मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

सशस्त्र क्रांति / लढ्याच्या मर्यादा.

कलंत्री ·
मिपावर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल नियमित लेख प्रसिद्ध होत असतात. याचा एक अर्थ सरळ सरळ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकाचे भरीव योगदान आहे. दुसरा अर्थ असाही आहे की भारतीय जनमाणसाला क्रांतिकारकाचे अप्रुप वाटत असले तरी तत्कालिन राजकारणातील मुख्यलढ्याच्या समोर हा लढा तसा निष्प्रभ ठरत होता. पुढील विवेचन करण्याअगोदर काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकतर भारतातील एकंदरीतच सर्वच स्वातंत्र्य सेनानी आदर्शवादाने भारावलेले होते, त्यांचे मनोबल उच्चदर्जाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वर्तन, चरित्र हे निष्कंलक होते.

बुश साहेबांना जोड्यांचा आहेर

भास्कर केन्डे ·
बुश साहेबांना इराकमध्ये जोड्याचा आहेर मिळाल्याची बातमी दोन दिवसांपासून जगभर गाजते आहे. कुठे या प्रकाराला इराकमधील जनतेचा असंतोष म्हटले जात आहे तर कुठे त्या पत्रकाराचा प्रसिद्धी स्टंट. या विषयावर मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायला उत्सुक. जाता जाता - कोणत्या घटनेचा उपयोग कोण कसा करुन घेईल हे सांगणे मात्र मुष्किल. आता हेच पहा ना. या घटनेवर लगेचच एका ब्रिटिश तरुणाने एक खेळ विकसीत करुन आंतरजाळावर टाकला आणि पंचवीस लाखांवर हिट्स मिळवल्या! जगभरातल्या वर्तमानपत्रांप्रमाणे याची माहिती आपल्या मराठी वॄत्तपत्रांत सुद्धा आलेली आहे.

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे "बळी'

अन्वय ·
मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या, पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हा काही मुंबईतील पहिला हल्ला नव्हता; परंतु या वेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित जीवनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे यापूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांपेक्षा ही घटना समाजमनावर अधिक तीव्रतेने आदळली.

एक विलक्षण अनुभव

विनायक पाचलग ·
आय.आय.टी.सारख्या अत्युच्च संस्थेतुन शिक्षण ,एक व्यवसाय,मुळ गाव अगदी साधे.ही माहीती ऐकल्यावर ती व्यक्ती तुम्हाला कोण वाटेल एखादी आय टी प्रोफेशनल किन्वा कष्टातुन भविष्य घडवलेली एखाद्या संस्थेची अध्यक्ष.अह! ती तशी नाही. कारण काल मी या व्यक्तीला भेटलो .ती नोकरी करत नाही आणि तीचा व्यवसाय तर नाहीच नाही मग ती करते तरी काय ?? पुर्णवेळ राजकारण !!!!!!!!!!

इरफान हुसैन

एकलव्य ·
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

पाळणा हलला!

आपला अभिजित ·
`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता. बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले.

कॉंग्रेस

अन्वय ·
निवडणुकीची धामधूम संपली होती निकालांचा घोष झाला... कॉंग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले चोहीकडे जल्लोष होता... ताज, ओबेरॉय, चौपाटी फुलली होती सीएसटीवर होता जयघोष... सरकार हे आमचेच आहे बाबरी पडली, दंगली झाल्या, स्फोट झाले बळी गेले सामान्यांचे... यात कॉंग्रेसचा काही दोष नाही हे तर विरोधकांचे देशविरोधी षडयंत्र आहे पाकबरोबर त्यांचे संगनमत आहे... कुणी अनाथ, कुणी विधवा, कुणी बेघर झाले तेच याला जबाबदार आहेत माणूस बुडो, राज्य बुडो, देश बुडो, जग बुडो कॉंग्रेसचे सरकार चांगले आहे सीएसटीवर जयघोष होता सरकार हे आमचेच आहे ---- जयघोष कानात घुमत असतानाच आली हाळी अरे बंड्या उठ, साडेदहा वाजत आलेत ऑफिसला जायचंय

सुमारांच्या तावडीत...

श्रावण मोडक ·
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

सुनील मोहन ·
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

कोण कोम???

सुनील मोहन ·
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.