मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

सवय

टारझन ·
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स , असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.

पं. मल्लिकार्जुन मन्सूर जन्मशताब्दी कार्यक्रम

रमताराम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, जयपूर घराण्याचे दिग्गज गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'मन्सूर संस्मरण मंच' आणि 'पुणे भारत गायन समाज' यांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र शनिवार २५ डिसेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजता भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्रात विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. दुसरे सत्र दिनांक २६ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (पत्रकार भवन, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, एस. एम.

ती का पडली...

५० फक्त ·
लेखनप्रकार
ती का पडली... आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच. या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत.

बहरला पारिजात दारी...

५० फक्त ·
लेखनविषय:
सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली. जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं.

जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!

सुधीर काळे ·
लेखनविषय:
जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम! ('मिसळ्पाव' व 'मी मराठी' दोन्हीवसंस्थळाचे सभासद असलेल्यांसाठी माहिती कीं हा लेख याआधी 'मी मराठी' या संस्थळावर प्रकाशित झालेला आहे.) १९ नोव्हेंबर रोजी येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली.

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

५० फक्त ·
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

स्पा ·
'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला. पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते.

गुंजग्रामीचे दिवस

यकु ·
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

आज अचानक गाठ पडे....

५० फक्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती. शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो.

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

स्पा ·
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .