संवाद
In reply to स्वागत....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या अतिशय महत्त्वाच्या पण by सुबोध खरे
In reply to माणसाचं आयुष्य सर्वाधीक प्रभावीत करणारा विषय. by अर्धवटराव
In reply to @ डॉ. माधुरी ठाकूर : तुम्ही मानसशास्त्राच्या डॉक्टर आहात का ? by संजय क्षीरसागर
आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.भिती घालविण्याचा ह्या पेक्षा दुसरा चपखल मार्ग नाही.
ते थांबवण्याच्या दोन हमखास लागू पडणाऱ्या पद्धती म्हणजे ‘मन प्रयत्नपूर्वक दुसऱ्या विचाराकडे वळवणं’ (distraction technique), आणि साक्षी भाव (mindfulness)आनंदीनी यांनी दुसर्या भागात साक्षी भाव (mindfulness) हा मार्ग सांगितला आहे, त्यानेच संक्षी म्हणता आहेत तो उलगडा होऊ शकतो. - (मनस्वी) सोकाजी
In reply to है शाबास by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
In reply to आम्ही कशाला मुद्दा भरकटवू. by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे by संजय क्षीरसागर
In reply to जे लिहिलंय ते तुमच्या by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : अध्यात्मात अजिबात रस नसलेली व्यक्ती by संजय क्षीरसागर
In reply to जाणीव वर्टीकल व्हायला by सुबोध खरे
जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित विचार म्हणजे जाणीवेचा रोख त्या विचारांप्रमाणेच हॉरिझाँटल असतो. त्याचा परिणाम म्हणजे मुद्दा कळत नाही. काल काय प्रतिसाद दिला ते आज लक्षात रहात नाही. एकदा दुसर्याची लायकी, मग प्रतिसादाची लायकी आणि शेवटी स्वतःची लायकी काढतो ! जाणिव वर्टीकल होणं म्हणजे संपूर्णपणे वर्तमानात असणं. करा ट्राय म्हणजे मुद्दा समजेल आणि त्याला मुद्दा पकडता येणं म्हणतात हे पण कळेल.
In reply to @ सुबोध खरे : बरीच मजल गाठायचीये अजून तुम्हाला ! by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे by संजय क्षीरसागर
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता. इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?हाहाहा!!! ॐ शांती ॐ
In reply to ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : बरे प्रकटलात ! by संजय क्षीरसागर
In reply to @ शाम भागवत : बरे प्रकटलात ! by संजय क्षीरसागर
In reply to तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी by चौकस२१२
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाहीभय हा मूळ प्रश्न आहे, कशाचं भय हे दुय्यम आहे. कारण आपण संपू ही एकमेव भीती सर्व कारणांमागे दडलेली आहे. जर आपल्याला काहीही संपवू शकत नाही हा उलगडा झाला तर कोणत्याही कारणानं भय निर्माण होणार नाही.
In reply to @ चौकस२१२ : खर्यांचे प्रतिसाद वाचा आणि by संजय क्षीरसागर
In reply to १:१० विक्रम गोखले टू नाना by चौकस२१२
प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचेआणि मी तुम्हाला म्हटलं मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल >तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ? कमाले !
In reply to @ चौकस२१२ : ? by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी by चौकस२१२
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाहीहे का पटलं नाही हे तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं तर काही चर्चा होइल. (संक्षींनी का करत येत नाही हे स्पष्ट केलं आहे.) ता.क.: व्यक्तिगत शेर्यांकडे दूर्लक्ष केलं तर साधक बाधक चर्चा (ह्या धाग्याच्या विषयाशी सुसंगत) करता येइल. - (चर्चोत्सुक) सोकाजी
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.कोणतीही भावना हा विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच असतो.
विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच अतिशय प्रचंड वेगाने होतो आणि तसं होणं हे 'ऑटो पायलट' मोडमधे आपसूकच होते. त्यामुळे विचार खरा वाटू लागतो. जाणीवेत राहून विचारांकडे तटस्थ बघण्याची (mindfulness) साधना करत राहिलं की विचांराना व्यक्तिगत रिस्पॉन्स देणंं हळूहळू कमी होत जातं. - (Mindful होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
In reply to वाह, क्या बात है! by सोत्रि
In reply to शरीर by शा वि कु
अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्मनेमकं उलटं होतय. शारिरीक पातळीवरची जाणिव ही स्थूल (Gross Reality), त्याच्यापलीकडची जाणिव ही सूक्ष्म (subtle reality).
मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाहीही मानण्याची गोष्ट नसून अनुभूतीची अवस्था आहे. - (शरीर आणि मन ह्यांच्या पलीकडचा) सोकाजी
In reply to अहं by सोत्रि
In reply to माझं म्हणणं by शा वि कु
In reply to @ शा वि कु : एका क्षणात अनुभव येईल ! by संजय क्षीरसागर
In reply to हम्म. by शा वि कु
In reply to शरीर by शा वि कु
In reply to मुळात शरीर नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाहि by अर्धवटराव
In reply to सर्वात महत्वाचं... by अर्धवटराव
In reply to बरोबर. by शा वि कु
सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.माझ्या एका मित्राची आई टी.वी वर देखील साप पाहु शकत नसायची. त्यावेळी छायागीत चित्रहार मध्ये नगीना नागीन वा तत्सम नागधारी चित्रपटातील गाणी सर्रास लागायची तेव्हा त्या, त्या गाण्यापुरते मान वळवुन घेत असत.
In reply to डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया by आनन्दा
In reply to माहितीपुर्ण लेख!!! by वीणा३
In reply to माहितीपुर्ण लेख!!! by वीणा३
In reply to आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक by शाम भागवत
यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही ?भय हाच तर स्व उलगडण्यातला महत्त्वाचा अडथळा आहे आणि विचारांची प्रक्रिया कळली की तो दूर होतो. याला सांख्ययोग म्हणतात. तुमचं पिस्तुल घेऊन काल्पनिक व्यक्तीला ठार करणं हा भयाचाच प्रकार आहे. याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे. आता ते ॐ शांती शांती सोडा आणि माझे प्रतिसाद नीट वाचा, तुमची भीती जाईल.
In reply to @ शाम भागवत : चर्चा वाढवत नेण्यासाठी by संजय क्षीरसागर
In reply to ॐ शांती ॐ by शाम भागवत
In reply to याचा साधा अर्थ तुम्हाला by सुबोध खरे
In reply to मी तर बाॅ एकदाच “शांती“ by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : पुन्हा चुकलात ! by संजय क्षीरसागर
मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.पण इथे तर तुम्ही संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे असं म्हणता :
संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे. तो मनाच्या अंतरंगात फार खोलवर उतरला आहे. मनाच्या महालाचे सर्व कानेकोपरे त्याच्या परीचयाचे आहेत. मनाच्या विमनस्कतेचं वर्णन तो अनेक अंगानी आणि कलात्मकतेनं करु शकतो.तर मग तुम्हांस मन म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? २. एके ठिकाणी तुम्ही मनाची व्याख्या केलीयेत :
मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट.आणि आता म्हणता की मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ....? ३. इथे म्हणता की :
जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.आणि वर म्हणता की :
विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे.म्हणजे विचार अस्तित्वात असतात तर. हे विचार मनाच्या नसतील तर नेमक्या कशाच्या आधारे अस्तित्वात असतात? कुतूहल म्हणून विचारतो आहे. माझा मनाचा अभ्यास नाही. आ.न., -गा.पै.
In reply to अवांतर : संक्षी यांना प्रश्न - मन म्हणजे नक्की काय by गामा पैलवान
In reply to @ गामा पैलवान : वॉट अ वंडरफुल क्वेस्टशन गामाश्री ! by संजय क्षीरसागर
In reply to सगळे संत-महंत, सगळी सायकीअ by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : एकतर तुम्ही संपूर्ण प्रतिसाद वाचत नाही by संजय क्षीरसागर
In reply to श्री सर्वज्ञ संक्षी by सुबोध खरे
In reply to श्री सर्वज्ञ संक्षी by सुबोध खरे
कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे . परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.तुम्हाला ते माहिती नाही ! मला समजावून सांगण्याचा प्रश्ण कुठे येतो ? तुम्ही नक्की जागा सांगा विषय संपला. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा पत्ता तुम्ही काय सांगणार ? २.
एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.तुम्ही विज्ञान शिकला आहात, एखादी गोष्ट सिद्धच होत नसेल तरीही ती आहे असं मानता का ? प्रथम रोगनिदान आणि नंतर उपचार अशी पद्धत आहे. तुम्ही रोग गृहित धरुन उपचार करता का ? शिवाय तुमचा हा युक्तीवाद तुमच्याच पहिल्या दाव्याला (ते मला माहिती आहे) धोबीपछाड मारतो. इतकी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ? ३.
काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलचबघा सगळं ओमफस्स करुन ठेवलंत ! थोडक्यात, तुमच्याकडे उत्तर नाही. ४.
फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. पहा आपल्याला झेपतोय का?इतके अंतर्बाह्य पोकळ प्रतिसाद असल्यावर तुमच्या विधानांचा काय पाड लागणार ? तस्मात, झेपण्याच्या गोष्टी सोडा. तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. त्यापेक्षा त्या निबंधाचं तुमचं आकलन लिहा. (अर्थात, ते सुद्धा लिहायची गरज नाही कारण तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे)
In reply to @ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत असला तरी by संजय क्षीरसागर
मी
च हुशार चालू द्याIn reply to हा हा हा by सुबोध खरे
In reply to @ गामा पैलवान : वॉट अ वंडरफुल क्वेस्टशन गामाश्री ! by संजय क्षीरसागर
In reply to मन नसेल तर पार्श्वभूमी कोण पुरवणार by गामा पैलवान
तो दाखवणारा आणि पाहणारा एकच आहेअसं नाही >माझा प्रतिसाद बघा : आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. २. हा चित्रपट कशावर चालतो हा तुमचा प्रष्ण नंतर घेऊ. प्रथम हे बघू की हा दृक-श्राव्य चलतपट प्रक्षेपित कोण करतं ? कारण असा प्रक्षेपण करणारा जो कुणी आहे त्यालाच तर मन समजलं गेलंय ! आणि माझं म्हणणंय की असा प्रक्षेपण करणारा कुणीही नाही. काय सोडवणूक आहे याची ? कारण प्रक्षेपक मूळ आहे, प्रक्षेपण दुय्यम आहे. प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं ! मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अॅनॅलिसिस आहे. प्रोजेक्शन झाल्यावर (म्हणजे चित्रपट चालू झाल्यावर) त्याला दिलेल्या रिस्पाँन्सचा तो अभ्यास आहे. त्यामुळे लेखिका सोयिस्करपणे चर्चेतून अंग काढून घेऊन नव्या पोस्ट टाकतेयं. आणि हा प्रक्षेपकच सगळ्या संत-महंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, कवि-लेखकांनी, तुम्ही-आम्ही (ज्याम) गृहित धरला आहे या अनुषंगानं आता एकदम अपूर्व उलगडा करतो ! प्रक्षेपण किंवा मेंदूत अविरत चाललेला हा दृक-श्राव्य चलतपट म्हणजे आपलंच रुपांतरण आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे बेसावधपणा ! सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा. रात्री हा चलतपट स्पष्ट दिसतो त्याला आपण स्वप्न म्हणतो; दिवसा उजेडामुळे तो अस्प्ष्ट दिसतो; त्याला आपण विचार म्हणतो; इतकाच काय तो फरक ! त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान ! ३. आता तुमचा प्रश्ण : तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे. __________________________________ * प्रतिसाद देतांना जरी मन हा शब्द वापरत असलो तरी त्याचा अर्थ विचारांचा प्रवाह किंवा एकूण मानसिक अॅक्टीविटी असाच आहे. मन अशी काही चीज या दुनियेत नाही. तरी सदस्यांनी (काहीही न जमल्यानं) उगीच शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करु नये.
In reply to @ गामा पैलवान : या चर्चेच्या निमित्तानं तुम्ही by संजय क्षीरसागर
In reply to मौज अशी की लेखिका by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : लिहिलंय ते शुद्ध मराठीत आहे by संजय क्षीरसागर
In reply to गा पै साहेब by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : अरे व्वा, by संजय क्षीरसागर
In reply to गा पै साहेब by सुबोध खरे
In reply to स्वतःच्या अस्तित्वाची भीती by Rajesh188
आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.काही हरकत नाही. तसंही पाहता माझ्याकडून तो मूळ मुद्दा नव्हता. २.
प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच. ३.
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.मी लेखिकेच्या या विधानाबद्दल काहीच भाष्य करू इच्छित नाही. सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे. ४.
सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा.मान्य. मात्र यातनं एक प्रश्न उद्भवतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याचप्रमाणे निद्रावस्थेतून जागृतावस्थेत आणणारी एखादी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. या दोन एजन्सी कदाचित एकंच असू शकतात. त्यांना मन म्हणायला काय हरकत आहे? निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन. ५.
त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य. माऊलींनी असंच काहीसं कुठेतरी म्हटलंय. ६.
तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.तसं पाहायला गेलं तर मेंदू एक चरबीचा लिबलिबीत गोळा आहे. विशिष्ट स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तो विचार ग्रहण करू शकंत नाही. उदा. : मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन. आ.न., -गा.पै.
In reply to मन अस्तित्वात आहे (किंव तसं मानावं तरी लागतं) by गामा पैलवान
सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.शाब्बास ! तोच एकमेव मुद्दा आहे. २.
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं. ३.
निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत. ४.
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्यमन नाहीचे. अविरत चाललेला विचार प्रवाह शून्य होतो. शांतता प्रस्थापित होते. आपण आपल्यात स्थित होतो. ५.
मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.मृत मेंदू म्हणजे मनाचं नाहिसं होणं नाही. मेंदू फुल्ली फंक्शनल असतांना (आणि आपण जीवंत असतांना) विचार प्रवाह थांबणं ही जागृत अवस्था आहे. त्याचा मनाशी काहीएक संबंध नाही.
स्वागत....!