Skip to main content

(भूक ही खरी किती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/04/2008 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान. (गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार. संपादित आवृत्ती.) भेटती अजून गरगरीत भोवरे किती! सोबतीस आणतात श्वान चावरे किती! मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो त्या तशा तनूतही मेद आत रे किती? प्रश्न हा विचारतात 'ढीग' ते 'ढिगास'ही- पुढचेच 'मॅक' ते असे दूर रे किती? बारक्या जनास ही बघून हासती जरा आलिशान चारचाकि चेपली बरे किती? ज्या क्षणास तो विशाल देह तिथुनि चालला जाणवे कसा उपास? पोकळी बरे किती? "तूच सांग आजकाल चालतोस तू कसा?" होत धरणिकंप अन् मोडती घरे किती! ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा तुला फिकीर बर्गरात असे चीझ रे किती? चालता असेच ते अजून चार दीसही घडायचे तयां अजून उपासही खरे किती? फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू तरी धुळीत अन्न रे किती? चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3018
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया