मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरडा चेला तर नेता गुरू

विवेकपटाईत ·
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास

मार्गी ·

चौथा कोनाडा 06/09/2024 - 13:21
थक्क करणारा संघर्ष .... लेखातुन उतरलेलं चित्र सिनेमा पहावाच असं वाटायला लावणारं आहे. एकच म्हणावेसे वाटते : दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती !

मार्गी 14/09/2024 - 11:52
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद व नमस्कार.

चौथा कोनाडा 06/09/2024 - 13:21
थक्क करणारा संघर्ष .... लेखातुन उतरलेलं चित्र सिनेमा पहावाच असं वाटायला लावणारं आहे. एकच म्हणावेसे वाटते : दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती !

मार्गी 14/09/2024 - 11:52
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद व नमस्कार.
✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए" ✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही ✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं ✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत ✪ क्षमतेला साकार करण्याची‌ वाट दाखवणारी शिक्षिका ✪ सिस्टीमसोबत संघर्ष करून बारावीनंतर विज्ञान घेतलेला पहिला भारतीय दृष्टीहिन विद्यार्थी ✪ अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि भारतामध्ये ८०% दिव्यांगांना रोजगार देणारा उद्योगपती ✪ प्रतिष्ठेचा पुरस्कार "स्पेशल कॅटेगरीतून नको" म्हणून नाकारण्याची हिंमत ✪ Know us not for our disability, but for our abilities! नमस्कार.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

चप्पल . .

अत्रुप्त आत्मा ·

कंजूस 13/08/2024 - 08:58
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत. खट्याळपणा हरवत चालला आहे. मागे मागे वळून बघण्याचं वय सुरू झालंय खेटरं नवीन पण पावलं जुनी होत आहेत.

In reply to by कंजूस

हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत.
सहमत. कवीच्या पूर्वजीवनातील काव्य पाहता ही वेगळ्या धाटनीची कविता. कवीच्या भूतकाळातील जाणीवा लक्षात घेवून काव्याचा आस्वाद घ्यावा काय ? यावर चिंतन-मनन होऊ शकते. कवीचं आनंदमयी जीवन जाऊन आता संसारातील कारुण्य कवितेत येते. साध्या 'चपला'ही कवीस वेदना देत आहेत, हे फार दु:खदायक आहे, तरल भावकाव्य भिडले. लिहिते राहा. पुलेशु. :) -दिलीप बिरुटे

कंजूस 13/08/2024 - 09:02
माझाच वर्गमित्र हाकेला आता ओ देत नाही ......मनोबा. इतरांना हाका घालण्यात जुन्यांना तो विसरत आहे. स्वतःला सावरण्यात ओळख आणि चिन्हं हरवत आहेत

कधी कुठं चप्पल काढायची याचं भान हवं कधी,कुठली चप्पल घालाची याचं ज्ञान हवं एकवेळ चप्लेचं ठिक, पण अस्मितेच काय? कधी ती पण बाहेर ठेवावी लागते, नस्तो काही उपाय. म्हणतात ना,सत्तेपुढे शहाणपण चालत नाय आवडली.

प्रचेतस 14/08/2024 - 07:13
भावगंभीर तरल काव्य रचना. कवीचा एकूण काव्यक्षेत्रातला एकूण प्रवासच ही कविता संगते आहे असे वाटून गेलं. चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत.

In reply to by प्रचेतस

@चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत. >>>>> ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु :P

कंजूस 13/08/2024 - 08:58
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत. खट्याळपणा हरवत चालला आहे. मागे मागे वळून बघण्याचं वय सुरू झालंय खेटरं नवीन पण पावलं जुनी होत आहेत.

In reply to by कंजूस

हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत.
सहमत. कवीच्या पूर्वजीवनातील काव्य पाहता ही वेगळ्या धाटनीची कविता. कवीच्या भूतकाळातील जाणीवा लक्षात घेवून काव्याचा आस्वाद घ्यावा काय ? यावर चिंतन-मनन होऊ शकते. कवीचं आनंदमयी जीवन जाऊन आता संसारातील कारुण्य कवितेत येते. साध्या 'चपला'ही कवीस वेदना देत आहेत, हे फार दु:खदायक आहे, तरल भावकाव्य भिडले. लिहिते राहा. पुलेशु. :) -दिलीप बिरुटे

कंजूस 13/08/2024 - 09:02
माझाच वर्गमित्र हाकेला आता ओ देत नाही ......मनोबा. इतरांना हाका घालण्यात जुन्यांना तो विसरत आहे. स्वतःला सावरण्यात ओळख आणि चिन्हं हरवत आहेत

कधी कुठं चप्पल काढायची याचं भान हवं कधी,कुठली चप्पल घालाची याचं ज्ञान हवं एकवेळ चप्लेचं ठिक, पण अस्मितेच काय? कधी ती पण बाहेर ठेवावी लागते, नस्तो काही उपाय. म्हणतात ना,सत्तेपुढे शहाणपण चालत नाय आवडली.

प्रचेतस 14/08/2024 - 07:13
भावगंभीर तरल काव्य रचना. कवीचा एकूण काव्यक्षेत्रातला एकूण प्रवासच ही कविता संगते आहे असे वाटून गेलं. चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत.

In reply to by प्रचेतस

@चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत. >>>>> ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु :P
चप्पलच्या दुकानातंही आत चपला काढून शिरावं लागतं . धर्म नावाचं मूल्य मनात, असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं नुसतच," हे असं कसं !? " असं म्हणून भागत नाही . एकट्यानीच जगायचं . . ?, तर मग यापेक्षा काहीच लागत नाही . पण टोळीत जगणार ना तुम्ही ? मग द्यायला हवी हमी . पत्ते आवडत नसले खेळायला, तरी जमवावी लागेल रम्मी !

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार ·

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

भाकरीचे पीठ

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 26/05/2024 - 22:59
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा ! कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली. भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?

कंजूस 27/05/2024 - 05:14
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत. ( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )

कंजूस 27/05/2024 - 05:21
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.

In reply to by कंजूस

पाषाणभेद 28/05/2024 - 22:23
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.

कविल ने तृप्ततेची ढेकर दिली हे विहंगम दृश्य बघून पलीकडील बांधावरच्या अप्पांना कायप्पाचा समाजाभिमुख उपयोग बघून गदगदून आले.

In reply to by कर्नलतपस्वी

पाषाणभेद 28/05/2024 - 22:26
प्रॅक्टीकली बांधाला बांध लागून असणारे अगदीच बारामतीचे असतात हे सत्य आहे. त्यामुळे समोरचा आप्पा नक्कीच आसूयेने हसला असेल.

कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते. माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - अश्मछेद

चित्रगुप्त 28/05/2024 - 07:02
इंटरनेटीवर हुडकून ज्यांची नावं ठेवली गेली, त्या कायरा - मायरा - तान्या - वृशांत - कविल एक्सेट्रांची जनरेशन आता ऑर्गेनिक, ग्लुटेनफ्री, जीएमओफ्री, लो क्यालरी, देसी फार्मिंग करू लागलीय हे बघून भडभडून येऊन गद्गद झालेलो आहे. आता ताबडतोब ऑर्ग्यानिक जीएमओफ्री लेमोनेड प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही. -- जियो पाभे, लिहीत रहा (सुटा) आता.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/05/2024 - 02:53
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली ) -- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक) आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' ) उदाहरणार्थ खालील फोटू बघा: . . . असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.

भागो 28/05/2024 - 07:07
कथा आवडली. मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत. असे काही आहे का?

चौथा कोनाडा 28/05/2024 - 17:36
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - भेपा

In reply to by चौथा कोनाडा

पाषाणभेद 28/05/2024 - 22:35
तान्या वृशांतला "साहित्याने काय पोट भरणार आहे का?" अशा अर्थाचे बोलली. वृशांत लगोलग चिन्मयकडे गेला व त्याला ग्रंथालयाबाहेर काढले.

In reply to by पाषाणभेद

चौथा कोनाडा 29/05/2024 - 18:23
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.

निनाद 29/05/2024 - 07:29
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे! आमचा प्रयत्न... -- कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते. व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - का बे?

In reply to by निनाद

पाषाणभेद 29/05/2024 - 08:02
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.

काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव. काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला. आता कायरा काय करणार,.... तीने कायप्पावर स्टेटस टाकले. वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले. हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली. भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.

नठ्यारा 29/05/2024 - 21:46
सदर कथा 'रबरीचं पाकीट' असं शीर्षक योजून अश्लील अवतारात सहजपणे पुनर्लेखित करता यावी. -नाठाळ नठ्या

In reply to by पाषाणभेद

नठ्यारा 30/05/2024 - 00:54
अहो पाभे, मी देखील बाकीच्यांप्रमाणे सभ्यतेचा बुरखा पांघरला आहे. ;-) आता काय सांगू तुम्हांस असभ्यांच्या व्यथा .... ! -नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा 26/05/2024 - 22:59
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा ! कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली. भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?

कंजूस 27/05/2024 - 05:14
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत. ( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )

कंजूस 27/05/2024 - 05:21
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.

In reply to by कंजूस

पाषाणभेद 28/05/2024 - 22:23
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.

कविल ने तृप्ततेची ढेकर दिली हे विहंगम दृश्य बघून पलीकडील बांधावरच्या अप्पांना कायप्पाचा समाजाभिमुख उपयोग बघून गदगदून आले.

In reply to by कर्नलतपस्वी

पाषाणभेद 28/05/2024 - 22:26
प्रॅक्टीकली बांधाला बांध लागून असणारे अगदीच बारामतीचे असतात हे सत्य आहे. त्यामुळे समोरचा आप्पा नक्कीच आसूयेने हसला असेल.

कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते. माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - अश्मछेद

चित्रगुप्त 28/05/2024 - 07:02
इंटरनेटीवर हुडकून ज्यांची नावं ठेवली गेली, त्या कायरा - मायरा - तान्या - वृशांत - कविल एक्सेट्रांची जनरेशन आता ऑर्गेनिक, ग्लुटेनफ्री, जीएमओफ्री, लो क्यालरी, देसी फार्मिंग करू लागलीय हे बघून भडभडून येऊन गद्गद झालेलो आहे. आता ताबडतोब ऑर्ग्यानिक जीएमओफ्री लेमोनेड प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही. -- जियो पाभे, लिहीत रहा (सुटा) आता.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/05/2024 - 02:53
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली ) -- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक) आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' ) उदाहरणार्थ खालील फोटू बघा: . . . असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.

भागो 28/05/2024 - 07:07
कथा आवडली. मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत. असे काही आहे का?

चौथा कोनाडा 28/05/2024 - 17:36
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - भेपा

In reply to by चौथा कोनाडा

पाषाणभेद 28/05/2024 - 22:35
तान्या वृशांतला "साहित्याने काय पोट भरणार आहे का?" अशा अर्थाचे बोलली. वृशांत लगोलग चिन्मयकडे गेला व त्याला ग्रंथालयाबाहेर काढले.

In reply to by पाषाणभेद

चौथा कोनाडा 29/05/2024 - 18:23
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.

निनाद 29/05/2024 - 07:29
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे! आमचा प्रयत्न... -- कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते. व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - का बे?

In reply to by निनाद

पाषाणभेद 29/05/2024 - 08:02
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.

काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव. काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला. आता कायरा काय करणार,.... तीने कायप्पावर स्टेटस टाकले. वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले. हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली. भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.

नठ्यारा 29/05/2024 - 21:46
सदर कथा 'रबरीचं पाकीट' असं शीर्षक योजून अश्लील अवतारात सहजपणे पुनर्लेखित करता यावी. -नाठाळ नठ्या

In reply to by पाषाणभेद

नठ्यारा 30/05/2024 - 00:54
अहो पाभे, मी देखील बाकीच्यांप्रमाणे सभ्यतेचा बुरखा पांघरला आहे. ;-) आता काय सांगू तुम्हांस असभ्यांच्या व्यथा .... ! -नाठाळ नठ्या
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - पाभे

निवडणूक, ऋषि सुनकांची

माहितगार ·

हे अमेरिकन राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की भाजपा लोकसभा निवडणुकीत किमान ३०५ जागा जिंकेल. ह्याला नाक खुपसणे म्हणणार का ? https://www.youtube.com/watch?v=iA6FOD4i8_A&t=215s भारत सरकारने तरी अजून तसे काही म्हंटलेले नाही!!

कंजूस 24/05/2024 - 21:34
हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे तिकडे काय चाललंय यावर लक्ष ठेवावं लागतं. केवळ खुर्चीत बसून टीका करणे, गप्पा मारणाऱ्यांसाठी हा विषय नसतो.

नठ्यारा 10/06/2024 - 02:07
लोकहो, इथे इंग्लंडात ( खरंतर संयुक्त साम्राज्यात म्हणजे युकेत म्हणायला पाहिजे ) अचानक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामागे युक्रेन विरुद्ध रशिया लढाईची पार्श्वभूमी आहे. कशी ते सांगतो. रॉबर्ट फिको नामे स्लोव्हाक पंतप्रधानावर जीवघेणा हल्ला झाला. नाटोला हे युद्ध वाढवून युरोपभर भडकावीत न्यायचं आहे. पण सर्व युरोपीय नेते नाटोच्या बाजूने नाहीत. आणि जनता तर नाहीच नाही. मग एखादा दहशतवादी हल्ला घडवून जनतेस उल्लू बनवायचं किंवा राजकारण्यांना धमकावून इप्सित साध्य करवून घ्यायचं. नाटोस अमेरिकी सैन्यासाठी मुख्य युरोप मोकळा करायचा आहे. बातमी ( इंग्रजी लेख ) : https://www.dailymail.co.uk/news/article-13492243/NATO-plan-troops-line-fight-RUSSIA-Alliance-prepares-rapid-deployment-American-soldiers-amid-fears-Moscow-plotting-major-war-Europe.html तर अडचण अशीये की युरोपीय जनतेचा या बेतास आजीबात पाठिंबा नाहीये. म्हणून नाटोकडून ( म्हणजेच डीप स्टेट कडून ) नेत्यांना धमकावायचे प्रयत्न चाललेत. फिकोवरील गोळीबार हा याच हेतूने केलाय. याची चाहूल इंग्लंडातल्या अनेकांना लागलीये. युद्धापासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी आपण निवडणुकीस उभे राहणार नाही असं सुमारे १२० खासदारांनी जाहीर केलंय. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.independent.co.uk/news/uk/politics/mps-standing-down-general-election-tories-b2551970.html तर सुनाकबाबू हा युद्धाचा चेहरा आहे. यापूर्वी दोन्ही महायुद्दांच्या वेळेस अनेक नेतेमंडळींचे मुडदे पडलेले आहेत. मला माहीत असेलेला उच्चपदस्थ लॉर्ड किचनर. हा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस इ.स. १९१६ साली फील्डमार्शल व युद्धसचिव होता. म.से. हांपश्यर ही नौका बुड(व)ली तेव्हा तिच्यासोबत यालाही जलसमाधी मिळाली. काही लोक जिवंतपणी स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटावर दाखल झाले. त्यांनाही ठार मारण्यात आलं अशी वदंता आहे. जर युद्धसचिव ( Secretary of State for War ) मारला जाऊ शकतो तर कुठलासा किरकोळ नेता किस झाड की पत्ती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अनेक शांततावादी नेत्यांचे अकाली व/वा संशयास्पद मृत्यू झाले आहेत. हिटलरशी म्युनिक करार करणारा चेंबरलेन राजीनामापश्चात लगेच सहा महिन्यांत कर्करोगाने मेला ( १९४० ). जर्मनीशी समझोता करून युद्ध थांबवाचं धोरण असलेला क्लाईव्हडेन हा शांतीकंपू तर बऱ्याच प्रमाणावर नाहीसा झाला किंवा करण्यात आला. लॉर्ड एरॉल ( १९४० ) पासून सुरुवात झाली आणि दोनतीन वर्षांत एकेक जण मृत्यू पावले. त्यापैकी काही : लॉर्ड लोदियन ( १९४० ), लॉर्ड रॉदरमियर ( १९४० ), सर हॅरी ओक्स ( १९४३ ). जर ही बडी मंडळी विल्हेवाटीत निघू शकतात, तर कोण्या य:कश्चित खासदारास कोण विचारतो ! आणि हो, तो सगळ्यांत मोठ्ठा नाझी स्नेही राहिलाच. त्याचं नाव आठवा एडवर्ड. तो मात्र वाचला. कारण की त्याचे पिताश्री पाचवे जॉर्ज हे राजेसाहेब होते. भो पंचम म्हणतात तेच ते. तर आठव्या एडवर्डने म्हणे वॉलिस सिम्पसन या घटस्फोटीतेशी विवाह करण्याच्या मिषाने संयुक्त साम्राज्याची ( = युकेची ) राजगादी सोडली. कोण विश्वास ठेवणार असल्या भाकडकथेवर. सांगायचा मुद्दा काये की युद्धाचे पडघम वाजू लागले नसले तरी वातावरणनिर्मिती जोरात चालू आहे. येत्या निवडणुका ही युद्धासंबंधी जनमत अजमावण्याची एक रीत म्हणून बघितली जात आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

माहितगार 13/06/2024 - 08:50
शस्त्रांची बाजारपेठ युद्धजन्य परिस्थितीत रस ठेवते आणि राजकारण्यांवर ताबा मिळवते, हे शक्य, तरीही न टळणारे असते. पण इंग्लंडाची आर्थिक स्थिती तुर्तास बिकट असल्याचे सांगितले जाते मग ते युद्धासाठी पैसा कसा उभा करू इच्छितात?

In reply to by माहितगार

नठ्यारा 13/06/2024 - 18:41
माहितगार, पैसे नाहीत वगैरे रड पब्लिकच्या तोंडावर फेकायला असते. खऱ्या सत्ताधारींना हा प्रश्न कधीच पडंत नसतो. -नाठाळ नठ्या

हे अमेरिकन राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की भाजपा लोकसभा निवडणुकीत किमान ३०५ जागा जिंकेल. ह्याला नाक खुपसणे म्हणणार का ? https://www.youtube.com/watch?v=iA6FOD4i8_A&t=215s भारत सरकारने तरी अजून तसे काही म्हंटलेले नाही!!

कंजूस 24/05/2024 - 21:34
हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे तिकडे काय चाललंय यावर लक्ष ठेवावं लागतं. केवळ खुर्चीत बसून टीका करणे, गप्पा मारणाऱ्यांसाठी हा विषय नसतो.

नठ्यारा 10/06/2024 - 02:07
लोकहो, इथे इंग्लंडात ( खरंतर संयुक्त साम्राज्यात म्हणजे युकेत म्हणायला पाहिजे ) अचानक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामागे युक्रेन विरुद्ध रशिया लढाईची पार्श्वभूमी आहे. कशी ते सांगतो. रॉबर्ट फिको नामे स्लोव्हाक पंतप्रधानावर जीवघेणा हल्ला झाला. नाटोला हे युद्ध वाढवून युरोपभर भडकावीत न्यायचं आहे. पण सर्व युरोपीय नेते नाटोच्या बाजूने नाहीत. आणि जनता तर नाहीच नाही. मग एखादा दहशतवादी हल्ला घडवून जनतेस उल्लू बनवायचं किंवा राजकारण्यांना धमकावून इप्सित साध्य करवून घ्यायचं. नाटोस अमेरिकी सैन्यासाठी मुख्य युरोप मोकळा करायचा आहे. बातमी ( इंग्रजी लेख ) : https://www.dailymail.co.uk/news/article-13492243/NATO-plan-troops-line-fight-RUSSIA-Alliance-prepares-rapid-deployment-American-soldiers-amid-fears-Moscow-plotting-major-war-Europe.html तर अडचण अशीये की युरोपीय जनतेचा या बेतास आजीबात पाठिंबा नाहीये. म्हणून नाटोकडून ( म्हणजेच डीप स्टेट कडून ) नेत्यांना धमकावायचे प्रयत्न चाललेत. फिकोवरील गोळीबार हा याच हेतूने केलाय. याची चाहूल इंग्लंडातल्या अनेकांना लागलीये. युद्धापासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी आपण निवडणुकीस उभे राहणार नाही असं सुमारे १२० खासदारांनी जाहीर केलंय. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.independent.co.uk/news/uk/politics/mps-standing-down-general-election-tories-b2551970.html तर सुनाकबाबू हा युद्धाचा चेहरा आहे. यापूर्वी दोन्ही महायुद्दांच्या वेळेस अनेक नेतेमंडळींचे मुडदे पडलेले आहेत. मला माहीत असेलेला उच्चपदस्थ लॉर्ड किचनर. हा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस इ.स. १९१६ साली फील्डमार्शल व युद्धसचिव होता. म.से. हांपश्यर ही नौका बुड(व)ली तेव्हा तिच्यासोबत यालाही जलसमाधी मिळाली. काही लोक जिवंतपणी स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटावर दाखल झाले. त्यांनाही ठार मारण्यात आलं अशी वदंता आहे. जर युद्धसचिव ( Secretary of State for War ) मारला जाऊ शकतो तर कुठलासा किरकोळ नेता किस झाड की पत्ती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अनेक शांततावादी नेत्यांचे अकाली व/वा संशयास्पद मृत्यू झाले आहेत. हिटलरशी म्युनिक करार करणारा चेंबरलेन राजीनामापश्चात लगेच सहा महिन्यांत कर्करोगाने मेला ( १९४० ). जर्मनीशी समझोता करून युद्ध थांबवाचं धोरण असलेला क्लाईव्हडेन हा शांतीकंपू तर बऱ्याच प्रमाणावर नाहीसा झाला किंवा करण्यात आला. लॉर्ड एरॉल ( १९४० ) पासून सुरुवात झाली आणि दोनतीन वर्षांत एकेक जण मृत्यू पावले. त्यापैकी काही : लॉर्ड लोदियन ( १९४० ), लॉर्ड रॉदरमियर ( १९४० ), सर हॅरी ओक्स ( १९४३ ). जर ही बडी मंडळी विल्हेवाटीत निघू शकतात, तर कोण्या य:कश्चित खासदारास कोण विचारतो ! आणि हो, तो सगळ्यांत मोठ्ठा नाझी स्नेही राहिलाच. त्याचं नाव आठवा एडवर्ड. तो मात्र वाचला. कारण की त्याचे पिताश्री पाचवे जॉर्ज हे राजेसाहेब होते. भो पंचम म्हणतात तेच ते. तर आठव्या एडवर्डने म्हणे वॉलिस सिम्पसन या घटस्फोटीतेशी विवाह करण्याच्या मिषाने संयुक्त साम्राज्याची ( = युकेची ) राजगादी सोडली. कोण विश्वास ठेवणार असल्या भाकडकथेवर. सांगायचा मुद्दा काये की युद्धाचे पडघम वाजू लागले नसले तरी वातावरणनिर्मिती जोरात चालू आहे. येत्या निवडणुका ही युद्धासंबंधी जनमत अजमावण्याची एक रीत म्हणून बघितली जात आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

माहितगार 13/06/2024 - 08:50
शस्त्रांची बाजारपेठ युद्धजन्य परिस्थितीत रस ठेवते आणि राजकारण्यांवर ताबा मिळवते, हे शक्य, तरीही न टळणारे असते. पण इंग्लंडाची आर्थिक स्थिती तुर्तास बिकट असल्याचे सांगितले जाते मग ते युद्धासाठी पैसा कसा उभा करू इच्छितात?

In reply to by माहितगार

नठ्यारा 13/06/2024 - 18:41
माहितगार, पैसे नाहीत वगैरे रड पब्लिकच्या तोंडावर फेकायला असते. खऱ्या सत्ताधारींना हा प्रश्न कधीच पडंत नसतो. -नाठाळ नठ्या
मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.

वाट पहाणं

श्रीकृष्ण सामंत ·
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

चाय की चर्चा..

आजी ·

चौकस२१२ 02/05/2024 - 16:36
चहा १ सुंठ घातलेलला पण फार कडवट नाही आणि फार गो ड नाही दूध म्हशीचे आणि ते सुधा ताजे असेल तर मस्तच फार गरम नको चहा २, चिनी पद्धतीचा फक्त पाणी घातलेलला ८५° तापमान

गवि 02/05/2024 - 20:29
सहज कुतूहल म्हणून यांचे सर्व लेखन ही लिंक पाहिली. आजींचे एकूण पासष्ट (६५ ) लेख दिसत आहेत (दोन पाने अनुक्रमणिका मोजता). त्यातील आठ (८) शीर्षके हिंदी आहेत. (महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. ) म्हणजे सर्व नव्हे तर बारा टक्के शीर्षके हिंदी आहेत. हा आकडा कितपत मोठा हे अर्थात सापेक्ष आहे. चार पाच आंग्ल देखील आहेत. पण बहुतांश मराठी दिसत आहेत. रूढ प्रसिद्ध वाकप्रयोग किंवा लोकप्रिय गाण्यांची शीर्षके या स्वरूपात अमराठी शीर्षके दिसतात. पण लेखात मात्र कुठे हिंदी इंग्रजी फार मध्ये मध्ये येताना दिसत नाही. त्यामुळे बरे वाटते. हे वैयक्तिक मत. हा लेख आवडला. भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत चहा वेगवेगळ्या रीतीने बनवला आणि पेष केला जातो. दक्षिणेत उकळता चहाचा अर्क ऐनवेळी गरम दुधाच्या ग्लासात एका फडक्यातून गाळून दोन ग्लासांच्या मध्ये हवेतून एकमेकांत धार पाडून फेसाळ करून देत असत.

In reply to by गवि

महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. नाहीतर मग दुसऱ्या कुठल्या भाषेत मोजले गेले असते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि 02/05/2024 - 20:41
नै नै.. तसं नव्हे अबासाहेब.* की जय, जिंदाबाद वगैरे मराठी किंवा सर्वभाषिक घोषणांचा भाग होऊन गेल्याने साधारणपणे भाषेच्या पलीकडे गेले आहेत असे म्हणता येईल. पण तसे म्हणता येत नसले तरीही सांगण्याचा मुद्दा इतकाच की तेही धरून आठच शीर्षके हिंदी सापडली. इति. :-) तळटीप : * यावरून अतृप्त आत्मा यांची आठवण झाली अता. अताशा कुठे दिसले नाहीत. सकाळी सकाळी सुपर भात वाढणारे आमचे गुर्जी.

रुपी 07/05/2024 - 10:06
मस्त खुसखुशीत लेख! आवडत्या विषयावरचा असल्यामुळे आज कित्येक दिवसांनी लॉग इन केले प्रतिसाद द्यायला. खूप सार्‍या बाबतीत तंतोतंत सहमत. चहाचा मसाला घालून केलेला फोडणी चहा मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा चहा न प्यायलेला बरा. >> अगदी! माझ्या नवर्‍याने चहाचा मसाला आणलेला मी शेवटी लपवून ठेवला ;) चांगला चहा सगळ्यांनाच करता येत नाही. >> हेही खरेच आहे. मी तर किती तरी ठिकाणी जाताना घरूनच चहा पिऊन निघते. आजी , लिहीत रहा. तुमचे लेख आले की मी आवर्जून वाचते!

चहा विषयावरचा हा लेख एकदम फक्कड जमला आहे. मी स्वतः गेली अनेक वर्षे सुटसुटीत असा मायक्रोवेव्ह ओव्हनमधे केलेला झटपट चहा पितोय. दिवसातून कमाल तीनदाच चहा पितो.

In reply to by चौकस२१२

गेल्या अनेक वर्षांपासून मायक्रोवेव्ह चहाची पाककृती टंकाळ्यामुळे प्रकाशित करणे राहून जात आहे. थोडक्यात लिहितो.
  • प्रथम एका कपात पाणी घेऊन त्यात चहाची डीप भिजवून ठेवणे. किमान १५ मिनिटे, घाई असल्यास कप थरथरवणे.
  • नंतर मायक्रोवेव्हमधे तापवणे. मी ४० सेकंद करतो. मायक्रोवेव्हच्या सेटिंग्जनुसार हा वेळ कमी अधिक करावा लागू शकतो.
  • कप बाहेर काढून त्यात दूध ओतणे.
  • पुन्हा एकदा मायक्रोवेव्हमधे गरम करणे.
  • नंतर कप बाहेर काढून, गरम असलेल्या डीपला चमच्याने दाबून त्यातले द्रव कपातल्या मिश्रणात मिसळतो.
  • चहा तयार :-). भिजवून ठेवण्याची वेळ सोडल्यास एका कपाला दोन मिनिटे लागतात. दोन कप चहा करताना ४० सेकंदाऐवजी १ मिनिटभर तापवतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

चित्रगुप्त 24/05/2024 - 01:23
मायक्रोवेव्हात गरम केलेले पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात असाही एक मतप्रवाह आहे. मी आणि माझी बायको ते कधीच वापरत नाही. पातेले, कढईत गरम करायला आणि भांडी घासायला लागणारा वेळ परवडला, पण खरोखर मा.वे. धोकादायक असेल तर कशाला विषाची परिक्षा घ्या, असा त्यामागे विचार आहे. -- माझ्या एका विद्वान प्रोफेसराच्या अनुभवाप्रमाणे अशा विविध हानिकारक गोष्टींविषयी संशोधनास फंडिंग उपलब्ध होत नसल्याने तसे संशोधन होत नाही, कुणी केले तरी ते दाबले जाते. याउलट मायक्रोवेव्ह, इंटरनेटचे तरंग, प्रिझर्वेटिव्हे, डास पळवण्याची साधने वगैरे हानिकारक नसतात, असा प्रचार करायला भरपूर पैसा ओतला जातो. अमेरिकेत शेतावर वाढणार्या गाईंचे ताजे दूध वापरण्यास मनाई आहे. दोन-चार आठवड्याची एक्स्पायरी डेट असलेले, रासायनिक प्रक्रिया केलेले दूध विकणेच कायदेशीर असते. आम्ही लांबून मुद्दाम जाऊन ताजे दूध आणतो, त्यावर NOT FOR HUMAN CONSUMPTION असे ठळक लेबल लावलेले असते. ते घ्यायला आधीपासून बुकिंग करावे लागते आणि ते दुप्पट-तिप्पट महाग असते. . पूर्वी कॅन्सर होणारे लोक फार कमी असायचे आता ते प्रमाण प्रचंड वाढलेले असण्यामागे आधुनिक रहाणी, सवयी-सुखसोयींमधून होणारे घातक परिणाम असावेत. अमेरिकेत बंदूक दुकानात जाऊन विकत घेता येते, पण ताजे कच्चे दूध नाही. "दुनिया पागल है, या फिर मै दीवाना" हे गाणे आठवते.

In reply to by चित्रगुप्त

मायक्रोवेव्ह ओव्हनमधे तापवलेले अन्न खावून आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे फार पूर्वी ऐकले होते. जालावर शोधले असता त्याचे खंडन करणारे बरेच वाचायला मिळाले अन समर्थनार्थ फारसे काही मिळाले नाही. सुक्ष्मलहरींचा वापर केला म्हणून इतका गंभीर परिणाम होईल असे शक्य नाही असे वाचल्याचे स्मरते. कर्करोगावर संशोधन करणार्‍यांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मुद्दा कळला की, एखाद्याला कर्करोग कशामुळेही होऊ शकतो अन तशाच परिस्थितीत असणार्‍या अनेकांना त्या कारणाने कर्करोग अजिबात होत नाही. तसेही कुठलीच रासायनिक प्रक्रिया न केलेले अन्न खाणे अन शरीराला विविध कृत्रिम रासायनिक घटकांपासून लांब ठेवायचे असेल तर जंगलात जाऊन आदीमानवासारखेच राहावे लागेल :-). प्रदुषणाच्या पातळीमुळे आरोग्यावर होणार्‍या वाईट परिणामांचा विचार करता भारतात नवी दिल्ली, बृहन्मुंबई, पुणे इत्यादी शहरात किमान हिवाळ्यात तरी वास्तव्य करू नये असेही म्हणता येईल.

आजी 21/05/2024 - 13:40
माझ्या या लेखावर जवळपास वीस प्रतिसाद आले. वाचनेही भरपूर झाली. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. त्या लेखात एक मुद्दा राहिला आहे. तो इथे टाकते. "चांगल्या चहाच्या यशाची मेख तो उकळण्यात नसून तो मुरवण्यात आहे. एक कप मोजून चहाचं आधण ठेवायचं. त्याला थोडीशी उकळी आली की त्यात साखर घालून ती विरघळवायची. मग चांगली खळखळून उकळी आल्यावर त्यात चहा टाकायचा आणि पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. दोन मिनिटांनी चहा गाळायचा. चहा नीट मुरल्याची खूण म्हणजे गाळण्यावर चहापत्ती अजिबात येता कामा नये. मग दूध घालून असा मस्त चहा प्यायचा. गप्पा मारायला तुमच्यासारखे दोस्त असतील तर आणखी मजा." ओके तर मग! पुन्हा एकदा सर्वांचे आभार. तुमची स्नेहांकित आजी.

In reply to by आजी

सर टोबी 21/05/2024 - 16:27
लेख नेहमीप्रमाणेच छान आणि मी नेहमी उल्लेख करतो त्या निरागासतेने भारलेला होता. एक थोडासा नाउमेद करणारा प्रतिसाद सुरुवातीलाच आला आणि त्यात प्रतिसाद देताना तांत्रिक अडचण उद्भवली. नेहमीसारखंच लिखाण करीत जा ही आग्रहाची विनंती.

आजी, 'चाय पे चर्चा' शिर्षक वाचलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीत लेखन वाचायचं राहीलं. आजीही चाय पे चर्चावर आल्या की असे वाटून एक सामान्य चहा विकणारा किती मोठा होतो वगैरे वर लेखन आहे की काय असे वाटले आणि आजीही पॉलिटीक्समधे आल्याचा आनंद झाला होता. आज चहा पिता पिता लेख वाचला. नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या विषयावरील चहाच्या आठवणी गोष्टी आवडल्या. चहा मलाही आवडतो. गरम. आजी आपण जसे रेकॉर्डींगसाठी वेगवेगळ्या गावी चहा पिला तसं मी पण नोकरीच्या गावीचा प्रवास करतांना, माझेही चहावाले ठरलेले. कधी तरी गुळाचा गरम चहा तर, कधी बीगर शक्कर दोन्हीही चहावाल्याला ऑर्डर्स पाठ. मागे एकदा वाट्सॅप विद्यापीठात चहा भारतात कसा आला वगैरेची ष्टोरी वाचलेली. चहाची ओळखच नसती झाली तर, असेही प्रश्न पड्तात. व्यक्तीगणिक चहाची चव बदलते बरं का आजी असे वाट्ते. आता ते कसं माहिती नाही. व्यक्तीगत मला बीनदुधाचा काळा चहा लिंबु पिळून आवडत नाही. भरपूर दुधाचा चहा आवड्तो. कॉफी आवडते. फारच गोड जीभेवर गडद पाक यावा इतक्या अशा चहाचा राग येतो. अशा खुप काही गोष्टी. आजी, आपल्या लेखनामधे साधे विषय असले तरी त्याची एक खास खुशबू आहे. मला तर तुमचे लेखन आले की टायटनिक सिनेमातली ती ती आजी डोळ्यासमोर येते, जी टायनिक ष्टोरी सांगते, तसं तुम्ही आम्हा मिपाकरांना आयुष्यातील विविध अनुभव सांगत आहात असा फिल येतो तेव्हा लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 24/05/2024 - 18:00
चहासाठी दूध हवं ते म्हशीचं. भरपूर दाट. गाईचं पांचट दूध चहात टाकलेलं मला आवडत नाही. वाढेना कोलेस्टेरॉल! एक कप चहात अशी कितीशी फॅट असणार? तर म्हशीच्या दुधाचा चहा. त्यात आलं आणि गवती चहा असेल तर सोन्याला सुगंध. माझ्या अगदी मनातली पाककृती चहाची. मी स्वतःही चहाप्रेमी. सकाळी फक्कड चहा आणि चपाती असे भन्नाट कॉम्बिनेशन खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडले तर चुकचुकल्यासारखे वाटते. पूर्वी मी दिवसातून अनेकदा चहा पीत असे, पण काही वर्षांपासून एसिडिटीचा त्रास सुरू झाल्यामुळे दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी पितो. रच्याकने, चहापत्ती आणि म्हशीचे गाढे दुध हे ज्यांना एसिडिटीचा, अन्न पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी त्रासदायक आहे, असे डॉक्टरांकडून कळाले.

चौथा कोनाडा 25/05/2024 - 17:28
सुरेख चहा प्रपंच ! चहाप्रेमी म्हणून आवडले .. अर्थातच ! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सि) हिनं सो-कुल नावाचे सदर लिहिले होते (आता त्याचं पुस्तक होऊन बाजरात आलेय ) त्यात पण असाच सुंदर लेख होता चहा वर ! मजा आली आजी

विजुभाऊ 25/12/2024 - 13:04
सध्या बंगळूर मुक्कामी आहे. या दक्षीणात्याना चहा हे कॉफी प्रमाणेच उकळून उकळून त्याचे असे काही सूप करायचे असते असे शिकवलेले असावे घट्ट दूध आणि इतका घट्ट उकळवलेला चहा हा कोणाला "चहा सोडायचा" असेल तर एक उत्तम औषध आहे.

In reply to by विजुभाऊ

कंजूस 25/12/2024 - 15:17
याउलट रेल्वेतला चहा असतो. तोंड धुवायला गोड गरम पाणी. तोही आपल्याला चहा सोडायला लावतोच. मग कॉफी जरा बरी असते.

चौकस२१२ 02/05/2024 - 16:36
चहा १ सुंठ घातलेलला पण फार कडवट नाही आणि फार गो ड नाही दूध म्हशीचे आणि ते सुधा ताजे असेल तर मस्तच फार गरम नको चहा २, चिनी पद्धतीचा फक्त पाणी घातलेलला ८५° तापमान

गवि 02/05/2024 - 20:29
सहज कुतूहल म्हणून यांचे सर्व लेखन ही लिंक पाहिली. आजींचे एकूण पासष्ट (६५ ) लेख दिसत आहेत (दोन पाने अनुक्रमणिका मोजता). त्यातील आठ (८) शीर्षके हिंदी आहेत. (महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. ) म्हणजे सर्व नव्हे तर बारा टक्के शीर्षके हिंदी आहेत. हा आकडा कितपत मोठा हे अर्थात सापेक्ष आहे. चार पाच आंग्ल देखील आहेत. पण बहुतांश मराठी दिसत आहेत. रूढ प्रसिद्ध वाकप्रयोग किंवा लोकप्रिय गाण्यांची शीर्षके या स्वरूपात अमराठी शीर्षके दिसतात. पण लेखात मात्र कुठे हिंदी इंग्रजी फार मध्ये मध्ये येताना दिसत नाही. त्यामुळे बरे वाटते. हे वैयक्तिक मत. हा लेख आवडला. भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत चहा वेगवेगळ्या रीतीने बनवला आणि पेष केला जातो. दक्षिणेत उकळता चहाचा अर्क ऐनवेळी गरम दुधाच्या ग्लासात एका फडक्यातून गाळून दोन ग्लासांच्या मध्ये हवेतून एकमेकांत धार पाडून फेसाळ करून देत असत.

In reply to by गवि

महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. नाहीतर मग दुसऱ्या कुठल्या भाषेत मोजले गेले असते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि 02/05/2024 - 20:41
नै नै.. तसं नव्हे अबासाहेब.* की जय, जिंदाबाद वगैरे मराठी किंवा सर्वभाषिक घोषणांचा भाग होऊन गेल्याने साधारणपणे भाषेच्या पलीकडे गेले आहेत असे म्हणता येईल. पण तसे म्हणता येत नसले तरीही सांगण्याचा मुद्दा इतकाच की तेही धरून आठच शीर्षके हिंदी सापडली. इति. :-) तळटीप : * यावरून अतृप्त आत्मा यांची आठवण झाली अता. अताशा कुठे दिसले नाहीत. सकाळी सकाळी सुपर भात वाढणारे आमचे गुर्जी.

रुपी 07/05/2024 - 10:06
मस्त खुसखुशीत लेख! आवडत्या विषयावरचा असल्यामुळे आज कित्येक दिवसांनी लॉग इन केले प्रतिसाद द्यायला. खूप सार्‍या बाबतीत तंतोतंत सहमत. चहाचा मसाला घालून केलेला फोडणी चहा मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा चहा न प्यायलेला बरा. >> अगदी! माझ्या नवर्‍याने चहाचा मसाला आणलेला मी शेवटी लपवून ठेवला ;) चांगला चहा सगळ्यांनाच करता येत नाही. >> हेही खरेच आहे. मी तर किती तरी ठिकाणी जाताना घरूनच चहा पिऊन निघते. आजी , लिहीत रहा. तुमचे लेख आले की मी आवर्जून वाचते!

चहा विषयावरचा हा लेख एकदम फक्कड जमला आहे. मी स्वतः गेली अनेक वर्षे सुटसुटीत असा मायक्रोवेव्ह ओव्हनमधे केलेला झटपट चहा पितोय. दिवसातून कमाल तीनदाच चहा पितो.

In reply to by चौकस२१२

गेल्या अनेक वर्षांपासून मायक्रोवेव्ह चहाची पाककृती टंकाळ्यामुळे प्रकाशित करणे राहून जात आहे. थोडक्यात लिहितो.
  • प्रथम एका कपात पाणी घेऊन त्यात चहाची डीप भिजवून ठेवणे. किमान १५ मिनिटे, घाई असल्यास कप थरथरवणे.
  • नंतर मायक्रोवेव्हमधे तापवणे. मी ४० सेकंद करतो. मायक्रोवेव्हच्या सेटिंग्जनुसार हा वेळ कमी अधिक करावा लागू शकतो.
  • कप बाहेर काढून त्यात दूध ओतणे.
  • पुन्हा एकदा मायक्रोवेव्हमधे गरम करणे.
  • नंतर कप बाहेर काढून, गरम असलेल्या डीपला चमच्याने दाबून त्यातले द्रव कपातल्या मिश्रणात मिसळतो.
  • चहा तयार :-). भिजवून ठेवण्याची वेळ सोडल्यास एका कपाला दोन मिनिटे लागतात. दोन कप चहा करताना ४० सेकंदाऐवजी १ मिनिटभर तापवतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

चित्रगुप्त 24/05/2024 - 01:23
मायक्रोवेव्हात गरम केलेले पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात असाही एक मतप्रवाह आहे. मी आणि माझी बायको ते कधीच वापरत नाही. पातेले, कढईत गरम करायला आणि भांडी घासायला लागणारा वेळ परवडला, पण खरोखर मा.वे. धोकादायक असेल तर कशाला विषाची परिक्षा घ्या, असा त्यामागे विचार आहे. -- माझ्या एका विद्वान प्रोफेसराच्या अनुभवाप्रमाणे अशा विविध हानिकारक गोष्टींविषयी संशोधनास फंडिंग उपलब्ध होत नसल्याने तसे संशोधन होत नाही, कुणी केले तरी ते दाबले जाते. याउलट मायक्रोवेव्ह, इंटरनेटचे तरंग, प्रिझर्वेटिव्हे, डास पळवण्याची साधने वगैरे हानिकारक नसतात, असा प्रचार करायला भरपूर पैसा ओतला जातो. अमेरिकेत शेतावर वाढणार्या गाईंचे ताजे दूध वापरण्यास मनाई आहे. दोन-चार आठवड्याची एक्स्पायरी डेट असलेले, रासायनिक प्रक्रिया केलेले दूध विकणेच कायदेशीर असते. आम्ही लांबून मुद्दाम जाऊन ताजे दूध आणतो, त्यावर NOT FOR HUMAN CONSUMPTION असे ठळक लेबल लावलेले असते. ते घ्यायला आधीपासून बुकिंग करावे लागते आणि ते दुप्पट-तिप्पट महाग असते. . पूर्वी कॅन्सर होणारे लोक फार कमी असायचे आता ते प्रमाण प्रचंड वाढलेले असण्यामागे आधुनिक रहाणी, सवयी-सुखसोयींमधून होणारे घातक परिणाम असावेत. अमेरिकेत बंदूक दुकानात जाऊन विकत घेता येते, पण ताजे कच्चे दूध नाही. "दुनिया पागल है, या फिर मै दीवाना" हे गाणे आठवते.

In reply to by चित्रगुप्त

मायक्रोवेव्ह ओव्हनमधे तापवलेले अन्न खावून आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे फार पूर्वी ऐकले होते. जालावर शोधले असता त्याचे खंडन करणारे बरेच वाचायला मिळाले अन समर्थनार्थ फारसे काही मिळाले नाही. सुक्ष्मलहरींचा वापर केला म्हणून इतका गंभीर परिणाम होईल असे शक्य नाही असे वाचल्याचे स्मरते. कर्करोगावर संशोधन करणार्‍यांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मुद्दा कळला की, एखाद्याला कर्करोग कशामुळेही होऊ शकतो अन तशाच परिस्थितीत असणार्‍या अनेकांना त्या कारणाने कर्करोग अजिबात होत नाही. तसेही कुठलीच रासायनिक प्रक्रिया न केलेले अन्न खाणे अन शरीराला विविध कृत्रिम रासायनिक घटकांपासून लांब ठेवायचे असेल तर जंगलात जाऊन आदीमानवासारखेच राहावे लागेल :-). प्रदुषणाच्या पातळीमुळे आरोग्यावर होणार्‍या वाईट परिणामांचा विचार करता भारतात नवी दिल्ली, बृहन्मुंबई, पुणे इत्यादी शहरात किमान हिवाळ्यात तरी वास्तव्य करू नये असेही म्हणता येईल.

आजी 21/05/2024 - 13:40
माझ्या या लेखावर जवळपास वीस प्रतिसाद आले. वाचनेही भरपूर झाली. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. त्या लेखात एक मुद्दा राहिला आहे. तो इथे टाकते. "चांगल्या चहाच्या यशाची मेख तो उकळण्यात नसून तो मुरवण्यात आहे. एक कप मोजून चहाचं आधण ठेवायचं. त्याला थोडीशी उकळी आली की त्यात साखर घालून ती विरघळवायची. मग चांगली खळखळून उकळी आल्यावर त्यात चहा टाकायचा आणि पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. दोन मिनिटांनी चहा गाळायचा. चहा नीट मुरल्याची खूण म्हणजे गाळण्यावर चहापत्ती अजिबात येता कामा नये. मग दूध घालून असा मस्त चहा प्यायचा. गप्पा मारायला तुमच्यासारखे दोस्त असतील तर आणखी मजा." ओके तर मग! पुन्हा एकदा सर्वांचे आभार. तुमची स्नेहांकित आजी.

In reply to by आजी

सर टोबी 21/05/2024 - 16:27
लेख नेहमीप्रमाणेच छान आणि मी नेहमी उल्लेख करतो त्या निरागासतेने भारलेला होता. एक थोडासा नाउमेद करणारा प्रतिसाद सुरुवातीलाच आला आणि त्यात प्रतिसाद देताना तांत्रिक अडचण उद्भवली. नेहमीसारखंच लिखाण करीत जा ही आग्रहाची विनंती.

आजी, 'चाय पे चर्चा' शिर्षक वाचलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीत लेखन वाचायचं राहीलं. आजीही चाय पे चर्चावर आल्या की असे वाटून एक सामान्य चहा विकणारा किती मोठा होतो वगैरे वर लेखन आहे की काय असे वाटले आणि आजीही पॉलिटीक्समधे आल्याचा आनंद झाला होता. आज चहा पिता पिता लेख वाचला. नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या विषयावरील चहाच्या आठवणी गोष्टी आवडल्या. चहा मलाही आवडतो. गरम. आजी आपण जसे रेकॉर्डींगसाठी वेगवेगळ्या गावी चहा पिला तसं मी पण नोकरीच्या गावीचा प्रवास करतांना, माझेही चहावाले ठरलेले. कधी तरी गुळाचा गरम चहा तर, कधी बीगर शक्कर दोन्हीही चहावाल्याला ऑर्डर्स पाठ. मागे एकदा वाट्सॅप विद्यापीठात चहा भारतात कसा आला वगैरेची ष्टोरी वाचलेली. चहाची ओळखच नसती झाली तर, असेही प्रश्न पड्तात. व्यक्तीगणिक चहाची चव बदलते बरं का आजी असे वाट्ते. आता ते कसं माहिती नाही. व्यक्तीगत मला बीनदुधाचा काळा चहा लिंबु पिळून आवडत नाही. भरपूर दुधाचा चहा आवड्तो. कॉफी आवडते. फारच गोड जीभेवर गडद पाक यावा इतक्या अशा चहाचा राग येतो. अशा खुप काही गोष्टी. आजी, आपल्या लेखनामधे साधे विषय असले तरी त्याची एक खास खुशबू आहे. मला तर तुमचे लेखन आले की टायटनिक सिनेमातली ती ती आजी डोळ्यासमोर येते, जी टायनिक ष्टोरी सांगते, तसं तुम्ही आम्हा मिपाकरांना आयुष्यातील विविध अनुभव सांगत आहात असा फिल येतो तेव्हा लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 24/05/2024 - 18:00
चहासाठी दूध हवं ते म्हशीचं. भरपूर दाट. गाईचं पांचट दूध चहात टाकलेलं मला आवडत नाही. वाढेना कोलेस्टेरॉल! एक कप चहात अशी कितीशी फॅट असणार? तर म्हशीच्या दुधाचा चहा. त्यात आलं आणि गवती चहा असेल तर सोन्याला सुगंध. माझ्या अगदी मनातली पाककृती चहाची. मी स्वतःही चहाप्रेमी. सकाळी फक्कड चहा आणि चपाती असे भन्नाट कॉम्बिनेशन खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडले तर चुकचुकल्यासारखे वाटते. पूर्वी मी दिवसातून अनेकदा चहा पीत असे, पण काही वर्षांपासून एसिडिटीचा त्रास सुरू झाल्यामुळे दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी पितो. रच्याकने, चहापत्ती आणि म्हशीचे गाढे दुध हे ज्यांना एसिडिटीचा, अन्न पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी त्रासदायक आहे, असे डॉक्टरांकडून कळाले.

चौथा कोनाडा 25/05/2024 - 17:28
सुरेख चहा प्रपंच ! चहाप्रेमी म्हणून आवडले .. अर्थातच ! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सि) हिनं सो-कुल नावाचे सदर लिहिले होते (आता त्याचं पुस्तक होऊन बाजरात आलेय ) त्यात पण असाच सुंदर लेख होता चहा वर ! मजा आली आजी

विजुभाऊ 25/12/2024 - 13:04
सध्या बंगळूर मुक्कामी आहे. या दक्षीणात्याना चहा हे कॉफी प्रमाणेच उकळून उकळून त्याचे असे काही सूप करायचे असते असे शिकवलेले असावे घट्ट दूध आणि इतका घट्ट उकळवलेला चहा हा कोणाला "चहा सोडायचा" असेल तर एक उत्तम औषध आहे.

In reply to by विजुभाऊ

कंजूस 25/12/2024 - 15:17
याउलट रेल्वेतला चहा असतो. तोंड धुवायला गोड गरम पाणी. तोही आपल्याला चहा सोडायला लावतोच. मग कॉफी जरा बरी असते.
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे. चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते. मला चहा आवडतो. खूप आवडतो. पण म्हणून मी सारखा सारखा चहा पित नाही. फक्त दोनदा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी. संध्याकाळी एक वेळ नसला तरी चालेल. पण सकाळचा मस्ट. मात्र मला चहा जसा आवडतो तसाच बनलेला हवा.

वटवृक्ष!

मार्गी ·

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:56
अप्रतिम व्यक्तिचित्र ! मिपाकर असं व्यक्त होतात हे बघुन विशेष वाटतं !
वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा. जशा खूप लांबच्या गोष्टी दिसू शकत नाहीत, तशा खूप जवळच्याही गोष्टी अनेकदा दिसू शकत नाहीत अशी काहीशी स्थिती असलेलं मुलगा- वडील नातं. त्या तुलनेत आजोबा- नातू किंवा नात हे काही बाबतीत जास्त सुखद नातं. प्रखर सूर्याचं सौम्य झालेलं तेज आणि अंतरामुळे वाटणारी ओढ!
क्लासिक !
आणि आज जेव्हा जगातला काँट्रास्ट दिसतो तेव्हा हा वटवृक्ष किती खोलवर गेलेला आणि किती उंच विस्तारला होता हे जाणवतं. खरं तर ते दिवस व तो काळ- तो ज़माना वेगळाच होता.
अगदी खरंय ! तो काळच भारलेला होता ... त्या काळातले काही अंश मला अनुभवायला मिळाले हे खरंच माझं भाग्य म्हणायचं !
त्याकाळी म्हणजे साधारण १९६०- १९८० च्या परभणीमध्ये घरी अनेक जण नेहमी वार लावून जेवायला यायचे. अनेकांची घरी सतत उठबस असायची. किती तरी विद्यार्थ्यांना आजोबा आणि आजीने मदत केलेली आहे. आजच्या काळाच्या अगदी विपरित म्हणजे तेव्हा जे जे लोक घरी यायचे किंवा बाहेर ज्यांना भेटणं व्हायचं ते सगळे अनोळखी तर नाहीच नाही पण मित्रच असायचे. दुकानदार, घरात किंवा इतर ठिकाणी काम करणारे, शिक्षक, सरकारी कर्मचारी असे सगळे. आजी किंवा आजोबा आणि नंतरच्या काळात बाबा कधी कोणा अनोळखी माणसाला भेटतच नसावेत. इतकी माणसं जोडलेली आणि जपलेली असायची. आणि हे सगळं एफर्टलेस होतं. इतकं त्यांच्यामध्ये ते मुरलं होतं. अगदी सहजपणे ते आजीला संगीताच्या साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे व त्यांच्या मुलींना मनासारख्या गोष्टी करू द्यायचे. ही गोष्ट तेव्हाच्या छोट्या गावात काळाच्या खूपच पुढची होती. त्यामुळे बाहेरच‌ं जग बघेपर्यंत हे काही वेगळं आहे हे जाणवलंच नाही.
खरोखर वटवृक्षच ! त्यांच्या पारंब्यांवर किती जण तरारून आले असतील याला गणतीच नसेल !
अस्ताला जाण्यापूर्वी शेवटी शेवटी ह्या सूर्याला विस्मरणाचं ग्रहण लागलं. त्यामुळे कदाचित अनेकांच्या मनामध्ये त्यांच्या विस्मरणाचीच आठवण जास्त लक्षात असेल! पण भले मंदप्रभ झालेला सूर्य अस्त पावल्यानंतर लोकांनी जे बोलून दाखवलं, ज्या आठवणी सांगितल्या त्यातून त्या सूर्याची "प्रभा" किती होती हे कळत गेलं.
हे वाचून मन कातर झालं ======================= “As you write more and more personal becomes more and more universal.” ― व. पु. काळे, वपुर्झा

मार्गी 23/04/2024 - 11:32
ओहह! इतकी सविस्तर प्रतिक्रिया!!!! खूप खूप धन्यवाद चौथा कोनाडा जी! खूप आपुलकीने तुम्ही ह्या आठवणी वाचल्या!! लेखातल्या व प्रतिक्रियेतल्या शेवटच्या भागासंदर्भात- स्नेहप्रभा हे आजीचं नाव आहे. आजोबांची शेवटची ११ वर्षं त्यांना विस्मरण- डिमेंशिया होता. हळु हळु वाढत गेला होता.

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:56
अप्रतिम व्यक्तिचित्र ! मिपाकर असं व्यक्त होतात हे बघुन विशेष वाटतं !
वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा. जशा खूप लांबच्या गोष्टी दिसू शकत नाहीत, तशा खूप जवळच्याही गोष्टी अनेकदा दिसू शकत नाहीत अशी काहीशी स्थिती असलेलं मुलगा- वडील नातं. त्या तुलनेत आजोबा- नातू किंवा नात हे काही बाबतीत जास्त सुखद नातं. प्रखर सूर्याचं सौम्य झालेलं तेज आणि अंतरामुळे वाटणारी ओढ!
क्लासिक !
आणि आज जेव्हा जगातला काँट्रास्ट दिसतो तेव्हा हा वटवृक्ष किती खोलवर गेलेला आणि किती उंच विस्तारला होता हे जाणवतं. खरं तर ते दिवस व तो काळ- तो ज़माना वेगळाच होता.
अगदी खरंय ! तो काळच भारलेला होता ... त्या काळातले काही अंश मला अनुभवायला मिळाले हे खरंच माझं भाग्य म्हणायचं !
त्याकाळी म्हणजे साधारण १९६०- १९८० च्या परभणीमध्ये घरी अनेक जण नेहमी वार लावून जेवायला यायचे. अनेकांची घरी सतत उठबस असायची. किती तरी विद्यार्थ्यांना आजोबा आणि आजीने मदत केलेली आहे. आजच्या काळाच्या अगदी विपरित म्हणजे तेव्हा जे जे लोक घरी यायचे किंवा बाहेर ज्यांना भेटणं व्हायचं ते सगळे अनोळखी तर नाहीच नाही पण मित्रच असायचे. दुकानदार, घरात किंवा इतर ठिकाणी काम करणारे, शिक्षक, सरकारी कर्मचारी असे सगळे. आजी किंवा आजोबा आणि नंतरच्या काळात बाबा कधी कोणा अनोळखी माणसाला भेटतच नसावेत. इतकी माणसं जोडलेली आणि जपलेली असायची. आणि हे सगळं एफर्टलेस होतं. इतकं त्यांच्यामध्ये ते मुरलं होतं. अगदी सहजपणे ते आजीला संगीताच्या साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे व त्यांच्या मुलींना मनासारख्या गोष्टी करू द्यायचे. ही गोष्ट तेव्हाच्या छोट्या गावात काळाच्या खूपच पुढची होती. त्यामुळे बाहेरच‌ं जग बघेपर्यंत हे काही वेगळं आहे हे जाणवलंच नाही.
खरोखर वटवृक्षच ! त्यांच्या पारंब्यांवर किती जण तरारून आले असतील याला गणतीच नसेल !
अस्ताला जाण्यापूर्वी शेवटी शेवटी ह्या सूर्याला विस्मरणाचं ग्रहण लागलं. त्यामुळे कदाचित अनेकांच्या मनामध्ये त्यांच्या विस्मरणाचीच आठवण जास्त लक्षात असेल! पण भले मंदप्रभ झालेला सूर्य अस्त पावल्यानंतर लोकांनी जे बोलून दाखवलं, ज्या आठवणी सांगितल्या त्यातून त्या सूर्याची "प्रभा" किती होती हे कळत गेलं.
हे वाचून मन कातर झालं ======================= “As you write more and more personal becomes more and more universal.” ― व. पु. काळे, वपुर्झा

मार्गी 23/04/2024 - 11:32
ओहह! इतकी सविस्तर प्रतिक्रिया!!!! खूप खूप धन्यवाद चौथा कोनाडा जी! खूप आपुलकीने तुम्ही ह्या आठवणी वाचल्या!! लेखातल्या व प्रतिक्रियेतल्या शेवटच्या भागासंदर्भात- स्नेहप्रभा हे आजीचं नाव आहे. आजोबांची शेवटची ११ वर्षं त्यांना विस्मरण- डिमेंशिया होता. हळु हळु वाढत गेला होता.
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा.