तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला. माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत.

सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

लेखनविषय:
लेखनप्रकार

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

आज मी साबणाने आंघोळ केली

लेखनविषय:
लेखनप्रकार
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ.

महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण

लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.
Subscribe to समाज