मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

कोलबेर ·

नंदन 24/10/2007 - 11:05
वेगळ्या विषयावरील लेख आवडला. राजकारणाच्या बुद्धिबळात चौसष्ट घरांपेक्षा अधिक घरे असतात आणि कुठलेही प्यादे कसेही चालू शकते, असे मागे कास्पारोव्हच म्हणाल्याचे आठवते. ही जाण असलेला कास्पारोव्ह यशस्वी व्हावा असं वाटतं. अर्थात, हे यश केवळ पुतीनला पदच्युत करुन सत्ता संपादणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसावे, तर एकंदरीतच रशियात आणि सभोवतीच्या लहान राष्ट्रांत लोकशाही स्थापन व्हावी या व्यापक अर्थाने असावे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

गुंडोपंत 24/10/2007 - 11:32
बापरे! काय हे भयंकर लोक आहेत! इतके खतरनाक रशियन लोक त्यात ते भुके कंगाल... शिवाय त्यांच्या कडे ते अणु तंत्रज्ञान! आणी तेही ते असे रस्त्यावर विकायला बसल्यासारखेच बसले आहेत बरंका. शिवाय त्यांनी आजवरच्या इतिहासात दाखवूनही दिलय... की ते तेला साठी काहीही करू शकतात. त्यांनीच का तो मधे हल्ला केला होता आफ्रिकेवर...? जाऊ दे त्या देशाचे काय इतके... एक फालतू देश! आणी मध्य पुर्वेचे.. ? इस्राएल व्हायला त्यांनीच मदत केली की काय? ते स्मार्ट बाँब वगैरे चे नका हो सांगु मला... रशियाकडे कुठे तंत्रज्ञान आहे? ते फक्त अमेरिकाच दाखवोन देणार अफगाणीस्तानात . व्हिएतनाम? नाव नका काढू... आमच्या निरपराध सैनिकांवर इतके अत्याचार केले त्यांनी... बायोलॉजीकल वेपन्स? छे छे!!! हे सगळे आम्हाला करावे लागले हो... अहो रशियाचे भूत होते ना मागे... कुणी विकले? सद्दामला... आम्ही...? काय खोटे बोलताय... इराणलाही...? वॉटरगेट? आता बाकी हद्द झाली बरका खोटेपणाची! अणुबाँब... मानवतेला काळीमा? अहो काय बोलताय... जगाला वाचवण्यासाठी एक चारपाच लाख लोक मेले तर काय बिघडले? काय म्हणता.. इराक मध्ये तितकेचे मेले? अहो जगात अराजक माजेल अराजक! आम्ही जगाला वाचवण्यासाठी काही तरी करतो आहोत. त्यात काही लोक मेले... तर इतके काय? आणी जरासे तेल आम्हाला मिळाले तर काय झाले इतके दुखायला पोटात? काय म्हणता, असे वर्ष गेले नाही की ज्या वर्षी अमेरीकेने युद्ध केले नाही? छे छे धादांत खोटे बोलता तुंम्ही... आम्ही अतिशय शांततावादी देश आहोत. लवकरात लवकर जगाला वाचवलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. आम्ही मागेही क्युबाला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण काय करणार? आणी तो व्हेनेझुएलाचा व्ह्युगो... अहो त्यांना कळत नाही... त्यांचा देश त्यांनी आम्हाला चालवायला एकदा दीला की त्यांची... वाट लागेल...?? काहीतरीच काय बोलता? युद्धखोर तो रशिया आणी इराण! त्यांनी युद्धच केले नाही गेल्या पाच वर्षात? अहो तयारी करतायेत ते तयारी !!! जग जाणार युद्धाच्या खाईत... धिस इज टू मच. इन गॉड वुई ट्र्स्ट! इन द नेम ऑफ गॉड या इव्हील एक्सेस ला गाडा काय म्हणात निधर्मी आम्हीआम्ही तेच म्हणतोय हो... एकदा जगात फक्त एकच धर्म शिल्लक उरला की निधर्मीवाद अतिशय एफेक्टीव्हली राबवता येईल... आमच्या चर्च मध्ये या ना एकदा चर्चा करू या यावर. अरेरे... तुमचा अगदीच बुद्धीभ्रम झालाय हो... तुम्हाला मदतीची गरज आहे. हे पहा, आमच्या रिसर्च बेस असलेल्या कंपन्या लवकरच तुमच्या देशात येतील त्यांची औषधे... महाग? अहो काय बोलताय काय? जीव वाचवतोय तुमचा आम्ही... चोरलेले ज्ञान? काहीतरीच! आम्ही कधी तुमचेच ज्ञान चोरले? आम्ही ते लिखित स्वरूपात मांडले! त्याला काही चोरी नाही म्हणत! छे! तुमच्या बोलणेच शक्य नाहीये बॉ! कम्युनिस्टांच्या एजंटांना वेचून मारले पाहिजे हेच खरे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 24/10/2007 - 12:34
गुंडोपंत तुमच्या उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप सहज दिसून येत असला तरी काहीसा लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच. लोकशाही ही पद्धती आदर्श असो वा नसो आजच्या घडीला प्रत्येक विकसीत राष्ट्राने (एखाद दुसरा अपवाद वगळता) हीच पद्धती अवलंबली असल्याने ह्याचा प्रगतीशी थेट संबध असावा असे वाटते. त्याचबरोबर साम्यवादावर चालणारी राष्ट्रे ही तुलनेता मागास (नॉर्थ कोरीया, रशिया, २० वर्षापुर्वीचा चीन) असल्याने त्याचा देखिल अधोगतीशी संबध असावा असे म्हणण्यास जागा आहे. माझा साम्यवादाचा अभ्यास नाही पण जॉर्ज ऑरवेलचे 'ऍनीमल फार्म' हे सुंदर पुस्तक वाचल्यावर ही पद्धती 'प्रॅक्टीकल' नाही हे पटले.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 24/10/2007 - 14:40
उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप कोणताही संताप नाही ! फक्त सहजपणे दिसणारा भामटा दुट्टप्पीपणा! लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच. नाही हे ही नाही... लोकशाही ला आजिबात विरोध नाही. आणि या उपहासात माझा सूर तसा दिसत असला तरी कम्युनिझमचे प्रेमही नाही. फक्त अमेरिकन लोकशाहीच किती चांगली आणि फक्त त्याच आणी त्याच विचाराने पुढे जाणे कसे चांगले याला मात्र पूर्ण विरोध! अमेरिकन राजकारणी कोणतेही प्रकरण फक्त त्यांच्याच बाजूने दाखवण्यात वाकबगार आहेत. त्यासाठी ते अमाप पैसा वेगवेगळ्या कंसल्टंट्सवर खर्च करत असतात. तुझा लेखही मला तरी संपूर्णपणे एकांगी वाटला (व वरचे सुचत गेल!) इराण हे इस्लामी राष्ट्र आहे वगैरे ठीक पण त्यांचा नेता लोकशाही मार्गाने निवडून आलेला आहे हे एक वाक्य या सगळ्यात कसे काय 'विसरले' जाते बॉ? शिवाय अमेरिकेने केलेली युद्धे ही दर वर्षी आहेत. इराणने इराक शिवायचे पाहता कोणते युद्ध केले आहे? इराणला वाटणारी इस्राएल ची भीती मात्र सार्थ आहे. त्यांचे एकुण वर्तन पाहता त्यांच्या जवळपासचा कोणताही देश अशी काळजी घेईलच. मी रशिया किंवा इराणचे समर्थन करत नाहीये. मात्र अमेरिकेची री ओढणेही जमणे शक्य दिसत नाही... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 24/10/2007 - 21:54
गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही. ह्या लेखातील काही वाक्ये पुन्हा देतो आहे. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे. अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले. त्याचबरोबर,आंतरराष्ट्रीय राजकारणावर काहीही लिहताना लेख एकांगी होऊ नये म्हणून आधी अमेरिकेची वारेमाप निंदा नालस्ती दर वेळेला केलीच पाहिजे का?

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:17
गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही. कारण सर्व लेखात एकदोन वाक्ये वगळता अमेरिकेचीच बाजू दिसते आहे. १. त्यात एकाही रशियन वृत्तपत्राचा हवाला नाही. २. एकाही इराणी वृत्तपत्राचा हवाला नाही (फक्त कॉस्पॉरॉव्ह हाच एक मुद्द) ३. रशिया किंवा इराण च्या गतकालीन व आताच्या धोरणांचा उहापोह नाही. ४. (नंतर दिलेल्या) डॉक्युमेंटरी च्या दुव्यातही अमेरिकन नाव दिसते आहे. जर लेख फक्त अमेरिकन माध्यमांवर आधारीत आहे असे दिसते आहे तर तर तसा (अमेरिकावादी) अर्थ काढणे वावगे कसे ठरू शकते? आपला गुंडोपंत

सहज 24/10/2007 - 11:43
रशिया मधे निरोगी लोकशाही वाढो ही सदिच्छा! कास्पारोव्ह सकट अजूनही पर्याय मिळोत. बाकी अंदाधुंद शस्त्रखरेदी विक्रीला सर्वच प्रगत देश व तसेच ते घेणारे पण कारणीभूत आहेत. अमेरिकेनेपण नको त्या लोकांच्या हाती शस्त्र ठेवली आहेत. एखादा देश जेव्हा शस्त्रे निर्यात करतो तेव्हा काही आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील असतो. व बहूतेक सर्व निर्यात ही यूनॉ मान्य देशांनाच योग्य कारणासाठी नियमानुसार होत असते. हे कत्तली, इ. साठी वापरले जातात ती शस्त्रे सर्व खाजगी कंपन्यांकडून येतात ज्यात म्हणे ९८ देश येतात. (वरच्या लिंक मधे तसे लिहले आहे. अजून माहीती मिळाली तर टाकीन. अजून एक संबधीत दुवा बघा)यादी विचाराल तर सर्व देश जिथे भानगडी आहेत ती. (साउथ अफ्रीका, इस्त्राइल, जपान देखील प्रमूख मंडळी आहेत)विकत घेतले जातील असे देशात सर्व प्रगत व प्रमूख देशातील खाजगी कंपन्यांनी टाकली आहेत दुकाने. अफगान-पाकीस्तान सरहद्दीवर तर टपर्‍या आहेत जिथे टायर पंक्चर काढल्यासारखे शस्त्रे देशभग, बनवणे इ. होते. आता एके-४७ ही बंदूक जगात कूठेही बनते (उल्हासनगर मार्केट टाइप). आपल्या देशात इंपोर्टेडचे आकर्षण असले तरी बरीच खाजगी शस्त्रेपण बनतात. हा विषय, आवाका फार वेगळा आहे. बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट

In reply to by सहज

गुंडोपंत 24/10/2007 - 11:58
बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट नायदर मी! अशा प्रकारच्या लेखाला काय म्हणातात हो ? हां "एज्युकेटींग पिपल विथ राईट इन्फॉर्मेशन" सहजरावजराइट म्हणजे का विचारताय? राईट म्हणजे जी आपल्याला राईट असते तीच! ;))) आपला (जगाच्या राजकारणा विषयी जरासा अज्ञ असणारा) गुंडोपंत

In reply to by सहज

कोलबेर 24/10/2007 - 12:42
अहमदेनीजादला न्युक्लिअर रिऍ़क्टर्स आणि अणु तंत्रज्ञान पुरवण्यास हीच युती कार्यशील आहे. आज कट्टर इस्लामवादाचा पुरस्कार करणारे नेतृत्व असलेल्या जगातल्या सगळ्यात ज्वलनशील राष्ट्राला (टेड कॉपेलची डीस्कवरी वरील डॉक्युमेंट्री) न्युक्लिअर तंत्रज्ञान मिळणे मलातरी धोक्याचेच वाटत आहे. अर्थातच अजुन ह्यामध्ये अनेक घडामोडी घडतील हे ही खरे पण सध्या पुरते निदान ही युती 'अभद्र' आहे इतके तरी तुम्ही विकत घेतलेत तेही नसे थोडके ;-)

In reply to by कोलबेर

सहज 24/10/2007 - 13:44
बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट म्हणजे मला म्हणायचे होते की रशिया व इराणची जागतीक शांततेला धोक्यात टाकणारी अभद्र युती झाली आहे हे मी मानत नाही. (लगेच खुश होऊ नकोस :-)) असेच काही पुरावा पाहून बुश, ब्लेयर खूश व समाधानी झाले होते सद्दामकडे अणूबॉम्ब आहे म्हणून, सापडला का? असो मला तु वेगळा विषय हाताळतोयस ह्याचा आनंद आहे. इतकच. :-) आणी इराणच्या अणूबॉम्बची भिती फक्त इस्त्राइलाच :-) व ते तो धोका हाताळायला समर्थ आहेत ;-) बाकी इराणला "जे नको ते" आण्वीक तंत्रज्ञान हे पाकचा अब्दूलकादीर खान, तसेच नॉर्थ कोरीया व ब्लॅक मार्केट मिलीट्री टेक्नोलॉजी व त्या इराणचे स्वतःचे हुशार तंत्रज्ञ यांच्याकडून मिळाले आहे "रशिया देशाकडून नाही" रशिया जे तंत्रज्ञान देते ते रशियाच्या पर्यायाने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नियमतत्वात बसते तसेच. मांडवली तंत्रज्ञान रे. म्हणजे अणूबाँब बनवता येणार नाही व कायम देखरेख असेल असे. रशिया नेहमी अमेरीका, युरोपीयन युनियन यांना आपली ताकद (उपद्रव मूल्य) दाखवायला वाया गेलेल्या मुलासारखी बेजबाबदार गोष्टी करून दाखवत असते किंबहूना तसे धमकावत असते, खरे करायचे नसते. सोव्हीयेत युनीयन मोडल्याला इतकी वर्षे झाली खरोखर रशिया वाईट असती तर एव्हाना सगळ्यांनी अणूबॉम्ब बनवला असता. मी रशियाचे समर्थन करत नाही आहे पण उगाच असे पण बोलणार नाही की रशिया जागतीक शांतता धोक्यात आणेल.

विसोबा खेचर 24/10/2007 - 11:49
रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे. वरूणदेवा, आपण अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे.... गॅरीचा फोटो क्लासच आहे. आम्हीही गॅरी कास्पारावचे निस्सिम भक्त आहोत... आपला, (फ्रेन्च डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 24/10/2007 - 12:57
अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे.... जरूर तात्या.. जिथे जिथे "लोकशाही" तिथे तिथे आम्ही :-) प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!

देवदत्त 24/10/2007 - 14:03
माहितीपुर्ण लेखाबद्द्ल धन्यवाद. माझे ह्यातील ज्ञान कमीच.. वाढवायच्या प्रयत्नात आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

लेख आवडला. बुद्धीजीवी कास्पारोव्ह राजकारणात येतोय आणि लोकशाहीचा समर्थन करतो त्याचा आम्हालाही आनंद आहे. वरुणराव, असेच नवनवीन लिहीत राहा. पण, वरुणराव तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 24/10/2007 - 22:25
तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ? प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे. पण प्रत्यक्षात तिथली जनता मात्र ह्या सरकाराल विटली आहे असे कास्पारोव्ह म्हणाला. खरे खोटे ते रशियन्सच जाणोत.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:25
प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे. १. काही संदर्भ? २. आकडेवारी? ३. आधी व नंतर अशी केलेली तुलना? आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 25/10/2007 - 07:53
१) संदर्भ : पुतिनचे अप्रुव्हल रेटिंग; मिडियावरील निर्बंध २) आकडेवारी: वर दिलेल्या दुव्यावर पुतिनचे अप्रुव्हल रेटींग ८५% आहे. ३) एखाद्या राष्ट्राध्यक्षाचे अप्रुव्हल रेटींग ८५% च्या आसपास असेल तर अशी तुलना करण्याची गरज नाही असे वाटते. तसेही मुद्दा हा सध्याचे पुतिनचे अप्रुव्हल रेटींग तो अतिशय लाडका नेता असल्याचे भासवत आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे असा कास्पारोव्ह चा दावा आहे. तेव्हा आधी व नंतर अशी तुलना कशासाठी हवी आहे?

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 09:30
वा! पहिला संदर्भ योग्य आहे असे वाटते. पत्ता रशियाचा आहे! (मात्र तरीही, रशियन वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अमेरिकेची एफ १८ विमाने अमेरिकेचा अभिमान ही वाक्य खटकून गेले. असो!) दुसरा संदर्भही ठीक आहे. पूर्ण वाचन करायला वेळ मिळाला नाही... (त्यात पुतीनचे जसे मिडिया ऑडीट केले तसे बुश चे ही इराक युद्धाचे करता येईल. मेलेल्या सैनिकांचे कोणतेही प्रक्षेपण करण्यास मनाई वगैरे - असे वाटले तरीही लिंक दिली यात सगळे आले.) असो, एकुण संदर्भासहीत लेख या प्रकाराने गुंडोपंत खुष झाले आहेत. कोणतीच फेकफेकी केलेली नाही. म्हणून मी तुझे कौतुक करतो! तळमळीने लेख लिहिलास शिवाय सर्व शंकांचे वव्यस्थित निराकरण केलेस. त्वरीत प्रतिसाद दिलेस. (माझ्या प्रतिसादात्मक फालतू उपहासाला ही शांतपणे उत्तर दिलेस...) संपादक व्हायला कोलबेरराव लायक आहेत हे वारंवार या सगळ्यातून सिद्धच होते आहे असे वाटते. या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे ते जर निवडणूकीत असतील तर आमचे मत त्यांनाच! :)) आपला आपल्या पुढील लेखाची वाट पाहणारा... गुंडोपंत

चित्रा 24/10/2007 - 20:01
योग्य वेळी लेख लिहीलात. चांगला झाला आहे. कॉन्डी राईस यांचे या विषयातले काय मत तेही लेखात यायला हवे होते असे वाटते, पण लेख हा रशिया आणि इराण युती यावर असल्याने काही जास्त बिघडले नाही. कालच पी. बी एस वर showdown with iran पाहिले. हा दुवा मिळाला बघायला तर नक्की बघा. कास्पारोवचे माहिती नव्हते. अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले. म्हणजेच तो सर्वसाधारण जनमताच्या बाजूने बोलतो आहे असे वाटते आहे.

प्रियाली 25/10/2007 - 02:36
वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या धाटणीचा लेख आवडला. हॉलीवूड चित्रपटांची परीक्षणे, तंत्रज्ञान, प्रवासवर्णन आणि उत्तम प्रकाशचित्रकारी याबद्दल वरूणची ओळख होती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरील या लेखाने ती अधिक वाढली. लेख उत्तम आहे.

धनंजय 25/10/2007 - 04:03
शीतयुद्ध इतके फटदिशी आटपेल अशी त्या काळातल्या अमेरिकन नेतृत्वाला कल्पना नसावी. किंवा कुठलेही युद्ध संपल्यावर डाव कसा खेळावा हा विचार करण्यात अमेरिकन मुत्सद्दी कमजोर असावेत (अलीकडचे उदाहरण इराकयुद्धाचे घ्यावे.) रेगनने शस्त्रास्त्रस्पर्धा हा एकच डाव खेळला नाही, तर त्याने ईश्वरशून्य सोवियतांवर प्रभू-आणि-अल्ला-भक्तांचे अमोघ अस्त्र सोडले. हे खरे म्हणजे गुपीत नाही. कुठल्यातरी लाचार स्थितीत बेनझीर भुत्तोंनी दिलेली मुलाखत मी वाचली, आणि आश्चर्य म्हणजे खुद्द त्यांनीही सांगितले की त्यांच्या पंतप्रधानकीच्या काळात पठाण प्रदेशातल्या मदरशांकडे केवळ सौदी अरबस्तानाचेच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटनमधूनही आर्थिक सहाय्य येत होते. (पुढे कधी या बाबतीत भुत्तोबाईंनी या बाबतीत जीभ सैल सोडली नाही!) त्या वाहत्या धनगंगेत आयएसआय ने तालिबानच्या पिशच्चाचे पोषण केले. याही गोष्टीकडे अमेरिकन मुत्सद्द्यांनी दुर्लक्ष केले. आगदी सप्टेंबर २००१ पर्यंत, अफगाणिस्तानातील उत्तरेच्या तालिबानविरोधी आघाडीचे, कुत्सित किंवा तालिबानशी समसमान उल्लेख मी अमेरिकन वर्तमानपत्रांत वाचत आलो आहे. (तालिबानच्या विजयी अफगाणिस्तान मोहीमेची खबर मठ्ठ अमेरिकन माध्यमांना कंटाळून मी बीबीसी-उर्दूवर समजून घेत होतो!) शीतयुद्ध जिंकल्यावर या धर्मयुद्धभूमीवरचा विस्कळित पसारा नीट समजून घेण्यात अमेरिका कमी पडली, असेच मानावे लागेल. पुढे गोर्बाचेव्ह वि. येल्त्सिन चढाओढीत पितृबुश-क्लिंटनांनी येल्त्सिनना भरभरून मदत केली. आणि येल्त्सिन मावळताना त्यांच्या चुनिंद्या पुतीनना साहाय्य केले. येल्त्सिनच्या काळात रशियाच्या संसदेला क्रमाक्रमाने लुळे करण्यात आले (त्या संसदेत साम्यवाद्यांचे वर्चस्व होते), आणि अध्यक्षाखाली सगळे अधिकार जमवण्यात आले, त्याबद्दल अमेरिकन वर्तमानपत्रांत मी येल्त्सिनांचेच समर्थन केलेले वाचले आहे. बालबुशनी पुतीनांच्या डोळ्यांत त्यांच्या आत्म्याचा वेध घेतला, तेव्हापर्यंत पुतीन रशियाचा एकाधिकारी हुकुमशहा झाले नव्हते - पण त्यांच्या आत्म्यात ती महत्त्वाकांक्षा बघण्यात अमेरिकेचे नेते कमी पडले. या सगळ्यापेक्षा मला याचे आश्चर्य अधिक वाटते की सामान्य सुशिक्षित अमेरिकन माणसाला तालिबानादि कट्टरपंथीयांच्या निर्मितीत रेगनशासनाचा हातभार मुळीच ठाऊक नाही. ते सोडा येल्त्सिन-पुतीनच्या लोकशाहीविरोधी कृत्यांचे अमेरिकेकडून अगदी अलीकडचे समर्थन झालेले आठवत नाही. ही गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नाही. येथील मोठ्या वर्तमानपत्रांच्या (न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टच्या) त्या त्या काळच्या सरकारसमर्थक लेखांचे वाचन आहे. (त्या मानाने सामान्य सुशिक्षित इस्राइली माणसाला पीएलओ विरुद्ध इस्राइलसरकारने हमस ला सबळ केले हे माहीत असते.) आपल्या पूर्वीच्या अदूरदर्शीपणामुळे नुकसान झाले हे न कळणारा अमेरिकन सुशिक्षिताचा अदूरदर्शीपणा म्हणजे मोतिबिंदू झालेल्याला डोळे येणे होय. रशिया-ईरान वगैरेंच्या बाबतीत अमेरिका स्वतःच्या पायावर आणखी कशीकशी कुर्‍हाड घालेल ते सांगणे नाही. अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते, हे गृहीतक जाणून भारताने या बाक्या प्रसंगी परराष्ट्र धोरण ठरवावे.

In reply to by धनंजय

कोलबेर 25/10/2007 - 07:19
निव्वळ तालिबानच नव्हे तर टॉवर्स उडवणारा बिन लादेन आणि पर्यायाने अल कायदा हे देखिल अमेरिकेच्या जोरावरच पुढे आलेले आहेत. अफगाणिस्तानात रशियाला शह देण्यासाठी केलेली ती चाल होती. ही माहिती देखिल गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नसून माझ्या मते सुशिक्षीत अमेरिकन लोकांना माहित असावी. इथल्या टी.व्ही वरच्या चर्चांमध्ये ह्याचा उल्लेख पाहिलेला आहे. त्याच बरोबर इथल्याच डिस्कवरीवर देखिल टेड कॉपेलच्या वर उल्लेखलेल्या'वर्ल्डस मोस्ट डेन्जरस नेशनः इरान' ह्या डॉक्युमेंट्री मध्ये ५० च्या दशकात इराणमध्ये बहरास आलेली लोकशाही सि.आय.ए आणि ब्रिटीश हेरांनी कारस्थाने रचुन आपल्या स्वार्थासाठी उलथुन लावली होती हा संदर्भ देखिल दिला आहे. खोमेनी आणि मुलतत्ववादी चळवळ इराण मध्ये त्यामुळेच सुरू झाली. अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते हे पूर्णपणे मान्य असले तरी त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:30
त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते. वरूणदेवा, हे १०१% सहमत! माओ काय नि स्टालीन काय ही भयानक लोक होते... ते पुढे आले नाहीत हेच बरे झाले. आपला गुंडोपंत

सर्किट 26/10/2007 - 02:23
लेख आवडला. पुटिनचे अनेक विरोधक अचानक विषबाधेने गेल्या वर्षात कसे मेले ह्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवण्याबद्दल अमेरिकेला दूषणे देणारे हे विसरतात की रशियाने अफगाणिस्तानवर स्वतःहूना आक्रमण केले होते. तेव्हा पुटिन स्वतः केजीबीत होते. हेच आक्रमण रशियाने भारतावर केले असते (समजा), तर भारतालाही शस्त्रास्त्रे पुरवली असती अमेरिकेने. खरं की नाही ? गुंडोपंतांची तळमळ समजली (त्यांना वॉटरगेट ऐवजी इराण-कॉण्ट्रा म्हणायचे असावे कदाचित.) सर्व जगात शांती नांदावी ह्याबद्दल कुणालाही तळमळ वाटेलच. अशाच चर्चा येथे व्हाव्यात, ही इच्छा. - सर्किट

गुंडोपंत 26/10/2007 - 05:53
हा व्हिडियो पाहणे महत्वाचे ठरावे यात चार्ली ने व्यक्त केले विचार ५० -६० वर्षांनंतरही तसेच्या तसेच लागू होतात, या सारखे आपले दुर्दैव नाही...! आपला गुंडोपंत

नंदन 24/10/2007 - 11:05
वेगळ्या विषयावरील लेख आवडला. राजकारणाच्या बुद्धिबळात चौसष्ट घरांपेक्षा अधिक घरे असतात आणि कुठलेही प्यादे कसेही चालू शकते, असे मागे कास्पारोव्हच म्हणाल्याचे आठवते. ही जाण असलेला कास्पारोव्ह यशस्वी व्हावा असं वाटतं. अर्थात, हे यश केवळ पुतीनला पदच्युत करुन सत्ता संपादणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसावे, तर एकंदरीतच रशियात आणि सभोवतीच्या लहान राष्ट्रांत लोकशाही स्थापन व्हावी या व्यापक अर्थाने असावे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

गुंडोपंत 24/10/2007 - 11:32
बापरे! काय हे भयंकर लोक आहेत! इतके खतरनाक रशियन लोक त्यात ते भुके कंगाल... शिवाय त्यांच्या कडे ते अणु तंत्रज्ञान! आणी तेही ते असे रस्त्यावर विकायला बसल्यासारखेच बसले आहेत बरंका. शिवाय त्यांनी आजवरच्या इतिहासात दाखवूनही दिलय... की ते तेला साठी काहीही करू शकतात. त्यांनीच का तो मधे हल्ला केला होता आफ्रिकेवर...? जाऊ दे त्या देशाचे काय इतके... एक फालतू देश! आणी मध्य पुर्वेचे.. ? इस्राएल व्हायला त्यांनीच मदत केली की काय? ते स्मार्ट बाँब वगैरे चे नका हो सांगु मला... रशियाकडे कुठे तंत्रज्ञान आहे? ते फक्त अमेरिकाच दाखवोन देणार अफगाणीस्तानात . व्हिएतनाम? नाव नका काढू... आमच्या निरपराध सैनिकांवर इतके अत्याचार केले त्यांनी... बायोलॉजीकल वेपन्स? छे छे!!! हे सगळे आम्हाला करावे लागले हो... अहो रशियाचे भूत होते ना मागे... कुणी विकले? सद्दामला... आम्ही...? काय खोटे बोलताय... इराणलाही...? वॉटरगेट? आता बाकी हद्द झाली बरका खोटेपणाची! अणुबाँब... मानवतेला काळीमा? अहो काय बोलताय... जगाला वाचवण्यासाठी एक चारपाच लाख लोक मेले तर काय बिघडले? काय म्हणता.. इराक मध्ये तितकेचे मेले? अहो जगात अराजक माजेल अराजक! आम्ही जगाला वाचवण्यासाठी काही तरी करतो आहोत. त्यात काही लोक मेले... तर इतके काय? आणी जरासे तेल आम्हाला मिळाले तर काय झाले इतके दुखायला पोटात? काय म्हणता, असे वर्ष गेले नाही की ज्या वर्षी अमेरीकेने युद्ध केले नाही? छे छे धादांत खोटे बोलता तुंम्ही... आम्ही अतिशय शांततावादी देश आहोत. लवकरात लवकर जगाला वाचवलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. आम्ही मागेही क्युबाला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण काय करणार? आणी तो व्हेनेझुएलाचा व्ह्युगो... अहो त्यांना कळत नाही... त्यांचा देश त्यांनी आम्हाला चालवायला एकदा दीला की त्यांची... वाट लागेल...?? काहीतरीच काय बोलता? युद्धखोर तो रशिया आणी इराण! त्यांनी युद्धच केले नाही गेल्या पाच वर्षात? अहो तयारी करतायेत ते तयारी !!! जग जाणार युद्धाच्या खाईत... धिस इज टू मच. इन गॉड वुई ट्र्स्ट! इन द नेम ऑफ गॉड या इव्हील एक्सेस ला गाडा काय म्हणात निधर्मी आम्हीआम्ही तेच म्हणतोय हो... एकदा जगात फक्त एकच धर्म शिल्लक उरला की निधर्मीवाद अतिशय एफेक्टीव्हली राबवता येईल... आमच्या चर्च मध्ये या ना एकदा चर्चा करू या यावर. अरेरे... तुमचा अगदीच बुद्धीभ्रम झालाय हो... तुम्हाला मदतीची गरज आहे. हे पहा, आमच्या रिसर्च बेस असलेल्या कंपन्या लवकरच तुमच्या देशात येतील त्यांची औषधे... महाग? अहो काय बोलताय काय? जीव वाचवतोय तुमचा आम्ही... चोरलेले ज्ञान? काहीतरीच! आम्ही कधी तुमचेच ज्ञान चोरले? आम्ही ते लिखित स्वरूपात मांडले! त्याला काही चोरी नाही म्हणत! छे! तुमच्या बोलणेच शक्य नाहीये बॉ! कम्युनिस्टांच्या एजंटांना वेचून मारले पाहिजे हेच खरे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 24/10/2007 - 12:34
गुंडोपंत तुमच्या उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप सहज दिसून येत असला तरी काहीसा लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच. लोकशाही ही पद्धती आदर्श असो वा नसो आजच्या घडीला प्रत्येक विकसीत राष्ट्राने (एखाद दुसरा अपवाद वगळता) हीच पद्धती अवलंबली असल्याने ह्याचा प्रगतीशी थेट संबध असावा असे वाटते. त्याचबरोबर साम्यवादावर चालणारी राष्ट्रे ही तुलनेता मागास (नॉर्थ कोरीया, रशिया, २० वर्षापुर्वीचा चीन) असल्याने त्याचा देखिल अधोगतीशी संबध असावा असे म्हणण्यास जागा आहे. माझा साम्यवादाचा अभ्यास नाही पण जॉर्ज ऑरवेलचे 'ऍनीमल फार्म' हे सुंदर पुस्तक वाचल्यावर ही पद्धती 'प्रॅक्टीकल' नाही हे पटले.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 24/10/2007 - 14:40
उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप कोणताही संताप नाही ! फक्त सहजपणे दिसणारा भामटा दुट्टप्पीपणा! लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच. नाही हे ही नाही... लोकशाही ला आजिबात विरोध नाही. आणि या उपहासात माझा सूर तसा दिसत असला तरी कम्युनिझमचे प्रेमही नाही. फक्त अमेरिकन लोकशाहीच किती चांगली आणि फक्त त्याच आणी त्याच विचाराने पुढे जाणे कसे चांगले याला मात्र पूर्ण विरोध! अमेरिकन राजकारणी कोणतेही प्रकरण फक्त त्यांच्याच बाजूने दाखवण्यात वाकबगार आहेत. त्यासाठी ते अमाप पैसा वेगवेगळ्या कंसल्टंट्सवर खर्च करत असतात. तुझा लेखही मला तरी संपूर्णपणे एकांगी वाटला (व वरचे सुचत गेल!) इराण हे इस्लामी राष्ट्र आहे वगैरे ठीक पण त्यांचा नेता लोकशाही मार्गाने निवडून आलेला आहे हे एक वाक्य या सगळ्यात कसे काय 'विसरले' जाते बॉ? शिवाय अमेरिकेने केलेली युद्धे ही दर वर्षी आहेत. इराणने इराक शिवायचे पाहता कोणते युद्ध केले आहे? इराणला वाटणारी इस्राएल ची भीती मात्र सार्थ आहे. त्यांचे एकुण वर्तन पाहता त्यांच्या जवळपासचा कोणताही देश अशी काळजी घेईलच. मी रशिया किंवा इराणचे समर्थन करत नाहीये. मात्र अमेरिकेची री ओढणेही जमणे शक्य दिसत नाही... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 24/10/2007 - 21:54
गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही. ह्या लेखातील काही वाक्ये पुन्हा देतो आहे. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे. अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले. त्याचबरोबर,आंतरराष्ट्रीय राजकारणावर काहीही लिहताना लेख एकांगी होऊ नये म्हणून आधी अमेरिकेची वारेमाप निंदा नालस्ती दर वेळेला केलीच पाहिजे का?

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:17
गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही. कारण सर्व लेखात एकदोन वाक्ये वगळता अमेरिकेचीच बाजू दिसते आहे. १. त्यात एकाही रशियन वृत्तपत्राचा हवाला नाही. २. एकाही इराणी वृत्तपत्राचा हवाला नाही (फक्त कॉस्पॉरॉव्ह हाच एक मुद्द) ३. रशिया किंवा इराण च्या गतकालीन व आताच्या धोरणांचा उहापोह नाही. ४. (नंतर दिलेल्या) डॉक्युमेंटरी च्या दुव्यातही अमेरिकन नाव दिसते आहे. जर लेख फक्त अमेरिकन माध्यमांवर आधारीत आहे असे दिसते आहे तर तर तसा (अमेरिकावादी) अर्थ काढणे वावगे कसे ठरू शकते? आपला गुंडोपंत

सहज 24/10/2007 - 11:43
रशिया मधे निरोगी लोकशाही वाढो ही सदिच्छा! कास्पारोव्ह सकट अजूनही पर्याय मिळोत. बाकी अंदाधुंद शस्त्रखरेदी विक्रीला सर्वच प्रगत देश व तसेच ते घेणारे पण कारणीभूत आहेत. अमेरिकेनेपण नको त्या लोकांच्या हाती शस्त्र ठेवली आहेत. एखादा देश जेव्हा शस्त्रे निर्यात करतो तेव्हा काही आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील असतो. व बहूतेक सर्व निर्यात ही यूनॉ मान्य देशांनाच योग्य कारणासाठी नियमानुसार होत असते. हे कत्तली, इ. साठी वापरले जातात ती शस्त्रे सर्व खाजगी कंपन्यांकडून येतात ज्यात म्हणे ९८ देश येतात. (वरच्या लिंक मधे तसे लिहले आहे. अजून माहीती मिळाली तर टाकीन. अजून एक संबधीत दुवा बघा)यादी विचाराल तर सर्व देश जिथे भानगडी आहेत ती. (साउथ अफ्रीका, इस्त्राइल, जपान देखील प्रमूख मंडळी आहेत)विकत घेतले जातील असे देशात सर्व प्रगत व प्रमूख देशातील खाजगी कंपन्यांनी टाकली आहेत दुकाने. अफगान-पाकीस्तान सरहद्दीवर तर टपर्‍या आहेत जिथे टायर पंक्चर काढल्यासारखे शस्त्रे देशभग, बनवणे इ. होते. आता एके-४७ ही बंदूक जगात कूठेही बनते (उल्हासनगर मार्केट टाइप). आपल्या देशात इंपोर्टेडचे आकर्षण असले तरी बरीच खाजगी शस्त्रेपण बनतात. हा विषय, आवाका फार वेगळा आहे. बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट

In reply to by सहज

गुंडोपंत 24/10/2007 - 11:58
बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट नायदर मी! अशा प्रकारच्या लेखाला काय म्हणातात हो ? हां "एज्युकेटींग पिपल विथ राईट इन्फॉर्मेशन" सहजरावजराइट म्हणजे का विचारताय? राईट म्हणजे जी आपल्याला राईट असते तीच! ;))) आपला (जगाच्या राजकारणा विषयी जरासा अज्ञ असणारा) गुंडोपंत

In reply to by सहज

कोलबेर 24/10/2007 - 12:42
अहमदेनीजादला न्युक्लिअर रिऍ़क्टर्स आणि अणु तंत्रज्ञान पुरवण्यास हीच युती कार्यशील आहे. आज कट्टर इस्लामवादाचा पुरस्कार करणारे नेतृत्व असलेल्या जगातल्या सगळ्यात ज्वलनशील राष्ट्राला (टेड कॉपेलची डीस्कवरी वरील डॉक्युमेंट्री) न्युक्लिअर तंत्रज्ञान मिळणे मलातरी धोक्याचेच वाटत आहे. अर्थातच अजुन ह्यामध्ये अनेक घडामोडी घडतील हे ही खरे पण सध्या पुरते निदान ही युती 'अभद्र' आहे इतके तरी तुम्ही विकत घेतलेत तेही नसे थोडके ;-)

In reply to by कोलबेर

सहज 24/10/2007 - 13:44
बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट म्हणजे मला म्हणायचे होते की रशिया व इराणची जागतीक शांततेला धोक्यात टाकणारी अभद्र युती झाली आहे हे मी मानत नाही. (लगेच खुश होऊ नकोस :-)) असेच काही पुरावा पाहून बुश, ब्लेयर खूश व समाधानी झाले होते सद्दामकडे अणूबॉम्ब आहे म्हणून, सापडला का? असो मला तु वेगळा विषय हाताळतोयस ह्याचा आनंद आहे. इतकच. :-) आणी इराणच्या अणूबॉम्बची भिती फक्त इस्त्राइलाच :-) व ते तो धोका हाताळायला समर्थ आहेत ;-) बाकी इराणला "जे नको ते" आण्वीक तंत्रज्ञान हे पाकचा अब्दूलकादीर खान, तसेच नॉर्थ कोरीया व ब्लॅक मार्केट मिलीट्री टेक्नोलॉजी व त्या इराणचे स्वतःचे हुशार तंत्रज्ञ यांच्याकडून मिळाले आहे "रशिया देशाकडून नाही" रशिया जे तंत्रज्ञान देते ते रशियाच्या पर्यायाने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नियमतत्वात बसते तसेच. मांडवली तंत्रज्ञान रे. म्हणजे अणूबाँब बनवता येणार नाही व कायम देखरेख असेल असे. रशिया नेहमी अमेरीका, युरोपीयन युनियन यांना आपली ताकद (उपद्रव मूल्य) दाखवायला वाया गेलेल्या मुलासारखी बेजबाबदार गोष्टी करून दाखवत असते किंबहूना तसे धमकावत असते, खरे करायचे नसते. सोव्हीयेत युनीयन मोडल्याला इतकी वर्षे झाली खरोखर रशिया वाईट असती तर एव्हाना सगळ्यांनी अणूबॉम्ब बनवला असता. मी रशियाचे समर्थन करत नाही आहे पण उगाच असे पण बोलणार नाही की रशिया जागतीक शांतता धोक्यात आणेल.

विसोबा खेचर 24/10/2007 - 11:49
रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे. वरूणदेवा, आपण अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे.... गॅरीचा फोटो क्लासच आहे. आम्हीही गॅरी कास्पारावचे निस्सिम भक्त आहोत... आपला, (फ्रेन्च डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 24/10/2007 - 12:57
अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे.... जरूर तात्या.. जिथे जिथे "लोकशाही" तिथे तिथे आम्ही :-) प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!

देवदत्त 24/10/2007 - 14:03
माहितीपुर्ण लेखाबद्द्ल धन्यवाद. माझे ह्यातील ज्ञान कमीच.. वाढवायच्या प्रयत्नात आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

लेख आवडला. बुद्धीजीवी कास्पारोव्ह राजकारणात येतोय आणि लोकशाहीचा समर्थन करतो त्याचा आम्हालाही आनंद आहे. वरुणराव, असेच नवनवीन लिहीत राहा. पण, वरुणराव तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 24/10/2007 - 22:25
तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ? प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे. पण प्रत्यक्षात तिथली जनता मात्र ह्या सरकाराल विटली आहे असे कास्पारोव्ह म्हणाला. खरे खोटे ते रशियन्सच जाणोत.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:25
प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे. १. काही संदर्भ? २. आकडेवारी? ३. आधी व नंतर अशी केलेली तुलना? आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर 25/10/2007 - 07:53
१) संदर्भ : पुतिनचे अप्रुव्हल रेटिंग; मिडियावरील निर्बंध २) आकडेवारी: वर दिलेल्या दुव्यावर पुतिनचे अप्रुव्हल रेटींग ८५% आहे. ३) एखाद्या राष्ट्राध्यक्षाचे अप्रुव्हल रेटींग ८५% च्या आसपास असेल तर अशी तुलना करण्याची गरज नाही असे वाटते. तसेही मुद्दा हा सध्याचे पुतिनचे अप्रुव्हल रेटींग तो अतिशय लाडका नेता असल्याचे भासवत आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे असा कास्पारोव्ह चा दावा आहे. तेव्हा आधी व नंतर अशी तुलना कशासाठी हवी आहे?

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 09:30
वा! पहिला संदर्भ योग्य आहे असे वाटते. पत्ता रशियाचा आहे! (मात्र तरीही, रशियन वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अमेरिकेची एफ १८ विमाने अमेरिकेचा अभिमान ही वाक्य खटकून गेले. असो!) दुसरा संदर्भही ठीक आहे. पूर्ण वाचन करायला वेळ मिळाला नाही... (त्यात पुतीनचे जसे मिडिया ऑडीट केले तसे बुश चे ही इराक युद्धाचे करता येईल. मेलेल्या सैनिकांचे कोणतेही प्रक्षेपण करण्यास मनाई वगैरे - असे वाटले तरीही लिंक दिली यात सगळे आले.) असो, एकुण संदर्भासहीत लेख या प्रकाराने गुंडोपंत खुष झाले आहेत. कोणतीच फेकफेकी केलेली नाही. म्हणून मी तुझे कौतुक करतो! तळमळीने लेख लिहिलास शिवाय सर्व शंकांचे वव्यस्थित निराकरण केलेस. त्वरीत प्रतिसाद दिलेस. (माझ्या प्रतिसादात्मक फालतू उपहासाला ही शांतपणे उत्तर दिलेस...) संपादक व्हायला कोलबेरराव लायक आहेत हे वारंवार या सगळ्यातून सिद्धच होते आहे असे वाटते. या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे ते जर निवडणूकीत असतील तर आमचे मत त्यांनाच! :)) आपला आपल्या पुढील लेखाची वाट पाहणारा... गुंडोपंत

चित्रा 24/10/2007 - 20:01
योग्य वेळी लेख लिहीलात. चांगला झाला आहे. कॉन्डी राईस यांचे या विषयातले काय मत तेही लेखात यायला हवे होते असे वाटते, पण लेख हा रशिया आणि इराण युती यावर असल्याने काही जास्त बिघडले नाही. कालच पी. बी एस वर showdown with iran पाहिले. हा दुवा मिळाला बघायला तर नक्की बघा. कास्पारोवचे माहिती नव्हते. अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले. म्हणजेच तो सर्वसाधारण जनमताच्या बाजूने बोलतो आहे असे वाटते आहे.

प्रियाली 25/10/2007 - 02:36
वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या धाटणीचा लेख आवडला. हॉलीवूड चित्रपटांची परीक्षणे, तंत्रज्ञान, प्रवासवर्णन आणि उत्तम प्रकाशचित्रकारी याबद्दल वरूणची ओळख होती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरील या लेखाने ती अधिक वाढली. लेख उत्तम आहे.

धनंजय 25/10/2007 - 04:03
शीतयुद्ध इतके फटदिशी आटपेल अशी त्या काळातल्या अमेरिकन नेतृत्वाला कल्पना नसावी. किंवा कुठलेही युद्ध संपल्यावर डाव कसा खेळावा हा विचार करण्यात अमेरिकन मुत्सद्दी कमजोर असावेत (अलीकडचे उदाहरण इराकयुद्धाचे घ्यावे.) रेगनने शस्त्रास्त्रस्पर्धा हा एकच डाव खेळला नाही, तर त्याने ईश्वरशून्य सोवियतांवर प्रभू-आणि-अल्ला-भक्तांचे अमोघ अस्त्र सोडले. हे खरे म्हणजे गुपीत नाही. कुठल्यातरी लाचार स्थितीत बेनझीर भुत्तोंनी दिलेली मुलाखत मी वाचली, आणि आश्चर्य म्हणजे खुद्द त्यांनीही सांगितले की त्यांच्या पंतप्रधानकीच्या काळात पठाण प्रदेशातल्या मदरशांकडे केवळ सौदी अरबस्तानाचेच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटनमधूनही आर्थिक सहाय्य येत होते. (पुढे कधी या बाबतीत भुत्तोबाईंनी या बाबतीत जीभ सैल सोडली नाही!) त्या वाहत्या धनगंगेत आयएसआय ने तालिबानच्या पिशच्चाचे पोषण केले. याही गोष्टीकडे अमेरिकन मुत्सद्द्यांनी दुर्लक्ष केले. आगदी सप्टेंबर २००१ पर्यंत, अफगाणिस्तानातील उत्तरेच्या तालिबानविरोधी आघाडीचे, कुत्सित किंवा तालिबानशी समसमान उल्लेख मी अमेरिकन वर्तमानपत्रांत वाचत आलो आहे. (तालिबानच्या विजयी अफगाणिस्तान मोहीमेची खबर मठ्ठ अमेरिकन माध्यमांना कंटाळून मी बीबीसी-उर्दूवर समजून घेत होतो!) शीतयुद्ध जिंकल्यावर या धर्मयुद्धभूमीवरचा विस्कळित पसारा नीट समजून घेण्यात अमेरिका कमी पडली, असेच मानावे लागेल. पुढे गोर्बाचेव्ह वि. येल्त्सिन चढाओढीत पितृबुश-क्लिंटनांनी येल्त्सिनना भरभरून मदत केली. आणि येल्त्सिन मावळताना त्यांच्या चुनिंद्या पुतीनना साहाय्य केले. येल्त्सिनच्या काळात रशियाच्या संसदेला क्रमाक्रमाने लुळे करण्यात आले (त्या संसदेत साम्यवाद्यांचे वर्चस्व होते), आणि अध्यक्षाखाली सगळे अधिकार जमवण्यात आले, त्याबद्दल अमेरिकन वर्तमानपत्रांत मी येल्त्सिनांचेच समर्थन केलेले वाचले आहे. बालबुशनी पुतीनांच्या डोळ्यांत त्यांच्या आत्म्याचा वेध घेतला, तेव्हापर्यंत पुतीन रशियाचा एकाधिकारी हुकुमशहा झाले नव्हते - पण त्यांच्या आत्म्यात ती महत्त्वाकांक्षा बघण्यात अमेरिकेचे नेते कमी पडले. या सगळ्यापेक्षा मला याचे आश्चर्य अधिक वाटते की सामान्य सुशिक्षित अमेरिकन माणसाला तालिबानादि कट्टरपंथीयांच्या निर्मितीत रेगनशासनाचा हातभार मुळीच ठाऊक नाही. ते सोडा येल्त्सिन-पुतीनच्या लोकशाहीविरोधी कृत्यांचे अमेरिकेकडून अगदी अलीकडचे समर्थन झालेले आठवत नाही. ही गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नाही. येथील मोठ्या वर्तमानपत्रांच्या (न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टच्या) त्या त्या काळच्या सरकारसमर्थक लेखांचे वाचन आहे. (त्या मानाने सामान्य सुशिक्षित इस्राइली माणसाला पीएलओ विरुद्ध इस्राइलसरकारने हमस ला सबळ केले हे माहीत असते.) आपल्या पूर्वीच्या अदूरदर्शीपणामुळे नुकसान झाले हे न कळणारा अमेरिकन सुशिक्षिताचा अदूरदर्शीपणा म्हणजे मोतिबिंदू झालेल्याला डोळे येणे होय. रशिया-ईरान वगैरेंच्या बाबतीत अमेरिका स्वतःच्या पायावर आणखी कशीकशी कुर्‍हाड घालेल ते सांगणे नाही. अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते, हे गृहीतक जाणून भारताने या बाक्या प्रसंगी परराष्ट्र धोरण ठरवावे.

In reply to by धनंजय

कोलबेर 25/10/2007 - 07:19
निव्वळ तालिबानच नव्हे तर टॉवर्स उडवणारा बिन लादेन आणि पर्यायाने अल कायदा हे देखिल अमेरिकेच्या जोरावरच पुढे आलेले आहेत. अफगाणिस्तानात रशियाला शह देण्यासाठी केलेली ती चाल होती. ही माहिती देखिल गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नसून माझ्या मते सुशिक्षीत अमेरिकन लोकांना माहित असावी. इथल्या टी.व्ही वरच्या चर्चांमध्ये ह्याचा उल्लेख पाहिलेला आहे. त्याच बरोबर इथल्याच डिस्कवरीवर देखिल टेड कॉपेलच्या वर उल्लेखलेल्या'वर्ल्डस मोस्ट डेन्जरस नेशनः इरान' ह्या डॉक्युमेंट्री मध्ये ५० च्या दशकात इराणमध्ये बहरास आलेली लोकशाही सि.आय.ए आणि ब्रिटीश हेरांनी कारस्थाने रचुन आपल्या स्वार्थासाठी उलथुन लावली होती हा संदर्भ देखिल दिला आहे. खोमेनी आणि मुलतत्ववादी चळवळ इराण मध्ये त्यामुळेच सुरू झाली. अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते हे पूर्णपणे मान्य असले तरी त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते.

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 25/10/2007 - 07:30
त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते. वरूणदेवा, हे १०१% सहमत! माओ काय नि स्टालीन काय ही भयानक लोक होते... ते पुढे आले नाहीत हेच बरे झाले. आपला गुंडोपंत

सर्किट 26/10/2007 - 02:23
लेख आवडला. पुटिनचे अनेक विरोधक अचानक विषबाधेने गेल्या वर्षात कसे मेले ह्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवण्याबद्दल अमेरिकेला दूषणे देणारे हे विसरतात की रशियाने अफगाणिस्तानवर स्वतःहूना आक्रमण केले होते. तेव्हा पुटिन स्वतः केजीबीत होते. हेच आक्रमण रशियाने भारतावर केले असते (समजा), तर भारतालाही शस्त्रास्त्रे पुरवली असती अमेरिकेने. खरं की नाही ? गुंडोपंतांची तळमळ समजली (त्यांना वॉटरगेट ऐवजी इराण-कॉण्ट्रा म्हणायचे असावे कदाचित.) सर्व जगात शांती नांदावी ह्याबद्दल कुणालाही तळमळ वाटेलच. अशाच चर्चा येथे व्हाव्यात, ही इच्छा. - सर्किट

गुंडोपंत 26/10/2007 - 05:53
हा व्हिडियो पाहणे महत्वाचे ठरावे यात चार्ली ने व्यक्त केले विचार ५० -६० वर्षांनंतरही तसेच्या तसेच लागू होतात, या सारखे आपले दुर्दैव नाही...! आपला गुंडोपंत
ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती.

पॉलीटीकली इनकरेक्ट

विकास ·

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विकास 11/10/2007 - 02:55
यात नेमके काय गैर आहे ते कळले नाही. याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही". याचा अर्थ इतर ठिकाणचा भ्रष्टाचार चालेल...म्हणून म्हणले पॉलितीकली इनकरेक्ट विकास

In reply to by विकास

धनंजय 12/10/2007 - 00:31
त्यांना सैन्यातील भ्रष्टाचाराबद्दलच काही करता येते, म्हणून "आपण काय करणार" असे सांगितले असणार. शिवाय, सैन्याचे कुटुंब म्हणून प्रेम असेल, "आमच्या सैन्यात हे खपवून घेणार नाही", तुम्ही बेशिस्त बिगर-सैन्यवाले, तुमचे तुम्ही पाहून घ्या!

बेसनलाडू 12/10/2007 - 02:38
तीन महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलेले ब्रह्मसत्य आठवले. ते असे - "भ्रष्टाचार हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू नाही. भ्रष्टाचारी समाजव्यवस्थेतही संपन्न भारताचे स्वप्न बघणे आणि ते वास्तवात येणे शक्य आहे. थोडक्यात, भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद." अर्थात यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे. असो. (अवांतर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विकास 12/10/2007 - 02:53
यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे. जातीयवादाबाबतचे विधान बरोबर आणि गंभीरपण आहे. भ्रष्टाचाराबाबत "एका अस्वस्थ दशकाची डायरी" लिहीणारे धर्माधिकारी उपहासाने बघतील/बोलतील कदाचीत पण त्यांच्या नजरेत त्याचे गांभिर्य कमी असेल असे वाटत नाही..

In reply to by विकास

बेसनलाडू 12/10/2007 - 06:39
आपल्या जातीयवाद आणि भ्रष्टाचाराबाबतच्या मताशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू अवांतर - प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात माझा प्रतिसाद अवांतर असल्याने तसे म्हटले. असो. (खुलासेवार)बेसनलाडू

In reply to by विकास

आजानुकर्ण 18/10/2007 - 18:14
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक जबरी आहे. - (वाचक) आजानुकर्ण अविनाशदांची लेखनशैली आवडते बॉ. - (गुणग्राहक) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

सर्किट 12/10/2007 - 11:51
धर्माधिकारींशी सहमत आहे ! ही भूमिका उपहासात्मक नाही. २००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता (स्थळ सान्ता क्लारा लायब्ररी), आणि त्यातही ते हेच म्हणाले होते. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास 12/10/2007 - 16:20
२००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता त्याच सुमारास मी पण बॉस्टनमधे त्यांना भेटलो होतो. (नंतर पुण्यातपण भेट झाली होती). त्यांचा तेंव्हा "आपण त्यांच्या समान व्हावे" हा भाषणाचा संच घेतला होता. शिवाजी, विवेकानंद, शाहू महाराज, म. फुले, आंबेडकर, सावरकर, गांधीजी आणि सर्वात शेवटी एक सर्वसामवेषक प्रत्येकी दोन अशा १६ सीडींचा तो संच होता. खूप चांगली आणि वेगळी माहीती (नुसत्याच नेहेमीच्या गोष्टी नाहीत) त्यात त्यांनी सांगीतली होती.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 15/10/2007 - 09:21
भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद. जातीयवाद आणि भ्रष्टाचार ह्या दोन्ही तुलना न करता येण्याइतक्या भिषण समस्या आहेत. "पैसे खायचे तर खाऊ द्या काम तर करता आहेत ना!" ह्या वृत्तीमुळे भ्रष्टाचाराची तिव्रता कमी न होता उलत वाढते असे मला वाटते. कोणत्याही ठीकाणी साधारण १० टक्के लोक हे जन्मत: अतिभ्रष्ट आणि १० टक्के लोक हे जन्मत:च प्रामाणिक असतात. बाकी ८०%च्या कॉन्शंसला मात्र 'पैसे खाल्ले तर काय झाले, काम तर करतो आहे ना!' हे समर्थन मिळते आणि भ्रष्टाचार बोकाळतो. कोणाकडूनतरी पैसे घेऊन केलेले काम, हे काम न करण्यापेक्षा घातक असते. कारण त्यामूळेच बांधल्या पासून महिन्याभरातच पूल कोसळतात आणि निरपराध लोकांचे जीव जातात. त्यापेक्षा तो पूल न बांधलेलाच बरा. तेव्हा तात्पर्य काम होते आहे म्हणून भ्रष्टाचाराची समस्या निवळते असे मलातरी वाटत नाही.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 15/10/2007 - 13:07
मला वाटते, भ्रष्टाचाराच्या समस्येची गंभीरता त्यांनी नाकारलेली नाही. मात्र गिवन ए चॉय्अस ऍन्ड सिविएरिटी, जातीयवाद भ्रष्टाचारापेक्षा जास्त खतरनाक आणि म्हणूनच अधिक असह्य वाटतो. (अंदाजपंचे)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 15/10/2007 - 23:42
बरोबर. इतकेच बोलुन ते थांबले असते तर पटले असते. असहमती आहे ती दिलेल्या खालिल कारणाला. >>"भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! "

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 20/03/2008 - 18:56
भ्रष्टाचार हा वाईटच. त्याचा संबंध नैतिक/अनैतिकतेशी येतो. त्याची व्याप्ती मोठी असली तरी तो पकडणे/रोखणे काही प्रमाणात शक्य आहे. आणि तो असला तरी प्रगती होऊ शकते. लोकांच्या मनात ह्याविषयी असलेल्या संकल्पनाना मूर्त स्वरुप देता येते. त्या उलट जातीयवादाचे स्वरूप फार सूक्ष्म आहे. आपल्या समाजाशी बांधिलकी कुठे संपते आणि जातीयता कधी सुरु होते ह्यातली सीमारेषा फार अंधुक आहे आणि ती ओळखायला फारच शहाण्या समाजाची गरज आहे. हा रोग फार पूर्वीपासून समाजमनात घट्ट पाळेमुळे रोवलेला आहे तो असा सहजासहजी जाणवणारा, पकडता येणारा, रोखता येणारा नाही कारण त्याचा संबंध भावनांशी आहे. तो कधी, कुठे, कसे डोके वर काढेल कळत नाही. एकदा भावना भडकवल्या की विवेक संपतो आणि त्यानंतर रोग बळावतच जातो. एकमेकाचे पाय खेचण्यात सर्व प्रकारची शक्ती खर्च होते आणि प्रगती थांबते. चतुरंग

आजानुकर्ण 18/10/2007 - 18:12
अँटनी साहेबांचे बरोबर आहे. पहिलीच्या वर्गात सूचना देताना गुरूजी "मुलांनो बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही" असे म्हणतात... त्याचा अर्थ दुसरीतल्या मुलींचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाईल असा थोडाच आहे. - (सूक्ष्मनिरीक्षक) आजानुकर्ण ऑडियन्स बघून त्यांनी ऍडिशन घेतली आहे असे म्हणावे लागेल. - (प्रेक्षक) आजानुकर्ण

सैन्यात भ्रष्टाचार होणे वाईट पण म्हणून सरसकट भ्रष्टाचार वाईट असे म्हणता येणार नाही. लाच देण्याने देणारा आणि घेणारा दोघे ही खुश. कामे पटपट होतात. कामे न करता झोपा काढणारे सरकारी बाबू लोक क्रियाशील होतात. काळा पैसा तिजोरीत पडून न राहता चलनात राहतो. एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 20/03/2008 - 14:41
एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका. हो! मुंबईत करुन टाका.पुण्यात तरी गरज नाही त्याची. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

या बाबतीत चाणक्याचे उदाहरण बघता येईल. चाणक्याच्या कारकिर्दीत प्रवास करणार्‍या चिनी प्रवाशानं लिहून ठेवले आहे की 'चाणक्याच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती, ते काहीतरी काम करीत होते, त्यानी मला बसण्याची खूण केली. थोड्या वेळात काम संपवून त्यानी दिवा विझवला. आणि दुसरा दिवा लावला. मी त्याना असे करण्याचे कारण विचारल्यावर ते उत्तरले 'त्या दिव्यातले तेल सरकारी होते. त्यामुळे सरकारी काम झाल्यावर मी तो दिवा बंद केला. आपण माझे खाजगी पाहुणे असल्यामुळे आपल्याशी बोलताना मी माझ्या खर्चातून आणलेल्या तेलातून दिवा लावला.' अशी निस्पृहता असल्याशिवाय धनानंदासारख्या सम्राटाचा पराभव करून स्वतःचे साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्तासारखा राजा निर्माण करता येत नाही..... पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 20/03/2008 - 10:16
पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीवाद." हे १००% खरे......... अडवाणीचा रामरथ थांबवण्यासाठी व्ही पी सिंग नी मंडल चा जूना पुराणा बासनात पडलेला मुद्द शोधुन काढला आणि भारातच्या भविष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.मंडल मुळे जातीयवाद जास्तच उफाळुन आला. विषेशतः उत्तर भारतात्..सध्या तेथे विकास शिक्षण अन्न पाणी रस्ते हे सर्व जीवनावश्यक मुद्दे जाती च्या मुद्द्यापुढे गौण होतात......या जातियावादाचा फयदा होतो अर्थिक्द्रुष्ट्या प्रगत समाजाला आणि भरडला जातो अशिक्षित समाज........... खरे तर सर्वांगीण शिक्षण हाच भारताच्या विकासाचा मुख्य खांब आहे.त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जातेय "जातीवाद" या जीवनावष्याक? मुद्यापुढे. जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला विजुभाऊ

जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता येत आहे, त्यामुळे हा क्रमांक हळू हळू खाली जाईल असे वाटते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भारतात कोणकोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, हे सांगितले होते.त्यामुळे सैन्यदलातला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, ही बातमी आपण सर्वांनीच हलके घेतली पाहिजे असे वाटते. ट्रान्सपरन्सीचा अहवालात कशाकशावर ठपका ठेवलेला आहे याची माहिती कोणीतरी इथे दिली पाहिजे असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे पहिल्या क्रमांकाचा शत्रू जातीयवाद आहे. भ्रष्टाचार हा दुस-या क्रमांकाचा शत्रू असा अर्थ मी घेईन. पुण्याच्या पेशव्यांनी दिलेला चाणक्यांचा दाखला मी देखील वाचला आहे. प्रा. डॉक्टरसाहेब जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे. ही बातमी फसवी आहे. निष्कर्ष कोणत्या सांख्यिकी विश्लेषणावरून काढला अहे हे आपल्याला ठाऊक नाही. माझ्या माहितीप्रमाणे लाच म्हणून दिलेला पैसा फक्त यात धरला जातो. लाच घेतलेला पैसा नाही. त्यामुळे आनंद नको मानूया. भ्रष्टाचाराची व्याख्या काय? हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. पूर्ण पगार घेऊनहि बॉस नसतांना कामाची टाळाटाळ करणे यालादेखील भ्रष्टाचार म्हणतात. तसेच त्याच पगारावर सेवकाकडून त्याच्या सेवाशर्तीच्या बाहेरील काम करून घेणे हा देखील भ्रष्टाचारच. विजेचा अपव्याय, सार्वजनिक मालमत्तेची हानि करणे (यात घाण करणे आले) हा पण भ्रष्टाचार. परंतु कामगार कायद्यानुसार, (फॅक्टरी ऍक्ट, १९४८) सतत चार तास काम केल्यानंतर विश्रांति न देता एखाद्या सेवकाकडून काम करून घेणे तसेच सलग १२ तासांपेक्षा (यात एक अर्ध्या तासाची सुटी व दोन १५ मिनिटाच्या सुट्यांचा वेळ धरला नाही)काम करून घेणे हाहि भ्रष्टाचार. शाळा, १० पेक्षा कमी सेवकवर्ग असलेल्या व्यापारी आस्थापना, सरकारी व निमसरकारी नोकर, सैनिकी दले या कायद्याखाली येत नाहीत. म्हणून व्याख्या व अपवाद नक्की करायला पाहिजेत. कानिटकरांचे "मला उत्तर हवंय" हे नाटक मला या विषयावर मर्मवेधी वाटले. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विकास 11/10/2007 - 02:55
यात नेमके काय गैर आहे ते कळले नाही. याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही". याचा अर्थ इतर ठिकाणचा भ्रष्टाचार चालेल...म्हणून म्हणले पॉलितीकली इनकरेक्ट विकास

In reply to by विकास

धनंजय 12/10/2007 - 00:31
त्यांना सैन्यातील भ्रष्टाचाराबद्दलच काही करता येते, म्हणून "आपण काय करणार" असे सांगितले असणार. शिवाय, सैन्याचे कुटुंब म्हणून प्रेम असेल, "आमच्या सैन्यात हे खपवून घेणार नाही", तुम्ही बेशिस्त बिगर-सैन्यवाले, तुमचे तुम्ही पाहून घ्या!

बेसनलाडू 12/10/2007 - 02:38
तीन महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलेले ब्रह्मसत्य आठवले. ते असे - "भ्रष्टाचार हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू नाही. भ्रष्टाचारी समाजव्यवस्थेतही संपन्न भारताचे स्वप्न बघणे आणि ते वास्तवात येणे शक्य आहे. थोडक्यात, भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद." अर्थात यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे. असो. (अवांतर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विकास 12/10/2007 - 02:53
यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे. जातीयवादाबाबतचे विधान बरोबर आणि गंभीरपण आहे. भ्रष्टाचाराबाबत "एका अस्वस्थ दशकाची डायरी" लिहीणारे धर्माधिकारी उपहासाने बघतील/बोलतील कदाचीत पण त्यांच्या नजरेत त्याचे गांभिर्य कमी असेल असे वाटत नाही..

In reply to by विकास

बेसनलाडू 12/10/2007 - 06:39
आपल्या जातीयवाद आणि भ्रष्टाचाराबाबतच्या मताशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू अवांतर - प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात माझा प्रतिसाद अवांतर असल्याने तसे म्हटले. असो. (खुलासेवार)बेसनलाडू

In reply to by विकास

आजानुकर्ण 18/10/2007 - 18:14
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक जबरी आहे. - (वाचक) आजानुकर्ण अविनाशदांची लेखनशैली आवडते बॉ. - (गुणग्राहक) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

सर्किट 12/10/2007 - 11:51
धर्माधिकारींशी सहमत आहे ! ही भूमिका उपहासात्मक नाही. २००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता (स्थळ सान्ता क्लारा लायब्ररी), आणि त्यातही ते हेच म्हणाले होते. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास 12/10/2007 - 16:20
२००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता त्याच सुमारास मी पण बॉस्टनमधे त्यांना भेटलो होतो. (नंतर पुण्यातपण भेट झाली होती). त्यांचा तेंव्हा "आपण त्यांच्या समान व्हावे" हा भाषणाचा संच घेतला होता. शिवाजी, विवेकानंद, शाहू महाराज, म. फुले, आंबेडकर, सावरकर, गांधीजी आणि सर्वात शेवटी एक सर्वसामवेषक प्रत्येकी दोन अशा १६ सीडींचा तो संच होता. खूप चांगली आणि वेगळी माहीती (नुसत्याच नेहेमीच्या गोष्टी नाहीत) त्यात त्यांनी सांगीतली होती.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 15/10/2007 - 09:21
भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद. जातीयवाद आणि भ्रष्टाचार ह्या दोन्ही तुलना न करता येण्याइतक्या भिषण समस्या आहेत. "पैसे खायचे तर खाऊ द्या काम तर करता आहेत ना!" ह्या वृत्तीमुळे भ्रष्टाचाराची तिव्रता कमी न होता उलत वाढते असे मला वाटते. कोणत्याही ठीकाणी साधारण १० टक्के लोक हे जन्मत: अतिभ्रष्ट आणि १० टक्के लोक हे जन्मत:च प्रामाणिक असतात. बाकी ८०%च्या कॉन्शंसला मात्र 'पैसे खाल्ले तर काय झाले, काम तर करतो आहे ना!' हे समर्थन मिळते आणि भ्रष्टाचार बोकाळतो. कोणाकडूनतरी पैसे घेऊन केलेले काम, हे काम न करण्यापेक्षा घातक असते. कारण त्यामूळेच बांधल्या पासून महिन्याभरातच पूल कोसळतात आणि निरपराध लोकांचे जीव जातात. त्यापेक्षा तो पूल न बांधलेलाच बरा. तेव्हा तात्पर्य काम होते आहे म्हणून भ्रष्टाचाराची समस्या निवळते असे मलातरी वाटत नाही.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 15/10/2007 - 13:07
मला वाटते, भ्रष्टाचाराच्या समस्येची गंभीरता त्यांनी नाकारलेली नाही. मात्र गिवन ए चॉय्अस ऍन्ड सिविएरिटी, जातीयवाद भ्रष्टाचारापेक्षा जास्त खतरनाक आणि म्हणूनच अधिक असह्य वाटतो. (अंदाजपंचे)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 15/10/2007 - 23:42
बरोबर. इतकेच बोलुन ते थांबले असते तर पटले असते. असहमती आहे ती दिलेल्या खालिल कारणाला. >>"भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! "

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 20/03/2008 - 18:56
भ्रष्टाचार हा वाईटच. त्याचा संबंध नैतिक/अनैतिकतेशी येतो. त्याची व्याप्ती मोठी असली तरी तो पकडणे/रोखणे काही प्रमाणात शक्य आहे. आणि तो असला तरी प्रगती होऊ शकते. लोकांच्या मनात ह्याविषयी असलेल्या संकल्पनाना मूर्त स्वरुप देता येते. त्या उलट जातीयवादाचे स्वरूप फार सूक्ष्म आहे. आपल्या समाजाशी बांधिलकी कुठे संपते आणि जातीयता कधी सुरु होते ह्यातली सीमारेषा फार अंधुक आहे आणि ती ओळखायला फारच शहाण्या समाजाची गरज आहे. हा रोग फार पूर्वीपासून समाजमनात घट्ट पाळेमुळे रोवलेला आहे तो असा सहजासहजी जाणवणारा, पकडता येणारा, रोखता येणारा नाही कारण त्याचा संबंध भावनांशी आहे. तो कधी, कुठे, कसे डोके वर काढेल कळत नाही. एकदा भावना भडकवल्या की विवेक संपतो आणि त्यानंतर रोग बळावतच जातो. एकमेकाचे पाय खेचण्यात सर्व प्रकारची शक्ती खर्च होते आणि प्रगती थांबते. चतुरंग

आजानुकर्ण 18/10/2007 - 18:12
अँटनी साहेबांचे बरोबर आहे. पहिलीच्या वर्गात सूचना देताना गुरूजी "मुलांनो बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही" असे म्हणतात... त्याचा अर्थ दुसरीतल्या मुलींचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाईल असा थोडाच आहे. - (सूक्ष्मनिरीक्षक) आजानुकर्ण ऑडियन्स बघून त्यांनी ऍडिशन घेतली आहे असे म्हणावे लागेल. - (प्रेक्षक) आजानुकर्ण

सैन्यात भ्रष्टाचार होणे वाईट पण म्हणून सरसकट भ्रष्टाचार वाईट असे म्हणता येणार नाही. लाच देण्याने देणारा आणि घेणारा दोघे ही खुश. कामे पटपट होतात. कामे न करता झोपा काढणारे सरकारी बाबू लोक क्रियाशील होतात. काळा पैसा तिजोरीत पडून न राहता चलनात राहतो. एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 20/03/2008 - 14:41
एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका. हो! मुंबईत करुन टाका.पुण्यात तरी गरज नाही त्याची. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

या बाबतीत चाणक्याचे उदाहरण बघता येईल. चाणक्याच्या कारकिर्दीत प्रवास करणार्‍या चिनी प्रवाशानं लिहून ठेवले आहे की 'चाणक्याच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती, ते काहीतरी काम करीत होते, त्यानी मला बसण्याची खूण केली. थोड्या वेळात काम संपवून त्यानी दिवा विझवला. आणि दुसरा दिवा लावला. मी त्याना असे करण्याचे कारण विचारल्यावर ते उत्तरले 'त्या दिव्यातले तेल सरकारी होते. त्यामुळे सरकारी काम झाल्यावर मी तो दिवा बंद केला. आपण माझे खाजगी पाहुणे असल्यामुळे आपल्याशी बोलताना मी माझ्या खर्चातून आणलेल्या तेलातून दिवा लावला.' अशी निस्पृहता असल्याशिवाय धनानंदासारख्या सम्राटाचा पराभव करून स्वतःचे साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्तासारखा राजा निर्माण करता येत नाही..... पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 20/03/2008 - 10:16
पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीवाद." हे १००% खरे......... अडवाणीचा रामरथ थांबवण्यासाठी व्ही पी सिंग नी मंडल चा जूना पुराणा बासनात पडलेला मुद्द शोधुन काढला आणि भारातच्या भविष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.मंडल मुळे जातीयवाद जास्तच उफाळुन आला. विषेशतः उत्तर भारतात्..सध्या तेथे विकास शिक्षण अन्न पाणी रस्ते हे सर्व जीवनावश्यक मुद्दे जाती च्या मुद्द्यापुढे गौण होतात......या जातियावादाचा फयदा होतो अर्थिक्द्रुष्ट्या प्रगत समाजाला आणि भरडला जातो अशिक्षित समाज........... खरे तर सर्वांगीण शिक्षण हाच भारताच्या विकासाचा मुख्य खांब आहे.त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जातेय "जातीवाद" या जीवनावष्याक? मुद्यापुढे. जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला विजुभाऊ

जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता येत आहे, त्यामुळे हा क्रमांक हळू हळू खाली जाईल असे वाटते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भारतात कोणकोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, हे सांगितले होते.त्यामुळे सैन्यदलातला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, ही बातमी आपण सर्वांनीच हलके घेतली पाहिजे असे वाटते. ट्रान्सपरन्सीचा अहवालात कशाकशावर ठपका ठेवलेला आहे याची माहिती कोणीतरी इथे दिली पाहिजे असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे पहिल्या क्रमांकाचा शत्रू जातीयवाद आहे. भ्रष्टाचार हा दुस-या क्रमांकाचा शत्रू असा अर्थ मी घेईन. पुण्याच्या पेशव्यांनी दिलेला चाणक्यांचा दाखला मी देखील वाचला आहे. प्रा. डॉक्टरसाहेब जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे. ही बातमी फसवी आहे. निष्कर्ष कोणत्या सांख्यिकी विश्लेषणावरून काढला अहे हे आपल्याला ठाऊक नाही. माझ्या माहितीप्रमाणे लाच म्हणून दिलेला पैसा फक्त यात धरला जातो. लाच घेतलेला पैसा नाही. त्यामुळे आनंद नको मानूया. भ्रष्टाचाराची व्याख्या काय? हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. पूर्ण पगार घेऊनहि बॉस नसतांना कामाची टाळाटाळ करणे यालादेखील भ्रष्टाचार म्हणतात. तसेच त्याच पगारावर सेवकाकडून त्याच्या सेवाशर्तीच्या बाहेरील काम करून घेणे हा देखील भ्रष्टाचारच. विजेचा अपव्याय, सार्वजनिक मालमत्तेची हानि करणे (यात घाण करणे आले) हा पण भ्रष्टाचार. परंतु कामगार कायद्यानुसार, (फॅक्टरी ऍक्ट, १९४८) सतत चार तास काम केल्यानंतर विश्रांति न देता एखाद्या सेवकाकडून काम करून घेणे तसेच सलग १२ तासांपेक्षा (यात एक अर्ध्या तासाची सुटी व दोन १५ मिनिटाच्या सुट्यांचा वेळ धरला नाही)काम करून घेणे हाहि भ्रष्टाचार. शाळा, १० पेक्षा कमी सेवकवर्ग असलेल्या व्यापारी आस्थापना, सरकारी व निमसरकारी नोकर, सैनिकी दले या कायद्याखाली येत नाहीत. म्हणून व्याख्या व अपवाद नक्की करायला पाहिजेत. कानिटकरांचे "मला उत्तर हवंय" हे नाटक मला या विषयावर मर्मवेधी वाटले. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
खालील बातमीचा मथळा वाचून त्यात काही गैर वाटले का? Corruption has no place in armed forces: Antony याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही". नक्की कुठला नैतीक आधार आपण सैन्यदलास देत आहोत आणि नक्की कुठला आदर्श (निदान बोलण्यात तरी) जनतेसमोर मांडत आहोत?

गांधी जी

विकास ·

सर्किट 02/10/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज 02/10/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास 02/10/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट 03/10/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 02/10/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास 02/10/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट 02/10/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु 02/10/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट 03/10/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या 03/10/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 03/10/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 03/10/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका 02/10/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो 03/10/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे 02/10/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास 03/10/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ 03/10/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास 03/10/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे 03/10/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट 03/10/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव 03/10/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 03/10/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे 03/10/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे 04/10/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा 03/10/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली 03/10/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 03/10/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या 03/10/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 03/10/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण 03/10/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/10/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन 03/10/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज 03/10/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 03/10/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा 04/10/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव 11/09/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे 04/10/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सर्किट 02/10/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज 02/10/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास 02/10/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट 03/10/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 02/10/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास 02/10/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट 02/10/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु 02/10/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट 03/10/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या 03/10/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 03/10/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 03/10/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका 02/10/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो 03/10/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे 02/10/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास 03/10/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ 03/10/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास 03/10/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे 03/10/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट 03/10/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव 03/10/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 03/10/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे 03/10/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे 04/10/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा 03/10/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली 03/10/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 03/10/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या 03/10/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 03/10/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण 03/10/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/10/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन 03/10/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज 03/10/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 03/10/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा 04/10/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव 11/09/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे 04/10/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

सहज ·

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) हे मस्तच! निवडणूकीचा धुरळा उडवायला सुरूवातच केलीत की! आता तात्याला लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार? सल्ला मागायला हवा आता तुमच्या 'सहज कन्सलचंट'कडे..:) स्वाती

विकास 30/09/2007 - 20:12
सहजराव, हा ही लेख मस्त आहे. एक अजून कल्पना: इच्छूक उमेदवारांची "वादविवाद" स्पर्धा ठेवली पाहीजे. त्यात मधे डेमोक्रॅट्स ना जसे यूट्यूब वरून प्रश्न विचारले गेले तसे किंवा कसेतरी प्रश्न विचारले गेले पाहीजेत. त्यात परराष्ट्रीय धोरणचर्चेत इतर संकेत स्थळांशी कसे संबंध ठेवले जातील, कोण कोणाचा (शोधून पण न मिळणारा)बिन लॅडन, कोण कुणाचा मोहम्मद अहमदेनीजाद आहे - थोडक्यात घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला बाहेर कोणाला झोडपणार आहे - ते पण कळणे महत्वाचे वाटते!

सहजराव ! तुम्हाला काय सुचेल त्याचा काय नेम राहिलेला नाही. एक तर निवडणूकीचा विषय काढून तुम्ही थेट मुद्यालाच हात घातला. लवकर म्हणजे आठ एक दिवसात निवडणूक आयोगाने अधिसुचना जाहिर केली पाहिजे,असे आम्हासही वाटू लागले आहे ! इच्छूक पॅनेलप्रमुखांनी आपले चार उमेदवार जाहिर करावे आणि आपला मिसळपावचा जाहिरनामा जाहिर करावा, बाकी मतदारराजांसाठी काय काय करावे तुम्ही सांगितले असल्यामुळे मतदारांकडे उमेदवार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहात असेल.सहजराव, आपले लेखन आणि आपले लेखन कौशल्य संकेतस्थळावरील काही क्षण आनंदात घालवतात हे मात्र नक्की ! आपण असेच लिहित राहा, काही प्रसंग वाचून मात्र ह्सून हसून पुरेवाट झाली बॉ ! जसे ''लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..'' अवांतर ;) सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही ! क्या बात है !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 01/10/2007 - 10:12
निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहिर केली जाईल. तोवर पंचायत समितीला वेगवेगळे नियम करण्याचा हक्क असेल. त्यानंतर तो हक्क निवडणुकीपर्यंत रद्द करण्यात येईल. - (टी. एन.) सर्किट शेषन

विसोबा खेचर 01/10/2007 - 00:00
च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती ह्म्म! चांगली कल्पना आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही! :) ५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा. मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 01/10/2007 - 10:14
मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) ऐकतोय तात्या ! निवडणुक आयोगाला दिलेले टोमणे सहन करण्यात येणार नाहीत. पण एनीवे, भोकराचे लोणचे काही छचोर लोकांना "विस्मरणात गेलेले पदार्थ" वाटत असतील. आम्ही ते रोजच खातो. विस्मरणात कसे जाईल ? - (निवडणुक आयुक्त) सर्किट

राजे 01/10/2007 - 01:17
सहज राव काय सहज पणे लिहता हो.... " संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा" ;} मस्त. कधी जिवनामध्ये विचार केला नव्हता ही असे देखील कधी वाचावे लागेल ह्यांची . खरोखर कमाल केलीत तुम्ही आज. एकदम शतक ? क्या बात है ? खरोखर. * जबरा... ह्यांचे अधिकार भोमेकाकांच्याकडे राखीव आहेत ह्यांची नोंद घ्यावी. राजे (*हेच राज जैन आहेत व ह्यांचा दुसरा कोणताही आई डी नाही आहे ह्याची खात्रीच आहे, खात्री नसेल तर नसेल तर साब को पुछो ..)

सहज 01/10/2007 - 07:49
आभार आभार त्रिवार आभार! स्वातीताई दिनेशराव - बाकी अस जॉइंट अकाऊंट मतदानाला उपयोगी नाही तुमचे "एकमत" असले तरी तरी तुम्ही २ मताधीकारी असून एक अकाऊंट एक मत होते. लवकरात लवकर दिनेश स्वाती असे अकाऊंट काढावे. जर का दिनेश असे खाते असेल तर ते रहीत करून दिनेश स्वाती करायलाच लावावे. स्त्रीवाद ताजा आहे म्हणून थोडे ऍडीशनल स्वगत :- (प्लीज झेला जरा) आपल्या नावापूढे नवर्‍याचेही (लग्न झाले नसल्यास तात्याच्या भाषेत "आवडते पुरूष"चे) नाव लावणार्‍या अनेक असतील पण आपल्या नावापूढे बायकोचीही नाव लावणारे पुरूष आहेत का? (टाळ्या) विकासराव खरे आहे ह्या निवडणूकीच्या एकेका घटकावर असेच लेख लिहता येतील. तुम्ही पण बघा काय जमते का? पण तुम्ही सत्ताधारीतले घटकपक्ष आहात तेव्हा आचारसंहीता भंग होणार नाही त्याची काळजी घ्या. प्रा.डॉ.सर तुमचे कौतुक असे चविष्ट आहे की केवळ त्याकरता लिहावे असे वाटते, जसे आज्जीने रेवडी, सुकामेवा, लेमनची गोळी द्यावी म्हणून तिला स्तोत्र, कवीता, ए,बी,सी, डी. म्हणून दाखवावे तसे आमचे होते आता. खेचरजी - म्हणजे ज्याची खेचायला मजा येते असे जी, आमच्या बाललीला सहन करता म्हणून तुम्ही आमचे आवडते काका! राजेसाब - आता कॉलनीत नाटक बसवले तर भूमीका करणारे कॉलनीतलेच ना म्हणून तुम्हीपण आलात. अफ्टरऑल हम पंछी एक डाल के खरे की नाही महाराज?) पंत - फायलींचा निचरा काढल्यावरच सर्फींग करायचे बर का? :-) तुमच्या डोळ्याला त्रास होतो म्हणून आधीच कमी काम करू देत आहोत. ---------------------------------------------------------------------------------------- मी पक्षःपाती नाही. मी भेदभाव करत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.

In reply to by सहज

सहजराव,दिनेश चा वेगळा अकाऊंट मि पा वर आहे हो, तेव्हा २ मतांची काळजी नको,त्या तिथे पलिकडे,मनोगतावर जेव्हा अकाऊंट उघडला तेव्हा दुसरी कोणी एक स्वाती असल्याने मला स्वाती पुढे दिनेश लावावे लागले,मग आता तेच नाव जालावर घेतले.(सारखे आय डी बदला बिदला नाही हो झेपत!:)) आणि आपल्या नावापुढे बायकोचे नाव लावणारे काही आय डी आहेत त्या तिथे पलिकडे,ती मंडळी मिपावर आली आहेत की नाही हे माहित नाही बॉ.. स्वाती

कोलबेर 01/10/2007 - 09:16
सहजराव, हा लेख म्हणजे तुमचेपण कँपेनींग समजायचे काय? 'कार्ल रोव्ह' आणि 'भोकराचे लोणचे' हे खासच!! :-)

In reply to by कोलबेर

सहज 01/10/2007 - 09:18
वाचली नाही का? निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.

यनावाला 01/10/2007 - 14:26
( ही प्रतिक्रिया केवळ एकाच वाक्याविषयी आहे. लेखातील आशयासंदर्भात नाही.) ................................................................................... श्री.सहज लिहितात :(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) . ................................................................................... इथे असे लिहिणे म्हणजे "सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." असे म्हणणे आहे. उत्तम प्रकारचे ,चांगल्या रंगसंगतीचे, अंगाला व्यवस्थित बसणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालणे (म्ह.काटेकोर व्याकरणशुद्ध लिहिणे ) प्रत्येकालाच जमेल असे नाही हे खरे.पण चार लोकांकडे पाहून, कुणाला विचारून,,स्वच्छ धुऊन (म्ह. लिहिलेले तपासून ) बर्‍यापैकी नीट नेटके कपडे घालणे प्रत्येकाला शक्य असते. ते सोडून उघड्या अंगाने हिंडू लागले तर काही टारगट टाळ्या वाजवतील. पण ते शिष्टसंमत नव्हे. आपल्या घरी कांदापोहे खाताना अंगावर अर्धी चड्डी असणे ठीक .(म्ह. खाजगी बोलणे लिहिणे अशुद्ध चालेल ).पण चारचौघां परिचितांत बसून मिसळपाव खायला हॉटेलात यायचे तर अंगावर ठाकठीक कपडे असणे शिष्टाचाराला धरून होईल.

In reply to by यनावाला

सहज 01/10/2007 - 14:48
चवीला मीठ चिमूटभर मागे पुढे एवढाच अर्थ आहे. आचार्य, मला कृपया सांगा हा लेख उघडाबंब आहे की बर्‍यापैकी झाकला गेलेला, चालेल असा आहे? बाकीचे नंतर.

In reply to by यनावाला

"सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." आपन तर कापडं घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासून संरक्शन व 'इतरांच' लज्जा रक्शन. आमच्या साळंत प्वॉर बिटान तुटल कि टाक 'टाका' मंग लईच फाटली किंवा ईरलि कि डायरेक सोमवार्च्या बाजारात जाऊन जिथं फाटलं आसनं तिथून च बंडी काढायची. मंग नवी बंडी चढवायची. मंग आंघुळ्या करुन घ्यायच्या. प्रकाश घाटपांडे

यनावाला 02/10/2007 - 21:40
श्री. सहज यांच्या लेखाच्या प्रारंभी असलेले वाक्य वाचल्यावर माझा समज झाला की व्याकरणाचे सर्व नियम झुगारून अनियंत्रित लेखनाचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न असावा. कारण त्या वाक्यात श्री. सहज यांनी अनेक चुका हेतुतः केल्या होत्या. तेव्हा पुढचा लेख न वाचताच मी प्रथम प्रतिक्रिया लिहून निषेध नोंदविला. नंतर पूर्ण लेख वाचला तेव्हा लक्षात आले की लेखातील व्याकरण दोष अगदी नगण्य आहेत. लेख उत्तम जमला आहे. काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण लेखन शैलीची आठवण व्हावी इतका चांगला आहे. पूर्ण लेख वाचल्याविना प्रतिक्रिया लिहायला नको होती असे आता वाटते. पण "ही प्रतिक्रिया केवळ एका वाक्यापुरती आहे ." एवढे लिहिण्याची दक्षता घेतली आहे. कोणी व्याकरणनियम धुडकावले की मी जरा उद्विग्न होतो. तरी श्री. सहज यांनी राग मानू नये. ....... यनावाला

सल्ले चांगले आहेत. पुन्हा निवडणुक केव्हा आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सुनील 11/01/2009 - 18:12
मस्त लेख. नजरेतून निसटला होता. गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहजराव, हल्ली लेखणी का हो गुंडाळून ठेवली आहेत? पण जमाना बदल गया है। एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या. अजून काही दिवसांनी प्रतिक्रिया लिहिण्याचे 'काटे क्लासेस' नाही निघाले म्हणजे मिळवलं! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

गोगोल 12/01/2009 - 01:00
"त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. " गरज नाही...ऑनियन राउटिंग करा की राव :)

शंकरराव 12/01/2009 - 05:09
सहजराव कमाल केली लेख लक्षात राहील. असा वाचून सोडून देता येणार नाही. सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही. हे आवडले. ईस्टेट ब्रोकर नाहीत तर :-) शेवटी गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. असेच म्हणतो प्रेषक सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness Freedom gives you happiness to do the things you like

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) हे मस्तच! निवडणूकीचा धुरळा उडवायला सुरूवातच केलीत की! आता तात्याला लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार? सल्ला मागायला हवा आता तुमच्या 'सहज कन्सलचंट'कडे..:) स्वाती

विकास 30/09/2007 - 20:12
सहजराव, हा ही लेख मस्त आहे. एक अजून कल्पना: इच्छूक उमेदवारांची "वादविवाद" स्पर्धा ठेवली पाहीजे. त्यात मधे डेमोक्रॅट्स ना जसे यूट्यूब वरून प्रश्न विचारले गेले तसे किंवा कसेतरी प्रश्न विचारले गेले पाहीजेत. त्यात परराष्ट्रीय धोरणचर्चेत इतर संकेत स्थळांशी कसे संबंध ठेवले जातील, कोण कोणाचा (शोधून पण न मिळणारा)बिन लॅडन, कोण कुणाचा मोहम्मद अहमदेनीजाद आहे - थोडक्यात घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला बाहेर कोणाला झोडपणार आहे - ते पण कळणे महत्वाचे वाटते!

सहजराव ! तुम्हाला काय सुचेल त्याचा काय नेम राहिलेला नाही. एक तर निवडणूकीचा विषय काढून तुम्ही थेट मुद्यालाच हात घातला. लवकर म्हणजे आठ एक दिवसात निवडणूक आयोगाने अधिसुचना जाहिर केली पाहिजे,असे आम्हासही वाटू लागले आहे ! इच्छूक पॅनेलप्रमुखांनी आपले चार उमेदवार जाहिर करावे आणि आपला मिसळपावचा जाहिरनामा जाहिर करावा, बाकी मतदारराजांसाठी काय काय करावे तुम्ही सांगितले असल्यामुळे मतदारांकडे उमेदवार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहात असेल.सहजराव, आपले लेखन आणि आपले लेखन कौशल्य संकेतस्थळावरील काही क्षण आनंदात घालवतात हे मात्र नक्की ! आपण असेच लिहित राहा, काही प्रसंग वाचून मात्र ह्सून हसून पुरेवाट झाली बॉ ! जसे ''लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..'' अवांतर ;) सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही ! क्या बात है !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 01/10/2007 - 10:12
निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहिर केली जाईल. तोवर पंचायत समितीला वेगवेगळे नियम करण्याचा हक्क असेल. त्यानंतर तो हक्क निवडणुकीपर्यंत रद्द करण्यात येईल. - (टी. एन.) सर्किट शेषन

विसोबा खेचर 01/10/2007 - 00:00
च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती ह्म्म! चांगली कल्पना आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही! :) ५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा. मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 01/10/2007 - 10:14
मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) ऐकतोय तात्या ! निवडणुक आयोगाला दिलेले टोमणे सहन करण्यात येणार नाहीत. पण एनीवे, भोकराचे लोणचे काही छचोर लोकांना "विस्मरणात गेलेले पदार्थ" वाटत असतील. आम्ही ते रोजच खातो. विस्मरणात कसे जाईल ? - (निवडणुक आयुक्त) सर्किट

राजे 01/10/2007 - 01:17
सहज राव काय सहज पणे लिहता हो.... " संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा" ;} मस्त. कधी जिवनामध्ये विचार केला नव्हता ही असे देखील कधी वाचावे लागेल ह्यांची . खरोखर कमाल केलीत तुम्ही आज. एकदम शतक ? क्या बात है ? खरोखर. * जबरा... ह्यांचे अधिकार भोमेकाकांच्याकडे राखीव आहेत ह्यांची नोंद घ्यावी. राजे (*हेच राज जैन आहेत व ह्यांचा दुसरा कोणताही आई डी नाही आहे ह्याची खात्रीच आहे, खात्री नसेल तर नसेल तर साब को पुछो ..)

सहज 01/10/2007 - 07:49
आभार आभार त्रिवार आभार! स्वातीताई दिनेशराव - बाकी अस जॉइंट अकाऊंट मतदानाला उपयोगी नाही तुमचे "एकमत" असले तरी तरी तुम्ही २ मताधीकारी असून एक अकाऊंट एक मत होते. लवकरात लवकर दिनेश स्वाती असे अकाऊंट काढावे. जर का दिनेश असे खाते असेल तर ते रहीत करून दिनेश स्वाती करायलाच लावावे. स्त्रीवाद ताजा आहे म्हणून थोडे ऍडीशनल स्वगत :- (प्लीज झेला जरा) आपल्या नावापूढे नवर्‍याचेही (लग्न झाले नसल्यास तात्याच्या भाषेत "आवडते पुरूष"चे) नाव लावणार्‍या अनेक असतील पण आपल्या नावापूढे बायकोचीही नाव लावणारे पुरूष आहेत का? (टाळ्या) विकासराव खरे आहे ह्या निवडणूकीच्या एकेका घटकावर असेच लेख लिहता येतील. तुम्ही पण बघा काय जमते का? पण तुम्ही सत्ताधारीतले घटकपक्ष आहात तेव्हा आचारसंहीता भंग होणार नाही त्याची काळजी घ्या. प्रा.डॉ.सर तुमचे कौतुक असे चविष्ट आहे की केवळ त्याकरता लिहावे असे वाटते, जसे आज्जीने रेवडी, सुकामेवा, लेमनची गोळी द्यावी म्हणून तिला स्तोत्र, कवीता, ए,बी,सी, डी. म्हणून दाखवावे तसे आमचे होते आता. खेचरजी - म्हणजे ज्याची खेचायला मजा येते असे जी, आमच्या बाललीला सहन करता म्हणून तुम्ही आमचे आवडते काका! राजेसाब - आता कॉलनीत नाटक बसवले तर भूमीका करणारे कॉलनीतलेच ना म्हणून तुम्हीपण आलात. अफ्टरऑल हम पंछी एक डाल के खरे की नाही महाराज?) पंत - फायलींचा निचरा काढल्यावरच सर्फींग करायचे बर का? :-) तुमच्या डोळ्याला त्रास होतो म्हणून आधीच कमी काम करू देत आहोत. ---------------------------------------------------------------------------------------- मी पक्षःपाती नाही. मी भेदभाव करत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.

In reply to by सहज

सहजराव,दिनेश चा वेगळा अकाऊंट मि पा वर आहे हो, तेव्हा २ मतांची काळजी नको,त्या तिथे पलिकडे,मनोगतावर जेव्हा अकाऊंट उघडला तेव्हा दुसरी कोणी एक स्वाती असल्याने मला स्वाती पुढे दिनेश लावावे लागले,मग आता तेच नाव जालावर घेतले.(सारखे आय डी बदला बिदला नाही हो झेपत!:)) आणि आपल्या नावापुढे बायकोचे नाव लावणारे काही आय डी आहेत त्या तिथे पलिकडे,ती मंडळी मिपावर आली आहेत की नाही हे माहित नाही बॉ.. स्वाती

कोलबेर 01/10/2007 - 09:16
सहजराव, हा लेख म्हणजे तुमचेपण कँपेनींग समजायचे काय? 'कार्ल रोव्ह' आणि 'भोकराचे लोणचे' हे खासच!! :-)

In reply to by कोलबेर

सहज 01/10/2007 - 09:18
वाचली नाही का? निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.

यनावाला 01/10/2007 - 14:26
( ही प्रतिक्रिया केवळ एकाच वाक्याविषयी आहे. लेखातील आशयासंदर्भात नाही.) ................................................................................... श्री.सहज लिहितात :(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) . ................................................................................... इथे असे लिहिणे म्हणजे "सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." असे म्हणणे आहे. उत्तम प्रकारचे ,चांगल्या रंगसंगतीचे, अंगाला व्यवस्थित बसणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालणे (म्ह.काटेकोर व्याकरणशुद्ध लिहिणे ) प्रत्येकालाच जमेल असे नाही हे खरे.पण चार लोकांकडे पाहून, कुणाला विचारून,,स्वच्छ धुऊन (म्ह. लिहिलेले तपासून ) बर्‍यापैकी नीट नेटके कपडे घालणे प्रत्येकाला शक्य असते. ते सोडून उघड्या अंगाने हिंडू लागले तर काही टारगट टाळ्या वाजवतील. पण ते शिष्टसंमत नव्हे. आपल्या घरी कांदापोहे खाताना अंगावर अर्धी चड्डी असणे ठीक .(म्ह. खाजगी बोलणे लिहिणे अशुद्ध चालेल ).पण चारचौघां परिचितांत बसून मिसळपाव खायला हॉटेलात यायचे तर अंगावर ठाकठीक कपडे असणे शिष्टाचाराला धरून होईल.

In reply to by यनावाला

सहज 01/10/2007 - 14:48
चवीला मीठ चिमूटभर मागे पुढे एवढाच अर्थ आहे. आचार्य, मला कृपया सांगा हा लेख उघडाबंब आहे की बर्‍यापैकी झाकला गेलेला, चालेल असा आहे? बाकीचे नंतर.

In reply to by यनावाला

"सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." आपन तर कापडं घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासून संरक्शन व 'इतरांच' लज्जा रक्शन. आमच्या साळंत प्वॉर बिटान तुटल कि टाक 'टाका' मंग लईच फाटली किंवा ईरलि कि डायरेक सोमवार्च्या बाजारात जाऊन जिथं फाटलं आसनं तिथून च बंडी काढायची. मंग नवी बंडी चढवायची. मंग आंघुळ्या करुन घ्यायच्या. प्रकाश घाटपांडे

यनावाला 02/10/2007 - 21:40
श्री. सहज यांच्या लेखाच्या प्रारंभी असलेले वाक्य वाचल्यावर माझा समज झाला की व्याकरणाचे सर्व नियम झुगारून अनियंत्रित लेखनाचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न असावा. कारण त्या वाक्यात श्री. सहज यांनी अनेक चुका हेतुतः केल्या होत्या. तेव्हा पुढचा लेख न वाचताच मी प्रथम प्रतिक्रिया लिहून निषेध नोंदविला. नंतर पूर्ण लेख वाचला तेव्हा लक्षात आले की लेखातील व्याकरण दोष अगदी नगण्य आहेत. लेख उत्तम जमला आहे. काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण लेखन शैलीची आठवण व्हावी इतका चांगला आहे. पूर्ण लेख वाचल्याविना प्रतिक्रिया लिहायला नको होती असे आता वाटते. पण "ही प्रतिक्रिया केवळ एका वाक्यापुरती आहे ." एवढे लिहिण्याची दक्षता घेतली आहे. कोणी व्याकरणनियम धुडकावले की मी जरा उद्विग्न होतो. तरी श्री. सहज यांनी राग मानू नये. ....... यनावाला

सल्ले चांगले आहेत. पुन्हा निवडणुक केव्हा आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सुनील 11/01/2009 - 18:12
मस्त लेख. नजरेतून निसटला होता. गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहजराव, हल्ली लेखणी का हो गुंडाळून ठेवली आहेत? पण जमाना बदल गया है। एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या. अजून काही दिवसांनी प्रतिक्रिया लिहिण्याचे 'काटे क्लासेस' नाही निघाले म्हणजे मिळवलं! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

गोगोल 12/01/2009 - 01:00
"त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. " गरज नाही...ऑनियन राउटिंग करा की राव :)

शंकरराव 12/01/2009 - 05:09
सहजराव कमाल केली लेख लक्षात राहील. असा वाचून सोडून देता येणार नाही. सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही. हे आवडले. ईस्टेट ब्रोकर नाहीत तर :-) शेवटी गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. असेच म्हणतो प्रेषक सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness Freedom gives you happiness to do the things you like
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.

चकाट्या

ॐकार ·

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट
3