मांडवाखालून !!

लेखनविषय:
लेखनप्रकार
हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला... तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस." पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर." "झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय." "बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?" "म्हणजे?" "म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?" "अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते" "बरं बघ हं, माझ्या भाचीसाठी..म्हणजे मोठी बहीण आहे कनई तिच्या मुलीसाठी स्थळ शोधणं चाललंय.

टबुडी टबुडी जसवंती

लेखनविषय:
लेखनप्रकार
गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.

स्वप्नातला सचिन

लेखनविषय:
संध्याकाळची वेळ असते. सगळीकडे धावपळ चाललेली असते. कुणीतरी "खास" देवमाणूस घरी येणार असतं. अगदी मोजकीच लोकांना आमंत्रण दिलेला असत मी. सगळी तयारी जोरात सुरु असते. कुणी फुलांची सजावट करतंय कुणी पायघड्या टाकतंय. सगळे जण आतुरतेने वाट बघताय कि निमंत्रित व्यक्ती कधी येतेय. वेळ जाता जात नसतो. आम्ही आपले गच्चीवर जाउन कुणी येतंय का ह्याची चाहूल घेत असतो. आणि शेवटी । शेवटी म्हणण्यापेक्षा नेहमीसारखा PUNCTUALLY ती व्यक्ती वेळेपेक्षा आधी उपस्थित होते. बरोबर हर्षा (भोगल्यान्चा) पण असतो. गप्पा होतात. बाकी सगळी लोक फोटो काढता, सही घेतात.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखनविषय:
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखनप्रकार
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

गृहिणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
गृहिणी गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्याबाळालातीट लावू दे. गृहिणी गृहिणी दार उघड थांब माझ्या बाळ झोपवू दे. चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल! कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते. घरातल्या लोकांच्या काळजीपोटी ही बिचारी झोपते न झोपते, तिचा डोळा लागतो ना लागतो, तोच फटफटीत सकाळ उजाडते.

अर्धांग

नोकरीने शोषलेले, प्रवासाने शिणलेले ते आमचे अर्धांग, न्याहाळत असतो मी, पैलतीरावरुन ! अधुन मधुन ओळख दाखवतं, सटीसहामाशी, कधी वाट्याला येतं चिपाड बनून! तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत शोधू लागतो मी काजळमाया आणि शुष्क ओठांतली उरली सुरली थरथर प्रयत्न करुन! मग जाणवतात यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे एक उरकून टाकण्याची भावना बहुतकरुन!

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

मनरक्षिता (३)

लेखनविषय:
लेखनप्रकार
मनरक्षिता (१) मनरक्षिता (२) सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली. मास्तर अजून शाळेत आला नव्हता ! तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!! ‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली. चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा ! चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या.

मनरक्षिता (२)

लेखनविषय:
लेखनप्रकार
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.
Subscribe to रेखाटन