मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त ·

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

कोरोना ची किंमत त्याला विचारा...

बलि ·

Cuty 14/08/2020 - 15:06
शहरात आपल्या मुलाबाळांसोबत निवांत रमलेल्या , आणि मेव्हणा, साडू , नंदा, जावा,जावई असा बिनकामाचा गोतावळा गावातच अडकलेल्या, एखाद्या जोडप्याला विचारा! हा:हा:

Cuty 14/08/2020 - 15:06
शहरात आपल्या मुलाबाळांसोबत निवांत रमलेल्या , आणि मेव्हणा, साडू , नंदा, जावा,जावई असा बिनकामाचा गोतावळा गावातच अडकलेल्या, एखाद्या जोडप्याला विचारा! हा:हा:
बऱ्याच दिवसांनी लिहितोय, चूकभूल माफ असावी.

संवाद (भाग २)

aanandinee ·

aanandinee 13/08/2020 - 14:32
रातराणी, विजुभाऊ, भक्ती आपल्या प्रतिक्रियांकरिता आभार. शाम भागवत worksheet जोडण्याकरिता खूप धन्यवाद! worksheets इमेजेस जोडणं मला अजून जमत नाहीये :(

In reply to by aanandinee

शाम भागवत 13/08/2020 - 15:28
तुम्ही दिलेली लिंक अशी आहे. <img src="https://flic.kr/ps/dKSGP" alt="Worksheet 1: विचारांची उलट तपासणी " /> ती खालीलप्रमाणे पाहिजे होती. <img src="https://live.staticflickr.com/65535/50219210683_6eb2f711c6_z.jpg"> इमेज फाईल साधारणतः jpg फॉर्मॅट मधे असतात. त्यामुळे इमेज फाईलच्या नावाच्या शेवटी साधारणतः ".jpg" असे असते.वरील लिंक मधे मी ते ठळक केले आहे. आपल्याला जे चित्र जोडायचे आहे त्या चित्रावर राईट क्लीक केल्यावर जो छोटा मेनू उघडतो, त्यातील "Copy image address" हा पर्याय निवडा. क्रोम व सफारीमधे हाच पर्याय येतो. फायर फॉक्समधे Copy Image Location हा पर्याय असतो तर इंटरनेट एक्सप्लोरर मधे प्रथम Properties हा पर्याय निवडायचा. मग उघडणार्‍या Property विंडोतून Address (URL) मधून हा पत्ता कॉपी करायला लागतो. आपण योग्य तेच कॉपी करून घेतलेले आहे हे तपासून पाहण्यासाठी ब्राउझरमधे एक नवीन पान उघडून त्यात ही लिंक चिकटवा. एन्टर मारल्यावर जर आपल्याला पाहिजे असलेले चित्र बरोबर उमटले तर आपण योग्य ती लिंक कॉपी केली आहे हे तात्काळ लक्षात येते. मग परत मिसळपाववर येऊन img src या टॅगमधे तो पत्ता चिकटवा. तुम्ही या टॅगचा वापर योग्य प्रकारे केलेला आहे. फक्त चित्राचा पत्ता चुकला होता. मी फक्त तेवढीच दुरूस्ती केली आणि चित्र दिसायला लागले. पुढील भागासाठी शुभेच्छा.

In reply to by aanandinee

शाम भागवत 13/08/2020 - 16:01
वरती मी पध्दत दिली आहे त्याप्रमाणे प्रतिसाद विंडोमध्ये तुम्हाला प्रयत्न करून बघता येतील. पूर्वपरिक्षण बटण दाबून तुम्ही तपासू शकता. एकदा का तुम्हाला इमेज देता यायला लागली की, चित्रासकट धागा काढायला मस्त वाटेल. चित्रे, चार्ट वगैरे दिली की, शिकवायलाही सोपे व शिकायलाही सोपे.

वीणा३ 13/08/2020 - 19:58
हा पण भाग छान झालाय. एक नात्यातली व्यक्ती गेली कित्येक वर्ष पंख्याखाली झोपायला घाबरते. अगदी कुठेही पंखा चालू असेल तरी लांब जातात. तो अंगावर पडेल अशी भीती वाटते, त्यांना तुमच्या या चार्ट चा खूप उपयोग होऊ शकतो. हे सतत काळजी चिंता वाले लोक घरातच आहेत. आमच्याकडे राहायला आलेले असताना एक छोटा भूकंप (कमी रिश्टर स्केल चा) झाला, आम्ही बिल्डिंग मध्ये राहत नाही. तरी त्या दिवसानंतर पुढचे ४ महिने रोज भूकंपाचा विषय निघून काळजी चालू राहिली.

खरं तर ५० टक्के प्रश्न हे केवळ संवादाने सुटतात. हे सो कॉल्ड एटिकेट्स,मॅनर्स वगैरे संवादात अडथळा निर्माण करतात. संवादातून आपले अंतरंग उघडे पडेल कि काय याची भीती. वाद नको म्हणून संवादच नको. संवाद आपल्याला कोषातून बाहेत काढतो.पण कोषातून बाहेर पडले कि असुरक्षिततेचे भय. म्हणून संवाद नको अस्तो. संवाद हा नातं निर्माण करतो. नातं अपेक्षा निर्माण करतात. अपेक्षा निर्माण झाल्या कि अपेक्षाभंगाची भीती. म्हणून संवाद नको. अनोळखी माणसे बोलण्यात गुंगवून लुबाडतात हे अनेक ठिकाणी वाचले असते,म्हणून भीती. संवाद आपल्या खाजगीपणात हस्तक्षेप करतो. मूळातच संवाद हा उभयपक्षी मान्य असेल तरच होतो. स्वत:शीच मनातल्या मनातल्या मनात केला तर ते आत्मपरिक्षण ठरते. पंण असा संवाद जर मोठ्याने म्हणजे दुसर्‍याला ऐकायला जाईल अशा पद्धतीने केला तर या 'स्व' च्या मैत्रीला लोक काय म्हणतात हे सुज्ञास सांगणे नलगे. थोडक्यात असा संवाद हा सुसंवादाकडे नेण्याऐवजी विसंवादाकडे नेईल याची भीती. हा प्रतिसाद मी पूल बांधा रे मैत्रीचे या लेखात दिला होता. इथेही तो उचित वाटतो म्हणून पेस्टवला आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मा. ऎडमिन खाली प्रतिसाद दोनदा झाले आहेत ते काढावेत. मी ज्या व्हिडीओची लिंक दिली आहे त्या लेखिकाच आहेत का? असा माझा उत्सुकतेपोटी प्रश्न होता.

aanandinee 14/08/2020 - 16:16
काही वर्षांपूर्वी मी अनिरुद्ध बापूंची निस्सीम भक्ती करत होते. अजूनही करते पण आता त्यात पूर्वीचा पूर्ण शरण भाव येत नाही. कारण गेल्या काही वर्षांत मी स्वतःला जास्त प्रश्न विचारू लागले आहे, त्यांची उत्तरं मला अजून सापडत नाहीयेत. त्यामुळे घरका ना घाटका अशी माझी अवस्था झाली आहे. देवावरचा, गुरूंवरचा विश्वास सुटत नाही आणि प्रश्नही पडत राहतात. हे लेख मी पूर्ण आणि फक्त प्रोफेशनल आस्पेक्ट ने लिहीत आहे. इथे युकेमध्ये प्रॅक्टिस करताना ज्या गोष्टी तर्कशुद्ध पायावर , research based असतील त्याच मी करू किंवा सुचवू शकते. लिहितानासुद्धा मी तेच धोरण ठेवलं आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी यापुढे काहीही चर्चा करणार नाही. आणि आपणही करू नये ही विनंती . जर धागा सतत भरकटत राहिला तर मला तो सोडून देण्याशिवाय पर्याय राहणार नाही .

In reply to by aanandinee

धागा भरकटण्याचा धोका आपण ओळखला आहे.तो अन्यथाही असतोच. पण माझा मुद्दा भय व असुरक्षितता यासाठी श्रद्धेची / भक्तिची जोपासना या बद्द्ल मानसशास्त्रीय भूमिका हा आहे. त्या व्हिडीओ मुळे मला अनेक चिकित्सक प्रश्न पडले

In reply to by प्रकाश घाटपांडे

वेबदुनिया जादूभरी आहे इथं केंव्हा काय समोर येईल याचा नेम नाही. १. धागा भरकटण्याचा धोका आपण ओळखला आहे.तो अन्यथाही असतोच. हे एकदम बरोबरे २. पण माझा मुद्दा भय व असुरक्षितता यासाठी श्रद्धेची / भक्तिची जोपासना या बद्द्ल मानसशास्त्रीय भूमिका हा आहे. करेक्ट ! कारण भय हाच तर लेखमालिकेचा विषय आहे. ३. त्या व्हिडीओ मुळे मला अनेक चिकित्सक प्रश्न पडले हे सहाजिकच आहे. ४ लेखिकेनं ही प्रामाणिक उत्तर दिलंय आणि ते कौतुकास्पद आहे :
त्यामुळे घरका ना घाटका अशी माझी अवस्था झाली आहे. देवावरचा, गुरूंवरचा विश्वास सुटत नाही आणि प्रश्नही पडत राहतात.
हा वरकरणी व्यक्तिगत विषय वाटला तरी यामागची नेमकी मानसशास्त्रिय कारणमिमांसा झाली (भयमुक्तीसाठी गुरुशरणता कितपत उपयोगी आहे), तर ते विषयाला अनुसरुन आणि इतरांनाही उपयोगी होईल.

aanandinee 13/08/2020 - 14:32
रातराणी, विजुभाऊ, भक्ती आपल्या प्रतिक्रियांकरिता आभार. शाम भागवत worksheet जोडण्याकरिता खूप धन्यवाद! worksheets इमेजेस जोडणं मला अजून जमत नाहीये :(

In reply to by aanandinee

शाम भागवत 13/08/2020 - 15:28
तुम्ही दिलेली लिंक अशी आहे. <img src="https://flic.kr/ps/dKSGP" alt="Worksheet 1: विचारांची उलट तपासणी " /> ती खालीलप्रमाणे पाहिजे होती. <img src="https://live.staticflickr.com/65535/50219210683_6eb2f711c6_z.jpg"> इमेज फाईल साधारणतः jpg फॉर्मॅट मधे असतात. त्यामुळे इमेज फाईलच्या नावाच्या शेवटी साधारणतः ".jpg" असे असते.वरील लिंक मधे मी ते ठळक केले आहे. आपल्याला जे चित्र जोडायचे आहे त्या चित्रावर राईट क्लीक केल्यावर जो छोटा मेनू उघडतो, त्यातील "Copy image address" हा पर्याय निवडा. क्रोम व सफारीमधे हाच पर्याय येतो. फायर फॉक्समधे Copy Image Location हा पर्याय असतो तर इंटरनेट एक्सप्लोरर मधे प्रथम Properties हा पर्याय निवडायचा. मग उघडणार्‍या Property विंडोतून Address (URL) मधून हा पत्ता कॉपी करायला लागतो. आपण योग्य तेच कॉपी करून घेतलेले आहे हे तपासून पाहण्यासाठी ब्राउझरमधे एक नवीन पान उघडून त्यात ही लिंक चिकटवा. एन्टर मारल्यावर जर आपल्याला पाहिजे असलेले चित्र बरोबर उमटले तर आपण योग्य ती लिंक कॉपी केली आहे हे तात्काळ लक्षात येते. मग परत मिसळपाववर येऊन img src या टॅगमधे तो पत्ता चिकटवा. तुम्ही या टॅगचा वापर योग्य प्रकारे केलेला आहे. फक्त चित्राचा पत्ता चुकला होता. मी फक्त तेवढीच दुरूस्ती केली आणि चित्र दिसायला लागले. पुढील भागासाठी शुभेच्छा.

In reply to by aanandinee

शाम भागवत 13/08/2020 - 16:01
वरती मी पध्दत दिली आहे त्याप्रमाणे प्रतिसाद विंडोमध्ये तुम्हाला प्रयत्न करून बघता येतील. पूर्वपरिक्षण बटण दाबून तुम्ही तपासू शकता. एकदा का तुम्हाला इमेज देता यायला लागली की, चित्रासकट धागा काढायला मस्त वाटेल. चित्रे, चार्ट वगैरे दिली की, शिकवायलाही सोपे व शिकायलाही सोपे.

वीणा३ 13/08/2020 - 19:58
हा पण भाग छान झालाय. एक नात्यातली व्यक्ती गेली कित्येक वर्ष पंख्याखाली झोपायला घाबरते. अगदी कुठेही पंखा चालू असेल तरी लांब जातात. तो अंगावर पडेल अशी भीती वाटते, त्यांना तुमच्या या चार्ट चा खूप उपयोग होऊ शकतो. हे सतत काळजी चिंता वाले लोक घरातच आहेत. आमच्याकडे राहायला आलेले असताना एक छोटा भूकंप (कमी रिश्टर स्केल चा) झाला, आम्ही बिल्डिंग मध्ये राहत नाही. तरी त्या दिवसानंतर पुढचे ४ महिने रोज भूकंपाचा विषय निघून काळजी चालू राहिली.

खरं तर ५० टक्के प्रश्न हे केवळ संवादाने सुटतात. हे सो कॉल्ड एटिकेट्स,मॅनर्स वगैरे संवादात अडथळा निर्माण करतात. संवादातून आपले अंतरंग उघडे पडेल कि काय याची भीती. वाद नको म्हणून संवादच नको. संवाद आपल्याला कोषातून बाहेत काढतो.पण कोषातून बाहेर पडले कि असुरक्षिततेचे भय. म्हणून संवाद नको अस्तो. संवाद हा नातं निर्माण करतो. नातं अपेक्षा निर्माण करतात. अपेक्षा निर्माण झाल्या कि अपेक्षाभंगाची भीती. म्हणून संवाद नको. अनोळखी माणसे बोलण्यात गुंगवून लुबाडतात हे अनेक ठिकाणी वाचले असते,म्हणून भीती. संवाद आपल्या खाजगीपणात हस्तक्षेप करतो. मूळातच संवाद हा उभयपक्षी मान्य असेल तरच होतो. स्वत:शीच मनातल्या मनातल्या मनात केला तर ते आत्मपरिक्षण ठरते. पंण असा संवाद जर मोठ्याने म्हणजे दुसर्‍याला ऐकायला जाईल अशा पद्धतीने केला तर या 'स्व' च्या मैत्रीला लोक काय म्हणतात हे सुज्ञास सांगणे नलगे. थोडक्यात असा संवाद हा सुसंवादाकडे नेण्याऐवजी विसंवादाकडे नेईल याची भीती. हा प्रतिसाद मी पूल बांधा रे मैत्रीचे या लेखात दिला होता. इथेही तो उचित वाटतो म्हणून पेस्टवला आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मा. ऎडमिन खाली प्रतिसाद दोनदा झाले आहेत ते काढावेत. मी ज्या व्हिडीओची लिंक दिली आहे त्या लेखिकाच आहेत का? असा माझा उत्सुकतेपोटी प्रश्न होता.

aanandinee 14/08/2020 - 16:16
काही वर्षांपूर्वी मी अनिरुद्ध बापूंची निस्सीम भक्ती करत होते. अजूनही करते पण आता त्यात पूर्वीचा पूर्ण शरण भाव येत नाही. कारण गेल्या काही वर्षांत मी स्वतःला जास्त प्रश्न विचारू लागले आहे, त्यांची उत्तरं मला अजून सापडत नाहीयेत. त्यामुळे घरका ना घाटका अशी माझी अवस्था झाली आहे. देवावरचा, गुरूंवरचा विश्वास सुटत नाही आणि प्रश्नही पडत राहतात. हे लेख मी पूर्ण आणि फक्त प्रोफेशनल आस्पेक्ट ने लिहीत आहे. इथे युकेमध्ये प्रॅक्टिस करताना ज्या गोष्टी तर्कशुद्ध पायावर , research based असतील त्याच मी करू किंवा सुचवू शकते. लिहितानासुद्धा मी तेच धोरण ठेवलं आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी यापुढे काहीही चर्चा करणार नाही. आणि आपणही करू नये ही विनंती . जर धागा सतत भरकटत राहिला तर मला तो सोडून देण्याशिवाय पर्याय राहणार नाही .

In reply to by aanandinee

धागा भरकटण्याचा धोका आपण ओळखला आहे.तो अन्यथाही असतोच. पण माझा मुद्दा भय व असुरक्षितता यासाठी श्रद्धेची / भक्तिची जोपासना या बद्द्ल मानसशास्त्रीय भूमिका हा आहे. त्या व्हिडीओ मुळे मला अनेक चिकित्सक प्रश्न पडले

In reply to by प्रकाश घाटपांडे

वेबदुनिया जादूभरी आहे इथं केंव्हा काय समोर येईल याचा नेम नाही. १. धागा भरकटण्याचा धोका आपण ओळखला आहे.तो अन्यथाही असतोच. हे एकदम बरोबरे २. पण माझा मुद्दा भय व असुरक्षितता यासाठी श्रद्धेची / भक्तिची जोपासना या बद्द्ल मानसशास्त्रीय भूमिका हा आहे. करेक्ट ! कारण भय हाच तर लेखमालिकेचा विषय आहे. ३. त्या व्हिडीओ मुळे मला अनेक चिकित्सक प्रश्न पडले हे सहाजिकच आहे. ४ लेखिकेनं ही प्रामाणिक उत्तर दिलंय आणि ते कौतुकास्पद आहे :
त्यामुळे घरका ना घाटका अशी माझी अवस्था झाली आहे. देवावरचा, गुरूंवरचा विश्वास सुटत नाही आणि प्रश्नही पडत राहतात.
हा वरकरणी व्यक्तिगत विषय वाटला तरी यामागची नेमकी मानसशास्त्रिय कारणमिमांसा झाली (भयमुक्तीसाठी गुरुशरणता कितपत उपयोगी आहे), तर ते विषयाला अनुसरुन आणि इतरांनाही उपयोगी होईल.
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

लेखनवाला ·

चौथा कोनाडा 11/08/2020 - 20:59
व्वा, खुप सुंदर ! जबरदस्त ! तुमची लेखनशैली खिळवून टकणारी आहे, अगदी चित्रदर्शी ! तुमच्या बरोबर परिक्षा हॉलमध्ये आहे असं वाटलं. माझ्याही परिक्षेचे प्रसंग आठवले ! वाह लेखनवाला. लिहित रहा तुमच्या लेखणीला _/\_

चौथा कोनाडा 11/08/2020 - 20:59
व्वा, खुप सुंदर ! जबरदस्त ! तुमची लेखनशैली खिळवून टकणारी आहे, अगदी चित्रदर्शी ! तुमच्या बरोबर परिक्षा हॉलमध्ये आहे असं वाटलं. माझ्याही परिक्षेचे प्रसंग आठवले ! वाह लेखनवाला. लिहित रहा तुमच्या लेखणीला _/\_
सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक.

संवाद

aanandinee ·

सुबोध खरे 07/08/2020 - 10:35
या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाबद्दल आपण लिहिता आहात हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मनोविकाराबद्दल एकंदर गैरसमजच जास्त आहेत. ज्यात हे कधीच बरे होणार नाहीत पासून मनोविकार तज्ज्ञ नुसत्या झोपेच्या गोळ्या देतात पासून अशा औषधांचे साईड इफेक्टसच जास्त आहेत आणि त्यांचा काहीही फायदा होत नाही पर्यंत. हि स्थिती सुशिक्षित माणसांची आहे यात अनेकदा डॉक्टर सुद्धा गैरसमजांचे बळी पडलेले दिसतात. मग अशिक्षित माणसात तर हे "बाहेरचं" आहे. करणी केली आहे भूतबाधा आहे पासून मनोविकार तज्ज्ञांकडे गेले तर ते शॉकच देतात पर्यंत. याशिवाय अंधश्रद्धा आणि गैरसमजुती तर बक्कळ आहेतच. आपण जितक्या विस्ताराने लिहाल तितके गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

In reply to by सुबोध खरे

aanandinee 07/08/2020 - 23:57
सुबोध, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. मनोविकारांबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत. मी जे शिकले आहे, पाहिलं आहे ते या लेखमालेत सोप्या शब्दांत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

In reply to by अर्धवटराव

aanandinee 07/08/2020 - 23:58
आपल्या प्रतिक्रियेकरिता धन्यवाद! पुढला भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट करण्याचा विचार आहे. लेखमाला अवश्य share करा. वर लिहिल्याप्रमाणे Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

aanandinee 07/08/2020 - 23:47
डॉ. बिरुटे, भक्ती, रातराणी आपल्या प्रतिक्रियांकरिता खरंच आभारी आहे. मी या वेळी प्रतिक्रियांची विशेष वाट पाहत होते कारण फार वैद्यकीय शब्दांचा मारा होत नाहीये ना, साधारण प्रतिसाद कसा आहे याची मला खूप उत्सुकता होती. आपल्या प्रतिक्रियांनी हुरूप आला आहे

मुळात भय हे एकच आहे > आपण नष्ट होऊ ! याची दोन उपांग आहेत > एक, शरीर नष्ट होईल आणि दोन, प्रतिमा भंग होईल. तुम्ही दिलेले साहीप्रकार या मुळ भीतीत येतात. भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही. आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 03/09/2020 - 09:59
आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.
भिती घालविण्याचा ह्या पेक्षा दुसरा चपखल मार्ग नाही.
ते थांबवण्याच्या दोन हमखास लागू पडणाऱ्या पद्धती म्हणजे ‘मन प्रयत्नपूर्वक दुसऱ्या विचाराकडे वळवणं’ (distraction technique), आणि साक्षी भाव (mindfulness)
आनंदीनी यांनी दुसर्‍या भागात साक्षी भाव (mindfulness) हा मार्ग सांगितला आहे, त्यानेच संक्षी म्हणता आहेत तो उलगडा होऊ शकतो. - (मनस्वी) सोकाजी

सुबोध खरे 08/08/2020 - 11:53
है शाबास तज्ज्ञ-- पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ... सर्वज्ञ -- भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे. ज्याप्रमाणे चित्रपट हा अनेक स्थिर चित्रं गतीमानतेनं डोळ्यासमोरुन नेल्यावर हालचालीचा भास होतो; तसा अनेक विचारांच्या गतीमान प्रवाहामुळे मनाचा भास होतो. हे कळल्यावर तुमची निम्मी भीती संपेल, कारण मन अशी काही अज्ञात शक्ती नाही. एकेक विचार वेगवेगळा आहे. भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे. हा झाला पार्ट वन. _______________________________________ विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे. हे देखिल पिक्चरप्रमाणेच आहे. जेवढा तो व्यक्तीला खरा वाटतो तितका तो सखोल परिणाम करतो. विचार हा भ्रम आहे म्हटल्यावर त्यामुळे भीती निर्माण होणं अशक्य आहे. अर्थात, यासाठी तुमच्याकडे कमालीचा अवेअरनेस (सजगता) हवा. अवेअरनेस म्हणजे नक्की काय हे अप्रिय आठवणींपासून सुटका प्रकरणात तुम्हाला सांगितलं आहेच. कारण तिथेही नेमका हाच प्रश्न होता; लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. ते वाचा म्हणजे तुम्हाला आणखी लाईट पडेल. आणि हे देखिल कळेल की नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, मग मला प्रतिसाद देतांना ते भान कायम राहील. अर्थात, तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! तस्मात, आता मुद्दा भरकटवणे आणि व्यक्तिगत प्रतिसाद देणे टाळाल तर पुन्हा उघडे पडणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 10/08/2020 - 10:11
आम्ही कशाला मुद्दा भरकटवू. आम्हाला एवढाच कळतं कि कोणी एखाद्या विषयात ( येथे मनोविकाराशास्त्रात) पदव्युत्तर तीन वर्षे घासली आहेत. आणि त्यानंतर अनेक वर्षे व्यासंग केला आहे. त्यांना थोडं तरी कळत असेल कि नाही? मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, काय विचार मौक्तिके आहेत ( हायला पण विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे --इति सर्वज्ञ) म्हणजे हि पण विभ्रम मौक्तिके आहेत तर. तुम्हाला आणखी लाईट पडेल.तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! आम्ही काय सर्वज्ञ आहोत का लाईट पडायला? आणि पडला तर उचलून घेऊ हा का ना का

In reply to by सुबोध खरे

असं दिसतंय. तुम्हाला शब्दच्छलाशिवाय काहीही जमत नाही. आता सांगा : १. कुठे असतं हे मन ? २. ज्या विचाराची चर्चा चालू आहे तो वस्तुस्थिती विभ्रमित करण्यापलिकडे काय करतो ? ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ? ४. इतकी वर्ष मेडिसिनमधे (घासून का काय ते) तुम्हाला मुद्दा कसा लक्षात येत नाही ? का न वाचता आणि विचार करता प्रतिसाद ठोकता ? आता लेखिकेचं मत जाणून घ्या म्हणजे जास्त शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 10/08/2020 - 12:56
जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे अर्थातच म्हणून तर लेखिकेला पुढचे भाग सविस्तर लिहायला सांगितले आहेत. आपण तर कोण कुठले-- गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी झालंच तर श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम अशा संतांना सुद्धा न समजलेले अध्यात्म कोळून प्यायला आहात. आम्ही साधे चार बुकं वाचलेले मुमुक्षु भिक्षुक आहोत, आपल्यासारखे शत ग्रन्थ पचवून उच्चपदाला पोचलेले व्युत्पन्न अन सर्वज्ञ थोडीच आहोत?

In reply to by सुबोध खरे

मुमुक्षु भिक्षुक झाली म्हणजे बरीच प्रगती आहे ! आता मुद्दा पकडायला शिका > जाणीव वर्टीकल व्हायला ते फार उपयोगी आहे. भय काय आहे आणि मन अशी काही चीज आहे का ? यावर चर्चा चालू आहे. संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 13:58
जाणीव वर्टीकल व्हायला हायला जाणीव हॉंरीझॉन्टल असते का? संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत. इथे आम्ही कुठे मरायला लागलोय कि संतांकडे वाचवण्यासाठी साकडं घालून बसलोय ? बाकी तुमच्या सारख्या माणसाशी वाद घालायला लै मज्जा यायलीये बघा. तर मुद्दा कसा पकडायचा? हा मुद्दा आहे सध्या. ते मन आणि भय राहू दे बाजूला

In reply to by सुबोध खरे

जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?
अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित विचार म्हणजे जाणीवेचा रोख त्या विचारांप्रमाणेच हॉरिझाँटल असतो. त्याचा परिणाम म्हणजे मुद्दा कळत नाही. काल काय प्रतिसाद दिला ते आज लक्षात रहात नाही. एकदा दुसर्‍याची लायकी, मग प्रतिसादाची लायकी आणि शेवटी स्वतःची लायकी काढतो ! जाणिव वर्टीकल होणं म्हणजे संपूर्णपणे वर्तमानात असणं. करा ट्राय म्हणजे मुद्दा समजेल आणि त्याला मुद्दा पकडता येणं म्हणतात हे पण कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 18:46
मग आडवं पडलं कि जाणीव व्हर्टिकल होईल कि. (म्हणजे झोपेपूर्वी चिंतन केलं कि !) ते आइन्स्टाइन सापेक्षता वादाचा सिद्धांत म्हणून "काही तरी" सांगून गेलाय एवढं सोपं असून तुम्हाला समजलं नाही? सर्वज्ञ असूनही? आश्चर्य आहे ! बघा मुद्दा सापडला का? किंवा पकडता आला का?

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 10/08/2020 - 16:59
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?
हाहाहा!!! ॐ शांती ॐ

In reply to by शाम भागवत

> ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. यापेक्षा काही वेगळा प्रकार होता का ? तुम्ही कल्पनेतलं पिस्तुल काढून समोर नसलेल्या व्यक्तीचा गेम करायचा प्रयत्न करत होता ! आणि तो ही भिजलेल्या बनीयनवर.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 14:07
तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य आहे पहा. कल्पनेतच गेम करायचा तर फडतूस पिस्तूल कशाला काढायचं. त्यातून नेम चुकला तर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा खटला उभा राहील ना( कल्पनेतका होईना) चांगला रणगाडा क्षेपणास्त्र नाही तर गेला बाजार बॉम्ब तरी हवा होता. कल्पनेतच गेम वाजवायचा म्हणजे जोरदार का नको?

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 05:02
संक्षी आपला पहिला प्रतिसाद चांगले होता, त्यातील "भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही ( एक सर्वसामान्य माणूस म्हणून ) पण यात तज्ज्ञ सांगू शकतील जास्त पण आपल्याला एक विचारू का.. का हो तुम्ही सांगल्यांशी भांडता... आता तुम्ही म्हणाल.. येथे डॉ खरे यांनी तुमचं वॉर टिप्पणी केली म्हणून अशी टिपण्णी येते याला काय कारण असू शकेल हे कधी आपल्या मनाला विचारलाय का ? याचं कारण हे असू शकत का ... प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे ,, आणि क्लिष्ट कार्याचे...हि आपली सवय आपण हुशार तर आहातच ( हि चेश्टा नव्हे आपल्या लेखांतून दिसते म्हणून म्हंटले ) पण असा भांडकुदळ पणा करण्यात वेळ का घालवता? आपली अकौंटिंग नयनातील काहीतरी सांगत जा हो .. सगळ्यांना फायदा होईल असो डॉ माधुरी यांच्या कडून त्यातील अजून कळेल तर बरे आणि अजून एक, सर्वांनाच उद्देशून, खास करून वैद्यकीय बाबींबद्दल कोणी लिहीत असले तर त्यांनी आपण कसले डॉक्टर आहोत किंवा त्या विषयातील आपण कोण आहोत हे नक्की लिहावे , सही च्या खाली .. कारण वैद्यकीय विचार, माहिती आणि सल्ला ह्या फार मह्त्वाचया गोष्टी आहेत

In reply to by चौकस२१२

त्यांना सल्ला देण्याचं धाडस करा. मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल.
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
भय हा मूळ प्रश्न आहे, कशाचं भय हे दुय्यम आहे. कारण आपण संपू ही एकमेव भीती सर्व कारणांमागे दडलेली आहे. जर आपल्याला काहीही संपवू शकत नाही हा उलगडा झाला तर कोणत्याही कारणानं भय निर्माण होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 13:04
"....तुमच्याकडे काही समज असेल तर .." संजय क्षीरसागर हे राम... खरंच तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही... सतत दुसऱ्याला अक्कल शिकवत राहा... तुमच्या क्लायंट बरोबर पण असेच वाद घालता काहो ? https://www.youtube.com/watch?v=DCXDyIsPEN8&list=RDWFdNRFAqvDA&index=१२ १:१० विक्रम गोखले टू नाना

In reply to by चौकस२१२

अक्कल तुम्ही मला शिकवतायं ! बघा :
प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे
आणि मी तुम्हाला म्हटलं मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल >तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ? कमाले !

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 16:13
- 'प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे' मि? कधि तसा आव आणलाय .. २-३ विषयात थोडा अनुभव आहे तिथेच लिहितो, नाट्य, स्थलांतर , ट्रेडिंग ( फिनंसिअल) इत्यादी आणि १-२ आवडी, फिरणे खाणे पिणे एवढेच ,( राजकारण यावर तर सगळेच बोलतात आणि भांडतात ) " त्यांना ( डॉ खरे )सल्ला द्या " म्हणता तुम्ही..... अहो कशाला... बहुतेक मंडळींना त्यांचे लिखाण आवडते ( मतभेद असले तरी) नाही वाटत मला कि ते अनाठावी सर्वन्यानी असे वागतात म्हणून, मग कशाला त्यांना सल्ला देऊ? -'तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ?' मला? कशाला? उलट मी तुम्हाल दाखवून देतोय कि तुम्ही किती भांडताय ते .. बरं तुमचं विषयी काही चांगले बोलावे / चांगला प्रतिसाद तरी तरी तुम्ही गुरकावणार असो तुमचा शब्द शेवटचा आणि खरा... बसा उगाळत

In reply to by चौकस२१२

सोत्रि 03/09/2020 - 10:21
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
हे का पटलं नाही हे तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं तर काही चर्चा होइल. (संक्षींनी का करत येत नाही हे स्पष्ट केलं आहे.) ता.क.: व्यक्तिगत शेर्‍यांकडे दूर्लक्ष केलं तर साधक बाधक चर्चा (ह्या धाग्याच्या विषयाशी सुसंगत) करता येइल. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 03/09/2020 - 10:08
भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.
कोणतीही भावना हा विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच असतो.
विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.
विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच अतिशय प्रचंड वेगाने होतो आणि तसं होणं हे 'ऑटो पायलट' मोडमधे आपसूकच होते. त्यामुळे विचार खरा वाटू लागतो. जाणीवेत राहून विचारांकडे तटस्थ बघण्याची (mindfulness) साधना करत राहिलं की विचांराना व्यक्तिगत रिस्पॉन्स देणंं हळूहळू कमी होत जातं. - (Mindful होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 03/09/2020 - 11:13
जरी एकवेळ मानलं, की आपण केवळ शरीर नाही, पण आपण शरीर आजिबात नाही हे पटत नाही. संक्षींना आपली शरीर सोडून काही ओळख असते असे वाटते हे वाचून फार आश्चर्य वाटले. (मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही.) माझे शरीर ही माझी ओळख आहेच. म्हणून तर माझे हात पाय कापले जाऊ नयेत अशी माझी अगदी मनापासून आणि तीव्र इच्छा आहे. याबाबत मी जरासाही उदासीन नाही. उदा – मी व्हॉट्स अॅप स्टेटस बाबतीत उदासीन असतो कारण ती माझी ओळख नाही हे मला पुरेपूर पटत. शरीराची जीवापाड काळजी घेऊन शरीर नष्ट होणे ह्यात काही भिण्यासारखे नाही असे म्हणणे – पटण्यासारखे नाही वाटत. त्यामुळे आनंदिनी यांनी उल्लेखलेले भीतीचे विविध प्रकार हे केवळ अध्यात्मिक गैरसमजातून आले आहेत असे नाही वाटत. तसे मानणे या गोष्टींना फार अंडर एस्टिमेट करणे होईल. डिप्रेस्ड व्यक्तीला "डिप्रेस्ड राहू नकोस ना मग." असा सल्ला दिल्यासारखा. अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म, पिनपॉइंट समस्यांवर आहे. त्यामुळे हे अवांतर होते आहे.

In reply to by शा वि कु

सोत्रि 03/09/2020 - 12:33
अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म
नेमकं उलटं होतय. शारिरीक पातळीवरची जाणिव ही स्थूल (Gross Reality), त्याच्यापलीकडची जाणिव ही सूक्ष्म (subtle reality).
मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही
ही मानण्याची गोष्ट नसून अनुभूतीची अवस्था आहे. - (शरीर आणि मन ह्यांच्या पलीकडचा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 03/09/2020 - 14:18
हे असं होतं "जीवन समरसून जगा, जीवनात चढ उतार येतात" हे जेनरिक वाक्य ओके आहे. एक जीवन जगण्याचा मंत्र म्हणूनसुद्धा चांगले आहे. पण हे वाक्य क्रॉनिक डिप्रेशन सारखा रोगावर इलाज आहे काय ? किंवा " डेबिट व्हॉट कमस इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट" हे रियल अकाउंट्स चे मुख्य सूत्र आहे, जे बारावीत शिकवले जाते. हे चुकीचे आजिबात नाही, आणि खरतर यातच सर्वकाही समावल आहे. पण सीए फायनल ला येणारे प्रश्न केवळ या ढोबळ सूत्राने सोडवता येत नाहीत. अश्या प्रकारे मला "शरीराच्या जाण्याची भीती अनाठायी वाटते" हे वाक्य ढोबळ वाटते. तुम्हाला सूक्ष्म वाटत असेल तर ओके.

In reply to by शा वि कु

आता जिथे बसला आहात तिथे, खुर्चीला पाठ टेकवून शांतपणे डोळे मिटा. तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलं आहे आणि आपल्याला कळतंय. आपणच शरीर असतो तर असं कळणं शक्य नाही. या नंतर धारणा निस्सरण आणि मी डिवेलप केलेली एक ध्यानपद्धती यामुळे आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव सघन होत जातो. यथावकाश निद्रेत ही अनुभुती आली की शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय ही स्थिती येते. आपण मृत्यूला पार करतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥ या श्लोकाचा नेमका अर्थ तो आहे. संकेतस्थळावरच्या लोकांना अध्यात्मात शून्य रस आहे (इथे बहुतेक देवभोळे आहेत) त्यामुळे इथे त्याविषयीचं लेखन मी बंद केलं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु 03/09/2020 - 14:55
मान्य आहे, अशी अनुभूती येते. पण याचा शरीर सोडून स्वची जाणिव असू शकते असा अर्थ नाही वाटत. उदाहरणार्थ , मेंदुशिवाय/हृद्य थांबल्यावर/चेतातंतूच्या जाळ्याशिवाय ही जाणीव असेल का ? शंका वाटते.

In reply to by शा वि कु

फक्त व्यक्त जाणण्यासाठी आहे. स्वतःला जाणण्यासाठी न्यूरो सिस्टमचा काहीएक उपयोग नाही कारण आपण अंतीम आहोत. स्व स्वतःला जाणू शकत नाही कारण जाणण्यासाठी आपण स्वतःला स्वत:पासून वेगळं करु शकत नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 04/09/2020 - 08:48
आपण शरीर नाहि.. कारण शरीर अ‍ॅज सच काहि नाहि. अवयवांच्या असेम्ब्लीला शरीर म्हणतात. अवयव देखील अस्तीत्वात नाहि. एक प्रचंड पेशी समुह म्हणजे अवयव. पेशी देखील अस्तीत्वात नाहि. काहि रसायनांची असेम्ब्ली म्हणजे पेशी... असं कितीही सुक्ष्मात जाता येते. शरीर म्हणा किंवा पर्वत, सूर्य म्हणा किंवा अमीबा... तत्वतः हे असं काहिच अस्तीत्वात नसतं.. आपल्याला कुठलिही गोष्ट तिच्या स्वरुपानुसार कळत नसुन कार्यावरुन कळते. तुम्ही कार्याचे कॉण्टेक्स्ट बाद करत चला.. मग प्रत्येक गोष्ट एका युनिफॉर्म ऑब्जेक्टमधे परावर्तीत व्ह्यायला लागते. या प्रकारे विश्वाची युनिफॉर्मीटी लक्षात आलि कि सारं सुख-दु:ख त्यात विरघळुन जाईल. डिप्रेशन वगैरे तर नावाला देखील राहाणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 04/09/2020 - 09:21
तुमचं म्हणणं अर्थातच बरोबर आहे. पण मायक्रो असण्याने मॅक्रो का रद्द करावा ? आणि अणू/ पेशी/केमिकल्स/अवयव/शरीर हे माझ्या "मी" असण्यासाठी मस्ट आहेत. इतकेच.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 04/09/2020 - 23:52
अजीबात रद्द करु नये. इन फॅक्ट या सर्व आपला "मी' च्याच अवस्था आहेत. त्यातल्या किती जाणवतात, किती नाहि हे व्यक्तीपरत्वे/परिस्थीतीनुसार ठरतं.. पण त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडीटीला बाधा येत नाहि.

Rajesh188 08/08/2020 - 12:19
भीतीच्या ह्या सर्व प्रकारातील एका प्रकारची भीती जास्तीजास्त लोकांना असते. सर्वांना कशाची तरी भीती वाटतं असते. मी दुचाकी वर माग बसलो की गाडी चालवणं रा काळजी पूर्वक गाडी चालवत नाही कधी ही accident करू शकतो अशी भीती वाटते. पण स्वतः चालवत असताना ती भीती वाटतं नाही.

पियुशा 08/08/2020 - 12:25
Dr. मैडम आपन खुप छान संमजावत आहात पुढचे भाग येऊ दया आम्ही वाट पाहतोय, आणी हो एक महत्वाचे इथे स्वयंघोषित महावतार पन आहेत ज्याना सगळ सगळ कळत ते भोचकेगिरी करायला आले तरी दुर्लक्ष करा ही नम्र विनंती :)

लेख वाचुन असे वाटले कि लेखात उल्लेखिलेल्या सगळ्या भीती मला कमी अधिक प्रमाणात वाटतात. : )
सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
माझ्या एका मित्राची आई टी.वी वर देखील साप पाहु शकत नसायची. त्यावेळी छायागीत चित्रहार मध्ये नगीना नागीन वा तत्सम नागधारी चित्रपटातील गाणी सर्रास लागायची तेव्हा त्या, त्या गाण्यापुरते मान वळवुन घेत असत.

In reply to by आनन्दा

आनन्दा 10/08/2020 - 08:22
आपण हे लक्ष्यात ठेवूया की शेवटी विचार म्हणजे केमिकल लोच्या असतो. त्यामुळे एकदा केमिकल लोच्या झाला तर तो केवळ दुसऱ्या केमिकलनेच बारा होऊ शकतो!!

वीणा३ 11/08/2020 - 01:24
माहितीपुर्ण लेख!!! पुढे नक्की लिहा. कधी कधी उलट सुलट प्रतिसाद वाचून पुढचा लेख लिहायची इच्छा जाते काही लेखकांची. दुर्लक्ष करा हि विनंती आहे. आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की. कधी कधी आपल्याच आसपास हे त्रास/लक्षणं असणारं कोणी आहे हे जाणवून आपसूक मदत केली जाते, किमान सहानभूती तरी दाखवली जाते.

In reply to by वीणा३

शाम भागवत 11/08/2020 - 09:11
आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की.
या अगोदरची ही सत्यघटनेवर आधारित कथा\a> मुद्दामहून वरती आणलीय. त्यामुळे १. ही वाचाल तर मग त्यांच्या अगोदरच्या कथाही वाचतच राहाल. २. बुध्दीमान असाल तर तुमच्या बुध्दीला त्या कथा खाद्य पुरवतील. ३. चर्चा वाढवत नेण्यासाठी यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही. ४. लेखिका मानसशास्त्रातीलच तज्ञ असल्याने व बराच काळ मिपावर असल्याने, सक्रीय सभासदांच्या इथल्या वावरावरून त्यांनी त्या सभासदांना नक्कीच जोखले असणार. त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे हे त्यांना नक्कीच माहिती असणार. नव्हे, तीच तर त्यांची विशेषिता आहे. त्यामुळे कोणितरी त्यांना त्रास देईल, त्या त्रास करून घेतील, त्यामुळे त्या त्यांचे लेखन कार्य थांबवतील अशी शक्यता नाही. ५. आत्तापर्यंतच्या होत्या त्या कथा होत्या. बरोबरीच्या नात्याने चर्चा करणे व आपले मत मांडणे बरोबर होते. पण आता मात्र त्या त्यामागचे शास्त्र सांगताहेत. त्यामुळे ते समजावून घेणे, आणखी नीट समजण्यासाठी शंका विचारणे हे योग्य होईल. ६. तसेच आपले मत मांडता येईल. तो हक्क सर्वांचाच आहे. पण यावेळेस त्याबरोबर त्याची कारणमिमांसाही माडली तर ती अभ्यासाच्या दृष्टिने उत्तम होईल.. वीणाताई, हे फक्त तुम्हाला उद्देशून लिहिल्यासारखे वाटले तरी, ते सगळ्यांसाठीच लिहिले आहे. कृपया वैयक्तिक घेऊ नये.

In reply to by शाम भागवत

यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही ?
भय हाच तर स्व उलगडण्यातला महत्त्वाचा अडथळा आहे आणि विचारांची प्रक्रिया कळली की तो दूर होतो. याला सांख्ययोग म्हणतात. तुमचं पिस्तुल घेऊन काल्पनिक व्यक्तीला ठार करणं हा भयाचाच प्रकार आहे. याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे. आता ते ॐ शांती शांती सोडा आणि माझे प्रतिसाद नीट वाचा, तुमची भीती जाईल.

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 11/08/2020 - 14:11
याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे. पहा शामराव आम्ही म्हटलं नव्हतं का? येथे कुणालाही काहीही येत नाही आणि सर्वच बाबींची सर्वांची जाण शून्य आहे. तुम्हाला "ओम शांती शांती" चा तरी अर्थ कळलाय का?

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 11/08/2020 - 14:22
मी तर बाॅ एकदाच “शांती“ म्हणतो. ते दोनदा का म्हणतात काही कळत नाही. कदाचित त्यांना डबल शांतीची जरूरी असावी. :)

गामा पैलवान 12/08/2020 - 02:50
अवांतर : संजय क्षीरसागर, १. या धाग्यात वर तुम्ही म्हणता की :
मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.
पण इथे तर तुम्ही संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे असं म्हणता :
संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे. तो मनाच्या अंतरंगात फार खोलवर उतरला आहे. मनाच्या महालाचे सर्व कानेकोपरे त्याच्या परीचयाचे आहेत. मनाच्या विमनस्कतेचं वर्णन तो अनेक अंगानी आणि कलात्मकतेनं करु शकतो.
तर मग तुम्हांस मन म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? २. एके ठिकाणी तुम्ही मनाची व्याख्या केलीयेत :
मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट.
आणि आता म्हणता की मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ....? ३. इथे म्हणता की :
जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.
आणि वर म्हणता की :
विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे.
म्हणजे विचार अस्तित्वात असतात तर. हे विचार मनाच्या नसतील तर नेमक्या कशाच्या आधारे अस्तित्वात असतात? कुतूहल म्हणून विचारतो आहे. माझा मनाचा अभ्यास नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमचा मनाचा अभ्यास नसला तरी माझ्या सर्व लेखनाचा जबरदस्त अभ्यास आहे ! तुम्ही तो अत्यंत मनःपूर्वक केलायं आणि तुमच्या विचारांची दिशाही एकदम पर्फेक्ट आहे. त्यामुळे तुमचा प्रश्ण आवांतर नाही, अत्यंत समर्पक आहे. १. गर्दी अशी चीज अस्तित्वात नाही, व्यक्ती समूहाचं ते सर्वनाम आहे. एकेक व्यक्ती वेगळी झाली तर गर्दी शून्य होईल. एक्झॅक्टीली तसंच मनाचं आहे, एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही. ज्याप्रमाणे गर्दी या सर्वनामाचा आपण उपयोग करतो त्याप्रमाणे मन या निदर्शकाचा उपयोग आहे. पण त्यामुळे एक सर्वात मोठा झोल झाला आहे; मन अशी काही तरी अज्ञात शक्ती शरीरात आहे आणि ती सर्व व्यक्तीगत जीवनावर सत्ता गाजवते असा समज दृढ झाला आहे. आणि सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत. थोडक्यात, 'मन आहे' अशी चुकीची समजूत एकदा दृढ झाली की सगळी उपाय योजना, सगळा अप्रोच हुकतो. २. मनाची नेमकी व्याख्या ही आहे : मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. तो मेंदूच्या आधारे चालतो आणि आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. जर तुम्हाला एकेक विचार वेगळा दिसायला लागला तर तुम्ही त्या अविरत प्रवाहातून मुक्त होण्याची शक्यता आहे > त्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 12/08/2020 - 18:23
सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत. सगळेच्या सगळे कसे काय बेअक्कल निपजले आहेत बुवा?

In reply to by सुबोध खरे

त्यात तुम्हाला अर्धवट उप-प्रतिसाद देण्याची घाई ! एकदम अक्कल, लायकी अशा गोष्टींवर कशाला घसरता ? तुम्ही स्वतः शरीरशास्त्राचा अभ्यास केला आहे. संपूर्ण देहाचं डिसेक्शन अभ्यासक्रमात असेल, हजारो पेशंटस तपासले असतील. मानसशास्त्र हा तुमचा विषय नसला तरी एक गोष्ट सांगा : कुठे असतं हे मन ? अर्थात, तुमच्याकडे याचं उत्तर नाही ! मग आता निरर्थक प्रतिसाद न देता, किमान सभ्यतेनं लेखिकेचं म्हणणं ऐकाल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 13/08/2020 - 09:31
श्री सर्वज्ञ संक्षी कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे. परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही. एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात. ऑक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हताच का? किंवा ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही म्हणून तो नसतोच असे म्हणत आहात. आपल्यालाच सर्व काही कळतं हा दंभ झाला असल्यामुळे असा होतंय. फंक्शनल एम आर आय नावाची काही गोष्ट असते ज्याने आपल्या मेंदूचा आणि मनाचा व्यापार कसा चालतो याचे गूढ आता उलगडायला लागले आहे. >फंक्शनल एम आर आय हा मी ज्या शास्त्राचा ( क्ष किरण शास्त्र) अभ्यास आणि व्यवसाय करतो आहे त्याचाच एक भाग आहे. यामुळे याबद्दल मला थोडी फार माहिती आहे. काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच. तोवर तुम्ही आपला पूर्व ग्रह कुरवाळत रहा. जाता जाता -- फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. Studying mind and brain with fMRI https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2555441/ पहा आपल्याला झेपतोय का?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 13/08/2020 - 09:39
Can fMRI Read your Mind ? https://www.imagilys.com/fmri-mind-reading/ A selective review of dharana and dhyana /fmri https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0975947616302406 जिज्ञासूंनी f mri गुगलून पाहावे. बाकी हा धाग्याचा विषय नव्हे म्हणून मी यावर अधिक टिप्पणी करत नाही.

In reply to by सुबोध खरे

किमान मुद्दा धरुन आहे; चला एवढी तरी प्रगती झाली ! १.
कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे . परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.
तुम्हाला ते माहिती नाही ! मला समजावून सांगण्याचा प्रश्ण कुठे येतो ? तुम्ही नक्की जागा सांगा विषय संपला. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा पत्ता तुम्ही काय सांगणार ? २.
एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.
तुम्ही विज्ञान शिकला आहात, एखादी गोष्ट सिद्धच होत नसेल तरीही ती आहे असं मानता का ? प्रथम रोगनिदान आणि नंतर उपचार अशी पद्धत आहे. तुम्ही रोग गृहित धरुन उपचार करता का ? शिवाय तुमचा हा युक्तीवाद तुमच्याच पहिल्या दाव्याला (ते मला माहिती आहे) धोबीपछाड मारतो. इतकी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ? ३.
काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच
बघा सगळं ओमफस्स करुन ठेवलंत ! थोडक्यात, तुमच्याकडे उत्तर नाही. ४.
फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. पहा आपल्याला झेपतोय का?
इतके अंतर्बाह्य पोकळ प्रतिसाद असल्यावर तुमच्या विधानांचा काय पाड लागणार ? तस्मात, झेपण्याच्या गोष्टी सोडा. तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. त्यापेक्षा त्या निबंधाचं तुमचं आकलन लिहा. (अर्थात, ते सुद्धा लिहायची गरज नाही कारण तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे)

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/08/2020 - 18:22
तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. झेपत नाही असे सरळ प्रामाणिकपणे म्हणा कि कशाला मला सगळंच समजतं म्हणून आव आणत आहात

In reply to by संजय क्षीरसागर

गामा पैलवान 13/08/2020 - 02:26
संजय क्षीरसागर, प्रश्नाच्या प्रशंसेबद्दल आभार. अभ्यासाबद्दल म्हणाल तर ते माझं नसून गुग्गुळाचार्यांचं कर्तृत्व आहे. असो. एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही, असं तुमचं मत आहे. पण हा एकेक विचार सुट्टा करायचा तो कशाच्या पार्श्वभूमीवर? त्याचप्रमाणे तो सुट्टा न बघता सलग बघायचा झाला तरी पार्श्वभूमी हवीच ना? मग तिलाच मन का म्हणू नये? तुम्ही म्हणता तो दृक-श्राव्य चलतपट मेंदूच्या आधारे चालतो. तो दाखवणारा आणि पाहणारा एकंच आहे. तो म्हणजे जाणीवस्वरूपी आत्मा. पण तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रक्षेपकाच्या भिंगामागे चित्रफीत फिरंत असते, तिच्यावर चित्रपट चित्रमुद्रित असतो. पण प्रक्षेपकाच्या भिंगाला डोळा लावून चित्रपट दिसंत नसतो. त्यासाठी पांढरा पडदा लागतो. हा पांढरा पडदा म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संकेतस्थळाचा दर्जा उंचावयचं मनावरच घेतलंय ! १. प्रथम तुमच्या आकलनातली एक चूक दुरुस्त करतो :
तो दाखवणारा आणि पाहणारा एकच आहे
असं नाही >माझा प्रतिसाद बघा : आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. २. हा चित्रपट कशावर चालतो हा तुमचा प्रष्ण नंतर घेऊ. प्रथम हे बघू की हा दृक-श्राव्य चलतपट प्रक्षेपित कोण करतं ? कारण असा प्रक्षेपण करणारा जो कुणी आहे त्यालाच तर मन समजलं गेलंय ! आणि माझं म्हणणंय की असा प्रक्षेपण करणारा कुणीही नाही. काय सोडवणूक आहे याची ? कारण प्रक्षेपक मूळ आहे, प्रक्षेपण दुय्यम आहे. प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं ! मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. प्रोजेक्शन झाल्यावर (म्हणजे चित्रपट चालू झाल्यावर) त्याला दिलेल्या रिस्पाँन्सचा तो अभ्यास आहे. त्यामुळे लेखिका सोयिस्करपणे चर्चेतून अंग काढून घेऊन नव्या पोस्ट टाकतेयं. आणि हा प्रक्षेपकच सगळ्या संत-महंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, कवि-लेखकांनी, तुम्ही-आम्ही (ज्याम) गृहित धरला आहे या अनुषंगानं आता एकदम अपूर्व उलगडा करतो ! प्रक्षेपण किंवा मेंदूत अविरत चाललेला हा दृक-श्राव्य चलतपट म्हणजे आपलंच रुपांतरण आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे बेसावधपणा ! सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा. रात्री हा चलतपट स्पष्ट दिसतो त्याला आपण स्वप्न म्हणतो; दिवसा उजेडामुळे तो अस्प्ष्ट दिसतो; त्याला आपण विचार म्हणतो; इतकाच काय तो फरक ! त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान ! ३. आता तुमचा प्रश्ण : तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे. __________________________________ * प्रतिसाद देतांना जरी मन हा शब्द वापरत असलो तरी त्याचा अर्थ विचारांचा प्रवाह किंवा एकूण मानसिक अ‍ॅक्टीविटी असाच आहे. मन अशी काही चीज या दुनियेत नाही. तरी सदस्यांनी (काहीही न जमल्यानं) उगीच शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करु नये.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 13/08/2020 - 12:06
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. है शाबास

In reply to by सुबोध खरे

एकदा वाचून कळालेलं दिसत नाही. प्रतिसादाची घाई करु नका. पुन्हा दोनदा वाचा नक्की कळेल. उघड गोष्टी आहेत. एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी घ्याल !

सुबोध खरे 12/08/2020 - 10:22
गा पै साहेब काही लोकांचं लेखन हे नेपाळी भाषेतील वृत्तपत्र वाचल्यासारखं असतं. वाचता तर सगळं येतं पण समजत मात्र काहीही नाही. ))=((

In reply to by सुबोध खरे

तुम्हाला नेपाळी वाचता येतं ही नवी माहिती कळली ! फावल्या वेळात गुरख्याबरोबर ड्युटी केली का क्लास लावला होता ? पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे तो अभ्यास घरच्या घरी सुद्धा केला असेल पण अर्थ समजत नसेल तर वाचायचं कशाला ?

सुबोध खरे 12/08/2020 - 18:21
पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं १२.४१ नेपाळी देवनागरी स्क्रीप्टमधे लिहितात१.०९ हि पश्चात बुद्धी कशी काय आली.? जाता जाता -- लष्करात असताना गुरखा सैनिकांबरोबर बराच वेळ घालवला आहे. आणि त्या शूर पण भोळ्या आणि सरळ मनाच्या माणसांबद्दल अत्यंत आदर आहे.

Rajesh188 12/08/2020 - 23:18
स्वतःच्या अस्तित्वाची भीती हे सर्व. भीती चे मूळ आहे हे संजय क्षीरसागर ह्यांचे मत योग्य च आहे. पण भीती चे खूप. वेगवेगळे प्रकार आहेत त्या वर चर्चा करून त्याचा अभ्यास करून त्या वर उपाय शोधणे गरजेचे पण आहे. अस्तित्वात नसलेल्या संकटाची भीती वाटणे हा मानसिक रोग आहे त्या भीती शी अस्तित्वाची भीती शी काही संबंध नाही

In reply to by Rajesh188

अर्धवटराव 12/08/2020 - 23:56
बर्‍याचदा काहितरी गमावण्याची भिती हि अस्तित्व संपण्याच्या भितीपेक्षा वरचढ ठरते. जीवंत असल्याचं समाधान आणि आनंदप्रापती/दु:खमुक्ती करता आवषयक वाटणार्‍या (आवश्यक असायलाच हवे असे नाहि..) रिसोर्सेसची हमी असल्याचं समाधान, यात अनेक जण रिसोर्सेसला प्राधान्य देतील. कोणि कितीही म्हटलं कि तुमचं अस्तित्व कुठल्याही बाह्य बाबींपासुन अबाधीत आहे, तरी ते दु:खमुक्त आणि/किंवा सुखासीन असण्याला जास्त महत्व दिलं जाणं, हे देखील भितेचं एक कारण आहे. हि लेखमाला बहुतेक या बाबींना स्पर्ष करेलच.

गामा पैलवान 14/08/2020 - 02:18
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो. १.
आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.
काही हरकत नाही. तसंही पाहता माझ्याकडून तो मूळ मुद्दा नव्हता. २.
प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच. ३.
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.
मी लेखिकेच्या या विधानाबद्दल काहीच भाष्य करू इच्छित नाही. सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे. ४.
सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा.
मान्य. मात्र यातनं एक प्रश्न उद्भवतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याचप्रमाणे निद्रावस्थेतून जागृतावस्थेत आणणारी एखादी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. या दोन एजन्सी कदाचित एकंच असू शकतात. त्यांना मन म्हणायला काय हरकत आहे? निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन. ५.
त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य. माऊलींनी असंच काहीसं कुठेतरी म्हटलंय. ६.
तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.
तसं पाहायला गेलं तर मेंदू एक चरबीचा लिबलिबीत गोळा आहे. विशिष्ट स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तो विचार ग्रहण करू शकंत नाही. उदा. : मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.
शाब्बास ! तोच एकमेव मुद्दा आहे. २.
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.
जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं. ३.
निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.
आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत. ४.
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य
मन नाहीचे. अविरत चाललेला विचार प्रवाह शून्य होतो. शांतता प्रस्थापित होते. आपण आपल्यात स्थित होतो. ५.
मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.
मृत मेंदू म्हणजे मनाचं नाहिसं होणं नाही. मेंदू फुल्ली फंक्शनल असतांना (आणि आपण जीवंत असतांना) विचार प्रवाह थांबणं ही जागृत अवस्था आहे. त्याचा मनाशी काहीएक संबंध नाही.

सुबोध खरे 14/08/2020 - 09:37
जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याला ARAS (ascending reticular activating system) म्हणतात. https://en.wikipedia.org/wiki/Reticular_formation#:~:text=The%20ascending%20reticular%20activating%20system%20(ARAS)%2C%20also%20known%20as,wakefulness%20and%20sleep%2Dwake%20transitions.

सुबोध खरे 07/08/2020 - 10:35
या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाबद्दल आपण लिहिता आहात हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मनोविकाराबद्दल एकंदर गैरसमजच जास्त आहेत. ज्यात हे कधीच बरे होणार नाहीत पासून मनोविकार तज्ज्ञ नुसत्या झोपेच्या गोळ्या देतात पासून अशा औषधांचे साईड इफेक्टसच जास्त आहेत आणि त्यांचा काहीही फायदा होत नाही पर्यंत. हि स्थिती सुशिक्षित माणसांची आहे यात अनेकदा डॉक्टर सुद्धा गैरसमजांचे बळी पडलेले दिसतात. मग अशिक्षित माणसात तर हे "बाहेरचं" आहे. करणी केली आहे भूतबाधा आहे पासून मनोविकार तज्ज्ञांकडे गेले तर ते शॉकच देतात पर्यंत. याशिवाय अंधश्रद्धा आणि गैरसमजुती तर बक्कळ आहेतच. आपण जितक्या विस्ताराने लिहाल तितके गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

In reply to by सुबोध खरे

aanandinee 07/08/2020 - 23:57
सुबोध, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. मनोविकारांबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत. मी जे शिकले आहे, पाहिलं आहे ते या लेखमालेत सोप्या शब्दांत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

In reply to by अर्धवटराव

aanandinee 07/08/2020 - 23:58
आपल्या प्रतिक्रियेकरिता धन्यवाद! पुढला भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट करण्याचा विचार आहे. लेखमाला अवश्य share करा. वर लिहिल्याप्रमाणे Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

aanandinee 07/08/2020 - 23:47
डॉ. बिरुटे, भक्ती, रातराणी आपल्या प्रतिक्रियांकरिता खरंच आभारी आहे. मी या वेळी प्रतिक्रियांची विशेष वाट पाहत होते कारण फार वैद्यकीय शब्दांचा मारा होत नाहीये ना, साधारण प्रतिसाद कसा आहे याची मला खूप उत्सुकता होती. आपल्या प्रतिक्रियांनी हुरूप आला आहे

मुळात भय हे एकच आहे > आपण नष्ट होऊ ! याची दोन उपांग आहेत > एक, शरीर नष्ट होईल आणि दोन, प्रतिमा भंग होईल. तुम्ही दिलेले साहीप्रकार या मुळ भीतीत येतात. भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही. आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 03/09/2020 - 09:59
आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.
भिती घालविण्याचा ह्या पेक्षा दुसरा चपखल मार्ग नाही.
ते थांबवण्याच्या दोन हमखास लागू पडणाऱ्या पद्धती म्हणजे ‘मन प्रयत्नपूर्वक दुसऱ्या विचाराकडे वळवणं’ (distraction technique), आणि साक्षी भाव (mindfulness)
आनंदीनी यांनी दुसर्‍या भागात साक्षी भाव (mindfulness) हा मार्ग सांगितला आहे, त्यानेच संक्षी म्हणता आहेत तो उलगडा होऊ शकतो. - (मनस्वी) सोकाजी

सुबोध खरे 08/08/2020 - 11:53
है शाबास तज्ज्ञ-- पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ... सर्वज्ञ -- भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे. ज्याप्रमाणे चित्रपट हा अनेक स्थिर चित्रं गतीमानतेनं डोळ्यासमोरुन नेल्यावर हालचालीचा भास होतो; तसा अनेक विचारांच्या गतीमान प्रवाहामुळे मनाचा भास होतो. हे कळल्यावर तुमची निम्मी भीती संपेल, कारण मन अशी काही अज्ञात शक्ती नाही. एकेक विचार वेगवेगळा आहे. भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे. हा झाला पार्ट वन. _______________________________________ विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे. हे देखिल पिक्चरप्रमाणेच आहे. जेवढा तो व्यक्तीला खरा वाटतो तितका तो सखोल परिणाम करतो. विचार हा भ्रम आहे म्हटल्यावर त्यामुळे भीती निर्माण होणं अशक्य आहे. अर्थात, यासाठी तुमच्याकडे कमालीचा अवेअरनेस (सजगता) हवा. अवेअरनेस म्हणजे नक्की काय हे अप्रिय आठवणींपासून सुटका प्रकरणात तुम्हाला सांगितलं आहेच. कारण तिथेही नेमका हाच प्रश्न होता; लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. ते वाचा म्हणजे तुम्हाला आणखी लाईट पडेल. आणि हे देखिल कळेल की नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, मग मला प्रतिसाद देतांना ते भान कायम राहील. अर्थात, तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! तस्मात, आता मुद्दा भरकटवणे आणि व्यक्तिगत प्रतिसाद देणे टाळाल तर पुन्हा उघडे पडणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 10/08/2020 - 10:11
आम्ही कशाला मुद्दा भरकटवू. आम्हाला एवढाच कळतं कि कोणी एखाद्या विषयात ( येथे मनोविकाराशास्त्रात) पदव्युत्तर तीन वर्षे घासली आहेत. आणि त्यानंतर अनेक वर्षे व्यासंग केला आहे. त्यांना थोडं तरी कळत असेल कि नाही? मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही. विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे. लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती. नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स, काय विचार मौक्तिके आहेत ( हायला पण विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे --इति सर्वज्ञ) म्हणजे हि पण विभ्रम मौक्तिके आहेत तर. तुम्हाला आणखी लाईट पडेल.तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर ! आम्ही काय सर्वज्ञ आहोत का लाईट पडायला? आणि पडला तर उचलून घेऊ हा का ना का

In reply to by सुबोध खरे

असं दिसतंय. तुम्हाला शब्दच्छलाशिवाय काहीही जमत नाही. आता सांगा : १. कुठे असतं हे मन ? २. ज्या विचाराची चर्चा चालू आहे तो वस्तुस्थिती विभ्रमित करण्यापलिकडे काय करतो ? ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ? ४. इतकी वर्ष मेडिसिनमधे (घासून का काय ते) तुम्हाला मुद्दा कसा लक्षात येत नाही ? का न वाचता आणि विचार करता प्रतिसाद ठोकता ? आता लेखिकेचं मत जाणून घ्या म्हणजे जास्त शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 10/08/2020 - 12:56
जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे अर्थातच म्हणून तर लेखिकेला पुढचे भाग सविस्तर लिहायला सांगितले आहेत. आपण तर कोण कुठले-- गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी झालंच तर श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम अशा संतांना सुद्धा न समजलेले अध्यात्म कोळून प्यायला आहात. आम्ही साधे चार बुकं वाचलेले मुमुक्षु भिक्षुक आहोत, आपल्यासारखे शत ग्रन्थ पचवून उच्चपदाला पोचलेले व्युत्पन्न अन सर्वज्ञ थोडीच आहोत?

In reply to by सुबोध खरे

मुमुक्षु भिक्षुक झाली म्हणजे बरीच प्रगती आहे ! आता मुद्दा पकडायला शिका > जाणीव वर्टीकल व्हायला ते फार उपयोगी आहे. भय काय आहे आणि मन अशी काही चीज आहे का ? यावर चर्चा चालू आहे. संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 13:58
जाणीव वर्टीकल व्हायला हायला जाणीव हॉंरीझॉन्टल असते का? संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत. इथे आम्ही कुठे मरायला लागलोय कि संतांकडे वाचवण्यासाठी साकडं घालून बसलोय ? बाकी तुमच्या सारख्या माणसाशी वाद घालायला लै मज्जा यायलीये बघा. तर मुद्दा कसा पकडायचा? हा मुद्दा आहे सध्या. ते मन आणि भय राहू दे बाजूला

In reply to by सुबोध खरे

जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?
अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित विचार म्हणजे जाणीवेचा रोख त्या विचारांप्रमाणेच हॉरिझाँटल असतो. त्याचा परिणाम म्हणजे मुद्दा कळत नाही. काल काय प्रतिसाद दिला ते आज लक्षात रहात नाही. एकदा दुसर्‍याची लायकी, मग प्रतिसादाची लायकी आणि शेवटी स्वतःची लायकी काढतो ! जाणिव वर्टीकल होणं म्हणजे संपूर्णपणे वर्तमानात असणं. करा ट्राय म्हणजे मुद्दा समजेल आणि त्याला मुद्दा पकडता येणं म्हणतात हे पण कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 18:46
मग आडवं पडलं कि जाणीव व्हर्टिकल होईल कि. (म्हणजे झोपेपूर्वी चिंतन केलं कि !) ते आइन्स्टाइन सापेक्षता वादाचा सिद्धांत म्हणून "काही तरी" सांगून गेलाय एवढं सोपं असून तुम्हाला समजलं नाही? सर्वज्ञ असूनही? आश्चर्य आहे ! बघा मुद्दा सापडला का? किंवा पकडता आला का?

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 10/08/2020 - 16:59
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?
हाहाहा!!! ॐ शांती ॐ

In reply to by शाम भागवत

> ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. यापेक्षा काही वेगळा प्रकार होता का ? तुम्ही कल्पनेतलं पिस्तुल काढून समोर नसलेल्या व्यक्तीचा गेम करायचा प्रयत्न करत होता ! आणि तो ही भिजलेल्या बनीयनवर.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 11/08/2020 - 14:07
तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य आहे पहा. कल्पनेतच गेम करायचा तर फडतूस पिस्तूल कशाला काढायचं. त्यातून नेम चुकला तर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा खटला उभा राहील ना( कल्पनेतका होईना) चांगला रणगाडा क्षेपणास्त्र नाही तर गेला बाजार बॉम्ब तरी हवा होता. कल्पनेतच गेम वाजवायचा म्हणजे जोरदार का नको?

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 05:02
संक्षी आपला पहिला प्रतिसाद चांगले होता, त्यातील "भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही ( एक सर्वसामान्य माणूस म्हणून ) पण यात तज्ज्ञ सांगू शकतील जास्त पण आपल्याला एक विचारू का.. का हो तुम्ही सांगल्यांशी भांडता... आता तुम्ही म्हणाल.. येथे डॉ खरे यांनी तुमचं वॉर टिप्पणी केली म्हणून अशी टिपण्णी येते याला काय कारण असू शकेल हे कधी आपल्या मनाला विचारलाय का ? याचं कारण हे असू शकत का ... प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे ,, आणि क्लिष्ट कार्याचे...हि आपली सवय आपण हुशार तर आहातच ( हि चेश्टा नव्हे आपल्या लेखांतून दिसते म्हणून म्हंटले ) पण असा भांडकुदळ पणा करण्यात वेळ का घालवता? आपली अकौंटिंग नयनातील काहीतरी सांगत जा हो .. सगळ्यांना फायदा होईल असो डॉ माधुरी यांच्या कडून त्यातील अजून कळेल तर बरे आणि अजून एक, सर्वांनाच उद्देशून, खास करून वैद्यकीय बाबींबद्दल कोणी लिहीत असले तर त्यांनी आपण कसले डॉक्टर आहोत किंवा त्या विषयातील आपण कोण आहोत हे नक्की लिहावे , सही च्या खाली .. कारण वैद्यकीय विचार, माहिती आणि सल्ला ह्या फार मह्त्वाचया गोष्टी आहेत

In reply to by चौकस२१२

त्यांना सल्ला देण्याचं धाडस करा. मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल.
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
भय हा मूळ प्रश्न आहे, कशाचं भय हे दुय्यम आहे. कारण आपण संपू ही एकमेव भीती सर्व कारणांमागे दडलेली आहे. जर आपल्याला काहीही संपवू शकत नाही हा उलगडा झाला तर कोणत्याही कारणानं भय निर्माण होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 13:04
"....तुमच्याकडे काही समज असेल तर .." संजय क्षीरसागर हे राम... खरंच तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही... सतत दुसऱ्याला अक्कल शिकवत राहा... तुमच्या क्लायंट बरोबर पण असेच वाद घालता काहो ? https://www.youtube.com/watch?v=DCXDyIsPEN8&list=RDWFdNRFAqvDA&index=१२ १:१० विक्रम गोखले टू नाना

In reply to by चौकस२१२

अक्कल तुम्ही मला शिकवतायं ! बघा :
प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे
आणि मी तुम्हाला म्हटलं मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल >तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ? कमाले !

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ 11/08/2020 - 16:13
- 'प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे' मि? कधि तसा आव आणलाय .. २-३ विषयात थोडा अनुभव आहे तिथेच लिहितो, नाट्य, स्थलांतर , ट्रेडिंग ( फिनंसिअल) इत्यादी आणि १-२ आवडी, फिरणे खाणे पिणे एवढेच ,( राजकारण यावर तर सगळेच बोलतात आणि भांडतात ) " त्यांना ( डॉ खरे )सल्ला द्या " म्हणता तुम्ही..... अहो कशाला... बहुतेक मंडळींना त्यांचे लिखाण आवडते ( मतभेद असले तरी) नाही वाटत मला कि ते अनाठावी सर्वन्यानी असे वागतात म्हणून, मग कशाला त्यांना सल्ला देऊ? -'तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ?' मला? कशाला? उलट मी तुम्हाल दाखवून देतोय कि तुम्ही किती भांडताय ते .. बरं तुमचं विषयी काही चांगले बोलावे / चांगला प्रतिसाद तरी तरी तुम्ही गुरकावणार असो तुमचा शब्द शेवटचा आणि खरा... बसा उगाळत

In reply to by चौकस२१२

सोत्रि 03/09/2020 - 10:21
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही
हे का पटलं नाही हे तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं तर काही चर्चा होइल. (संक्षींनी का करत येत नाही हे स्पष्ट केलं आहे.) ता.क.: व्यक्तिगत शेर्‍यांकडे दूर्लक्ष केलं तर साधक बाधक चर्चा (ह्या धाग्याच्या विषयाशी सुसंगत) करता येइल. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 03/09/2020 - 10:08
भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.
कोणतीही भावना हा विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच असतो.
विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.
विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच अतिशय प्रचंड वेगाने होतो आणि तसं होणं हे 'ऑटो पायलट' मोडमधे आपसूकच होते. त्यामुळे विचार खरा वाटू लागतो. जाणीवेत राहून विचारांकडे तटस्थ बघण्याची (mindfulness) साधना करत राहिलं की विचांराना व्यक्तिगत रिस्पॉन्स देणंं हळूहळू कमी होत जातं. - (Mindful होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 03/09/2020 - 11:13
जरी एकवेळ मानलं, की आपण केवळ शरीर नाही, पण आपण शरीर आजिबात नाही हे पटत नाही. संक्षींना आपली शरीर सोडून काही ओळख असते असे वाटते हे वाचून फार आश्चर्य वाटले. (मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही.) माझे शरीर ही माझी ओळख आहेच. म्हणून तर माझे हात पाय कापले जाऊ नयेत अशी माझी अगदी मनापासून आणि तीव्र इच्छा आहे. याबाबत मी जरासाही उदासीन नाही. उदा – मी व्हॉट्स अॅप स्टेटस बाबतीत उदासीन असतो कारण ती माझी ओळख नाही हे मला पुरेपूर पटत. शरीराची जीवापाड काळजी घेऊन शरीर नष्ट होणे ह्यात काही भिण्यासारखे नाही असे म्हणणे – पटण्यासारखे नाही वाटत. त्यामुळे आनंदिनी यांनी उल्लेखलेले भीतीचे विविध प्रकार हे केवळ अध्यात्मिक गैरसमजातून आले आहेत असे नाही वाटत. तसे मानणे या गोष्टींना फार अंडर एस्टिमेट करणे होईल. डिप्रेस्ड व्यक्तीला "डिप्रेस्ड राहू नकोस ना मग." असा सल्ला दिल्यासारखा. अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म, पिनपॉइंट समस्यांवर आहे. त्यामुळे हे अवांतर होते आहे.

In reply to by शा वि कु

सोत्रि 03/09/2020 - 12:33
अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म
नेमकं उलटं होतय. शारिरीक पातळीवरची जाणिव ही स्थूल (Gross Reality), त्याच्यापलीकडची जाणिव ही सूक्ष्म (subtle reality).
मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही
ही मानण्याची गोष्ट नसून अनुभूतीची अवस्था आहे. - (शरीर आणि मन ह्यांच्या पलीकडचा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 03/09/2020 - 14:18
हे असं होतं "जीवन समरसून जगा, जीवनात चढ उतार येतात" हे जेनरिक वाक्य ओके आहे. एक जीवन जगण्याचा मंत्र म्हणूनसुद्धा चांगले आहे. पण हे वाक्य क्रॉनिक डिप्रेशन सारखा रोगावर इलाज आहे काय ? किंवा " डेबिट व्हॉट कमस इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट" हे रियल अकाउंट्स चे मुख्य सूत्र आहे, जे बारावीत शिकवले जाते. हे चुकीचे आजिबात नाही, आणि खरतर यातच सर्वकाही समावल आहे. पण सीए फायनल ला येणारे प्रश्न केवळ या ढोबळ सूत्राने सोडवता येत नाहीत. अश्या प्रकारे मला "शरीराच्या जाण्याची भीती अनाठायी वाटते" हे वाक्य ढोबळ वाटते. तुम्हाला सूक्ष्म वाटत असेल तर ओके.

In reply to by शा वि कु

आता जिथे बसला आहात तिथे, खुर्चीला पाठ टेकवून शांतपणे डोळे मिटा. तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलं आहे आणि आपल्याला कळतंय. आपणच शरीर असतो तर असं कळणं शक्य नाही. या नंतर धारणा निस्सरण आणि मी डिवेलप केलेली एक ध्यानपद्धती यामुळे आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव सघन होत जातो. यथावकाश निद्रेत ही अनुभुती आली की शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय ही स्थिती येते. आपण मृत्यूला पार करतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥ या श्लोकाचा नेमका अर्थ तो आहे. संकेतस्थळावरच्या लोकांना अध्यात्मात शून्य रस आहे (इथे बहुतेक देवभोळे आहेत) त्यामुळे इथे त्याविषयीचं लेखन मी बंद केलं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु 03/09/2020 - 14:55
मान्य आहे, अशी अनुभूती येते. पण याचा शरीर सोडून स्वची जाणिव असू शकते असा अर्थ नाही वाटत. उदाहरणार्थ , मेंदुशिवाय/हृद्य थांबल्यावर/चेतातंतूच्या जाळ्याशिवाय ही जाणीव असेल का ? शंका वाटते.

In reply to by शा वि कु

फक्त व्यक्त जाणण्यासाठी आहे. स्वतःला जाणण्यासाठी न्यूरो सिस्टमचा काहीएक उपयोग नाही कारण आपण अंतीम आहोत. स्व स्वतःला जाणू शकत नाही कारण जाणण्यासाठी आपण स्वतःला स्वत:पासून वेगळं करु शकत नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 04/09/2020 - 08:48
आपण शरीर नाहि.. कारण शरीर अ‍ॅज सच काहि नाहि. अवयवांच्या असेम्ब्लीला शरीर म्हणतात. अवयव देखील अस्तीत्वात नाहि. एक प्रचंड पेशी समुह म्हणजे अवयव. पेशी देखील अस्तीत्वात नाहि. काहि रसायनांची असेम्ब्ली म्हणजे पेशी... असं कितीही सुक्ष्मात जाता येते. शरीर म्हणा किंवा पर्वत, सूर्य म्हणा किंवा अमीबा... तत्वतः हे असं काहिच अस्तीत्वात नसतं.. आपल्याला कुठलिही गोष्ट तिच्या स्वरुपानुसार कळत नसुन कार्यावरुन कळते. तुम्ही कार्याचे कॉण्टेक्स्ट बाद करत चला.. मग प्रत्येक गोष्ट एका युनिफॉर्म ऑब्जेक्टमधे परावर्तीत व्ह्यायला लागते. या प्रकारे विश्वाची युनिफॉर्मीटी लक्षात आलि कि सारं सुख-दु:ख त्यात विरघळुन जाईल. डिप्रेशन वगैरे तर नावाला देखील राहाणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 04/09/2020 - 09:21
तुमचं म्हणणं अर्थातच बरोबर आहे. पण मायक्रो असण्याने मॅक्रो का रद्द करावा ? आणि अणू/ पेशी/केमिकल्स/अवयव/शरीर हे माझ्या "मी" असण्यासाठी मस्ट आहेत. इतकेच.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 04/09/2020 - 23:52
अजीबात रद्द करु नये. इन फॅक्ट या सर्व आपला "मी' च्याच अवस्था आहेत. त्यातल्या किती जाणवतात, किती नाहि हे व्यक्तीपरत्वे/परिस्थीतीनुसार ठरतं.. पण त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडीटीला बाधा येत नाहि.

Rajesh188 08/08/2020 - 12:19
भीतीच्या ह्या सर्व प्रकारातील एका प्रकारची भीती जास्तीजास्त लोकांना असते. सर्वांना कशाची तरी भीती वाटतं असते. मी दुचाकी वर माग बसलो की गाडी चालवणं रा काळजी पूर्वक गाडी चालवत नाही कधी ही accident करू शकतो अशी भीती वाटते. पण स्वतः चालवत असताना ती भीती वाटतं नाही.

पियुशा 08/08/2020 - 12:25
Dr. मैडम आपन खुप छान संमजावत आहात पुढचे भाग येऊ दया आम्ही वाट पाहतोय, आणी हो एक महत्वाचे इथे स्वयंघोषित महावतार पन आहेत ज्याना सगळ सगळ कळत ते भोचकेगिरी करायला आले तरी दुर्लक्ष करा ही नम्र विनंती :)

लेख वाचुन असे वाटले कि लेखात उल्लेखिलेल्या सगळ्या भीती मला कमी अधिक प्रमाणात वाटतात. : )
सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
माझ्या एका मित्राची आई टी.वी वर देखील साप पाहु शकत नसायची. त्यावेळी छायागीत चित्रहार मध्ये नगीना नागीन वा तत्सम नागधारी चित्रपटातील गाणी सर्रास लागायची तेव्हा त्या, त्या गाण्यापुरते मान वळवुन घेत असत.

In reply to by आनन्दा

आनन्दा 10/08/2020 - 08:22
आपण हे लक्ष्यात ठेवूया की शेवटी विचार म्हणजे केमिकल लोच्या असतो. त्यामुळे एकदा केमिकल लोच्या झाला तर तो केवळ दुसऱ्या केमिकलनेच बारा होऊ शकतो!!

वीणा३ 11/08/2020 - 01:24
माहितीपुर्ण लेख!!! पुढे नक्की लिहा. कधी कधी उलट सुलट प्रतिसाद वाचून पुढचा लेख लिहायची इच्छा जाते काही लेखकांची. दुर्लक्ष करा हि विनंती आहे. आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की. कधी कधी आपल्याच आसपास हे त्रास/लक्षणं असणारं कोणी आहे हे जाणवून आपसूक मदत केली जाते, किमान सहानभूती तरी दाखवली जाते.

In reply to by वीणा३

शाम भागवत 11/08/2020 - 09:11
आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की.
या अगोदरची ही सत्यघटनेवर आधारित कथा\a> मुद्दामहून वरती आणलीय. त्यामुळे १. ही वाचाल तर मग त्यांच्या अगोदरच्या कथाही वाचतच राहाल. २. बुध्दीमान असाल तर तुमच्या बुध्दीला त्या कथा खाद्य पुरवतील. ३. चर्चा वाढवत नेण्यासाठी यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही. ४. लेखिका मानसशास्त्रातीलच तज्ञ असल्याने व बराच काळ मिपावर असल्याने, सक्रीय सभासदांच्या इथल्या वावरावरून त्यांनी त्या सभासदांना नक्कीच जोखले असणार. त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे हे त्यांना नक्कीच माहिती असणार. नव्हे, तीच तर त्यांची विशेषिता आहे. त्यामुळे कोणितरी त्यांना त्रास देईल, त्या त्रास करून घेतील, त्यामुळे त्या त्यांचे लेखन कार्य थांबवतील अशी शक्यता नाही. ५. आत्तापर्यंतच्या होत्या त्या कथा होत्या. बरोबरीच्या नात्याने चर्चा करणे व आपले मत मांडणे बरोबर होते. पण आता मात्र त्या त्यामागचे शास्त्र सांगताहेत. त्यामुळे ते समजावून घेणे, आणखी नीट समजण्यासाठी शंका विचारणे हे योग्य होईल. ६. तसेच आपले मत मांडता येईल. तो हक्क सर्वांचाच आहे. पण यावेळेस त्याबरोबर त्याची कारणमिमांसाही माडली तर ती अभ्यासाच्या दृष्टिने उत्तम होईल.. वीणाताई, हे फक्त तुम्हाला उद्देशून लिहिल्यासारखे वाटले तरी, ते सगळ्यांसाठीच लिहिले आहे. कृपया वैयक्तिक घेऊ नये.

In reply to by शाम भागवत

यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही ?
भय हाच तर स्व उलगडण्यातला महत्त्वाचा अडथळा आहे आणि विचारांची प्रक्रिया कळली की तो दूर होतो. याला सांख्ययोग म्हणतात. तुमचं पिस्तुल घेऊन काल्पनिक व्यक्तीला ठार करणं हा भयाचाच प्रकार आहे. याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे. आता ते ॐ शांती शांती सोडा आणि माझे प्रतिसाद नीट वाचा, तुमची भीती जाईल.

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 11/08/2020 - 14:11
याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे. पहा शामराव आम्ही म्हटलं नव्हतं का? येथे कुणालाही काहीही येत नाही आणि सर्वच बाबींची सर्वांची जाण शून्य आहे. तुम्हाला "ओम शांती शांती" चा तरी अर्थ कळलाय का?

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 11/08/2020 - 14:22
मी तर बाॅ एकदाच “शांती“ म्हणतो. ते दोनदा का म्हणतात काही कळत नाही. कदाचित त्यांना डबल शांतीची जरूरी असावी. :)

गामा पैलवान 12/08/2020 - 02:50
अवांतर : संजय क्षीरसागर, १. या धाग्यात वर तुम्ही म्हणता की :
मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.
पण इथे तर तुम्ही संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे असं म्हणता :
संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे. तो मनाच्या अंतरंगात फार खोलवर उतरला आहे. मनाच्या महालाचे सर्व कानेकोपरे त्याच्या परीचयाचे आहेत. मनाच्या विमनस्कतेचं वर्णन तो अनेक अंगानी आणि कलात्मकतेनं करु शकतो.
तर मग तुम्हांस मन म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? २. एके ठिकाणी तुम्ही मनाची व्याख्या केलीयेत :
मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट.
आणि आता म्हणता की मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ....? ३. इथे म्हणता की :
जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.
आणि वर म्हणता की :
विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे.
म्हणजे विचार अस्तित्वात असतात तर. हे विचार मनाच्या नसतील तर नेमक्या कशाच्या आधारे अस्तित्वात असतात? कुतूहल म्हणून विचारतो आहे. माझा मनाचा अभ्यास नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमचा मनाचा अभ्यास नसला तरी माझ्या सर्व लेखनाचा जबरदस्त अभ्यास आहे ! तुम्ही तो अत्यंत मनःपूर्वक केलायं आणि तुमच्या विचारांची दिशाही एकदम पर्फेक्ट आहे. त्यामुळे तुमचा प्रश्ण आवांतर नाही, अत्यंत समर्पक आहे. १. गर्दी अशी चीज अस्तित्वात नाही, व्यक्ती समूहाचं ते सर्वनाम आहे. एकेक व्यक्ती वेगळी झाली तर गर्दी शून्य होईल. एक्झॅक्टीली तसंच मनाचं आहे, एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही. ज्याप्रमाणे गर्दी या सर्वनामाचा आपण उपयोग करतो त्याप्रमाणे मन या निदर्शकाचा उपयोग आहे. पण त्यामुळे एक सर्वात मोठा झोल झाला आहे; मन अशी काही तरी अज्ञात शक्ती शरीरात आहे आणि ती सर्व व्यक्तीगत जीवनावर सत्ता गाजवते असा समज दृढ झाला आहे. आणि सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत. थोडक्यात, 'मन आहे' अशी चुकीची समजूत एकदा दृढ झाली की सगळी उपाय योजना, सगळा अप्रोच हुकतो. २. मनाची नेमकी व्याख्या ही आहे : मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. तो मेंदूच्या आधारे चालतो आणि आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. जर तुम्हाला एकेक विचार वेगळा दिसायला लागला तर तुम्ही त्या अविरत प्रवाहातून मुक्त होण्याची शक्यता आहे > त्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 12/08/2020 - 18:23
सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत. सगळेच्या सगळे कसे काय बेअक्कल निपजले आहेत बुवा?

In reply to by सुबोध खरे

त्यात तुम्हाला अर्धवट उप-प्रतिसाद देण्याची घाई ! एकदम अक्कल, लायकी अशा गोष्टींवर कशाला घसरता ? तुम्ही स्वतः शरीरशास्त्राचा अभ्यास केला आहे. संपूर्ण देहाचं डिसेक्शन अभ्यासक्रमात असेल, हजारो पेशंटस तपासले असतील. मानसशास्त्र हा तुमचा विषय नसला तरी एक गोष्ट सांगा : कुठे असतं हे मन ? अर्थात, तुमच्याकडे याचं उत्तर नाही ! मग आता निरर्थक प्रतिसाद न देता, किमान सभ्यतेनं लेखिकेचं म्हणणं ऐकाल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 13/08/2020 - 09:31
श्री सर्वज्ञ संक्षी कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे. परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही. एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात. ऑक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हताच का? किंवा ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही म्हणून तो नसतोच असे म्हणत आहात. आपल्यालाच सर्व काही कळतं हा दंभ झाला असल्यामुळे असा होतंय. फंक्शनल एम आर आय नावाची काही गोष्ट असते ज्याने आपल्या मेंदूचा आणि मनाचा व्यापार कसा चालतो याचे गूढ आता उलगडायला लागले आहे. >फंक्शनल एम आर आय हा मी ज्या शास्त्राचा ( क्ष किरण शास्त्र) अभ्यास आणि व्यवसाय करतो आहे त्याचाच एक भाग आहे. यामुळे याबद्दल मला थोडी फार माहिती आहे. काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच. तोवर तुम्ही आपला पूर्व ग्रह कुरवाळत रहा. जाता जाता -- फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. Studying mind and brain with fMRI https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2555441/ पहा आपल्याला झेपतोय का?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 13/08/2020 - 09:39
Can fMRI Read your Mind ? https://www.imagilys.com/fmri-mind-reading/ A selective review of dharana and dhyana /fmri https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0975947616302406 जिज्ञासूंनी f mri गुगलून पाहावे. बाकी हा धाग्याचा विषय नव्हे म्हणून मी यावर अधिक टिप्पणी करत नाही.

In reply to by सुबोध खरे

किमान मुद्दा धरुन आहे; चला एवढी तरी प्रगती झाली ! १.
कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे . परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.
तुम्हाला ते माहिती नाही ! मला समजावून सांगण्याचा प्रश्ण कुठे येतो ? तुम्ही नक्की जागा सांगा विषय संपला. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा पत्ता तुम्ही काय सांगणार ? २.
एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.
तुम्ही विज्ञान शिकला आहात, एखादी गोष्ट सिद्धच होत नसेल तरीही ती आहे असं मानता का ? प्रथम रोगनिदान आणि नंतर उपचार अशी पद्धत आहे. तुम्ही रोग गृहित धरुन उपचार करता का ? शिवाय तुमचा हा युक्तीवाद तुमच्याच पहिल्या दाव्याला (ते मला माहिती आहे) धोबीपछाड मारतो. इतकी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ? ३.
काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच
बघा सगळं ओमफस्स करुन ठेवलंत ! थोडक्यात, तुमच्याकडे उत्तर नाही. ४.
फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. पहा आपल्याला झेपतोय का?
इतके अंतर्बाह्य पोकळ प्रतिसाद असल्यावर तुमच्या विधानांचा काय पाड लागणार ? तस्मात, झेपण्याच्या गोष्टी सोडा. तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. त्यापेक्षा त्या निबंधाचं तुमचं आकलन लिहा. (अर्थात, ते सुद्धा लिहायची गरज नाही कारण तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे)

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/08/2020 - 18:22
तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. झेपत नाही असे सरळ प्रामाणिकपणे म्हणा कि कशाला मला सगळंच समजतं म्हणून आव आणत आहात

In reply to by संजय क्षीरसागर

गामा पैलवान 13/08/2020 - 02:26
संजय क्षीरसागर, प्रश्नाच्या प्रशंसेबद्दल आभार. अभ्यासाबद्दल म्हणाल तर ते माझं नसून गुग्गुळाचार्यांचं कर्तृत्व आहे. असो. एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही, असं तुमचं मत आहे. पण हा एकेक विचार सुट्टा करायचा तो कशाच्या पार्श्वभूमीवर? त्याचप्रमाणे तो सुट्टा न बघता सलग बघायचा झाला तरी पार्श्वभूमी हवीच ना? मग तिलाच मन का म्हणू नये? तुम्ही म्हणता तो दृक-श्राव्य चलतपट मेंदूच्या आधारे चालतो. तो दाखवणारा आणि पाहणारा एकंच आहे. तो म्हणजे जाणीवस्वरूपी आत्मा. पण तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रक्षेपकाच्या भिंगामागे चित्रफीत फिरंत असते, तिच्यावर चित्रपट चित्रमुद्रित असतो. पण प्रक्षेपकाच्या भिंगाला डोळा लावून चित्रपट दिसंत नसतो. त्यासाठी पांढरा पडदा लागतो. हा पांढरा पडदा म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संकेतस्थळाचा दर्जा उंचावयचं मनावरच घेतलंय ! १. प्रथम तुमच्या आकलनातली एक चूक दुरुस्त करतो :
तो दाखवणारा आणि पाहणारा एकच आहे
असं नाही >माझा प्रतिसाद बघा : आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. २. हा चित्रपट कशावर चालतो हा तुमचा प्रष्ण नंतर घेऊ. प्रथम हे बघू की हा दृक-श्राव्य चलतपट प्रक्षेपित कोण करतं ? कारण असा प्रक्षेपण करणारा जो कुणी आहे त्यालाच तर मन समजलं गेलंय ! आणि माझं म्हणणंय की असा प्रक्षेपण करणारा कुणीही नाही. काय सोडवणूक आहे याची ? कारण प्रक्षेपक मूळ आहे, प्रक्षेपण दुय्यम आहे. प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं ! मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. प्रोजेक्शन झाल्यावर (म्हणजे चित्रपट चालू झाल्यावर) त्याला दिलेल्या रिस्पाँन्सचा तो अभ्यास आहे. त्यामुळे लेखिका सोयिस्करपणे चर्चेतून अंग काढून घेऊन नव्या पोस्ट टाकतेयं. आणि हा प्रक्षेपकच सगळ्या संत-महंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, कवि-लेखकांनी, तुम्ही-आम्ही (ज्याम) गृहित धरला आहे या अनुषंगानं आता एकदम अपूर्व उलगडा करतो ! प्रक्षेपण किंवा मेंदूत अविरत चाललेला हा दृक-श्राव्य चलतपट म्हणजे आपलंच रुपांतरण आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे बेसावधपणा ! सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा. रात्री हा चलतपट स्पष्ट दिसतो त्याला आपण स्वप्न म्हणतो; दिवसा उजेडामुळे तो अस्प्ष्ट दिसतो; त्याला आपण विचार म्हणतो; इतकाच काय तो फरक ! त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान ! ३. आता तुमचा प्रश्ण : तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे. __________________________________ * प्रतिसाद देतांना जरी मन हा शब्द वापरत असलो तरी त्याचा अर्थ विचारांचा प्रवाह किंवा एकूण मानसिक अ‍ॅक्टीविटी असाच आहे. मन अशी काही चीज या दुनियेत नाही. तरी सदस्यांनी (काहीही न जमल्यानं) उगीच शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करु नये.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 13/08/2020 - 12:06
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. है शाबास

In reply to by सुबोध खरे

एकदा वाचून कळालेलं दिसत नाही. प्रतिसादाची घाई करु नका. पुन्हा दोनदा वाचा नक्की कळेल. उघड गोष्टी आहेत. एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी घ्याल !

सुबोध खरे 12/08/2020 - 10:22
गा पै साहेब काही लोकांचं लेखन हे नेपाळी भाषेतील वृत्तपत्र वाचल्यासारखं असतं. वाचता तर सगळं येतं पण समजत मात्र काहीही नाही. ))=((

In reply to by सुबोध खरे

तुम्हाला नेपाळी वाचता येतं ही नवी माहिती कळली ! फावल्या वेळात गुरख्याबरोबर ड्युटी केली का क्लास लावला होता ? पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे तो अभ्यास घरच्या घरी सुद्धा केला असेल पण अर्थ समजत नसेल तर वाचायचं कशाला ?

सुबोध खरे 12/08/2020 - 18:21
पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं १२.४१ नेपाळी देवनागरी स्क्रीप्टमधे लिहितात१.०९ हि पश्चात बुद्धी कशी काय आली.? जाता जाता -- लष्करात असताना गुरखा सैनिकांबरोबर बराच वेळ घालवला आहे. आणि त्या शूर पण भोळ्या आणि सरळ मनाच्या माणसांबद्दल अत्यंत आदर आहे.

Rajesh188 12/08/2020 - 23:18
स्वतःच्या अस्तित्वाची भीती हे सर्व. भीती चे मूळ आहे हे संजय क्षीरसागर ह्यांचे मत योग्य च आहे. पण भीती चे खूप. वेगवेगळे प्रकार आहेत त्या वर चर्चा करून त्याचा अभ्यास करून त्या वर उपाय शोधणे गरजेचे पण आहे. अस्तित्वात नसलेल्या संकटाची भीती वाटणे हा मानसिक रोग आहे त्या भीती शी अस्तित्वाची भीती शी काही संबंध नाही

In reply to by Rajesh188

अर्धवटराव 12/08/2020 - 23:56
बर्‍याचदा काहितरी गमावण्याची भिती हि अस्तित्व संपण्याच्या भितीपेक्षा वरचढ ठरते. जीवंत असल्याचं समाधान आणि आनंदप्रापती/दु:खमुक्ती करता आवषयक वाटणार्‍या (आवश्यक असायलाच हवे असे नाहि..) रिसोर्सेसची हमी असल्याचं समाधान, यात अनेक जण रिसोर्सेसला प्राधान्य देतील. कोणि कितीही म्हटलं कि तुमचं अस्तित्व कुठल्याही बाह्य बाबींपासुन अबाधीत आहे, तरी ते दु:खमुक्त आणि/किंवा सुखासीन असण्याला जास्त महत्व दिलं जाणं, हे देखील भितेचं एक कारण आहे. हि लेखमाला बहुतेक या बाबींना स्पर्ष करेलच.

गामा पैलवान 14/08/2020 - 02:18
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो. १.
आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.
काही हरकत नाही. तसंही पाहता माझ्याकडून तो मूळ मुद्दा नव्हता. २.
प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच. ३.
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.
मी लेखिकेच्या या विधानाबद्दल काहीच भाष्य करू इच्छित नाही. सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे. ४.
सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा.
मान्य. मात्र यातनं एक प्रश्न उद्भवतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याचप्रमाणे निद्रावस्थेतून जागृतावस्थेत आणणारी एखादी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. या दोन एजन्सी कदाचित एकंच असू शकतात. त्यांना मन म्हणायला काय हरकत आहे? निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन. ५.
त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य. माऊलींनी असंच काहीसं कुठेतरी म्हटलंय. ६.
तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.
तसं पाहायला गेलं तर मेंदू एक चरबीचा लिबलिबीत गोळा आहे. विशिष्ट स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तो विचार ग्रहण करू शकंत नाही. उदा. : मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.
शाब्बास ! तोच एकमेव मुद्दा आहे. २.
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.
जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं. ३.
निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.
आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत. ४.
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य
मन नाहीचे. अविरत चाललेला विचार प्रवाह शून्य होतो. शांतता प्रस्थापित होते. आपण आपल्यात स्थित होतो. ५.
मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.
मृत मेंदू म्हणजे मनाचं नाहिसं होणं नाही. मेंदू फुल्ली फंक्शनल असतांना (आणि आपण जीवंत असतांना) विचार प्रवाह थांबणं ही जागृत अवस्था आहे. त्याचा मनाशी काहीएक संबंध नाही.

सुबोध खरे 14/08/2020 - 09:37
जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याला ARAS (ascending reticular activating system) म्हणतात. https://en.wikipedia.org/wiki/Reticular_formation#:~:text=The%20ascending%20reticular%20activating%20system%20(ARAS)%2C%20also%20known%20as,wakefulness%20and%20sleep%2Dwake%20transitions.
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते.

स्मृतीची पाने चाळताना: चार

चंद्रकांत ·

नोकरीच्या वाटेने निघालेली पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! >>> ओढ कायम राहते , खरय . !

नोकरीच्या वाटेने निघालेली पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! >>> ओढ कायम राहते , खरय . !
आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले.

हागिया सोफियाचे निमीत्त

माहितगार ·

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्‍याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे. काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ? एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले.

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

अनिल चव्हाण रामपुरीकर ·

अभ्या.. 28/07/2020 - 14:08
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा. तुम्ही आकडा टाकून वीज घेता. तुम्ही वारेमाप खर्च करुन लग्न समारंभे करता. कुठलाच टॅक्स न देता स्कॉर्पिओतून फिरता. व्यापार जमत नाही म्हणून आडत्याला शरण जाता आणि भाव मिळत नाही म्हणून बोंबलता. आडती लोक शहरी लोकांना जास्त भावात विकून कमावतात म्हणून विव्हळता. शहरी लोक तुमच्या हितासाठी त्यांची सगळी कर्जे विनामाफीची फेडून वर सगळे टॅक्स भरुन तुमच्या हितासाठी धडपडतात तर त्यांच्याच नावाने ओरडता. शहरी लोक इतक्या प्रेमाने अ‍ॅग्रो पर्यटनाला येतात तर तिथेही तुम्ही त्यांना नाडता. भाव मिळत नाही म्हनून कांदा, टमाटे आणि दूध रस्त्यावर ओतायचा माजुरडे पणा करता. तुम्हाला पिक, जमीन, भाव, बाजार, शिक्षण, घर ह्या कशातलेच व्यवस्थापन जमत नाही तरीही शेत सोडवत नाही आणि ते दुसर्‍यालाही घेऊ न देता रडता. राजकारण्यांना एकगट्ठा मताची लालूच दाखवून पिकविमा, कर्जमाफी, विज्बिलमाफी, सवलती अशा गोष्टी पदरात पाडून घेऊन परत तडफड करता. . .तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 28/07/2020 - 14:59
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !! त्यासाठीच दिलाय तो प्रतिसाद

In reply to by प्रसाद गोडबोले

आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या मग ठरवु काही बोलायची गरज आहे का नाही ते. @मार्कस्_ऑरेलियस

In reply to by अनिल चव्हाण रा…

कशाला करताय इतकी तोट्यातली शेती , फुंकुन टाका जमीन अन मस्त शहरात जाऊन राव्हा ना , मस्त फॉर्चुनर घ्या , "पनवेल"ला जाऊन पैसे उडवा ! पैसे गेले तरी चालतील पण खेळ झाला पाहिजे =)))) तुमची शेतजमीन विकायची असल्यास लोकेशन , क्वोट आणि मोबाईल नंबर सांगा.

In reply to by अनिल चव्हाण रा…

तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!

In reply to by अनिल चव्हाण रा…

तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!

In reply to by अभ्या..

सर टोबी 28/07/2020 - 22:48
तसेच आक्रस्ताळ्या प्रतिसादाशीही सहमत नाही. प्रथम शेतीविषयक त्रुटींविषयी जाणून घेऊ: शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान बदलवून टाकणारी सहकार पद्धत गैरव्यवहार आणि राजकारण यामुळे पूरती मोडकळीस आणली. एके काळी सहकारी क्षेत्राने निव्वळ शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसाय जसे सूत गिरणी, मद्यार्क, वीज इ. क्षेत्रात पाय रोवले होते. महाराष्ट्रात तर सहकार क्षेत्राने अपना बाजार, अभियांत्रिकी, पेट्रोल पंप, असे नवनवीन क्षेत्रात जम बसविण्यास सुरुवात केली. आज तेच सहकार क्षेत्र जेमतेम शेतीपुरते टिकून आहे. सहकारी पध्धतीने शीतगृहांची निर्मिती, पुरवठ्याच्या नियंत्रातून बाजार भावाचे नियोजन, सामुदायिक रित्या ठरवलेली पीक पद्धत ज्यात सर्वच शेतकरी एकच एक उत्पादन घेण्याऐवजी भिशी पध्धतीने उत्पादन घेतील अश्या अनेक कल्पक गोष्टी करू शकतात. आता प्रतिसाद देणार्यांकडे वळु. प्रथम आकडा टाकण्याची चैन असणारे, स्कॉर्पियोतून फिरणारे, सोन्याचा गोफ घालणारे, लग्न कार्यात मोठा खर्च करणारे शेतकरी फक्त मोठ्या शहरांच्या आजूबाजूला बागायती शेती करणारे असतात. निवडणुकीच्या वेळेस होडीतून जाणारे, डोंगर चढून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे जे फोटो येतात ना अशा दुर्गम भागात गरीब आणि जिरायती शेती करणारा शेतकरी असतो. आणि बागायतीचं जरी म्हणाल तरी खालील गोष्टींचा विचार करा आणि आपला प्रतिसाद किती उथळ होता ते बघा:
  • शेतकरी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त झाला आणि कोरोनाच्या फेऱ्यात अडकला. यात कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः फायद्यापासून दुरावला. याला कांदा निर्यातीवरील बंदीही कारणीभूत आहे.
  • शेतकऱ्यांना कृषी माल हवा त्याला विकता येणं हि एक प्रकारे अडत व्यवसायाचीच सुधारित आवृत्ती आहे. म्हणजे त्यात किमान हमी भावाची शाश्वती नाहीच.
  • अजून एक. नुसती कल्पना करून बघा. तुम्हाला काही कारणाने तुमची मिळकत विकायची आहे आणि तुम्हाला कळतं कि सरकारने त्यावर आरक्षण टाकलं आहे. ती जी कळ उमटेल ना काळजात ती शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली असते.

In reply to by अभ्या..

आता तुमचे सर्व मुद्दे खोडुन काडतो ,, १ आकडे ,,,, एक वेळेस सर्च करा महाराष्ट्रातील किती शेती सिन्चन क्षेत्रात येते न किती कोरड वाहु आहे,,, अर्धवट माहीती धोक्याची असते, जिथे विज नाही, आली तरिही फिक्स टाइम नाही,, राहाता राहिला प्रश्न आकड्यचा आता नियम बदलले आहेत कोणी ही विज चोरु शकत नाही ,, काहि जण चोरत असतील तर अस नाही ना की सर्वच जण चोरत असतिल,,, आणि जर तस असेल तर शहरात राहणारे सर्व जण श्रिमंत पाहिजेत ना मग कशाला लोकल ने प्रवास करता, भाड्याच्या घरात राहाता बी एम ड्ब्लु घेउन फिरा ना सर्व,,,, आता २. लग्न खर्च ,,, तुमच लग्न झालय का ,, झाल असेल तर तुम्ही कोर्ट marriage केल आहे का ??? नसेल तर का नाही केल,, आणि लग्न नसेल केल तर का नाहि करनार???????, का कमी पना वाट्तो ????? ,,,, आता ३ टॅक्स ,, इ बूड्बक ,, अभि नये कानुन के हिसाब से ५,००,००० के उपर वालो को भी टॅक्स देना होगा ,, जे एका सामान्य शेतकर्‍याच (२-३ एकर वाले) ३-४ वर्षाच पन उतपन्न नसत.,,, आता स्काॅर्पिओ त्याला तुम्ही घेउन दिली काय???? ४ .. हे मात्र अती झाल जो जगाला जगवतो त्याला व्यापार शिकवणार तुम्ही ,, अरे बाबा त्याला वेळ कुठाय ,, एक महिन्यात २-४ वेळा खुरपण एक दोन वेळा पाळी टाकावी लागते,, ति काय तुम्ही करुण देनार???? कधी केलय का हे काम ऐकुन तरि आहात का,, हे आस असत म्हनुण, ,, आता भाव सोडुन द्या कशाला माझ तोंड उघडता, शिक्षका चा पगार at the time of independence and now or ( today ),,, n the cost of food grains at the time of independence and now,, you will find a huge difference about 400 times ,, हे लिहीनारा पण एक शेतकरीच आहे म्हनुण ते शिक्षण न बाकी उपदेशाचे डोस देउ नका,,.,,! आणि टॅक्स भरता म्हनुन ऊडु नका तुम्हाल इनकम रिटर्न मिळत,, तुमच्य टॅक्स पेक्षा जास्त बियान अन खत जमिनीत ओततो जे येइल का नाही ग्यारन्टी नसते,, घेतली का कधी असली रिस्क ,, ओतले का कधी हजरो रुपये जमिनीत???? आले मोठे व्यापार अन् भाव शिकवायला. ओय!!!!! AGRO पर्यटन ,,, शहरी च नाही जगातील कोणाताही व्यक्ती जर सहज म्हनुण शेतात आला तर आम्ही असेल तो रानमेवा खाउ घातल्या शिवाय त्याला जाउ देत नाही ,, त्याला काहि त्रास असेल तर मुक्काम करायला लावतो. Without expecting and accepting a single penny from him/them,, can u do that ,,???????. रात्री कोणी बेल वाजवली तर पोलिस स्टेशन ला कॉल करनारे, आम्हाला म्हणता आम्ही शहरी लोकांवर ओरडतो,,, खोटा आरोप करता,,, वाह् रे वाह !!!! ५ .. भाव नाहि मिळाला तर travel expenses and wages देउ शकु एवढ पण उतपन्न नाहि निघत,, मग तुम्हि देनार का ते पैसै??. काय जोक करता राव ६,,,६ अन हे व्यवस्थापन कुठुन आनल, असु देत,, एक महिन्याचा ५०,००० पगार लेट झाला तर बजेट बिघडल अन् घर खर्च कमी करनारे,,, तुम्ही जो ५०,००० सहज जमिनीत ओततो अन १,००,००त वर्ष काढतो एखद्या एम बी ए ला लाजवेल अस व्यस्थापन करतो,, त्याला मॅनेजमेंट येत नाही अस म्हनता.... कमाल !!! ,, ७ आता मात्र संयम संपला,, लाज वाट्ते का काळी आई विक म्हणायला,,, जर असाच विचार करून सगळ्यांनी जमीनी विकल्या तर खाणार काय ?????? ,., ८ ... ओ राजकारणी ,, पिक विमा, कर्ज माफी ४-५ वर्षाला एकदा होते,, दररोज नाही.. ,, अन आताच तर म्हनालात आकडे टाकतो,, तरिहि विजबिल माफी घुसवली ,, तरिही सांगतो. आम्हाला फक्त ३-५ ₹ पर युनिट बिल ,, म्हणजे ५०० ₹ पण बिल येत नाही ,, मग आम्ही कधी माफी मागितली, उलट आता लॉकडाउन मधे बिल माफी कोण मागतय.,, ज्या शेतकर्‍याच्या शेतात पाणी नाही मोटर नाही ते पण मागतात का हो विजबिल माफी????? हे सर्व फक्त तुम्हालाच ,, तुमच्या बाल बुद्धीची किव येते.. तुम्हाला कोणी अधिकार दिला , शितावरुन भाताची परिक्षा करायला. आधि नांगरट न पाळी मधला फरक सांगा.,,, उचलली जिभ न लावली टाळाला.. टिप : हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही. Last but not least ,, Don't talk about anything until and unless you have therotical as well as practical knowledge or experience about it. by अनिथ. बाकी टायपिंग मिस्टेक असतिल तर जाउ देत.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 30/07/2020 - 17:48
हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही.
असे का म्हणून? मी विचारलेले कधी ऐकले नाहि ह्याआधी कुणाकडून? कशामुळे आली ही परिस्थिती? आणि मी सोडून इतरांनी मनावर घेऊ नये असे का म्हणून? घेऊ दे की मनावर. जबाबदारी पण घ्यावी मनावर घेतल्याची. कशाला घाबरायचे.. सल काय आहे ते कळले पण त्याची उकल कुणी करायची? कशी करायची? का करायची? . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात भाषणे ठोकल्यासारखे लिहुन काही होत नाही बळीराजा. हसण्याचा विषय नाहीये हा पण तो होतोय तुमाच्यासारखे आवेशपूर्ण पण बिनबुडाचे प्रतिसाद वाचून. . सावरा, सांभाळा

In reply to by अभ्या..

आधी बघा बिनबुडाचे आरोप कोण करतय,, मनावर घ्या नका घेउ तुमचा विशय ,, फक्त हा मुद्दा शहरी / ग्रामिण न व्हावा हा हेतु होता म्हनुन तस लिहील ,,, अन् मी काही भाषण नव्हतो देत , ते तुम्ही दिल मी नाही ,,, मी फक्त कविता लिहीली , तुमचा प्रतिसाद आला मी प्रतिउत्तर दिल that's it,, आता मी दिलेल्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर द्या नका देउ मर्जी तुमची , तसा तो तुम्ही नाही देणार हे अपेक्षितच होत , झाल हि तेच ,, उगाच विषयांतर केलत,, आता तुमचे उत्तर अन माझे प्रश्न यांचा मेळ बसत असनारा प्रतिसाद आला तरच मी रिप्लाय देइल,, , धन्यवाद.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 31/07/2020 - 20:27
हे बघा मालक, तुमच्या कवितेत टोटल तीन प्रश्न आहेत. १) असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? २) आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || ३) त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, त्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिलेले आहे कवितेत शेवटी. असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ओके. काही हरकत नाही. माझाही बाप कधी टिपटाप राहिला नाही. अगदी माझ्या(म्हणजे माझ्या बापाच्या) शेताचा सध्याचा चालू भाव ६५ लाख प्रति एकर (फक्त शेतीसाठी, गुंठेवारीसाठी नाही) असूनही टिपटाप राहात नाही. त्यांना गरज वाटत नाही त्याची. पोरांनी टिपटाप राहावे असे वाटते त्यांना पण स्वतःच्या पोराच्या लग्नातही खांद्यावर गमजा टाकून कामे करत हिंडतील. मनुष्य स्वभाव. पिढीचा फरक, इलाज नाही. दुसरा प्रश्न पोरक्या पोराचा प्रश्न फक्त शेतकर्‍यांच्या पोरांचा नसतो. पोरका झाला तरी त्याची काळी माय शाबूत असते. नोकरदाराच्या पोरक्या पोराला अनुकंपेत नोकरी मिळायचे प्रमाण फक्त सरकारी मध्ये. खाजगीत ते ही नाही. सगळी सुरुवात नव्याने. तिसरा प्रश्न : कोण देईल थाप? अर्थात ह्याचेही उत्तर वरचेच आहे. पितृछत्र दुरावणे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. पण ती युनिव्हर्सल आहे. प्रत्येक बाप नसलेल्या पोराला बापाची कमी वाटत राहणार. त्याचा शेतकरी बाप आणि शहरी बाप असा फरक नसतो. . राहता राहिले कवितेबद्दल आणि वस्तुस्थिती बद्दल. अ‍ॅज अ कविता रचना चांगलीच आहे. काही थोडी यमके आणि शब्दरचना सोडल्यास बाकी उत्तम आहे. पण.... हि कविता म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येक शेतकृयाची आहे आणि त्यातून आपण फार शेतीविषयक गंभीर प्रष्न मांडत आहोत असा आव आणत असताल तर प्लीज .... फक्त तुम्ही शेतकरी नाही आहात किंवा बाके सगळ्यांनी शेतकृयावर अन्याय केलाय आणि तरीही शेतकृयांवर आरोप करतोय असा समज कदापिहि करुन घेऊ नका. आता माझ्या प्रतिसादातले आरोप... ते निष्कर्ष आहेत गेल्या कित्येक वर्षातले प्रत्येक चर्चेतले, प्रत्येक व्यासपीठावरचे शेतीच्या कुठल्याही प्रश्नांवर काहीही लिहिले गेले तरी काढले गेलेले निष्कर्ष आहेत. मी नाही काढलेले. मी तर उद्विग्न होऊन फक्त संकलित केलेत. आतापर्यंत ते तुमच्या कधीच वाचनात आले नसतील तर तुम्हाला खरोखर मूळापासून विचार करायची फार गरज आहे. मला आदर आहे प्रत्येकच काम करणार्‍या कामगाराचा. भले तो शेतकरी असेल, जवान असेल किंवा शास्त्रज्ञ असेल. शिक्षणाचे महत्व तुम्हाला तर सांगायलाच नको. एखादा शेतकर्‍याचा मुलगा फर्डे इंग्रजितले कोटस देत जर संभाषण करत असेल त्याचे कौतुक वाटेल पण मुद्दा हरवून कसे चालेल मालक. तुम्हाला इंग्रजि मिलो हे अपमानास्पद आणि मुस्कील घडी वाटते पण त्या मिलो वर तेव्हाचा शेतकरी पण जगलाय. आज शेतीत बियाणे, खते, किटकनाशके, औजारे परदेशी कंपनीचे जर शेतकर्‍यांना चालू शकत असतील तर शहरी माणसांनी केले इंपोर्ट धान्य काय बिघडणारे. आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. कुणाचे पूर्वज शेतकरी नव्हते आणि कोण फक्त सर्व पिढ्या शेतीच करत आले आहेत ह्याचा गंभीरपणे विचार करा तुम्हाला जाणवेल तुम्ही (म्हणजे शेतकरी) फक्त सिस्टिमचा एक भाग आहेत. असतात प्रत्येक क्षेत्राला स्वतःचे असे काही प्रॉब्लेम पण ते दुसर्‍या कुणाला स्मजणारच नाहीत असा आव आणला तर ते कधीच संपणार नाहीत. मूल लहान असले की ते फक्त रडते. आई समजून घेते त्याला भूक लागलीय का सू लागलीय का गरम होतय का थंडी वाजत्ये. जसे जसे मूल जाणते होते तसतसे त्याला काय हवेय आणि ते कसे आणि कुणाकडून मिळवायची ह्याची जाण येते. मला वाटते ह्यावरुन तुम्हास समजेल असेल काय म्हणाय्चेय ते. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

या प्रतिसादाशी मी सहमत आहे,, पण मी कवितेतील प्रश्नाचे उत्तर नाही तर तुमच्या उद्विग्न होउन दिलेल्या प्रतिसादावर मी दिलेला प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती. पण असो., तुमच्या बद्द्ल झालेला गैरसमज ( तुमचा पहिला प्रतिसाद वाचुन ) दुर झाला हा प्रतिसाद वाचुन. " आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. " हे ही पटले. खाली एका प्रतिसादात वाचले कि तिकडे जमिन ६५ लाख रुपये प्रति एकर आहे, विभाग वार किंमत बदलते,, सध्या परभणी जिल्ह्यात ६-१० लाख प्रति एकर इतकाच भाव आहे., असो. ,,,, तुमच्या भावना पोहोचल्या तुम्हाला काय म्हणायचय ते पण कळल. म्हणुन हा विषय वाढवण्यात अर्थ नाही अस मला वाटत, मी एका कर्जबाजारीपणामुळे फाशी घेतलेल्या शेतकर्‍याच्या एका मुलाची व्यथा मांडण्याचा प्रामानिक प्रयत्न केला होता, पेश्याने काही मी कवि नाही ना तुम्ही मालक म्हणाव एवढा मोठा. पण अजुनही मी तुमच्या पहिल्या प्रतिसादास असहमत ( सहमत नाही ).

In reply to by अनिल चव्हाण रा…

शाम भागवत 02/08/2020 - 12:03
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६-१० एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?

In reply to by अभ्या..

शाम भागवत 02/08/2020 - 12:04
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६५ लाख एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?

In reply to by अनिल चव्हाण रा…

कपिलमुनी 31/07/2020 - 18:33
एवढे प्रॉब्लेम आहेत तर शेती करू नका, शहरात या नोकरि करा, धंदा करा , टिप टॉप रहा

In reply to by अभ्या..

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:33
धागालेखकाच्या भावना पोहोचल्या.
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
दुर्दैवाने, अभ्याशेठचा संपूर्ण प्रतिसाद (उपरोधिक आणि) अत्यंत वास्तवदर्शी आहे.

Rajesh188 28/07/2020 - 14:53
शेती करणे म्हणजे जुगार आहे . इथे तुम्ही किती उत्पादन घेवू शकता ह्या वर अनेक घटक कार्य करतात. काही घटक तुमच्या हातात तर काही घटकांवर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते. 1), चांगले बी,मशागत, खत देणे हे तुमच्या हातात आहे पण पावसचा लहरीपणा,पिकावर पडणारी रोग राई हे आपल्या हातात नाही आणि हे घटक सर्व अंदाज चुकवू शकतात आणि उत्पादन खर्च पण निघत नाही. मजुरांची कमतरता,रस्त्यांची सुविधा,पाणी पुरवठा,विजेची उपलब्धता एक नाही असंख्य अडचणी वर मात करून जेव्हा उत्पादन बाजारात येते तेव्हा भाव नसतो. भाज्या टिकावू नसतात त्या मुळे त्या साठवता येत नाहीत त्या विकण्यासाठी साखळी ची गरज असते ती साखळी निर्माण करणे एका शेतकऱ्याला शक्य नाही तशी यंत्रणा उभी राहणे aavshakya आहे.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 30/07/2020 - 17:42
हायब्रीड पिकवायला ही शेतकरी लागणार ना? म्हण्जे ते पीएल १८० मधला अमेरिकेतुन आलेला मिलो म्हण्जे हायब्रीड म्हणत असताल तर ती वेगळी गोश्ट. ज्यांच्यासाठी पिकवता ते विचार करेना झाले मग शेतकर्‍यांनी का करावा त्यांचा विचार? ते करतील काहीही. इंपोर्ट करतील, त्याला पैसे मोजतील. शेतकर्‍यांनी आपापल्या पोटापुरते पिकवायचे अन मजेत राहायचे. एखाद्या पोराने नोकरी करायची अन राहायचे टिपटॉप.

In reply to by अभ्या..

फक्त मागच्या वर्षी ज्वारी पिकली नाही तर ६००₹ क्विंटल असनारी ज्वारी ४३००-४८०० पर्यंत गेली,, बाकि सोडुन द्या,, परत इंग्लंड वरुन डुकरांसाठीचा मिलो आणावा लागेल

In reply to by अभ्या..

Rajesh188 31/07/2020 - 18:21
शेती हा व्यवसाय आहे समाज सेवा नाही (समाजाची सेवा होते तो by-product समजा). शेती दुसऱ्यांना अन्न धान्य मिळावे म्हणून कोणी करत नाही स्वतः चा फायदा व्हावा म्हणून शेती केली जाते. शेती च नाही तर सर्वच,व्यवसाय,नोकरी माणूस स्वतः साठी करतो. कोंबडी अंड देते ती मालकाला खुश करण्यासाठी देत नाही. तसेच आहे हे. दुष्काळ ची झळ ज्यांचा शेती व्यक्तितिक्त इन्कम आहे त्यांना बसत नाही. शेतकरी,कामगार,आणि गरीब लोकांना बसते. देव करो आणि अमेरिका किंवा दुसऱ्या कोणत्या ही देशातून अन्न धान्य मागवायचे वेळ येवू नये.

In reply to by अनिल चव्हाण रा…

कपिलमुनी 30/07/2020 - 19:12
खायचे काय हा लोकांचा प्रॉब्लेम आहे . तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडावा, लोक आयात करून 200₹ किलो ने खातील , तुम्हाला काय करायचंय ??

Rajesh188 30/07/2020 - 18:47
खनिज तेल आयात करायला पैसे पुराणात आणि चालले अन्न धान्य आयात करायला. तेवढं विदेशी भांडार आहे का. जेव्हा इथेच काहीच उत्पादन होणार नाही तेव्हा 40 रुपये किलो गहू ,आणि 40 रुपये किलो टोमॅटो एक पण देश देणार नाही. एक आपल्या कडे दुसऱ्या देशांना देण्यासारखे काही नाही त्या अशी किंमत नाहीच जगात. शेती वर आधारित उत्पादन पिकणे बंद झाले तर दुसरे देश सांगतील तो भाव 500 रुपये किलो टोमॅटो. एक वेळेचे जेवायला तुमचा पगार किंवा जो काही इन्कम असेल तो पुरेल का. Import करू एवढं सोपं आहे का,खावू आहे काय.

गणेशा 30/07/2020 - 19:19
स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करू नये.. पण अशी चर्चा आधी माझ्याच एका शेती वरच्या धाग्यावर झालीये सो येथे आता पुन्हा नाही.. पास माझा.. मूळ कवितेच्या भावना कळल्या आहेत

Rajesh188 30/07/2020 - 20:34
माणूस हा सर्वात आधी शेती करायला शिकला आणि त्याची वणवण थांबली आणि तो स्थिर झाला. आणि त्याची खरी प्रगती तेथूनच सुरू झाली. अन्न साठी वणवण फिरणे बंद झाल्या मुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्याला फायदा झाला आणि नवनवीन शोध तो लावत गेला. शहर तशी नवीनच आता इंडस्ट्रियल क्रांती यूरोप मध्ये झाली आणि भारत त्यांचा अंकित देश असल्यामुळे त्याची काही फळ इथे पण उडाली. आणि खऱ्या अर्थाने शहर निर्माण होवू लागली. काही भारतीय कंपन्या मोजक्याच निर्मिती क्षेत्रात होते त्यांना देश अंतर्गत च बाजार होता. सर्वच नवीन असल्या मुळे शहर वाढू लागली . आणि खऱ्या अर्थाने नोकरी हा प्रकार चालू झाला. सरकारी नोकरांना सरकारी तिजोरी मधून पगार दिला जातो त्यांची कार्य क्षमता काय आहे. त्यांना जो भरमसाठ पगार दिला जातो तेवढं फायदा त्यांच्यावकडून मिळतो का तर बिलकुल नाही 10 percent सुद्धा रिटर्न त्यांच्या कडून मिळत नाहीत. शहर निर्माण होण्यासाठी जमीन लागते अजुन तरी अधांतरी शहर निर्माण झालेली नाहीत. ती जमीन अत्यंत कमी किमतीत जबरदस्ती नी ताब्यात घेतली जाते त्यांचे मालक शेतकरी च असतात. रस्ते निर्मिती,कारखानदारी साठी जमीन ,कमी किमतीत सरकार ताब्यात घेत ती जमीन कोणाची असते, पाणी पुरवठा करण्यासाठी धरण त्याला जमीन लागते ती कोणाची असते. जास्त विरोध न करता देशाचे कार्य म्हणून ती जमीन शेतकरी देतो. उद्या पुण्यातील अतिशय पॉश वस्ती जमीनदोस्त करून तिथे जनतेच्या हितासाठी हॉस्पिटल बांधायचे आहे म्हणून. 1000 रुपये गुंटा भरपाई देवून सरकार नी ती जमीन ताब्यात घेतली तर शहरी लोक अटॅक येवून मरतील. कोणाची ही जमीन सरकार देश हितासाठी ताब्यात घेवू शकते हाच नियम त्यांना लागू होईल. थोडक्यात शहर निर्मिती शेतकऱ्यांच्या त्यागवर झाली आहे. शेतकऱ्यांना सरळ पैस्याच्या रुपात कधीच मदत मिळत नाही. खतांची सबसिडी खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना दिली जाते. दूध साठी सबसिडी दूध dairy na दिली जाते. कर्ज माफी ही मागणी शेतकऱ्यांची नाही ती नेत्यांची आहे. योग्य भाव द्यावा,आणि प्राथमिक सुविधा निर्माण कराव्यात ही शेतकऱ्यांची मागणी आहे. 1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही . पण बाकी टॅक्स ते भरत असतात. नोकरदार इन्कम असूनसुद्धा सरकार ला फसवण्याचा धंधा करत असतात. व्यापारी तर त्यांचे बाप रोज लाख रुपये कमवत असले तरी कर चुकवने,वीज बिल बुडवणे,पाणी बिल बुळवणे हे bindast करतात.

In reply to by Rajesh188

डॅनी ओशन 31/07/2020 - 16:15
1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही .
एकर्सचा काहीही संबंध नसतो. कितीही शेती असली तरी पूर्ण उत्पन्न टॅक्स फ्री असते. अर्थात इनडायरेकट् टॅक्स (gst वैगेरे) अर्थातच सर्वच जण भरतात. आणि इनडायरेकट् टॅक्स टोटल कॉन्ट्रीब्युशनच्या 65% असल्यामुळे शेतकरी किंवा कमी उत्पन्नाच्या लोकांचा करभरणीतला वाटा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. इथे तुमचे म्हणणे 100% बरोबर. शेतकरी देशाच्या करसाठ्यात हातभार लावत नाहीत हे फसवे विधान आहे.

बोलघेवडा 30/07/2020 - 21:40
एक साधा प्रश्न आहे. शेतीत इतके प्रॉब्लेम्स आहेत तर शेती विकून का टाकत नाहीत. जी मेहनत शेतीत करणार तीच मेहनत विकून आलेल्या पैशातून दुसरं काहीतरी धंदा करण्यात लावायची. कृपा करून राग मानू नये.

In reply to by बोलघेवडा

Rajesh188 30/07/2020 - 22:19
जे जमीन विकतील ते सर्वात unlucky असतील . काही वर्षांनी इथे सर्व मिळेल पण जमीन मिळणार नाही. फ्लॅट ला काही किँमत नसेल बिल्डिंग चे आयुष्य संपलं की सर्व संपलं. ज्याची जमिनी वर मालकी तोच जगेल. बोलघेवडे 100 वर्ष नंतर आताच्या बिल्डिंग उभ्या नाही आडव्या असतील. जमीन वर असलेली 9 by 9 chi झोपडी उभी असेल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 30/07/2020 - 22:48
कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार , आपल्या ऐकण्या वाचण्यात आला का ? भारतीय नागरिकांची सरासरी आयुष्य वर्षे किती ? १०० वर्षे का ?

In reply to by mrcoolguynice

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:43
श्री-थंड-चांगल्या-मनुष्या, प्रतिसादाच्या between the lines शी पूर्ण सहमत. काय वेळ आलीय माझ्यावर, कुणाशी सहमत होतोय ;) हघ्याहेवेसांन. रच्याक, Conveyance deed बद्धल माझा थोडा गोंधळ आहे राव. इथे किंवा स्वतंत्र, सविस्तर लिहू शकाल का?

Rajesh188 30/07/2020 - 23:13
कमी व्याज दर त्या मुळे फ्लॅट चे कृत्रिम पने वाढलेले दर. फ्लॅट ची किंमत 30 लाख खरी किँमत 15 लाख . 15 लाखाचा फुगा. आता रिअल estate chi अवस्था अत्यंत खराब . फुगा फुटला नाही पण हवा गेली आहे. 40 फ्लोअर ची बिल्डिंग आहे 50 वर्षात ती पाडण्या च्या अवस्थेत येईल. फुकट घर पाहिजे असेल तर 80 फ्लोअर ची बिल्डिंग हवी . मग मोकळी जागा राहणार नाही . सरकारी नियमात बसणार नाही. आणि कोणीच पैसे गुंतवणे शक्य नाही redevelopment साठी. ते फायद्याचे ठरणार नाही.

Rajesh188 31/07/2020 - 00:28
मी शेतकरी नाही उत्तम नोकरी करणारा च आहे. पण अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद अत्यंत हिन दर्जाचा होता. त्यांच्या प्रतिसाद चा सत्य परिस्थिती शी काहीच संबंध नाही. असभ्य,सत्यापासून लांब जाणार,पूर्व गृह दूषित असणारा प्रतिसाद तत्काळ काढून टाकणे गरजेचे होते. प्रतेक प्रश्नांच्या दोन बाजू असतात. आपल्याला त्या मधील काहीच कळत नसेल तर ठाम मत व्यक्त करू नये. माणूस जुना सभासद आहे,काही विषयात उत्तम लेखन करतो. म्हणून चूक आहे ते बरोबर आहे अशी भूमिका नको. चुकीला माफी नसावी. ती दाखवून दिली पाहिजे अंध पने समर्थन नको.

In reply to by धनावडे

अभ्या.. 31/07/2020 - 20:38
धनावडे साहेब नमस्कार, खरे सांगतो मालक, चीज केले तुम्ही माझ्या तुटक्या मुटक्या लिखाणाचे. मला खरेच कधी ही वाटले नव्हते की कुणी लक्षात ठेवून माझे प्रतिसाद वाचत असतील आणि त्याची नोंद ठेवून वेळेवर आठवण करुन देईल. थॅन्क्क्स अ लॉट धनावडे साहेब आणि मिपा पण. बाकी ते राजेश कुणी आहेत त्यांचे काही मनावर घ्यायचे नसते. ते मनकी बात फेम आहेत. नुसते पिंका टाकत लॉजिकलेस विधाने करत हिंडायचे एवढेच ते करतात. चर्चा नामक एक प्रकार असतो, कुणाला प्रष्न विचारला तर त्याची उत्तरे द्यायची असतात कींवा निदान माहित नसले तर गप्प वाचन करायचे असते ते त्यांना माहित नाही अजून. संजय क्षीरसागर आणि अर्धवटराव, कोहंसोहं, भागवसर अशा थोरामोठ्यांच्या चर्चेत पिंका टाकून आध्यात्म अन आस्तिकनास्तिकता शिकवण्याचे धाडस आहे ह्या आयडीचे. विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र देणार नाहीत. दुसरीकडे तिसरीच टेप वाजवत बसणार. ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मात्र उत्तरे द्यायची लोकांनी. उपहास, लॉजिक, अभ्यास, व्यासंग, शुध्द्लेखन अशा कोणत्याही गोष्टीचा दूरदूरचा संबध नसताना लोकांच्या चुकीच्या माफीची गोष्ट करतो हाच विनोद आहे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद धनावडे साहेब. लोभ असु द्या

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:34
मला वाटतं, इतर कोणत्याही कामाप्रमाणे शेती हे एक उपजीविकेचे साधन आहे. तिला काळी माय (किंवा भौगोलिक स्थानानुसार - लाल माय, for that matter) म्हणणे, तिची पूजा करणे यात योग्य-अयोग्य असं काही नाही. व्यापारी त्याच्या गल्ल्याची, कारखानदार त्याच्या यंत्र सामुग्रीची, इडली-डोसेवाला त्याच्या गॅस-शेगडीची पूजा करतात, नाही का? पण नियंत्रणात असलेल्या-नसलेल्या कारणांनी जर धंदा चालत नसेल तर तेच लोक, तीच उपजीविकेची साधने येईल त्या भावात विकूनही टाकतात आणि कुवतीनुसार दुसरा धंदा करतात. "मी जर हा उद्योग बंद केला तर या जगाचे काय होईल" असा विचार ते करतात का? शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत असेल, आणि पुनःपुन्हा शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत आहे असा अनुभव येत असेल तर... पुढे काही लिहिण्याची गरज आहे का?

Rajesh188 31/07/2020 - 11:56
जो धंधा चालत नाही तो विकून दुसरा धंधा चालू करणे हे व्यवहारिक आहे आणि योग्य पण आहे. ह्या विषयी दुमत नाही. शेती नेहमीच नुकसानी मध्ये जात असेल तर विकावी हा सल्ला योग्य दिसत असला तरी तो योग्य नाही. ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर. जी लोकसंख्या वाढेल तशी कमी होत जाईल. दुसरा मुद्धा हा आहे की जमीन ही पिढ्यान् पिढ्या च्या वारसा हक्क नी मिळालेली संपत्ती आहे ती कमावलेली नाही . त्या मुळे ती विकण्याचा नैतिक अधिकार पण नाही. शेती ला पूरक व्यवसाय करू शकता,नोकरी करून शेती पण करू शकता. अनेक पर्याय आहेत. शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 31/07/2020 - 14:04
ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर...... शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.
हे सगळं ठिकाय, त्यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर सुचवा प्लिज. शेतकरी टीपटाप कधी राहायला लागेल ? जमिनीचे भाव करोडो होतील, तेव्हा जमीन विकून की आणखी कश्या प्रकारे ?

सतिश गावडे 31/07/2020 - 18:28
कोकणात प्रामुख्याने भात शेती होते. पूर्वी दुबार असायची. म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर आणि उन्हाळ्यात कालव्याचे पाणी. कालवा म्हणजे घाटावर असतो तसा मोठा ओढा सदृष्य नव्हे, एका ढांगेत ओलांडता येईल इतका रुंद आणि फुट दिड फुट खोल. पुढे पुढे हे कालवे वर्षागणिक बंद होत गेले आणि काही भागात उन्हाळी भात शेती बंद झाली. तशा नद्या आहेत, बारमाही भरुन वाहणार्‍या. मात्र कोकणातील शेतकरी नदीला मोटर पंप लावून वगैरे भातशेती करण्याची तसदी घेत नाही. पूर्वी जेव्हा दुबार शेती होती तेव्हा स्वतःसाठी ठेवून धान्य उरायचे ते विकले जायचे. आता पावसाळ्यात जे पिकते ते स्वतःसाठी ठेवतात. (किंवा आपण पिकवलेला भात विकतात आणि राशनचा/दुकानातील "पालिस" केलेला तांदूळ आणतात. जिथे शहरी माणसं ब्राऊन राईस चढ्या किंमतीने विकत घेतोय तिथे हा भात उत्पादक मात्र मशीनवर डबल पॉलिश केलेला तांदूळ विकत घेतो. असो) नदीकाठी जमीन असेल तर थोडीफार भाजी पिकवली जाते. मात्र असे कष्ट घेणारा कोकणी शेतकरी गावात एखाद दुसरा. उन्हाळी जिथे कालव्याचे पाणी जात नाही मात्र नदीकिनारी शेत असेल तर शेताला ओल असते. अशावेळी कडधान्ये पेरली जातात. हे ही अपवादात्मक असते. पावसाळ्यात मात्र अंगणात, परसदारी शेताच्या बांधावर भाजीपाला उगवला जातो. आणि त्या भाजीवर पुर्ण पावसाळा साजरा होतो. शेतीला पुरक धंदा म्हणून म्हशी पाळल्या जातात. दूध विकले जाते. तो मोठा उत्पन्नाचा आधार असतो. कुठे आत्महत्या नाही, कुठे कर्जमाफी वीज बील माफी ची मागणी नाही, सावकारी व्यवसाय अस्तित्वात नाही, अडी नडीला जमीन गहाणवट टाकली जाते, मात्र ती वेळेवर सोडवलीही जाते. गहाणवट ठेवलेली जमीन हडपणारा अण्णा नाईक हा सिरियलमध्येच दिसतो. तसाही कोकणी माणूस अल्पसंतुष्ट. छानछौकी न करता आहे त्यात समाधानी राहणारा. समस्या नाहीत असं नाही, मात्र कोकणी शेतकरी रडताना, यंत्रणेपुढे हात पसरताना दिसत नाही. कर्जमाफी, वीजबिलमाफीकडे आस लावून बसत नाही. झेपेल तितकं पोराबाळांना शिकवतो, नाही झेपत तेव्हा हात जोडून म्हणतो बाबारे आता काय पुढं शिकवणं शक्य नाही. पोरगा काय ते समजून जातो आणि कोकण रेल्वेत बसून मुंबईला जातो. चार पैसे कमवतो. त्यातले दोन पैसे आई बापांना इमानदारीने पाठवतो. कोकणातील शेतकर्‍यांच्या लेकी बाळीही तशा शहाण्या. बाप शिकवेल तितकं शिकतात, शिक्षण थांबलं की मुंबईचा रस्ता धरतात. चार घरची धुणी भांडी करतात. चार पैसे गाठीला बांधतात. तेव्हढाच बापावरील लग्नाच्या खर्चाचा बोझा कमी होतो. यातील काहींना उच्च शिक्षणाचं महत्व कळतं. कुठेतरी कुणाच्या इंजिनीयर पोराला गाडीतून फिरताना एखादा शेतकरी पाहतो आणि आपल्या पोरालाही इंजिनीयर करायचं मनावर घेतो. घरातील म्हशी वाढतात, भात लावायची शेतं वाढतात. त्या पोरालाही शाळा, गुरं आणि शेती अशी तिहेरी कसरत करावी लागते. पोरगंही रक्त आटवतं, शाळेत जातं, गुरं राखतं, शेतात नांगर धरतं, डोक्यावर भाताचे भारे वाहतो. आणि एक दिवस इंजिनीयर होऊन विमानात बसून कॅलिफोर्नियाला जातं. याचं पाहून अजून चार पोर शेती गुरं ढोरं यांच्या जोडीने मन लावून अभ्यास करतात. काही बाही बनतात आणि घरी आई बापाला चार पैसे पाठवतात. राज्याच्या इतर भागातील शेतकर्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

Rajesh188 31/07/2020 - 19:44
शेतकरी हा शेतकरी असतो तो कोकणी, घाटावर चा,भारतीय,अमेरिकन असा नसतो. मनुष्य स्वभावाचा बदल असू शकतो शेतकऱ्यांचं समस्या मध्ये बदल नसतो. मध्ये मी अमेरिकन शेतकऱ्या विषयी पण वाचलं होते. त्यांना असणाऱ्या समस्या काय आहेत. शेती ची सर्वात मोठी समस्या आहे प्रक्रिया न केलेल्या शेती च्या उत्पादन ला मागणी नाही. आणि प्रक्रिया उद्योग शेतकऱ्या च्या हातात नाही. Exa बटाटा 30 रुपये किलो बटाट्याचे चिप्स 10 रुपयाला 50 ग्राम. म्हणजे 200 रुपये किलो. फळांचे भाव आणि फळा पासून बनलेले जाम किंवा बाकी पदार्थ ह्यांचे भाव फरक बघा. दुधाचे भाव 20 ते 25 रुपये लिटर (विक्री) आणि लोणी, चीझ,मावा ह्यांचे भाव. रोजच्या जीवनात आता लोक कशाला महत्व देतात. सॉस(प्रक्रिया केलेले) जाम(प्रक्रिया केलेलं) चीज ( प्रक्रिया केलेले) पिझ्झा( प्रक्रिया केलेले) चिप्स(प्रक्रिया केलेली) साखर( प्रक्रिया केलेले) ज्युस( प्रक्रिया केलेले) तेल ( प्रक्रिया केलेले) ब्रेड(प्रक्रिया केलेले) पाव( प्रक्रिया केलेले). प्रोटीन्स suppliment ( प्रक्रिया केलेले) असे अनेक प्रकार हे सर्व पदार्थ शेती मधील कच्च्या मालावर प्रक्रिया केलेले आहेत. ह्या वर उद्योगपती चे नियंत्रण आहे. प्रक्रिया न झालेले. सरळ शेतकरी विकू शकतो. दूध, डाळी,आणि भाज्या. ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे.

In reply to by Rajesh188

चौकस२१२ 02/08/2020 - 19:30
"ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे." हा तर्क काही कळला नाही... जर प्रक्रिया केलेलं पदार्थ वाढत आहेत आणि ते मूळ शेतीच्या मालावर अवलंबून असतील तर शेतकऱ्याला घाऊक भावात अश्या उद्योगांना विकून खात्रीचे गिर्हाईक मिळतील कि.. म्हणजे मग फक्त ताजी भाजी, फळाच्या रोजच्या विक्रीवर अवलंबून राहावे लागत नसेल. म्हणजे एकूण शेतकऱ्याचा फायदाच कि फळ पिकवणारा शेतकरी २, ३ प्रकारे त्याचे उत्पादन विकू शकतो , पूर्वी फक्त बाजारात फळ म्हणून आत जॅम बनवणारे कारखाने, रस बनवून विकणारे कारखाने यांनचं कडून मागणी वाढली.. मग तक्रार काय? तोटा कसा ?

सुबोध खरे 31/07/2020 - 19:53
एक किंवा दोन एकर शेती (हि पूरक उत्पन्न नसेल तर) आतबट्ट्याचा ठरली आहे. ( लातूर भूकंपाच्या नंतर केलेले सर्वेक्षण हि गोष्ट स्पष्टपणे दाखवून देते) पूर्वी दर डोई १० एकर शेती होती तेंव्हा केवळ एक पीक घेऊन काम भागत होतं. त्यातील २ एकर शेती दर ४ वर्षांनी पडीक ठेवून परत कसायला घेत असत त्यामुळे शेतीची नापिकी होत नसे. परंतु एका शेतकऱ्याला ५ मुले झाल्यावर दर डोई शेती २ एकर झाली. यामुळे शेतीवरचा भार वाढला आणि पडीक ठेवणे शक्य झाले नाही आणि शेतीचा कस कमी होत गेला त्यातून अनेक ठिकाणी रासायनिक खते आणि अमाप पाणी देऊन त्या भागात न झेपणारी पिके ( उदा मराठवाड्यात उसाची शेती) तात्पुरत्या फायद्यासाठी घेतली गेली. यामुळे भूजल पातळी खाली गेली आणि बोअरमधून वारेमाप उपसा केल्यामुळे क्षारयुक्त पाणी येऊ लागले आणि काही काळाने मातीत अतिरिक्त क्षार झाल्याने नापिकीचे प्रमाण वाढले. एवढे असूनही लोकसंख्य दुप्पट झाली त्यामुळे बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक झाले. यामुळे येणारे उत्पन्न खाण्यासाठीच पुरत नसल्यामुळे व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी त्यात गुंतवणूक होतच नाही आणि हे दुष्टचक्र चालूच राहते. एक उदाहरण देतो आहे. आमच्या लहानपणापासून पाणीपुरी विकणारा (रामानुज सिंह) भय्या आजही मिशा आणि केस पिकले तरी पाणीपुरीच विकत आहे कारण येणारा अतिरिक्त नफा तो "गाव मी भेज देता है" यामुळे त्याची स्थिती तीच राहिली आहे. याउलट माझ्या भावाची वातानुकूलन यंत्रे दुरुस्त करणारा तंत्रज्ञ (अली) याला माझ्या भावाने रोख पैसे देण्याचे साफ नाकारले. त्याला बँकेत करंट खाते उघडून दिले आणि त्यात चेक टाकायला लावला. यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा सांगून त्याला रोख पैसे न देता बँकेचा चेक दिला. बँकेत चालू खाते आल्यावर त्यातून पैसे काढून "गाव मे भेजना" बंद करायला लावले यानंतर त्याला एक दुकान भाड्याने घ्यायला लावले. त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवायला लावले. हे दुकान भाड्याने घेतल्यामुळे त्याला लोकांच्या घरून वातानुकूलन यंत्र दुकानात घेऊन जाऊन दुरुस्त करणे शक्य झाले. ( अन्यथा मुंबईत घरात बायको एकटी असताना कोणीही माणूस तंत्रज्ञाला घरात काम करू देत नव्हता. हे सर्व करून त्याचे करनियोजन केल्याने त्याने गृह कर्ज घेऊन एक खोली विकत घेतली.बँकेत खाते, पॅन आणि आधार कार्ड असल्यामुले माणसाला एक पत प्राप्त झाली आणि अलीने आपले दोन भाचे आता कामावर ठेवले आहेत. भाड्याचे दुकान त्याने कर्ज काढून विकत घेतले आहे. थोडक्यात आपला व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर उद्योजकतेचा मार्ग चोखाळला लागतो. उद्योजक हा चोर च आहे अशीच मनोवृत्ती सरकारी अधिकाऱ्यांची असते आणि ते उद्योजकाला नाडत असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण शेतकरी मात्र बळीराजा म्हणून सहानुभूतीला पात्र असतो. बहुसंख्य शेतकऱ्यांना जमीन हि वडिलोपार्जित म्हणून फुकट ( भांडवली खर्च न करता) मिळालेली आहे. दोन एकर जिरायती जमिनीची किंमत किती याचा व्यापारी हिशेब ( फुकट मिळालेले भांडवल) करणे अत्यावश्यक आहे. मी आजतागायत एकही शेतकरी गळा काढताना हि गोष्ट हिशेबात धरताना पाहिलेला नाही. ( गैरसोयीच्या गोष्टी बोलणे गैरसोयीचे असते) बहुसंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक यांनी कोणतीही गोष्ट बापाची वारसाहक्काने मिळालेली नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि अपार कष्टावर उभी केलेली आहे. यात धीरूभाई अंबानी, गौतम अडानी पासून लक्ष्मणराव किर्लोस्कर,आबासाहेब गरवारे, चितळे, कॅम्लिनचे दादासाहेब दांडेकर, सारखे असंख्य उद्योजक आहेत. तेंव्हा उद्योजक हे हरामखोर रक्तपिपासू हि भिकारडी कम्युनिस्ट मनोवृत्ती टाकून दिली पाहिजे. तेंव्हा शेतकर्याचे कल्याण करणे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. सरकार तुमच्या साठी काही करेल हि अपेक्षाच सोडून दिली पाहिजे

In reply to by सुबोध खरे

बाप्पू 31/07/2020 - 22:27
खरे सर यांच्याशी सहमत.. बऱ्याच वेळेला ह्या धाग्यावर लिहावे असे वाटले.. पण स्वतः ला आवरते घेतले कारण स्पष्ट आणि मुद्देसूद लिहिलं कि शेतकऱ्यांना सॉरी... बळीराजाला आणि त्याच्या हितचिंतकांना ते पचत नाही.. त्यामुळे अश्या धाग्यावर आता प्रतिक्रिया देणे बंद केलेय..

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 01/08/2020 - 10:01
१.रिपेयर चार्जेस चार्जेस सरकार ठरवते का ? २.अली ने ठराविक ठिकाणी जाऊनच ए सी रिपेयर केला पाहिजे असे सरकार ठरवते का ? ३. मागणी वाढल्याने अली च्या सर्व्हिस वर सरकारी नियंत्रण आणले जाते का ?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 01/08/2020 - 12:37
मूळ मुद्दा समजून घ्या. अलीला लागणारे अनेक परवाने (कुलन्ट गॅस विकत घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी यासारखे) शेतकऱ्याला तसेच्या तसेच लागतात का? दुकान रहिवासी क्षेत्रात चालवता येत नाही( निदान मुंबईत तरी कायदे बऱ्यापैकी कडक पणे पाळले जातात) . व्यावसायिक जागीच दुकान असावे लागते. त्याचे भाडे/ किंमत रहिवासी क्षेत्रापेक्षा भरपूर जास्त असते. अलीला बापजाद्यांकडून काहीही फुकट मिळालेले नव्हते. सरकारी अधिकारी आले कि त्यांचे "चहापाणी" करावे लागते. वीज फुकट तर नाहीच परंतु ११ रुपये युनिट ने घ्यावी लागते आणि दुरुस्त केलेला प्रत्येक ए सी चालू ठेवून थंड होतो कि नाही हे पाहण्यासाठी विजेचे भरमसाठ बिल येते. त्यातील एक दमडी कधीही माफ होत नाही. प्रत्येक व्यवसायाचे आपले प्रश्न वेगळे असतात उगाच अहमदशहा अब्दालीची शेंडी बाजीरावाला लावू नका मूळ मुद्दा समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 01/08/2020 - 13:29
मुळात सर्व्हिस सेक्टर आणि उत्पादन सेक्टर हे दोन्ही भिन्न बाबी आहेत. सेवा क्षेत्रात एसी रेपैरिंग येते . शेती उत्पटन क्षेत्रात येते. दोन्ही च्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांची मिसळ करायला नको. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी त्यांनी शहरात या आणि लहान सहान धंदे आणि नोकऱ्या करा हा तात्पुरता पर्याय झाला . झोपड्या ची वाढ होण्यास हेच कारणीभूत आहे. झोपडपट्टी राहणारे आणि किरकोळ काम करून पोट भरणारे ह्यांची अवस्था केविलवाणी होते शहरात. आणि बाकी असंख्य अडचणी निर्माण होतात त्या वेगळ्या. नियोजन बद्ध ग्रामीण विकास हाच शास्वत मार्ग आहे. आयटी इंजिियर्स ला मेडिकल क्षेत्रात काम असा सांगितले तर त्याचे लक्ष तरी लागेल का त्या कामात . आणि त्याच्या कडे ते स्किल सुद्धा नसेल. फक्त pattya टाकायचे काम करेल तो शेती ला पूरक व्यवसाय निर्माण झाले तर शेती व्यतिरिक्त पैसे कमविण्याची मार्ग मिळेल. शेती परवडत नाही तर ती सोडा आणि शहरात येवून वॉचमनी,करा,रस्त्यावर उभे राहून फेरीवाला बना,किंवा peoun बना हा काही उपाय नाही.

कपिलमुनी 31/07/2020 - 20:19
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी पश्चिम महाराष्ट्र - सांगली , सातारा (माणदेश वगळता )आणि कोल्हापूर . या भागात मुबलक पाणी , कसदार जमीन , सहकार उद्योग , डेअरि उद्योग , साखर कारखाने , जागरुक मतदार यामुळे इथले शेतकरि उस , द्राक्ष , केळी अशी नगदी पिके घेतात , इथे तुम्हाला आत्महत्या केलेला शेत़करी सापडणार नाही. पुणे - नाशिक - उत्तम हवामान आणि भरपूर पाऊस यामुळे इथे पीक मुख्यत भाजि पाला उत्तम पिकतो , शहरी मार्केट जवळ असल्यने नगदि पिके घेतात आणि पैसे बरे मिळतात , सोबत पोळ्ट्री वगैरे व्यवसाय करतत. या भागात जमीनीचे रेट जास्त असल्याने आत्महत्या करण्यापेक्षा जमिनि विकून इतर उद्योग करतात . विदर्भ - सर्वाधिक आत्महत्या होणारे जिल्हे - अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा हे अत्महत्यांचे मुख्य केंद्र आहे. बेभरवशी हवामान, खासगी कर्जे , पाण्याचा अभाव आणि मुख्य म्हणजे गाव ना सोडण्याची वॄत्ती व १०० % शेतीवर अवलंबून कुटूंबे ही आत्महत्यांची कारणे आहेत.. सरकारने कितिही मदत केली तरि या भागात उद्योग , सिंचन आणि स्किलसेट आणि घर सोडण्याची मानसिकता तयार होत नाही तोवर इथल्या आत्महत्या अशाच राहणार पुढे चालू ..

Rajesh188 31/07/2020 - 21:16
शहरांची अवस्था गंभीर होवू नये म्हणून त्यांची काळजी घेणे पण सर्वांचीच जबाबदारी आहे. आताच पुणे,मुंबई,बंगलोर,सारख्या मोठ्या शहरांची अवस्था गंभीर झालेली आहे. ग्रामीण भागातून रोजगार साठी प्रचंड मोठी लोकसंख्या शहरात येत आहे. कसलेच नियोजन नसल्या मुळे शहर अस्ताव्यस्त वाढत आहेत. लोकांना चालायला जागा नाही तर मोकळ्या जागा तर असूच शकत नाही. हे असेच चालले तर एक दिवस भारतीय शहर मृत होतील. त्या मुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्र ह्या मध्ये बर्या पैकी यशस्वी आहे. कोकणात जबरदस्त ताकत आहे आहे . सहकारी साखर कारखाने,पाणी व्यवस्था,धरण,सहकारी दुग्ध व्यवसाय,वीज, रस्ते ह्या वर सरकारी खर्च झालाच पाहिजे. ग्रामीण भागात शेती आधारित उद्योग उभे राहिले तर लोकसंख्या शहरात येणार नाही. हीच ती वेळ आहे सावरायची. नंतर परिस्थिती हातात राहणार नाही.

Rajesh188 31/07/2020 - 21:22
सहकार क्षेत्राचा ज्यांनी पाया रचला आणि तो सहकाराचा वृक्ष वाढवला त्या महान नेत्यांचा ,कर्मवीरांचे महाराष्ट्र शतशः ऋनी आहे. मुंबई,पुण्यात मराठी लोक कमी असण्याचे ते पण कारण आहे लोकांना गावातच रोजगार उपलब्ध आहे. त्या मुळे ते धाव घेत नाहीत. यूपी,बिहार सारख्या राज्यात ग्रामीण अर्थ व्यवस्था निर्माण च झाली नाही त्या मुळे प्रचंड स्थलांतर होत आहे. फक्त शहर वाढणे अभिमान ची गोष्ट नाही पुढल्या संकटाची चाहूल आहे.

पियुशा 01/08/2020 - 21:40
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर ओतलेले दुधाचे can, टैंकर ओततना पाहुन मला तरी खुप वाइट वाटले , जे आपण इतक्या कषटाने कमवले तेच मातीमोल करण्याचा विचार तरी कसा येतो, कधी एखादा व्यवसाय बुडाला तर ते लोक आपले उत्पादन ऐसे रस्त्यावर फेकून देताना पाहिलेत का? एखादा फेब्रिकेशन वाला नांगर बनवनारा डुबीत निघाला कर्ज बाजारी झाला तर तो आपले नांगर फेकल का रस्त्यावर, हे फक्त एक उदाहरण ,ऐसे कितीतरी व्यसाय आहेत, पण शेतकरी बन्धु आपले पिकाला भाव नाही रस्त्यावर फेक, शेतात उभ्या पिकावर बुलडोज़र फिरव, दूध रस्त्यावर आतून दे , भाजी रस्त्यावर फेकून दे है असले प्रकार करतात त्याचे वाइट वाटते चीड़ येते, ज्या पिकानी, दुधानी आपल्याला तारल त्यालाच माती मोल करायचे धाडस फक्त " शेतकरी" करतो

In reply to by पियुशा

गणेशा 02/08/2020 - 06:44
@पियुशा.. राजकीय, रयत क्रांती आणि विरोधक हे याला कारणीभूत आहेत, आणि दूध रस्त्यावर टँकर मधुन ओतणारे हीच लोकं आहेत.. मी तर म्हणतो फक्त दूध का.. पेट्रोल, गॅस, रस्त्यावरचे, खड्डे असे अनेक मुद्दे घेऊन आंदोलनं झाली होती पुन्हा तशीच सगळ्याची आंदोलने करा ना.. त्याला दम लागतो, आपन नक्की बोलाचीच कडी केली होती हे समोर येईल म्हणुन हे मार्ग.. खेदाने, करोना काळ.. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे पैसेच नाहीयेत जास्त.. आणि अश्या वेळेस पुन्हा शेतकर्या मागून राजकारण करणाऱ्या लोकांची कीव वाटते.. आणि शेतकर्या नी राजकारण्या कडून काही अपेक्षा करू नये असे बिन्धास्त बोलणारे यामागून चाललेले राजकारण कसे पाहू शकतात.. दूध सोडून मुळ मुद्द्यावर बोलतो - पायाभुत सुविधा सरकार ने दिल्या पाहिजेत.. मग यात शेतकरी, गावाकडचे, शहरी... मध्यमवर्ग असले येतेच कोठे..? सरकार कोणाचे असुद्या त्यांनी मूळ काम हे केले पाहिजेच.. पण शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवायची नाही.. अरे.. मग काय करायचे.. त्याला भिकारी, कटोरा घेऊन उभा राहणारा ह्या नजरेने बघणे आपण सोडून द्यावे.. सरकार ने मग काय, फक्त शहरातले डांबरी रस्ते उचकटवुन सिमेंट चे रस्ते करायचे, बुलेट ट्रेन शहरांना जोडायची हेच करायचे का.. असो.. शेतकऱ्यांच्या मालावर सरकार, दलाल यांचा अंकुश असतो.. मग असा इतर कुठला उत्पादक आहे, ज्याच्या मालाचा दर सरकार ठरवते? आता कांदा नाशिक ला 2 रुपय किलो ने विकला जातोय, शेतामधून माल मार्केट ला पोहचण्यास जितका खर्च येतोय ना तितका ही माल विकून मिळत नाहीये.. मग काय करायचे आता शेतकाऱ्याने.. घाईत लिहिलं आहे आता.. बोलणार नव्हतो पण लिहिले. जुन्या चर्चेची लिंक डेतो.. पुन्हा तोच पाढा सुरु झालाय.. शेतकरी हा विषय निघाल्यावर, ती चर्चा मध्यमवर्गीय.. किंवा राजकीय विषय यावर येऊन ठेपते हे समाजाचे दुर्दैव आहे.. असो थांबतो.. आज पासून सायकलिंग करायला लवकर उठलो.. आणि येथेच टाइम जातोय..

In reply to by गणेशा

सतिश गावडे 02/08/2020 - 10:24
मग काय करायचे आता शेतकाऱ्याने
पुर्णतः शेतीवर अवलंबून राहायचे नाही. जोडधंदे, पर्यायी व्यवसाय, नोकरी अशा गोष्टी करायच्या. पोटापूरते पिकवून चार पैसे कमवण्यासाठी इतर मार्गाला लागायचे. आपण जगाचे अन्नदाता आहोत आणि आपण नाही पिकवलं तर जग उपाशी मरेल या भ्रमात राहायचं नाही. जग त्याचं पाहून घेईल, आपण आपलं पाहायचं. कोकणात फक्त आणि फक्त भातशेती होते आणि बहुतांश ठिकाणी ती ही फक्त उन्हाळ्यात. आणि तरीही कोकणातील शेतकरी रडत नाही. कारण तो कधीच फक्त शेती एके शेती करत नाही. शेतीची कामे नसतील त्या दिवसात तो ट्रकवर हमाल म्हणून जातो, वीट भट्टीवर रोजंदारीने जातो, गाई म्हशी पाळतो कोंबड्या पाळतो. मोठ्या शेतकर्‍यांकडे बांधबांधवली करायला मजूरीने जातो, अगदीच काही होत नसेल तर मुंबई गाठतो. पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही. मी शेतकर्‍याचा मुलगा असून शाळा कॉलेच्या दिवसांत कंबरडं मोडेपर्यंत भातशेतीची कामं केलेली आहेत. त्यामुळे शेतीकामातील कष्टांची मला पूर्ण जाण आहे. बिगर कोकण प्रांतातील शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल तर त्यांनाच आपला मार्ग काढावा लागेल. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करणार्‍यांपासून चार हातात दूर ठेवावे लागेल. शेतकरी संमेलनं भरवून तिथे कविता वाचून शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यानं फक्त शेतकरी नेते म्हणून मिरवणार्‍यांचा, संमेलनं भरवणार्‍यांचा राजकीय फायदा होईल. समूह माध्यमांवर कविता लिहीणार्‍याला तात्पुरते आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडली असे वाटेल. मात्र त्याने शेतकर्‍यांच्या परिस्थितीत काडी इतकाही फरक पडणार नाही. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का?

In reply to by सतिश गावडे

१. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का? होय. मी एक शेतकर्‍याचा मुलगा आहे, आणि शेतीतील कामे ही करतो. अधुनिक आणि सुधारित बी-बियाणे वापरतो. गावातील इतरांना पण वापरायला लावतो.जास्त अधुनिक नाही पण ऑर्ग्यानिक शेती करण्याचा प्रयत्न करतो. फुल शेती काही जण करतात अगदी बोटावर मोजण्याइतके,, मत्स्यशेती इकडे होत नाही, एक दोन शेततळी, गोदावरी नदीत मासेमारी फक्त भोई समाज करतो,, कितीही आग्रह केला तरिही मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन कोणीही करत नाही. ,, आणि जोड धंदे फक्त दुग्धव्यवसाय ,, बाकी काही जण कुक्कुट पालन , शेळी पालन करतात,, सध्या जुन्या मंडळीला न जुमानता जोडधंद्यात वाढ होत आहे हि एक समाधान कारक बाब. अजुन काही असल्यास मोकळेपणाने विचारावे.

In reply to by सतिश गावडे

गणेशा 02/08/2020 - 15:01
मित्र या नात्याने तू वयक्तिक पणे बोलू शकतो, नव्हे पार शिव्या पण घालू शकतो, पण कवी बीवी काय राव.. मी स्वतःला कवी म्हणवून घेत नाही.. असो.. मजेचा भाग सोडला तर उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो..
पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही.
प्रिय मित्रा, 1. शेतकऱ्याने काय करावे ही लाईन तू उचलली.. त्याने पायाभूत सुविधांची अपेक्षा करू नये का ही ती लाईन आहे.. यात कोकण किंवा गैर कोकण असाही मुद्दा नाही.. hope u understand, पायाभूत सुविधा मिळवणे हे फक्त शेतकऱ्याचेच नाही, तर सर्वांचे अधिकार आहेत.. आणि कर्ज माफी याबद्दल मी लिहिलेले आहे खूपदा, कर्ज माफी हे सोल्युशन नाहीये..शेतकऱ्यांना फक्त सुविधा नीट हव्यात.. पण राजकारण करणारे हे का करतील.. .. 2. कोकणातील शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अशी तुलना आपण का करतोय.. तर ते आहे त्यात समाधानी आहे म्हणुन? कोकण पाऊस पाण्याचा आणि आंबा काजू ह्यांचा भाग.. मला जास्त माहित नाही, पण एकदंरीत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे माझ्या भागातून ही कोणीच काही फाशी वगैरे घेत नाही.. आणि जोडधंदा म्हणत असशील तर ते मुद्दे बरोबर आहे, आणि तो ते करतो.. फरक इतका की कोकण शेतकरी या आपल्याकडील भागाचा अभिमान असल्याने तुम्ही पाहत नसाल ते.. पण फक्त संकोचित आपल्या भागा पुरता विचार का? समस्त प्रोब्लेम चे मूळ शोधले पाहिजे.. 3. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? येथे लिहिणारे कोण आहे असे.. नसल्यास त्यांनी त्यांचे बघावे, शेतकरी कर्ज मागतो म्हणे.. ज्या राजकारण्यांना कर्ज आणि त्यावरील राजकारण करायचे आहे त्यांना तुम्ही का कर्ज देता असे कधी विचारले आहे का? माझे मत आधी मांडल्या प्रमाणे स्पष्ट आहे.. कर्जाची भीक नकोच.. पायाभूत सुविधा पुरवल्या तरी खुप आहे, माझा लेख पूर्ण त्यावर आहे.. कर्ज माफ करणे हे long term solution नाहीच.. आणि ते करू नये.. उलट कर्ज मागूच नये यासाठी सोयी, सुविधा, किंमत शेतकर्यांना मिळावी.. वयक्तिक शेतकऱ्यांत मिसळता का हा प्रश्न.. मी कधी काव्य वाचनात मिसळत नाही.. शेतकरी कुटुंब ..नातेवाईक.. मित्र सगळे शेतकरी.. मी माझ्या शेतात माझ्या जिरायती असलेल्या शेतात, ज्वारी पेरलेली आहे.. आणि एक माझ्या शेतावर कधी मी लोन घेतले नाही ना मी बुडवले आहे.. येथे लिहिणारे स्वतःला काय समजतात काय माहित, पूर्ण शेतकरी म्हणजे कर्जा कडे डोळे लावून बसलेले आहे हे चित्र का रंगवले जातेय? 2 आणि 3 आणि 5
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का?
वयक्तिक हे करणे जमत नसले तरी, बारामती अग्रो ची मेन ब्रँच, सुरुवात होण्या पासून भाऊ आहे तेथे.. कुकूट पालन माहिती, त्यांचे खाद्य.. फायदे या साठी कायम फिरती वर.. पंचक्रोशीत माऊली /अग्रो म्हणा मध्ये कळेल, कधी सोबत फिरलोय.. बारामती agro कडून चालणारी कामे माहित नसतील तुम्हाला.. या कधी तुम्हाला पण देऊ.. लोणी भापकर कमी पाऊस भाग, तेथे ही मामाला पोल्ट्री टाकून दिल्यात.. बर बारामती म्हणजे राजकीय घेऊ नये.. मामा भाजपा तालुका उपाध्यक्ष, नीरा कृषी समिती चा संचालक, बाकी इतर पक्षात.. राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही आमच्या घरात आणि नातेवाईका मध्ये आहेत.. असो.. 3. फुलशेती मत्स शेती आमच्या कोरड वाहू भागात नाही जमणार.. तरी पुरंदर च्या भागात, सीताफळ आणि फुलांच्या शेती मध्ये फिरलोय.. वयक्तिक नाही माहिती दिली..

In reply to by गणेशा

सतिश गावडे 02/08/2020 - 16:13
"कवीस" म्हणजे हा कविता धागा टाकणारा कवी यांना उद्देशून होते ते. तुला काही विचारायचे असते तर सरळ फोन नसता का केला मित्रा. असो. प्रश्न संकोचित आपल्या भागापुरता विचार करण्यापूरता नाही. आमच्या रायगड जिह्यात ना हापूस आंबा होतो ना काजू. आंबा आणि काजू आमच्या खालील दोन जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग. आमच्याकडे फक्त आणि फक्त भात पिकतो. पावसाळ्यात जो थोडाफार भाजीपाला अंगणात, परसदारी किंवा शेताच्या बांधावर पिकतो तो घरापूरता असतो. राहीली गोष्ट पावसाची आणि पाण्याची. पाऊस मुबलक असला तरी अवकाळी पाऊस कोकणातही होतो आणि त्यातून होणारे नुकसान कोकणी शेतकर्‍याचेही होतेच. आणि इतर भागात ज्याअर्थी पिके घेतली जातात त्याअर्थी तिथे पाणी ही समस्या नाही. पाणी नसते तर पिकच घेता आले नसते. त्यामुळे माझा रोख कोकणातील शेतकरी आपल्या परीने अडचणींवर मात करुन मार्ग काढतो तर मग ते इतर भागातील शेतकर्‍यांना का जमत नाही, ते ही मोठी शेती असताना, पिकांची विविधता असताना याकडे आहे. थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की शेतकर्‍यांना मदत कुणाला करायचीच नाहीये. केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करुन आपली पोळी शेकून घ्यायची आहे. तसे नसते तर कर्जमाफी आणि विजबिल माफी अशा तात्कालिक मागण्या पुन्हा पुन्हा करत राहण्यापेक्षा तू म्हणतोस त्या पायाभूत सुविधा मागितल्या गेल्या असत्या. त्यांची पुर्तता व्हावी म्हणून पाठपुरावा केला गेला असता. तसे होत नाही.

In reply to by सतिश गावडे

गणेशा 02/08/2020 - 15:24
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो येथे . एकदा दिले की उत्तरे द्यावेच लागतात.. माझ्या आधीच मूळ धागा कर्त्याने पण रिप्लाय दिलाय.. मी कर्जमाफीची मते वरती जी माझी लिंक दिली आहे त्या बद्दल माझा लेख असे लिहिले आहे.. ---- बाकी कवी कविता हा वेगळा विषय आहे, आणि त्याचा मला काडीमात्र अभिमान नाही.. माणसाने माणसात रहावे.. त्याला समजावे.. जगावे.. Problem सगळीकडे असतात, ते पहावे.. पण मुद्देसूद लिहिताना ही मध्यमवर्गीय माणुस, शेतकर्यांना कडू नजरेने बघणे सोडेल तर ना.. वरती परत.. शेतकार्यांचे कैवारी धावून येतात, अरे, येथे सगळे वाचले तरी कळेल.. कोणाला जास्त बोलायचे आहे.. असो. मी तर, मध्यमवर्गीय माणूस पण problem घेऊन जगतोय हे मान्य करतो.. पण म्हणुन त्याने दुसऱ्याला तुच्छ लेखावे.. मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि आमची जुनी मैत्रिण पियुशा ला रिप्लाय दिला असे वाटते आहे.. माणुस म्हणून पाहायचे सोडून आम्ही कर भरतो फलाना.. उद्या मोठे उद्योजक म्हणाले आम्ही जास्त कर भरतो.. आम्ही म्हणेल तसेच झाले पाहिजे तर..? किती कर भरता तुम्ही? मी स्वतः कर भरतो म्हणुन माझ्या शेतकरी बांधवाना मी तुच्छ नजरेने, दूषित नजरेने पाहिचे? सरकारने शेतकऱ्यांना सुविधा देऊ नये, त्यांचे त्यांनी पहावे असे म्हणताना आपल्याला काहीच वाटत नाही? मी तर पुढे जाऊन म्हणतो, लावा कर शेतकऱ्यांना पण.. काही हरकत नाही.. पण मग त्याच्या उत्त्पनाच्या किंमती वर तुम्ही बंधन घालणे बंद करा, दलाल बंद करा.. तो शेतकरी कसा त्यांचा माल विकेल तो बघेल.. नाही विकला तर नाही.. पण मग सरकार, आणि इतरांनी नाक खुपसू नका.. तेव्हडी हिम्मत आहे का? बळीराजा म्हणुन फायदा उठवतायेत वाटते ना.. आणि बाहेरून माल मागवू.. मग जा बिनधास्त.. आणि कर काय, लाईट बिल काय नका माफ करू.. पण पायाभूत सुविधा, व्यवस्था देण्यात प्रत्येक सरकार नपुसंक आहे हे ही मग मान्य करा.. आणि ते सरकार चे काम नाही हे म्हणणे असेल तर मग सरकारे का हवीत? अवघड आहे.. थांबतो.. का उगा टाइम पास करताय आणि करायला लावताय..

In reply to by पियुशा

गणेशा 02/08/2020 - 06:49
आधीची चर्चा लेख. आणि सुबोध जी आणि इतर जे येथे मुद्देसूद लिहीत आहे, त्याची प्रत्युत्ततरे तेव्हढ्याच मुद्देसूद तिकडे दिलेत.. पुन्हा तेच तेच लिहिण्यात काही अर्थ वाटत नाही.. थांबतो. http://misalpav.com/node/45446 शेती आणि राजकारण

In reply to by पियुशा

एक शेतमजुर दिवसाला ३००-५०० ₹ घेतो + वाहतुक खर्च कधी कधी भाव नाही लागला तर हा खर्च पण निघत नाही,, मग नाईलाजाने फिरवावा लागतो नांगर ,, आधि केलेला बी बीयाणांचा खर्च खत , फवारण्या , खुरपणी , पाळी इत्यादि पण निघत नाही काही वेळा.. महत्वाच फेकाफेकी करणारे फक्त ५-१०% शेतकरी असतात ते पण संतापुन,, बाकी सर्व राजकीय आंदोलने असतात.

Rajesh188 01/08/2020 - 23:20
शेती वाडी असल्या मुळे शेती विषयी अनुभव आहे. एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटत eji कडे शेती तोट्यात आहे असं म्हणायचं पण कारण शोधून त्या वर उपाय पण करायचे नाहीत. सरकार काही तरी करेल ह्या वर विसंबून राहायचे .. मग कर्ज माफी, ची मागणी असेल किंवा हमी भाव. फक्त एका गावाचा विचार केला तर 1 टक्के पण शेतकऱ्यांचा शेतात फळ झाड नाहीत , शेवगा, जांबुळ,अंबा, आवळा,चिंच अशी विविध प्रकारची झाडे 1 टक्के शेतकऱ्या कडे पण नाहीत.. सोयाबीन तर सर्व सोयाबीन च करणार मग भाव पडेल नाही तर काय होईल. कित्येक वर्ष शेती तोट्यात आहे ना . मग एकत्र येवून पिकांची रचना आणि नियोजन का केले जात नाही. शेतीमाल शेतकरी मंडईत जावून कमी भावात विकतो पण कोण्ही विकत मागितले तर तो बाजारातील खरेदी भाव लावतो. व्यापारी समजा गाजर 60 रुपये किलो नी विकत आहे तर तो शेतकऱ्या कडून 15 रुपये किलो नी खरेदी करतो . पण तोच शेतकरी गाजर 20 रुपया किलो नी बाजारात विक्री करू लागला तर किती तरी फायद्यात जाईल तुफान विक्री होईल पण तसं घडत नाही . आता 20 रुपये लिटर नी dairy la देईल पण 25 रुपये लिटर नी लोकांना देणार नाही त्यांना 45 रुपये बाजाराचा दर सांगेल. 25 रुपये लिटर नी शहरात शेतकरी दूध विकू लागला dairy var अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

वर दिलेले सर्व प्रतिसाद मी वाचले, थोडीफार नविन महिती पण वाचयला मिळाली,, पण काही प्रतिसादांशी मी सहमत नाही. कारण शेती ही पुर्णतः निसर्गावर अवलंबुन आहे. प्रत्येक भागात जसा कमि जास्त पाउस तसच पिक परंतु पिक कितीही चांगल आल तरिही एक अवकाळी जोराचा पाउस खुप काही करुन जातो. अशाच अवकळी ने मार खाल्लेल्या , सतत नापिकी व कर्जबाजारी पणामुळे कंटाळुन फाशी घेतलेल्या एका शेतकर्‍याच्या मुलाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद. लोभ असु द्या.

चौकस२१२ 02/08/2020 - 19:39
कोणत्याही देशात शेती हा "देशहितासाठीचा" व्यवसाय म्हणून समजला जातो आणि तो बुडून आपण परावलंबी होऊ नये म्हणून सरकार काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते १) पण तो व्यवसाय असतो...हे विसरून "सरकारने आणि समाजाने " केलेली मदत म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी समजू नये .. आणि २)बिगर शेतकऱ्यांनी शेतीचा मान हि ठेवावा .. दोन्ही बाजू टोकाला जायला लागल्या कि असा चुथडा होतो आपला.. एका शेतीप्रधान देशाचा रहिवासी ( येथे देशातील ७०% शेतीमाल निर्यात होतो https://www.dfat.gov.au/trade/organisations/wto/Pages/agricultural-trade#:~:text=We%20currently%20export%20more%20agricultural,total%20goods%20and%20services%20exports.)

Gk 03/08/2020 - 16:33
1950 आजा - 20 एकर मग त्याला 4 पोरे --- म्हणजे शेती प्रत्येकी 4 एकर मग त्याला 4 पोरे ... शेती प्रत्येकी 1 एकर मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते. एवढ्या काळात मुंबईत एक चाळीत घर , एक डोंबिवलीत व एक नेरळला घर होते आणि वारस किती ? एक मुलगा सून नैतर एक मुलगी जावई

गणेशा 03/08/2020 - 17:30
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते.
मग ते मुंबई पुण्यात येऊन चाळीत राहतात.. मग त्यांची पोरे शेतकरी आणि शेती पेक्षा शहराला जास्त योग्य समजतात.. मग त्यांची दोन आणखीन घरे होतात..

In reply to by गणेशा

Gk 03/08/2020 - 20:55
शहरातील एकुलती एक पोरे 2 रुपयेवाली असतात , बापाचा रुपायाही पोराला आणि आईचाही पोराला शेतकऱ्याला 4 पोरे , तर एकेक पोर चार आणेवाले होते

In reply to by गणेशा

गणेशा 03/08/2020 - 21:27
हो मग तेच म्हणतोय ना मी.. चारआनेवाला पोरगा मुंबई किंवा पुण्यात येतो.. मग तो चाळीत राहतो.. त्याला एक पोरगा होतो.. तो पोरगा शेतीवाले आणि शेतकरी हे कसे बिनडोक असे समजतो.. मग तो शहरात वाढतो.. त्याची आणखिन 2 घरे होतात..

अभ्या.. 28/07/2020 - 14:08
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा. तुम्ही आकडा टाकून वीज घेता. तुम्ही वारेमाप खर्च करुन लग्न समारंभे करता. कुठलाच टॅक्स न देता स्कॉर्पिओतून फिरता. व्यापार जमत नाही म्हणून आडत्याला शरण जाता आणि भाव मिळत नाही म्हणून बोंबलता. आडती लोक शहरी लोकांना जास्त भावात विकून कमावतात म्हणून विव्हळता. शहरी लोक तुमच्या हितासाठी त्यांची सगळी कर्जे विनामाफीची फेडून वर सगळे टॅक्स भरुन तुमच्या हितासाठी धडपडतात तर त्यांच्याच नावाने ओरडता. शहरी लोक इतक्या प्रेमाने अ‍ॅग्रो पर्यटनाला येतात तर तिथेही तुम्ही त्यांना नाडता. भाव मिळत नाही म्हनून कांदा, टमाटे आणि दूध रस्त्यावर ओतायचा माजुरडे पणा करता. तुम्हाला पिक, जमीन, भाव, बाजार, शिक्षण, घर ह्या कशातलेच व्यवस्थापन जमत नाही तरीही शेत सोडवत नाही आणि ते दुसर्‍यालाही घेऊ न देता रडता. राजकारण्यांना एकगट्ठा मताची लालूच दाखवून पिकविमा, कर्जमाफी, विज्बिलमाफी, सवलती अशा गोष्टी पदरात पाडून घेऊन परत तडफड करता. . .तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 28/07/2020 - 14:59
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !! त्यासाठीच दिलाय तो प्रतिसाद

In reply to by प्रसाद गोडबोले

आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या मग ठरवु काही बोलायची गरज आहे का नाही ते. @मार्कस्_ऑरेलियस

In reply to by अनिल चव्हाण रा…

कशाला करताय इतकी तोट्यातली शेती , फुंकुन टाका जमीन अन मस्त शहरात जाऊन राव्हा ना , मस्त फॉर्चुनर घ्या , "पनवेल"ला जाऊन पैसे उडवा ! पैसे गेले तरी चालतील पण खेळ झाला पाहिजे =)))) तुमची शेतजमीन विकायची असल्यास लोकेशन , क्वोट आणि मोबाईल नंबर सांगा.

In reply to by अनिल चव्हाण रा…

तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!

In reply to by अनिल चव्हाण रा…

तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!

In reply to by अभ्या..

सर टोबी 28/07/2020 - 22:48
तसेच आक्रस्ताळ्या प्रतिसादाशीही सहमत नाही. प्रथम शेतीविषयक त्रुटींविषयी जाणून घेऊ: शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान बदलवून टाकणारी सहकार पद्धत गैरव्यवहार आणि राजकारण यामुळे पूरती मोडकळीस आणली. एके काळी सहकारी क्षेत्राने निव्वळ शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसाय जसे सूत गिरणी, मद्यार्क, वीज इ. क्षेत्रात पाय रोवले होते. महाराष्ट्रात तर सहकार क्षेत्राने अपना बाजार, अभियांत्रिकी, पेट्रोल पंप, असे नवनवीन क्षेत्रात जम बसविण्यास सुरुवात केली. आज तेच सहकार क्षेत्र जेमतेम शेतीपुरते टिकून आहे. सहकारी पध्धतीने शीतगृहांची निर्मिती, पुरवठ्याच्या नियंत्रातून बाजार भावाचे नियोजन, सामुदायिक रित्या ठरवलेली पीक पद्धत ज्यात सर्वच शेतकरी एकच एक उत्पादन घेण्याऐवजी भिशी पध्धतीने उत्पादन घेतील अश्या अनेक कल्पक गोष्टी करू शकतात. आता प्रतिसाद देणार्यांकडे वळु. प्रथम आकडा टाकण्याची चैन असणारे, स्कॉर्पियोतून फिरणारे, सोन्याचा गोफ घालणारे, लग्न कार्यात मोठा खर्च करणारे शेतकरी फक्त मोठ्या शहरांच्या आजूबाजूला बागायती शेती करणारे असतात. निवडणुकीच्या वेळेस होडीतून जाणारे, डोंगर चढून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे जे फोटो येतात ना अशा दुर्गम भागात गरीब आणि जिरायती शेती करणारा शेतकरी असतो. आणि बागायतीचं जरी म्हणाल तरी खालील गोष्टींचा विचार करा आणि आपला प्रतिसाद किती उथळ होता ते बघा:
  • शेतकरी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त झाला आणि कोरोनाच्या फेऱ्यात अडकला. यात कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः फायद्यापासून दुरावला. याला कांदा निर्यातीवरील बंदीही कारणीभूत आहे.
  • शेतकऱ्यांना कृषी माल हवा त्याला विकता येणं हि एक प्रकारे अडत व्यवसायाचीच सुधारित आवृत्ती आहे. म्हणजे त्यात किमान हमी भावाची शाश्वती नाहीच.
  • अजून एक. नुसती कल्पना करून बघा. तुम्हाला काही कारणाने तुमची मिळकत विकायची आहे आणि तुम्हाला कळतं कि सरकारने त्यावर आरक्षण टाकलं आहे. ती जी कळ उमटेल ना काळजात ती शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली असते.

In reply to by अभ्या..

आता तुमचे सर्व मुद्दे खोडुन काडतो ,, १ आकडे ,,,, एक वेळेस सर्च करा महाराष्ट्रातील किती शेती सिन्चन क्षेत्रात येते न किती कोरड वाहु आहे,,, अर्धवट माहीती धोक्याची असते, जिथे विज नाही, आली तरिही फिक्स टाइम नाही,, राहाता राहिला प्रश्न आकड्यचा आता नियम बदलले आहेत कोणी ही विज चोरु शकत नाही ,, काहि जण चोरत असतील तर अस नाही ना की सर्वच जण चोरत असतिल,,, आणि जर तस असेल तर शहरात राहणारे सर्व जण श्रिमंत पाहिजेत ना मग कशाला लोकल ने प्रवास करता, भाड्याच्या घरात राहाता बी एम ड्ब्लु घेउन फिरा ना सर्व,,,, आता २. लग्न खर्च ,,, तुमच लग्न झालय का ,, झाल असेल तर तुम्ही कोर्ट marriage केल आहे का ??? नसेल तर का नाही केल,, आणि लग्न नसेल केल तर का नाहि करनार???????, का कमी पना वाट्तो ????? ,,,, आता ३ टॅक्स ,, इ बूड्बक ,, अभि नये कानुन के हिसाब से ५,००,००० के उपर वालो को भी टॅक्स देना होगा ,, जे एका सामान्य शेतकर्‍याच (२-३ एकर वाले) ३-४ वर्षाच पन उतपन्न नसत.,,, आता स्काॅर्पिओ त्याला तुम्ही घेउन दिली काय???? ४ .. हे मात्र अती झाल जो जगाला जगवतो त्याला व्यापार शिकवणार तुम्ही ,, अरे बाबा त्याला वेळ कुठाय ,, एक महिन्यात २-४ वेळा खुरपण एक दोन वेळा पाळी टाकावी लागते,, ति काय तुम्ही करुण देनार???? कधी केलय का हे काम ऐकुन तरि आहात का,, हे आस असत म्हनुण, ,, आता भाव सोडुन द्या कशाला माझ तोंड उघडता, शिक्षका चा पगार at the time of independence and now or ( today ),,, n the cost of food grains at the time of independence and now,, you will find a huge difference about 400 times ,, हे लिहीनारा पण एक शेतकरीच आहे म्हनुण ते शिक्षण न बाकी उपदेशाचे डोस देउ नका,,.,,! आणि टॅक्स भरता म्हनुन ऊडु नका तुम्हाल इनकम रिटर्न मिळत,, तुमच्य टॅक्स पेक्षा जास्त बियान अन खत जमिनीत ओततो जे येइल का नाही ग्यारन्टी नसते,, घेतली का कधी असली रिस्क ,, ओतले का कधी हजरो रुपये जमिनीत???? आले मोठे व्यापार अन् भाव शिकवायला. ओय!!!!! AGRO पर्यटन ,,, शहरी च नाही जगातील कोणाताही व्यक्ती जर सहज म्हनुण शेतात आला तर आम्ही असेल तो रानमेवा खाउ घातल्या शिवाय त्याला जाउ देत नाही ,, त्याला काहि त्रास असेल तर मुक्काम करायला लावतो. Without expecting and accepting a single penny from him/them,, can u do that ,,???????. रात्री कोणी बेल वाजवली तर पोलिस स्टेशन ला कॉल करनारे, आम्हाला म्हणता आम्ही शहरी लोकांवर ओरडतो,,, खोटा आरोप करता,,, वाह् रे वाह !!!! ५ .. भाव नाहि मिळाला तर travel expenses and wages देउ शकु एवढ पण उतपन्न नाहि निघत,, मग तुम्हि देनार का ते पैसै??. काय जोक करता राव ६,,,६ अन हे व्यवस्थापन कुठुन आनल, असु देत,, एक महिन्याचा ५०,००० पगार लेट झाला तर बजेट बिघडल अन् घर खर्च कमी करनारे,,, तुम्ही जो ५०,००० सहज जमिनीत ओततो अन १,००,००त वर्ष काढतो एखद्या एम बी ए ला लाजवेल अस व्यस्थापन करतो,, त्याला मॅनेजमेंट येत नाही अस म्हनता.... कमाल !!! ,, ७ आता मात्र संयम संपला,, लाज वाट्ते का काळी आई विक म्हणायला,,, जर असाच विचार करून सगळ्यांनी जमीनी विकल्या तर खाणार काय ?????? ,., ८ ... ओ राजकारणी ,, पिक विमा, कर्ज माफी ४-५ वर्षाला एकदा होते,, दररोज नाही.. ,, अन आताच तर म्हनालात आकडे टाकतो,, तरिहि विजबिल माफी घुसवली ,, तरिही सांगतो. आम्हाला फक्त ३-५ ₹ पर युनिट बिल ,, म्हणजे ५०० ₹ पण बिल येत नाही ,, मग आम्ही कधी माफी मागितली, उलट आता लॉकडाउन मधे बिल माफी कोण मागतय.,, ज्या शेतकर्‍याच्या शेतात पाणी नाही मोटर नाही ते पण मागतात का हो विजबिल माफी????? हे सर्व फक्त तुम्हालाच ,, तुमच्या बाल बुद्धीची किव येते.. तुम्हाला कोणी अधिकार दिला , शितावरुन भाताची परिक्षा करायला. आधि नांगरट न पाळी मधला फरक सांगा.,,, उचलली जिभ न लावली टाळाला.. टिप : हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही. Last but not least ,, Don't talk about anything until and unless you have therotical as well as practical knowledge or experience about it. by अनिथ. बाकी टायपिंग मिस्टेक असतिल तर जाउ देत.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 30/07/2020 - 17:48
हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही.
असे का म्हणून? मी विचारलेले कधी ऐकले नाहि ह्याआधी कुणाकडून? कशामुळे आली ही परिस्थिती? आणि मी सोडून इतरांनी मनावर घेऊ नये असे का म्हणून? घेऊ दे की मनावर. जबाबदारी पण घ्यावी मनावर घेतल्याची. कशाला घाबरायचे.. सल काय आहे ते कळले पण त्याची उकल कुणी करायची? कशी करायची? का करायची? . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात भाषणे ठोकल्यासारखे लिहुन काही होत नाही बळीराजा. हसण्याचा विषय नाहीये हा पण तो होतोय तुमाच्यासारखे आवेशपूर्ण पण बिनबुडाचे प्रतिसाद वाचून. . सावरा, सांभाळा

In reply to by अभ्या..

आधी बघा बिनबुडाचे आरोप कोण करतय,, मनावर घ्या नका घेउ तुमचा विशय ,, फक्त हा मुद्दा शहरी / ग्रामिण न व्हावा हा हेतु होता म्हनुन तस लिहील ,,, अन् मी काही भाषण नव्हतो देत , ते तुम्ही दिल मी नाही ,,, मी फक्त कविता लिहीली , तुमचा प्रतिसाद आला मी प्रतिउत्तर दिल that's it,, आता मी दिलेल्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर द्या नका देउ मर्जी तुमची , तसा तो तुम्ही नाही देणार हे अपेक्षितच होत , झाल हि तेच ,, उगाच विषयांतर केलत,, आता तुमचे उत्तर अन माझे प्रश्न यांचा मेळ बसत असनारा प्रतिसाद आला तरच मी रिप्लाय देइल,, , धन्यवाद.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 31/07/2020 - 20:27
हे बघा मालक, तुमच्या कवितेत टोटल तीन प्रश्न आहेत. १) असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? २) आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || ३) त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, त्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिलेले आहे कवितेत शेवटी. असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ओके. काही हरकत नाही. माझाही बाप कधी टिपटाप राहिला नाही. अगदी माझ्या(म्हणजे माझ्या बापाच्या) शेताचा सध्याचा चालू भाव ६५ लाख प्रति एकर (फक्त शेतीसाठी, गुंठेवारीसाठी नाही) असूनही टिपटाप राहात नाही. त्यांना गरज वाटत नाही त्याची. पोरांनी टिपटाप राहावे असे वाटते त्यांना पण स्वतःच्या पोराच्या लग्नातही खांद्यावर गमजा टाकून कामे करत हिंडतील. मनुष्य स्वभाव. पिढीचा फरक, इलाज नाही. दुसरा प्रश्न पोरक्या पोराचा प्रश्न फक्त शेतकर्‍यांच्या पोरांचा नसतो. पोरका झाला तरी त्याची काळी माय शाबूत असते. नोकरदाराच्या पोरक्या पोराला अनुकंपेत नोकरी मिळायचे प्रमाण फक्त सरकारी मध्ये. खाजगीत ते ही नाही. सगळी सुरुवात नव्याने. तिसरा प्रश्न : कोण देईल थाप? अर्थात ह्याचेही उत्तर वरचेच आहे. पितृछत्र दुरावणे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. पण ती युनिव्हर्सल आहे. प्रत्येक बाप नसलेल्या पोराला बापाची कमी वाटत राहणार. त्याचा शेतकरी बाप आणि शहरी बाप असा फरक नसतो. . राहता राहिले कवितेबद्दल आणि वस्तुस्थिती बद्दल. अ‍ॅज अ कविता रचना चांगलीच आहे. काही थोडी यमके आणि शब्दरचना सोडल्यास बाकी उत्तम आहे. पण.... हि कविता म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येक शेतकृयाची आहे आणि त्यातून आपण फार शेतीविषयक गंभीर प्रष्न मांडत आहोत असा आव आणत असताल तर प्लीज .... फक्त तुम्ही शेतकरी नाही आहात किंवा बाके सगळ्यांनी शेतकृयावर अन्याय केलाय आणि तरीही शेतकृयांवर आरोप करतोय असा समज कदापिहि करुन घेऊ नका. आता माझ्या प्रतिसादातले आरोप... ते निष्कर्ष आहेत गेल्या कित्येक वर्षातले प्रत्येक चर्चेतले, प्रत्येक व्यासपीठावरचे शेतीच्या कुठल्याही प्रश्नांवर काहीही लिहिले गेले तरी काढले गेलेले निष्कर्ष आहेत. मी नाही काढलेले. मी तर उद्विग्न होऊन फक्त संकलित केलेत. आतापर्यंत ते तुमच्या कधीच वाचनात आले नसतील तर तुम्हाला खरोखर मूळापासून विचार करायची फार गरज आहे. मला आदर आहे प्रत्येकच काम करणार्‍या कामगाराचा. भले तो शेतकरी असेल, जवान असेल किंवा शास्त्रज्ञ असेल. शिक्षणाचे महत्व तुम्हाला तर सांगायलाच नको. एखादा शेतकर्‍याचा मुलगा फर्डे इंग्रजितले कोटस देत जर संभाषण करत असेल त्याचे कौतुक वाटेल पण मुद्दा हरवून कसे चालेल मालक. तुम्हाला इंग्रजि मिलो हे अपमानास्पद आणि मुस्कील घडी वाटते पण त्या मिलो वर तेव्हाचा शेतकरी पण जगलाय. आज शेतीत बियाणे, खते, किटकनाशके, औजारे परदेशी कंपनीचे जर शेतकर्‍यांना चालू शकत असतील तर शहरी माणसांनी केले इंपोर्ट धान्य काय बिघडणारे. आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. कुणाचे पूर्वज शेतकरी नव्हते आणि कोण फक्त सर्व पिढ्या शेतीच करत आले आहेत ह्याचा गंभीरपणे विचार करा तुम्हाला जाणवेल तुम्ही (म्हणजे शेतकरी) फक्त सिस्टिमचा एक भाग आहेत. असतात प्रत्येक क्षेत्राला स्वतःचे असे काही प्रॉब्लेम पण ते दुसर्‍या कुणाला स्मजणारच नाहीत असा आव आणला तर ते कधीच संपणार नाहीत. मूल लहान असले की ते फक्त रडते. आई समजून घेते त्याला भूक लागलीय का सू लागलीय का गरम होतय का थंडी वाजत्ये. जसे जसे मूल जाणते होते तसतसे त्याला काय हवेय आणि ते कसे आणि कुणाकडून मिळवायची ह्याची जाण येते. मला वाटते ह्यावरुन तुम्हास समजेल असेल काय म्हणाय्चेय ते. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

या प्रतिसादाशी मी सहमत आहे,, पण मी कवितेतील प्रश्नाचे उत्तर नाही तर तुमच्या उद्विग्न होउन दिलेल्या प्रतिसादावर मी दिलेला प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती. पण असो., तुमच्या बद्द्ल झालेला गैरसमज ( तुमचा पहिला प्रतिसाद वाचुन ) दुर झाला हा प्रतिसाद वाचुन. " आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. " हे ही पटले. खाली एका प्रतिसादात वाचले कि तिकडे जमिन ६५ लाख रुपये प्रति एकर आहे, विभाग वार किंमत बदलते,, सध्या परभणी जिल्ह्यात ६-१० लाख प्रति एकर इतकाच भाव आहे., असो. ,,,, तुमच्या भावना पोहोचल्या तुम्हाला काय म्हणायचय ते पण कळल. म्हणुन हा विषय वाढवण्यात अर्थ नाही अस मला वाटत, मी एका कर्जबाजारीपणामुळे फाशी घेतलेल्या शेतकर्‍याच्या एका मुलाची व्यथा मांडण्याचा प्रामानिक प्रयत्न केला होता, पेश्याने काही मी कवि नाही ना तुम्ही मालक म्हणाव एवढा मोठा. पण अजुनही मी तुमच्या पहिल्या प्रतिसादास असहमत ( सहमत नाही ).

In reply to by अनिल चव्हाण रा…

शाम भागवत 02/08/2020 - 12:03
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६-१० एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?

In reply to by अभ्या..

शाम भागवत 02/08/2020 - 12:04
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६५ लाख एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?

In reply to by अनिल चव्हाण रा…

कपिलमुनी 31/07/2020 - 18:33
एवढे प्रॉब्लेम आहेत तर शेती करू नका, शहरात या नोकरि करा, धंदा करा , टिप टॉप रहा

In reply to by अभ्या..

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:33
धागालेखकाच्या भावना पोहोचल्या.
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
दुर्दैवाने, अभ्याशेठचा संपूर्ण प्रतिसाद (उपरोधिक आणि) अत्यंत वास्तवदर्शी आहे.

Rajesh188 28/07/2020 - 14:53
शेती करणे म्हणजे जुगार आहे . इथे तुम्ही किती उत्पादन घेवू शकता ह्या वर अनेक घटक कार्य करतात. काही घटक तुमच्या हातात तर काही घटकांवर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते. 1), चांगले बी,मशागत, खत देणे हे तुमच्या हातात आहे पण पावसचा लहरीपणा,पिकावर पडणारी रोग राई हे आपल्या हातात नाही आणि हे घटक सर्व अंदाज चुकवू शकतात आणि उत्पादन खर्च पण निघत नाही. मजुरांची कमतरता,रस्त्यांची सुविधा,पाणी पुरवठा,विजेची उपलब्धता एक नाही असंख्य अडचणी वर मात करून जेव्हा उत्पादन बाजारात येते तेव्हा भाव नसतो. भाज्या टिकावू नसतात त्या मुळे त्या साठवता येत नाहीत त्या विकण्यासाठी साखळी ची गरज असते ती साखळी निर्माण करणे एका शेतकऱ्याला शक्य नाही तशी यंत्रणा उभी राहणे aavshakya आहे.

In reply to by अनिल चव्हाण रा…

अभ्या.. 30/07/2020 - 17:42
हायब्रीड पिकवायला ही शेतकरी लागणार ना? म्हण्जे ते पीएल १८० मधला अमेरिकेतुन आलेला मिलो म्हण्जे हायब्रीड म्हणत असताल तर ती वेगळी गोश्ट. ज्यांच्यासाठी पिकवता ते विचार करेना झाले मग शेतकर्‍यांनी का करावा त्यांचा विचार? ते करतील काहीही. इंपोर्ट करतील, त्याला पैसे मोजतील. शेतकर्‍यांनी आपापल्या पोटापुरते पिकवायचे अन मजेत राहायचे. एखाद्या पोराने नोकरी करायची अन राहायचे टिपटॉप.

In reply to by अभ्या..

फक्त मागच्या वर्षी ज्वारी पिकली नाही तर ६००₹ क्विंटल असनारी ज्वारी ४३००-४८०० पर्यंत गेली,, बाकि सोडुन द्या,, परत इंग्लंड वरुन डुकरांसाठीचा मिलो आणावा लागेल

In reply to by अभ्या..

Rajesh188 31/07/2020 - 18:21
शेती हा व्यवसाय आहे समाज सेवा नाही (समाजाची सेवा होते तो by-product समजा). शेती दुसऱ्यांना अन्न धान्य मिळावे म्हणून कोणी करत नाही स्वतः चा फायदा व्हावा म्हणून शेती केली जाते. शेती च नाही तर सर्वच,व्यवसाय,नोकरी माणूस स्वतः साठी करतो. कोंबडी अंड देते ती मालकाला खुश करण्यासाठी देत नाही. तसेच आहे हे. दुष्काळ ची झळ ज्यांचा शेती व्यक्तितिक्त इन्कम आहे त्यांना बसत नाही. शेतकरी,कामगार,आणि गरीब लोकांना बसते. देव करो आणि अमेरिका किंवा दुसऱ्या कोणत्या ही देशातून अन्न धान्य मागवायचे वेळ येवू नये.

In reply to by अनिल चव्हाण रा…

कपिलमुनी 30/07/2020 - 19:12
खायचे काय हा लोकांचा प्रॉब्लेम आहे . तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडावा, लोक आयात करून 200₹ किलो ने खातील , तुम्हाला काय करायचंय ??

Rajesh188 30/07/2020 - 18:47
खनिज तेल आयात करायला पैसे पुराणात आणि चालले अन्न धान्य आयात करायला. तेवढं विदेशी भांडार आहे का. जेव्हा इथेच काहीच उत्पादन होणार नाही तेव्हा 40 रुपये किलो गहू ,आणि 40 रुपये किलो टोमॅटो एक पण देश देणार नाही. एक आपल्या कडे दुसऱ्या देशांना देण्यासारखे काही नाही त्या अशी किंमत नाहीच जगात. शेती वर आधारित उत्पादन पिकणे बंद झाले तर दुसरे देश सांगतील तो भाव 500 रुपये किलो टोमॅटो. एक वेळेचे जेवायला तुमचा पगार किंवा जो काही इन्कम असेल तो पुरेल का. Import करू एवढं सोपं आहे का,खावू आहे काय.

गणेशा 30/07/2020 - 19:19
स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करू नये.. पण अशी चर्चा आधी माझ्याच एका शेती वरच्या धाग्यावर झालीये सो येथे आता पुन्हा नाही.. पास माझा.. मूळ कवितेच्या भावना कळल्या आहेत

Rajesh188 30/07/2020 - 20:34
माणूस हा सर्वात आधी शेती करायला शिकला आणि त्याची वणवण थांबली आणि तो स्थिर झाला. आणि त्याची खरी प्रगती तेथूनच सुरू झाली. अन्न साठी वणवण फिरणे बंद झाल्या मुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्याला फायदा झाला आणि नवनवीन शोध तो लावत गेला. शहर तशी नवीनच आता इंडस्ट्रियल क्रांती यूरोप मध्ये झाली आणि भारत त्यांचा अंकित देश असल्यामुळे त्याची काही फळ इथे पण उडाली. आणि खऱ्या अर्थाने शहर निर्माण होवू लागली. काही भारतीय कंपन्या मोजक्याच निर्मिती क्षेत्रात होते त्यांना देश अंतर्गत च बाजार होता. सर्वच नवीन असल्या मुळे शहर वाढू लागली . आणि खऱ्या अर्थाने नोकरी हा प्रकार चालू झाला. सरकारी नोकरांना सरकारी तिजोरी मधून पगार दिला जातो त्यांची कार्य क्षमता काय आहे. त्यांना जो भरमसाठ पगार दिला जातो तेवढं फायदा त्यांच्यावकडून मिळतो का तर बिलकुल नाही 10 percent सुद्धा रिटर्न त्यांच्या कडून मिळत नाहीत. शहर निर्माण होण्यासाठी जमीन लागते अजुन तरी अधांतरी शहर निर्माण झालेली नाहीत. ती जमीन अत्यंत कमी किमतीत जबरदस्ती नी ताब्यात घेतली जाते त्यांचे मालक शेतकरी च असतात. रस्ते निर्मिती,कारखानदारी साठी जमीन ,कमी किमतीत सरकार ताब्यात घेत ती जमीन कोणाची असते, पाणी पुरवठा करण्यासाठी धरण त्याला जमीन लागते ती कोणाची असते. जास्त विरोध न करता देशाचे कार्य म्हणून ती जमीन शेतकरी देतो. उद्या पुण्यातील अतिशय पॉश वस्ती जमीनदोस्त करून तिथे जनतेच्या हितासाठी हॉस्पिटल बांधायचे आहे म्हणून. 1000 रुपये गुंटा भरपाई देवून सरकार नी ती जमीन ताब्यात घेतली तर शहरी लोक अटॅक येवून मरतील. कोणाची ही जमीन सरकार देश हितासाठी ताब्यात घेवू शकते हाच नियम त्यांना लागू होईल. थोडक्यात शहर निर्मिती शेतकऱ्यांच्या त्यागवर झाली आहे. शेतकऱ्यांना सरळ पैस्याच्या रुपात कधीच मदत मिळत नाही. खतांची सबसिडी खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना दिली जाते. दूध साठी सबसिडी दूध dairy na दिली जाते. कर्ज माफी ही मागणी शेतकऱ्यांची नाही ती नेत्यांची आहे. योग्य भाव द्यावा,आणि प्राथमिक सुविधा निर्माण कराव्यात ही शेतकऱ्यांची मागणी आहे. 1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही . पण बाकी टॅक्स ते भरत असतात. नोकरदार इन्कम असूनसुद्धा सरकार ला फसवण्याचा धंधा करत असतात. व्यापारी तर त्यांचे बाप रोज लाख रुपये कमवत असले तरी कर चुकवने,वीज बिल बुडवणे,पाणी बिल बुळवणे हे bindast करतात.

In reply to by Rajesh188

डॅनी ओशन 31/07/2020 - 16:15
1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही .
एकर्सचा काहीही संबंध नसतो. कितीही शेती असली तरी पूर्ण उत्पन्न टॅक्स फ्री असते. अर्थात इनडायरेकट् टॅक्स (gst वैगेरे) अर्थातच सर्वच जण भरतात. आणि इनडायरेकट् टॅक्स टोटल कॉन्ट्रीब्युशनच्या 65% असल्यामुळे शेतकरी किंवा कमी उत्पन्नाच्या लोकांचा करभरणीतला वाटा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. इथे तुमचे म्हणणे 100% बरोबर. शेतकरी देशाच्या करसाठ्यात हातभार लावत नाहीत हे फसवे विधान आहे.

बोलघेवडा 30/07/2020 - 21:40
एक साधा प्रश्न आहे. शेतीत इतके प्रॉब्लेम्स आहेत तर शेती विकून का टाकत नाहीत. जी मेहनत शेतीत करणार तीच मेहनत विकून आलेल्या पैशातून दुसरं काहीतरी धंदा करण्यात लावायची. कृपा करून राग मानू नये.

In reply to by बोलघेवडा

Rajesh188 30/07/2020 - 22:19
जे जमीन विकतील ते सर्वात unlucky असतील . काही वर्षांनी इथे सर्व मिळेल पण जमीन मिळणार नाही. फ्लॅट ला काही किँमत नसेल बिल्डिंग चे आयुष्य संपलं की सर्व संपलं. ज्याची जमिनी वर मालकी तोच जगेल. बोलघेवडे 100 वर्ष नंतर आताच्या बिल्डिंग उभ्या नाही आडव्या असतील. जमीन वर असलेली 9 by 9 chi झोपडी उभी असेल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 30/07/2020 - 22:48
कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार , आपल्या ऐकण्या वाचण्यात आला का ? भारतीय नागरिकांची सरासरी आयुष्य वर्षे किती ? १०० वर्षे का ?

In reply to by mrcoolguynice

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:43
श्री-थंड-चांगल्या-मनुष्या, प्रतिसादाच्या between the lines शी पूर्ण सहमत. काय वेळ आलीय माझ्यावर, कुणाशी सहमत होतोय ;) हघ्याहेवेसांन. रच्याक, Conveyance deed बद्धल माझा थोडा गोंधळ आहे राव. इथे किंवा स्वतंत्र, सविस्तर लिहू शकाल का?

Rajesh188 30/07/2020 - 23:13
कमी व्याज दर त्या मुळे फ्लॅट चे कृत्रिम पने वाढलेले दर. फ्लॅट ची किंमत 30 लाख खरी किँमत 15 लाख . 15 लाखाचा फुगा. आता रिअल estate chi अवस्था अत्यंत खराब . फुगा फुटला नाही पण हवा गेली आहे. 40 फ्लोअर ची बिल्डिंग आहे 50 वर्षात ती पाडण्या च्या अवस्थेत येईल. फुकट घर पाहिजे असेल तर 80 फ्लोअर ची बिल्डिंग हवी . मग मोकळी जागा राहणार नाही . सरकारी नियमात बसणार नाही. आणि कोणीच पैसे गुंतवणे शक्य नाही redevelopment साठी. ते फायद्याचे ठरणार नाही.

Rajesh188 31/07/2020 - 00:28
मी शेतकरी नाही उत्तम नोकरी करणारा च आहे. पण अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद अत्यंत हिन दर्जाचा होता. त्यांच्या प्रतिसाद चा सत्य परिस्थिती शी काहीच संबंध नाही. असभ्य,सत्यापासून लांब जाणार,पूर्व गृह दूषित असणारा प्रतिसाद तत्काळ काढून टाकणे गरजेचे होते. प्रतेक प्रश्नांच्या दोन बाजू असतात. आपल्याला त्या मधील काहीच कळत नसेल तर ठाम मत व्यक्त करू नये. माणूस जुना सभासद आहे,काही विषयात उत्तम लेखन करतो. म्हणून चूक आहे ते बरोबर आहे अशी भूमिका नको. चुकीला माफी नसावी. ती दाखवून दिली पाहिजे अंध पने समर्थन नको.

In reply to by धनावडे

अभ्या.. 31/07/2020 - 20:38
धनावडे साहेब नमस्कार, खरे सांगतो मालक, चीज केले तुम्ही माझ्या तुटक्या मुटक्या लिखाणाचे. मला खरेच कधी ही वाटले नव्हते की कुणी लक्षात ठेवून माझे प्रतिसाद वाचत असतील आणि त्याची नोंद ठेवून वेळेवर आठवण करुन देईल. थॅन्क्क्स अ लॉट धनावडे साहेब आणि मिपा पण. बाकी ते राजेश कुणी आहेत त्यांचे काही मनावर घ्यायचे नसते. ते मनकी बात फेम आहेत. नुसते पिंका टाकत लॉजिकलेस विधाने करत हिंडायचे एवढेच ते करतात. चर्चा नामक एक प्रकार असतो, कुणाला प्रष्न विचारला तर त्याची उत्तरे द्यायची असतात कींवा निदान माहित नसले तर गप्प वाचन करायचे असते ते त्यांना माहित नाही अजून. संजय क्षीरसागर आणि अर्धवटराव, कोहंसोहं, भागवसर अशा थोरामोठ्यांच्या चर्चेत पिंका टाकून आध्यात्म अन आस्तिकनास्तिकता शिकवण्याचे धाडस आहे ह्या आयडीचे. विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र देणार नाहीत. दुसरीकडे तिसरीच टेप वाजवत बसणार. ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मात्र उत्तरे द्यायची लोकांनी. उपहास, लॉजिक, अभ्यास, व्यासंग, शुध्द्लेखन अशा कोणत्याही गोष्टीचा दूरदूरचा संबध नसताना लोकांच्या चुकीच्या माफीची गोष्ट करतो हाच विनोद आहे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद धनावडे साहेब. लोभ असु द्या

कांदा लिंबू 31/07/2020 - 11:34
मला वाटतं, इतर कोणत्याही कामाप्रमाणे शेती हे एक उपजीविकेचे साधन आहे. तिला काळी माय (किंवा भौगोलिक स्थानानुसार - लाल माय, for that matter) म्हणणे, तिची पूजा करणे यात योग्य-अयोग्य असं काही नाही. व्यापारी त्याच्या गल्ल्याची, कारखानदार त्याच्या यंत्र सामुग्रीची, इडली-डोसेवाला त्याच्या गॅस-शेगडीची पूजा करतात, नाही का? पण नियंत्रणात असलेल्या-नसलेल्या कारणांनी जर धंदा चालत नसेल तर तेच लोक, तीच उपजीविकेची साधने येईल त्या भावात विकूनही टाकतात आणि कुवतीनुसार दुसरा धंदा करतात. "मी जर हा उद्योग बंद केला तर या जगाचे काय होईल" असा विचार ते करतात का? शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत असेल, आणि पुनःपुन्हा शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत आहे असा अनुभव येत असेल तर... पुढे काही लिहिण्याची गरज आहे का?

Rajesh188 31/07/2020 - 11:56
जो धंधा चालत नाही तो विकून दुसरा धंधा चालू करणे हे व्यवहारिक आहे आणि योग्य पण आहे. ह्या विषयी दुमत नाही. शेती नेहमीच नुकसानी मध्ये जात असेल तर विकावी हा सल्ला योग्य दिसत असला तरी तो योग्य नाही. ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर. जी लोकसंख्या वाढेल तशी कमी होत जाईल. दुसरा मुद्धा हा आहे की जमीन ही पिढ्यान् पिढ्या च्या वारसा हक्क नी मिळालेली संपत्ती आहे ती कमावलेली नाही . त्या मुळे ती विकण्याचा नैतिक अधिकार पण नाही. शेती ला पूरक व्यवसाय करू शकता,नोकरी करून शेती पण करू शकता. अनेक पर्याय आहेत. शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 31/07/2020 - 14:04
ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर...... शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.
हे सगळं ठिकाय, त्यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर सुचवा प्लिज. शेतकरी टीपटाप कधी राहायला लागेल ? जमिनीचे भाव करोडो होतील, तेव्हा जमीन विकून की आणखी कश्या प्रकारे ?

सतिश गावडे 31/07/2020 - 18:28
कोकणात प्रामुख्याने भात शेती होते. पूर्वी दुबार असायची. म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर आणि उन्हाळ्यात कालव्याचे पाणी. कालवा म्हणजे घाटावर असतो तसा मोठा ओढा सदृष्य नव्हे, एका ढांगेत ओलांडता येईल इतका रुंद आणि फुट दिड फुट खोल. पुढे पुढे हे कालवे वर्षागणिक बंद होत गेले आणि काही भागात उन्हाळी भात शेती बंद झाली. तशा नद्या आहेत, बारमाही भरुन वाहणार्‍या. मात्र कोकणातील शेतकरी नदीला मोटर पंप लावून वगैरे भातशेती करण्याची तसदी घेत नाही. पूर्वी जेव्हा दुबार शेती होती तेव्हा स्वतःसाठी ठेवून धान्य उरायचे ते विकले जायचे. आता पावसाळ्यात जे पिकते ते स्वतःसाठी ठेवतात. (किंवा आपण पिकवलेला भात विकतात आणि राशनचा/दुकानातील "पालिस" केलेला तांदूळ आणतात. जिथे शहरी माणसं ब्राऊन राईस चढ्या किंमतीने विकत घेतोय तिथे हा भात उत्पादक मात्र मशीनवर डबल पॉलिश केलेला तांदूळ विकत घेतो. असो) नदीकाठी जमीन असेल तर थोडीफार भाजी पिकवली जाते. मात्र असे कष्ट घेणारा कोकणी शेतकरी गावात एखाद दुसरा. उन्हाळी जिथे कालव्याचे पाणी जात नाही मात्र नदीकिनारी शेत असेल तर शेताला ओल असते. अशावेळी कडधान्ये पेरली जातात. हे ही अपवादात्मक असते. पावसाळ्यात मात्र अंगणात, परसदारी शेताच्या बांधावर भाजीपाला उगवला जातो. आणि त्या भाजीवर पुर्ण पावसाळा साजरा होतो. शेतीला पुरक धंदा म्हणून म्हशी पाळल्या जातात. दूध विकले जाते. तो मोठा उत्पन्नाचा आधार असतो. कुठे आत्महत्या नाही, कुठे कर्जमाफी वीज बील माफी ची मागणी नाही, सावकारी व्यवसाय अस्तित्वात नाही, अडी नडीला जमीन गहाणवट टाकली जाते, मात्र ती वेळेवर सोडवलीही जाते. गहाणवट ठेवलेली जमीन हडपणारा अण्णा नाईक हा सिरियलमध्येच दिसतो. तसाही कोकणी माणूस अल्पसंतुष्ट. छानछौकी न करता आहे त्यात समाधानी राहणारा. समस्या नाहीत असं नाही, मात्र कोकणी शेतकरी रडताना, यंत्रणेपुढे हात पसरताना दिसत नाही. कर्जमाफी, वीजबिलमाफीकडे आस लावून बसत नाही. झेपेल तितकं पोराबाळांना शिकवतो, नाही झेपत तेव्हा हात जोडून म्हणतो बाबारे आता काय पुढं शिकवणं शक्य नाही. पोरगा काय ते समजून जातो आणि कोकण रेल्वेत बसून मुंबईला जातो. चार पैसे कमवतो. त्यातले दोन पैसे आई बापांना इमानदारीने पाठवतो. कोकणातील शेतकर्‍यांच्या लेकी बाळीही तशा शहाण्या. बाप शिकवेल तितकं शिकतात, शिक्षण थांबलं की मुंबईचा रस्ता धरतात. चार घरची धुणी भांडी करतात. चार पैसे गाठीला बांधतात. तेव्हढाच बापावरील लग्नाच्या खर्चाचा बोझा कमी होतो. यातील काहींना उच्च शिक्षणाचं महत्व कळतं. कुठेतरी कुणाच्या इंजिनीयर पोराला गाडीतून फिरताना एखादा शेतकरी पाहतो आणि आपल्या पोरालाही इंजिनीयर करायचं मनावर घेतो. घरातील म्हशी वाढतात, भात लावायची शेतं वाढतात. त्या पोरालाही शाळा, गुरं आणि शेती अशी तिहेरी कसरत करावी लागते. पोरगंही रक्त आटवतं, शाळेत जातं, गुरं राखतं, शेतात नांगर धरतं, डोक्यावर भाताचे भारे वाहतो. आणि एक दिवस इंजिनीयर होऊन विमानात बसून कॅलिफोर्नियाला जातं. याचं पाहून अजून चार पोर शेती गुरं ढोरं यांच्या जोडीने मन लावून अभ्यास करतात. काही बाही बनतात आणि घरी आई बापाला चार पैसे पाठवतात. राज्याच्या इतर भागातील शेतकर्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

Rajesh188 31/07/2020 - 19:44
शेतकरी हा शेतकरी असतो तो कोकणी, घाटावर चा,भारतीय,अमेरिकन असा नसतो. मनुष्य स्वभावाचा बदल असू शकतो शेतकऱ्यांचं समस्या मध्ये बदल नसतो. मध्ये मी अमेरिकन शेतकऱ्या विषयी पण वाचलं होते. त्यांना असणाऱ्या समस्या काय आहेत. शेती ची सर्वात मोठी समस्या आहे प्रक्रिया न केलेल्या शेती च्या उत्पादन ला मागणी नाही. आणि प्रक्रिया उद्योग शेतकऱ्या च्या हातात नाही. Exa बटाटा 30 रुपये किलो बटाट्याचे चिप्स 10 रुपयाला 50 ग्राम. म्हणजे 200 रुपये किलो. फळांचे भाव आणि फळा पासून बनलेले जाम किंवा बाकी पदार्थ ह्यांचे भाव फरक बघा. दुधाचे भाव 20 ते 25 रुपये लिटर (विक्री) आणि लोणी, चीझ,मावा ह्यांचे भाव. रोजच्या जीवनात आता लोक कशाला महत्व देतात. सॉस(प्रक्रिया केलेले) जाम(प्रक्रिया केलेलं) चीज ( प्रक्रिया केलेले) पिझ्झा( प्रक्रिया केलेले) चिप्स(प्रक्रिया केलेली) साखर( प्रक्रिया केलेले) ज्युस( प्रक्रिया केलेले) तेल ( प्रक्रिया केलेले) ब्रेड(प्रक्रिया केलेले) पाव( प्रक्रिया केलेले). प्रोटीन्स suppliment ( प्रक्रिया केलेले) असे अनेक प्रकार हे सर्व पदार्थ शेती मधील कच्च्या मालावर प्रक्रिया केलेले आहेत. ह्या वर उद्योगपती चे नियंत्रण आहे. प्रक्रिया न झालेले. सरळ शेतकरी विकू शकतो. दूध, डाळी,आणि भाज्या. ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे.

In reply to by Rajesh188

चौकस२१२ 02/08/2020 - 19:30
"ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे." हा तर्क काही कळला नाही... जर प्रक्रिया केलेलं पदार्थ वाढत आहेत आणि ते मूळ शेतीच्या मालावर अवलंबून असतील तर शेतकऱ्याला घाऊक भावात अश्या उद्योगांना विकून खात्रीचे गिर्हाईक मिळतील कि.. म्हणजे मग फक्त ताजी भाजी, फळाच्या रोजच्या विक्रीवर अवलंबून राहावे लागत नसेल. म्हणजे एकूण शेतकऱ्याचा फायदाच कि फळ पिकवणारा शेतकरी २, ३ प्रकारे त्याचे उत्पादन विकू शकतो , पूर्वी फक्त बाजारात फळ म्हणून आत जॅम बनवणारे कारखाने, रस बनवून विकणारे कारखाने यांनचं कडून मागणी वाढली.. मग तक्रार काय? तोटा कसा ?

सुबोध खरे 31/07/2020 - 19:53
एक किंवा दोन एकर शेती (हि पूरक उत्पन्न नसेल तर) आतबट्ट्याचा ठरली आहे. ( लातूर भूकंपाच्या नंतर केलेले सर्वेक्षण हि गोष्ट स्पष्टपणे दाखवून देते) पूर्वी दर डोई १० एकर शेती होती तेंव्हा केवळ एक पीक घेऊन काम भागत होतं. त्यातील २ एकर शेती दर ४ वर्षांनी पडीक ठेवून परत कसायला घेत असत त्यामुळे शेतीची नापिकी होत नसे. परंतु एका शेतकऱ्याला ५ मुले झाल्यावर दर डोई शेती २ एकर झाली. यामुळे शेतीवरचा भार वाढला आणि पडीक ठेवणे शक्य झाले नाही आणि शेतीचा कस कमी होत गेला त्यातून अनेक ठिकाणी रासायनिक खते आणि अमाप पाणी देऊन त्या भागात न झेपणारी पिके ( उदा मराठवाड्यात उसाची शेती) तात्पुरत्या फायद्यासाठी घेतली गेली. यामुळे भूजल पातळी खाली गेली आणि बोअरमधून वारेमाप उपसा केल्यामुळे क्षारयुक्त पाणी येऊ लागले आणि काही काळाने मातीत अतिरिक्त क्षार झाल्याने नापिकीचे प्रमाण वाढले. एवढे असूनही लोकसंख्य दुप्पट झाली त्यामुळे बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक झाले. यामुळे येणारे उत्पन्न खाण्यासाठीच पुरत नसल्यामुळे व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी त्यात गुंतवणूक होतच नाही आणि हे दुष्टचक्र चालूच राहते. एक उदाहरण देतो आहे. आमच्या लहानपणापासून पाणीपुरी विकणारा (रामानुज सिंह) भय्या आजही मिशा आणि केस पिकले तरी पाणीपुरीच विकत आहे कारण येणारा अतिरिक्त नफा तो "गाव मी भेज देता है" यामुळे त्याची स्थिती तीच राहिली आहे. याउलट माझ्या भावाची वातानुकूलन यंत्रे दुरुस्त करणारा तंत्रज्ञ (अली) याला माझ्या भावाने रोख पैसे देण्याचे साफ नाकारले. त्याला बँकेत करंट खाते उघडून दिले आणि त्यात चेक टाकायला लावला. यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा सांगून त्याला रोख पैसे न देता बँकेचा चेक दिला. बँकेत चालू खाते आल्यावर त्यातून पैसे काढून "गाव मे भेजना" बंद करायला लावले यानंतर त्याला एक दुकान भाड्याने घ्यायला लावले. त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवायला लावले. हे दुकान भाड्याने घेतल्यामुळे त्याला लोकांच्या घरून वातानुकूलन यंत्र दुकानात घेऊन जाऊन दुरुस्त करणे शक्य झाले. ( अन्यथा मुंबईत घरात बायको एकटी असताना कोणीही माणूस तंत्रज्ञाला घरात काम करू देत नव्हता. हे सर्व करून त्याचे करनियोजन केल्याने त्याने गृह कर्ज घेऊन एक खोली विकत घेतली.बँकेत खाते, पॅन आणि आधार कार्ड असल्यामुले माणसाला एक पत प्राप्त झाली आणि अलीने आपले दोन भाचे आता कामावर ठेवले आहेत. भाड्याचे दुकान त्याने कर्ज काढून विकत घेतले आहे. थोडक्यात आपला व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर उद्योजकतेचा मार्ग चोखाळला लागतो. उद्योजक हा चोर च आहे अशीच मनोवृत्ती सरकारी अधिकाऱ्यांची असते आणि ते उद्योजकाला नाडत असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण शेतकरी मात्र बळीराजा म्हणून सहानुभूतीला पात्र असतो. बहुसंख्य शेतकऱ्यांना जमीन हि वडिलोपार्जित म्हणून फुकट ( भांडवली खर्च न करता) मिळालेली आहे. दोन एकर जिरायती जमिनीची किंमत किती याचा व्यापारी हिशेब ( फुकट मिळालेले भांडवल) करणे अत्यावश्यक आहे. मी आजतागायत एकही शेतकरी गळा काढताना हि गोष्ट हिशेबात धरताना पाहिलेला नाही. ( गैरसोयीच्या गोष्टी बोलणे गैरसोयीचे असते) बहुसंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक यांनी कोणतीही गोष्ट बापाची वारसाहक्काने मिळालेली नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि अपार कष्टावर उभी केलेली आहे. यात धीरूभाई अंबानी, गौतम अडानी पासून लक्ष्मणराव किर्लोस्कर,आबासाहेब गरवारे, चितळे, कॅम्लिनचे दादासाहेब दांडेकर, सारखे असंख्य उद्योजक आहेत. तेंव्हा उद्योजक हे हरामखोर रक्तपिपासू हि भिकारडी कम्युनिस्ट मनोवृत्ती टाकून दिली पाहिजे. तेंव्हा शेतकर्याचे कल्याण करणे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. सरकार तुमच्या साठी काही करेल हि अपेक्षाच सोडून दिली पाहिजे

In reply to by सुबोध खरे

बाप्पू 31/07/2020 - 22:27
खरे सर यांच्याशी सहमत.. बऱ्याच वेळेला ह्या धाग्यावर लिहावे असे वाटले.. पण स्वतः ला आवरते घेतले कारण स्पष्ट आणि मुद्देसूद लिहिलं कि शेतकऱ्यांना सॉरी... बळीराजाला आणि त्याच्या हितचिंतकांना ते पचत नाही.. त्यामुळे अश्या धाग्यावर आता प्रतिक्रिया देणे बंद केलेय..

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 01/08/2020 - 10:01
१.रिपेयर चार्जेस चार्जेस सरकार ठरवते का ? २.अली ने ठराविक ठिकाणी जाऊनच ए सी रिपेयर केला पाहिजे असे सरकार ठरवते का ? ३. मागणी वाढल्याने अली च्या सर्व्हिस वर सरकारी नियंत्रण आणले जाते का ?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 01/08/2020 - 12:37
मूळ मुद्दा समजून घ्या. अलीला लागणारे अनेक परवाने (कुलन्ट गॅस विकत घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी यासारखे) शेतकऱ्याला तसेच्या तसेच लागतात का? दुकान रहिवासी क्षेत्रात चालवता येत नाही( निदान मुंबईत तरी कायदे बऱ्यापैकी कडक पणे पाळले जातात) . व्यावसायिक जागीच दुकान असावे लागते. त्याचे भाडे/ किंमत रहिवासी क्षेत्रापेक्षा भरपूर जास्त असते. अलीला बापजाद्यांकडून काहीही फुकट मिळालेले नव्हते. सरकारी अधिकारी आले कि त्यांचे "चहापाणी" करावे लागते. वीज फुकट तर नाहीच परंतु ११ रुपये युनिट ने घ्यावी लागते आणि दुरुस्त केलेला प्रत्येक ए सी चालू ठेवून थंड होतो कि नाही हे पाहण्यासाठी विजेचे भरमसाठ बिल येते. त्यातील एक दमडी कधीही माफ होत नाही. प्रत्येक व्यवसायाचे आपले प्रश्न वेगळे असतात उगाच अहमदशहा अब्दालीची शेंडी बाजीरावाला लावू नका मूळ मुद्दा समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 01/08/2020 - 13:29
मुळात सर्व्हिस सेक्टर आणि उत्पादन सेक्टर हे दोन्ही भिन्न बाबी आहेत. सेवा क्षेत्रात एसी रेपैरिंग येते . शेती उत्पटन क्षेत्रात येते. दोन्ही च्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांची मिसळ करायला नको. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी त्यांनी शहरात या आणि लहान सहान धंदे आणि नोकऱ्या करा हा तात्पुरता पर्याय झाला . झोपड्या ची वाढ होण्यास हेच कारणीभूत आहे. झोपडपट्टी राहणारे आणि किरकोळ काम करून पोट भरणारे ह्यांची अवस्था केविलवाणी होते शहरात. आणि बाकी असंख्य अडचणी निर्माण होतात त्या वेगळ्या. नियोजन बद्ध ग्रामीण विकास हाच शास्वत मार्ग आहे. आयटी इंजिियर्स ला मेडिकल क्षेत्रात काम असा सांगितले तर त्याचे लक्ष तरी लागेल का त्या कामात . आणि त्याच्या कडे ते स्किल सुद्धा नसेल. फक्त pattya टाकायचे काम करेल तो शेती ला पूरक व्यवसाय निर्माण झाले तर शेती व्यतिरिक्त पैसे कमविण्याची मार्ग मिळेल. शेती परवडत नाही तर ती सोडा आणि शहरात येवून वॉचमनी,करा,रस्त्यावर उभे राहून फेरीवाला बना,किंवा peoun बना हा काही उपाय नाही.

कपिलमुनी 31/07/2020 - 20:19
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी पश्चिम महाराष्ट्र - सांगली , सातारा (माणदेश वगळता )आणि कोल्हापूर . या भागात मुबलक पाणी , कसदार जमीन , सहकार उद्योग , डेअरि उद्योग , साखर कारखाने , जागरुक मतदार यामुळे इथले शेतकरि उस , द्राक्ष , केळी अशी नगदी पिके घेतात , इथे तुम्हाला आत्महत्या केलेला शेत़करी सापडणार नाही. पुणे - नाशिक - उत्तम हवामान आणि भरपूर पाऊस यामुळे इथे पीक मुख्यत भाजि पाला उत्तम पिकतो , शहरी मार्केट जवळ असल्यने नगदि पिके घेतात आणि पैसे बरे मिळतात , सोबत पोळ्ट्री वगैरे व्यवसाय करतत. या भागात जमीनीचे रेट जास्त असल्याने आत्महत्या करण्यापेक्षा जमिनि विकून इतर उद्योग करतात . विदर्भ - सर्वाधिक आत्महत्या होणारे जिल्हे - अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा हे अत्महत्यांचे मुख्य केंद्र आहे. बेभरवशी हवामान, खासगी कर्जे , पाण्याचा अभाव आणि मुख्य म्हणजे गाव ना सोडण्याची वॄत्ती व १०० % शेतीवर अवलंबून कुटूंबे ही आत्महत्यांची कारणे आहेत.. सरकारने कितिही मदत केली तरि या भागात उद्योग , सिंचन आणि स्किलसेट आणि घर सोडण्याची मानसिकता तयार होत नाही तोवर इथल्या आत्महत्या अशाच राहणार पुढे चालू ..

Rajesh188 31/07/2020 - 21:16
शहरांची अवस्था गंभीर होवू नये म्हणून त्यांची काळजी घेणे पण सर्वांचीच जबाबदारी आहे. आताच पुणे,मुंबई,बंगलोर,सारख्या मोठ्या शहरांची अवस्था गंभीर झालेली आहे. ग्रामीण भागातून रोजगार साठी प्रचंड मोठी लोकसंख्या शहरात येत आहे. कसलेच नियोजन नसल्या मुळे शहर अस्ताव्यस्त वाढत आहेत. लोकांना चालायला जागा नाही तर मोकळ्या जागा तर असूच शकत नाही. हे असेच चालले तर एक दिवस भारतीय शहर मृत होतील. त्या मुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्र ह्या मध्ये बर्या पैकी यशस्वी आहे. कोकणात जबरदस्त ताकत आहे आहे . सहकारी साखर कारखाने,पाणी व्यवस्था,धरण,सहकारी दुग्ध व्यवसाय,वीज, रस्ते ह्या वर सरकारी खर्च झालाच पाहिजे. ग्रामीण भागात शेती आधारित उद्योग उभे राहिले तर लोकसंख्या शहरात येणार नाही. हीच ती वेळ आहे सावरायची. नंतर परिस्थिती हातात राहणार नाही.

Rajesh188 31/07/2020 - 21:22
सहकार क्षेत्राचा ज्यांनी पाया रचला आणि तो सहकाराचा वृक्ष वाढवला त्या महान नेत्यांचा ,कर्मवीरांचे महाराष्ट्र शतशः ऋनी आहे. मुंबई,पुण्यात मराठी लोक कमी असण्याचे ते पण कारण आहे लोकांना गावातच रोजगार उपलब्ध आहे. त्या मुळे ते धाव घेत नाहीत. यूपी,बिहार सारख्या राज्यात ग्रामीण अर्थ व्यवस्था निर्माण च झाली नाही त्या मुळे प्रचंड स्थलांतर होत आहे. फक्त शहर वाढणे अभिमान ची गोष्ट नाही पुढल्या संकटाची चाहूल आहे.

पियुशा 01/08/2020 - 21:40
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर ओतलेले दुधाचे can, टैंकर ओततना पाहुन मला तरी खुप वाइट वाटले , जे आपण इतक्या कषटाने कमवले तेच मातीमोल करण्याचा विचार तरी कसा येतो, कधी एखादा व्यवसाय बुडाला तर ते लोक आपले उत्पादन ऐसे रस्त्यावर फेकून देताना पाहिलेत का? एखादा फेब्रिकेशन वाला नांगर बनवनारा डुबीत निघाला कर्ज बाजारी झाला तर तो आपले नांगर फेकल का रस्त्यावर, हे फक्त एक उदाहरण ,ऐसे कितीतरी व्यसाय आहेत, पण शेतकरी बन्धु आपले पिकाला भाव नाही रस्त्यावर फेक, शेतात उभ्या पिकावर बुलडोज़र फिरव, दूध रस्त्यावर आतून दे , भाजी रस्त्यावर फेकून दे है असले प्रकार करतात त्याचे वाइट वाटते चीड़ येते, ज्या पिकानी, दुधानी आपल्याला तारल त्यालाच माती मोल करायचे धाडस फक्त " शेतकरी" करतो

In reply to by पियुशा

गणेशा 02/08/2020 - 06:44
@पियुशा.. राजकीय, रयत क्रांती आणि विरोधक हे याला कारणीभूत आहेत, आणि दूध रस्त्यावर टँकर मधुन ओतणारे हीच लोकं आहेत.. मी तर म्हणतो फक्त दूध का.. पेट्रोल, गॅस, रस्त्यावरचे, खड्डे असे अनेक मुद्दे घेऊन आंदोलनं झाली होती पुन्हा तशीच सगळ्याची आंदोलने करा ना.. त्याला दम लागतो, आपन नक्की बोलाचीच कडी केली होती हे समोर येईल म्हणुन हे मार्ग.. खेदाने, करोना काळ.. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे पैसेच नाहीयेत जास्त.. आणि अश्या वेळेस पुन्हा शेतकर्या मागून राजकारण करणाऱ्या लोकांची कीव वाटते.. आणि शेतकर्या नी राजकारण्या कडून काही अपेक्षा करू नये असे बिन्धास्त बोलणारे यामागून चाललेले राजकारण कसे पाहू शकतात.. दूध सोडून मुळ मुद्द्यावर बोलतो - पायाभुत सुविधा सरकार ने दिल्या पाहिजेत.. मग यात शेतकरी, गावाकडचे, शहरी... मध्यमवर्ग असले येतेच कोठे..? सरकार कोणाचे असुद्या त्यांनी मूळ काम हे केले पाहिजेच.. पण शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवायची नाही.. अरे.. मग काय करायचे.. त्याला भिकारी, कटोरा घेऊन उभा राहणारा ह्या नजरेने बघणे आपण सोडून द्यावे.. सरकार ने मग काय, फक्त शहरातले डांबरी रस्ते उचकटवुन सिमेंट चे रस्ते करायचे, बुलेट ट्रेन शहरांना जोडायची हेच करायचे का.. असो.. शेतकऱ्यांच्या मालावर सरकार, दलाल यांचा अंकुश असतो.. मग असा इतर कुठला उत्पादक आहे, ज्याच्या मालाचा दर सरकार ठरवते? आता कांदा नाशिक ला 2 रुपय किलो ने विकला जातोय, शेतामधून माल मार्केट ला पोहचण्यास जितका खर्च येतोय ना तितका ही माल विकून मिळत नाहीये.. मग काय करायचे आता शेतकाऱ्याने.. घाईत लिहिलं आहे आता.. बोलणार नव्हतो पण लिहिले. जुन्या चर्चेची लिंक डेतो.. पुन्हा तोच पाढा सुरु झालाय.. शेतकरी हा विषय निघाल्यावर, ती चर्चा मध्यमवर्गीय.. किंवा राजकीय विषय यावर येऊन ठेपते हे समाजाचे दुर्दैव आहे.. असो थांबतो.. आज पासून सायकलिंग करायला लवकर उठलो.. आणि येथेच टाइम जातोय..

In reply to by गणेशा

सतिश गावडे 02/08/2020 - 10:24
मग काय करायचे आता शेतकाऱ्याने
पुर्णतः शेतीवर अवलंबून राहायचे नाही. जोडधंदे, पर्यायी व्यवसाय, नोकरी अशा गोष्टी करायच्या. पोटापूरते पिकवून चार पैसे कमवण्यासाठी इतर मार्गाला लागायचे. आपण जगाचे अन्नदाता आहोत आणि आपण नाही पिकवलं तर जग उपाशी मरेल या भ्रमात राहायचं नाही. जग त्याचं पाहून घेईल, आपण आपलं पाहायचं. कोकणात फक्त आणि फक्त भातशेती होते आणि बहुतांश ठिकाणी ती ही फक्त उन्हाळ्यात. आणि तरीही कोकणातील शेतकरी रडत नाही. कारण तो कधीच फक्त शेती एके शेती करत नाही. शेतीची कामे नसतील त्या दिवसात तो ट्रकवर हमाल म्हणून जातो, वीट भट्टीवर रोजंदारीने जातो, गाई म्हशी पाळतो कोंबड्या पाळतो. मोठ्या शेतकर्‍यांकडे बांधबांधवली करायला मजूरीने जातो, अगदीच काही होत नसेल तर मुंबई गाठतो. पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही. मी शेतकर्‍याचा मुलगा असून शाळा कॉलेच्या दिवसांत कंबरडं मोडेपर्यंत भातशेतीची कामं केलेली आहेत. त्यामुळे शेतीकामातील कष्टांची मला पूर्ण जाण आहे. बिगर कोकण प्रांतातील शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल तर त्यांनाच आपला मार्ग काढावा लागेल. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करणार्‍यांपासून चार हातात दूर ठेवावे लागेल. शेतकरी संमेलनं भरवून तिथे कविता वाचून शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यानं फक्त शेतकरी नेते म्हणून मिरवणार्‍यांचा, संमेलनं भरवणार्‍यांचा राजकीय फायदा होईल. समूह माध्यमांवर कविता लिहीणार्‍याला तात्पुरते आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडली असे वाटेल. मात्र त्याने शेतकर्‍यांच्या परिस्थितीत काडी इतकाही फरक पडणार नाही. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का?

In reply to by सतिश गावडे

१. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का? होय. मी एक शेतकर्‍याचा मुलगा आहे, आणि शेतीतील कामे ही करतो. अधुनिक आणि सुधारित बी-बियाणे वापरतो. गावातील इतरांना पण वापरायला लावतो.जास्त अधुनिक नाही पण ऑर्ग्यानिक शेती करण्याचा प्रयत्न करतो. फुल शेती काही जण करतात अगदी बोटावर मोजण्याइतके,, मत्स्यशेती इकडे होत नाही, एक दोन शेततळी, गोदावरी नदीत मासेमारी फक्त भोई समाज करतो,, कितीही आग्रह केला तरिही मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन कोणीही करत नाही. ,, आणि जोड धंदे फक्त दुग्धव्यवसाय ,, बाकी काही जण कुक्कुट पालन , शेळी पालन करतात,, सध्या जुन्या मंडळीला न जुमानता जोडधंद्यात वाढ होत आहे हि एक समाधान कारक बाब. अजुन काही असल्यास मोकळेपणाने विचारावे.

In reply to by सतिश गावडे

गणेशा 02/08/2020 - 15:01
मित्र या नात्याने तू वयक्तिक पणे बोलू शकतो, नव्हे पार शिव्या पण घालू शकतो, पण कवी बीवी काय राव.. मी स्वतःला कवी म्हणवून घेत नाही.. असो.. मजेचा भाग सोडला तर उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो..
पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही.
प्रिय मित्रा, 1. शेतकऱ्याने काय करावे ही लाईन तू उचलली.. त्याने पायाभूत सुविधांची अपेक्षा करू नये का ही ती लाईन आहे.. यात कोकण किंवा गैर कोकण असाही मुद्दा नाही.. hope u understand, पायाभूत सुविधा मिळवणे हे फक्त शेतकऱ्याचेच नाही, तर सर्वांचे अधिकार आहेत.. आणि कर्ज माफी याबद्दल मी लिहिलेले आहे खूपदा, कर्ज माफी हे सोल्युशन नाहीये..शेतकऱ्यांना फक्त सुविधा नीट हव्यात.. पण राजकारण करणारे हे का करतील.. .. 2. कोकणातील शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अशी तुलना आपण का करतोय.. तर ते आहे त्यात समाधानी आहे म्हणुन? कोकण पाऊस पाण्याचा आणि आंबा काजू ह्यांचा भाग.. मला जास्त माहित नाही, पण एकदंरीत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे माझ्या भागातून ही कोणीच काही फाशी वगैरे घेत नाही.. आणि जोडधंदा म्हणत असशील तर ते मुद्दे बरोबर आहे, आणि तो ते करतो.. फरक इतका की कोकण शेतकरी या आपल्याकडील भागाचा अभिमान असल्याने तुम्ही पाहत नसाल ते.. पण फक्त संकोचित आपल्या भागा पुरता विचार का? समस्त प्रोब्लेम चे मूळ शोधले पाहिजे.. 3. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? येथे लिहिणारे कोण आहे असे.. नसल्यास त्यांनी त्यांचे बघावे, शेतकरी कर्ज मागतो म्हणे.. ज्या राजकारण्यांना कर्ज आणि त्यावरील राजकारण करायचे आहे त्यांना तुम्ही का कर्ज देता असे कधी विचारले आहे का? माझे मत आधी मांडल्या प्रमाणे स्पष्ट आहे.. कर्जाची भीक नकोच.. पायाभूत सुविधा पुरवल्या तरी खुप आहे, माझा लेख पूर्ण त्यावर आहे.. कर्ज माफ करणे हे long term solution नाहीच.. आणि ते करू नये.. उलट कर्ज मागूच नये यासाठी सोयी, सुविधा, किंमत शेतकर्यांना मिळावी.. वयक्तिक शेतकऱ्यांत मिसळता का हा प्रश्न.. मी कधी काव्य वाचनात मिसळत नाही.. शेतकरी कुटुंब ..नातेवाईक.. मित्र सगळे शेतकरी.. मी माझ्या शेतात माझ्या जिरायती असलेल्या शेतात, ज्वारी पेरलेली आहे.. आणि एक माझ्या शेतावर कधी मी लोन घेतले नाही ना मी बुडवले आहे.. येथे लिहिणारे स्वतःला काय समजतात काय माहित, पूर्ण शेतकरी म्हणजे कर्जा कडे डोळे लावून बसलेले आहे हे चित्र का रंगवले जातेय? 2 आणि 3 आणि 5
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का?
वयक्तिक हे करणे जमत नसले तरी, बारामती अग्रो ची मेन ब्रँच, सुरुवात होण्या पासून भाऊ आहे तेथे.. कुकूट पालन माहिती, त्यांचे खाद्य.. फायदे या साठी कायम फिरती वर.. पंचक्रोशीत माऊली /अग्रो म्हणा मध्ये कळेल, कधी सोबत फिरलोय.. बारामती agro कडून चालणारी कामे माहित नसतील तुम्हाला.. या कधी तुम्हाला पण देऊ.. लोणी भापकर कमी पाऊस भाग, तेथे ही मामाला पोल्ट्री टाकून दिल्यात.. बर बारामती म्हणजे राजकीय घेऊ नये.. मामा भाजपा तालुका उपाध्यक्ष, नीरा कृषी समिती चा संचालक, बाकी इतर पक्षात.. राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही आमच्या घरात आणि नातेवाईका मध्ये आहेत.. असो.. 3. फुलशेती मत्स शेती आमच्या कोरड वाहू भागात नाही जमणार.. तरी पुरंदर च्या भागात, सीताफळ आणि फुलांच्या शेती मध्ये फिरलोय.. वयक्तिक नाही माहिती दिली..

In reply to by गणेशा

सतिश गावडे 02/08/2020 - 16:13
"कवीस" म्हणजे हा कविता धागा टाकणारा कवी यांना उद्देशून होते ते. तुला काही विचारायचे असते तर सरळ फोन नसता का केला मित्रा. असो. प्रश्न संकोचित आपल्या भागापुरता विचार करण्यापूरता नाही. आमच्या रायगड जिह्यात ना हापूस आंबा होतो ना काजू. आंबा आणि काजू आमच्या खालील दोन जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग. आमच्याकडे फक्त आणि फक्त भात पिकतो. पावसाळ्यात जो थोडाफार भाजीपाला अंगणात, परसदारी किंवा शेताच्या बांधावर पिकतो तो घरापूरता असतो. राहीली गोष्ट पावसाची आणि पाण्याची. पाऊस मुबलक असला तरी अवकाळी पाऊस कोकणातही होतो आणि त्यातून होणारे नुकसान कोकणी शेतकर्‍याचेही होतेच. आणि इतर भागात ज्याअर्थी पिके घेतली जातात त्याअर्थी तिथे पाणी ही समस्या नाही. पाणी नसते तर पिकच घेता आले नसते. त्यामुळे माझा रोख कोकणातील शेतकरी आपल्या परीने अडचणींवर मात करुन मार्ग काढतो तर मग ते इतर भागातील शेतकर्‍यांना का जमत नाही, ते ही मोठी शेती असताना, पिकांची विविधता असताना याकडे आहे. थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की शेतकर्‍यांना मदत कुणाला करायचीच नाहीये. केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करुन आपली पोळी शेकून घ्यायची आहे. तसे नसते तर कर्जमाफी आणि विजबिल माफी अशा तात्कालिक मागण्या पुन्हा पुन्हा करत राहण्यापेक्षा तू म्हणतोस त्या पायाभूत सुविधा मागितल्या गेल्या असत्या. त्यांची पुर्तता व्हावी म्हणून पाठपुरावा केला गेला असता. तसे होत नाही.

In reply to by सतिश गावडे

गणेशा 02/08/2020 - 15:24
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो येथे . एकदा दिले की उत्तरे द्यावेच लागतात.. माझ्या आधीच मूळ धागा कर्त्याने पण रिप्लाय दिलाय.. मी कर्जमाफीची मते वरती जी माझी लिंक दिली आहे त्या बद्दल माझा लेख असे लिहिले आहे.. ---- बाकी कवी कविता हा वेगळा विषय आहे, आणि त्याचा मला काडीमात्र अभिमान नाही.. माणसाने माणसात रहावे.. त्याला समजावे.. जगावे.. Problem सगळीकडे असतात, ते पहावे.. पण मुद्देसूद लिहिताना ही मध्यमवर्गीय माणुस, शेतकर्यांना कडू नजरेने बघणे सोडेल तर ना.. वरती परत.. शेतकार्यांचे कैवारी धावून येतात, अरे, येथे सगळे वाचले तरी कळेल.. कोणाला जास्त बोलायचे आहे.. असो. मी तर, मध्यमवर्गीय माणूस पण problem घेऊन जगतोय हे मान्य करतो.. पण म्हणुन त्याने दुसऱ्याला तुच्छ लेखावे.. मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि आमची जुनी मैत्रिण पियुशा ला रिप्लाय दिला असे वाटते आहे.. माणुस म्हणून पाहायचे सोडून आम्ही कर भरतो फलाना.. उद्या मोठे उद्योजक म्हणाले आम्ही जास्त कर भरतो.. आम्ही म्हणेल तसेच झाले पाहिजे तर..? किती कर भरता तुम्ही? मी स्वतः कर भरतो म्हणुन माझ्या शेतकरी बांधवाना मी तुच्छ नजरेने, दूषित नजरेने पाहिचे? सरकारने शेतकऱ्यांना सुविधा देऊ नये, त्यांचे त्यांनी पहावे असे म्हणताना आपल्याला काहीच वाटत नाही? मी तर पुढे जाऊन म्हणतो, लावा कर शेतकऱ्यांना पण.. काही हरकत नाही.. पण मग त्याच्या उत्त्पनाच्या किंमती वर तुम्ही बंधन घालणे बंद करा, दलाल बंद करा.. तो शेतकरी कसा त्यांचा माल विकेल तो बघेल.. नाही विकला तर नाही.. पण मग सरकार, आणि इतरांनी नाक खुपसू नका.. तेव्हडी हिम्मत आहे का? बळीराजा म्हणुन फायदा उठवतायेत वाटते ना.. आणि बाहेरून माल मागवू.. मग जा बिनधास्त.. आणि कर काय, लाईट बिल काय नका माफ करू.. पण पायाभूत सुविधा, व्यवस्था देण्यात प्रत्येक सरकार नपुसंक आहे हे ही मग मान्य करा.. आणि ते सरकार चे काम नाही हे म्हणणे असेल तर मग सरकारे का हवीत? अवघड आहे.. थांबतो.. का उगा टाइम पास करताय आणि करायला लावताय..

In reply to by पियुशा

गणेशा 02/08/2020 - 06:49
आधीची चर्चा लेख. आणि सुबोध जी आणि इतर जे येथे मुद्देसूद लिहीत आहे, त्याची प्रत्युत्ततरे तेव्हढ्याच मुद्देसूद तिकडे दिलेत.. पुन्हा तेच तेच लिहिण्यात काही अर्थ वाटत नाही.. थांबतो. http://misalpav.com/node/45446 शेती आणि राजकारण

In reply to by पियुशा

एक शेतमजुर दिवसाला ३००-५०० ₹ घेतो + वाहतुक खर्च कधी कधी भाव नाही लागला तर हा खर्च पण निघत नाही,, मग नाईलाजाने फिरवावा लागतो नांगर ,, आधि केलेला बी बीयाणांचा खर्च खत , फवारण्या , खुरपणी , पाळी इत्यादि पण निघत नाही काही वेळा.. महत्वाच फेकाफेकी करणारे फक्त ५-१०% शेतकरी असतात ते पण संतापुन,, बाकी सर्व राजकीय आंदोलने असतात.

Rajesh188 01/08/2020 - 23:20
शेती वाडी असल्या मुळे शेती विषयी अनुभव आहे. एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटत eji कडे शेती तोट्यात आहे असं म्हणायचं पण कारण शोधून त्या वर उपाय पण करायचे नाहीत. सरकार काही तरी करेल ह्या वर विसंबून राहायचे .. मग कर्ज माफी, ची मागणी असेल किंवा हमी भाव. फक्त एका गावाचा विचार केला तर 1 टक्के पण शेतकऱ्यांचा शेतात फळ झाड नाहीत , शेवगा, जांबुळ,अंबा, आवळा,चिंच अशी विविध प्रकारची झाडे 1 टक्के शेतकऱ्या कडे पण नाहीत.. सोयाबीन तर सर्व सोयाबीन च करणार मग भाव पडेल नाही तर काय होईल. कित्येक वर्ष शेती तोट्यात आहे ना . मग एकत्र येवून पिकांची रचना आणि नियोजन का केले जात नाही. शेतीमाल शेतकरी मंडईत जावून कमी भावात विकतो पण कोण्ही विकत मागितले तर तो बाजारातील खरेदी भाव लावतो. व्यापारी समजा गाजर 60 रुपये किलो नी विकत आहे तर तो शेतकऱ्या कडून 15 रुपये किलो नी खरेदी करतो . पण तोच शेतकरी गाजर 20 रुपया किलो नी बाजारात विक्री करू लागला तर किती तरी फायद्यात जाईल तुफान विक्री होईल पण तसं घडत नाही . आता 20 रुपये लिटर नी dairy la देईल पण 25 रुपये लिटर नी लोकांना देणार नाही त्यांना 45 रुपये बाजाराचा दर सांगेल. 25 रुपये लिटर नी शहरात शेतकरी दूध विकू लागला dairy var अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

वर दिलेले सर्व प्रतिसाद मी वाचले, थोडीफार नविन महिती पण वाचयला मिळाली,, पण काही प्रतिसादांशी मी सहमत नाही. कारण शेती ही पुर्णतः निसर्गावर अवलंबुन आहे. प्रत्येक भागात जसा कमि जास्त पाउस तसच पिक परंतु पिक कितीही चांगल आल तरिही एक अवकाळी जोराचा पाउस खुप काही करुन जातो. अशाच अवकळी ने मार खाल्लेल्या , सतत नापिकी व कर्जबाजारी पणामुळे कंटाळुन फाशी घेतलेल्या एका शेतकर्‍याच्या मुलाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद. लोभ असु द्या.

चौकस२१२ 02/08/2020 - 19:39
कोणत्याही देशात शेती हा "देशहितासाठीचा" व्यवसाय म्हणून समजला जातो आणि तो बुडून आपण परावलंबी होऊ नये म्हणून सरकार काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते १) पण तो व्यवसाय असतो...हे विसरून "सरकारने आणि समाजाने " केलेली मदत म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी समजू नये .. आणि २)बिगर शेतकऱ्यांनी शेतीचा मान हि ठेवावा .. दोन्ही बाजू टोकाला जायला लागल्या कि असा चुथडा होतो आपला.. एका शेतीप्रधान देशाचा रहिवासी ( येथे देशातील ७०% शेतीमाल निर्यात होतो https://www.dfat.gov.au/trade/organisations/wto/Pages/agricultural-trade#:~:text=We%20currently%20export%20more%20agricultural,total%20goods%20and%20services%20exports.)

Gk 03/08/2020 - 16:33
1950 आजा - 20 एकर मग त्याला 4 पोरे --- म्हणजे शेती प्रत्येकी 4 एकर मग त्याला 4 पोरे ... शेती प्रत्येकी 1 एकर मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते. एवढ्या काळात मुंबईत एक चाळीत घर , एक डोंबिवलीत व एक नेरळला घर होते आणि वारस किती ? एक मुलगा सून नैतर एक मुलगी जावई

गणेशा 03/08/2020 - 17:30
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते.
मग ते मुंबई पुण्यात येऊन चाळीत राहतात.. मग त्यांची पोरे शेतकरी आणि शेती पेक्षा शहराला जास्त योग्य समजतात.. मग त्यांची दोन आणखीन घरे होतात..

In reply to by गणेशा

Gk 03/08/2020 - 20:55
शहरातील एकुलती एक पोरे 2 रुपयेवाली असतात , बापाचा रुपायाही पोराला आणि आईचाही पोराला शेतकऱ्याला 4 पोरे , तर एकेक पोर चार आणेवाले होते

In reply to by गणेशा

गणेशा 03/08/2020 - 21:27
हो मग तेच म्हणतोय ना मी.. चारआनेवाला पोरगा मुंबई किंवा पुण्यात येतो.. मग तो चाळीत राहतो.. त्याला एक पोरगा होतो.. तो पोरगा शेतीवाले आणि शेतकरी हे कसे बिनडोक असे समजतो.. मग तो शहरात वाढतो.. त्याची आणखिन 2 घरे होतात..
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन

मुक्या प्राण्यांची सेवा

सुरज जाधव ·

माफ करा पण काही कळालं नाही. जर तुम्हाला पिल्ला घरट्यात ठेवायचं होते तर सायकलने घरी जावुन बाईकने पुन्हा त्या जागी कशाला आलात. आणि इतका वेळा ते पिल्लु कुठे होते.

माफ करा पण काही कळालं नाही. जर तुम्हाला पिल्ला घरट्यात ठेवायचं होते तर सायकलने घरी जावुन बाईकने पुन्हा त्या जागी कशाला आलात. आणि इतका वेळा ते पिल्लु कुठे होते.
दिनांक - 22/07/2020 नेहमी प्रमाणे सकाळी 5.30 ला उठून धर हॅण्डल मार फायन्डल करत माझ आवडत मार्ग बहिरवली कडे निघालो, अतिशय निसर्गरम्य घनदाट जंगल आणि रस्त्याच्या एक बाजूने जगबुडी खाडी..खाडी पट्टा म्हणून ओळखलंजाणाऱ्या रस्त्याला सध्या लॉकडाऊन मुळे वाहनांची वर्दळ खूप कमी आहे,, तसा हा पट्टा वाळू-माफिया पट्टा म्हणून पण प्रसिद्ध आहे...

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे ·

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.