाज होऊ नये म्हणून तोंडात पदराचा बोळा खुपसुन ती ओक्साभोक्षी रडत होती. सुगंधा ती शांत व्हायची वाट बघत होती. काही वेळाने शैलाने स्वतःला सावरले आणि ती बोलायला लागली,"ताई मला त्या हलकट आण्णा आणि त्याचा मुलगा उदय पासून वाचवा हो. पाच महीन्यांपूर्वी माझे वडील गेले. आई लहानपणीच् गेली होती. वडील गेल्याच्या दुस-या दिवशी उदयने घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला. तो दिवस आणि आज... शप्पथ सांगते ताई.. एक रात्र सोडत नाही हो तो. दिवसा देखील कधीही घुसतो. कधी शेतात ओढतो... माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी हौसेने दोन-चार दागिने केले होते तेसुद्धा त्याने घेतले आणि विकले. म्हणे आता मी तुला ठेवली आहे तर लग्नाचा प्रश्नच येत नाही. मग दागिने कशाला हवेत. ताई हे कमी होते म्हणून की काय काल आण्णानी निरोप पाठवला. वाहिनीनी बोलावल आहे वाड्यावर. मला मुर्खाला कळल नाही हो त्यांचा डाव. दुपारी वहिनी आणि उदयची बायको तुमच्या संस्थेत येतात ना... त्यावेळी बोलावून त्यांनी देखिल माझ्यावर हात टाकला हो. जीवाच्या आकांताने पळाले आणि आत्तापर्यंत शिवारात लपले होते. ताई, आण्णांचा गावात दरारा आहे. सगळे घाबरून आहेत त्यांना. त्यामुळे या उभ्या गावात आण्णाच्या विरुद्ध कोणी जाणार नाही. त्यांना आणि त्यांच्या मुलाला हे गाव म्हणजे त्यांची जहागिरि वाटते. सगळ्या गावातल्या पुरुषानी बांगड्या भरल्या आहेतजणू. काही दिवसांपूर्वी उदयच्या तोंडुन एकल होत की तुम्ही खूप हुशार आहात आणि बायकांसाठी काही करता आहात म्हणून. तुम्ही कामाला सुरुवात करायच्या अगोदर आण्णांच्या वाड्यावर गेला होतात. त्यामुळे लोक तुम्हाला त्यांच्या बाजूचे समजायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या बायका-सुनांना पाठवल आहे. त्यात तुम्ही लक्ष्मीबाईना आणि उदयच्या बायकोला पण तुमच्याकडे घेतल आहेत. त्यामुळे गावातल्या पुरुषांचा तुमच्यावर विश्वास आहे. अलीकडे बायाना तुमच्याबद्धल विश्वास वाटतो हे देखील मला माहित आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. ताई मला मदत करा हो! उद्या मी उदयच्या हाती लागले काय किंवा आण्णांच्या हाती लागले काय माझ मरणच आहे ताई."

तिच बोलण एकून सुगंधा विचारात पडली. तिच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली,"शैला शांत हो. मला विचार करायला वेळ दे. मी उद्या आण्णा साहेबांबरोबर जिल्ह्याच्या गावी जाते आहे. तिथून आले की आपण काय करायचे ते ठरवू. तोवर तू इथेच थांब."

"ताई मला मदत कराल न? इथे नाही थांबत मी. शिवारात जास्त सुरक्षित वाटत. परत उद्या रात्रि येते. मला सोडवा हो ताई या छळातून. नाहीतर जीव देण्याशिवाय पर्याय नाही हो मला." सुगंधाचा हात गच्च धरत शैला म्हणाली.

थोड़ा विचार करून सुगंधा सदा काकांना म्हणाली,"काका मी नाहितरी उद्या जिल्ह्यात आहे. तुम्ही हिला घेऊन आत्ताच ताबडतोप निघा. घरी जाऊन तिला आईकडे सुपुर्द करा आणि त्याच पावली परत या. म्हणजे दुपारपर्यंत याल. तुम्ही जिल्ह्याला जाऊन आलात हे कोणाला लक्षात येणार नाही. सध्यातरी मला संशयाची सुई माझ्या दिशेने वळायला नको आहे."

तिच बोलण एकून सदाकाकांनी मान हलवली आणि म्हणाले,"सुगंधा काय आहे तुझ्या डोक्यात मला माहीत नाही. पण मी तुझ्या शब्दाबाहेर नाही."

"शैला तू जा काकांबरोबर. अजिबात काळजी करू नकोस. मी तुला स्वतःहून येऊन भेटेन. तोवर माझ्या आई-वडिलांकडे रहा." सुगंधा शैलाला म्हणाली. डोळे पुसत शैलाने सुगंधाचे पाय धरले. त्याबरोबर तिला उठवत सुगंधा म्हणाली,"अग माझे पाय नको धरूस. चल... उठ आणि निघ तू काकांबरोबर."

सदाकाका आणि शैलाला निरोप देऊन सुगंधा पलंगावर येऊन पडली तोवर तांबड फुटायला लागल होत.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

6 Dec 2016 - 3:26 am | पद्मावति

वाचतेय. पु.भा.प्र.

रातराणी's picture

7 Dec 2016 - 11:49 am | रातराणी

पुभाप्र. छान पकड घेतलीये कथेने.

संजय पाटिल's picture

7 Dec 2016 - 1:26 pm | संजय पाटिल

वाचतोय. पुभाप्र.

गिरिजा देशपांडे's picture

7 Dec 2016 - 2:15 pm | गिरिजा देशपांडे

छान लिहिताय. वाचतेय. पु. भा. प्र.

बबन ताम्बे's picture

7 Dec 2016 - 6:02 pm | बबन ताम्बे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत .

ज्योति अळवणी's picture

9 Dec 2016 - 12:07 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद