मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेखकाची थेट भेट !

हेमंतकुमार ·

In reply to by सचिन काळे

हेमंतकुमार 13/10/2017 - 14:31
सचिन, सहमत. मी तर त्या वाक्याच्या अगदी प्रेमात पडलो आहे ! जेव्हा Persig ना एका पत्रकाराने फोनवरु न मुलाखत घ्यायला येऊ का असे विचारले तेव्हा त्यानी ते उत्तर दिले होते.

उदय 11/10/2017 - 22:56
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते. साधारणतः २००० साली "पुरुष" नाटक वॉशिंग्टन डी.सी. ला आले होते तेव्हा मी सहज बॅकस्टेजला गेलो आणि नाना पाटेकरबरोबर एकट्याने ४० मिनिटे मराठीत गप्पा मारल्या. मिरचीचे आईसक्रीम कसे लागते ते सिनेमात किती पैसे मिळतात ते सिनेमा जास्त आवडतो की नाटक, अशा विविध विषयांवर बोललो. त्याला भेटायच्या आधी मला अगदी "वॉव" असे वाटत होते, पण त्याच्याशी इतक्या सहज गप्पा मारल्या की नंतर लक्षात आले की हे कलाकार म्हणजे काही आकाशातून पडलेले नाहीत, तुमच्या-माझ्यासारखीच सामान्य माणसे आहेत. पण तेव्हापासून मुद्दाम कुणालाही भेटायचा विचार मात्र निघून गेला. चांगले की वाईट ते माहीत नाही, पण तेव्हापासून आता कुणालाही भेटायचे विषेश कौतुक वाटत नाही.

In reply to by गवि

उदय 13/10/2017 - 21:18
भारत आणि विदेश यामुळे नक्कीच काही फरक पडत असेल. पण माझ्या मित्राचा अनुभव सांगतो. तो डेनव्हरला होता, तेव्हा त्याची मुलगी ज्या कुमॉन क्लासमध्ये जायची तिथेच माधुरी दीक्षितपण यायची. तिथे बसायला जेमतेम चारच खुर्च्या असल्याने जवळपास दररोज भेटत आहे. पण एकंदरीत ती शिष्ट आहे, असे त्याचे मत आहे. शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत. त्यामुळे देश/परदेश यापेक्षा ते व्यक्तिवर जास्त अवलंबून आहे, असे मला वाटते.

4/5 वर्षांआधी अशोक सराफ धुळ्यात एका नाटकासाठी आले होते.ते ज्या होटेल मध्ये थांबले ते अगदी माझ्या घरासमोरच. आम्ही काँलनीतले मित्र एका autograph साठी तिथे गेलो. रूम बाहेर 2 तास वाट पाहिली पण काहीच मिळाले नाही. बाहेरयेऊनही त्यांनी autograph दिली नाही. शेवटी hotel मालकाने विनवल्यावर एक फोटो काढण्याची परवानगी दिली 30 लोकं आणी अशोक सराफ. फोटो बोंबलला. वाईट अनुभव. याऊलट तेथेच भरत जाधव, संजय नार्वेकर यांचा अनुभव चांगला आला.

सतिश गावडे 12/10/2017 - 08:44
असाच अनुभव मलाही आला एका पुस्तक प्रदर्शनात. एका लेखक महाशयांच्या पुस्तकांचा एक रॅक तिथे होता. लेखक ही तिथेच होते. मी त्यांना नमस्कार केला. तुमची पुस्तकं वाचतो म्हणालो. तर लेखक महाशय इतर काही न बोलता एखाद्या सराईत सेल्समनप्रमाणे रॅकवरील जास्तीत जास्त पुस्तकं माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करु लागले. त्या लेखकाचे लेखन यथातथाच असल्याने मी काही हा अनुभव मनाला लावून घेतला नाही. :)

In reply to by प्रचेतस

पुंबा 12/10/2017 - 09:39
गोड बोलणारे असतील तर माझा अनुभव चांगला आहे, सांगलीला एका व्याख्यानासाठी आलेले तेव्हा पुस्तकांचा स्टॉल लावला होता तिथे त्यांनी.:प मी पुस्तक न घेता आगाऊपणे काही तरी लिबरलीझम, कम्युनिझमविषयीचा प्रश्न विचारला होता, त्यांनी बरंच व्यवस्थित उत्तर दिलेले. ५-७ मिनिट एंटरटेन केलं ते पण त्यांच्या पुस्तकविक्रीतून वेळ काढून. पण त्यानंतर आता कुठल्या लेखकाला भेटून बोलण्याची इच्छा नाही होत.

In reply to by पुंबा

प्रचेतस 12/10/2017 - 11:04
मला ते ८/१० वेळा पुस्तक प्रदर्शनांत दिसलेले, पण त्यांचे एकही पुस्तक मी वाचलेले नसल्याने मी त्यांच्याशी बोलायला धजू शकलो नाही,

In reply to by सतिश गावडे

पगला गजोधर 12/10/2017 - 13:50
च्याय्ला पूर्ण लेख वाचून इथपर्यंत प्रतिक्रिया वाचेपर्यंत, मनात , "अच्युत गोडबोले" ??? असं विचारावं ... असं ठरवलेलं .. पण श्या ...

दाह 12/10/2017 - 10:30
आठेक वर्षांपूर्वी माझ्यासोबत पण असाच किस्सा घडलेला. फक्त व्यक्ती लेखक नसून इतिहासकार होती. महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असामी. आमच्या परिचयातील एकांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला जिथे हे प्रमुख वक्ते म्हणून आलेले होते. इतकं वय होऊनही त्यांच्या भाषणातील आवेश आणि ओघवती शैली कायम होती. कार्यक्रम संपल्यावर जेवण सुरु झालं आणि तिथं मी त्यांना हातात ताट घेऊन खुर्चीवर बसलेलं पाहिलं. यजमानांची परवानगी घेऊन मी त्यांच्यापाशी गेलो. सर्वप्रथम वंदन केलं. आणि खुर्ची घेऊन शेजारी बसलो. हे निर्विकार चेहऱ्यानी जेवत होते. त्यांना काही इतिहासाबद्दल , महाराजांबद्दल शंका , प्रश्न विचारले तर "हं"आणि "नाही" च्या पलीकडे काही उत्तर नाहीच. बरं प्रश्न काही अगदीच बाळबोध नव्हते.पण महाशय काहीच बोलेनात. भाषणात त्यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केलेला. त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला अजून काही करता येईल का असं विचारलं तर "कर तुला काय करायचंय ते" इतकं एक वाक्य कसंबसं जुलमाचा रामराम केल्यागत बाहेर पडलं. नंतर काहीतरी प्रश्न विचारतील, निदान तू काय करतोस काय शिकतोस हे तरी विचारतील अशा अपेक्षेने पाच मिनिट बसून राहिलो पण इतिहासकार मेन्यूमध्ये भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी यासारखे मराठमोळे पदार्थ ठेवल्याबद्दल यजमानांचं कौतुक करण्यात गुंग झाले आणि मी तसाच उठून निघून आलो.

In reply to by दाह

हवालदार 13/10/2017 - 15:27
तूम्ही जेवायला बसल्यावर तुमच्या बाजूला कोणी तीर्हईत व्यक्ती येवून तुमच्याशी गप्पा मारू लागली तर तुम्हाला चालते का? तेही दररोज वेगळी व्यक्ती?

कपिलमुनी 12/10/2017 - 10:59
कोणत्याही अनोळखी प्रसिद्ध किंवा सामान्य माणसाशी बोलताना पूर्वपरवानगी घ्यावी , त्यांना वेळ आहे का ? आपण ५ मिनिट बोलू शकतो का ? असे विचारूनच बोलावे. आपल्याकडे हा कॉमन सेन्स सार्वजनिकरीत्या खूप कमी आहे. ( कदाचित इतिहासकारांना कडाडून भूक लागली असावी आणि तुमचा जेवणात व्यत्यय होत असावा! ह. घ्या. )

In reply to by कपिलमुनी

दाह 12/10/2017 - 11:06
हं विचारायला हवं होतं खरं. तसं आयोजकांना (जे आमच्याच नात्यातील एक होते) आधी चारपाचदा विचारलेलं नक्की जाऊ का म्हणून. त्यांनी बिनधास्त जा म्हणून सांगितलं. जेवणानंतर ते तडक निघणार असल्याने हीच संधी आहे असंही त्यांनी सांगितलं.

मित्रहो 12/10/2017 - 11:04
ते माणसावर आणि त्यावेळेच्या पिरिस्थितीवर अवलंबून असावे. कुणी पुस्तक प्रदर्शानात असेल तर तो पुस्तके खपावायचाच प्रयत्न करेल. काही माणासांना दुसऱ्याशी बोलायला आवडत नाही. काही स्वतःत मग्न असतात. मराठीतले एक लेखक माझ्या बायकोला इंग्रजी शिकवायचे आणि तिचे त्यांच्याविषयी कधीही चांगले मत नव्हते. आजही नाही. मी काहीतरी वेगळा आहे असे त्यांना वाटते असे तिचे मत आहे. असेच काहीसे मत माझ्या एका मित्राचे त्याच्या आजोबांविषयी होते. ते कवी होते. याउलट सर्वसामान्य माणसांसारखे वागनारे सुद्धा बरेच बघितले. शेवटी सारी माणसे असतात.

जागु 12/10/2017 - 11:53
प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. कुणाला मी पणा जास्त असतो कोणाला नसतो असो. मी मंगला गोडबोले आणि वीणा गावणकर यांना मेसेज पाठवले होते. त्यांनी मला खुप छान शब्दात रिप्लाय दिले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला माझा.

सुबोध खरे 12/10/2017 - 13:31
माझे अनुभव काही निराळे आहेत. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा आर्यक्रम मुलुंड मध्ये (२०१५) झाला तेंव्हा आम्ही सुरुवातीला त्यांना भेटायला गेलो.त्यांनी आमचे छान हसून स्वागत केले. त्यांना नमस्कार केल्यावर आम्ही तुमचे चाहते आहोत सांगितले. त्यांनी मला विचारले "आप क्या करते हो? मी "लष्करातून रिटायर झालो" आहे असे सांगितल्यावर त्यांनी हसून "आप रिटायर हुए जैसे लगते नही हो" म्हणून सांगितले. माझ्या बायकोने आपला "किरवाणी" राग फार दिवसात ऐकला नाही असे सांगितले. त्यावर ते म्हणाले कि बरोबर आहे १९९७ नंतर मी तो वाजवलेला नाही. काही काळाने कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा त्यांनी प्रस्तावना झाल्यावर सांगितले कि बऱ्याच दिवसात किरवाणी राग वाजवला नाही म्हणून आज मी हा राग वाजवणार आहे. आमच्या "अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू" उभे राहिले. आमच्या सारख्या एका टिनपाट श्रोत्याचे ऐकून एवढा मोठा दिग्गज कलाकार त्यांच्या आवडीचा राग पूर्ण दीड पावणे दोन तास वाजवतो हि आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ( मला रागदारीतील ओ का ठो कळत नाही परंतु ऐकायला मात्र आवडतं आणि मी सलग चार पाच तास असे कार्यक्रम ऐकू शकतो/ ऐकतो ते सुद्धा फेसबुकवर/ इंस्टाग्राम वर स्टेटस न टाकता -- बायको गाणं शिकली आहे तिला थोडं फार समजत असावं.) पंडित विश्वमोहन भट, पंडित विजय घाटे, पंडित सतीश व्यास, पंडित आनंद भाटे अशा अनेक दिग्गज कलाकारांना आम्ही भेटलो आहे. सर्वानी छान हसून व्यवस्थित संभाषण केले. पुलं नि लिहिले आहे कि चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक असावा असे कुठे तरी वाटते

अनिंद्य 12/10/2017 - 13:46
लेखकांचे नाहीत पण चित्रकार मंडळींचे फार चांगले अनुभव आहेत मला. अगदी कमी बोलणाऱ्या बऱ्याच प्रसिद्ध चित्रकारांशी ओळखपाळख नसता छान गप्पा झाल्या आहेत. सतीश गुजराल यांच्याबद्दलचा अनुभव तर हृद्य आणि कायम लक्षात राहील असा आहे. त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांना अजिबात ऐकू येत नाही, पण त्यांनी किरण गुजराल यांच्या मार्फत सुरेख संवाद साधला. न कंटाळता माझे बाळबोध म्हणणे ऐकले (म्हणजे किरणजींनी त्यांना हातवाऱ्याने / लिहून सांगितले). सतीशजींनी त्यांच्या प्रदर्शनात मांडलेली चित्रे आणि म्युरल्सबद्दल उत्साहाने सांगितले.... May be it was my lucky day :-) नाटक-फिल्मी लोकांबद्दल आकर्षण नाही, पण दीपा-श्रीराम लागू, जावेद अख्तर, अमिताभ बच्चन ही मंडळी चाहत्यांशी विनम्रतेने वागतात - वागवतात हे बघितले आहे. मला वाटतं ही वागणूक व्यक्तीसापेक्ष असते. बाकी The best place to meet an author is on the pages of his book ह्याच्याशी सहमत :-)

रेवती 12/10/2017 - 17:17
आपल्याला जरा वाईट वाटल्याचे लेखनातून जाणवते आहे. साहजिक आहे. आजवर मी आवडत्या लेखक, कलाकारांना भेटले नाहीये. तसे वाटलेही नाही त्यामुळे स्वत:चा असा अनुभव नाही. तरीही मैत्रिणीला या त्रासातून जाताना पाहिलेय. ती एका मंडळासाठी बरेच काम करते. वयाने मोठी आहे म्हणून तिचा यातील अनुभवही मोठा आहे. दोन ते तीन राज्यांमध्ये तिचे वास्तव्य झाले आहे व त्या त्या ठिकाणी तिने या मंडळासाठी काम केले आहे. प्रसंगानुरूप अनेक कलाकारांना, लेखकांना, गायकांना आमंत्रित केले जात असते. एका हिंदीत स्थिरावलेल्या मराठी मनुष्याला सपत्निक आमंत्रित केले गेले. राहण्याजेवणाच्या, वास्तव्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या गेल्या. बिझनेस क्लास प्रवास मान्य केला. तरी तो कलाकार व त्याची पत्नी यांनी बराच त्रास दिला. मैत्रिणीची कॉलेजवयीन कन्यका दिमतीला राहीली होती. ती एका दिवसातच वैतागून काम सोडून गेली. मनुष्य शुद्धीत असेल तर बरा वागण्याची शक्यता. नसल्यास नाही. त्याचप्रमाणे आणाखीही एक मराठी कलाकारांचा संच आला असताना अपरात्री पेयपान करून मोठ्याने हसत, गप्पा मारत हॉटेलच्या बाहेर बसून राहणे, विनंती करूनही आपापल्या खोल्यांमध्ये न जाणे वगैरे प्रकार केले आहेत. मग दुसरे दिवशी प्रयोगावेळेस घसे बसणे, झोपा पूर्ण न झाल्याने त्रास होणे वगैरे झाले. एक गायिकाबाई तर ऐन कार्यक्रमावेळेस गाऊच शकल्या नाहीत. काहीवेळा अपघाताने असे होते पण अनेक कलाकार आहेत जे स्वत:चे गळे जपतात व उत्तम कार्यक्रम पार पाडतात. आपल्या देशातील हवामान व दुसर्‍या देशातील हवामानात फरक असतो. थंडी, उन्हाळा हे वेगळे असल्याने त्रास झाल्यास व त्यामुळे प्रयोग व्यवस्थित न झाल्यास जबाबदार कोण? व्यावसायिकता कोठे गेली? मैत्रिणीला फार मनस्ताप झाला. मला वाटतं की लोकांनी यांना भेटायचे टाळावे व लेखक, कलाकारांनी व्यावसायिक मानसिकता ठेवून काम करावे. असे करताना आपण सगळेजण मनुष्यप्राणी असल्याने कधी आनंदाच्या भरात भेटले जाणे हे आपल्याकडून, तर कधी व्यावसायिकतेचे भान सुटणे हे समोरच्याकडून थोडेफार झाल्यास सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पण वर उल्लेखलेल्या प्रसंगात झालेले अपमान, पेयपानाचा खर्च दुसर्‍याच्या माथी मारणे वगैरे खपवून घेतले जाऊ नये. मी येत्या विकांती होणार्‍या एका मराठी नाटकाची तिकिटे काढलियेत. कार्यक्रम नीट होईल अशी आशा आहे. कोणालाही भेटायला वगैरे जाणार नाहीये.

In reply to by रेवती

सुबोध खरे 12/10/2017 - 18:29
आपण म्हणता तसा अनुभव बऱ्याच अनिवासी भारतीयांना आला आहे. आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो हे त्यांच्यावर उपकार करतो असा आव बऱ्याच कलाकारांचा असतो. शिवाय त्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी ते आपल्याला बोलावतात म्हणजे हि त्यांची निकड आपण भागवतो. ते श्रीमंत आहेत आणि भरपूर पैसे मिळवतात मग आम्ही त्यांना भरपूर पैसे मागितला तर काय चूक आहे असाही भाव असतो बरेच कलावंत आणतात. अशा वृत्तीच्या कलाकारांच्या मुळे माझ्या बऱ्याच अनिवासी मित्रांनी मनस्ताप झाल्याचे बोलून दाखवले आहे. अर्थात याची दुसरी बाजू सुद्धा आहे म्हणजे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी सुद्धा कलाकारांच्या वाट्यास आली आहेत आपण संयत भाषेत लिहिले आहे तेच मी स्पष्टपणे लिहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 12/10/2017 - 18:51
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी अर्थातच ही बाजूही खरी असणार.

In reply to by रेवती

सुबोध खरे 12/10/2017 - 20:55
हा प्रकार गानसरस्वती श्री किशोरी आमोणकर यांनी सांगितला होता. त्यांच्या मैफिलीत काही लोक बियर पीत गप्पा मारत होते त्यामुळे त्यांनी मैफिल आटोपती घेऊन तेथून रजा घेतली यावर त्यातील काही हुशार लोकांनी हि अमेरिकेची संस्कृती आहे, पॉप शो मध्ये पण असे होते म्हणून मल्लिनाथी पण केली होती. किशोरीताईंनी सांगितले कि संगीत हि माझ्यासाठी ईश्वर पूजा आहे आणि त्यासाठी मी माझे आयुष्य वेचले आहे त्याचा उपमर्द मला कधीही सहन होणार नाही. २०१५ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी हि मैफिलीत आल्यावर आणि गायन संपल्यावर त्यांनी श्रोत्यांना डोके टेकून साष्टांग नमस्कार घातलेला मी स्वतः पाहिलेला आहे. हा मूळ दोन संस्कृतीतील फरक आहे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 12/10/2017 - 23:28
किशोरीताईंनी जे केले ते बरोबर होते असे वाटते. हा पॉप संगिताचा कार्यक्रम नव्हता आणि आपल्या संगिताच्या मैफिलीबद्दल काहीच माहीत नसणारे हे लोक्स नसावेत. उगीच सारवासारव केली.

सेलिब्रिटी या देखील आपल्यासारख्याच हाडामासाची माणसेच असतात. त्यांना देखील त्यांचे मुड असतात. हे विसरले गेल्याने चाहत्यांना मारहाण सारख्या बातम्या वाचायला मिळतात. मला स्वाक्षरी गोळा करायचा छंद आहे. या निमीत्ताने मी अनेक मान्यवरांना भेटलोय देखील , अगदी काही नामांकितांच्या घरीही गेलेलो आहे. थोडे फार बरे वाईट अनुभव गाठीशी आहेत. यावर धागा लिहावा ईतके मटेरियल आहे, पण उगाच मी अमुक्याला कसे भेटलो, त्यांनी माझे कौतुक कसे केले असे माझीच आरति ओवाळणारा म्हाग्रु छाप धागा होईल, तेव्हा न लिहीणेच बरे.

रेवती 15/10/2017 - 08:36
नाटकाला जाऊन आलो. त्यांनी नाटकाच्या सुरुवातीला व शेवटी फोटू काढणे, सह्या घेणे, पडद्यापाठीमागे भेटणे वगैरे आज होऊ शकणार नाही हे सांगितल्याने कोणी गेले नाही. कार्य्क्रम अर्धा तास उशिराने सुरु झाला. इकडील पब्लिकची ती सवय मोडल्याने काही वेळाने लोकांनी विनाकारण टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. मग चालू केला. सगळे कलाकार फार दमल्याचे समजत होते. ते एका राज्यातून उडून आमच्या राज्यात आले होते, प्रयोग सादर केला, उद्या जर्सी असे करत ६ नोव्हें. पर्यंत दौरा असणार आहे. कार्यक्रमाच्या खर्चाचा बराच हिस्सा पु. ना. गाडगिळांनी उचलल्याने त्यांच्याकडील सोने व हिरे यांच्यात गुंतवणूक केली असता काय मिळेल ही झायरात कलाकारांकरवी करण्यात आली. त्यात एकरकमी २००० डॉ चे सोने खरेदी केले असता सलमान खानला भेटण्याची संधी अशी ऑफर होती. ती कोणाला इच्छा आहे? असे विचारताच एकही हात वर झाला नाही. (बरे झाले! असेच हवे त्या सलमानला!) नाटक चांगले पार पाडले. शेवटी स्टेजवर कलाकारांना बॉस्टन मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. एक दोनजण सोडता बाकी कलाकारांनी पिशव्या उघडून त्यात काय आहे हे लगेच पाहिले त्याची गंमत वाटली.

गामा पैलवान 15/10/2017 - 19:55
उदय,
शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत.
बऱ्याचदा अशी माणसे मराठीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. पूर्वेतिहासाची कसलीशी असुरक्षितता वाटंत असते. अगदी घरकुळाचा पत्ता नसलेलं अनौरस अपत्यसुद्धा आत्मसन्मान असेल तर आपला इतिहास दडवून ठेवंत नसतं. मग अतिप्रसिद्ध व्यक्तींना कसली अडचण आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by सचिन काळे

हेमंतकुमार 13/10/2017 - 14:31
सचिन, सहमत. मी तर त्या वाक्याच्या अगदी प्रेमात पडलो आहे ! जेव्हा Persig ना एका पत्रकाराने फोनवरु न मुलाखत घ्यायला येऊ का असे विचारले तेव्हा त्यानी ते उत्तर दिले होते.

उदय 11/10/2017 - 22:56
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते. साधारणतः २००० साली "पुरुष" नाटक वॉशिंग्टन डी.सी. ला आले होते तेव्हा मी सहज बॅकस्टेजला गेलो आणि नाना पाटेकरबरोबर एकट्याने ४० मिनिटे मराठीत गप्पा मारल्या. मिरचीचे आईसक्रीम कसे लागते ते सिनेमात किती पैसे मिळतात ते सिनेमा जास्त आवडतो की नाटक, अशा विविध विषयांवर बोललो. त्याला भेटायच्या आधी मला अगदी "वॉव" असे वाटत होते, पण त्याच्याशी इतक्या सहज गप्पा मारल्या की नंतर लक्षात आले की हे कलाकार म्हणजे काही आकाशातून पडलेले नाहीत, तुमच्या-माझ्यासारखीच सामान्य माणसे आहेत. पण तेव्हापासून मुद्दाम कुणालाही भेटायचा विचार मात्र निघून गेला. चांगले की वाईट ते माहीत नाही, पण तेव्हापासून आता कुणालाही भेटायचे विषेश कौतुक वाटत नाही.

In reply to by गवि

उदय 13/10/2017 - 21:18
भारत आणि विदेश यामुळे नक्कीच काही फरक पडत असेल. पण माझ्या मित्राचा अनुभव सांगतो. तो डेनव्हरला होता, तेव्हा त्याची मुलगी ज्या कुमॉन क्लासमध्ये जायची तिथेच माधुरी दीक्षितपण यायची. तिथे बसायला जेमतेम चारच खुर्च्या असल्याने जवळपास दररोज भेटत आहे. पण एकंदरीत ती शिष्ट आहे, असे त्याचे मत आहे. शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत. त्यामुळे देश/परदेश यापेक्षा ते व्यक्तिवर जास्त अवलंबून आहे, असे मला वाटते.

4/5 वर्षांआधी अशोक सराफ धुळ्यात एका नाटकासाठी आले होते.ते ज्या होटेल मध्ये थांबले ते अगदी माझ्या घरासमोरच. आम्ही काँलनीतले मित्र एका autograph साठी तिथे गेलो. रूम बाहेर 2 तास वाट पाहिली पण काहीच मिळाले नाही. बाहेरयेऊनही त्यांनी autograph दिली नाही. शेवटी hotel मालकाने विनवल्यावर एक फोटो काढण्याची परवानगी दिली 30 लोकं आणी अशोक सराफ. फोटो बोंबलला. वाईट अनुभव. याऊलट तेथेच भरत जाधव, संजय नार्वेकर यांचा अनुभव चांगला आला.

सतिश गावडे 12/10/2017 - 08:44
असाच अनुभव मलाही आला एका पुस्तक प्रदर्शनात. एका लेखक महाशयांच्या पुस्तकांचा एक रॅक तिथे होता. लेखक ही तिथेच होते. मी त्यांना नमस्कार केला. तुमची पुस्तकं वाचतो म्हणालो. तर लेखक महाशय इतर काही न बोलता एखाद्या सराईत सेल्समनप्रमाणे रॅकवरील जास्तीत जास्त पुस्तकं माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करु लागले. त्या लेखकाचे लेखन यथातथाच असल्याने मी काही हा अनुभव मनाला लावून घेतला नाही. :)

In reply to by प्रचेतस

पुंबा 12/10/2017 - 09:39
गोड बोलणारे असतील तर माझा अनुभव चांगला आहे, सांगलीला एका व्याख्यानासाठी आलेले तेव्हा पुस्तकांचा स्टॉल लावला होता तिथे त्यांनी.:प मी पुस्तक न घेता आगाऊपणे काही तरी लिबरलीझम, कम्युनिझमविषयीचा प्रश्न विचारला होता, त्यांनी बरंच व्यवस्थित उत्तर दिलेले. ५-७ मिनिट एंटरटेन केलं ते पण त्यांच्या पुस्तकविक्रीतून वेळ काढून. पण त्यानंतर आता कुठल्या लेखकाला भेटून बोलण्याची इच्छा नाही होत.

In reply to by पुंबा

प्रचेतस 12/10/2017 - 11:04
मला ते ८/१० वेळा पुस्तक प्रदर्शनांत दिसलेले, पण त्यांचे एकही पुस्तक मी वाचलेले नसल्याने मी त्यांच्याशी बोलायला धजू शकलो नाही,

In reply to by सतिश गावडे

पगला गजोधर 12/10/2017 - 13:50
च्याय्ला पूर्ण लेख वाचून इथपर्यंत प्रतिक्रिया वाचेपर्यंत, मनात , "अच्युत गोडबोले" ??? असं विचारावं ... असं ठरवलेलं .. पण श्या ...

दाह 12/10/2017 - 10:30
आठेक वर्षांपूर्वी माझ्यासोबत पण असाच किस्सा घडलेला. फक्त व्यक्ती लेखक नसून इतिहासकार होती. महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असामी. आमच्या परिचयातील एकांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला जिथे हे प्रमुख वक्ते म्हणून आलेले होते. इतकं वय होऊनही त्यांच्या भाषणातील आवेश आणि ओघवती शैली कायम होती. कार्यक्रम संपल्यावर जेवण सुरु झालं आणि तिथं मी त्यांना हातात ताट घेऊन खुर्चीवर बसलेलं पाहिलं. यजमानांची परवानगी घेऊन मी त्यांच्यापाशी गेलो. सर्वप्रथम वंदन केलं. आणि खुर्ची घेऊन शेजारी बसलो. हे निर्विकार चेहऱ्यानी जेवत होते. त्यांना काही इतिहासाबद्दल , महाराजांबद्दल शंका , प्रश्न विचारले तर "हं"आणि "नाही" च्या पलीकडे काही उत्तर नाहीच. बरं प्रश्न काही अगदीच बाळबोध नव्हते.पण महाशय काहीच बोलेनात. भाषणात त्यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केलेला. त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला अजून काही करता येईल का असं विचारलं तर "कर तुला काय करायचंय ते" इतकं एक वाक्य कसंबसं जुलमाचा रामराम केल्यागत बाहेर पडलं. नंतर काहीतरी प्रश्न विचारतील, निदान तू काय करतोस काय शिकतोस हे तरी विचारतील अशा अपेक्षेने पाच मिनिट बसून राहिलो पण इतिहासकार मेन्यूमध्ये भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी यासारखे मराठमोळे पदार्थ ठेवल्याबद्दल यजमानांचं कौतुक करण्यात गुंग झाले आणि मी तसाच उठून निघून आलो.

In reply to by दाह

हवालदार 13/10/2017 - 15:27
तूम्ही जेवायला बसल्यावर तुमच्या बाजूला कोणी तीर्हईत व्यक्ती येवून तुमच्याशी गप्पा मारू लागली तर तुम्हाला चालते का? तेही दररोज वेगळी व्यक्ती?

कपिलमुनी 12/10/2017 - 10:59
कोणत्याही अनोळखी प्रसिद्ध किंवा सामान्य माणसाशी बोलताना पूर्वपरवानगी घ्यावी , त्यांना वेळ आहे का ? आपण ५ मिनिट बोलू शकतो का ? असे विचारूनच बोलावे. आपल्याकडे हा कॉमन सेन्स सार्वजनिकरीत्या खूप कमी आहे. ( कदाचित इतिहासकारांना कडाडून भूक लागली असावी आणि तुमचा जेवणात व्यत्यय होत असावा! ह. घ्या. )

In reply to by कपिलमुनी

दाह 12/10/2017 - 11:06
हं विचारायला हवं होतं खरं. तसं आयोजकांना (जे आमच्याच नात्यातील एक होते) आधी चारपाचदा विचारलेलं नक्की जाऊ का म्हणून. त्यांनी बिनधास्त जा म्हणून सांगितलं. जेवणानंतर ते तडक निघणार असल्याने हीच संधी आहे असंही त्यांनी सांगितलं.

मित्रहो 12/10/2017 - 11:04
ते माणसावर आणि त्यावेळेच्या पिरिस्थितीवर अवलंबून असावे. कुणी पुस्तक प्रदर्शानात असेल तर तो पुस्तके खपावायचाच प्रयत्न करेल. काही माणासांना दुसऱ्याशी बोलायला आवडत नाही. काही स्वतःत मग्न असतात. मराठीतले एक लेखक माझ्या बायकोला इंग्रजी शिकवायचे आणि तिचे त्यांच्याविषयी कधीही चांगले मत नव्हते. आजही नाही. मी काहीतरी वेगळा आहे असे त्यांना वाटते असे तिचे मत आहे. असेच काहीसे मत माझ्या एका मित्राचे त्याच्या आजोबांविषयी होते. ते कवी होते. याउलट सर्वसामान्य माणसांसारखे वागनारे सुद्धा बरेच बघितले. शेवटी सारी माणसे असतात.

जागु 12/10/2017 - 11:53
प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. कुणाला मी पणा जास्त असतो कोणाला नसतो असो. मी मंगला गोडबोले आणि वीणा गावणकर यांना मेसेज पाठवले होते. त्यांनी मला खुप छान शब्दात रिप्लाय दिले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला माझा.

सुबोध खरे 12/10/2017 - 13:31
माझे अनुभव काही निराळे आहेत. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा आर्यक्रम मुलुंड मध्ये (२०१५) झाला तेंव्हा आम्ही सुरुवातीला त्यांना भेटायला गेलो.त्यांनी आमचे छान हसून स्वागत केले. त्यांना नमस्कार केल्यावर आम्ही तुमचे चाहते आहोत सांगितले. त्यांनी मला विचारले "आप क्या करते हो? मी "लष्करातून रिटायर झालो" आहे असे सांगितल्यावर त्यांनी हसून "आप रिटायर हुए जैसे लगते नही हो" म्हणून सांगितले. माझ्या बायकोने आपला "किरवाणी" राग फार दिवसात ऐकला नाही असे सांगितले. त्यावर ते म्हणाले कि बरोबर आहे १९९७ नंतर मी तो वाजवलेला नाही. काही काळाने कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा त्यांनी प्रस्तावना झाल्यावर सांगितले कि बऱ्याच दिवसात किरवाणी राग वाजवला नाही म्हणून आज मी हा राग वाजवणार आहे. आमच्या "अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू" उभे राहिले. आमच्या सारख्या एका टिनपाट श्रोत्याचे ऐकून एवढा मोठा दिग्गज कलाकार त्यांच्या आवडीचा राग पूर्ण दीड पावणे दोन तास वाजवतो हि आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ( मला रागदारीतील ओ का ठो कळत नाही परंतु ऐकायला मात्र आवडतं आणि मी सलग चार पाच तास असे कार्यक्रम ऐकू शकतो/ ऐकतो ते सुद्धा फेसबुकवर/ इंस्टाग्राम वर स्टेटस न टाकता -- बायको गाणं शिकली आहे तिला थोडं फार समजत असावं.) पंडित विश्वमोहन भट, पंडित विजय घाटे, पंडित सतीश व्यास, पंडित आनंद भाटे अशा अनेक दिग्गज कलाकारांना आम्ही भेटलो आहे. सर्वानी छान हसून व्यवस्थित संभाषण केले. पुलं नि लिहिले आहे कि चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक असावा असे कुठे तरी वाटते

अनिंद्य 12/10/2017 - 13:46
लेखकांचे नाहीत पण चित्रकार मंडळींचे फार चांगले अनुभव आहेत मला. अगदी कमी बोलणाऱ्या बऱ्याच प्रसिद्ध चित्रकारांशी ओळखपाळख नसता छान गप्पा झाल्या आहेत. सतीश गुजराल यांच्याबद्दलचा अनुभव तर हृद्य आणि कायम लक्षात राहील असा आहे. त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांना अजिबात ऐकू येत नाही, पण त्यांनी किरण गुजराल यांच्या मार्फत सुरेख संवाद साधला. न कंटाळता माझे बाळबोध म्हणणे ऐकले (म्हणजे किरणजींनी त्यांना हातवाऱ्याने / लिहून सांगितले). सतीशजींनी त्यांच्या प्रदर्शनात मांडलेली चित्रे आणि म्युरल्सबद्दल उत्साहाने सांगितले.... May be it was my lucky day :-) नाटक-फिल्मी लोकांबद्दल आकर्षण नाही, पण दीपा-श्रीराम लागू, जावेद अख्तर, अमिताभ बच्चन ही मंडळी चाहत्यांशी विनम्रतेने वागतात - वागवतात हे बघितले आहे. मला वाटतं ही वागणूक व्यक्तीसापेक्ष असते. बाकी The best place to meet an author is on the pages of his book ह्याच्याशी सहमत :-)

रेवती 12/10/2017 - 17:17
आपल्याला जरा वाईट वाटल्याचे लेखनातून जाणवते आहे. साहजिक आहे. आजवर मी आवडत्या लेखक, कलाकारांना भेटले नाहीये. तसे वाटलेही नाही त्यामुळे स्वत:चा असा अनुभव नाही. तरीही मैत्रिणीला या त्रासातून जाताना पाहिलेय. ती एका मंडळासाठी बरेच काम करते. वयाने मोठी आहे म्हणून तिचा यातील अनुभवही मोठा आहे. दोन ते तीन राज्यांमध्ये तिचे वास्तव्य झाले आहे व त्या त्या ठिकाणी तिने या मंडळासाठी काम केले आहे. प्रसंगानुरूप अनेक कलाकारांना, लेखकांना, गायकांना आमंत्रित केले जात असते. एका हिंदीत स्थिरावलेल्या मराठी मनुष्याला सपत्निक आमंत्रित केले गेले. राहण्याजेवणाच्या, वास्तव्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या गेल्या. बिझनेस क्लास प्रवास मान्य केला. तरी तो कलाकार व त्याची पत्नी यांनी बराच त्रास दिला. मैत्रिणीची कॉलेजवयीन कन्यका दिमतीला राहीली होती. ती एका दिवसातच वैतागून काम सोडून गेली. मनुष्य शुद्धीत असेल तर बरा वागण्याची शक्यता. नसल्यास नाही. त्याचप्रमाणे आणाखीही एक मराठी कलाकारांचा संच आला असताना अपरात्री पेयपान करून मोठ्याने हसत, गप्पा मारत हॉटेलच्या बाहेर बसून राहणे, विनंती करूनही आपापल्या खोल्यांमध्ये न जाणे वगैरे प्रकार केले आहेत. मग दुसरे दिवशी प्रयोगावेळेस घसे बसणे, झोपा पूर्ण न झाल्याने त्रास होणे वगैरे झाले. एक गायिकाबाई तर ऐन कार्यक्रमावेळेस गाऊच शकल्या नाहीत. काहीवेळा अपघाताने असे होते पण अनेक कलाकार आहेत जे स्वत:चे गळे जपतात व उत्तम कार्यक्रम पार पाडतात. आपल्या देशातील हवामान व दुसर्‍या देशातील हवामानात फरक असतो. थंडी, उन्हाळा हे वेगळे असल्याने त्रास झाल्यास व त्यामुळे प्रयोग व्यवस्थित न झाल्यास जबाबदार कोण? व्यावसायिकता कोठे गेली? मैत्रिणीला फार मनस्ताप झाला. मला वाटतं की लोकांनी यांना भेटायचे टाळावे व लेखक, कलाकारांनी व्यावसायिक मानसिकता ठेवून काम करावे. असे करताना आपण सगळेजण मनुष्यप्राणी असल्याने कधी आनंदाच्या भरात भेटले जाणे हे आपल्याकडून, तर कधी व्यावसायिकतेचे भान सुटणे हे समोरच्याकडून थोडेफार झाल्यास सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पण वर उल्लेखलेल्या प्रसंगात झालेले अपमान, पेयपानाचा खर्च दुसर्‍याच्या माथी मारणे वगैरे खपवून घेतले जाऊ नये. मी येत्या विकांती होणार्‍या एका मराठी नाटकाची तिकिटे काढलियेत. कार्यक्रम नीट होईल अशी आशा आहे. कोणालाही भेटायला वगैरे जाणार नाहीये.

In reply to by रेवती

सुबोध खरे 12/10/2017 - 18:29
आपण म्हणता तसा अनुभव बऱ्याच अनिवासी भारतीयांना आला आहे. आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो हे त्यांच्यावर उपकार करतो असा आव बऱ्याच कलाकारांचा असतो. शिवाय त्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी ते आपल्याला बोलावतात म्हणजे हि त्यांची निकड आपण भागवतो. ते श्रीमंत आहेत आणि भरपूर पैसे मिळवतात मग आम्ही त्यांना भरपूर पैसे मागितला तर काय चूक आहे असाही भाव असतो बरेच कलावंत आणतात. अशा वृत्तीच्या कलाकारांच्या मुळे माझ्या बऱ्याच अनिवासी मित्रांनी मनस्ताप झाल्याचे बोलून दाखवले आहे. अर्थात याची दुसरी बाजू सुद्धा आहे म्हणजे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी सुद्धा कलाकारांच्या वाट्यास आली आहेत आपण संयत भाषेत लिहिले आहे तेच मी स्पष्टपणे लिहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 12/10/2017 - 18:51
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी अर्थातच ही बाजूही खरी असणार.

In reply to by रेवती

सुबोध खरे 12/10/2017 - 20:55
हा प्रकार गानसरस्वती श्री किशोरी आमोणकर यांनी सांगितला होता. त्यांच्या मैफिलीत काही लोक बियर पीत गप्पा मारत होते त्यामुळे त्यांनी मैफिल आटोपती घेऊन तेथून रजा घेतली यावर त्यातील काही हुशार लोकांनी हि अमेरिकेची संस्कृती आहे, पॉप शो मध्ये पण असे होते म्हणून मल्लिनाथी पण केली होती. किशोरीताईंनी सांगितले कि संगीत हि माझ्यासाठी ईश्वर पूजा आहे आणि त्यासाठी मी माझे आयुष्य वेचले आहे त्याचा उपमर्द मला कधीही सहन होणार नाही. २०१५ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी हि मैफिलीत आल्यावर आणि गायन संपल्यावर त्यांनी श्रोत्यांना डोके टेकून साष्टांग नमस्कार घातलेला मी स्वतः पाहिलेला आहे. हा मूळ दोन संस्कृतीतील फरक आहे.

In reply to by सुबोध खरे

रेवती 12/10/2017 - 23:28
किशोरीताईंनी जे केले ते बरोबर होते असे वाटते. हा पॉप संगिताचा कार्यक्रम नव्हता आणि आपल्या संगिताच्या मैफिलीबद्दल काहीच माहीत नसणारे हे लोक्स नसावेत. उगीच सारवासारव केली.

सेलिब्रिटी या देखील आपल्यासारख्याच हाडामासाची माणसेच असतात. त्यांना देखील त्यांचे मुड असतात. हे विसरले गेल्याने चाहत्यांना मारहाण सारख्या बातम्या वाचायला मिळतात. मला स्वाक्षरी गोळा करायचा छंद आहे. या निमीत्ताने मी अनेक मान्यवरांना भेटलोय देखील , अगदी काही नामांकितांच्या घरीही गेलेलो आहे. थोडे फार बरे वाईट अनुभव गाठीशी आहेत. यावर धागा लिहावा ईतके मटेरियल आहे, पण उगाच मी अमुक्याला कसे भेटलो, त्यांनी माझे कौतुक कसे केले असे माझीच आरति ओवाळणारा म्हाग्रु छाप धागा होईल, तेव्हा न लिहीणेच बरे.

रेवती 15/10/2017 - 08:36
नाटकाला जाऊन आलो. त्यांनी नाटकाच्या सुरुवातीला व शेवटी फोटू काढणे, सह्या घेणे, पडद्यापाठीमागे भेटणे वगैरे आज होऊ शकणार नाही हे सांगितल्याने कोणी गेले नाही. कार्य्क्रम अर्धा तास उशिराने सुरु झाला. इकडील पब्लिकची ती सवय मोडल्याने काही वेळाने लोकांनी विनाकारण टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. मग चालू केला. सगळे कलाकार फार दमल्याचे समजत होते. ते एका राज्यातून उडून आमच्या राज्यात आले होते, प्रयोग सादर केला, उद्या जर्सी असे करत ६ नोव्हें. पर्यंत दौरा असणार आहे. कार्यक्रमाच्या खर्चाचा बराच हिस्सा पु. ना. गाडगिळांनी उचलल्याने त्यांच्याकडील सोने व हिरे यांच्यात गुंतवणूक केली असता काय मिळेल ही झायरात कलाकारांकरवी करण्यात आली. त्यात एकरकमी २००० डॉ चे सोने खरेदी केले असता सलमान खानला भेटण्याची संधी अशी ऑफर होती. ती कोणाला इच्छा आहे? असे विचारताच एकही हात वर झाला नाही. (बरे झाले! असेच हवे त्या सलमानला!) नाटक चांगले पार पाडले. शेवटी स्टेजवर कलाकारांना बॉस्टन मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. एक दोनजण सोडता बाकी कलाकारांनी पिशव्या उघडून त्यात काय आहे हे लगेच पाहिले त्याची गंमत वाटली.

गामा पैलवान 15/10/2017 - 19:55
उदय,
शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत.
बऱ्याचदा अशी माणसे मराठीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. पूर्वेतिहासाची कसलीशी असुरक्षितता वाटंत असते. अगदी घरकुळाचा पत्ता नसलेलं अनौरस अपत्यसुद्धा आत्मसन्मान असेल तर आपला इतिहास दडवून ठेवंत नसतं. मग अतिप्रसिद्ध व्यक्तींना कसली अडचण आहे? आ.न., -गा.पै.
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात. साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत.

बोली आणि भाषा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

गामा पैलवान 01/10/2017 - 23:47
डॉक्टर सुधीर राजाराम देवरे, लेख ठीकठाक आहे. भाषांचा द्वेषबिष करू नये ते सगळं बरोबरे. मात्र संस्कृतविषयी एक विधान पटलं नाही :
त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली.
विधान पटलं नाही कारण की संस्कृत वाचण्यावर कधीच बंदी नव्हती. संस्कृतच्या विद्वानांनी कुणालाही कसलीही कवाडंबिवाडं बंद केली नाहीत. संस्कृत आजही भारतात अनेक ठिकाणी शिकवली जाते. ती मृतबित अजिबात नाही. माझ्या नित्यपाठात अनेक संस्कृत श्लोक आहेत. मी ते रोज म्हणतो. यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संस्कृत बद्दल सहमती ! आजही बॉलीवुड्, टॉलीवुडचे चित्रपट पहा, खलनायकाला मारताना, हिरोची एन्ट्री होताना, लग्न होताना संस्कृत श्लोकांशिवाय अ‍ॅक्शनमधे मजा येत नाही.

In reply to by गामा पैलवान

उगाचे शिळ्या मेथीच्या भाजीला पाणी मारुन टवटवीत करण्याचे प्रकार चालू असतात.असो. सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by गामा पैलवान

शब्दबम्बाळ 09/10/2017 - 12:05
नाही म्हणजे आम्हालाही शाळेत ३ वर्ष होती शिकायला पण व्यवहारात आजपर्यंत कोणी बोललेली ऐकली नाहीये. याशिवाय बऱ्याच संस्कृतोद्भव भाषा चांगल्या टिकल्या पण संस्कृतच व्यवहारात टिकली नाही याचे कारण ती फक्त काही लोकांपुरती मर्यादित केली गेली हे नव्हते का? पण हे सगळं सोडून एक वेगळा मुद्दा तुमची प्रतिक्रिया वाचून डोक्यात आला.
यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही
भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. तिचे महत्व दोन किंवा अनेक व्यक्तींशी आपले विचार मांडणे शक्य व्हावे यासाठी आहे असे मानले तर "माझ्यासाठी" अशी कुठली भाषा असू शकते का? मुळात व्यक्तीला स्वतःसाठी भाषेची आवश्यकता असते का? जर तुम्हाला मनातल्या मनात एखादा विचार करायचा असेल तर तुम्ही कुठल्यातरी एका भाषेतच करत असाल. जर आपल्याला भाषा शिकवलेच गेली नसती तर आपण विचार कशा पद्धतीने केला असता?? हा प्रश्न अवांतर आहे आणि बरेच कंगोरे असलेला आहे त्यासाठी एक धागा काढेन... :)

पैसा 02/10/2017 - 10:14
लेख आवडला. भाषा आणि बोली यात भांडणे व्हायला राजकारणी आणि राजकारण मुख्यतः कारणीभूत असते. अस्मितेच्या नावावर पेटवून देण्यासाठी भाषा हा अगदी सोपा आणि सोयीचा मुद्दा असतो.

ओरायन 02/10/2017 - 10:53
लेखातील विचार योग्य आहेत. एकंदरीत लेख आवडला. मात्र संस्कृत भाषेविषयी मांडलेले विचार पटले नाहीत. जरी रामायण व महाभारत व अनेक संस्कृत ग्रंथ विपुल प्रमाणात होते/आहेत तरी त्यावेळी असणाऱ्या प्रचलित गोष्टींमुळे समाजाचा मोठा घटक तिकडे जात नव्हता. त्याना कोणी बंदी केलेली नव्हती. 'आपले ते काम नव्हे ' ह्या समाजरूढीत हा वर्ग अडकलेला होता. आता आज सुद्धा संस्कृत आपण स्वतःहून केवळ मंत्र , पूजा ह्यासाठी सिमित केली आहे. जर्मन/जपानी/संस्कृत असे तीन वेगवेगळे पर्याय ठेवले तर किती जण संस्कृतला हो म्हणतील ? ते म्हणणार नाहीत कारण त्याचा उपयोग काय ? असा 'पारंपरिक' विचार बहुसंख्य करतील. मात्र संस्कृत भाषा मृत नाही. उलट आंतरजालामुळे त्याला 'बढावा ' मिळाला आहे. आज मीपण काही संस्कृत समूहांचा एक सदस्य आहे. शाळेत असतांना जेवढी माहिती मिळत नव्हती तेवढी संस्कृत भाषेविषयी माहिती मिळत आहे. तिचे प्रमाण पण एवढे आहे कि ग्रहणशक्ती कमी पडत आहे. आता बोला ?

बोलीबद्द्ल~ मी माझा हिमाचली मित्र आणी एक राजस्थानी मित्र आम्ही गप्पा मारतांना राजस्थानी मित्राने मला ग्लासात दुध घ्यायला लावले. त्यावेळी तो मारवाडीत बोलून गेला " दुध काढ" असं.नंतर तिघांच्या चर्चेतुन निष्कर्ष निघाला की "काढ" हा शब्द मारवाडी, पहाडी ( हिमाचली),आणी मराठी ह्या तिनही भाषेत एकाच अर्थाने वापरला जातो.

गामा पैलवान 09/10/2017 - 12:44
शब्दबम्बाळ,
भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे.
भाषा केवळ संवादाचे साधन नाही. ते ज्ञानवर्धनाचे साधनसुद्धा आहे. मला संस्कृतमधून ज्ञान व भक्ती प्राप्त होत असल्याने माझ्यापुरती तरी ती मृत नाही. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 01/10/2017 - 23:47
डॉक्टर सुधीर राजाराम देवरे, लेख ठीकठाक आहे. भाषांचा द्वेषबिष करू नये ते सगळं बरोबरे. मात्र संस्कृतविषयी एक विधान पटलं नाही :
त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली.
विधान पटलं नाही कारण की संस्कृत वाचण्यावर कधीच बंदी नव्हती. संस्कृतच्या विद्वानांनी कुणालाही कसलीही कवाडंबिवाडं बंद केली नाहीत. संस्कृत आजही भारतात अनेक ठिकाणी शिकवली जाते. ती मृतबित अजिबात नाही. माझ्या नित्यपाठात अनेक संस्कृत श्लोक आहेत. मी ते रोज म्हणतो. यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संस्कृत बद्दल सहमती ! आजही बॉलीवुड्, टॉलीवुडचे चित्रपट पहा, खलनायकाला मारताना, हिरोची एन्ट्री होताना, लग्न होताना संस्कृत श्लोकांशिवाय अ‍ॅक्शनमधे मजा येत नाही.

In reply to by गामा पैलवान

उगाचे शिळ्या मेथीच्या भाजीला पाणी मारुन टवटवीत करण्याचे प्रकार चालू असतात.असो. सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by गामा पैलवान

शब्दबम्बाळ 09/10/2017 - 12:05
नाही म्हणजे आम्हालाही शाळेत ३ वर्ष होती शिकायला पण व्यवहारात आजपर्यंत कोणी बोललेली ऐकली नाहीये. याशिवाय बऱ्याच संस्कृतोद्भव भाषा चांगल्या टिकल्या पण संस्कृतच व्यवहारात टिकली नाही याचे कारण ती फक्त काही लोकांपुरती मर्यादित केली गेली हे नव्हते का? पण हे सगळं सोडून एक वेगळा मुद्दा तुमची प्रतिक्रिया वाचून डोक्यात आला.
यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही
भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. तिचे महत्व दोन किंवा अनेक व्यक्तींशी आपले विचार मांडणे शक्य व्हावे यासाठी आहे असे मानले तर "माझ्यासाठी" अशी कुठली भाषा असू शकते का? मुळात व्यक्तीला स्वतःसाठी भाषेची आवश्यकता असते का? जर तुम्हाला मनातल्या मनात एखादा विचार करायचा असेल तर तुम्ही कुठल्यातरी एका भाषेतच करत असाल. जर आपल्याला भाषा शिकवलेच गेली नसती तर आपण विचार कशा पद्धतीने केला असता?? हा प्रश्न अवांतर आहे आणि बरेच कंगोरे असलेला आहे त्यासाठी एक धागा काढेन... :)

पैसा 02/10/2017 - 10:14
लेख आवडला. भाषा आणि बोली यात भांडणे व्हायला राजकारणी आणि राजकारण मुख्यतः कारणीभूत असते. अस्मितेच्या नावावर पेटवून देण्यासाठी भाषा हा अगदी सोपा आणि सोयीचा मुद्दा असतो.

ओरायन 02/10/2017 - 10:53
लेखातील विचार योग्य आहेत. एकंदरीत लेख आवडला. मात्र संस्कृत भाषेविषयी मांडलेले विचार पटले नाहीत. जरी रामायण व महाभारत व अनेक संस्कृत ग्रंथ विपुल प्रमाणात होते/आहेत तरी त्यावेळी असणाऱ्या प्रचलित गोष्टींमुळे समाजाचा मोठा घटक तिकडे जात नव्हता. त्याना कोणी बंदी केलेली नव्हती. 'आपले ते काम नव्हे ' ह्या समाजरूढीत हा वर्ग अडकलेला होता. आता आज सुद्धा संस्कृत आपण स्वतःहून केवळ मंत्र , पूजा ह्यासाठी सिमित केली आहे. जर्मन/जपानी/संस्कृत असे तीन वेगवेगळे पर्याय ठेवले तर किती जण संस्कृतला हो म्हणतील ? ते म्हणणार नाहीत कारण त्याचा उपयोग काय ? असा 'पारंपरिक' विचार बहुसंख्य करतील. मात्र संस्कृत भाषा मृत नाही. उलट आंतरजालामुळे त्याला 'बढावा ' मिळाला आहे. आज मीपण काही संस्कृत समूहांचा एक सदस्य आहे. शाळेत असतांना जेवढी माहिती मिळत नव्हती तेवढी संस्कृत भाषेविषयी माहिती मिळत आहे. तिचे प्रमाण पण एवढे आहे कि ग्रहणशक्ती कमी पडत आहे. आता बोला ?

बोलीबद्द्ल~ मी माझा हिमाचली मित्र आणी एक राजस्थानी मित्र आम्ही गप्पा मारतांना राजस्थानी मित्राने मला ग्लासात दुध घ्यायला लावले. त्यावेळी तो मारवाडीत बोलून गेला " दुध काढ" असं.नंतर तिघांच्या चर्चेतुन निष्कर्ष निघाला की "काढ" हा शब्द मारवाडी, पहाडी ( हिमाचली),आणी मराठी ह्या तिनही भाषेत एकाच अर्थाने वापरला जातो.

गामा पैलवान 09/10/2017 - 12:44
शब्दबम्बाळ,
भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे.
भाषा केवळ संवादाचे साधन नाही. ते ज्ञानवर्धनाचे साधनसुद्धा आहे. मला संस्कृतमधून ज्ञान व भक्ती प्राप्त होत असल्याने माझ्यापुरती तरी ती मृत नाही. आ.न., -गा.पै.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

बोली आणि भाषा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

प्रिय नर्मदेस

शिव कन्या ·

आनन्दा 24/09/2017 - 09:39
मस्त जमल आहे.. मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं अवांतर आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_

आनन्दा 24/09/2017 - 09:39
मस्त जमल आहे.. मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं अवांतर आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

Night Out...!

प. शी. ·

In reply to by पद्मावति

प. शी. 24/09/2017 - 12:25
धन्यवाद... माझ्या लेखनावर प्रथम प्रतिक्रीया... पुढील भाग लवकरच प्रकाशीत होईल... काही पुर्वअनुमान लावला असेल तर सुचवा. मी प्रयत्न करेल तुम्हास चुकीच ठरवण्याचा... प. शी.

In reply to by दुर्गविहारी

प. शी. 24/09/2017 - 12:30
धन्यवाद... काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा... तुम्हास चुकीच ठरवण्याचा प्रयत्न असेल... पुढील भाग लवकरच... प. शी.

In reply to by प. शी.

पगला गजोधर 27/09/2017 - 13:59
काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा...
विक्रम आणि सुमन पहाटे सुसरोडच्या पॉइंटला भेटायचे ठरवतात, कारण बर्याच वर्ष्यांच्या ताटातुटीनंतर, MS करून विक्रम भारतात परतलेला असतो. कॉलेजच्या दिवसातील, एकत्र CCD च्या टेबलावर मस्त वाफाळता कापचिनो घेण्याचा अनुभव त्यांना परत अनुभवासा वाटतो. रस्त्याच्या दोन्ही टोकांना दोघे समोरासमोर आल्यावर, ला ला ला ...... ला ला .. ला ला ..ला ...... ला ला .. ला....... ला लाला ला करत गळाभेट घेण्यासाठी आसूसलेले असल्याने त्याला आपण बाईक चालवतोय व तिला आपण ऍक्टिवावर आहोत याचे भान राहत नाही. दोघेही सुस्साट वेगाने गाडी दामटवतात .... आणि समोरासमोर टक्कर होते.....

विंटरेस्टींग!! सुमनांची ऍक्टिव्हा आणि विक्रमची बाईक... एवढाच काय तो संदर्भ विचारात घेण्याजोगा वाटला.... बाकी... पुभाप्र! Sandy

किसन शिंदे 26/09/2017 - 14:19
आकाशात चंद्राकडे पाहत बसला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती. रातकिडयांचा आणि दुरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज त्या शांततेत भंग पाडत होता. रस्त्यावरच्या दिव्याचा तांबुस प्रकाश त्यांच्यावर पडत होता.
हे लैच्च टिपिकल वाटले. थोडा प्रयत्न केलात तर यापेक्षा चांगलं लिहू शकाल असं वाटतं.

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 26/09/2017 - 20:07
"चंद्र आकाशाकडे पाहत भुंकत होता, सर्वत्र रस्ता पसरलेला होता, कुत्री आणि रातकिडे तांबूस केसांचा भांग पाडत होते, दिव्यांच्या रडण्याने रस्त्यावर प्रकाश पडत होता." . असे चालेल का किसनमालक?

Nitin Palkar 26/09/2017 - 20:27
सॉलिड अभ्याशेठ. लै ब्येस. कला आहे तुमच्या अंगात.

In reply to by पद्मावति

प. शी. 24/09/2017 - 12:25
धन्यवाद... माझ्या लेखनावर प्रथम प्रतिक्रीया... पुढील भाग लवकरच प्रकाशीत होईल... काही पुर्वअनुमान लावला असेल तर सुचवा. मी प्रयत्न करेल तुम्हास चुकीच ठरवण्याचा... प. शी.

In reply to by दुर्गविहारी

प. शी. 24/09/2017 - 12:30
धन्यवाद... काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा... तुम्हास चुकीच ठरवण्याचा प्रयत्न असेल... पुढील भाग लवकरच... प. शी.

In reply to by प. शी.

पगला गजोधर 27/09/2017 - 13:59
काही पुर्वानुमान लावला असेल तर सुचवा...
विक्रम आणि सुमन पहाटे सुसरोडच्या पॉइंटला भेटायचे ठरवतात, कारण बर्याच वर्ष्यांच्या ताटातुटीनंतर, MS करून विक्रम भारतात परतलेला असतो. कॉलेजच्या दिवसातील, एकत्र CCD च्या टेबलावर मस्त वाफाळता कापचिनो घेण्याचा अनुभव त्यांना परत अनुभवासा वाटतो. रस्त्याच्या दोन्ही टोकांना दोघे समोरासमोर आल्यावर, ला ला ला ...... ला ला .. ला ला ..ला ...... ला ला .. ला....... ला लाला ला करत गळाभेट घेण्यासाठी आसूसलेले असल्याने त्याला आपण बाईक चालवतोय व तिला आपण ऍक्टिवावर आहोत याचे भान राहत नाही. दोघेही सुस्साट वेगाने गाडी दामटवतात .... आणि समोरासमोर टक्कर होते.....

विंटरेस्टींग!! सुमनांची ऍक्टिव्हा आणि विक्रमची बाईक... एवढाच काय तो संदर्भ विचारात घेण्याजोगा वाटला.... बाकी... पुभाप्र! Sandy

किसन शिंदे 26/09/2017 - 14:19
आकाशात चंद्राकडे पाहत बसला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती. रातकिडयांचा आणि दुरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज त्या शांततेत भंग पाडत होता. रस्त्यावरच्या दिव्याचा तांबुस प्रकाश त्यांच्यावर पडत होता.
हे लैच्च टिपिकल वाटले. थोडा प्रयत्न केलात तर यापेक्षा चांगलं लिहू शकाल असं वाटतं.

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 26/09/2017 - 20:07
"चंद्र आकाशाकडे पाहत भुंकत होता, सर्वत्र रस्ता पसरलेला होता, कुत्री आणि रातकिडे तांबूस केसांचा भांग पाडत होते, दिव्यांच्या रडण्याने रस्त्यावर प्रकाश पडत होता." . असे चालेल का किसनमालक?

Nitin Palkar 26/09/2017 - 20:27
सॉलिड अभ्याशेठ. लै ब्येस. कला आहे तुमच्या अंगात.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

चल, घरी चल .....

शिव कन्या ·
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

कंपास पेटी

OBAMA80 ·

पद्मावति 20/09/2017 - 14:32
मस्तच. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. =)) आवडलं खुप.

गामा पैलवान 21/09/2017 - 19:09
ओबामाऐशी, माझी जुनी क्याम्लिनची कंपासपेटी आठवली. मी तिच्यात बेडूक भरून नेत असे. एका गुरुजींना तरी तो रबराचा वाटला. त्यांनी सांगितल्यानुसार मी आज्ञाधारकपणे तो उचलून त्यांच्या टेबलावर ठेवला. तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. चेहरा खाली करून ते त्यास न्याहाळू लागले. मग मी त्याच्या (=बेडकाच्या) विशिष्ट जागी स्पर्श केला. तर तो उड्या मारू लागला. प्रत्येक उडीसरशी मास्तरांचा चेहरा मागे मागे जात राहिला. तिसरी उडी झाल्यावर मीच त्याला पडकून परत कंपासपेटीत बंदिस्त केला. वर्गर एकंच हशा उसळला. मास्तर दयाळू होते म्हणून बरं. नाहीतर माझी रवानगी कुठेतरी झाली असती. आ.न., -गा.पै.

OBAMA80 22/09/2017 - 16:30
@ गामा पैलवान:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्हांला लहानपणी काडेपेटीचे छाप (Match box) गोळा करायची सवय होती. त्यात शाळेत मित्रांबरोबर देवाणघेवाण चालायची. घरच्यांपासून लपविण्यासाठी ते कंपासपेटी ठेवले जायचे. एकदा बाबांनी तातडीने पेन हवे म्हणून कंपास उघडला...आणि मग जी काय आमची हजामत झाली विचारू नका. त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मनिमौ 25/09/2017 - 09:51
छान लिहीले आहे. लंपास मधे वेळापत्रक मानावे आणी ते टिकावे म्हणून आम्ही मैत्रीणी जरा जाडसर कागद मिळवायला बघायचो. त्यांची आठवण आली. पाचवीत गेल्यावर माॅर्डन च्या दुकानात चायना पेन आणी नवीन कंपास सहट आाठी णी आईची बोलणी पण आठवली.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 25/09/2017 - 17:57
माॅर्डन च्या दुकानात चायना पेन
हे अस्सल सोलापूरकर बघा. कीतीही वेळा सांगा आम्हाला ते मॉर्डन नाही मॉडर्न आहे. आम्ही एकच सांगणार" तेच बे, तेच की ते कामतसमोरले मॉर्डन."

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 25/09/2017 - 18:28
सोलापुरीवर कोल्हापुरी : ते मॉर्डनच आहे. लंडनला कधी गेला नाहीत वाटतं? बघा इथे मॉर्डन आहे : https://en.wikipedia.org/wiki/Morden -गा.पै.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 29/09/2017 - 01:07
अभ्या बे, आमच्या काळात मॉडर्न पार्कच्या चार पुतळ्या समोर होते. आता तिथे कार चे शोरूम आहे. एक वेळ काळजापूर मारुतीचे मंदिर उघडे मिळेल पण मॉडर्न फार कमी वेळ उघडे असायचे. :)

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 29/09/2017 - 01:22
राघवा ती कारची शोरूम जागा पैल्यापासून तशीच होती, मॉडर्न ची जागा सिटी पार्क हॉटेलची झाली. कशी ताब्यात घेतली ती वेगळी स्टोरी. ;)

चौथा कोनाडा 28/09/2017 - 21:28
सुंदर नॉस्टेल्जिक लेख ! पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, शाईचे पेन, त्याच्या निब इ. गोष्टींचा आपल्या संसारात शाईचा उल्लेख वाचून मला डायरेक्ट माझ्या कंपास पेटीचा वास यायला लागलाय ! गेले ते दिन गेले !

पद्मावति 20/09/2017 - 14:32
मस्तच. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. =)) आवडलं खुप.

गामा पैलवान 21/09/2017 - 19:09
ओबामाऐशी, माझी जुनी क्याम्लिनची कंपासपेटी आठवली. मी तिच्यात बेडूक भरून नेत असे. एका गुरुजींना तरी तो रबराचा वाटला. त्यांनी सांगितल्यानुसार मी आज्ञाधारकपणे तो उचलून त्यांच्या टेबलावर ठेवला. तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. चेहरा खाली करून ते त्यास न्याहाळू लागले. मग मी त्याच्या (=बेडकाच्या) विशिष्ट जागी स्पर्श केला. तर तो उड्या मारू लागला. प्रत्येक उडीसरशी मास्तरांचा चेहरा मागे मागे जात राहिला. तिसरी उडी झाल्यावर मीच त्याला पडकून परत कंपासपेटीत बंदिस्त केला. वर्गर एकंच हशा उसळला. मास्तर दयाळू होते म्हणून बरं. नाहीतर माझी रवानगी कुठेतरी झाली असती. आ.न., -गा.पै.

OBAMA80 22/09/2017 - 16:30
@ गामा पैलवान:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्हांला लहानपणी काडेपेटीचे छाप (Match box) गोळा करायची सवय होती. त्यात शाळेत मित्रांबरोबर देवाणघेवाण चालायची. घरच्यांपासून लपविण्यासाठी ते कंपासपेटी ठेवले जायचे. एकदा बाबांनी तातडीने पेन हवे म्हणून कंपास उघडला...आणि मग जी काय आमची हजामत झाली विचारू नका. त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मनिमौ 25/09/2017 - 09:51
छान लिहीले आहे. लंपास मधे वेळापत्रक मानावे आणी ते टिकावे म्हणून आम्ही मैत्रीणी जरा जाडसर कागद मिळवायला बघायचो. त्यांची आठवण आली. पाचवीत गेल्यावर माॅर्डन च्या दुकानात चायना पेन आणी नवीन कंपास सहट आाठी णी आईची बोलणी पण आठवली.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 25/09/2017 - 17:57
माॅर्डन च्या दुकानात चायना पेन
हे अस्सल सोलापूरकर बघा. कीतीही वेळा सांगा आम्हाला ते मॉर्डन नाही मॉडर्न आहे. आम्ही एकच सांगणार" तेच बे, तेच की ते कामतसमोरले मॉर्डन."

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 25/09/2017 - 18:28
सोलापुरीवर कोल्हापुरी : ते मॉर्डनच आहे. लंडनला कधी गेला नाहीत वाटतं? बघा इथे मॉर्डन आहे : https://en.wikipedia.org/wiki/Morden -गा.पै.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 29/09/2017 - 01:07
अभ्या बे, आमच्या काळात मॉडर्न पार्कच्या चार पुतळ्या समोर होते. आता तिथे कार चे शोरूम आहे. एक वेळ काळजापूर मारुतीचे मंदिर उघडे मिळेल पण मॉडर्न फार कमी वेळ उघडे असायचे. :)

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 29/09/2017 - 01:22
राघवा ती कारची शोरूम जागा पैल्यापासून तशीच होती, मॉडर्न ची जागा सिटी पार्क हॉटेलची झाली. कशी ताब्यात घेतली ती वेगळी स्टोरी. ;)

चौथा कोनाडा 28/09/2017 - 21:28
सुंदर नॉस्टेल्जिक लेख ! पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, शाईचे पेन, त्याच्या निब इ. गोष्टींचा आपल्या संसारात शाईचा उल्लेख वाचून मला डायरेक्ट माझ्या कंपास पेटीचा वास यायला लागलाय ! गेले ते दिन गेले !

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

कुलुप

RDK ·

एस 20/09/2017 - 00:23
कथा चांगली आहे. विनाकारण झालेले क्षुल्लक गैरसमज परस्परांच्या नात्यात किती मोठी दरी निर्माण करू शकतात हे छान उलगडून दाखवलंय.

एस 20/09/2017 - 00:23
कथा चांगली आहे. विनाकारण झालेले क्षुल्लक गैरसमज परस्परांच्या नात्यात किती मोठी दरी निर्माण करू शकतात हे छान उलगडून दाखवलंय.
लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती. स्टेशन गेट जवळ उसाच्या रसाचे दूकान लोकांचा गळा थंड करत होते. शाळेतुन येणारी काही मुले बंगल्यांच्या बाहेर, झाडावरुन पडलेले बादाम दगड़ाने फोडुन खात होती. तेवढ्यात एक गाडी गेटजवळ येऊन थांबली. मालगाड़ी जात होती. स्टेशन गेट लावलेले होते.

प्रिय घरास

शिव कन्या ·
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

बाबा-बुवांचे सामाजिक काम

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

रामपुरी 15/09/2017 - 21:47
" पण समजा हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तरी ज्याअर्थी हिंदू चोरांची बाजू आपण घेत नाही, ज्याअर्थी हिंदू खुन्यांची बाजू आपण घेत नाही त्याअर्थी केवळ हिंदू धर्मातले आहेत म्हणून बलात्कारी बाबांची बाजू आपण का घ्यावी?" हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तर ते चूक आहे हे पण मान्य करायला हरकत नसावी. ज्याअर्थी फक्त हिंदू चोर पकडले जात नाहीत, ज्याअर्थी फक्त हिंदू खुनी पकडले जात नाहीत त्याअर्थी फक्त हिंदू बाबांच पकडले जाणे हे अन्याय्य नाही काय?

Ram ram 17/09/2017 - 09:10
सुधीरजींशी 10000000000 वेळा सहमत, मी कोणतेही धार्मिक काम, मठ मंदिरांना देणगी देत नाही. मला कोणताही धर्म परिपूर्ण वाटत नाही मी नास्तिक असुन नाईलाजाने जाती धर्माचे लेबल वागवतोय. इथे काही लोक आपला तो बाब्या या न्यायाने वागत आहेत.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

आनन्दा 17/09/2017 - 09:52
मुळात ३ वेळा तलाक झाल्यावर कर्मधर्मसंयोगाने जर त्याच शोहरशी पाट लावायची वेळ आली तर ज्या धर्मात धर्मगुरुकडे जाऊन स्त्रीला शुद्ध व्हावे लागते, त्या धर्मातील धर्मगुरूंवर तुम्ही लैंगिक शोषणाचे आरोप कश्याच्या आधारावर करताय?

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 19/09/2017 - 10:40
http://indiatoday.intoday.in/story/nikah-halala-islamic-scholars-one-night-stand-divorced-muslim-women-marriage/1/1027212.html आनंदराव वरचा दुवा पाहून घ्या. धर्माच्या आड स्त्रियांचे आर्थिक मानसिक आणि लैंगिक शोषण कसे होते ते.

गामा पैलवान 17/09/2017 - 14:45
डॉक्टर सुधीर राजाराम देवरे, देवभोळेपणाच्या अंधश्रध्देवर चालणारा भारतातला सर्वात मोठा मॉल म्हणजे क्याथलिक चर्च होय. भारत सरकारच्या खालोखाल सर्वात जास्त जमीन क्याथलिक चर्चच्या मालकीची आहे. देवाची सेवा करतांना जमीन कशाला पाहिजे त्यांना? केरळातल्या मुरिंगूर नावाच्या ठिकाणी डिव्हाईन रीट्रीत सेंटर आहे. तिथे १९९१ पासून सुमारे १००० लोकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. आसारामबापूंच्या नसलेल्या बलात्कारावर दुथडी भरून वृत्ते देणाऱ्या वृत्तवेश्या चर्चच्या बाबतीत आपली थोबाडं का उचकटत नाहीत, ते आम्हाला माहितीये. तुमच्यांत हिंमत असेल तर चर्चवर लेख लिहून दाखवा. 'असंतांचे संत' प्रकरण माहितीये ना? आ.न., -गा.पै.

Duishen 18/09/2017 - 00:09
नरहर कुरुंदकर सरांचा १० वी चा धडा आठवला... "बुवाबाजी आणि समाज"! प्रगती पेक्षा अधोगती जास्त झाली असे म्हणावे की अधोगती आहे तेव्हडीच आहे पण ती अधोगती प्रकाशात येण्याचे प्रमाण वाढले असे म्हणावे...!!!

रामपुरी 15/09/2017 - 21:47
" पण समजा हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तरी ज्याअर्थी हिंदू चोरांची बाजू आपण घेत नाही, ज्याअर्थी हिंदू खुन्यांची बाजू आपण घेत नाही त्याअर्थी केवळ हिंदू धर्मातले आहेत म्हणून बलात्कारी बाबांची बाजू आपण का घ्यावी?" हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तर ते चूक आहे हे पण मान्य करायला हरकत नसावी. ज्याअर्थी फक्त हिंदू चोर पकडले जात नाहीत, ज्याअर्थी फक्त हिंदू खुनी पकडले जात नाहीत त्याअर्थी फक्त हिंदू बाबांच पकडले जाणे हे अन्याय्य नाही काय?

Ram ram 17/09/2017 - 09:10
सुधीरजींशी 10000000000 वेळा सहमत, मी कोणतेही धार्मिक काम, मठ मंदिरांना देणगी देत नाही. मला कोणताही धर्म परिपूर्ण वाटत नाही मी नास्तिक असुन नाईलाजाने जाती धर्माचे लेबल वागवतोय. इथे काही लोक आपला तो बाब्या या न्यायाने वागत आहेत.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

आनन्दा 17/09/2017 - 09:52
मुळात ३ वेळा तलाक झाल्यावर कर्मधर्मसंयोगाने जर त्याच शोहरशी पाट लावायची वेळ आली तर ज्या धर्मात धर्मगुरुकडे जाऊन स्त्रीला शुद्ध व्हावे लागते, त्या धर्मातील धर्मगुरूंवर तुम्ही लैंगिक शोषणाचे आरोप कश्याच्या आधारावर करताय?

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 19/09/2017 - 10:40
http://indiatoday.intoday.in/story/nikah-halala-islamic-scholars-one-night-stand-divorced-muslim-women-marriage/1/1027212.html आनंदराव वरचा दुवा पाहून घ्या. धर्माच्या आड स्त्रियांचे आर्थिक मानसिक आणि लैंगिक शोषण कसे होते ते.

गामा पैलवान 17/09/2017 - 14:45
डॉक्टर सुधीर राजाराम देवरे, देवभोळेपणाच्या अंधश्रध्देवर चालणारा भारतातला सर्वात मोठा मॉल म्हणजे क्याथलिक चर्च होय. भारत सरकारच्या खालोखाल सर्वात जास्त जमीन क्याथलिक चर्चच्या मालकीची आहे. देवाची सेवा करतांना जमीन कशाला पाहिजे त्यांना? केरळातल्या मुरिंगूर नावाच्या ठिकाणी डिव्हाईन रीट्रीत सेंटर आहे. तिथे १९९१ पासून सुमारे १००० लोकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. आसारामबापूंच्या नसलेल्या बलात्कारावर दुथडी भरून वृत्ते देणाऱ्या वृत्तवेश्या चर्चच्या बाबतीत आपली थोबाडं का उचकटत नाहीत, ते आम्हाला माहितीये. तुमच्यांत हिंमत असेल तर चर्चवर लेख लिहून दाखवा. 'असंतांचे संत' प्रकरण माहितीये ना? आ.न., -गा.पै.

Duishen 18/09/2017 - 00:09
नरहर कुरुंदकर सरांचा १० वी चा धडा आठवला... "बुवाबाजी आणि समाज"! प्रगती पेक्षा अधोगती जास्त झाली असे म्हणावे की अधोगती आहे तेव्हडीच आहे पण ती अधोगती प्रकाशात येण्याचे प्रमाण वाढले असे म्हणावे...!!!
- डॉ. सुधीर रा. देवरे भारतात बाबा-बुवांचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. अलिकडे खाजगीत एक चावळ सुरू झालीय की म्हणे हिंदु धर्माच्या बुवांनाच टारगेट केलं जातं. म्हणून इथं एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल की हे बुवा सगळ्याच धर्मात आहेत आणि आपली स्वार्थिक बजबजपुरी त्यांनी आपापल्या धर्मात प्रचारून आपली दुकाने यथास्थित सुरू ठेवलीत.