Skip to main content

विडंबन

(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/02/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी! -- तात्या.

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 25/01/2012 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव
काव्यरस

काळोखातली कासवे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/01/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखातली कासवे काळोखात का(?)सवे आली... सहज बादलीभर अंडी घातली... कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...) बाजी...मारलीस का..? तू ही... ;-) (विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)
काव्यरस

उडालं गेऽऽ धर!!! (एका विस्कळीत लेखाचे विच्छेदन)

लेखक यकु यांनी गुरुवार, 19/01/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कलाकृती इथे वाचा: http://www.aisiakshare.com/node/451 आपण आपल्यासाठी सोपे नसलेले प्रश्न स्वत:लाच कशाला बरे विचारतो? कारण आपला आजूबाजूला जे घडतंय, घडत आलं आहे त्यावर, आपल्या आधीच्या किंवा सोबतच्या माणसांवर, अनुभवांवर, कश्‍शा-कश्शावरही, अगदी स्वत:चा स्वत:वरही विश्‍वास नसतो. त्यामुळं या सोप्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या लोकांच्या विचारपद्धतीतून आलेल्या धारणांपेक्षा वेगळीच असतात. कुठेही गेल्यावर कशा प्रतिक्रिया याव्यात ते आपल्याला अपेक्षित असतं. एकदम वेगळेच प्रतिसाद आले तर मग डोकं सुन्न होतं.

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

लेखक यकु यांनी बुधवार, 18/01/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..

(बोंबाबोंब)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 18/01/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस

तो एक लाज-पुत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/01/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात ;-) ,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा) तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं। चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥ कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१। खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?। ताई रे ताई म्हणुन स्वारी,भरशील नळावरी
काव्यरस

(खा घास हा)

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले .. आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
काव्यरस

तुम्ही पी एम बनणारच ..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/01/2012 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा
काव्यरस