आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती
दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती.
चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत.
परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत.
नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती.
चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती.
एका घरात चहा झाला तर दुसर्या घरात खाण व्हायच.
रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच.
जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत.
माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत.
घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती.
गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती.
संकट आल एखाद्या घरी तर चाळ मदतीस धाऊन यायची.
सुखात मात्र नेहमीच सदा सावली देणार झाड व्हायची.
इथे माणसाना कधी कोणी खर्या नावाने हाक मारीतच नसे
बेबी, नाना, अण्णा,यमी ह्यांचीच चलती नेहमी असे.
मन खरच अजुनही भुतकाळात सतत सतत रमत.
चाळ अजुन हवी होती म्हणत धाय मोकलुन रडत.
आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे
लवकरात लवकर घेतले जातील उरलेल्या चाळीचे जीव रे.
चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती.
चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती.
प्रतिक्रिया
13 Jul 2012 - 1:25 pm | गवि
छान.. लहानपनच्या चाळीतल्या वर्षांची अन शेजार्यापाजार्यांची आठवण झाली. बाकी वर्णन बरंच मिळतंजुळतं.. चाळसंस्कृतीत प्रायव्हसीची वाट लागायची हे खरं पण सपोर्ट सिस्टीम आणि एकत्रितपणा होता हेही खरं.
13 Jul 2012 - 3:21 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे.
या ओळीत 'ण' वर अनुस्वार न दिल्याने याला जुळणारी भलतीच ओळ सुचली.
13 Jul 2012 - 10:48 pm | पक पक पक
या ओळीत 'ण' वर अनुस्वार न दिल्याने याला जुळणारी भलतीच ओळ सुचली.
स्वाभाविक स्वाभाविक म्हणतात ते हेच.... ;)
13 Jul 2012 - 10:55 pm | आंबोळी
मात्रा चुकून भलतीकडेच वाचली आणि फसगत झाली...
चुकून 'एका हाती चोळी' वाचले...
बाकी चालू द्या
13 Jul 2012 - 11:10 pm | पक पक पक
चुकून 'एका हाती चोळी' वाचले...
स्वाभाविक स्वभाविक म्हणतात ते हे देखिल... ;)
13 Jul 2012 - 2:41 pm | निश
गवि साहेब, अगदी बरोबर बोललात.
चाळसंस्कृतीत प्रायव्हसीची वाट लागायची हे खरं पण सपोर्ट सिस्टीम आणि एकत्रितपणा होता हेही खरं. चाळ म्हटल तर शहरात वसलेल छोट एक गावच होत.
13 Jul 2012 - 3:27 pm | निश
नगरीनिरंजन साहेब, चुक मान्य.
पुढील वेळेस अजुन काळजी घेईन शुध्दलेखन करण्याची.
13 Jul 2012 - 10:50 pm | पक पक पक
नको हो ! इतके प्रामाणिक नका होउ, कस कसच होत. ;)
14 Jul 2012 - 12:29 pm | अमितसांगली
ही कविता वाचताना फ.मु. यांच्या 'आई' या कवितेची आठवण होत होती.....
14 Jul 2012 - 10:43 pm | सूड
अहोरुपमहोध्वनि: ॥
14 Jul 2012 - 12:55 pm | चौकटराजा
निश,
कविता ओके पण लेखनचुका खूप -
खोल्यांच, आमच, लोकांच, होत, आपलस, वाटाव , अस , मायेच, खाण, व्हायच, यायच, पहिल, मानाच,
मन, आल, धाऊन, देणार, खरच, रमत, रडत,
हे सारे शब्द कवितेशी बोली शैली पहाता चुकीच्या पद्धतीने लिहिले आहेत.
तात्पर्य= मराठी इज अ व्हेर्र्रीईई फन्नी लॅंग्वेज !
तू मित्र ,त्यामुळे न कंटाळता कंट्रोल सी कंट्रोल व्ही केले आहे.
14 Jul 2012 - 11:15 pm | पक पक पक
मास्तर इथे शुद्धलेखन नाही हो कविच्या भावना महत्वाच्या... ;) अस नका खेळु त्यांच्या (नवकवीं) भावनांशी.. ;)
15 Jul 2012 - 9:04 am | चौकटराजा
मग शद्ध तुपाचा वापर प्रसादात का करायचा ?
खालील दोन वाक्य पहा पक राव , म्हंजे आमास्नी काय म्हनायचं ते उमगंल .
आता उमगंल हा शब्दच पहा व उमगलं या शब्द पहा पहिला भविष्य काळाशी संबंधित तर दुसरा भूतकाळाशी . आणखी पुढे उदाहरण पहा -
१) तुला सांगतो त्याला पुरता गाड
२) काय सांगायचं कसंतरी चाललंय आमच गाडं
या दोन्ही वाक्यातील गाड या शब्दातील अनुस्वारावर त्यातील " भावना" कशा अवलंबून आहेत .
16 Jul 2012 - 4:32 pm | निश
चौकटराजा साहेब, तुमच म्हणण व समजावुन सांगण एकदम मान्य.
ज्या सहजतेने तुम्ही गाड / गाडं हया मधील फरक समाजाउन दिला आहात तो खरच मान्य होण्यासारखा व थेट मी केलेल्या चु़कांवर बोट ठेवणारा आहे. मराठी भाषा व अचुकता ह्यांच नात थेट पणे सांगणारा आहे.
मागे असाच एका माझ्या प्रतिसादावर प्रभाकर पेठकर सरानी मला हाच मुद्दा सांगितला होता. मराठी भाषा व ती लिहिताना घ्यावयाची काळजी ह्याबद्दल.
14 Jul 2012 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
'हे चित्र आणि ते चित्र' असे रंगविल्यास जास्त परिणामकारक होईल असे वाटते.
एक प्रयत्न...
आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे
रुक्ष 'फ्लॅट्'सना नाहित भावनांचे कंगोरे.
'शेजार' आता कुठेही उरलाच नाही,
'नेबर', मात्र मनाने कधी भावलाच नाही.
चाळींबरोबर गेला 'मराठी'चा ओलावा,
आजकाल सोसायट्यांमध्ये 'विंग्रजी'चाच कालवा.
कळत नाही कसे आता हे आवरायचे रे,
लवकरच घेतले जातील उरलेल्या चाळींचे जीव रे.
16 Jul 2012 - 4:38 pm | निश
प्रभाकर पेठकर काका, अप्रतिम कविता आहे .
मला वाटत मला जे माझ्या कवितेत सांगायच होत ते तुम्ही अचुकपणे तुमच्या ह्या कवितेत सांगितल आहेत.
14 Jul 2012 - 2:05 pm | RUPALI POYEKAR
एकुण एक शब्द खरा आहे, आम्ही पण श्रावणापासुन ते गुढीपाड्व्यापर्यत सर्व सण एकत्रित साजरे करायचो, बाकि गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....................